* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHETI KARU FAYDYACHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661262
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 300
  • Language : MARATHI
  • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FARMING IS A SCIENCE; IF WE PRACTICE IT SCIENTIFICALLY THEN IT WILL ALWAYS GIVE GOOD RESULTS. INDIAN FARMING IS DEPENDENT UPON THE RAIN AND THE WEATHER CONDITIONS. WE HAVE TRIED TO HANDLE ALL THE TOPICS RELATED TO FARMING RIGHT FROM PLOUGHING TO STORING THE PRODUCE. WE REQUEST YOU TO READ THIS BOOK AT LEAST ONCE AND STEP TOWARDS MAKING MAHARASHTRA SUJALAM, SUFALAM, WHILE PROMISING YOURSELVES TO THINK ABOUT THE MODERN TECHNIQUES OF FARMING AND ACCEPTING THE CHALLENGES IN FARMING.
शेती हे एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे शेती केल्यास ती फायद्याची ठरते. आपली शेती हवामानावर, पावसावर अवलंबून असते. त्यांचा विचार करूनच नांगरटीपासून धान्य-साठवणीपर्यंत सर्व विषय इथे हाताळले आहेत. नव्या शेतीचा विचार करून, नवीन आव्हाने स्वीकारून, शेती फायद्याची करून महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याचा प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्याने करावा, यादृष्टीने हे पुस्तक वाचावे, अशी विनंती आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA

    फायदेशीर शेतीसाठी मार्गदर्शक… शेती हा मानवी जीवनाशी निगडित असलेला विषय आहे. आपली शेती निसर्गावर अवलंबून असते. निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्याचे जबरदस्त नुकसान होत असते. खरे तर शेती हे एक शास्त्र असून आहे त्या परिस्थितीत आहे त्या जमिनीतून शेतकरी ायदेशीर शेती करु शकतो. त्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. त्याच उद्देशाने आ. बा. पाटील यांनी ‘शेती करु फायद्याची’ हे पुस्तक लिहिले. लेखकाचे १९७३ पासून शेतीविषयक लेख विविध वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत आहेत. त्यांचे दै.‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेले लेख एकत्रितपणे पुस्तकाद्वारे आपणासमोर सादर केले आहेत. यात त्यांनी नांगरटीपासून धान्य साठवणीपर्यंतचे सर्व विषय हाताळले आहेत. शेतीत नुकसान दोन कारणांमुळे होऊ शकते. पहिले म्हणजे आपले शेतीकडे दुर्लक्ष किंवा जाणते-अजाणतेपणे आपल्याकडून होणाऱ्या चुका, तर दुसरे कारण बाहेरची प्रतिकूल परिस्थिती आहे. दुसरी परिस्थिती केव्हातरीच उद्भवत असते. त्यामुळेच लेखक पहिल्या कारणास फार महत्त्व देतो. यामध्ये उद्भवणारे दोष दूर करणे आपल्याच हातात असते. त्यात मशागत नीट न करणे, पेरणी वेळेवर व नीट न करणे, खते न देणे, रोगकिडींचा योग्य वेळी बंदोबस्त न करणे आदींमुळे शेतीवर परिणाम होत असतो. शेतीच्या धंद्यात होणाऱ्या चुका आणि इतर धंद्यातील चुकात फरक आहे. इतर धंद्यातील चुका लगेच दुरुस्त करता येतात; परंतु शेतीतील चुकीमुळे वर्ष वाया घालवावे लागते. लेखकाच्या मते यांत्रिक साधनांचा वापर केला म्हणजे ती सुधारलेली शेती होत नाही, तर ती करताना आपणाकडून होणाऱ्या चुका वेळीच जाणून घेऊन उत्पादन जास्तीत जास्त कसे वाढेल याकडे लक्ष दिले तरच ती सुधारलेली होऊ शकते, त्यासाठी लेखक अधिक उत्पादनासाठी विचारात घ्यावयाच्या विविध गोष्टींची आपणास माहिती करून देत आहेत. सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे माती परीक्षण करणे. पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालश ही अन्नद्रव्ये जमिनीतून द्यावी लागतात. यातील आपल्या जमिनीत किती प्रमाणात उपलब्ध आहेत व आपणास ती रासायनिक खताद्वारे किती प्रमाणात देणे आवश्यक आहे यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे असते, तसेच या परिक्षणामुळे कोणती पिके चांगल्याप्रकारे घेऊ शकते हे तर कळतेच पण जमीन शेतीयोग्य नसल्यास त्यात सुधारणा घडवण्यास मार्गदर्शनही मिळते. तपासणीसाठी मातीनमुना योग्य तंत्रानेच घ्यावा लागतो. तो कधी व कशाप्रकारे घ्यावा याची माहिती लेखक आपणास करून देतो. सदर तपासणी शासकीय प्रयोगशाळेत विनामूल्य केली जाते. याचा शेतकऱ्यांनी जरूर लाभ घ्यावा. कारण माती परीक्षण हा शेती सुधारणेचा महत्त्वाचा पाया आहे. त्यानंतर लेखक मशागतीची सविस्तर माहिती देतो. पाऊस पडणे आपल्या हाती नसते. पाऊस कमी अथवा त्यास उशीर होत असेल, तर आपण काय करावे, कोणते उपाय योजावे, याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. अशावेळी आपण पिकांना वेळेवर पाणी देऊ शकत नाही, त्यासाठी खुरपणी, कोळपणी व विरळणी महत्त्वाची आहे. खुरपणी, कोळपणीने जमीन हलवली गेल्यामुळे हवा खेळती राहते व बाष्पीभवन थांबते. पेरणी मग ती खरीप, रब्बी अथवा उन्हाळी असो, ती करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. निरनिराळ्या पिकांना निरनिराळ्या प्रकारची पेरणीसाठी योग्य जमीन लागते. बियांचे प्रकार व आकाराप्रमाणे पेरणीची खोली बदलते. तसेच लेखक सुचवतात की, पेरणी पूर्व-पश्चिम करण्याऐवजी दक्षिणोत्तर करावी. कारण यामध्ये पिकांना भरपूर सूर्यप्रकाश मिळून पिकांची वाढ चांगली होती. याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ असतात. आपण कोणती पिके घेणार याचे आधीच नियोजन करून ठेवले पाहिजे, त्यासाठी लागणारे बियाणे खात्रीच्या ठिकाणावरून लवकर आणून ठेवले पाहिजे. सदर पुस्तकात ज्वारी, बाजरी, भात आदीच्या सुधारित जाती व त्यांच्या पेरणीची शास्त्रोक्त माहिती या पुस्तकात आहे. बियाणे निवडताना ते पेरल्यावर निरोगी निपजण्यासाठी त्यांची आधीच काळजी घेणे आवश्यक असते. कारण रोग आल्यानंतर त्यावर उपाय योजण्यापेक्षा तो येऊ नये म्हणून काळजी घेणे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यासाठी विविध उपायांबाबत लेखक आपणास मार्गदर्शन करत आहेत. बियांना औषध लावणे, बी औषधाच्या पाण्यात बुडविणे किंवा बियाण्यावर उष्ण पाण्याची प्रक्रिया आदी उपाय करता येतात. बऱ्याच रोगांचे मूळ बियातच असते. बीजप्रक्रियेमुळे रोगकारक जंतू, बीजाणूंचा नाश होतो. निरनिराळ्या अन्नधान्यांच्या पिकांबरोबरच फळझाडांची लागवड आपण वाढविली पाहिजे. कारण महाराष्ट्रात सर्व प्रकारची फळझाडे चांगल्याप्रकारे येऊ शकतात. आंबा, फणस, पेरू, सीताफळ, नारळ आदी फळांच्या सुधारित जाती आणि त्यांच्या लागवडीच्या योग्य पद्धती दिल्या आहेत, तसेच या फळझाडांवरील विविध रोग व त्यांचा बंदोबस्त कसा करावा याची माहिती दिली आहे. सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. शेतीविषयक विविध क्रांतिकारक शोधांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी अशा पुस्तकांची आवश्यकता आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more