* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STONES INTO SCHOOLS
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184984354
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FROM THE AUTHOR OF THE PHENOMENAL NO.1 BESTSELLER THREE CUPS OF TEA, THE CONTINUING STORY OF THIS DETERMINED HUMANITARIAN`XS EFFORTS TO PROMOTE PEACE THROUGH EDUCATION. IN THIS DRAMATIC FIRST-PERSON NARRATIVE, GREG MORTENSON PICKS UP WHERE THREE CUPS OF TEA LEFT OFF IN 2003, RECOUNTING HIS RELENTLESS, ONGOING EFFORTS TO ESTABLISH SCHOOLS FOR GIRLS IN AFGHANISTANX HIS EXTENSIVE WORK IN AZAD KASHMIR AND PAKISTAN AFTER A MASSIVE EARTHQUAKE HIT THE REGION IN 2005X AND THE UNIQUE WAYS HE HAS BUILT RELATIONSHIPS WITH ISLAMIC CLERICS, MILITIA COMMANDERS, AND TRIBAL LEADERS EVEN AS HE WAS DODGING SHOOTOUTS WITH FEUDING AFGHAN WARLORDS AND SURVIVING AN EIGHT-DAY ARMED ABDUCTION BY THE TALIBAN. HE SHARES FOR THE FIRST TIME HIS BROADER VISION TO PROMOTE PEACE THROUGH EDUCATION AND LITERACY, AS WELL AS TOUCHING ON MILITARY MATTERS, ISLAM, AND WOMEN &NDASHX ALL WOVEN TOGETHER WITH THE MANY RICH PERSONAL STORIES OF THE PEOPLE WHO HAVE BEEN INVOLVED IN THIS REMARKABLE TWO-DECADE HUMANITARIAN EFFORT
ग्रेग मॉर्टेन्सन यांची ‘सेंट्रल एशिया इन्स्टिट्यूट’ ही सेवाभावी संस्था गेली सोळा वर्षं पाकिस्तानातील व अफगाणिस्तानातील दुर्गम, उपेक्षित कोपऱ्यांमध्ये शाळा बांधून देऊन मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य करीत आहे. या देशांमधील दहशतवाद्यांच्या बंडखोरीला शह देऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि विकास घडवून आणण्यासाठी ‘शिक्षण’ – विशेषत: स्त्रीशिक्षण – ही गुरुकिल्ली आहे, असा या संस्थेचा ठाम विश्वास आहे. अमेरिकन देणगीदारांनी सढळ हाताने दिलेल्या देणग्यांचा या सत्कार्यासाठी विनियोग करताना या संस्थेने विविध प्रकल्पांच्या जागेवरील स्थानिक लोकांशी विश्वास व आदरावर उभारलेले जिव्हाळ्याचे नातंसुद्धा जोडले आहे. उमद्या वृत्तीने, चिकाटीने व विनयशीलतेने केलेल्या या कार्याचा मनमोहक आलेख म्हणजेच हे पुस्तक! प्रचंड अस्थिरता व हिंसाचारांनी बुजबुजलेल्या देशात जिवावर उदार होऊन या सत्कार्यासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या नि:स्वार्थी लोकांची ही हृद्य, प्रेरणादायी व थरारक कहाणी मानवी मनाच्या थोरवीचे विविध पैलू दाखवून वाचकाला स्तिमित करते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#STONESINTOSCHOOLS #STONESINTOSCHOOLS #स्टोन्सइनटूस्कूल्स #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNITIKANE #सुनीतिकाणे #GREGMORTENSON "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 18-12 -2016

    एका वशाची कहाणी… अफगाणिस्तानातली गुंतागुंतीची लढाई अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्यापुढच्या परराष्ट्रीय संबंधाबाबतचं सर्वात निकडीचं आव्हान ठरली आहे. या चिघळत्या पार्श्वभूमीवर अटलांटिक कौन्सिलचे धोरणी विचारवंत अफगाणिस्तान हा देश रसातळाला पोहोचला असल्याे अहवाल प्रसिद्ध करीत आहेत. देशापुढे निःसंशयपणे प्रचंड समस्या उभ्या आहेत. भीषण व वाढती बंडखोरी सुव्यवस्थेच्या आणि प्रगतीच्या प्रयत्नांच्या आड येते आहे. अफूच्या बोंडांचं तुफान पीक काढलं जात आहे. पराकोटीचं दारिद्रय आहे. गुन्हेगारी आहे, बेघर लोक आहेत. बेकारांची प्रचंड संख्या आहे. स्वच्छ पाण्याची टंचाई आहे. स्त्रियांच्या दर्जाबाबतचे प्रश्न सुटलेले नाहीत तर दुसरीकडे नागरिकांचं सरंक्षण करून त्यांना प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी मध्यवर्ती सरकार धडपडतं आहे. पण ११ सप्टेंबर २००१ नंतर अफगाणिस्तानात काही आशादायक घटनाही घडलेल्या आहेत आणि त्यातली सर्वात महत्त्वाची आहे शिक्षण क्षेत्रातली! अफगाणिस्तनात सकारात्मक, चिरंतर-स्वरूपी बदल घडविण्यासाठी शिक्षण हा कळीचा मुद्दा आहे, हे विधान आपण मान्य केलं, तर या वर्षी अफगाणिस्तानात जवळजवळ पंच्याऐंशी लाख मुलं शाळेत जाऊ लागतील आणि त्यातील ४० टक्के मुली असतील ही गोष्ट अत्यंत उमेद देणारी आहे, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही! या गोष्टीचं महत्त्व ग्रेग मॉर्टेन्सन चांगलंच जाणतात. त्यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात स्थापन केलेल्या १३१ शाळांमध्ये ५८ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध होतं आहे. केवळ एका मुलानं शिक्षण घेतलं तरी त्याचा किती खोलवर परिणाम होतो आणि त्याची व्याप्ती किती दूरगामी असते हे त्यांच्याएवढं कुणीही जाणत नाही. अफगाणिस्तानातलं अमेरिकेचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं इतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ग्रेट मॉर्टेन्सहून अधिक पल्ला गाठू शकलेली नाही. या विनयशील, मृदूभाषी सद्गृहस्थानं अमेरिकी लष्कराला दाखवून दिलं आहे, की त्यांच्या मनमिळावू स्मितानं आणि स्नेहाच्या हस्तांदोलनानं हृदयं काबीज करण्याची लढाई कशी खेळली आणि ती कशी जिंकली. ग्रेग याचं तत्त्वज्ञान गुंतागुंतीचं नाही. त्यांचा अगदी प्रामाणिक विश्वास आहे, की अफगाणिस्तानातला तंटा सरतेशेवटी बंदुकी आणि हवाईहल्ल्यांना नव्हे, तर पुस्तकं, वह्या, पेन्सिली या आर्थिक प्रगतीकडे नेणाऱ्या साधनांनी जिंकला जाणार आहे. त्यांचं कळकळीचं सांगणं आहे, की अफगाण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं, म्हणजे देशाच्या भविष्याचं दिवाळं फुंकणं आणि कधी काळी अफगाणिस्तान अधिक सुबत्तेचं आणि अधिक प्रगतीशील राष्ट्र बनू शकेल, ही शक्यता नष्ट करणं आहे. ग्रेग मार्टिन्सनविरुद्ध फतवा काढला गेला असला आणि तालिबान आणि इतर दहशतवाद्यांकडून त्यांना धमक्या येत असल्या, तरीही अफगाणिस्तानाबाबत असं घडू नये, यासाठी त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे त्यांनी मुली आणि तरुण स्त्रियांना शिक्षण देण्याचा जोमानं प्रयत्न केला आहे. ज्या भागात आई-वडील मुलींना नेहमीच शाळेबाहेर ठेवत आलेले आहेत आणि तिथल्या परंपरागत प्रथांनी स्त्रियांच्या शिकण्याच्या नव्हे! परंतु खेड्या खेड्यांमध्ये ग्रेगनी तिथले धर्मगुरू आणि वडीलधाऱ्यांचं मन वळवून त्यांच्याद्वारे मुलींना शाळेत धाडण्याबद्दल आई-वडिलांचं मतपरिवर्तन घडवलं आहे. यामागचं कारण असं आहे, की माझ्याप्रमाणेच ग्रेग यांचा अगदी ठाम विश्वास आहे, की अफगाणिस्तानाचा उत्कर्ष होण्यासाठी तिथल्या स्त्रियांचाही सहभाग प्रगतीच्या मोहिमेत अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्त्रियांना शालेय शिक्षण लाभलं पाहिजे आणि देशाच्या पुनर्रचनेत तसंच विकासात त्यांचं शिक्षण हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे. ते एखाद्या मंत्राप्रमाणे सतत जप करत असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला शिक्षण देता तेव्हा तुम्ही केवळ एका व्यक्तीला शिक्षण देता; पण जेव्हा तुम्ही एका मुलीला शिक्षण देता, तेव्हा तुम्ही एका सामाजिक गटाला प्रशिक्षित करत असता. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सारं ग्रेगनी मनमोहकपणे, उमद्या वृत्तीनं, चिकाटीनं आणि विनयशीलतेनं केलेलं आहे. त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं. विश्वास आणि आदरावर उभारलेलं नातं गावातल्या पुढाऱ्यांबरोबर जोडलं आणि त्यांचं भविष्य घडवण्यात लोकांना सामील करून घेतलं. स्थानिक संस्कृतीतला विनय, अगत्य, ज्येष्ठांबद्दलचा आदर शिकून घेण्यासाठी त्यांनी वेळ खर्च केला आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातलं इस्लामचं महत्त्व आदरपूर्वक समजून घेतलं. अमेरिकन लष्करानं खेड्यातल्या ज्येष्ठांशी आणि टोळ्यांच्या नेत्यांशी चांगले संबंध जोडण्याबाबत सल्ला मसलतीसाठी ग्रेग यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यात आश्चर्य ते काय! ते त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतील. आपण सारेच शिकू शकू! ग्रेग, आपण जे करत आहोत, त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! ...Read more

  • Rating StarDainik Aikya 18-12-16

    दहशतीतल्या शिक्षणसंघर्षाची कथा.. अफगाणिस्तानातली गुंतागुंतीची लढाई अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्यापुढच्या परराष्ट्रीय संबंधाबाबतचं सर्वात निकडीचं आव्हान ठरली आहे. या चिघळत्या पार्श्वभूमीवर अटलांटिक कौन्सिलचे धोरणी विचारवंत अफगाणिस्तान हा देश रसातळाल पोहोचला असल्याचे अहवाल प्रसिद्ध करीत आहेत. देशापुढे निःसंशयपणे प्रचंड समस्या उभ्या आहेत. भीषण व वाढती बंडखोरी सुव्यवस्थेच्या आणि प्रगतीच्या प्रयत्नांच्या आड येते आहे. अफूच्या बोंडांचं तुफान पीक काढलं जात आहे. पराकोटीचं दारिद्रय आहे. गुन्हेगारी आहे, बेघर लोक आहेत. बेकारांची प्रचंड संख्या आहे. स्वच्छ पाण्याची टंचाई आहे. स्त्रियांच्या दर्जाबाबतचे प्रश्न सुटलेले नाहीत तर दुसरीकडे नागरिकांचं सरंक्षण करून त्यांना प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी मध्यवर्ती सरकार धडपडतं आहे. पण ११ सप्टेंबर २००१ नंतर अफगाणिस्तानात काही आशादायक घटनाही घडलेल्या आहेत आणि त्यातली सर्वात महत्त्वाची आहे शिक्षण क्षेत्रातली! अफगाणिस्तनात सकारात्मक, चिरंतर-स्वरूपी बदल घडविण्यासाठी शिक्षण हा कळीचा मुद्दा आहे, हे विधान आपण मान्य केलं, तर या वर्षी अफगाणिस्तानात जवळजवळ पंच्याऐंशी लाख मुलं शाळेत जाऊ लागतील आणि त्यातील ४० टक्के मुली असतील ही गोष्ट अत्यंत उमेद देणारी आहे, असं म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही! या गोष्टीचं महत्त्व ग्रेग मॉर्टेन्सन चांगलंच जाणतात. त्यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात स्थापन केलेल्या १३१ शाळांमध्ये ५८ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध होतं आहे. केवळ एका मुलानं शिक्षण घेतलं तरी त्याचा किती खोलवर परिणाम होतो आणि त्याची व्याप्ती किती दूरगामी असते हे त्यांच्याएवढं कुणीही जाणत नाही. अफगाणिस्तानातलं अमेरिकेचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं इतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ग्रेट मॉर्टेन्सहून अधिक पल्ला गाठू शकलेली नाही. या विनयशील, मृदूभाषी सद्गृहस्थानं अमेरिकी लष्कराला दाखवून दिलं आहे, की त्यांच्या मनमिळावू स्मितानं आणि स्नेहाच्या हस्तांदोलनानं हृदयं काबीज करण्याची लढाई कशी खेळली आणि ती कशी जिंकली. ग्रेग याचं तत्त्वज्ञान गुंतागुंतीचं नाही. त्यांचा अगदी प्रामाणिक विश्वास आहे, की अफगाणिस्तानातला तंटा सरतेशेवटी बंदुकी आणि हवाईहल्ल्यांना नव्हे, तर पुस्तकं, वह्या, पेन्सिली या आर्थिक प्रगतीकडे नेणाऱ्या साधनांनी जिंकला जाणार आहे. त्यांचं कळकळीचं सांगणं आहे, की अफगाण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं, म्हणजे देशाच्या भविष्याचं दिवाळं फुंकणं आणि कधी काळी अफगाणिस्तान अधिक सुबत्तेचं आणि अधिक प्रगतीशील राष्ट्र बनू शकेल, ही शक्यता नष्ट करणं आहे. ग्रेग मार्टिन्सनविरुद्ध फतवा काढला गेला असला आणि तालिबान आणि इतर दहशतवाद्यांकडून त्यांना धमक्या येत असल्या, तरीही अफगाणिस्तानाबाबत असं घडू नये, यासाठी त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, म्हणजे त्यांनी मुली आणि तरुण स्त्रियांना शिक्षण देण्याचा जोमानं प्रयत्न केला आहे. ज्या भागात आई-वडील मुलींना नेहमीच शाळेबाहेर ठेवत आलेले आहेत आणि तिथल्या परंपरागत प्रथांनी स्त्रियांच्या शिकण्याच्या नव्हे! परंतु खेड्या खेड्यांमध्ये ग्रेगनी तिथले धर्मगुरू आणि वडीलधाऱ्यांचं मन वळवून त्यांच्याद्वारे मुलींना शाळेत धाडण्याबद्दल आई-वडिलांचं मतपरिवर्तन घडवलं आहे. यामागचं कारण असं आहे, की माझ्याप्रमाणेच ग्रेग यांचा अगदी ठाम विश्वास आहे, की अफगाणिस्तानाचा उत्कर्ष होण्यासाठी तिथल्या स्त्रियांचाही सहभाग प्रगतीच्या मोहिमेत अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्त्रियांना शालेय शिक्षण लाभलं पाहिजे आणि देशाच्या पुनर्रचनेत तसंच विकासात त्यांचं शिक्षण हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे. ते एखाद्या मंत्राप्रमाणे सतत जप करत असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला शिक्षण देता तेव्हा तुम्ही केवळ एका व्यक्तीला शिक्षण देता; पण जेव्हा तुम्ही एका मुलीला शिक्षण देता, तेव्हा तुम्ही एका सामाजिक गटाला प्रशिक्षित करत असता. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सारं ग्रेगनी मनमोहकपणे, उमद्या वृत्तीनं, चिकाटीनं आणि विनयशीलतेनं केलेलं आहे. त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं. विश्वास आणि आदरावर उभारलेलं नातं गावातल्या पुढाऱ्यांबरोबर जोडलं आणि त्यांचं भविष्य घडवण्यात लोकांना सामील करून घेतलं. स्थानिक संस्कृतीतला विनय, अगत्य, ज्येष्ठांबद्दलचा आदर शिकून घेण्यासाठी त्यांनी वेळ खर्च केला आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातलं इस्लामचं महत्त्व आदरपूर्वक समजून घेतलं. अमेरिकन लष्करानं खेड्यातल्या ज्येष्ठांशी आणि टोळ्यांच्या नेत्यांशी चांगले संबंध जोडण्याबाबत सल्ला मसलतीसाठी ग्रेग यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यात आश्चर्य ते काय! ते त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतील. आपण सारेच शिकू शकू! ग्रेग, आपण जे करत आहोत, त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more