* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353174873
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :BABARAO MUSALE COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NO NOT NEVER IS A STORY OF TWO VILLAGE GIRLS RANI & MANKI WHO ARE SHIFTED TO THE CITY FOR ENGINEERING STUDIES. RANI IS STUDIOUS BUT POOR. WHEREAS MANKI IS RICH, STUBBORN GIRL WHO BELIEVES ONLY IN ENJOYMENT. UNCONTROLLABLE BEHAVIOR OF MANKI PUTS RANI IS A CHALLENGING SITUATIONS ALL THE TIME, BUT HER SINCERE AND CALM ATTITUDE GIVES HER STRENGTH TO TACKLE ALL THE HURDLES.
ही कहाणी आहे वहाड विदर्भातल्या दोन मुलींची. गुणी, सोज्वळ आणि गरीब राणीची आणि श्रीमंत कुटुंबातल्या हटखोर मंकीची. राणीच्या घरची परिस्थिती नसतानाही मंकीच्या वडिलांच्या दयेमुळे तिला पुढील शिक्षणाची संधी मिळते. बारावीनंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी या दोघी पुण्यासारख्या महानगरात दाखल होतात. या महानगराचे रागरंग, इंजिनिअरिंग महाविद्यालयातील खळबळजनक वातावरण आणि दोघींचा परस्परविरोधी स्वभाव यातून या कथानकाला वेगवेगळी वळणं मिळत जातात. स्वैर, उच्छृंखल मंकी आपल्या अनिर्बंध जगण्यासाठी वेळोवेळी राणीला वेठीस धरते. आणि राणीचं पुण्यातलं जगणं आव्हानांनी भरून जातं. तरुणाईची मानसिकता आणि मोकळ्या अवकाशात मिळालेलं स्वातंत्र्य यांचा सुरस मेळ असणारी, कधी अंगावर शहारे आणणारी तर कधी सुखद रोमांच आणणारी विलक्षण कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#BABARAOMUSALE #NONOTNEVER #MARATHINOVEL #ONLINEBOOKS #VARUL #COLLEGEDRAMA #ग्रामीणकादंबरी #ओंनलाईनपुस्तके #मराठीपुस्तके #वारूळ #मराठीप्रकाशक
Customer Reviews
  • Rating StarLALIT - APRIL 2021

    ‘नो नॉट नेव्हर’ या कादंबरीचे लेखक बाबाराव मुसळे अत्यंत अभ्यासू वृत्तीचे आहे. या कादंबरीचे कथानक सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेकांची मदत घेतली आहे, चर्चा केली आहे. त्या सर्वांविषयीचे ऋण सुरुवातीलाच त्यांनी व्यक्त केले आहे. वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यवर ‘टीन ऐजर्स’चा आव्हानात्मक विषय त्यांनी हाताळला. त्यात ते कितपत यशस्वी झाले, ते वाचकांनी ठरवायचे, असेही त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे त्यांचे मनोगत विशेष महत्त्वाचे आहे. या कादंबरीतील दोन महत्त्वाची पात्रं म्हणजे अत्यंत ग्रामीण भागातील गरीबाघरची ‘राणी’ आणि श्रीमंताघरची ‘मंकी’ या दोन एकाच वयाच्या पात्रांचे एकत्र येणे. एकत्र प्रवास करणे, पुणे शहरात शिक्षणासाठी एकत्र राहणे, एका वर्गात शिकणे याची कारणे कादंबरीत सापडतात. त्यांचे रूपरंग, त्यांच्यातील वाद-संवाद, त्यांचे स्वभाव, विचार करण्याची प्रवृत्ती, मानसिकता, बौद्धिक क्षमता यातून मुसळे यांनी दोन व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर साक्षात उभी केली आहेत. इंजिनिअिंरग कॉलेजचे विषय काय असतात? इतकेच नव्हे, तर ते कॉलेजमध्ये कसे शिकवले जातात? किंवा इंजिनिअिंरग शिकताना विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलही करावी लागतात, तर त्या प्रॅक्टिकल्समध्ये काय विषय असतात, इथपर्यंतची सूक्ष्म निरीक्षणे या पुस्तकात त्यांनी नोंदवली आहेत. उदा. वर्गात त्यांनी ‘सॉलिड स्टेट फिजिक्स’ हे प्रकरण शिकवलं. त्यात पी-एन जंक्शन डायोड आणि झेनर जंक्शन डायोड यांच्या कॅरेक्टरिस्टिक पाहिल्या. त्यापैकी पी-एन जंक्शन डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक आज तपासून पाहावयाच्या होत्या. ‘राणीचा चेहरा वापरून बनवलेली घाणेरडी व्हिडिओ क्लिप्स आणि त्याद्वारे केलेले ब्लॅकमेलिंग’, ‘स्लीपर कोच ट्रॅव्हल’ विषयीच्या काही नोंदी, ‘इसाक’ची कहाणी, बोल्ड भट्टी, सुचिता मॅडम आणि राणी यांच्यातील संवाद, प्रिन्सिपॉलकडून राणीला ‘आयडॉल ऑफ कॉलेज’चा किताब मिळणे, सिनेमातले काही कथानक, राणीच्या वडिलांना कारण नसताना पडलेला मार याची कथा, मासिक पाळीमध्ये मुली वापरत असलेले पॅड, कॉलेज आवारात बिनदिक्कतपणे निरोधचा वापर या संबंधित कथानक, डेटिंग, ‘भिन्नलिंगी आणि समलिंगी’ संबंधाविषयी चर्चा, रॅगिंग, जीएफ-बीएफ (गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड), जागतिक फ्रेंडशिप डे, (Yolo) (योलो म्हणजे यू ओन्ली लिव्ह वन्स!), सिड हल्ला, आत्महत्या, खोटे अटेंडन्स देणे, ‘टोपो’ नावाचा कॉपीचा नवीन प्रकार, असे कितीतरी विषय एकदाच कादंबरीमध्ये हाताळले आहेत. त्यामुळे ही कादंबरी अगदी तरुण पिढीलाही जवळची वाटेल! काही चमकदार वाक्ये संपूर्ण कादंबरीमध्ये अधेमधे पेरलेली आहेत. घरात झोपताना गोधडीवरची स्थिरता येथे क्षणभरही लाभत नव्हती. किंवा भट्टीचं ब्लॅक बॅकग्राऊंडवरचं हे पोल्युटेड पिक्चर तर राणीचं गोल्डन बॅकग्राऊंडवरचं एनर्जेटिक, इन्थुझास्टिक, हाय स्पिरिटेड पिक्चर. दोन्ही परस्परविरोधी असले तरी दोन्हीचं आपापल्या ठिकाणी वेगळं महत्त्व आहे. उच्च शिक्षण घेताना येणारे आजच्या काळचे सगळे ज्वलंत प्रश्न आणि त्याला सामोरी जाणारी तरुण पिढी याचे उत्कृष्ट चित्रण या कादंबरीद्वारे लेखकाने केले आहे. ज्या तऱ्हेने कादंबरीची सुरुवात आहे त्यानुसार शेवटाकडे ती सरकताना वाचकाच्या मनात एक शेवट असतो, तर त्याला पूर्णत्वाने कलाटणी देणारा शेवट यात आहे, हेही या कादंबरीचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. खरोखरी कधी अंगावर शहारे आणणारी तर कधी सुखद रोमांच उठवणाऱ्या या कादंबरीचे वाचक नक्कीच स्वागत करतील! ...Read more

  • Rating Star महाराष्ट्र टाइम्स नागपूर बुधवार १३/१/२०२१

    जेष्ठ लेखक बाबाराव मुसळे यांची `नो नॉट नेव्हर...` ही अलीकडेच प्रकाशित बहुचर्चित कादंबरी. ही कादंबरी म्हणजे मुळात सत्तर वर्षे वयाच्या लेखकाने तिसऱ्या पिढीतल्या तरुणाईच्या मानसिकतेत शिरून, तरुणाईची भाषा जाणून घेत, इंजिनिअरिंग कॉलेजमधील त्यांचे ` ऍव्हान्स कॉलेज लाईफ` कादंबरीत हुबेहूब चितारणे, हा एक साहित्यिक चमत्कारच म्हणावा लागेल. हा चमत्कार लेखक बाबाराव मुसळे यांनी करून दाखवल्याबद्दल त्यांच्या सर्जनशीलतेला दाद द्यावी तितकी थोडीच. पुण्यातले एक इंजिनिअरिंग कॉलेज. विदर्भातल्या वाशीम जिल्ह्यातल्या ब्रम्हा या खेड्यागावातल्या राणी आणि मंकी उर्फ मृणाल या दोन विद्यार्थिनी. दोघींचे स्वभाव अतिभीन्न. अगदी टोकाचे म्हणावे असे. जणू दोन समांतर रूळ एकमेकांसोबत धावणारे; पण कधीही जवळ न येणारे असे. या महाविद्यालयात प्रवेश करतानाचा विद्यार्थ्यांचा सुरुवातीचा सैरभैरपणा, कॉलेज विश्व् , टीचर्स स्टाफ, कर्मचारी, प्रिन्सिपल, संस्थाचालक, लायब्ररी, कँटीन, व्यवस्थापनाची कडक शिस्त, जर्नल्स, प्रॅक्टिकल्सची रुक्ष बाजू.... सगळं काही अभ्यासपूर्ण शैलीने समजून घेवून तंतोतंत मांडले आहे. यामुळे ते सगळे काही जसेच्या तसे वाचकांच्या अनुभवास येते. कादंबरीचा प्रवास जसा सुरु होतो, तसा आपलाही या महाविद्यालयात प्रवेश होतो . नंतर जे जे घडत जाते त्याला वाचक म्हणून आपण साक्षीदार उरतो. राणी मंकी, भट्टी, मंदार, संजना, जाधव सर, देशपांडे सर.. कादंबरीतील एकएक पात्र हळूहळू आपल्या ओळखीचे होत जाते. कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी लेखक आपल्याला त्या विश्वात फिरवत राहतो. लेखकाला परकाया प्रवेश करता यायला हवा, असे म्हणतात. पात्रांच्या मनात शिरून त्यांच्यासारखे, लेखकाला लिहिताना मानसिक पातळीवर जगावे लागते. तरच ती पात्र जिवंत होतात. जिवंतपणे कादंबरीमध्ये वावरू लागतात. इथे तरुण पिढीच्या मनात शिरून त्यांचे जगणे बाबाराव मुसळे हे समरसून जगले आहेत. कोणताही परिसर फक्त बघून निरीक्षण करून ओळखीचा होत नाही; तर त्या परिसरात राहून तो परिसर आपलासा करावा लागतो. तरच तो परिसर, तो माहोल जिवंतपणे उभा करता येतो. लेखक बाबाराव मुसळे यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात, साहिल मंझील मधील मुलींचे हॉस्टेल बोलते केले आहे. अगदी राणी-मंकीची रूमसुद्धा आपल्या ओळखीची होवून जाते. अध्यापन, व्यवस्थापन, त्यातील खाचाखोचा, त्यातील अदृश्य राजकारण लेखकाने नीटपणे समजून घेतले आहे. शिस्त, नियम, आचारसंहिता याकडे बघण्याची व्यवस्थापनाची बाजू रास्त वाटते; तर तीच विद्यार्थ्याच्या नजरेतून बघताना आणखी वेगळी वाटते. शरीरसंबंध, कॉन्डोम, पिल्स, डेटिंग, चॅटिंग याबाबत तरुणाई एवढी सहज झालेली आहे कि वाचताना नंतर नंतर धक्कादायक काहीच वाटत नाही. घराबाहेर आपली मुलं किती सुरक्षित असतात? चांगल्या-वाईट संगतीचे त्यांच्यावर कसले परिणाम होतात? मोबाइल, इंटरनेट, चॅटींग,एसएमएस, पोर्नोग्राफी, भिन्नलिंगी आकर्षण, स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची मानसिकता, चंगळवादी, मौजमजा करण्याचा दृष्टीकोन, त्यातील धोके, अडचणी, जीवावर बेतणारे प्रसंग, यासारख्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत ही कादंबरी पुढे सरकत राहते. तरुणाईची भाषा, त्यांचे एसएमएस, चॅटिंग त्यांचे शॉर्टफॉर्म्स, त्यांनी मित्रांना-मैत्रिणींना दिलेली नावे, त्यांचे आपसातील संभाषण, त्यांची अभिव्यक्ती, त्यांचे स्वभाव विशेष.. सर्वकाही नेमकेपणाने साधले गेले आहे. विद्यार्थी-विद्यार्थीनिंची देहबोली, त्यांचे पेहराव, त्यातील बिनधास्तपणा, त्यांच्या आक्रमक फॅशन्स, हे जग कुठेही कृत्रिम वाटत नाही. हे सगळं उभारणं अभ्यासू वृत्तीशिवाय, मेहनतीशिवाय अजिबात शक्य नाही. कादंबरीच्या कथानकाचा उलगडा करून रसभंग करणे क्षम्य होणार नाही. पण, `ऍटलीस्ट एक तरी कॉन्डोम पर्समध्ये बाळगत जा. कधी कोणता प्रसंग येईल ते सांगता येत नाही. तसा प्रसंग आलाच तर शक्यतो अवॊइड करायचा प्रयत्न करायचा. ते जमलं नाहीच तर त्याला कॉन्डोमचा यूज करायची विनंती करायची.` एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला दिलेला हा संदेश महाविद्यालयीन तरुणींच्या सेक्स लाईफची भयावहता दर्शवतो. किंवा `नो इंटरकोर्स विदाउट कॉन्डोम` हे सेक्सचं मध्यवर्ती सूत्र सांगणारे संवाद यातील भीषणता दर्शवित असल्याने त्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. कादंबरीत अनेक बऱ्यावाईट घटना अचानकपणे येवून आदळतात. पण ओढून-ताणून कथानकाची जुळवणी केलेली कुठेही जाणवत नाही. काही घटनांमागील उकल लेखकाने रहस्यकथेच्या शैलीत केली आहे. त्यामुळे वाचताना कथानकाची आणखीनच रंजकता वाढते. एकंदरीत लेखक बाबाराव मुसळे यांनी आपले वय कमी करून या तरुणाईसोबत तरुण होत नुकतेच अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे कि काय? असे वाटावे इतपत ही कादंबरी तरुणाईची झालेली आहे. ही कादंबरी तरुणाईला नक्की आपली वाटणार, या कादंबरीवर तरुणाईच्या नक्की उड्या पडणार यात शंका नाही. तरीही भरकटलेल्या, भरकटू पाहणाऱ्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींना एक सकारात्मक, आश्वासक संदेश हि कादंबरी देवून हि कादंबरी संपते, हे या कादंबरीचे मोठे यश होय... ...Read more

  • Rating Starदिलीप जिरवणकर

    कांदबरीची सुरुवातच ब्रह्मा गांवच पाणीच वेगळ हे राणीच्या यशानं पुन्हा सिद्ध झाल.ही पहिलीच ओळ वाचून मनाला सुखद धक्काच बसला. ब्रह्मा गांवचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहचाविनारे लेखक म्हणून खूप मोठे नांव होउन सुद्धा तुम्ही आपल्या मातीशी किती एकरुप आहात.तुम्ही कांदबरीच्या सुरुवातीलाच गांवाकडील मुलांचे नोकरी, व्यवसाय, छोटे मोठे काम करणाऱ्याचे मोठ्या मनानी कौतुक केले. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या गांवच पाणीच न्यार ते अगदी तुमच्या बाबतीत अगदी खर आहे. तुम्हीच १० कांदबरी लीहुन अख्खा महाराष्ट्रला ते न्यार पाणी(शब्दरुपी)देऊन तुमच्या बरोबर गांवचे नाव उज्वल केले. कादंबरी तुम्ही अशी शब्दरुपी साकारली की ती वाचतानी नजरे समोर संपूर्ण घटनेचे चित्र डोळ्यानी बघत आहोत .आपण त्या प्रत्येक घटनास्थळाचे साक्षीदार आहोत असेच वाटते. कांदबरीत दोन भिन्न विचराच्या तरुण मुली एकत्र राहतात पण त्या आपसात कधी बोलत सुद्धा नाही. त्या कधीच एकत्र येणार नाही असेच वाटत. पंरतु त्या शेवटी एकत्र आनुन लेखकाने एक सुखद धक्का दिला. वाचतानी बर्याच वेळा काळजात ठोके पडतात. कांदबरीची एक नाईका राणी ब्रह्म्याची असल्याने ती खूप जवळची वाटते की तीच्या विषयी मनात एक आपुलकी, जिव्हाळा आपोआपच येतो. तसेच ब्लॅकमेल मंकीचा सुरुवातीला खूप तिरस्कार यतो की स्वताच्या स्वार्थासाठी कोणत्याही टोकाला जायला तयार होते.परंतु ह्या स्वभावामुळे तिच्यावरच जीवघेण्या समस्या येतात .काही काळानंतर जेंव्हा तीला कळत की आपण ज्या राणीचा तिरस्कार करत होतो .तीच्यामुळेच आपण ह्या नरकातुन सहीसलामत सुटलो आहे. शेवटी तीला राणीचाच आधार वाटतो.त्या नुकत्याच एकत्र येतात मंकी माकडपणा सोडुन म्रूणाल होते. त्याचवेळी सोज्वळ राणीला एका मीत्राचा वात्रट एस.एम.एस.येतो. ती घाबरून जाते पंरतु या त्रासातून शेवटी म्रुणालनेच बाहेर काढले. कांदबरीचे मुखपृष्ठ खुपच आकर्षक आहे ते बघुनच कांदबरी वाचायला आकर्षित करते. कांदबरी वाचूनच तुम्हाला मंकीची म्रूणाल कशी झाली हे कळेल. दादा मी कांदबरी वाचताना खूप प्रभावीत झालो .एवढे पात्र साकारणे आणि त्याचे रोल प्रत्येक पेजवर पात्राची लींक न तुटता साकारणे म्हणजे तुम्ही त्या पात्राला मनात कसे साठवले असेल हा मनाला प्रश्न पडतो तुम्ही लीहीलेली कांदबरी वाचून त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला चार ओळी लीहु शकत नाही. दादा तुम्ही फार ग्रेट आहात शब्दात तुमचे वर्णन करण्यापलीकडे आहे. तुमची हाल्या हाल्या दुधू दे ही कांदबरी जशी आकाशवाणीवर सादरीकरण झाले तशी ही कांदबरी एखाद्या मराठी चँनलवाल्याच्या नजरेस पडली तर तिच्यावर एखादी टिव्ही सिरीयल नक्कीच ते करतील अस मला मनातुन वाटत आहे. माझी एक विनंती आहे. प्रत्यकाने ही कांदबरी वाचावी पंरतु खासकरून वर्ग १०वी पास विद्यार्थीच्या पालकांनी ती जरूर वाचावी व आपल्या पाल्यास ती वाचावयास भाग पाडावी.मुलांना पुढील शिक्षण घेतांना कोण कोणत्या समस्या येउ शकतात तसेच कोणत्या मीत्राची संगत केली पाहिजे.काँलेज शिक्षण, काँलेज जिवण तेथील एकुण वातावरण कश्या प्रकारे असते. वयानुसार तुमचे शरीर, भावना ह्यात होणारे बदल त्यामुळे आपल्या मनातील चलबिचल, तेथील चांगले,वाइट अनुभव कसे येउ शकतात. ही कांदबरी सत्यपरिस्तीथीच दर्शन घडविते.तुम्हाला संपूर्ण शिक्षण झाल्यावर जे अनुभव येतील तेच अनुभव ही कांदबरी वाचुन तुम्हाला अगोदर कळेल म्हणजे माझा सांगन्याचा हेतू म्हणजे तुमच्या साठी ही कांदबरी मार्गदर्शक ठरावी हे माझ ठाम मत आहे. ...Read more

  • Rating StarSanjan More

    नो नॉट नेव्हर...सत्तरीच्या लेखकाचा साहित्यिक चमत्कार! ही बाबाराव मुसळे यांची बहुचर्चित कादंबरी वाचली. चार दिवस या कादंबरीने पिच्छा सोडला नव्हता. पुण्यातलं एक इंजिनिअरिंग कॉलेज. विदर्भातल्या वाशीम जिल्ह्यातल्या ब्रम्हा या खेडेगावातल्या राणी, आणिमंकी ( मृणाल ) या दोन विद्यार्थिनी. दोघींचे स्वभाव अतिभिन्न, अगदी टोकाचे म्हणावे असे. जणू दोन समांतर रुळ एकमेकांसोबत धावणारे पण कधीही जवळ न येणारे असे. या महाविद्यालयात प्रवेश करतानाचा विद्यार्थ्याचा सुरुवातीचा सैरभैरपणा, कॉलेज विश्व, स्टाफ, कर्मचारी, प्रिन्सिपॉल, संस्थाचालक, लायब्ररी, कॅन्टीन, व्यवस्थापनाची कडक शिस्त, जर्नल्स, प्रॅक्टिकल्सची रुक्ष बाजू... सगळं काही लेखकाने कष्ट घेवून, मेहनत करुन अभ्यासपूर्ण शैलीने समजून घेवून तंतोतंत मांडलंय, त्यामुळे ते सगळं काही जसंच्या तसं वाचकांच्या अनुभवास येतं. कादंबरीचा प्रवास जसा सुरू होतो तसा आपलाही या महाविद्यालयात प्रवेश होतो. नंतर जे जे घडत जातं त्याला आपण साक्षीदार उरतो. राणी, मंकी, भट्टी, मंदार, संजना, जाधव सर, देशपांडे सर... कादंबरीतलं एक एक पात्र हळूहळू आपल्या ओळखीचं होत जातं. कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी लेखक आपल्याला त्या विश्वात फिरवत राहतो. मुळात सत्तर वर्षे वयाच्या लेखकाने तिसऱ्या पिढीतल्या तरुणाईच्या मानसिकतेत शिरून, तरुणाईची भाषा जाणून घेवून, इंजिनिअरिंग कॉलेजमधील त्यांचं अ‍ॅडव्हान्स्ड कॉलेज लाईफ कादंबरीत हुबेहुब चितारणं हा एक साहित्यिक चमत्कारच म्हणावा लागेल. हा चमत्कार लेखक बाबाराव मुसळे यांनी करुन दाखवलाय. लेखकाला परकाया प्रवेश करता यायला हवा असं म्हणतात. पात्रांच्या मनात शिरुन त्यांच्यासारखं, लेखकाला लिहताना मानसिक पातळीवर जगावं लागतं, तरच ती पात्रं जिवंत होतात, जिवंतपणे कादंबरीमध्ये वावरू लागतात. इथं बाबाराव मुसळे तरुण पिढीच्या मनात शिरुन त्यांचं जगणं भोगणं समर्थपणे जाणतात। परीक्षक ‍संजन मोरे ,बारामती ,पुणे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more