* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHAND BAGECHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985207
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : MARATHI
  • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IF YOU HAVE A SMALL GARDEN IN THE SMALL COURTYARD IN FRONT OF THE BUNGALOW OR DOOR, THEN IT FEELS GREAT. SO MUCH SO, EVEN IN THE FLAT GALLERY, IN THE WINDOW GRILLS OR IN A CORNER OF THE HOUSE, IF YOU PLANT A SPIDER OR A FLOWER GARDEN, THE BEAUTY OF THE HOUSE INCREASES AND IS LAVISH. BUT THEN, THE QUESTION IS, HOW TO PREPARE A GARDEN IN SPACE? WHAT DO YOU WANT TO DO? AND ONCE THE GARDEN IS READY, HOW TO MAINTAIN IT PROPERLY, HOW TO TAKE CARE OF IT? YOU WILL FIND ANSWERS TO ALL OF THE ABOVE QUESTIONS IN THIS BOOK. THIS INCLUDES VARIOUS TYPES OF GARDEN, HOW TO CHOOSE THE PLANTS ACCORDING TO THE SPACES, HOW TO DO BONSAI, HOW TO USE FERTILIZER-PESTICIDES, VARIOUS TYPES OF FLOWERING, ETC. THEREFORE, THIS BOOK WILL DEFINITELY BE USEFUL FOR NATURE-SEEKERS, AS WELL AS FOR
बंगल्याच्या अंगणात किंवा दारासमोरच्या लहानशा जागेत छोटीशी बाग असेल तर छान वाटतं. इतकंच काय, तर अगदी फ्लॅटमधल्या गॅलरीत, खिडक्यांच्या ग्रिल्समध्ये किंवा घराच्या एखाद्या कोप-यात, जागेनुसार एखादं रोप किंवा फुलझाडं लावल्यास घराची शोभा तर वाढतेच व प्रफुल्लितही वाटतं. पण मग प्रश्न पडतो की, जागेनुसार बाग तयार करायची कशी? त्यासाठी काय तयारी करायची? आणि एकदा का बाग तयार झाली की, ती नीट कशी ठेवायची, तिची काळजी कशी घ्यायची? वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील. यात बागांचे विविध प्रकार, जागेनुसार झाडांची निवड कशी करावी, बोन्साय कसे करावे, खतं-कीटकनाशकं कशी वापरावीत, पुष्परचनेचे विविध प्रकार कोणते इत्यादी विषयांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी, तसेच जिज्ञासूंसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHANDBAGECHA #CHANDBAGECHA #छंदबागेचा #TECHNOLOGYENGINEERINGAGRICULTURE #MARATHI #SUNITIMANGESHDESHMUKH #सुनीतीमंगेशदेशमुख "
Customer Reviews
  • Rating Starरमेश मोहिते

    आप्तस्वकियांचा अकाली मृत्यू, व्यवसायातील अपयश, अपेक्षाभंग, सेवानिवृती नंतरचे रिकामेपण आदि कारणामुळे आलेले नैराश्य या समस्येची उकल करणारे सलग सहा पुस्तक परिचय करून दिल्यानंतरही, समस्या निवरणाचा अजूनही एक पर्याय सुचवू इच्छितो तो म्हणजे, आपल्या आवडीच्य एखाद्या छंदात गुंतून राहणे. सेवानिवृती नंतर मी बागकामात गुंतवून घेतल्यामुळे, बागकाम संदर्भातीलच एखाद्या पुस्तकाचा परिचय करून देवून या अभियानातील माझ्या सहभागाची सांगता करण्याचे ठरविले. या संदर्भातील बरीच पुस्तके वाचली होती पण आजवर परिचय करून दिलेल्या पुस्तकांच्या तुलनेत ती फारसी भावली नाहीत. शेवटी आपल्या ग्रुपवरील,या क्षेत्राशी निगडीत असलेल्या बावचकर सरांशी संपर्क साधला, त्यांनी संगितलेल्या क्लू वरुन हे पुस्तक काल, कोविड बंद काळात, दस्तुतखुद्द लेखिके कडूनच मिळविले. मी कृषिपदवीधर असल्यामुळे बागकाम या क्षेत्राची थोडीफार माहिती असली तरीही, आज सौ. सुनीति देशमुख यांचे ” छंद बागेचा ” हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र, मी ,आमच्याच बागेत किती चुका केल्या आहेत हे लक्षात आले. केवळ पुस्तकी ज्ञानावरच कोणत्याही क्षेत्रात लगेचच प्रावीण्य प्राप्त होत नसले तरीही, संबंधित विषयाची माहिती वाचून, त्या क्षेत्रात गोडी निर्माण झा/केली तर आपण, अगदी राष्ट्रीय स्तरापर्यन्त आपली ओळख निर्माण करू शकतो याचे उदाहरण म्हणजे या पुस्तकाच्या लेखिका. पण,“अति परिचयात अवज्ञा” असे काहीसे, लेखिके बाबत झाल्याकडून झाले. नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची सुधारित तिसरी आवृति २०१८ मध्ये, मेहता पब्लिसिटी हाऊस सारख्या नामांकित प्रकाशन संस्थेने प्रकाशित करूनही, हे पुस्तक काल पर्यन्त मलाही परिचित नव्हते. कदाचित लेखिकेचे , बोनसाय(वामनवृक्ष), बोनसाय म्युरल, ट्रे लँडस्केप, रॉक प्लांटिंग, पुष्परचना,इकेबाना, जपानी बगीचा आदिच्या कार्यशाळा, व्याख्याने आणि लेख हे फक्त, आर्थिक उच्चत्तरातील लोकांसाठीच आहेत असा गैरसमज करून घेतल्यामुळे हे झाले असावे. विशेष म्हणजे लेखिकेस, आपल्या घराभोवतालची बाग तसेच वर नमूद केलेल्या सर्व नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी, कैकवेळा मिळालेल्या पारितोषक वितरण समारंभात, विविध संस्थांनी दिलेल्या सन्मानपत्र सोहळ्यात प्रत्यक्ष हजर राहूनही माझ्या कडून हे घडले आहे. असो. चार विभागात विभागलेल्या या पुस्तकाच्या पहिल्या विभागात, बागेचा इतिहासात, ज्यात बुद्ध, महावीर, रामायण,महाभारत काळातील पुष्पवाटिका, पासून शालीमार, मुगल गार्डन,ते अद्ययावत बागांची माहिती, बागेची आखणी (ले आऊट) कशी असावी, लॉन, गच्चीवरील बाग, वॉटर फॉल, रोपवाटिका,अभिवृद्धी- कलम करून नवी रोपे बनविण्याची कला, वॉटर गार्डन, किचन गार्डन, रॉक गार्डन, बागेत वापरायच्या हत्यारांचा परिचय (हा परिचय हत्यारे खरेदी करण्यापूर्वीच होणे आवश्यक आहे), हंगामी फुलझाडे, ऑकिड, नेचे, इनडोअर प्लांट (सावलीतील बाग) शिंकाळी (हँगिंग्ज) तयार करणे, निवडुंग, शुष्क काष्ट (ड्रिफ्ट वूड) तबक बाग (डिश गार्डन),बॉटल गार्डन आदि थोड्याफार ओळखीच्या किंवा अजिबात माहित नसलेल्या विषयांची खूप सोप्या भाषेत माहिती सांगितली दिली आहे. माझ्या मते हे पुस्तक इतक्याच माहितीसह, याच किमतीत, जरी मिळाले, तरीही ,पैसे वसूल झाले असे म्हणता आले असते. दुसर्या विभागात लेखिकेच्या आवडत्या-बोनसाय,बोनसाय म्युरल, ट्रे लँडस्केप, रॉक प्लांटिंग, ट्रे वॉटर गार्डन या विषयाची सविस्तर माहिती आहे. लक्षपूर्वक आणि चिकाटीने करायचे हे काम एकदा जमले की तुम्ही या क्षेत्रातील “मास्टर” झालात असे समजायला हरकत नाही. तिसर्या विभागात- पुष्प रचना,इकेबाणा, पाश्चिमात्य/भितीवरील/पाण्यावरील पुष्प रचना, काळजीपूर्वक समजावून घेवून करू लागलात की हाच छंद व्यवसाय म्हणूनही जमून जाईल/गरजूना सुचवू शकाल. आजकाल शहरी भागात या व्यवसायास मागणी असून, मागणी करणारा वर्ग सधन असल्या मुळे फीच्या रूपाने अर्थार्जन ही होईल. चौथ्या विभागात- पर्यावरणाचे र्हासपर्व,औषधी वनस्पती,रासायनिक खते आणि किटक नाशकांचे दुष्यपरिणाम ,गांडूळ खत निर्मिती,घरा जवळ लावायचे वृक्ष,रोपवाटिका,बागेतील अवजारे आणि काही उपयुक्त माहिती तक्ते दिले आहेत. या पैकी रोप वाटिका या व्यवसायास खूप स्कोप असुन,जवळ जवळ सर्व भारतात,विशेषत: दक्षिण व पुर्व भारतात,लागणार्या रोपा पैकी बहूतेक रोपे ही बेंगलोर परिसर आणि द.गोदावरी जिल्ह्यात तयार होतात. थोडक्यात सांगायचे तर सार्वजनिक, व्यवसायभिमुख आणि घरगुती अशा बागेच्या तीन प्रकारा पैकी घरगुती बागेचे , फ्लॅट धारकांसाठी कुंडीतील,हँगिंग आणि गॅलरीतील बागकाम. रो हाऊस,छोटीघरे असणार्याना, फ्लॅट धारकांचे सर्व प्रकार शिवाय टेरेस गार्डन. आणि घराभोवती जागा असणार्यांसाठी वरील दोन्ही प्रकारा शिवाय परसबाग,कुंपन,मोठे वृक्ष लागवड आदीचा समावेश. असे तीन प्रकार पाडता येतील.या तिन्हीही प्रकारच्या घरात राहणार्याना हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. मी वाचलेल्या अशा आशयाच्या पुस्तकांत हे सर्वाधिक माहितीपूर्ण पुस्तक आहे. ”कोल्हापूर बोनसाय क्लब” च्या अध्यक्षा असलेल्या सौ.देशमुख यांच्या बागकामा संदर्भातील प्रत्यक्ष आणि ऑन लाइन कार्यशाळाही सतत सुरू असतात. पुस्तकातील माहितीच्या आधारे प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात करून, आपल्या अनुभवातूनच पूर्णत्वाकडे जाण्यासाठी, ,याहून उत्तम हंगाम/वेळ असणार नाही . तसेच या निमीत्त कोरोंना काळातील बंदीवासही सत्कारणी लागेल . ...Read more

  • Rating Star LOKPRABHA 4-9-2015

    बागकामाची हौस व छंद यातून वनस्पती संवर्धनाचे शिक्षण घेणे आणि अनेक कार्यशाळा व क्लासेस घेत, ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचे सामाजिक कार्य लेखिका सुनीती देशमुख यांनी ‘छंद बागेचा’ हे पुस्तक लिहून केले आहे. अनेक प्रकारच्या उद्यानपद्धतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास,विकास आणि मार्गदर्शन करत अनेक निसर्गसंवर्धक त्यांनी निर्माण केलेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वैदिक काळापासून ते प्रागैतिहासिक काळापर्यंत म्हणजेच इ. स. पूर्व ५०० ते आत्तापर्यंतच्या काळात उद्यानकलेवर विभिन्न धर्म, संस्कृतीचा प्रभाव पडल्यामुळे त्यात कसे परिवर्तन होत गेले याचे सविस्तर वर्णन ‘बागेचा इतिहास’ या लेखात केले आहे. हिरवळ म्हणजेच कुठल्याही बागेचे हृदय. हिरवळ कशा प्रकारची असावी, त्यासाठी कोणते खत वापरावे, हिरवळीची काळजी कशी घ्यावी, तसेच जुन्या हिरवळीला पुनरुज्जीवित कसे करावे याचे मार्गदर्शन ‘हिरवळ (लॉन)’ मध्ये वाचायला मिळते. कमीत कमी जागेत गच्चीवरील बाग कशी तयार करावी? ती आकर्षक दिसण्यासाठी धबधबा कसा तयार करावा? गच्चीवरील बागेत कोणती झाडे लावावीत? छोट्या रोपांसाठी रोपवाटिका कशी असावी? अभिवृद्धी म्हणजेच रोप कसे तयार करावे? त्याची निगा कशी राखावी? या सर्व प्रश्नांची उकल केली आहे. तसेच अश्मउद्यान म्हणजेच रॉकगार्डनच्या सजावटीचे मार्गदर्शन, बागेत वापरायच्या अलंकारांची (अ‍ॅक्सेसरीज) माहिती, हंगामी फुलझाडांची माहिती व त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, ऑर्किडच्या फुलांची, रोपांची माहिती. इनडोअर प्लँट्स, त्यांची काळजी कशी घ्यायची, हँगिग्जबद्दलची माहिती आहे. कॅक्ट्स व सक्युलंट या निसर्गातील दोन सुंदर पण अंधश्रद्धेमुळे दुर्लक्षिलेल्या झाडाच्या प्रकारांची माहिती. त्यांच्या पोटजातीची माहिती, त्याचबरोबर हे दोन्ही प्रकार जगवण्यासाठी घ्यावयाची काळजी वर्णन केली आहे. शुष्क काष्ठ (ड्रिप्टवूड) म्हणजेच झाडाचा वाळलेला भाग. जंगलातील मेलेल्या झाडाची खोडे, मुळं, फांद्या यांवर खूप दिवस ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक घटकांची प्रक्रिया होऊन विविध आकारांची शुष्क काष्ठे तयार होतात. हे नैसर्गिक ठोकळे बागकामासाठी कसे वापरावे? त्यांची निगा कशी राखावी? त्यात कुठल्या प्रकाराची झाडे लावावी? तबकातील बाग म्हणजेच डिश गार्डन कसे तयार करावे? तसेच काचहंडीतील बगिचा बॉटल गार्डन कसा असावा? या सर्वांची सचित्र माहिती विभाग एकमध्ये दिली आहे. विभाग दोनमध्ये निसर्गाच्या सहवासाच्या आवडीपोटी मोठ्या झाडांना ‘बटुरुप’ देऊन निसर्गातील मोठ्या झाडांना आपल्या बाल्कनीत किंवा बैठकीत आणण्याच्या प्रकाराला ‘बोन्साय’ असे म्हणतात. त्याची सविस्तर माहिती लिहिली आहे. मूळची चीनमध्ये उगम पावलेली ही कला जपानला जाऊन कशी विकसित झाली? याची माहिती. त्याचप्रमाणे भित्तिचित्र म्हणजेच बोन्साय म्युरल, तबकातील देखावा म्हणजेच ट्रेलॅण्डस्केप, दगडावरील झाडे म्हणजे रॉक प्लॉंटिंग, तबकातील जलोद्यान म्हणजेच ट्रे वॉटर गार्डन या विविध प्रकारांत कोणत्या प्रकारची झाडे कशा पद्धतीने लावावी? त्यासाठी कशा प्रकारचे साहित्य वापरावे तसेच नंतर त्याची काळजी कशी घ्यावी यावे विस्तृत मार्गदर्शन केले आहे. विभाग तीनमध्ये सर्व प्रकारच्या पुष्परचनांची माहिती कलात्मकरित्या दिली आहे. भारतीय नृत्यप्रकाराचे हावभाव घेऊन त्या आधारे करता येणाऱ्या पुष्परचनेसाठी सचित्र माहिती दिली आहे. त्याचबरोबर इकेबाना पाश्चिमात्य शैलीची पुष्परचना, भिंतीवरील पुष्परचना, पाण्यावरचा गालिचा, फुले ताजी ठेवण्याच्या युक्त्या, त्याचबरोबर ड्रायप्लॉवर डेकोरेशनचे मार्गदर्शन केले आहे. विभाग चारमध्ये पर्यावरणाचे ऱ्हासपर्वअंतर्गत मानवनिर्मित प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम, त्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय दिले आहेत. परसबागेतील औषधींमध्ये घरातील कुंडीत व बागेत लावता येणाऱ्या विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, त्यांचा विविध आजारांवरील उपयोग याची यादी दिली आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचे दुष्परिणाम कसे टाळावे यावर मार्गदर्शन केले आहे. जैविक व वनस्पतीजन्य किटकनाशकांची उपयुक्त माहिती दिली आहे. गांडूळखत कसे तयार करावे? त्यासाठीच्या साहित्यापासून कृती आणि संवर्धनाची माहिती सचित्र दिली आहे. घराजवळील बागेत नारळ, आंबा यांसारखे मोठे फलवृक्ष कसे लावावे? त्यासाठी जागा किती व कशी असावी? त्या त्या वृक्षासाठी लागणारे हवामान, जमीन, त्याच्या जाती, लागवडीची पद्धत, त्यासाठी वापरायचे खत, त्याला लागणाऱ्या किडींचे प्रकार व त्यासाठी कसे नियंत्रण करावे याची विस्तृत माहिती दिली आहे. रोपवाटिका म्हणजेच नर्सरी कशी असावी? त्याची जोपासना कशी करावी? याचे मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर या बागकामासाठी लागणाऱ्या अवजारांची सूची व त्यांचा उपयोग दिला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी होळीच्या सणाला जी वृक्षतोड होते त्याला पर्याय म्हणून घरच्या घरी छोट्याशा ताटलीत होळी कशी रचावी याचे अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपण झाडे लावण्यास नक्कीच उद्युक्त होऊ आणि हरितक्रांतीला हातभार लावू यात तिळमात्र शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more