* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: POLITICS OF THE WOMB
  • Availability : Available
  • Translators : RESHMA KULKARNI-PATHARE
  • ISBN : 9789353170196
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 352
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
  • Available in Combos :PINKI VIRANI COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"AMONG LIFE’S CHOICES IS TO HAVE CHILDREN OR REMAIN CHILDFREE. YET THOSE WHO WANT A CHILD AND FIND THEMSELVES UNABLE, LIVE THROUGH THE TRAUMA OF ‘INFERTILITY’—CRUELLY ATTRIBUTED AS ‘THEIR FAULT’—TO UNDERGO THE TRIBULATIONS OF ASSISTED REPRODUCTIVE TECHNOLOGY. BUT HOW SAFE IS AGGRESSIVE IVF, INVASIVE ICSI, EXPLOITATIVE OVARIAN HYPER-STIMULATION AND COMMERCIAL SURROGACY? POLITICS OF THE WOMB PROVES THAT THERE CAN BE BROKEN BABIES AND BREAKING MOTHERS; IT RIPS AWAY THE ROMANTICISM AROUND UTERUS TRANSPLANTS, WARNS OF GENETIC THEFT AND ‘DESIGNER BABIES’, AND POINTS TO THE HUMAN ELEMENT BEING SACRIFICED, AS ARTIFICIAL REPRODUCTION USES, REUSES AND RECYCLES THE WOMAN. PINKI VIRANI COMBINES INVESTIGATION WITH ANALYSIS TO QUESTION THOSE WHO LEAD THE WORLDWIDE ONSLAUGHT ON THE WOMAN’S WOMB IN THE NAME OF BABIES, AND SQUARELY CONFRONTS WHAT HAS BECOME THE BUSINESS OF BABY-MAKING BY A CHAIN OF SUPPLIERS THAT MANUFACTURES ON DEMAND. WRITTEN IN A MANNER ACCESSIBLE TO ALL, HERE FINALLY IS A PATH-BREAKING BOOK WHICH SPEAKS UP, IN NO UNCERTAIN TERMS, FOR THE RIGHT TO INFORMED CHOICE ON RESPONSIBLE REPRODUCTION. "
आयुष्यात आपण स्वतंत्रपणे काही निर्णय घ्यायचे असतात. त्या निर्णयांपैकी एक असतो, आपण मूल जन्माला घालायचं की नाही. आणि तरीही, ज्यांना मूल जन्माला घालायचं असतं, पण तसं करण्यासाठी ते नैर्सिगकरीत्या असफल ठरतात, अशा लोकांवर वंध्य असण्याचा क्रूर शिक्का लावला जातो. समाज या लोकांना टोचून बोलतो; त्यांच्यात काहीतरी कमी आहे, असं त्यांना सतत सांगत राहतो. मग या अवहेलनेच्या दुष्टचक्रामधून सुटण्यासाठी, ही माणसं प्रजनन साहाय्य तंत्रज्ञानाच्या आहारी जातात. मात्र आक्रमक आयव्हीएफ, आयसीएसआयसारख्या उपचार पद्धती; अंडाशयांना अतिउत्तेजित करून प्रजनन घडवून आणणं; आणि धंदेवाईक सरोगसी, या गोष्टी नेमक्या कितपत बिनधोक असतात? ‘पॉलिटिक्स ऑफ द वूम्’ हे सिद्ध करतं की सदर प्रजनन साहाय्य उपचार पद्धतींद्वारा मुख्यत्वे काय मिळतं, तर सव्यंग बाळं आणि कणाकणानं विखुरत जाणाऱ्या आया. गर्भाशय रोपणासारख्या पद्धतींकडे पाहण्याचा गुलाबी चष्मा काढणारं; डिझायनर बेबीजबद्दलचं सत्य सांगणारं; जनुकांची सर्रास होत असणारी चोरी दाखवून देणारं; आणि प्रजननाच्या बाजारपेठेत स्त्रीचा कसा वापर केला जाऊन बळी दिला जातो, याबद्दल परखड भाष्य करणारं असं हे पुस्तक आहे. सखोल अभ्यास, तपास आणि विवेचन या सर्व मार्गांमार्फत लेखिका पिंकी विरानी, प्रजननाच्या नावाखाली जगभरात चाललेल्या स्त्रीशोषणाला आवाज फोडते. जागतिक तज्ज्ञ-विशेषज्ज्ञांनी केलेल्या संशोधनांची ग्वाही देऊन, ‘मागणी तसा पुरवठा’ या निलाजऱ्या सबबीखाली भरवल्या जाणाऱ्या प्रजननाच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना रोखठोख जाब विचारते. सगळ्या वाचकांना समजेल अशा पद्धतीनं लिहिलेलं हे पुस्तक, कुठलीही कुचराई न करता, जबाबदार प्रजननासाठी प्रत्येकाला सुयोग्य माहिती मिळवण्याचा हक्क कसा आणि का आहे, याबद्दल सुस्पष्ट भाष्य करतं.

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#POLITICS OF THE WOMB# PINKY VIRANI# RESHMA KULKARNI-PATHARE#पॉलिटिक्स ऑफ द वूम्ब# पिंकी विराणी# अनुवाद- रेश्मा कुलकर्णी-पाठारे# व्हजायना व्हर्सेस वूम# अनप्रेग्नन्ट#बाय# बाय बेबी# वी बिट प्रेग्नन्ट# एग्स्प्लॉयटेशन# सिन ऑफ अवर फादर्स# मिल्क ऑफ ह्यूमन काइंडनेस# इन कोल्ड डोमेन# हॅच# मॅच# डिस्पॅच
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA (LOKRANG) 27-01-2019

    ‘मातृत्वा’च्या राजकारणाचा सखोल वेध... जगाची लोकसंख्या आज सातशे दहा (७१०) कोटी आहे व भारतासारख्या खंडप्राय देशात आज १३० कोटी लोक राहतायेत. २०५० साली जगाची लोकसंख्या दहा अब्जांहून अधिक आणि भारताची लोकसंख्या दीड अब्जाहून अधिक होईल! एकीकडे हे वास्तव आह, तर दुसरीकडे प्रजननाच्या तंत्रशास्त्रात होत असलेली प्रगती! या अनुषंगाने जागतिक स्तरावरील प्रजनन तंत्रशास्त्रातील विदारक सत्यावर परखड भाष्य करणारे ‘पॉलिटिक्स ऑफ द वूम्ब’ हे पहिलेच पुस्तक आहे. या पुस्तकाच्या लेखिका पिंकी विराणी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा करून गेली अनेक वर्षे वृत्तपत्रांतून लिहीत आहेत. प्रस्तुत पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे तो रेश्मा कुलकर्णी-पाठारे यांनी! पुस्तकात एकूण बारा प्रकरणे आहेत. पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच या प्रकरणांच्या शीर्षकांचाही अनुवाद न करता ती मूळ भाषेतच ठेवली आहेत. उदा. ‘व्हजायना व्हर्सेस वूम्ब’, ‘अनप्रेग्नंट’, ‘बाय, बाय बेबी’, ‘एग्स्प्लॉयटेशन’, मिन ऑफ अदर फादर्स’, ‘प्रेग्नंट’, ‘मिल्क ऑफ काइंडनेस’, ‘इन कोल्ड डोमेन’, ‘हँच’, ‘मॅच डिस्मॅच! प्रस्तुत पुस्तक समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचे विधान लक्षात ठेवायला हवे, ते आहे. ‘आपण अशा एका समाजाचे भाग आहोत, ज्याचा तंत्रज्ञान हा एक अविभाज्य भाग आहे. पण तरीही हे तंत्रज्ञान कशाशी खातात, हे सुद्धा बहुतांशी लोकांना ठाऊक नाही.’ विज्ञानाने स्त्रीला संततिनियमनाची विविध साधने देऊन मातृत्वाबद्दल स्वातंत्र्य दिले. परंतु आता त्याच विज्ञानामुळे तिच्या पायात ‘इन-विट्रो फर्टिलायझेशन’ अर्थात आयव्हीएफच्या बेड्या झपाट्याने टाकल्या जात आहेत. अनादिकाळापासून ‘स्त्री’च्या डोक्यावर समाजाने आणि संस्कृतीने एक बाब लादण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणजे - स्त्री कितीही कर्तृत्ववान असली तरी तिच्या स्त्रित्वाचा खरा सन्मान आणि जीवनाचे खरे सार्थक तेव्हाच होणार जेव्हा ती एखादे तरी मूल जन्माला घालेल आणि आताही, जेमतेम वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मुलीसुद्धा आयव्हीएफसाठी आपली बीजे देऊन मृत्युमुखी पडत आहेत. ‘अनप्रेग्नंट’ या शीर्षकाच्या प्रकरणात वंध्यत्वाविषयी विस्ताराने माहिती, तपशील देऊन विवेचन केले आहे. आयव्हीएफद्वारा जन्मलेल्या मुलांमध्ये ‘ऑटिझम’ अणि ‘मंदबुद्धीपणा’ यांचे प्रमाण अधिक असते. एका संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे, की १९८२ ते २००७ या २५ वर्षांत जन्मलेल्या २.५ दशलक्ष मुलांपैकी ३०,९५९ मुले आयव्हीएफद्वारा जन्मली होती. ३१ डिसेंबर २००९ पर्यंत या सर्व मुलांची सतत पाहणी करण्यात आली. त्या निरीक्षणातून असा निष्कर्ष निघाला, की आयव्हीएफद्वारा जन्मलेल्या मुलांपैकी १०३ मुलांना ‘ऑटिझम’ होता, तर १८० मुले मंदबुद्धी होती वा त्यांना बौद्धिक विकलांगता होती. आयव्हीएफद्वारे जन्मलेल्या मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण यासंबंधीही बरेच संशोधन झाले आहे. अशा मुलांना बालपणात कर्करोग होण्याची ३३ टक्के अधिक शक्यता असते. ‘ल्युकोमिया’ होण्याची ६५ टक्के अधिक शक्यता असते, तर मेंदू आणि मध्यवर्ती मज्जसंस्थेचा कर्करोग होण्याची २८ टक्के अधिक शक्यता असते. वंध्यत्वावर मात करण्यासाठी स्त्रीने केलेल्या औषधाचे सेवन आणि तिच्या मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण या संशोधनाचे निष्कर्ष २०१३ सालच्या ऑक्टोबरमध्ये कोपनहेगन येथील ‘डॅनिश कॅन्सर सोसायटी रीसर्च सेंटर’च्या डॉ. मारी हारग्रीव्ह यांनी जाहीर केले होते. वर दिलेली आकडेवारी त्याच संशोधनाच्या निष्कर्षांचा एक भाग होती. वंध्यत्वाच्या उपचारपद्धती, प्रजनन साहाय्य प्रक्रिया आणि जनुकांच्या कार्यपद्धतीमुळे हे होऊ शकते. त्यासंबंधी डॉ. हारग्रीव्ह म्हणतात, ‘सदर प्रक्रियेमुळे ज्या उपप्रक्रिया असतात आणि ज्या काही विशिष्ट परिस्थिती निर्माण होतात, त्यामुळे हे बदल घडून येतात. उदा. कृत्रिम संप्रेरके वापरणे, शुक्राणू तयार करणे, फलित अंडी थिजवणे. तसेच फलित अंडी कोणत्या वातावरणात वाढवली जात आहेत. रोपण प्रक्रिया किती कालांतराने केली जात आहे यावरही हे अवलंबून आहे.’ ‘फर्टिलिटी अ‍ॅण्ड स्टरिलिटी’ या नियतकालिकाने १९९० ते २०१० या काळात अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क आदी १२ विकसित देशांतील २५ अभ्यासांचा आढावा घेतला होता. या अभ्यास-प्रकल्पांमध्ये ज्या मुलांची पाहणी केली गेली होती, त्यापैकी बहुतेकांचा जन्म आयव्हीएफद्वारा झाला होता. तर उर्वरित मुलांचा जन्म ‘आयसीएमआय’ (इन्ट्रासायटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन) किंवा ‘आययूआय’ (इन्ट्रॉटेरिन इन्सेमिनेशन) या तंत्रांनी झाला होता. या अभ्यास-प्रकल्पांबद्दलही पुस्तकात वाचायला मिळते. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार ‘आरोग्य’ म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ नसून त्यामध्ये मानसिक स्वास्थाचाही समावेश आहे. भारतात मानसिक विकार, अस्वास्थ्य यांना फारसे महत्त्व दिले जात नाही. उलट आपल्या कुटुंबात कुणाला मानसिक आजार असल्यास त्याबद्दल कधीच उघडपणे कबुली दिली जात नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीमधील दोष ठळकपणे दिसून येतात तेव्हा त्याला वेडा, मेंटल अशा सर्वसामान्य पद्धतीने संबोधले जाते. परंतु ‘स्किझोफ्रेनिया’सारखा जटिल मानसिक विकार इतक्या सहज पद्धतीने संबोधला गेल्यास त्यावर योग्य ते उपचार केले जाऊ शकत नाहीत. भारतात बऱ्याचदा स्किझोफ्रेनिया असलेल्या मुलाचे वा मुलीचे लग्न लावून दिले जाते. अशी दुभंगलेले व्यक्तिमत्त्व असलेली मुले वा मुली आपले आयुष्य आनंदाने, सुखाने घालवू शकत नाहीत. या पुस्तकात स्किझोफ्रेनियाशी निगडित काही अभ्यासांबद्दल वाचायला मिळते. उदा. न्यू यॉर्क येथील मानसोपचारतज्ज्ञ आणि पर्यावरणशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. डोलेरेस यांनी केलेला अभ्यास. त्यांच्या संशोधनात हे सिद्ध झाले, की स्किझोफ्रेनिया झालेल्या २५ टक्के अपत्यांमध्ये हा आजार होण्याचे प्रमुख कारण त्यांच्या जन्मावेळी असणारे त्याच्या पित्याचे प्रौढ वय हे होते. इतरही अनेक संशोधनांनुसार, स्किझोफ्रेनिया असलेल्या मुलांपैकी ५०-६२ टक्के मुलांच्या पालकांमध्ये स्किझोफ्रेनिया आणि निगडित व्याधी दिसून आल्या. परंतु ज्या पालकांना स्किझोफ्रेनिया नाही, त्यांच्या मुलांमध्येही स्किझोफ्रेनिया होण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१२ मध्ये तर एका संशोधनात हे सिद्धच झाले आहे, की केवळ भारतातच नव्हे तर कुठल्याही देशातील प्रौढ वयाच्या पुरुषाचे शुक्राणू अपत्याला धोका पोहचवू शकतात आणि तसेच आईचे प्रौढ वयसुद्धा अपत्यासाठी हानिकारक ठरू शकते. मातृत्व संकल्पना आणि तिच्याशी निगडित सर्व अंगांचा वेध घेणाऱ्या या पुस्तकात जगभर चाललेल्या प्रजनन तंत्रशास्त्रातील संशोधनाबद्दल विस्ताराने लिहिले आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतिशास्त्रज्ञ व जनुकशास्त्रातील संशोधक - अभ्यासकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे! –ज. शं. आपटे ...Read more

  • Rating StarAditya Shashikant Desai

    पॉलिटिक्स ऑफ द वूम्ब-मातृत्वाच्या बाजाराचे भेदक चित्रण दहा वर्षे मूल होत नसलेल्या लेस्ली ब्राऊन ची डॉ.रॉबर्ट एडवर्ड्स व डॉ.पॅट्रिक स्टेपको या जोडगोळीशी ओळख झाली.त्यांनी विज्ञानाचा एक आविष्कार घडवला व 25 जुलै 1978 ला *लुईस* या पहिल्या टेस्ट ट्यूब बबी चा जन्म झाला.ही IVF किंवा In-Vitro Fertilization या तंत्रज्ञानाची सुरुवात होती. IVF म्हणजे काय? In-Vitro म्हणजे शरीराच्या बाहेर एखादया पेट्री डिशमध्ये(प्रयोगशाळेतील छोटी ताटली) प्रक्रिया करणे.Fertilization म्हणजे फलन प्रक्रिया. पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणू व स्त्रीच्या अंडाशयातून( किंवा ovary) स्त्रीबीजे(अंडी)छोट्या शस्त्रक्रियेद्वारे काढून प्रयोगशाळेत त्याचे फलन केले जाते.ते जर यशस्वी झाले तर ती फलित अंडी पुन्हा स्त्रीच्या गर्भाशयात वाढीसाठी सोडली जातात.अशी ही साधारण पद्धत आहे. मग हे तर किती सोपं वाटतंय नाही का? पण यातील प्रत्येक टप्प्यावर स्त्रीला भोगावा लागणारा मानसिक,शारीरिक,आर्थिक त्रास किती असतो,यात सर्व गोष्टींचा धंदा कसा चालतो,लाखोंची उलाढाल कशी होते यांसारख्या कित्येक प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास पिंकी विराणी यांचे `*पॉलिटिक्स* *ऑफ* *द**वूम्ब* हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.विवाहित-अविवाहित स्त्री-पुरुष या सर्वांनीच. मातृत्व म्हणजे कोणत्याही स्त्रीसाठी एक अत्यानंदाची भावना असते.त्याच भावनेचा गैरफायदा हे फर्टिलीटी क्लिनिक्स घेत असतात. सुरुवात होते ती स्त्रीबीजे वाढीचा वेग वाढण्यासाठी वेगवेगळी इंजेक्शन्स,गोळ्या देणे ज्यात स्त्रियांना त्रास सहन करावा लागतो. ती एकदा वाढलीत की छोटया शस्त्रक्रियेद्वारे काढली जातात.मग शुक्रजंतुंबरोबर त्याचे फलन केले जाते.इथे जर योग्य प्रकारे हाताळणी झाली नाही तर ते यशस्वी होत नाही, मुले अपंग किंवा आजाराने पीडित अशी जन्माला येऊ शकतात.कधीकधी तर या आयव्हीएफ ची गरज नसते,मात्र चुकीच्या पद्धतीने हे केल्यास वंध्यत्व येऊ शकते. काही वेळा स्त्रीची गर्भधारणा क्षमताच नसते तरी क्लिनिक त्यांना मातृत्वाची खोटी स्वप्ने दाखवतात आणि पैसे लुटण्याचा कार्यक्रम चालू ठेवतात.बिचारे दांपत्य आशा लावून बसते. पिंकी विराणी म्हणतात की,"या प्रक्रियेमध्ये स्त्रीच्या प्रत्येक नाजूक अवयवाची अवहेलना केली जाते.रोजची इंजेक्शन्स,असंख्य रक्तचाचण्या,लघवीच्या चाचण्या,संप्रेरकांच्या चाचण्या यांचा रतीब लागतो." या इंजेक्शन्स मुळे स्त्रीच्या शरीराचे खूप हाल होतात. गंमत म्हणजे काही स्त्रियांना वाटत असते की आपल्याला लग्नाशिवाय जर अशी मुले होत असतील तर त्यात गैर ते काय? बरं या अंड्यांचा फार मोठा व्यापार चालतो.त्याचे दलाल असतात.स्त्री जर चांगली उंच व छान देहाची असेल तर तिच्या अंड्यांना चांगला भाव मिळतो. या धंद्यात झोपडपट्टीपासून ते चांगल्या घरातील स्त्रिया आहेत. समलिंगी जोडपी किंवा इतर अनेक ठिकाणी या अंड्यांना मोठी मागणी असते.यासाठी जास्तीत जास्त अंडी मिळावीत म्हणून खूप संप्रेरकांची इंजेक्शन्स दिली जातात.पैसेसुद्धा बक्कळ मिळतात. या सर्व गोष्टींत लोक जन्मणारे मूल निरोगी असेल का याचा विचार करत नाहीत.त्यांना आई-वडील असा कपाळावर शिक्का हवा असतो,समाजात ताठ मानेने वावरण्यासाठी. त्यात गरज नसताना त्यांच्यावर असले उपचार लादले जातात. पिंकी विराणी यांनी या पुस्तकात मांडलेले विषय इतक्या थोडक्यात सांगणे अशक्य आहे. अगदी वंध्यत्व म्हणजे काय, आयव्हीएफ खरोखरचं यशस्वी ठरते का?त्यातले सत्य काय आहे ? त्यातून जन्मणाऱ्या मुलांचे जन्मजात विकार,गर्भाशयरोपण, स्त्रीच्या दुधाचा बाजार,अंड्यांचा बाजार यांसारखे जबरदस्त विषय पुस्तकात मांडले आहेत तेसुद्धा प्रचंड वैद्यकिय अभ्यास करूनच.अगदी फेलोपियन ट्यूब वगैरे अनेक शब्द संज्ञा यात आहेत,त्यामुळे वाचताना कदाचित थोडं अवघड वाटू शकेल.पण समांतर शरीराची आकृती पाहिली तर सहज कळू शकेल. पिंकी विराणी यांचे अरुणाची गोष्ट,कैलासवासी मुंबई यानंतरचे मी वाचलेले तिसरे पुस्तक. अप्रतिम ताकदवान लिखाण!! ...Read more

  • Rating Starआदित्य श.देसाई

    पॉलिटिक्स ऑफ वूम्ब-मातृत्वाच्या बाजाराचे भेदक चित्रण दहा वर्षे मूल होत नसलेल्या लेस्ली ब्राऊन ची डॉ.रॉबर्ट एडवर्ड्स व डॉ.पॅट्रिक स्टेपको या जोडगोळीशी ओळख झाली.त्यांनी विज्ञानाचा एक आविष्कार घडवला व 25 जुलै 1978 ला *लुईस* या पहिल्या टेस्ट ट्यूब बेब चा जन्म झाला.ही IVF किंवा In-Vitro Fertilization या तंत्रज्ञानाची सुरुवात होती. IVF म्हणजे काय? In-Vitro म्हणजे शरीराच्या बाहेर एखादया पेट्री डिशमध्ये(प्रयोगशाळेतील छोटी ताटली) प्रक्रिया करणे.Fertilization म्हणजे प्रजनन. पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणू व स्त्रीच्या अंडाशयातून( किंवा ovary) स्त्रीबीजे(अंडी)छोट्या शस्त्रक्रियेद्वारे काढून प्रयोगशाळेत त्याचे फलन केले जाते.ते जर यशस्वी झाले तर ती फलित अंडी पुन्हा स्त्रीच्या गर्भाशयात वाढीसाठी सोडली जातात.अशी ही साधारण पद्धत आहे. मग हे तर किती सोपं वाटतंय नाही का? पण यातील प्रत्येक टप्प्यावर स्त्रीला भोगावा लागणारा मानसिक,शारीरिक,आर्थिक त्रास किती असतो,यात सर्व गोष्टींचा धंदा कसा चालतो,लाखोंची उलाढाल कशी होते यांसारख्या कित्येक प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास पिंकी विराणी यांचे `*पॉलिटिक्स* *ऑफ* *द**वूम्ब* हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.विवाहित-अविवाहित स्त्री-पुरुष या सर्वांनीच. मातृत्व म्हणजे कोणत्याही स्त्रीसाठी एक अत्यानंदाची भावना असते.त्याच भावनेचा गैरफायदा हे फर्टिलीटी क्लिनिक्स घेत असतात. सुरुवात होते ती स्त्रीबीजे वाढीचा वेग वाढण्यासाठी वेगवेगळी इंजेक्शन्स,गोळ्या देणे ज्यात स्त्रियांना त्रास सहन करावा लागतो. ती एकदा वाढलीत की छोटया शस्त्रक्रियेद्वारे काढली जातात.मग शुक्रजंतुंबरोबर त्याचे फलन केले जाते.इथे जर योग्य प्रकारे हाताळणी झाली नाही तर ते यशस्वी होत नाही, मुले अपंग किंवा आजाराने पीडित अशी जन्माला येऊ शकतात.कधीकधी तर या आयव्हीएफ ची गरज नसते,मात्र चुकीच्या पद्धतीने हे केल्यास वंध्यत्व येऊ शकते. काही वेळा स्त्रीची गर्भधारणा क्षमताच नसते तरी क्लिनिक त्यांना मातृत्वाची खोटी स्वप्ने दाखवतात आणि पैसे लुटण्याचा कार्यक्रम चालू ठेवतात.बिचारे दांपत्य आशा लावून बसते. पिंकी विराणी म्हणतात की,"या प्रक्रियेमध्ये स्त्रीच्या प्रत्येक नाजूक अवयवाची अवहेलना केली जाते.रोजची इंजेक्शन्स,असंख्य रक्तचाचण्या,लघवीच्या चाचण्या,संप्रेरकांच्या चाचण्या यांचा रतीब लागतो." या इंजेक्शन्स मुळे स्त्रीच्या शरीराचे खूप हाल होतात. गंमत म्हणजे काही स्त्रियांना वाटत असते की आपल्याला लग्नाशिवाय जर अशी मुले होत असतील तर त्यात गैर ते काय? बरं या अंड्यांचा फार मोठा व्यापार चालतो.त्याचे दलाल असतात.स्त्री जर चांगली उंच व छान देहाची असेल तर तिच्या अंड्यांना चांगला भाव मिळतो. या धंद्यात झोपडपट्टीपासून ते चांगल्या घरातील स्त्रिया आहेत. समलिंगी जोडपी किंवा इतर अनेक ठिकाणी या अंड्यांना मोठी मागणी असते.यासाठी जास्तीत जास्त अंडी मिळावीत म्हणून खूप संप्रेरकांची इंजेक्शन्स दिली जातात.पैसेसुद्धा बक्कळ मिळतात. या सर्व गोष्टींत लोक जन्मणारे मूल निरोगी असेल का याचा विचार करत नाहीत.त्यांना आई-वडील असा कपाळावर शिक्का हवा असतो,समाजात ताठ मानेने वावरण्यासाठी. त्यात गरज नसताना त्यांच्यावर असले उपचार लादले जातात. पिंकी विराणी यांनी या पुस्तकात मांडलेले विषय इतक्या थोडक्यात सांगणे अशक्य आहे. अगदी वंध्यत्व म्हणजे काय, आयव्हीएफ खरोखरचं यशस्वी ठरते का?त्यातले सत्य काय आहे ? त्यातून जन्मणाऱ्या मुलांचे जन्मजात विकार,गर्भाशयरोपण, स्त्रीच्या दुधाचा बाजार,अंड्यांचा बाजार यांसारखे जबरदस्त विषय हाताळले पुस्तकात मांडले आहेत तेसुद्धा प्रचंड वैद्यकिय अभ्यास करूनच.अगदी फेलोपियन ट्यूब वगैरे अनेक शब्द संज्ञा यात आहेत,त्यामुळे वाचताना कदाचित थोडं अवघड वाटू शकेल.पण समांतर शरीराची आकृती पाहिली तर सहज कळू शकेल. पिंकी विराणी यांचे अरुणाची गोष्ट,कैलासवासी मुंबई यानंतरचे मी वाचलेले तिसरे पुस्तक. अप्रतिम ताकदवान लिखाण!! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more