* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHAND BAGECHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985207
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : MARATHI
  • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
  • Available in Combos :KISAN DIWAS OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IF YOU HAVE A SMALL GARDEN IN THE SMALL COURTYARD IN FRONT OF THE BUNGALOW OR DOOR, THEN IT FEELS GREAT. SO MUCH SO, EVEN IN THE FLAT GALLERY, IN THE WINDOW GRILLS OR IN A CORNER OF THE HOUSE, IF YOU PLANT A SPIDER OR A FLOWER GARDEN, THE BEAUTY OF THE HOUSE INCREASES AND IS LAVISH. BUT THEN, THE QUESTION IS, HOW TO PREPARE A GARDEN IN SPACE? WHAT DO YOU WANT TO DO? AND ONCE THE GARDEN IS READY, HOW TO MAINTAIN IT PROPERLY, HOW TO TAKE CARE OF IT? YOU WILL FIND ANSWERS TO ALL OF THE ABOVE QUESTIONS IN THIS BOOK. THIS INCLUDES VARIOUS TYPES OF GARDEN, HOW TO CHOOSE THE PLANTS ACCORDING TO THE SPACES, HOW TO DO BONSAI, HOW TO USE FERTILIZER-PESTICIDES, VARIOUS TYPES OF FLOWERING, ETC. THEREFORE, THIS BOOK WILL DEFINITELY BE USEFUL FOR NATURE-SEEKERS, AS WELL AS FOR
बंगल्याच्या अंगणात किंवा दारासमोरच्या लहानशा जागेत छोटीशी बाग असेल तर छान वाटतं. इतकंच काय, तर अगदी फ्लॅटमधल्या गॅलरीत, खिडक्यांच्या ग्रिल्समध्ये किंवा घराच्या एखाद्या कोप-यात, जागेनुसार एखादं रोप किंवा फुलझाडं लावल्यास घराची शोभा तर वाढतेच व प्रफुल्लितही वाटतं. पण मग प्रश्न पडतो की, जागेनुसार बाग तयार करायची कशी? त्यासाठी काय तयारी करायची? आणि एकदा का बाग तयार झाली की, ती नीट कशी ठेवायची, तिची काळजी कशी घ्यायची? वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील. यात बागांचे विविध प्रकार, जागेनुसार झाडांची निवड कशी करावी, बोन्साय कसे करावे, खतं-कीटकनाशकं कशी वापरावीत, पुष्परचनेचे विविध प्रकार कोणते इत्यादी विषयांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी, तसेच जिज्ञासूंसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CHANDBAGECHA #CHANDBAGECHA #छंदबागेचा #TECHNOLOGYENGINEERINGAGRICULTURE #MARATHI #SUNITIMANGESHDESHMUKH #सुनीतीमंगेशदेशमुख "
Customer Reviews
  • Rating Starरमेश मोहिते

    आप्तस्वकियांचा अकाली मृत्यू, व्यवसायातील अपयश, अपेक्षाभंग, सेवानिवृती नंतरचे रिकामेपण आदि कारणामुळे आलेले नैराश्य या समस्येची उकल करणारे सलग सहा पुस्तक परिचय करून दिल्यानंतरही, समस्या निवरणाचा अजूनही एक पर्याय सुचवू इच्छितो तो म्हणजे, आपल्या आवडीच्य एखाद्या छंदात गुंतून राहणे. सेवानिवृती नंतर मी बागकामात गुंतवून घेतल्यामुळे, बागकाम संदर्भातीलच एखाद्या पुस्तकाचा परिचय करून देवून या अभियानातील माझ्या सहभागाची सांगता करण्याचे ठरविले. या संदर्भातील बरीच पुस्तके वाचली होती पण आजवर परिचय करून दिलेल्या पुस्तकांच्या तुलनेत ती फारसी भावली नाहीत. शेवटी आपल्या ग्रुपवरील,या क्षेत्राशी निगडीत असलेल्या बावचकर सरांशी संपर्क साधला, त्यांनी संगितलेल्या क्लू वरुन हे पुस्तक काल, कोविड बंद काळात, दस्तुतखुद्द लेखिके कडूनच मिळविले. मी कृषिपदवीधर असल्यामुळे बागकाम या क्षेत्राची थोडीफार माहिती असली तरीही, आज सौ. सुनीति देशमुख यांचे ” छंद बागेचा ” हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र, मी ,आमच्याच बागेत किती चुका केल्या आहेत हे लक्षात आले. केवळ पुस्तकी ज्ञानावरच कोणत्याही क्षेत्रात लगेचच प्रावीण्य प्राप्त होत नसले तरीही, संबंधित विषयाची माहिती वाचून, त्या क्षेत्रात गोडी निर्माण झा/केली तर आपण, अगदी राष्ट्रीय स्तरापर्यन्त आपली ओळख निर्माण करू शकतो याचे उदाहरण म्हणजे या पुस्तकाच्या लेखिका. पण,“अति परिचयात अवज्ञा” असे काहीसे, लेखिके बाबत झाल्याकडून झाले. नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची सुधारित तिसरी आवृति २०१८ मध्ये, मेहता पब्लिसिटी हाऊस सारख्या नामांकित प्रकाशन संस्थेने प्रकाशित करूनही, हे पुस्तक काल पर्यन्त मलाही परिचित नव्हते. कदाचित लेखिकेचे , बोनसाय(वामनवृक्ष), बोनसाय म्युरल, ट्रे लँडस्केप, रॉक प्लांटिंग, पुष्परचना,इकेबाना, जपानी बगीचा आदिच्या कार्यशाळा, व्याख्याने आणि लेख हे फक्त, आर्थिक उच्चत्तरातील लोकांसाठीच आहेत असा गैरसमज करून घेतल्यामुळे हे झाले असावे. विशेष म्हणजे लेखिकेस, आपल्या घराभोवतालची बाग तसेच वर नमूद केलेल्या सर्व नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी, कैकवेळा मिळालेल्या पारितोषक वितरण समारंभात, विविध संस्थांनी दिलेल्या सन्मानपत्र सोहळ्यात प्रत्यक्ष हजर राहूनही माझ्या कडून हे घडले आहे. असो. चार विभागात विभागलेल्या या पुस्तकाच्या पहिल्या विभागात, बागेचा इतिहासात, ज्यात बुद्ध, महावीर, रामायण,महाभारत काळातील पुष्पवाटिका, पासून शालीमार, मुगल गार्डन,ते अद्ययावत बागांची माहिती, बागेची आखणी (ले आऊट) कशी असावी, लॉन, गच्चीवरील बाग, वॉटर फॉल, रोपवाटिका,अभिवृद्धी- कलम करून नवी रोपे बनविण्याची कला, वॉटर गार्डन, किचन गार्डन, रॉक गार्डन, बागेत वापरायच्या हत्यारांचा परिचय (हा परिचय हत्यारे खरेदी करण्यापूर्वीच होणे आवश्यक आहे), हंगामी फुलझाडे, ऑकिड, नेचे, इनडोअर प्लांट (सावलीतील बाग) शिंकाळी (हँगिंग्ज) तयार करणे, निवडुंग, शुष्क काष्ट (ड्रिफ्ट वूड) तबक बाग (डिश गार्डन),बॉटल गार्डन आदि थोड्याफार ओळखीच्या किंवा अजिबात माहित नसलेल्या विषयांची खूप सोप्या भाषेत माहिती सांगितली दिली आहे. माझ्या मते हे पुस्तक इतक्याच माहितीसह, याच किमतीत, जरी मिळाले, तरीही ,पैसे वसूल झाले असे म्हणता आले असते. दुसर्या विभागात लेखिकेच्या आवडत्या-बोनसाय,बोनसाय म्युरल, ट्रे लँडस्केप, रॉक प्लांटिंग, ट्रे वॉटर गार्डन या विषयाची सविस्तर माहिती आहे. लक्षपूर्वक आणि चिकाटीने करायचे हे काम एकदा जमले की तुम्ही या क्षेत्रातील “मास्टर” झालात असे समजायला हरकत नाही. तिसर्या विभागात- पुष्प रचना,इकेबाणा, पाश्चिमात्य/भितीवरील/पाण्यावरील पुष्प रचना, काळजीपूर्वक समजावून घेवून करू लागलात की हाच छंद व्यवसाय म्हणूनही जमून जाईल/गरजूना सुचवू शकाल. आजकाल शहरी भागात या व्यवसायास मागणी असून, मागणी करणारा वर्ग सधन असल्या मुळे फीच्या रूपाने अर्थार्जन ही होईल. चौथ्या विभागात- पर्यावरणाचे र्हासपर्व,औषधी वनस्पती,रासायनिक खते आणि किटक नाशकांचे दुष्यपरिणाम ,गांडूळ खत निर्मिती,घरा जवळ लावायचे वृक्ष,रोपवाटिका,बागेतील अवजारे आणि काही उपयुक्त माहिती तक्ते दिले आहेत. या पैकी रोप वाटिका या व्यवसायास खूप स्कोप असुन,जवळ जवळ सर्व भारतात,विशेषत: दक्षिण व पुर्व भारतात,लागणार्या रोपा पैकी बहूतेक रोपे ही बेंगलोर परिसर आणि द.गोदावरी जिल्ह्यात तयार होतात. थोडक्यात सांगायचे तर सार्वजनिक, व्यवसायभिमुख आणि घरगुती अशा बागेच्या तीन प्रकारा पैकी घरगुती बागेचे , फ्लॅट धारकांसाठी कुंडीतील,हँगिंग आणि गॅलरीतील बागकाम. रो हाऊस,छोटीघरे असणार्याना, फ्लॅट धारकांचे सर्व प्रकार शिवाय टेरेस गार्डन. आणि घराभोवती जागा असणार्यांसाठी वरील दोन्ही प्रकारा शिवाय परसबाग,कुंपन,मोठे वृक्ष लागवड आदीचा समावेश. असे तीन प्रकार पाडता येतील.या तिन्हीही प्रकारच्या घरात राहणार्याना हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. मी वाचलेल्या अशा आशयाच्या पुस्तकांत हे सर्वाधिक माहितीपूर्ण पुस्तक आहे. ”कोल्हापूर बोनसाय क्लब” च्या अध्यक्षा असलेल्या सौ.देशमुख यांच्या बागकामा संदर्भातील प्रत्यक्ष आणि ऑन लाइन कार्यशाळाही सतत सुरू असतात. पुस्तकातील माहितीच्या आधारे प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात करून, आपल्या अनुभवातूनच पूर्णत्वाकडे जाण्यासाठी, ,याहून उत्तम हंगाम/वेळ असणार नाही . तसेच या निमीत्त कोरोंना काळातील बंदीवासही सत्कारणी लागेल . ...Read more

  • Rating Star LOKPRABHA 4-9-2015

    बागकामाची हौस व छंद यातून वनस्पती संवर्धनाचे शिक्षण घेणे आणि अनेक कार्यशाळा व क्लासेस घेत, ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचे सामाजिक कार्य लेखिका सुनीती देशमुख यांनी ‘छंद बागेचा’ हे पुस्तक लिहून केले आहे. अनेक प्रकारच्या उद्यानपद्धतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास,विकास आणि मार्गदर्शन करत अनेक निसर्गसंवर्धक त्यांनी निर्माण केलेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वैदिक काळापासून ते प्रागैतिहासिक काळापर्यंत म्हणजेच इ. स. पूर्व ५०० ते आत्तापर्यंतच्या काळात उद्यानकलेवर विभिन्न धर्म, संस्कृतीचा प्रभाव पडल्यामुळे त्यात कसे परिवर्तन होत गेले याचे सविस्तर वर्णन ‘बागेचा इतिहास’ या लेखात केले आहे. हिरवळ म्हणजेच कुठल्याही बागेचे हृदय. हिरवळ कशा प्रकारची असावी, त्यासाठी कोणते खत वापरावे, हिरवळीची काळजी कशी घ्यावी, तसेच जुन्या हिरवळीला पुनरुज्जीवित कसे करावे याचे मार्गदर्शन ‘हिरवळ (लॉन)’ मध्ये वाचायला मिळते. कमीत कमी जागेत गच्चीवरील बाग कशी तयार करावी? ती आकर्षक दिसण्यासाठी धबधबा कसा तयार करावा? गच्चीवरील बागेत कोणती झाडे लावावीत? छोट्या रोपांसाठी रोपवाटिका कशी असावी? अभिवृद्धी म्हणजेच रोप कसे तयार करावे? त्याची निगा कशी राखावी? या सर्व प्रश्नांची उकल केली आहे. तसेच अश्मउद्यान म्हणजेच रॉकगार्डनच्या सजावटीचे मार्गदर्शन, बागेत वापरायच्या अलंकारांची (अ‍ॅक्सेसरीज) माहिती, हंगामी फुलझाडांची माहिती व त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, ऑर्किडच्या फुलांची, रोपांची माहिती. इनडोअर प्लँट्स, त्यांची काळजी कशी घ्यायची, हँगिग्जबद्दलची माहिती आहे. कॅक्ट्स व सक्युलंट या निसर्गातील दोन सुंदर पण अंधश्रद्धेमुळे दुर्लक्षिलेल्या झाडाच्या प्रकारांची माहिती. त्यांच्या पोटजातीची माहिती, त्याचबरोबर हे दोन्ही प्रकार जगवण्यासाठी घ्यावयाची काळजी वर्णन केली आहे. शुष्क काष्ठ (ड्रिप्टवूड) म्हणजेच झाडाचा वाळलेला भाग. जंगलातील मेलेल्या झाडाची खोडे, मुळं, फांद्या यांवर खूप दिवस ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक घटकांची प्रक्रिया होऊन विविध आकारांची शुष्क काष्ठे तयार होतात. हे नैसर्गिक ठोकळे बागकामासाठी कसे वापरावे? त्यांची निगा कशी राखावी? त्यात कुठल्या प्रकाराची झाडे लावावी? तबकातील बाग म्हणजेच डिश गार्डन कसे तयार करावे? तसेच काचहंडीतील बगिचा बॉटल गार्डन कसा असावा? या सर्वांची सचित्र माहिती विभाग एकमध्ये दिली आहे. विभाग दोनमध्ये निसर्गाच्या सहवासाच्या आवडीपोटी मोठ्या झाडांना ‘बटुरुप’ देऊन निसर्गातील मोठ्या झाडांना आपल्या बाल्कनीत किंवा बैठकीत आणण्याच्या प्रकाराला ‘बोन्साय’ असे म्हणतात. त्याची सविस्तर माहिती लिहिली आहे. मूळची चीनमध्ये उगम पावलेली ही कला जपानला जाऊन कशी विकसित झाली? याची माहिती. त्याचप्रमाणे भित्तिचित्र म्हणजेच बोन्साय म्युरल, तबकातील देखावा म्हणजेच ट्रेलॅण्डस्केप, दगडावरील झाडे म्हणजे रॉक प्लॉंटिंग, तबकातील जलोद्यान म्हणजेच ट्रे वॉटर गार्डन या विविध प्रकारांत कोणत्या प्रकारची झाडे कशा पद्धतीने लावावी? त्यासाठी कशा प्रकारचे साहित्य वापरावे तसेच नंतर त्याची काळजी कशी घ्यावी यावे विस्तृत मार्गदर्शन केले आहे. विभाग तीनमध्ये सर्व प्रकारच्या पुष्परचनांची माहिती कलात्मकरित्या दिली आहे. भारतीय नृत्यप्रकाराचे हावभाव घेऊन त्या आधारे करता येणाऱ्या पुष्परचनेसाठी सचित्र माहिती दिली आहे. त्याचबरोबर इकेबाना पाश्चिमात्य शैलीची पुष्परचना, भिंतीवरील पुष्परचना, पाण्यावरचा गालिचा, फुले ताजी ठेवण्याच्या युक्त्या, त्याचबरोबर ड्रायप्लॉवर डेकोरेशनचे मार्गदर्शन केले आहे. विभाग चारमध्ये पर्यावरणाचे ऱ्हासपर्वअंतर्गत मानवनिर्मित प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम, त्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय दिले आहेत. परसबागेतील औषधींमध्ये घरातील कुंडीत व बागेत लावता येणाऱ्या विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, त्यांचा विविध आजारांवरील उपयोग याची यादी दिली आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचे दुष्परिणाम कसे टाळावे यावर मार्गदर्शन केले आहे. जैविक व वनस्पतीजन्य किटकनाशकांची उपयुक्त माहिती दिली आहे. गांडूळखत कसे तयार करावे? त्यासाठीच्या साहित्यापासून कृती आणि संवर्धनाची माहिती सचित्र दिली आहे. घराजवळील बागेत नारळ, आंबा यांसारखे मोठे फलवृक्ष कसे लावावे? त्यासाठी जागा किती व कशी असावी? त्या त्या वृक्षासाठी लागणारे हवामान, जमीन, त्याच्या जाती, लागवडीची पद्धत, त्यासाठी वापरायचे खत, त्याला लागणाऱ्या किडींचे प्रकार व त्यासाठी कसे नियंत्रण करावे याची विस्तृत माहिती दिली आहे. रोपवाटिका म्हणजेच नर्सरी कशी असावी? त्याची जोपासना कशी करावी? याचे मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर या बागकामासाठी लागणाऱ्या अवजारांची सूची व त्यांचा उपयोग दिला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी होळीच्या सणाला जी वृक्षतोड होते त्याला पर्याय म्हणून घरच्या घरी छोट्याशा ताटलीत होळी कशी रचावी याचे अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपण झाडे लावण्यास नक्कीच उद्युक्त होऊ आणि हरितक्रांतीला हातभार लावू यात तिळमात्र शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more