* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STONES INTO SCHOOLS
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184984354
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FROM THE AUTHOR OF THE PHENOMENAL NO.1 BESTSELLER THREE CUPS OF TEA, THE CONTINUING STORY OF THIS DETERMINED HUMANITARIAN`XS EFFORTS TO PROMOTE PEACE THROUGH EDUCATION. IN THIS DRAMATIC FIRST-PERSON NARRATIVE, GREG MORTENSON PICKS UP WHERE THREE CUPS OF TEA LEFT OFF IN 2003, RECOUNTING HIS RELENTLESS, ONGOING EFFORTS TO ESTABLISH SCHOOLS FOR GIRLS IN AFGHANISTANX HIS EXTENSIVE WORK IN AZAD KASHMIR AND PAKISTAN AFTER A MASSIVE EARTHQUAKE HIT THE REGION IN 2005X AND THE UNIQUE WAYS HE HAS BUILT RELATIONSHIPS WITH ISLAMIC CLERICS, MILITIA COMMANDERS, AND TRIBAL LEADERS EVEN AS HE WAS DODGING SHOOTOUTS WITH FEUDING AFGHAN WARLORDS AND SURVIVING AN EIGHT-DAY ARMED ABDUCTION BY THE TALIBAN. HE SHARES FOR THE FIRST TIME HIS BROADER VISION TO PROMOTE PEACE THROUGH EDUCATION AND LITERACY, AS WELL AS TOUCHING ON MILITARY MATTERS, ISLAM, AND WOMEN &NDASHX ALL WOVEN TOGETHER WITH THE MANY RICH PERSONAL STORIES OF THE PEOPLE WHO HAVE BEEN INVOLVED IN THIS REMARKABLE TWO-DECADE HUMANITARIAN EFFORT
ग्रेग मॉर्टेन्सन यांची ‘सेंट्रल एशिया इन्स्टिट्यूट’ ही सेवाभावी संस्था गेली सोळा वर्षं पाकिस्तानातील व अफगाणिस्तानातील दुर्गम, उपेक्षित कोपऱ्यांमध्ये शाळा बांधून देऊन मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य करीत आहे. या देशांमधील दहशतवाद्यांच्या बंडखोरीला शह देऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी ‘शिक्षण’ – विशेषत: स्त्रीशिक्षण – ही गुरुकिल्ली आहे, असा या संस्थेचा ठाम विश्वास आहे. अमेरिकन देणगीदारांनी सढळ हाताने दिलेल्या देणग्यांचा या सत्कार्यासाठी विनियोग करताना या संस्थेने विविध प्रकल्पांच्या जागेवरील स्थानिक लोकांशी विश्वास व आदरावर उभारलेले जिव्हाळ्याचे नातंसुद्धा जोडले आहे. उमद्या वृत्तीने, चिकाटीने व विनयशीलतेने केलेल्या या कार्याचा मनमोहक आलेख म्हणजेच हे पुस्तक! प्रचंड अस्थिरता व हिंसाचारांनी बुजबुजलेल्या देशात जिवावर उदार होऊन या सत्कार्यासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या नि:स्वार्थी लोकांची ही हृद्य, प्रेरणादायी व थरारक कहाणी मानवी मनाच्या थोरवीचे विविध पैलू दाखवून वाचकाला स्तिमित करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#STONESINTOSCHOOLS #STONESINTOSCHOOLS #स्टोन्सइनटूस्कूल्स #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNITIKANE #सुनीतिकाणे #GREGMORTENSON "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 18-12 -2016

    एका वशाची कहाणी… अफगाणिस्तानातली गुंतागुंतीची लढाई अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्यापुढच्या परराष्ट्रीय संबंधाबाबतचं सर्वात निकडीचं आव्हान ठरली आहे. या चिघळत्या पार्श्वभूमीवर अटलांटिक कौन्सिलचे धोरणी विचारवंत अफगाणिस्तान हा देश रसातळाला पोहोचला असल्याे अहवाल प्रसिद्ध करीत आहेत. देशापुढे निःसंशयपणे प्रचंड समस्या उभ्या आहेत. भीषण व वाढती बंडखोरी सुव्यवस्थेच्या आणि प्रगतीच्या प्रयत्नांच्या आड येते आहे. अफूच्या बोंडांचं तुफान पीक काढलं जात आहे. पराकोटीचं दारिद्रय आहे. गुन्हेगारी आहे, बेघर लोक आहेत. बेकारांची प्रचंड संख्या आहे. स्वच्छ पाण्याची टंचाई आहे. स्त्रियांच्या दर्जाबाबतचे प्रश्न सुटलेले नाहीत तर दुसरीकडे नागरिकांचं सरंक्षण करून त्यांना प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी मध्यवर्ती सरकार धडपडतं आहे. पण ११ सप्टेंबर २००१ नंतर अफगाणिस्तानात काही आशादायक घटनाही घडलेल्या आहेत आणि त्यातली सर्वात महत्त्वाची आहे शिक्षण क्षेत्रातली! अफगाणिस्तनात सकारात्मक, चिरंतर-स्वरूपी बदल घडविण्यासाठी शिक्षण हा कळीचा मुद्दा आहे, हे विधान आपण मान्य केलं, तर या वर्षी अफगाणिस्तानात जवळजवळ पंच्याऐंशी लाख मुलं शाळेत जाऊ लागतील आणि त्यातील ४० टक्के मुली असतील ही गोष्ट अत्यंत उमेद देणारी आहे, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही! या गोष्टीचं महत्त्व ग्रेग मॉर्टेन्सन चांगलंच जाणतात. त्यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात स्थापन केलेल्या १३१ शाळांमध्ये ५८ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध होतं आहे. केवळ एका मुलानं शिक्षण घेतलं तरी त्याचा किती खोलवर परिणाम होतो आणि त्याची व्याप्ती किती दूरगामी असते हे त्यांच्याएवढं कुणीही जाणत नाही. अफगाणिस्तानातलं अमेरिकेचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं इतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ग्रेट मॉर्टेन्सहून अधिक पल्ला गाठू शकलेली नाही. या विनयशील, मृदूभाषी सद्गृहस्थानं अमेरिकी लष्कराला दाखवून दिलं आहे, की त्यांच्या मनमिळावू स्मितानं आणि स्नेहाच्या हस्तांदोलनानं हृदयं काबीज करण्याची लढाई कशी खेळली आणि ती कशी जिंकली. ग्रेग याचं तत्त्वज्ञान गुंतागुंतीचं नाही. त्यांचा अगदी प्रामाणिक विश्वास आहे, की अफगाणिस्तानातला तंटा सरतेशेवटी बंदुकी आणि हवाईहल्ल्यांना नव्हे, तर पुस्तकं, वह्या, पेन्सिली या आर्थिक प्रगतीकडे नेणाऱ्या साधनांनी जिंकला जाणार आहे. त्यांचं कळकळीचं सांगणं आहे, की अफगाण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं, म्हणजे देशाच्या भविष्याचं दिवाळं फुंकणं आणि कधी काळी अफगाणिस्तान अधिक सुबत्तेचं आणि अधिक प्रगतीशील राष्ट्र बनू शकेल, ही शक्यता नष्ट करणं आहे. ग्रेग मार्टिन्सनविरुद्ध फतवा काढला गेला असला आणि तालिबान आणि इतर दहशतवाद्यांकडून त्यांना धमक्या येत असल्या, तरीही अफगाणिस्तानाबाबत असं घडू नये, यासाठी त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे त्यांनी मुली आणि तरुण स्त्रियांना शिक्षण देण्याचा जोमानं प्रयत्न केला आहे. ज्या भागात आई-वडील मुलींना नेहमीच शाळेबाहेर ठेवत आलेले आहेत आणि तिथल्या परंपरागत प्रथांनी स्त्रियांच्या शिकण्याच्या नव्हे! परंतु खेड्या खेड्यांमध्ये ग्रेगनी तिथले धर्मगुरू आणि वडीलधाऱ्यांचं मन वळवून त्यांच्याद्वारे मुलींना शाळेत धाडण्याबद्दल आई-वडिलांचं मतपरिवर्तन घडवलं आहे. यामागचं कारण असं आहे, की माझ्याप्रमाणेच ग्रेग यांचा अगदी ठाम विश्वास आहे, की अफगाणिस्तानाचा उत्कर्ष होण्यासाठी तिथल्या स्त्रियांचाही सहभाग प्रगतीच्या मोहिमेत अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्त्रियांना शालेय शिक्षण लाभलं पाहिजे आणि देशाच्या पुनर्रचनेत तसंच विकासात त्यांचं शिक्षण हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे. ते एखाद्या मंत्राप्रमाणे सतत जप करत असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला शिक्षण देता तेव्हा तुम्ही केवळ एका व्यक्तीला शिक्षण देता; पण जेव्हा तुम्ही एका मुलीला शिक्षण देता, तेव्हा तुम्ही एका सामाजिक गटाला प्रशिक्षित करत असता. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सारं ग्रेगनी मनमोहकपणे, उमद्या वृत्तीनं, चिकाटीनं आणि विनयशीलतेनं केलेलं आहे. त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं. विश्वास आणि आदरावर उभारलेलं नातं गावातल्या पुढाऱ्यांबरोबर जोडलं आणि त्यांचं भविष्य घडवण्यात लोकांना सामील करून घेतलं. स्थानिक संस्कृतीतला विनय, अगत्य, ज्येष्ठांबद्दलचा आदर शिकून घेण्यासाठी त्यांनी वेळ खर्च केला आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातलं इस्लामचं महत्त्व आदरपूर्वक समजून घेतलं. अमेरिकन लष्करानं खेड्यातल्या ज्येष्ठांशी आणि टोळ्यांच्या नेत्यांशी चांगले संबंध जोडण्याबाबत सल्ला मसलतीसाठी ग्रेग यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यात आश्चर्य ते काय! ते त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतील. आपण सारेच शिकू शकू! ग्रेग, आपण जे करत आहोत, त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! ...Read more

  • Rating StarDainik Aikya 18-12-16

    दहशतीतल्या शिक्षणसंघर्षाची कथा.. अफगाणिस्तानातली गुंतागुंतीची लढाई अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्यापुढच्या परराष्ट्रीय संबंधाबाबतचं सर्वात निकडीचं आव्हान ठरली आहे. या चिघळत्या पार्श्वभूमीवर अटलांटिक कौन्सिलचे धोरणी विचारवंत अफगाणिस्तान हा देश रसातळाल पोहोचला असल्याचे अहवाल प्रसिद्ध करीत आहेत. देशापुढे निःसंशयपणे प्रचंड समस्या उभ्या आहेत. भीषण व वाढती बंडखोरी सुव्यवस्थेच्या आणि प्रगतीच्या प्रयत्नांच्या आड येते आहे. अफूच्या बोंडांचं तुफान पीक काढलं जात आहे. पराकोटीचं दारिद्रय आहे. गुन्हेगारी आहे, बेघर लोक आहेत. बेकारांची प्रचंड संख्या आहे. स्वच्छ पाण्याची टंचाई आहे. स्त्रियांच्या दर्जाबाबतचे प्रश्न सुटलेले नाहीत तर दुसरीकडे नागरिकांचं सरंक्षण करून त्यांना प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी मध्यवर्ती सरकार धडपडतं आहे. पण ११ सप्टेंबर २००१ नंतर अफगाणिस्तानात काही आशादायक घटनाही घडलेल्या आहेत आणि त्यातली सर्वात महत्त्वाची आहे शिक्षण क्षेत्रातली! अफगाणिस्तनात सकारात्मक, चिरंतर-स्वरूपी बदल घडविण्यासाठी शिक्षण हा कळीचा मुद्दा आहे, हे विधान आपण मान्य केलं, तर या वर्षी अफगाणिस्तानात जवळजवळ पंच्याऐंशी लाख मुलं शाळेत जाऊ लागतील आणि त्यातील ४० टक्के मुली असतील ही गोष्ट अत्यंत उमेद देणारी आहे, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही! या गोष्टीचं महत्त्व ग्रेग मॉर्टेन्सन चांगलंच जाणतात. त्यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात स्थापन केलेल्या १३१ शाळांमध्ये ५८ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध होतं आहे. केवळ एका मुलानं शिक्षण घेतलं तरी त्याचा किती खोलवर परिणाम होतो आणि त्याची व्याप्ती किती दूरगामी असते हे त्यांच्याएवढं कुणीही जाणत नाही. अफगाणिस्तानातलं अमेरिकेचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं इतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ग्रेट मॉर्टेन्सहून अधिक पल्ला गाठू शकलेली नाही. या विनयशील, मृदूभाषी सद्गृहस्थानं अमेरिकी लष्कराला दाखवून दिलं आहे, की त्यांच्या मनमिळावू स्मितानं आणि स्नेहाच्या हस्तांदोलनानं हृदयं काबीज करण्याची लढाई कशी खेळली आणि ती कशी जिंकली. ग्रेग याचं तत्त्वज्ञान गुंतागुंतीचं नाही. त्यांचा अगदी प्रामाणिक विश्वास आहे, की अफगाणिस्तानातला तंटा सरतेशेवटी बंदुकी आणि हवाईहल्ल्यांना नव्हे, तर पुस्तकं, वह्या, पेन्सिली या आर्थिक प्रगतीकडे नेणाऱ्या साधनांनी जिंकला जाणार आहे. त्यांचं कळकळीचं सांगणं आहे, की अफगाण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं, म्हणजे देशाच्या भविष्याचं दिवाळं फुंकणं आणि कधी काळी अफगाणिस्तान अधिक सुबत्तेचं आणि अधिक प्रगतीशील राष्ट्र बनू शकेल, ही शक्यता नष्ट करणं आहे. ग्रेग मार्टिन्सनविरुद्ध फतवा काढला गेला असला आणि तालिबान आणि इतर दहशतवाद्यांकडून त्यांना धमक्या येत असल्या, तरीही अफगाणिस्तानाबाबत असं घडू नये, यासाठी त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे त्यांनी मुली आणि तरुण स्त्रियांना शिक्षण देण्याचा जोमानं प्रयत्न केला आहे. ज्या भागात आई-वडील मुलींना नेहमीच शाळेबाहेर ठेवत आलेले आहेत आणि तिथल्या परंपरागत प्रथांनी स्त्रियांच्या शिकण्याच्या नव्हे! परंतु खेड्या खेड्यांमध्ये ग्रेगनी तिथले धर्मगुरू आणि वडीलधाऱ्यांचं मन वळवून त्यांच्याद्वारे मुलींना शाळेत धाडण्याबद्दल आई-वडिलांचं मतपरिवर्तन घडवलं आहे. यामागचं कारण असं आहे, की माझ्याप्रमाणेच ग्रेग यांचा अगदी ठाम विश्वास आहे, की अफगाणिस्तानाचा उत्कर्ष होण्यासाठी तिथल्या स्त्रियांचाही सहभाग प्रगतीच्या मोहिमेत अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्त्रियांना शालेय शिक्षण लाभलं पाहिजे आणि देशाच्या पुनर्रचनेत तसंच विकासात त्यांचं शिक्षण हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे. ते एखाद्या मंत्राप्रमाणे सतत जप करत असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला शिक्षण देता तेव्हा तुम्ही केवळ एका व्यक्तीला शिक्षण देता; पण जेव्हा तुम्ही एका मुलीला शिक्षण देता, तेव्हा तुम्ही एका सामाजिक गटाला प्रशिक्षित करत असता. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सारं ग्रेगनी मनमोहकपणे, उमद्या वृत्तीनं, चिकाटीनं आणि विनयशीलतेनं केलेलं आहे. त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं. विश्वास आणि आदरावर उभारलेलं नातं गावातल्या पुढाऱ्यांबरोबर जोडलं आणि त्यांचं भविष्य घडवण्यात लोकांना सामील करून घेतलं. स्थानिक संस्कृतीतला विनय, अगत्य, ज्येष्ठांबद्दलचा आदर शिकून घेण्यासाठी त्यांनी वेळ खर्च केला आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातलं इस्लामचं महत्त्व आदरपूर्वक समजून घेतलं. अमेरिकन लष्करानं खेड्यातल्या ज्येष्ठांशी आणि टोळ्यांच्या नेत्यांशी चांगले संबंध जोडण्याबाबत सल्ला मसलतीसाठी ग्रेग यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यात आश्चर्य ते काय! ते त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतील. आपण सारेच शिकू शकू! ग्रेग, आपण जे करत आहोत, त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more