* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STHULATELA KARA TATA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984040
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
RESEARCH ON OBESITY, BY DR. ASHISH BORKAR AND DR. GAURI BORKAR IS NOW AVAILABLE IN BOOK FORM. IT IS EASY TO OVERCOME OBESITY IF ONE ADOPTS A THREE-PRONGED ATTACK – A DIET THAT MATCHES YOUR CONSTITUTION AND PROFESSION, REGULAR EXERCISE, AND PROPER TREATMENT. THIS BOOK DELVES DEEPLY INTO THE COMPLICATIONS OF OBESITY AND THEIR TREATMENT AND ALSO THE WORRYING TREND OF CHILDHOOD OBESITY THAT IS ON THE RISE. THIS BOOK IS UNIQUE IN THAT IT OFFERS DETAILED ADVICE ABOUT DIET IN VARIOUS SITUATIONS – DAILY DIET, DIET FOR DAYS OF FASTING, DIET TO BE FOLLOWED IN MARRIAGE RECEPTION BANQUETS AND WHAT TO EAT IF ONE GOES TO A RESTAURANT. MANY PEOPLE FIND IT DIFFICULT TO SPARE TIME TO GO TO A GYM. THIS BOOK COMES WITH A DVD THAT DEMONSTRATES SIMPLE ‘FAT-BURN’ EXERCISES FOR HOUSEWIVES, SALARIED EMPLOYEES, BUSINESSMEN, AS WELL AS YOUNG BOYS AND GIRLS.
डॉ. आशिष बोरकर व डॉ. गौरी बोरकर यांचे `स्थूलते`वरील संशोधन पुस्तकरूपाने येत आहे. आपली प्रकृती आणि व्यवसाय यांना अनुरूप आहार, योग्य उपचार आणि नियमित व्यायाम ही त्रिसूत्री अंगिकारल्यास स्थूलतेवर विजय मिळवणे सोपे जाते. स्थूलतेमुळे होणारे विविध आजार व उपचार यांची माहिती, प्रौढांबरोबरच सध्या लहान मुलांमध्ये आढळणारे स्थूलतेचे चिंता करायला लावणारे प्रमाण याचा सखोल ऊहापोह या पुस्तकामध्ये केलेला आहे. स्थूल लोकांसाठी दैनंदिन आहार, धार्मिक उपवासाच्या दिवशीचा आहार, लग्न-समारंभातील आहार, हॉटेलमध्ये गेल्यास काय आहार घ्यावा यांसारख्या बारीकसारीक गोष्टींचा अंतर्भाव, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य! बऱ्याच लोकांना वेळेअभावी घराबाहेर जाऊन `जीम`मध्ये व्यायाम करणे शक्य होत नाही. गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार, लहान व तरुण मुले-मुली यांच्यासाठी खास सोपे व्यायामप्रकार या पुस्तकाबरोबर डी.व्ही.डी.मध्ये देण्यात आले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #STHULATELAKARATATA #STHULATELAKARATATA #स्थूलतेलाकराटाटा #HEALTHCARE&PSYCHOLOGY #MARATHI #GAURIBORKARASHISHBORKAR #गौरीबोरकरआशिषबोरकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 10-06-2016

    वाढते वजन अपरिहार्य अशा आधुनिक जीवनशैलीचे बायप्रॉडक्ट आहे. वेजची धावपळ, व्यायामाला कमी वेळ, वाढलेल्या जीवनमानामुळे चांगलेचुंगले, चवीढवीचे, भरपूर फॅट्स असलेले खाद्यपदार्थ हवे तेव्हा उपलब्ध असणं, जंक फूडचा मारा, ताणतणाव या सगळ्याचा परिणाम वजन वाढण्यावरहोतो. हल्ली लहान, शाळकरी वयातच स्थूलता येत असल्याचे संशोधन अलीकडेच पुढे आले आहे. थोडक्यात, वजन वाढणे आणि ते नियंत्रणात न येणे ही समस्या आता अनेकांना भेडसावत असते. ‘स्थूलतेला करा टाटा’ या पुस्तकात बोरकर डॉक्टरद्वयीने ही समस्या आणि ती सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याची चर्चा केली आहे. ‘आपले वजन का वाढते’ या प्रकरणात आपल्याला स्थूलत्व नेमके कशामुळे येते याबद्दलची चर्चा आहे. आपण स्थूल आहोत का, हे कसे ओळखायचं याबाबत आपल्याला दुसऱ्या प्रकरणात दिलेल्या तक्तावरून समजतं. आपला आहार संतुलित हवा म्हणजे नेमकं काय याबरोबरच संबंधित सगळ्या घटकांची माहिती देण्यात आली आहे. स्थूलतेच्या परिणामाची तपशीलवार चर्चा अतिरिक्त मेदसंचितीचे दुष्परिणाम या प्रकरणात मांडले आहेत. त्यात स्थूलतेचा आयुर्मानावर, श्वसनसंस्था, पचनसंस्थेवर होणारा परिणाम, स्थूलतेमुळे होणारी सांधेदुखी, येणारा थकवा, कंबरदुखी, टाचदुखी, व्हेरिकोज व्हेन्स, मधुमेह, प्रजनन संस्थेवर होणारा परिणाम, स्थूलता आणि अंतस्त्रावी ग्रंथी, त्वचेवर होणारा परिणाम, हृदयविकाराचा स्थूलतेशी असलेला संबंध, त्यावर उपाय याची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. वयात येताना होणारे मानसिक बदल आणि त्यांचा स्थूलतेशी असणारा संबंध, अशा वेळी पौगंडावस्थेतील मुलांशी कसं वागायला हवं, स्थूलता आणि उपवास यांचा काय संबंध आहे, पाणी पिण्याचे वजनाशी नेमके काय नाते आहे, कॅलरी मोजून आहार घेण्याचे सध्याचे फॅड आणि वस्तुस्थिती नेमकी काय असते या सगळ्या माहितीबरोबरच वजन कमी करण्याचे शास्त्रही हे पुस्तक सांगते. वजन कमी करण्यासाठी आहार काय असावा त्याचा तक्ताही पुस्तकात दिला आहे. आहारासंबंधी हदलेल्या टिप्स वजन कमी करणाऱ्या व्यक्तीला उपयोगी पडू शकतात. डॉक्टरांनी मांडलेले रुग्णानुभव हे वाचकांसाठी आरशासारखे ठरु शकतात. स्थूलता आणि व्यायाम, व्यायामाची त्रिसूत्री ही प्रकरणंही महत्त्वपूर्ण माहिती देतात. पण यात मांडलेली माहिती आणखी तपशीलवार असायला हवी होती, असं वाटत राहतं. पुस्तकाबरोबरच डीव्हीडीही देण्यात आली आहे. त्यात चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे वेगवेगळे, सोपे व्यायामप्रकार दिले आहेत. पुस्तक आणि डीव्हीडी असा हा मराठीतला पहिलाच कॉम्बीपॅक आहे. ...Read more

  • Rating Startejas joshi

    I read and followed this book. I really thank dr. borkar and mehta publishing house for such a nice combipack of book and DVD. It is very useful for everyone who is obese.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more