* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MERA PARIWAR
  • Availability : Available
  • Translators : VIMAL LIMAYE
  • ISBN : 9788184980080
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 144
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NATASHA WAS EVERY INCH A COMMON GIRL, RAISED IN AN ORPHANAGE, A CITIZEN OF RUSSIA, BUT SHE WAS FELICITATED WITH THE AWARD, `CERTIFICATE OF HONOUR`. HER JOURNEY STARTED OUT OF THE LOVE AND CONCERN SHE HAD FOR THE OTHER ORPHANS LIKE HER. AFTER MARRIAGE, SHE AND HER HUSBAND DAVID CAME TO KNOW THAT SHE WOULD NEVER BE ABLE TO CONCEIVE THEIR OWN CHILD. SO, INSTEAD OF CURSING THE DESTINY FOR THEIR BAD LUCK, TOGETHER THEY DECIDED TO DO SOMETHING CONCRETE FOR THE ORPHAN CHILDREN. THEY STARTED SHELTERING THE ORPHANS BY BRINGING THEM HOME, BY BEING THEIR PARENTS. THEY CONTRIBUTED THEIR EFFORTS, MONEY, LOVE; EVERYTHING THEY HAD FOR THE BETTERMENT OF THESE CHILDREN. THIS BOOK REVEALS THE GOOD AND BAD EXPERIENCES THEY HAD DURING THIS JOURNEY.
रशियाचा ‘सर्टिफिकेट ऑफ ऑनर’ हा मानाचा पुरस्कार मिळालेली नटाशा ही खरंतर एक सामान्य रशियन नागरिक, अनाथाश्रमात वाढलेली, परिस्थितीनंही बेताची़ परंतु, अनाथ मुलांविषयी मनात असलेल्या प्रेमाच्या ऊर्मीतून अन् अनाथपणाच्या दु:खातून तिचा जीवनप्रवास सुरू होतो. लग्न झाल्यानंतर मूल होण्याची शक्यता नाही, हे समजल्यावर नटाशा आणि तिचा नवरा डेव्हिड समजूतदारपणानं अन् एकमतानं, परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेली अनाथ मुलं आपल्या घरी आणतात. नटाशा या मुलांची आई बनून त्यांचं पालनपोषण करते, त्यांच्या उत्कर्षासाठी जिवापाड प्रयत्न करते. हे सगळं करत असताना आलेले बरेवाईट अनुभव आणि सहजीवनातील चढउतार यांचं प्रांजळ कथन...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मेरापरिवार #नटालियाअलेक्जेन्द्रोवनाफ्लौमर #विमललिमये #MERAPARIWAR #NATALIAALEXANDEROVNAFLUMMER #VIMALLIMAYE
Customer Reviews
  • Rating StarMILUN SARYAJANI - FEB 2010

    घर असावं घरासारखं मुलं वाढवावी मुलांसारखी ! नटालिया अलेक्जेंद्रोवना फ्लौमरा या सोव्हिएट महिलेची आत्मकथनपर कादंबरी म्हणजे ‘मेरा परिवार’ हे पुस्तक. मूळ रशियन आता हिंदीमधून विमल लिमये यांनी प्रवाही शैलीत मराठीत आणलेलं. ही मुलं त्यांची स्वत:ची नाहीत, त ती दत्त्तक घेतलेली... दत्तक घेण्यासाठी आपल्याकडे त्या मुलाला देण्यासाठी काहीतरी डबोलं - गडगंज संपत्ती असायला हवी या विचाराला हे पती-पत्नी छेद देताना दिसतात. आपल्या मनातला वात्सल्यभाव सत्कारणी लावताना मुलांना उत्तम नागरिक बनवावं ही त्यांची प्रबळ प्रेरणा दिसते. स्वत:च्या मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थितीशी सामना करत नटालिया पाच मुलांना वाढवते, स्वावलंबी आणि सुसंस्कारी बनवते. वाममार्गालासुद्धा लागलेल्या मुलांना न मारता, फार मोठ्या कडक वाटणाऱ्या शिक्षा न करता ती कशी सुधारते आणि त्यांच्यात माणुसकीचं नातं कसं जागवते हे त्या अनुभवातूनच लक्षात येत जातं. शेवटी उद्धृत केलेली ‘घर’ ही विमलताईंची कविता नटालियाच्या घराला समर्पक ठरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more