* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STHULATELA KARA TATA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984040
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
RESEARCH ON OBESITY, BY DR. ASHISH BORKAR AND DR. GAURI BORKAR IS NOW AVAILABLE IN BOOK FORM. IT IS EASY TO OVERCOME OBESITY IF ONE ADOPTS A THREE-PRONGED ATTACK – A DIET THAT MATCHES YOUR CONSTITUTION AND PROFESSION, REGULAR EXERCISE, AND PROPER TREATMENT. THIS BOOK DELVES DEEPLY INTO THE COMPLICATIONS OF OBESITY AND THEIR TREATMENT AND ALSO THE WORRYING TREND OF CHILDHOOD OBESITY THAT IS ON THE RISE. THIS BOOK IS UNIQUE IN THAT IT OFFERS DETAILED ADVICE ABOUT DIET IN VARIOUS SITUATIONS – DAILY DIET, DIET FOR DAYS OF FASTING, DIET TO BE FOLLOWED IN MARRIAGE RECEPTION BANQUETS AND WHAT TO EAT IF ONE GOES TO A RESTAURANT. MANY PEOPLE FIND IT DIFFICULT TO SPARE TIME TO GO TO A GYM. THIS BOOK COMES WITH A DVD THAT DEMONSTRATES SIMPLE ‘FAT-BURN’ EXERCISES FOR HOUSEWIVES, SALARIED EMPLOYEES, BUSINESSMEN, AS WELL AS YOUNG BOYS AND GIRLS.
डॉ. आशिष बोरकर व डॉ. गौरी बोरकर यांचे `स्थूलते`वरील संशोधन पुस्तकरूपाने येत आहे. आपली प्रकृती आणि व्यवसाय यांना अनुरूप आहार, योग्य उपचार आणि नियमित व्यायाम ही त्रिसूत्री अंगिकारल्यास स्थूलतेवर विजय मिळवणे सोपे जाते. स्थूलतेमुळे होणारे विविध आजार व उपचार यांची माहिती, प्रौढांबरोबरच सध्या लहान मुलांमध्ये आढळणारे स्थूलतेचे चिंता करायला लावणारे प्रमाण याचा सखोल ऊहापोह या पुस्तकामध्ये केलेला आहे. स्थूल लोकांसाठी दैनंदिन आहार, धार्मिक उपवासाच्या दिवशीचा आहार, लग्न-समारंभातील आहार, हॉटेलमध्ये गेल्यास काय आहार घ्यावा यांसारख्या बारीकसारीक गोष्टींचा अंतर्भाव, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य! बऱ्याच लोकांना वेळेअभावी घराबाहेर जाऊन `जीम`मध्ये व्यायाम करणे शक्य होत नाही. गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार, लहान व तरुण मुले-मुली यांच्यासाठी खास सोपे व्यायामप्रकार या पुस्तकाबरोबर डी.व्ही.डी.मध्ये देण्यात आले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #STHULATELAKARATATA #STHULATELAKARATATA #स्थूलतेलाकराटाटा #HEALTHCARE&PSYCHOLOGY #MARATHI #GAURIBORKARASHISHBORKAR #गौरीबोरकरआशिषबोरकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 10-06-2016

    वाढते वजन अपरिहार्य अशा आधुनिक जीवनशैलीचे बायप्रॉडक्ट आहे. वेजची धावपळ, व्यायामाला कमी वेळ, वाढलेल्या जीवनमानामुळे चांगलेचुंगले, चवीढवीचे, भरपूर फॅट्स असलेले खाद्यपदार्थ हवे तेव्हा उपलब्ध असणं, जंक फूडचा मारा, ताणतणाव या सगळ्याचा परिणाम वजन वाढण्यावरहोतो. हल्ली लहान, शाळकरी वयातच स्थूलता येत असल्याचे संशोधन अलीकडेच पुढे आले आहे. थोडक्यात, वजन वाढणे आणि ते नियंत्रणात न येणे ही समस्या आता अनेकांना भेडसावत असते. ‘स्थूलतेला करा टाटा’ या पुस्तकात बोरकर डॉक्टरद्वयीने ही समस्या आणि ती सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याची चर्चा केली आहे. ‘आपले वजन का वाढते’ या प्रकरणात आपल्याला स्थूलत्व नेमके कशामुळे येते याबद्दलची चर्चा आहे. आपण स्थूल आहोत का, हे कसे ओळखायचं याबाबत आपल्याला दुसऱ्या प्रकरणात दिलेल्या तक्तावरून समजतं. आपला आहार संतुलित हवा म्हणजे नेमकं काय याबरोबरच संबंधित सगळ्या घटकांची माहिती देण्यात आली आहे. स्थूलतेच्या परिणामाची तपशीलवार चर्चा अतिरिक्त मेदसंचितीचे दुष्परिणाम या प्रकरणात मांडले आहेत. त्यात स्थूलतेचा आयुर्मानावर, श्वसनसंस्था, पचनसंस्थेवर होणारा परिणाम, स्थूलतेमुळे होणारी सांधेदुखी, येणारा थकवा, कंबरदुखी, टाचदुखी, व्हेरिकोज व्हेन्स, मधुमेह, प्रजनन संस्थेवर होणारा परिणाम, स्थूलता आणि अंतस्त्रावी ग्रंथी, त्वचेवर होणारा परिणाम, हृदयविकाराचा स्थूलतेशी असलेला संबंध, त्यावर उपाय याची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. वयात येताना होणारे मानसिक बदल आणि त्यांचा स्थूलतेशी असणारा संबंध, अशा वेळी पौगंडावस्थेतील मुलांशी कसं वागायला हवं, स्थूलता आणि उपवास यांचा काय संबंध आहे, पाणी पिण्याचे वजनाशी नेमके काय नाते आहे, कॅलरी मोजून आहार घेण्याचे सध्याचे फॅड आणि वस्तुस्थिती नेमकी काय असते या सगळ्या माहितीबरोबरच वजन कमी करण्याचे शास्त्रही हे पुस्तक सांगते. वजन कमी करण्यासाठी आहार काय असावा त्याचा तक्ताही पुस्तकात दिला आहे. आहारासंबंधी हदलेल्या टिप्स वजन कमी करणाऱ्या व्यक्तीला उपयोगी पडू शकतात. डॉक्टरांनी मांडलेले रुग्णानुभव हे वाचकांसाठी आरशासारखे ठरु शकतात. स्थूलता आणि व्यायाम, व्यायामाची त्रिसूत्री ही प्रकरणंही महत्त्वपूर्ण माहिती देतात. पण यात मांडलेली माहिती आणखी तपशीलवार असायला हवी होती, असं वाटत राहतं. पुस्तकाबरोबरच डीव्हीडीही देण्यात आली आहे. त्यात चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे वेगवेगळे, सोपे व्यायामप्रकार दिले आहेत. पुस्तक आणि डीव्हीडी असा हा मराठीतला पहिलाच कॉम्बीपॅक आहे. ...Read more

  • Rating Startejas joshi

    I read and followed this book. I really thank dr. borkar and mehta publishing house for such a nice combipack of book and DVD. It is very useful for everyone who is obese.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more