* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY NAME IS ERIC
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184985627
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :REI KIMURA COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A "DOGOGRAPHY" WRITTEN FROM THE POINT OF VIEW OF ERIC, AN OUTSPOKEN AND MEMORABLE POMERANIAN. FROM HIS BIRTH ON A REMOTE DOG BREEDING FARM, DEEP INSIDE RURAL NEW SOUTH WALES, AUSTRALIA THROUGH HIS FORMATIVE YEARS IN SINGAPORE AND INTO OLD-AGE, YOU WILL GET TO KNOW, AND LOVE, ERIC AND THE FAMILY THAT RAISES HIM.
एक आठवणीत राहण्यासारख्या स्पष्टवक्त्या पॉमेरियन कुत्र्याच्या, एरिकच्या दृष्टिकोनातून लिहिलेले हे ‘कुत्र्याचे आत्मचरित्र’ आहे. ऑस्ट्रेलियातील साउथ वेल्स भागातील एक छोटे खेडेगाव आणि तेथील कुत्र्यांची निपज करणारे एक दूरवरचे शेत. तिथं जन्म झाल्यापासूून ते सिंगापूरला वाढत्या वयात येऊन म्हातारा होईपर्यंतचा एरिक. आणि ज्या कुटुंबात तो वाढला, ते कुटुंबही तुम्हाला कळेल आणि त्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटू लागेल.रेई किमुरा ही टोकियोत जन्मली आणि तिथंच वाढली. आता ती सिंगापूरमध्ये राहते आणि तिथंच काम करते. ह्या लेखिकेने सिंगापूरमध्ये कायद्याचा अभ्यास केला, तसेच वृत्तपत्रीय शिक्षण ऑस्ट्रेलियात घेतले. एक वकील तसेच जमीन-जुमल्याचा व्यवसाय करणारी आणि खूप कादंब-या लिहिणारी ती एक लेखिका आहे. तिचे लिखाण डच, स्पॉनिश, टंगेरियन, रशियन, पॉलिश, हिन्दी, मराठी, थाई, इंडोनेशियन, कोरियन, जपानी, व्हिएतनामी आणि चायनिज अशा अनेक भाषांतून प्रसिद्ध झालेले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #JAPANESEMAGNOLIA(MARATHI) #JAPANESEMAGNOLIA #जॅपनीजमॅग्नोलिया #FICTION TRANSLATED FROM ENGLISH TO MARATHI NIRMALA MONE निर्मला मोने REI KIMURA रेई किमुरा #JAPANESEORCHID(MARATHI) #AWAMARUTITANICOFJAPAN(MARATHI) #JAPANESEROSE #MIERIC #"
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 20-07-2018

    श्वानांच्या विचारांचे भावचित्र... खरे तर माणसाला तो सोडून निसर्गातले बाकीचे प्राणी सारखेच. तरीही काही प्राण्यांवर त्याचे जरा जास्त प्रेम असते. त्यातलाच एक प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्र्याला माणसाचा मित्र असेच म्हटले जाते. श्वानप्रेमींवर आजवर अनेक साहि्यिकांनी लिहून झालेले आहे. श्वानप्रेमींची लक्षणे, त्यांचे नखरे, त्यांचा जिव्हाळा, ऋणानुबंध अशा अनेक गोष्टी साहित्यातून येऊन गेल्या आहेत. पण प्राणी स्वत:च स्वत:ची गोष्ट सांगतायत, असे थेट साहित्य फारसे वाचनात नसते. अर्थात अशा प्रकारचे चित्रपट आपण पाहिलेले असतात. कार्टून्समधून बोलणारे कुत्रे पाहिलेले असतात. तरीही एखादा कुत्रा स्वत:च स्वत:ची गोष्ट सांगताना कसे वाटेल? ‘मी एरिक’ या पुस्तकात असाच एक मस्त केसाळ पॉमेरियन त्याची गोष्ट सांगतो आहे. ‘माय नेम इज एरिक’ या रेई किमुरा यांच्या पुस्तकाचा अनुवाद आहे. मुळात पुस्तकाचा मूड मस्त खेळकर आहे. ती एका पाळीव कुत्र्याची गोष्ट आहे, त्यामुळे त्याचे लोभस नखरे, त्याच्या कुटुंबावरचे त्याचे प्रेम, किस्से असे सगळे काही आहे. पण हा खेळकर मूडमध्ये हसवणारा कुत्रा त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी अशा सहजपणे सांगून जातो की आपल्या डोळ्यांत नकळत पाणी येते. अगदी सुरुवातच करायची तर पहिल्या प्रकरणात एका श्वान प्रजोत्पादन केंद्रामधील एका एरिकचे आयुष्य आणि आईपासून दूर होताना त्याची अवस्था, याचे वर्णन आपल्याला अस्वस्थ करते. पाळीव प्राण्यांच्या दुकानात गेल्यावर तिथले गोजिरे श्वान, गोबऱ्या मांजरी आपले लक्ष वेधून घेतात. पण आपल्या सुखासाठी या पिलांना त्यांच्या आईपासून वेगळे केले जाते, हे आपल्या लक्षातही येत नाही. ती गोष्ट ‘मी एरिक’चे पहिले प्रकरण सहज सांगून जाते. विमानातून या प्राण्यांची होणारी ने-आण, गैरसोय, त्यामध्ये त्यांना वाटणारी निसर्गसुलभ भीती, त्यांच्या मनाची द्विधा अवस्था सगळे काही एरिक आपल्याला सांगतो. पाळीव प्राण्यांच्या दुकानातून त्याच्या मालकाच्या म्हणजे जेनिफर आणि तानियाच्या घरी आल्यावर मात्र एरिकचे अच्छे दिन सुरू होतात. इथपासून म्हणजे प्रकरण तीनपासून एरिकच्या धम्माल कसरतींना सुरुवात होते आणि पुस्तकातील खेळकरपणा, गंमत परत येते. एरिकचा स्वभाव, त्याचे मालकिणीला म्हणजे त्याच्या भाषेत त्याच्या मानवी आईला आपल्या तालावर नाचवणे, घरातील इतर माणसांसोबतचे त्याचे नातेसंबंध, पिंजऱ्यातून घरी जाण्यासाठी त्याने श्वानसुलभ भावनेने घरच्या लेकीला लावलेला मस्का अशा सगळ्या गोष्टी मजा आणतात. एरिकचा आगाऊपणा, त्याचे कचऱ्याचे वेड, धुण्याच्या कपड्यांचा त्याने केलेला उकिरडा या गोष्टी या कुत्र्याबद्दल राग वाटू न देता त्याच्याबद्दलचे प्रेमच जागृत करतात. एरिकच्या अशक्य दंग्याला कंटाळून त्याला आज्ञापालन केंद्रात दाखल केले जाते. तिथला किस्साही धम्माल आणतो. एरिकचा शेजारी असलेल्या ‘कोल’ या जर्मन शेफर्डसोबतची त्याची खुन्नस, त्याचा कोलने काढलेला राग, एरिकला झालेला अपघात, श्वानसौंदर्य स्पर्धेत खट्याळ एरिकने घातलेला गोंधळ या सगळ्या गोष्टी हसू आणतात. एरिकचे सामर्थ्य आणि तथाकथित पुरुषार्थ दाखवणारे तसेच त्याच्या आगाऊपणामुळे त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीचे प्रकरण वाचनीय आहे. दोन्ही प्रकरणांत एरिक आपल्या लहान असण्याची काळजी न करता उद्योग करून बसतो आणि मग त्याला त्याचे परिणाम भोगायला लागतात. पहिल्या प्रकरणात एरिक घरात शिरलेल्या चोराच्या पायाचा कडकडून चावा घेतो आणि त्याला पळवून लावतो. त्याच्या धाडसाचे खूप कौतुक होते; परंतु त्याला झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागते, तर दुसऱ्या प्रसंगात एरिक घरात कुणी नसताना हट्टाने उड्या मारतो आणि पायाचा घोटा दुखावून बसतो. मरणाच्या दारातून अनेकदा परत आलेला एरिक त्याच्या कुटुंबीयांना अधिकाधिक हवासा होत जातो तसाच आपल्यालाही. संपूर्ण पुस्तकात एक गोष्ट सतत येते, ती म्हणजे एरिकला त्याच्या ऑस्ट्रेलियन वंशाची, आईची येणारी आठवण. माणूस कुठेही गेला तरी त्याला त्याचे बालपण आठवतेच. तो ते विसरू शकत नाही. कुत्र्यांचेही असेच असेल का, अशी एक पुसटशी शंका यामुळे येऊन जाते. रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून त्यांची नसबंदी केली जाते. अनेक पाळीव कुत्र्यांबाबतही मालक तोच निर्णय घेतात. कुत्र्यांचे खच्चीकरणही केले जाते. ही गोष्ट प्राणिमित्रांना पटत नाही, त्याबद्दल खरे तर फारसे बोललेच जात नाही. कारण जिथे मानवाच्या लैंगिकतेबद्दल बोलणेच कठीण तिथे प्राण्यांबद्दल कोण बोलणार? पण पुस्तकातला एरिक मात्र त्याच्या खच्चीकरणाच्या अनुभवाबद्दल सविस्तर लिहितो. त्यात शेवटी तो म्हणतो, हे होणे कुत्र्यांसाठी आणि त्याहीपेक्षा कुत्र्यांच्या जवळच्या मित्रासाठी म्हणजे माणसासाठी फार महत्त्वाचे असते. अशी वाक्ये विचारात पाडतात. श्वानप्रेमींबरोबरच इतरांनाही हे पुस्तक आवडू शकेल. कारण नुसतेच ‘आमचा टॉम्या बाई गुण्णाचा!’ असे भारावलेले हे पुस्तक नाही. त्याला कुत्र्याच्या मनातील प्रत्यक्ष विचारांची जोड आहे, अर्थात कल्पनेतल्याच. माणसांसाठी अनभिज्ञ अशा कुत्र्यांच्या विचारांचे भावचित्र रेखाटणारे हे पुस्तक एकदा वाचावे, असे नक्कीच आहे. स्नेहल जोशी यांनी पुस्तकाचा अनुवादही चांगला केला आहे. -स्वाती केतकर-पंडित ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 23 -11 -2014

    मेंदू शेंगदाण्याच्या आकाराचा असूनही मी पटपट शिकणारा आहे, असे आठवड्याच्या शेवटी जाहीर करण्यात आले, परंतु खरंच जर का माझ्या शेंगदाण्याच्या आकाराच्या मेंदूत ते डोकावून पाहू शकले असते, तर त्यांना हे कळले असते की, मी त्यांच्या मताप्रमाणे वागतोय, ते मी त्यंची आज्ञा पाळावी या जाणिवेने नव्हे; तर माझ्या सोईसाठी मला ते करावेसे वाटते म्हणून! .... विचार करणे, आठवून गोष्टी करणे, हृदयाला जाणवणे आणि प्रेम करणे.... यासाठी देवाने आम्हाला मेंदू दिला आहे. भले, तो मेंदू दुसऱ्यांच्या मेंदुपेक्षा थोडा लहान आहे!.... त्यामुळे ‘निव्वळ कुत्रा’ असे म्हणण्यामागे लोकांना काय अभिप्रेत असते?.....इति एरिक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more