* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VIPULACH SRUSHTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660678
  • Edition : 9
  • Publishing Year : 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
  • Available in Combos :KISAN DIWAS OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANY THINK THAT MODERN SCIENCE IS SOME VERY EXPENSIVE BUSINESS. ON THE CONTRARY, IN RELATION WITH THE AGRICULTURE MODERNIZATION MEANS UNDERSTANDING THE SECRETS OF NATURE AND USING THEM FOR THE BEST BENEFIT, WHILE INCREASING THE YIELD OF THE NATURE AND AUTOMATICALLY OF THE PRODUCE. FOR THIS, WE NEED TO COME TOGETHER, STUDY THE CROPS AND LAND TYPES IN OUR AREA, EXPERIMENT ON IT, AND THEN FIND OUT SUITABLE CONCLUSION TO GIVE BENEFIT TO ALL. WE REALLY WISH TO HAVE PROSPERITY, HAPPINESS AND FREEDOM, BUT WE FAIL TO UNDERSTAND THAT THE NATURE, THE SURROUNDINGS, AND OUR ENVIRONMENT ALL ARE WILLING TO SHOWER ALL GOOD THINGS UPON US. WE CAN WORK ON OUR NEW TECHNIQUES AND YET HELP THE NATURE. IN THE WESTERN COUNTRIES, THESE DAYS THE NEW SLOGAN IS `WE WITH OUR HAPPINESS, SATISFACTION, SURROUNDING, AND ENVIRONMENT SHALL LIVE IN PROSPERITY AND HARMONY`. WE NEED TO WORK ON SUCH LINES FOR THE BENEFIT OF OUR COUNTRY. IN THIS BOOK WE ARE GOING TO LEARN ABOUT VARIOUS SMALL EXPERIMENTS THAT WILL SURELY HELP US TO IMPROVE THE QUALITY AND QUANTITY OF OUR YIELD.
टाकाऊ पदार्थ कसे खत बनत असतात व त्यातून त्याच वेळी निसर्गातील कार्बनचक्र, नत्रचक्र या चक्रांना योग्य गती कशी मिळते... योग्य वनस्पतिसृष्टीशी हातमिळवणी केली तर पुन्हा आपणास उपयुक्त असे अनेक नवनवे पदार्थ कसे मिळविता येतात... शेतातील काढलेले तण शेतातच परत कसे गेले पाहिजे...आपल्या परिसरातील वनस्पती, प्राणी इत्यादी सजीवसृष्टीने टाकाऊ म्हणून टावूÂन दिलेल्या सर्व घटकांचे, आपल्या नव्या गरजा भागवण्यासाठी वापर करण्याचे शास्त्र सप्रयोग सांगणारे... परिसरात वाNयावर उधळला जाणारा पालापाचोळा व शेताच्या बांधावर कुजून पडलेले गहू, ज्वारीची धाटे, कांडे-धसकटे व टरफले आपल्या परिसराशी काहीतरी नेमके नाते सांगत आहेत याची जाणीव देणारे... कृषिवैज्ञानिक समाजजीवनाची स्थिर पायाभरणी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIPULACHSRUSHTI #विपुलाचसृष्टी #AGRICULTURE #MARATHI #SHRI.A DABHOLKAR श्री.अ.दाभोळकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL NASHIK 22-01-1990

    काही माणसं प्रयोगशील असतात. समृद्धीचा मार्ग प्रयोगातून जात असतो, हे ते आपल्या प्रयोगातून इतरांना दाखवून देतात. प्रयोगशीलता हा गुण अनेकांनी आत्मसात केल्यास ‘आपल्याच सृष्टीत असलेले विपुल धन’ आपल्या सर्वांना सुख-समृद्धीकडे नेईल यात शंकाच नाही, परंतु यासठी प्रथम आपणाला ‘प्रयोग’ परिवारात जावे लागेल आणि याच परिवारातील श्री. अ. दाभोळकरांचे ‘विपुलाच सृष्टी’ हे पुस्तक वाचावे लागेल. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा असलेला मानव नाही म्हटलं तरी जास्त प्रयोगशील झालेला आहे, संगीताच्या सहवासात पिकांची वाढभरघोस होते, हे काही आता नवीन राहिले नाही; परंतु अलीकडेच विद्युत क्षेत्राच्या सानिध्यात पिके चांगली येतात, असे दिसून आले आहे. परंतु आज परदेशात मात्र जमिनीसाठी व पिकासाठी वापरली जाणारी रासायनिक खते, किटकनाशके, औषधे, यांच्याविरुद्ध कृषी विचाराची एक नवी वैज्ञानिक लाट आली आहे. रासायनिक खतांच्या चांगल्या परिमाणापेक्षा वाईट परिणामांना जास्त तोंड द्यावे लागत असल्याने ‘जुने ते सोने’ या विचारानुसार विविध प्रयोगामार्फत परत जुनी सेंद्रिय खते व बियाणे कृषी क्षेत्रात वापरात येऊ लागली आहेत, याचे विवेचन या पुस्तकात आहे. लेखकाने सांगितलेल्या फेबर, जीन पेन, मासा नोबू फुकुओका वगैरेंच्या प्रयोगामुळे कॉग्रेस गवताला नाके मुरडणारेसुद्धा ‘माझ्या अंगणात कॉग्रेस फुलवला’ असे सांगू लागतील. गच्चीत निवडुंग लावणारे त्याच गच्चीत फळांचे भरघोस पीक घेतील. परंतु यासाठी ‘विपुलाच सृष्टी’ हे पुस्तक एकदा तरी उघडावे लागेल. निसर्ग हा आपला मित्र आहे. तो आपल्याला मदत करण्यास सदैव तयार असतो. त्याच्याशी हात मिळवणी करून त्याची रहस्ये जाणून घेतली पाहिजेत. निसर्गात घडणाऱ्या घटनांचे डोळसपणे निरीक्षण करून, त्यांचा उपयोग करून घ्यावा. पावसाळ्यात कुजणारा साधा पाला-पाचोळा, काटक्या किती उपयोगी आहेत हे सांगताना लेखक म्हणतो, ‘‘असा कुजलेला पाला-पाचोळा झाडाच्या मुळांच्या वाढीस उपयुक्त असणारे घटक बनवीतात. शिवाय हवेतील ओलावा ओढून घेण्याच्या त्याच्या शक्तीमुळे तो जमिनीचा ओलावा टिकवून ठेवतो.’’ जमिनीतील तण टाकाऊ नसून, धनाइतकेच मौल्यवान आहे. त्यांच्यामार्फत पिकांना आवश्यक ते सूक्ष्म घटक पुरविले जातात. शेतातल्या वा बागेतल्या काटक्या-कुटक्या, पाला-पाचोळा, कंपोस्ट खत वापरून केलेल्या ढिगावर कोणतेही रासायनिक खत न वापरता चांगले पीक येते याची सचित्र माहिती पुस्तकात आहे. जीन पेनच्या प्रयोगानुसार रंधलेले लाकूड, बारीक केलेला काटुकफाटा भिजवून व कृत्रिमरित्या कुजवून त्यापासून उत्तम खत, बायोगॅस व वीजही मिळविता येते. फुकुओका या जपानी शास्त्रज्ञाच्या ‘पेरा, फिरा, कापणी करा व काड तेथेच फिसकरा’ या भातशेतीच्या वेगळ्या प्रयोगाने भाताचे उत्पन्न वाढते हे दाखवून दिले आहे. फुकुओकाचे तत्त्व वापरून रानझाडाप्रमाणे भाजीपाल्याचीही लागवड करता येते. पॉडिचेरी येथील अरिंवद आश्रमातील अ‍ॅटोव्हिले आश्रमवासियांनी उजाड जमिनीचा कायापालट करता येतो हे दाखवून दिले आहे. यासंबंधीची माहिती मोठी उद्बोधक वाटते. आपल्या अनेक प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण सभोवतालचा परिसरच करतो. फक्त त्यासाठी थोडीशी वैज्ञानिक साक्षरता संपादिली पाहिजे. आधुनिक विज्ञानाचा समजून उपयोग केला तर दहा आर जमिनीवर पाच माणसांच्या कुटुंबाचा निर्वाह होऊ शकतो, याचे सविस्तर विवेचन लेखकाने केलेले आहे. पुस्तकाचा शेवट लेखकाने स्वत:च्या मनोगताने केला आहे. हौशी शेतकऱ्यांना व शेतात विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना हे पुस्तक उपयुक्त वाटेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more