D.M.MIRASDAR

About Author

Birth Date : 14/04/1927
Death Date : 02/10/2021


PROF. MIRASDAR WAS BORN ON APRIL 14, 1927 IN AKLUJ VILLAGE OF SOLAPUR DISTRICT. HIS SCHOOL EDUCATION WAS IN PANDHARPUR AND HIS COLLEGE EDUCATION WAS IN S.P. PUNE. DONE IN COLLEGE. HE STARTED HIS PROFESSIONAL CAREER WITH DAI. WORKED AS A JOURNALIST IN INDIA. FOR SOME TIME HE WAS IN NA.C. FADKE WAS WRITING IN THE WEEKLY ZHANKAR.

प्रा.द.मा. मिरासदार यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावी १४ एप्रिल, १९२७ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील स.प. महाविद्यालयात झाले. त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात ‘दै. भारत’मध्ये पत्रकार म्हणून केली. काही काळ ते ना.सी. फडके संपादित साप्ताहिक ‘झंकार’मध्ये लेखन करत होते. १९५२नंतर मात्र त्यांनी शिक्षक म्हणून पंढरपूर व पुणे येथे काम केले. औरंगाबादमध्ये देवगिरी महाविद्यालयात व पुढे पुण्यातील गरवारे महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहून ते निवृत्त झाले. मराठी साहित्यात कथालेखक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण जीवनावर त्यांनी लिहिलेल्या कथा विशेष गाजल्या. मराठी साहित्यात विनोदी साहित्याची परंपरा मोठी आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं.वि. जोशी, पु.ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली विनोदी साहित्याची समृद्ध परंपरा मिरासदारांनी पुढे चालवली; एवढेच नव्हे, तर ग्रामीण वातावरण आणि विनोदी कथा या दोन धारांना एकत्र आणून एक स्वतंत्र वाट तयार केली. मराठी साहित्याला त्यांनी दिलेली ही मोठी देणगी मानली जाते. एकूण २०पेक्षा जास्त कथासंग्रह, रूपांतरित कादंबऱ्या तसेच ‘मी लाडाची मैना तुमची’ हे वगनाट्य आदि लेखन केले. चित्रपटलेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठी कामगिरी केली असून ‘एक डाव भुताचा’, ‘ईर्षा’, ‘ठकास महाठक’, ‘गोष्ट धमाल नाम्याची’ आदि अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. उत्कृष्ट पटकथा संवाद लेखनासाठी त्यांना अनेक महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाले असून लेखक म्हणून त्यांचा ‘गदिमा पुरस्कार’, ‘अत्रे पुरस्कार’, ‘काकासाहेब गाडगीळ पुरस्कार’ तसेच ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच २०१४ सालचा महाराष्ट्र शासनाचा विं.दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. १९९८ साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या ७१व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील व द.मा. मिरासदार यांनी महाराष्ट्रात, देशात तसेच परदेशात कथाकथनांचे हजारो कार्यक्रम करून मराठी कथेला लोकप्रिय केले. लेखनाबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यही केले. अ.भा. विद्यार्थी परिषदेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेली भाषणे गाजली. संस्कार भारतीचे उपाध्यक्ष तसेच मराठी साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 26 total
ANGAT PANGAT Rating Star
Add To Cart INR 170
BENDBAJA Rating Star
Add To Cart INR 160
BHOKARWADICHYA GOSHTI Rating Star
Add To Cart INR 210
BHOKARWADITIL RASVANTIGRUHA Rating Star
Add To Cart INR 160
BHUTACHA JANMA Rating Star
Add To Cart INR 190
CHAKATYA Rating Star
Add To Cart INR 190
CHUTKYACHYA GOSHTI Rating Star
Add To Cart INR 140
22 %
OFF
D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS Rating Star
Add To Cart INR 4060 INR 3160
GAMMATGOSHTI Rating Star
Add To Cart INR 190
GANARA MULUKH Rating Star
Add To Cart INR 50
GAPPAGOSHTI Rating Star
Add To Cart INR 200
GAPPANGAN Rating Star
Add To Cart INR 180
123

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more