* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MERA PARIWAR
  • Availability : Available
  • Translators : VIMAL LIMAYE
  • ISBN : 9788184980080
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NATASHA WAS EVERY INCH A COMMON GIRL, RAISED IN AN ORPHANAGE, A CITIZEN OF RUSSIA, BUT SHE WAS FELICITATED WITH THE AWARD, `CERTIFICATE OF HONOUR`. HER JOURNEY STARTED OUT OF THE LOVE AND CONCERN SHE HAD FOR THE OTHER ORPHANS LIKE HER. AFTER MARRIAGE, SHE AND HER HUSBAND DAVID CAME TO KNOW THAT SHE WOULD NEVER BE ABLE TO CONCEIVE THEIR OWN CHILD. SO, INSTEAD OF CURSING THE DESTINY FOR THEIR BAD LUCK, TOGETHER THEY DECIDED TO DO SOMETHING CONCRETE FOR THE ORPHAN CHILDREN. THEY STARTED SHELTERING THE ORPHANS BY BRINGING THEM HOME, BY BEING THEIR PARENTS. THEY CONTRIBUTED THEIR EFFORTS, MONEY, LOVE; EVERYTHING THEY HAD FOR THE BETTERMENT OF THESE CHILDREN. THIS BOOK REVEALS THE GOOD AND BAD EXPERIENCES THEY HAD DURING THIS JOURNEY.
रशियाचा ‘सर्टिफिकेट ऑफ ऑनर’ हा मानाचा पुरस्कार मिळालेली नटाशा ही खरंतर एक सामान्य रशियन नागरिक, अनाथाश्रमात वाढलेली, परिस्थितीनंही बेताची़ परंतु, अनाथ मुलांविषयी मनात असलेल्या प्रेमाच्या ऊर्मीतून अन् अनाथपणाच्या दु:खातून तिचा जीवनप्रवास सुरू होतो. लग्न झाल्यानंतर मूल होण्याची शक्यता नाही, हे समजल्यावर नटाशा आणि तिचा नवरा डेव्हिड समजूतदारपणानं अन् एकमतानं, परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेली अनाथ मुलं आपल्या घरी आणतात. नटाशा या मुलांची आई बनून त्यांचं पालनपोषण करते, त्यांच्या उत्कर्षासाठी जिवापाड प्रयत्न करते. हे सगळं करत असताना आलेले बरेवाईट अनुभव आणि सहजीवनातील चढउतार यांचं प्रांजळ कथन...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मेरापरिवार #नटालियाअलेक्जेन्द्रोवनाफ्लौमर #विमललिमये #MERAPARIWAR #NATALIAALEXANDEROVNAFLUMMER #VIMALLIMAYE
Customer Reviews
  • Rating StarMILUN SARYAJANI - FEB 2010

    घर असावं घरासारखं मुलं वाढवावी मुलांसारखी ! नटालिया अलेक्जेंद्रोवना फ्लौमरा या सोव्हिएट महिलेची आत्मकथनपर कादंबरी म्हणजे ‘मेरा परिवार’ हे पुस्तक. मूळ रशियन आता हिंदीमधून विमल लिमये यांनी प्रवाही शैलीत मराठीत आणलेलं. ही मुलं त्यांची स्वत:ची नाहीत, त ती दत्त्तक घेतलेली... दत्तक घेण्यासाठी आपल्याकडे त्या मुलाला देण्यासाठी काहीतरी डबोलं - गडगंज संपत्ती असायला हवी या विचाराला हे पती-पत्नी छेद देताना दिसतात. आपल्या मनातला वात्सल्यभाव सत्कारणी लावताना मुलांना उत्तम नागरिक बनवावं ही त्यांची प्रबळ प्रेरणा दिसते. स्वत:च्या मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थितीशी सामना करत नटालिया पाच मुलांना वाढवते, स्वावलंबी आणि सुसंस्कारी बनवते. वाममार्गालासुद्धा लागलेल्या मुलांना न मारता, फार मोठ्या कडक वाटणाऱ्या शिक्षा न करता ती कशी सुधारते आणि त्यांच्यात माणुसकीचं नातं कसं जागवते हे त्या अनुभवातूनच लक्षात येत जातं. शेवटी उद्धृत केलेली ‘घर’ ही विमलताईंची कविता नटालियाच्या घराला समर्पक ठरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more