* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHETI KARU FAYDYACHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661262
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 300
  • Language : MARATHI
  • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FARMING IS A SCIENCE; IF WE PRACTICE IT SCIENTIFICALLY THEN IT WILL ALWAYS GIVE GOOD RESULTS. INDIAN FARMING IS DEPENDENT UPON THE RAIN AND THE WEATHER CONDITIONS. WE HAVE TRIED TO HANDLE ALL THE TOPICS RELATED TO FARMING RIGHT FROM PLOUGHING TO STORING THE PRODUCE. WE REQUEST YOU TO READ THIS BOOK AT LEAST ONCE AND STEP TOWARDS MAKING MAHARASHTRA SUJALAM, SUFALAM, WHILE PROMISING YOURSELVES TO THINK ABOUT THE MODERN TECHNIQUES OF FARMING AND ACCEPTING THE CHALLENGES IN FARMING.
शेती हे एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे शेती केल्यास ती फायद्याची ठरते. आपली शेती हवामानावर, पावसावर अवलंबून असते. त्यांचा विचार करूनच नांगरटीपासून धान्य-साठवणीपर्यंत सर्व विषय इथे हाताळले आहेत. नव्या शेतीचा विचार करून, नवीन आव्हाने स्वीकारून, शेती फायद्याची करून महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याचा प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्याने करावा, यादृष्टीने हे पुस्तक वाचावे, अशी विनंती आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA

    फायदेशीर शेतीसाठी मार्गदर्शक… शेती हा मानवी जीवनाशी निगडित असलेला विषय आहे. आपली शेती निसर्गावर अवलंबून असते. निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्याचे जबरदस्त नुकसान होत असते. खरे तर शेती हे एक शास्त्र असून आहे त्या परिस्थितीत आहे त्या जमिनीतून शेतकरी ायदेशीर शेती करु शकतो. त्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. त्याच उद्देशाने आ. बा. पाटील यांनी ‘शेती करु फायद्याची’ हे पुस्तक लिहिले. लेखकाचे १९७३ पासून शेतीविषयक लेख विविध वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत आहेत. त्यांचे दै.‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेले लेख एकत्रितपणे पुस्तकाद्वारे आपणासमोर सादर केले आहेत. यात त्यांनी नांगरटीपासून धान्य साठवणीपर्यंतचे सर्व विषय हाताळले आहेत. शेतीत नुकसान दोन कारणांमुळे होऊ शकते. पहिले म्हणजे आपले शेतीकडे दुर्लक्ष किंवा जाणते-अजाणतेपणे आपल्याकडून होणाऱ्या चुका, तर दुसरे कारण बाहेरची प्रतिकूल परिस्थिती आहे. दुसरी परिस्थिती केव्हातरीच उद्भवत असते. त्यामुळेच लेखक पहिल्या कारणास फार महत्त्व देतो. यामध्ये उद्भवणारे दोष दूर करणे आपल्याच हातात असते. त्यात मशागत नीट न करणे, पेरणी वेळेवर व नीट न करणे, खते न देणे, रोगकिडींचा योग्य वेळी बंदोबस्त न करणे आदींमुळे शेतीवर परिणाम होत असतो. शेतीच्या धंद्यात होणाऱ्या चुका आणि इतर धंद्यातील चुकात फरक आहे. इतर धंद्यातील चुका लगेच दुरुस्त करता येतात; परंतु शेतीतील चुकीमुळे वर्ष वाया घालवावे लागते. लेखकाच्या मते यांत्रिक साधनांचा वापर केला म्हणजे ती सुधारलेली शेती होत नाही, तर ती करताना आपणाकडून होणाऱ्या चुका वेळीच जाणून घेऊन उत्पादन जास्तीत जास्त कसे वाढेल याकडे लक्ष दिले तरच ती सुधारलेली होऊ शकते, त्यासाठी लेखक अधिक उत्पादनासाठी विचारात घ्यावयाच्या विविध गोष्टींची आपणास माहिती करून देत आहेत. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे माती परीक्षण करणे. पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालश ही अन्नद्रव्ये जमिनीतून द्यावी लागतात. यातील आपल्या जमिनीत किती प्रमाणात उपलब्ध आहेत व आपणास ती रासायनिक खताद्वारे किती प्रमाणात देणे आवश्यक आहे यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे असते, तसेच या परिक्षणामुळे कोणती पिके चांगल्याप्रकारे घेऊ शकते हे तर कळतेच पण जमीन शेतीयोग्य नसल्यास त्यात सुधारणा घडवण्यास मार्गदर्शनही मिळते. तपासणीसाठी मातीनमुना योग्य तंत्रानेच घ्यावा लागतो. तो कधी व कशाप्रकारे घ्यावा याची माहिती लेखक आपणास करून देतो. सदर तपासणी शासकीय प्रयोगशाळेत विनामूल्य केली जाते. याचा शेतकऱ्यांनी जरूर लाभ घ्यावा. कारण माती परीक्षण हा शेती सुधारणेचा महत्त्वाचा पाया आहे. त्यानंतर लेखक मशागतीची सविस्तर माहिती देतो. पाऊस पडणे आपल्या हाती नसते. पाऊस कमी अथवा त्यास उशीर होत असेल, तर आपण काय करावे, कोणते उपाय योजावे, याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. अशावेळी आपण पिकांना वेळेवर पाणी देऊ शकत नाही, त्यासाठी खुरपणी, कोळपणी व विरळणी महत्त्वाची आहे. खुरपणी, कोळपणीने जमीन हलवली गेल्यामुळे हवा खेळती राहते व बाष्पीभवन थांबते. पेरणी मग ती खरीप, रब्बी अथवा उन्हाळी असो, ती करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. निरनिराळ्या पिकांना निरनिराळ्या प्रकारची पेरणीसाठी योग्य जमीन लागते. बियांचे प्रकार व आकाराप्रमाणे पेरणीची खोली बदलते. तसेच लेखक सुचवतात की, पेरणी पूर्व-पश्चिम करण्याऐवजी दक्षिणोत्तर करावी. कारण यामध्ये पिकांना भरपूर सूर्यप्रकाश मिळून पिकांची वाढ चांगली होती. याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ असतात. आपण कोणती पिके घेणार याचे आधीच नियोजन करून ठेवले पाहिजे, त्यासाठी लागणारे बियाणे खात्रीच्या ठिकाणावरून लवकर आणून ठेवले पाहिजे. सदर पुस्तकात ज्वारी, बाजरी, भात आदीच्या सुधारित जाती व त्यांच्या पेरणीची शास्त्रोक्त माहिती या पुस्तकात आहे. बियाणे निवडताना ते पेरल्यावर निरोगी निपजण्यासाठी त्यांची आधीच काळजी घेणे आवश्यक असते. कारण रोग आल्यानंतर त्यावर उपाय योजण्यापेक्षा तो येऊ नये म्हणून काळजी घेणे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यासाठी विविध उपायांबाबत लेखक आपणास मार्गदर्शन करत आहेत. बियांना औषध लावणे, बी औषधाच्या पाण्यात बुडविणे किंवा बियाण्यावर उष्ण पाण्याची प्रक्रिया आदी उपाय करता येतात. बऱ्याच रोगांचे मूळ बियातच असते. बीजप्रक्रियेमुळे रोगकारक जंतू, बीजाणूंचा नाश होतो. निरनिराळ्या अन्नधान्यांच्या पिकांबरोबरच फळझाडांची लागवड आपण वाढविली पाहिजे. कारण महाराष्ट्रात सर्व प्रकारची फळझाडे चांगल्याप्रकारे येऊ शकतात. आंबा, फणस, पेरू, सीताफळ, नारळ आदी फळांच्या सुधारित जाती आणि त्यांच्या लागवडीच्या योग्य पद्धती दिल्या आहेत, तसेच या फळझाडांवरील विविध रोग व त्यांचा बंदोबस्त कसा करावा याची माहिती दिली आहे. सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. शेतीविषयक विविध क्रांतिकारक शोधांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी अशा पुस्तकांची आवश्यकता आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more