* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE HISTORY OF MAHABHARATA IS LIKE A MYTH YET IT IS A STORY OF A ROYAL FAMILY. IF WE TRY TO CONSIDER IT AS A STORY, THEN IT APPEARS TO BE AN EPIC, AND WHEN WE APPLY THE RULES OF EPIC TO IT, IT APPEARS TO BE AN APPREHENSIVE JUDGMENT. THIS EPIC MAY APPEAR TO BE DECEITFUL BUT ITS BEAUTY LIES IN ITS PECULIARITY. MAHABHARAT GIVES US THE TRUE PICTURES OF FOUR RIGHTEOUS CHARACTERS ON THE FOUR WALLS OF THE TEMPLE OF RELIGION. EACH WALL WILL PROUDLY REVEAL THE `KARMAYOGI` KRISHNA, `KARMAVEER` BHISHMA, `KARMANURAGI` YUDHISTHIR AND `KARMASANYASI` VIDUR RESPECTIVELY. THEY ALL HOLD DIVINE QUALITIES. MAHABHARATA IS SUCH A SENSITIVE TOPIC, MUCH HAVE BEEN WRITTEN ABOUT IT AND MUCH MORE WILL BE WRITTEN ABOUT IT. WHEN WE READ THIS EPIC, IT BRINGS DIFFERENT UNKNOWN ASPECTS TO CONSIDER OVER AND OVER AGAIN. IT SHOWS EACH INCIDENT IN NEW LIGHT, NEW PERSONALITIES, NEW FORMAT, NEW COLOURS..
महाभारताला इतिहास म्हणावे तर ते पुराण वाटते आणि पुराण म्हणू जावे तर ती राजघराण्याची कहाणी वाटते. एक कथा म्हणून त्याचे मूल्यांकन करावे तर ते विलक्षण असामान्य काव्य वाटते आणि काव्याच्या भिंगातून त्याच्याकडे पाहिल्यास तो दर्शनशास्त्राचा ग्रंथ आहे असे प्रतीत होते. पहिल्या दृष्टिक्षेपात महाभारताचे शास्त्रीय रूप फसवे भासले, तरी त्याचे सौंदर्यही त्याच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण असण्यातच आहे. महाभारतात ज्या धर्माचा बोध आहे, ज्या धर्माचे प्रयोजन आहे त्या धर्माची एखाद्या मंदिराच्या आकारात कल्पना केली तर त्या मंदिराच्या चार भिंतींवर चार वेगवेगळ्या धर्मपुरुषांचे दर्शन होते. एका भिंतीवर कर्मयोगी श्रीकृष्ण धर्माचे अगदी अभिनव रूप धारण करून उभे आहेत. दुसया भिंतीवर कर्मवीर भीष्म उभे आहेत. भीष्मांच्या धर्मतत्त्वात अवगाहन करणे म्हणजे आकाशाला मापण्यासारखे होईल. तिसया बाजूला उभा आहे कर्मानुरागी युधिष्ठिर. युधिष्ठिर स्वत:च धर्माचा अंश आहे. चौथ्या भिंतीवर मात्र साक्षात धर्म स्वत:च उभा आहे, हा धर्म म्हणजेच कर्मसंन्यासी महामना विदुर! महाभारताबद्दल मधूनमधून सारखे लिहिले जात आहे आणि यापुढील काळातही लिहिले जाईल. त्याचे कारण प्रत्येकवेळी नव्याने वाचताना महाभारताचे प्रत्येक पात्र, प्रत्येक घटना सूर्योदयाप्रमाणे, भरतीच्या लाटांप्रमाणेच नव्या रूपाचे, नव्या रंगाचे, स्वच्छ, निरभ्र आकाशासारखे दर्शन घडवत मर्मज्ञांपुढे हजर होते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #ANKRAHITSHUNYANCHIBERIJ #RAMAYANATILPATRAVANDANA #ANJANINARAVANE #SUSHMAKAROGAL
Customer Reviews
  • Rating StarVijay Bhadane

    मला भावलेले पुस्तक महाभारतातील पितृवंदना ! महाभारतातील मातृवंदना ! लेखक :--,दिनकर जोशीं मराठी अनुवाद :-- सुषमा शाळिग्राम रामायण ,महाभारत हे आपले आद्य,पुरातन,पूज्य महान ग्रंथ,अक्षर व अक्षय असे वाङमय ! लहानपण ते किशोर अवस्थे र्यंत त्यातील गोष्टी, कथा मनावर संस्कार कर तात,मनाचे मनोरंजन करतात. वाढत्या वयाबरोबर बुद्धी प्रगल्भ झाल्यावर मात्र या अभि जात साहित्यकृतीत गूढार्थ, विषयाची व्यापकता,मानवी जीवनातील भावभावनां या सगळ्यांचे उत्कट,समग्र,सर्वां गीण असे दर्शन घडते कृष्ण द्वैपायन महर्षी व्यास मुनींच्या सर्वस्पर्शी,ओजस्वी व त्रिकालापलीकडचा वेध घेणाऱ्या दिव्य,अद्वितीय लेखणीतून महा भारताचा विशाल पट मांडला गेला आहे. अनेक विचारवंत,ज्ञानमहर्षी, सारस्वतानी आपापल्यापरीने महाभारताचा व्यासांना अभि प्रेत असलेला अर्थ उलगडून दाखवतांना दर्जेदार ग्रंथांची पुस्तकांची निर्मिती केली आहे सुप्रसिद्ध गुजराथी लेखक दिनकर जोशी यांनी गुजराती त लिहिलेलीव सुषमा शाळी ग्राम यांनी मराठीत अनुवाद केलेली" महाभारतातील मातृवंदना व महाभारतातील पितृवंदना ही दोन वेगवेगळी पुस्तक माझ्या वाचनात आली आणि आपण महाभार तावर काहीतरी खूप वेगळे वाचल्याचा अनुभव आला, महाभारतातील व्यासनिर्मित स्त्री पुरुष पात्रांच्या स्वभावाचे मनोविश्लेषण लेखकाने किती खुबीने केले आहे याची प्रचिती ही दोन वेग वेगळी पुस्तके वाच ताना आली.वाचनानंद आला पुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रस्तावनेत लेखकाने खूप सुंदर वैचारिक प्रकट चिंतन करून वाचकाला अंतर्मुख केले आहे. त्यात महाभारताचा खरा नाय क कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे.भीष्म,द्रोण,कौरव पांडव हे सारे नायकपदी त्याच्यातील त्रुटी,वैगुण्या मुळे बसू शकत नाही .कारण पुत्रा ला अवैधरित्या जन्म देऊन त्यांचे संगोपनाची जबाबदारी स्वपत्नीवर टाकून ते नामनिराळे झाले आहेत.त्यामुलांचे संगोपन करताना या स्त्रीयांनी खूप कष्ट घेतले.परिस्थितीशी संघर्ष केला सत्यवती,गांधारी,कुंती,उत्तरा यांनी ही अग्निपरीक्षा दिली तरी त्या दुर्भागी ठरल्या!महाभारता च्या नायिका त्या नायिका शोभ ल्या असत्या परंतु त्यांच्यातील काही त्रुटींमुळे त्या होउ शकल्या नाही किंवा आपण नेमकी तशी भूमिका घेउ शकत नाही. महाभारतातील मातृवंदनेत गंगा सात्यकी,,कुंती,गांधारी, अशा स्रियांची व पितृवंदनेत श्रीकृष्ण,भीष्म धर्म,अर्जुन,द्रोणाचार्य,दुर्योधन कर्ण, शकुनी या पुरुषांची नियतीने रचलेली अदभुत, रोमहर्षक अशी जीवनगाथा आहे ,शूरवीर, महान योद्धे असूनही अहंकार,मोह,लोभ, द्वेष,असूया,वैर यासारख्या षडरिपुनी व्यक्ती तसेच समिष्टी ग्रासली असेल तर त्याची परिणीती कुलविनाशात ,समाज विनाशत कशी होते हेच महाभार कार दाखवून देतात.ही मातृ पितृ वंदना त्यातील स्त्री पुरुष पात्रांच्या स्वभावातील विविध पैलूंचे दर्शन घडविते ! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 20-01-2008

    महाभारतातील जीवन कहाण्यांचा वेध... ‘महाभारतातील पितृवंदना’ या पुस्तकात महाभारतातील प्रमुख पुरुष पात्रांच्या जीवनकहाण्यांचा मागोवा घेण्यात आला आहे. पितामह भीष्म, आचार्य द्रोण, राजा धृतराष्ट्र, महामना विदुर, धर्मराज युधिष्ठिर, दुरात्मा दुर्योधन, मृतयुंजय कर्ण, सव्यासाची अर्जुन, अश्वत्थामा, पांचालराज द्रुपद आणि महाभारताचा नायक म्हणता येईल असा पूर्णपुरुष श्रीकृष्ण या सर्वच व्यक्तिरेखांची जीवने विविध घटनांनी आणि संघर्षानी भरलेली आहेत. विशिष्ट जीवनमूल्ये आणि प्रसंगोत्पात नीतिमूल्यांबाबत घेतलेल्या वैचित्रपूर्ण भूमिका यामुळे या व्यक्ती गेली दोन-तीन हजार वर्षे भारतीयांना वीरपुरुषांचे आणि पुरुषार्थाचे सकारात्मक किंवा अनर्थकारक आदर्श वाटत आल्या आहेत. कौरव आणि पांडव यांच्यातील भाऊबंदकी लाभलेले युद्धाचे स्वरुप या दोहोंच्या वंशसंहाराला कारण ठरते. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ असे म्हणतात. महाभारतात जे व्यक्तींचे आणि नीतिमूल्यांच्या कसोटीचे प्रसंग आले आहेत, त्यांचीच पुनरावृत्ती मानवी जीवनात पुन: पुन्हा होत असते, तेच चिरंतन संघर्ष आजही आपल्याला भेडसावत असतात. असेही म्हणता येते. गुजराती लेखक दिनकर जोषी यांच्या महाभारतातील पितृवंदना या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी मूळ गुजराती शैलीच्या काही लकबी कायम ठेवून केले आहेत. महाभारतातील हे पुरुष महान आहेत, आकाशाला भिडणारे आहेत. त्यांना समजून देण्यात आपणच कुठेतरी उणे पडण्याची शक्यता आहे, असे म्हणतात. परंतु असे असूनही या पुरुषांच्या वर्तनातील विसंगती वा खटकणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करावे असे नाही, अशी शहामृगी वृत्ती ज्ञानयात्रेला बाधक आहे असे ते मानतात आणि लेखकाचा अधिकार वाचकांनी मान्य करून या सहयात्रेत सामील व्हावे, नितांत निर्मळ चिदाकाश सोबत असू द्यावे असे आवाहन करतात. महाभारताचे मर्म ही त्यांची प्रस्तावना या भूमिकेचे स्पष्टीकरण करते; तसेच महाभारताबद्दल काही मार्मिक निरीक्षणांचीही नोंद करते. महाभारत हा ग्रंथ कृष्णद्वैपायन व्यास नामक एका मानवाचेच सृजन आहे; परंतु ही निर्मिती मानवीय मर्यादांच्या पलीकडे जाऊन पोहोचते. महाभारताशी बरोबरी करील असा एकही ग्रंथ विश्वसाहित्यात नाही. कृष्ण-भीमापासून अश्वत्थामा-अभिमन्यूपर्यंत कुठलीही पात्रे घ्या. त्यांच्या ठिकाणी भव्यता आहे, पण त्याचबरोबर प्रश्नही काही कमी नाहीत. दुर्योधन हा बदनाम व दुर्जन. पण तोही महायुद्धाच्या भीषण क्षणी सात्यकीला म्हणतो, ‘आपण परममित्र. पण परस्परांचे शत्रू बनून जीवावर उठलो. धिक्कार असो आपल्या क्षात्रधर्माचा, आपल्या अहंकाराचा आणि मोहाचा! दुर्जनाचाही हा प्रामाणिकपणा व्यासमुनी दाखवतात. धर्मराज युधिष्ठिर द्यूत खेळून ‘मी कौरवांचे राज्य हिरावून घेऊ पाहत होता’ अशी कबुली देतो. पराक्रमी भीष्म द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना ‘समर्थ माणूस म्हणेल तोच धर्मज म्हणून अगतिकपणे बघ्याची भूमिका घेतो. आशीर्वाद मागायला आलेल्या युधिष्ठिराला आपण दुर्योधनाचे मिंधे आणि नपुंसक आहोत असे दिनपणे म्हणतो. धर्माचे उत्तुंग शिखर असणारा श्रीकृष्ण निद्रावस्थेतील द्रौपदीच्या पाच पुत्रांची अश्वत्थामाकडून होणारी हत्या रोखू शकत नाही. ही उदाहरणे देऊन जोषी आपण या व्यक्तींकडे ‘वास्तव’ द्दष्टीने बघण्याचा प्रयत्न कसा करीत आहोत याची प्रचिती दिली आहे. महाभारतातील बरीच पात्रे पिता म्हणून अवैध जन्म देऊन लगेच अद्दश्य होताना दिसतात. पुत्रजन्माचाच काय पुत्रसंगोपनाचा सगळा भार, सगळा संघर्ष हा स्त्रीपात्रांनाच सहन करावा लागतो, असेही विधान ते करतात. धृतराष्ट्र आणि पांडू यांना झालेली संतती ही सर्वसामान्य नाही. सत्यवती पराशराच्या संबंधातून व्यासाला जन्म देते आणि पराशराच्या वरदानाने ती कुमारीच राहते. यासारख्या घटनांतील तर्कसंगती लावणे कठीण जाते. भीष्म काशी कन्यांशी स्वयंवरात जाऊन त्यांचे बलपूर्वक हरण करतो. पण जिंकलेल्या अंबालिका व अंबिका यांच्याशी स्वत: लग्न न करता, विचित्रवीर्याशी त्यांचे लग्न लावून देतो. तिसरी राजकन्या अंबा शाल्वावर प्रेम आहे असे म्हणून भीष्माकडून ‘मुक्ती’ मिळवू पाहते. पण शाल्व तिला स्वीकारत नाही तेव्हा भीष्माने आपल्याशी लग्न करावे असे परशुरामाकरवी भीष्माला सुचवते. परशुराम हे भीष्माचे गुरु. पण ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा भीष्माला गुरुच्या आज्ञेचे पालन करण्याच्या आड येते. त्यांचे युद्ध होते. अंबा तपश्चर्या करून भीष्माचा वध करण्याचा वर मागते. शिखंडीच्या रुपात पुनर्जन्म घेते. अशा कितीतरी अतर्क्य, अनोख्या घटना या पात्रांच्या जीवनात घडतात. आजही त्या घटनांचे असामान्यत्व आपल्याला थक्क करते. जलकन्या उलुपी अर्जुनावर मोहीत होते. कामतृप्तीसाठी ती लग्नाचा प्रस्ताव मांडते. अर्जुनालाही तिचे आकर्षण वाटते; परंतु तो म्हणतो, ‘ब्रह्मचर्यपालनाच्या वचनाने मी बांधला गेलो आहे. तेव्हा उलुपी त्याची समजूत काढते, हे ब्रह्मचर्यपालन द्रौपदीच्या संदर्भात आहे. अर्जुन कामभावनेला शरण जाऊन प्रतिज्ञेला मुरड घालतो. तिच्याशी लग्न करतो. त्या रात्री त्यांचा सहवास घडतो. तिला गर्भ राहतो. पुढे पुत्र होतो. त्याचे नाव इरावान. तो तिच्याजवळच राहतो. अर्जुनाशी त्या रात्रीनंतर उलुपीचा संबंध येत नाही. परंतु उलुपी मात्र आमरण त्या विवाहाशी एकनिष्ठ राहते. हा पुत्र कुरुक्षेत्रावर पांडवांकडून लढतो. वनवासाच्या शेवटच्या टप्प्यातही अर्जुनाची भ्रमर वृत्ती दिसून येते. कृष्णाची बहीण सुभद्रा हिला बघून तो कामविव्हल होतो. कृष्ण त्याला सुभद्रेला पळवून नेण्याचा सल्ला देतो. तशी व्यवस्था करतो. कृष्ण असे का करतो? अर्जुनावर अंकुश ठेवण्यासाठी तो बहिणीचे निमित्त करतो, असे म्हणणे तर्कसंगत वाटते. अर्जुनाने नंतर अन्य स्त्रीचा विचार केला नाही ही वस्तुस्थिती आहे. दोनदा संधी असूनही अर्जुनाने परस्त्रीचा अंगीकार करण्याचे टाळले. इंद्राच्या दरबारात उर्वशीने त्याच्याशी शारीरिक संबंधाची इच्छा प्रकट केली. तेव्हा अर्जुनाने म्हटले, तुम्ही मला मातेसमान आहात. पुरुरवा या आमच्या पूर्वजाची पत्नी आहात. तुम्ही मला वंदनीय आहात. अर्जुनाने कृष्णप्रेम आणि दूरदृष्टी या दोन्हींचे उदाहरण म्हणून युद्धापूर्वी एका बाजूला नि:शस्त्र श्रीकृष्ण आणि दुसऱ्या बाजूला यादवांची सर्व सेना असा पर्याय असताना अर्जुनाने व् कृष्णाची निवड केली याकडे बोट दाखवायला हवे. युद्ध निरर्थक आहे. मला लढायचेच नाही. भाऊबंदांचा संहार करुन विजय मिळवण्यात मला गम्य नाही असे अर्जुन म्हणतो तेव्हा त्यांचा विचार हा ऊर्ध्वीकरण पावून गीतेचा योग बनतो, युद्धाच्या अखेरीसही श्रीकृष्ण भस्मसात झालेल्या रथातून अर्जुन उतरल्यानंतरच जळू देतो व अर्जुनाला वाचवतो. जोषी या प्रमुख व्यक्तींच्या वर्तनातील अशा विसंगतींचा अन्वयार्थ लावू पाहतात. लाक्षागृहाला दुर्योधन आग लावून पांडवांना जाळून टाकण्याचा बनाव रचतो. तेव्हा युधिष्ठिर भोजनाच्या निमित्ताने लाक्षागृहात आलेल्या स्त्रीला आणि तिच्या पाच पुत्रांना मद्य पाजून झोपायला लावतो आणि लाक्षागृहाला आग लावून पांडवांना भुयारी मार्गाने बाहेर काढतो. ही राजकीय लबाडीच होय असे जोशी स्पष्ट करतात. सहा निर्दोष अतिथींचा बळी देणे हे तर्कसंगत वाटत नाही. हे कृत्य युधिष्ठिराने केले म्हणून ते मनाला जास्त टोचते. युधिकष्ठराला मग धर्मराज का म्हणायचे? हा त्यांचा प्रश्न. युधिष्ठिराचे द्रौपदी स्वयंवराच्या वेळचे वर्तन, हस्तिनापुरात द्युत खेळण्याच्या वेळचे वर्तन आणि पत्नीला पणाला लावणे, हे बुचकळ्यात टाकणारे आहे. ‘होय, अश्वत्थामा मेला’ असे सांगून द्रोणाचार्यांना नामोहरम करण्याच्या वेळचे युधिष्ठिराचे वाक्य त्याच्या सत्यनिष्ठेबाबत साशंकता निर्माण करते. त्याबाबत ‘नरो वा कुंजरो वा’ असा श्लोक उद्घृत केला जातो. परंतु महाभारतात हा शब्दप्रयोग नाही असा खुलासा दिनकर जोशी करतात. हे स्पष्टवक्तेपण कधीकधी आपल्याला धक्कादायक वाटते. परंतु सत्य हे सत्यच असते. अर्थात युधिष्ठिरांच्या न्यायशील, सत्यनिष्ठ व धर्मनिष्ठ वर्तनाचेही अनेकविध प्रसंग आहेतच. असे प्रत्येक व्यक्तीबाबत बारकाईने जोषी यांनी विश्लेषण केले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more