D.M.MIRASDAR

About Author

Birth Date : 14/04/1927
Death Date : 02/10/2021


PROF. MIRASDAR WAS BORN ON APRIL 14, 1927 IN AKLUJ VILLAGE OF SOLAPUR DISTRICT. HIS SCHOOL EDUCATION WAS IN PANDHARPUR AND HIS COLLEGE EDUCATION WAS IN S.P. PUNE. DONE IN COLLEGE. HE STARTED HIS PROFESSIONAL CAREER WITH DAI. WORKED AS A JOURNALIST IN INDIA. FOR SOME TIME HE WAS IN NA.C. FADKE WAS WRITING IN THE WEEKLY ZHANKAR.

प्रा.द.मा. मिरासदार यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावी १४ एप्रिल, १९२७ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील स.प. महाविद्यालयात झाले. त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात ‘दै. भारत’मध्ये पत्रकार म्हणून केली. काही काळ ते ना.सी. फडके संपादित साप्ताहिक ‘झंकार’मध्ये लेखन करत होते. १९५२नंतर मात्र त्यांनी शिक्षक म्हणून पंढरपूर व पुणे येथे काम केले. औरंगाबादमध्ये देवगिरी महाविद्यालयात व पुढे पुण्यातील गरवारे महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहून ते निवृत्त झाले. मराठी साहित्यात कथालेखक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण जीवनावर त्यांनी लिहिलेल्या कथा विशेष गाजल्या. मराठी साहित्यात विनोदी साहित्याची परंपरा मोठी आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं.वि. जोशी, पु.ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली विनोदी साहित्याची समृद्ध परंपरा मिरासदारांनी पुढे चालवली; एवढेच नव्हे, तर ग्रामीण वातावरण आणि विनोदी कथा या दोन धारांना एकत्र आणून एक स्वतंत्र वाट तयार केली. मराठी साहित्याला त्यांनी दिलेली ही मोठी देणगी मानली जाते. एकूण २०पेक्षा जास्त कथासंग्रह, रूपांतरित कादंबऱ्या तसेच ‘मी लाडाची मैना तुमची’ हे वगनाट्य आदि लेखन केले. चित्रपटलेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठी कामगिरी केली असून ‘एक डाव भुताचा’, ‘ईर्षा’, ‘ठकास महाठक’, ‘गोष्ट धमाल नाम्याची’ आदि अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. उत्कृष्ट पटकथा संवाद लेखनासाठी त्यांना अनेक महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाले असून लेखक म्हणून त्यांचा ‘गदिमा पुरस्कार’, ‘अत्रे पुरस्कार’, ‘काकासाहेब गाडगीळ पुरस्कार’ तसेच ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच २०१४ सालचा महाराष्ट्र शासनाचा विं.दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. १९९८ साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या ७१व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील व द.मा. मिरासदार यांनी महाराष्ट्रात, देशात तसेच परदेशात कथाकथनांचे हजारो कार्यक्रम करून मराठी कथेला लोकप्रिय केले. लेखनाबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यही केले. अ.भा. विद्यार्थी परिषदेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेली भाषणे गाजली. संस्कार भारतीचे उपाध्यक्ष तसेच मराठी साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 26 total
ANGAT PANGAT Rating Star
Add To Cart INR 240
BENDBAJA Rating Star
Add To Cart INR 160
BHOKARWADICHYA GOSHTI Rating Star
Add To Cart INR 210
BHOKARWADITIL RASVANTIGRUHA Rating Star
Add To Cart INR 250
BHUTACHA JANMA Rating Star
Add To Cart INR 250
CHAKATYA Rating Star
Add To Cart INR 280
CHUTKYACHYA GOSHTI Rating Star
Add To Cart INR 220
22 %
OFF
D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS Rating Star
Add To Cart INR 4750 INR 3697
GAMMATGOSHTI Rating Star
Add To Cart INR 280
GANARA MULUKH Rating Star
Add To Cart INR 50
GAPPAGOSHTI Rating Star
Add To Cart INR 200
GAPPANGAN Rating Star
Add To Cart INR 180
123

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more