* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TO SIR, WITH LOVE
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177668247
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MR. BRAITHWAITE, THE NEW TEACHER. HE BEHAVED VERY DIFFERENTLY WITH THE STUDENTS IN HIS CLASS. HE MADE THEM LOOK DOWN SHAMEFULLY, REALIZING THEIR MISTAKES. HE FOUGHT WITH THEM, SOMETIMES HE ALSO WRESTLED WITH THEM. SLOWLY, YET STEADILY HE BROUGHT THE LIGHT OF KNOWLEDGE INTO THEIR LIVES AND LATER ON STARTED LOVING THEM, IMMENSELY. HIS STUDENTS WHO WERE FAMOUS FOR THEIR HOODLUMS, WHO WERE VERY SHAMELESS, STARTED RESPECTING HIM, CALLING HIM `SIR`. HE WAS THE ONE WHO TAUGHT THEM TO CALL THE GIRLS RESPECTFULLY WITH A `MISS`. HE TAUGHT THEM PERSONAL HYGIENE AND HE SAT WITH THEM TO READ SHAKESPEARE. HE WAS A TEACHER WITH SOME DEFINITE AIM, A TARGET. HE CHANGED THE HATRED, ANGER AND CONTEMPT INTO LOVE. HE TRANSFORMED THE REVOLUTIONARY NATURE OF THESE TEENAGERS INTO CONFIDENT MINDS. HE OPENED THE WAYS TO THINK ABOUT OTHERS, FROM OTHER`S POINT OF VIEWS. THIS WAS HIS SUCCESS, OF A TEACHER, OF HIS FERVOR, OF HIS EARNESTNESS TOWARDS HIS STUDENTS AND OF `THEIR` LOVE.
मि. ब्रेथवेट, नवे शिक्षक. त्यांनी आपल्या वर्गातील मुलांना शरमेनं मान खाली घालायला लावली. त्यांच्याशी झटापट केली, प्रसंगी कुस्तीसुद्धा खेळली. हळूहळू त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला आणि एक दिवस स्वत:च त्या मुलांवर निरतिशय प्रेम करू लागले. त्यांच्या वर्गातील गुंडगिरी करणारी, निर्ढावलेली मुलं त्यांना ‘सर’ म्हणून आदरानं हाक मारू लागली. त्या मुलांच्या गलिच्छ वस्तीतल्या पोरींना सन्मानानं ‘मिस्’ म्हणायलाही सरांनीच शिकवलं. त्या मुलांना हात स्वच्छ धुवायला शिकवलं आणि त्याचबरोबर शेक्सपिअरसुद्धा वाचायला शिकवलं. एका ध्येयानं प्रेरित झालेल्या शिक्षकानं रागाचं, द्वेषाचं, तिरस्काराचं रूपांतर प्रेमात केलं. पौगंडावस्थेतील बंडखोरीचं रूपांतर आत्मविश्वासात केलं. दुस-यांच्या दृष्टिकोनातून विचार कसा करायचा असतो, हे त्या मुलांना शिकवलं. हा त्यांचा विजय होता. एका शिक्षकाच्या तळमळीचा, विद्याथ्र्यांविषयी वाटणाऱ्या कळकळीचा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या प्रेमाचा...
`द गोवा हिंदु असोसिएशन`तर्फे सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी जी.ए.कुलकर्णी पुरस्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#टू सर, विथ लव्ह #लीना सोहनी TO SIR, WITH LOVE #LEENA SOHONI #E.R. BRAITHWAITE
Customer Reviews
  • Rating StarPradeep Talekar

    पुस्तक परिचय - पुष्प १ ले *टू सर विथ लव्ह* मूळ इंग्लिश लेखक - श्री. इ आर ब्रेथवेट. अनुवादिका - श्रीमती लीना सोहोनी. प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस. परिचय कर्ता: प्रदीप तळेकर, पुणे +919850899387 एक छोटीशी कादंबरी म्हणा किंवा आत्मलेखन म्हणावेअसे पुस्तक. पुस्तकाचा नायक म्हणजे स्वतः लेखक, श्री ब्रेथवेट, एक कृष्णवर्णीय तरुण गृहस्थ. इथे कृष्णवर्णीय हे महत्वाचे म्हणून त्याचा उल्लेख आवर्जून केलेला. एक सत्य कहाणी आपण पुस्तक वाचत असताना उलगडते आणि आपण या ओघवत्या अनुवादात या आत्मकथनात गुंतत जातो जसा नायक त्याच्या कथानकात गुंतलेला आढळतो. दुसऱ्या महायुध्दात आपला नायक हा रॉयल एअरफोर्स मध्ये ग्राउंड क्रू मध्ये काम करत असे. स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर. युद्ध संपल्यावर साहजिकच सक्तीची निवृत्ती पत्करावी लागलेली. मग नोकरीसाठी वणवण चालू, त्यावेळच्या युद्धाने उध्वस्त झालेल्या इंग्लंडमध्ये, मुख्यतः लंडनमध्ये. योग्य शैक्षणिक पात्रता आणि एअरफोर्स मधील अनुभव याच्या जोरावर सहज नाही तरी काही प्रयत्नांनी नोकरी मिळेल या आशेवर हा तरुण बाहेर पडतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे लगेच नोकरी मिळेल ही अपेक्षा नसतेच. पण त्याला तो केवळ कृष्णवर्णीय आणि इंग्लंडमध्ये न जन्मलेला इंग्लिश माणूस असल्यामुळे नोकरी मिळणे किती दुरापास्त होते याचे वर्णन म्हणजे ब्रिटिशांच्या वर्णद्वेषाचा धगधगता नमुना आहे. इंग्लंड बाहेरचा म्हणजे लेखकाचा जन्म गयानातील जॉर्जटाऊन येथील निग्रो घरातील. आता आपण मुख्य आशयाकडे वळणार आहोत. अनेक अपमान, शिव्याशाप मूग गिळून प्राप्त केल्यावर नायकाला एक अतिशय सामान्य अशी शिक्षकाची नोकरी मिळते. तीही कुठे, तर अतिशय गलिच्छ, अतिदारिद्री अशा वस्तीत टग्या मुलामुलींच्या शाळेत जिथे जागोजागी दलाल, वेश्या, अमली पदार्थ आणि त्याची जोड म्हणून खून मारामारी करणाऱ्यांचे साम्राज्य असते. याहून कहर म्हणजे, ही शाळा देखील प्रामुख्याने गोऱ्या मुलांची असते आणि हातावर बोटे मोजण्या एवढी कृष्णवर्णीय मुलांची. त्यात परत धार्मिक विघटन असतेच. त्यामुळे एकूणच समाजातील व्यक्ती आणि वर्ण द्वेष येथेही असतो. प्रथमच शिक्षकाची नोकरी करणाऱ्या नायकाला सोपवला जातो सर्वात मोठ्या मुलांचा आणि मुलींचा वरचा वर्ग. सूड, राग, द्वेष, उद्धटपणा, बेशिस्त या भावनांनी भरलेल्या मुलांच्या घोळक्यात आपला नायक येतो तीच आव्हाने घेऊन. शाळेचे हेडमास्तर आणि इतर बरेचसे शिक्षक त्यांच्यातील दोष लक्षात घेतले तरी चांगले असतात आणि या मुलांवरही प्रेम करीत असतात काही ध्येयाने प्रेरित होऊन. पुढे कथानकात या मुलांशी होणारा नायकाचा सामना, त्याचा त्यांच्याशी होणारा विविधतेचा संवाद किंवा विसंवाद यांचा परिचय होत जातो. या मुलांना सर्वसाधरण स्वच्छतेचे, म्हणजे अगदी हात धुणे, आंघोळ करणे ते नीटनेटके राहणे यांचे धडे तो कश्यातर्हेनें देतो, त्यांना धडपडत सुसंस्कृत, सुशिक्षित करण्याचे कष्ट घेतो हे वाचण्यासारखे आहे. बंडखोरीचे मुलांच्या आत्मविश्वासात तोच रूपांतर करतो. यातच त्याचा संयत प्रेमाचा प्रवास देखील हळुवारपणे पण कष्टाने उलगडला जातो. अनेकवेळेला वाचताना डोळे भरून येतात आणि नकळत वाहू लागतात. एक सामान्य तरुण ध्येयाने प्रेरित झालेला शिक्षक कसा घडतो आणि आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यास कसा हातभार लावतो याचे हे कथानक म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आणि प्रेरणास्थानच आहे. खूप काही सांगता येईल किंवा लिहिताही येईल. पण तो वेळेचा आणि आशयाचा अपव्यय होईल. त्यामुळे एकच सांगून थांबतो, ते म्हणजे प्रत्येकाने हा अनुवाद किंवा मूळ इंग्रजी पुस्तक जरूर वाचावे. कथानकाचा काळ हा दुसरे महायुद्ध संपल्या नंतरचे असले तरी अजूनही ते संदर्भहीन होत नाही यातच या लेखकाचे यश आहे. लेखन सीमा..... शुभम भवतू 💐 प्रदीप तळेकर, पुणे ...Read more

  • Rating StarAnil Udgirkar

    ही एका कृष्णवर्णी ईंग्लिश शिक्षकाची मि.ब्रेथवेट यानी स्वत: सांगीतलेली कहाणी .रॉयल एअरफोर्स मधील यशस्वी कारकिर्द संपवून ते जेंव्हा नौकरी साठी अर्ज करत होते तेंव्हा त्यांना खरी वर्णद्वेषाची ओळख झाली.वरवर सहानुभुती दाखवून शेवटी नकारघंटाच पदरात पडायला सुूवात होती. ग्रीनस्लेड शाळेत त्यांना शिक्षक म्हणुन रुजु व्हायची संधी आली.ह्या शाळेत समाजाच्या खालच्या आर्थीक स्तरातील मुलेच प्रवेश घ्यायची.सर्व बेशिस्त व कसलाही विधीनिषेध नसलेली,संस्कारहिन. ब्रेथवेट यानी अपार कष्ट घेऊन आपली योग्यता कशी सिध्द केली हे अगदी ह्रदयाला भिडणारे आहे. ...Read more

  • Rating StarRajiv Lute

    ही कहाणी आहे इंग्लंडमधील एका उच्चशिक्षित निवृत्त सैनिकाची जो अपरिहार्य कारणामुळे शिक्षक होतो. नाव एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट! ब्रेथवेट यांनी १९५९ साली शिक्षकी पेशातून आलेल्या अनुभवावर आधारित मूळ पुस्तक लिहले आहे. लीना सोहोनी यांनी त्याचा उकृष्ठ मराठी अुवाद केलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लडच्या रॉयल एअरफोर्समधून निवृत्त झालेले ब्रेथवेट हे बुद्धिमान इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत. (होते आता त्यांचं निधन झालं आहे.मृत्यू १२ डिसेंबर २०१६) निवृत्ती नंतर उच्चपदाच्या चांगल्या नोकरीस लायक असूनही त्यांना वारंवार डावलले जाते. त्यांचा पदोपदी अपमान केला जातो...कारण ते कृष्णवर्णीय(निग्रो) असणे हाच त्यांचा एकमेव दोष आहे. जगभर वसाहती बनवून आपल्या राज्याचा विस्तार करणारे आणि लोकशीच्या बाता मारणारे गोरे इंग्रज मनाने मात्र काळे होते. इंग्रजांच्या दुटुप्पीपणाचा, खोटारडेपणाचा बुरखा या आत्मचरित्रात फाडला गेला आहे. गोरे इंग्रज कृष्णवर्णीय लोकांचे कसे मानसिक शोषण आणि खच्चीकरण करत होते याबद्दल पुस्तकातून माहिती मिळते. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवण्यात अपयश आल्याने निराश होऊन आणि नोकरीची गरज म्हणून ब्रेथवेट लंडनच्या ईस्ट एन्ड या गरीब, बदनाम, गलिच्छ वस्तीतील एका शाळेत सामान्य शिक्षकाची नोकरी पत्करतात आणि सुरवात होते त्यांच्या आव्हानात्मक शिक्षकी पेशाला! त्यांचं जीवन बदलून टाकणाऱ्या प्रवासाला…! या शाळेतील सर्वात मोठ्या मुलांचा वर्ग त्यांना मिळतो. ही मुलं/मुली पौगंडावस्थेतील आहेत. सामन्य मुलांपेक्षा शरीराने मोठी आणि तारुण्यात पदार्पण करणारी आहेत. त्यांचं ओंगळवाणे वागणे, व्यसनं करणे, अस्वच्छ राहणीमान, मुलामुलींचे एकमेकांशी शारीरिक लगट करण्याचे प्रयत्न, कोणत्याही नवीन शिक्षकाला मानसिक त्रास देणे, नवीन शिक्षकाला शाळा सोडून पळून जायला मजबूर करणे अशा त्यांच्या वर्तणुकीचा सामना लेखकाला करावा लागतो. अशा मुलांना सुसंस्कारित करणे, त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी, आत्मविश्वासाने उभं राहण्यासाठी तयार करणे. ही अवघड कामे लेखक कशी करतो त्यात त्याला कितपत यश येते हा या पुस्तकातील मुख्य विषय आहे. असंस्कृत, असभ्य, वर्णद्वेष मनात बाळगणाऱ्या शाळकरी मुलाबद्दल त्यांच्या शिक्षकांने विश्वास दाखवला; शिक्षक त्यांच्याशी प्रेमाने वागला; त्याने मुलांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला; तर ती मुलं बदलतात. जबाबदारीने वागतात. वर्णद्वेष विसरतात. आचरणात चांगला बदल करून शाळेतील इतर लहान मुलांसमोर आदर्श ठेवतात. अभ्यासात प्रगती करतात. हे एका दिवसात साध्य होत नाही. शिक्षक असणारा लेखक त्यासाठी मेहनत घेतो. मुलांना शिकावण्याची पध्दत बदलतो. पालक आणि मुलांच्या भावविश्वात मानाचे स्थान मिळवतो. वेळप्रसंगी मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. यासाठी शाळेच्या प्रेमळ मुख्याध्यापकांची त्यांना सतत साथ मिळते. या शाळेचे मुख्याध्यापक खूप सहनशील, प्रेमळ आणि मुलांचं मन समजून घेणारे आहेत. प्रेमाच्या पायावर शाळेची इमारत तोलून धरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ब्रेथवेट यांना याच शाळेत त्यांची जीवनसाथी (सहकारी शिक्षिका) मिळते. सूड, द्वेष, राग, हिंसा अशा कोणत्याही भावनेपेक्षा प्रेम ही मोठी शक्ती आहे! एका शिक्षकाला आपल्या वर्गातील उनाड, वाया गेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रती वाटणाऱ्या अपार प्रेमाची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. वाचकाला खिळवून ठेवणारी ही कादंबरी लेखक बेथवेट यांच्या शिक्षकी पेशात सुरवातीला आलेल्या अनुभवावर आधारलेली आहे. या पुस्तकावर आधारित हॉलिवूड चित्रपटही येऊन गेलेले आहेत. शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रेथवेट! त्यांनी त्यांच्यातील शिक्षकाला उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे आणि समस्त शिक्षकांना आदर्श घालून दिलेला आहे. ब्रेथवेट यांचं #टू_सर_विथ_लव्ह हे पुस्तक दिशा हरवलेल्या सर्व शिक्षकांना दिशादर्शक आहे. पालकांनाही मार्गदर्शक आहे. आपल्याला घायाळ करायला टपलेल्या लोकांपेक्षा आपणाला खूप मोठे व्हायचे असेल तर निरर्थक वाद टाळून प्रतिकूल परिस्थितीतही मोठ्या संयमाने मार्गक्रमण करायला हवे. हे जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा ब्रेथवेट हा शिक्षक तरुणांना, तरूणाईकडे वाटचाल करणाऱ्या सर्वांना प्रेरणादायी आहे. ...Read more

  • Rating Starसंदिप रामचंद्र चव्हाण

    ही कहाणी आहे इंग्लंडमधील एका उच्चशिक्षित निवृत्त सैनिकाची जो अपरिहार्य कारणामुळे शिक्षक बनतो. नाव एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट! ब्रेथवेट यांनी १९५९ साली शिक्षकी पेशातून आलेल्या अनुभवावर आधारित मूळ पुस्तक लिहले आहे. लीना सोहोनी यांनी त्याचा उकृष्ठ मराठी नुवाद केलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लडच्या रॉयल एअरफोर्समधून निवृत्त झालेले ब्रेथवेट हे बुद्धिमान इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत. (होते आता त्यांचं निधन झालं आहे.मृत्यू १२ डिसेंबर २०१६) निवृत्ती नंतर उच्चपदाच्या चांगल्या नोकरीस लायक असूनही त्यांना वारंवार डावलले जाते. त्यांचा पदोपदी अपमान केला जातो...कारण ते कृष्णवर्णीय(निग्रो) असणे हाच त्यांचा एकमेव दोष आहे. जगभर वसाहती बनवून आपल्या राज्याचा विस्तार करणारे आणि लोकशीच्या बाता मारणारे गोरे इंग्रज मनाने मात्र काळे होते. इंग्रजांच्या दुटुप्पीपणाचा, खोटारडेपणाचा बुरखा या आत्मचरित्रात फाडला गेला आहे. गोरे इंग्रज कृष्णवर्णीय लोकांचे कसे मानसिक शोषण आणि खच्चीकरण करत होते याबद्दल पुस्तकातून माहिती मिळते. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवण्यात अपयश आल्याने निराश होऊन आणि नोकरीची गरज म्हणून ब्रेथवेट लंडनच्या ईस्ट एन्ड या गरीब, बदनाम, गलिच्छ वस्तीतील एका शाळेत सामान्य शिक्षकाची नोकरी पत्करतात आणि सुरवात होते त्यांच्या आव्हानात्मक शिक्षकी पेशाला! त्यांचं जीवन बदलून टाकणाऱ्या प्रवासाला…! या शाळेतील सर्वात मोठ्या मुलांचा वर्ग त्यांना मिळतो. ही मुलं/मुली पौगंडावस्थेतील आहेत. सामन्य मुलांपेक्षा शरीराने मोठी आणि तारुण्यात पदार्पण करणारी आहेत. त्यांचं ओंगळवाणे वागणे, व्यसनं करणे, अस्वच्छ राहणीमान, मुलामुलींचे एकमेकांशी शारीरिक लगट करण्याचे प्रयत्न, कोणत्याही नवीन शिक्षकाला मानसिक त्रास देणे, नवीन शिक्षकाला शाळा सोडून पळून जायला मजबूर करणे अशा त्यांच्या वर्तणुकीचा सामना लेखकाला करावा लागतो. अशा मुलांना सुसंस्कारित करणे, त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी, आत्मविश्वासाने उभं राहण्यासाठी तयार करणे. ही अवघड कामे लेखक कशी करतो त्यात त्याला कितपत यश येते हा या पुस्तकातील मुख्य विषय आहे. असंस्कृत, असभ्य, वर्णद्वेष मनात बाळगणाऱ्या शाळकरी मुलाबद्दल त्यांच्या शिक्षकांने विश्वास दाखवला; शिक्षक त्यांच्याशी प्रेमाने वागला; त्याने मुलांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला; तर ती मुलं बदलतात. जबाबदारीने वागतात. वर्णद्वेष विसरतात. आचरणात चांगला बदल करून शाळेतील इतर लहान मुलांसमोर आदर्श ठेवतात. अभ्यासात प्रगती करतात. हे एका दिवसात साध्य होत नाही. शिक्षक असणारा लेखक त्यासाठी मेहनत घेतो. मुलांना शिकावण्याची पध्दत बदलतो. पालक आणि मुलांच्या भावविश्वात मानाचे स्थान मिळवतो. वेळप्रसंगी मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. यासाठी शाळेच्या प्रेमळ मुख्याध्यापकांची त्यांना सतत साथ मिळते. या शाळेचे मुख्याध्यापक खूप सहनशील, प्रेमळ आणि मुलांचं मन समजून घेणारे आहेत. प्रेमाच्या पायावर शाळेची इमारत तोलून धरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ब्रेथवेट यांना याच शाळेत त्यांची जीवनसाथी (सहकारी शिक्षिका) मिळते. सूड, द्वेष, राग, हिंसा अशा कोणत्याही भावनेपेक्षा प्रेम ही मोठी शक्ती आहे! एका शिक्षकाला आपल्या वर्गातील उनाड, वाया गेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रती वाटणाऱ्या अपार प्रेमाची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. वाचकाला खिळवून ठेवणारी ही कादंबरी लेखक ब्रेथवेट यांच्या शिक्षकी पेशात सुरवातीला आलेल्या अनुभवावर आधारलेली आहे. या पुस्तकावर आधारित हॉलिवूड चित्रपटही येऊन गेलेले आहेत. मला या पुस्तकाबद्दलची माहिती हेरंब कुलकर्णी यांच्या बखर शिक्षणाची या पुस्तकातून मिळाली. शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रेथवेट! त्यांनी त्यांच्यातील शिक्षकाला उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे आणि समस्त शिक्षकांना आदर्श घालून दिलेला आहे. भारतात आज खाजगी शिक्षणसंस्थांचे आलेले उदंड पीक, सरकारी/अनुदानित शाळेतील/महाविद्यालयाततील कायम असणाऱ्या शिक्षक/प्राध्यापकांची विद्यार्थ्यांबद्दलची अनास्था; बहुसंख्य काँट्रॅक्ट भरती केलेले शिक्षक व त्यामुळे त्यांना आलेले नैराश्य; प्राथमिक ते विद्यापीठ शिक्षकांची समाजाशी-विद्यार्थ्यांशी तुटलेली नाळ; शिक्षकी पेशाचे विसरले गेलेले भान; कुठेच रोजगार नाही म्हणून नाइलाजाने शिक्षक झालेले शिक्षक; संस्था चालकांना लाखों रुपये देऊन व वशिलेबाजी करून मिळवलेली नोकरी; प्राथमिक/माध्यमिक शाळेतील मुलांची मानसीकता त्यांचं निरागस मन समजून घेण्यात आलेलं अपयश इत्यादी अनेक दोष आजच्या बहुसंख्य शिक्षकांमध्ये दिसतात. काही शिक्षक याला अपवाद आहेत; जीव तोडून, पदरच्या खर्चाने, प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कष्टाने आणि नेटाने आपले कर्तव्य पार पाडत आहेत त्याच्याबद्दल पूर्ण आदर आहे. परंतु त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. ब्रेथवेट यांचं #टू_सर_विथ_लव्ह हे पुस्तक दिशा हरवलेल्या सर्व शिक्षकांना दिशादर्शक आहे. पालकांनाही मार्गदर्शक आहे. आपल्याला घायाळ करायला टपलेल्या लोकांपेक्षा आपणाला खूप मोठे व्हायचे असेल तर निरर्थक वाद टाळून प्रतिकूल परिस्थितीतही मोठ्या संयमाने मार्गक्रमण करायला हवे. जीवनाचे हे तत्वज्ञान सांगणारा ब्रेथवेट (शिक्षक) प्रत्येक तरुणाला, तरूणाईकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more