* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NOT PAID
  • Availability : Available
  • Translators : Ujjwala Kelkar
  • ISBN : 9788184982855
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
HUMOUR AND SATIRE ARE CORE OF HINDI LITERATURE. MANY AUTHORS ARE FAMOUS FOR THEIR HUMOROUS AND SATIRICAL WRITING. AMONGST THOSE WRITERS THE MOST PROMINENT IS HARISHANKARJI. SOME OF HIS WRITING IS TRANSLATED BY UJJWALA KELKAR WHICH IS A REAL GIFT TO ALL THOSE MARATHI READERS WHO LOVE QUALITY READING BUT ARE STOPPED MIDWAY BECAUSE OF THE LANGUAGE BARRIER. TODAY, WE SEE THAT EACH AND EVERY ELEMENT OF INDIA IS CORRUPTED. GONE IS THE PURITY AND SANCTITY. IT IS REPLACED BY TURBIDITY AND DOUBT. THE AUTHOR SUCCEEDS IN BRINGING THESE SHARP, PUNGENT COLOURS TO OUR NOTICE THROUGH HIS WRITING. HE DOES NOT SKIP ANY AREA. HE INCLUDES POLITICS, DEMOCRACY, ELECTIONS, LITERATURE, ADMINISTRATION, EDUCATION, POLICE DEPARTMENT AND EVEN SPIRITUALITY. HIS WRITING OPENS OUR EYES AND EARS CLEARLY AND MAKES US UNDERSTAND THE TRUE MEANING OF THE HAPPENINGS ALL AROUND US. IT IS TRUE THAT HIS SARCASM IS SHARP, HIS DISDAIN AND CYNICISM IS RUDE YET HIS ANTAGONISM ABOUT THE DISLOYALTY OF THE SOCIETY IS TRUE TO THE CORE. SOMETIMES HE USES MYTHS, SOMETIMES CURRENT AFFAIRS. BUT HIS INTENTIONS ARE QUITE CLEAR. HIS WRITING MAKES EVERYONE PAUSE, THINK AND RESHUFFLE BELIEFS AND BEHAVIOUR. HIS WRITING HAS A WONDERFUL MEANING. THOUGH IT APPEARS QUITE SIMPLE IT IS DIFFICULT TO TRANSLATE IT. UJJWALA KELKAR HAS FULFILLED THIS HERCULEAN TASK WITH EASE.
हिंदीत पुष्कळ लेखक व्यंगलेखन करतात. त्यांच्यातले सर्वोत्कृष्ट म्हणजे हरिशंकर परसाई होत, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. हरिशंकरजींच्या काही उत्कृष्ट व्यंगरचनाच्या मराठी अनुवादांचा हा संग्रह ही श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी मराठी वाचकांना दिलेली एक नावीन्यपूर्ण भेट आहे. भारतीय समाजजीवनाची सर्वच अंगे भ्रष्ट झाली आहेत. त्यांचे स्वरूप पूर्णपणे गढूळ झाले आहे. या सार्वत्रिक गढूळपणाचे विदारक दर्शन तीक्ष्ण उपहासाद्वारे लेखकाने आपल्या व्यंगलेखनातून घडविले आहे. त्यातूनच कोणतचे क्षेत्र सुटलेले नाही. लोकशाही, निवडणुका, राजकारण यांच्यापासून साहित्य, सरकारी पुरस्कार, प्रशासन, पोलीसयंत्रणा, शिक्षण आणि अध्यात्मसुद्धा! अशी सर्वच क्षेत्रे उपहासाच्या धारदार सुरीने सोलून काढून, नागडीउघडी करून लेखकाने वाचकांसमोर ठेवली आहेत. हरिशंकरजींचा उपहास झोंबरा आहे, व्यंग बोचरे आहे. पण सार्वत्रिक गढूळपणाबद्दलची खंत आणि चीड अस्सल आहे. उपहासासाठी त्यांनी कधी पुराणकथांचे विडंबन केले आहे तरी कधी मार्मिक अभिप्रायांतून वाचकांना हसताहसता विचार करायला लावले आहे. हरिशंकरजींच्या हिंदीतील व्यंगलेखनाचे तेवढेच धारदार मराठीकरण करण्याचे कठीण काम श्रीमती केळकर यांनी समर्थपणे पार पाडले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #NOTPAID #NOTPAID #नॉटपेड #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMHINDITOMARATHI #UJJWALAKELKAR #HARISHANKARPARSAI "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more