* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BAL PARICHARYA
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177666199
  • Edition : 17
  • Publishing Year : JANUARY1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 440
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MRS. PATIL ASKED ME TO GO THROUGH HER ABOVE MENTIONED BOOK. OUT OF CURIOSITY, I AGREED TO DO SO. I AM VERY MUCH IMPRESSED WITH THE WAY SHE HAS DESCRIBED EACH AND EVERY CHAPTER. ACTUALLY, THIS TOPIC OF CHILD NURSING IS VERY DIFFICULT TO UNDERSTAND, BUT SHE HAS MADE IT VERY SIMPLE. TO MAKE THE UNDERSTANDING EASIER SHE HAS ELABORATED IT WITH THE HELP OF DIAGRAMS. THIS BOOK DESCRIBES IN DETAIL THE VARIOUS ASPECTS IN THE GROWTH OF A CHILD, RIGHT FROM THE CARE OF AN INFANT, HIS UPBRINGING, HIS PROTECTION, THE CARE TO BE TAKEN AT THE HOSPITAL AS WELL AS AFTER BRINGING THE BABY HOME, THE DISEASES, THEIR SIGNS AND SYMPTOMS, THE PREVENTIVE METHODS, THE MODE OF TREATMENT AND SPECIAL CARE, ETC. SHE HAS ALSO GIVEN DETAILED INFORMATION OF MANY WELFARE SCHEMES FOR CHILDREN. THIS BOOK IS THE FIRST OF ITS TYPE, BEFORE THIS I HAVE NOT COME ACROSS ANY SUCH BOOK, WHICH IS WRITTEN ESPECIALLY FOR THE BABIES. THIS BOOK WILL BE VERY USEFUL FOR THE STUDENTS OF NURSING COLLEGE, BUT IT WILL BE A GREAT GUIDE TO ALL PARENTS WHILE NURTURING THEIR BABIES. DR. V. A. BHOSALE; M. D. (PAEDIATRICS).
सौ. सुधा पाटील यांनी आपल्या बाल परिचर्या या लिखाणाचे वाचन करण्यास मला विनंती केली. मला त्यांनी काय लिहिले असेल हे पाहण्याची उत्सुकता वाटली व मी वाचण्याचे कबूल केले. काही प्रकरणे वाचल्यानंतर त्यांच्या सविस्तर लिखाणाबद्दल मला त्यांचे फारच कौतुक वाटले. त्यांनी सहज सोप्या मराठी भाषेतून किचकट विषयही समजण्यास सोपा व सविस्तर रीतीने मांडला आहे. विषय समजण्यास सोपा होण्यासाठी योग्य ठिकाणी सुबक आकृत्यांचाही समावेश केलेला आहे. या पुस्तकात नवजात बालकाची काळजी, बालकाचे संगोपन, संवर्धन, संरक्षण आजारी बालकाची घरी व रुग्णालयातील काळजी, बालकाला होणारे आजार, चिन्हे व लक्षणे, विशेष उपचार व काळजी यांचे सविस्तर विवेचन केले आहे. तसेच बाल कल्याणकारी योजनांचीही सविस्तर माहिती दिली आहे. बाल परिचर्या विषयाचे मराठीतील या पुस्तकाच्या दर्जाचे पुस्तक यापूर्वी माझ्या तरी वाचनात आलेले नाही. हे पुस्तक नर्सिंगच्या सर्व कोर्सेसच्या विद्यार्थिनींना निश्चितच उपयोगी पडेल, यात शंका नाही. तसेच आजच्या काळातील प्रत्येक माता-पित्याच्या वाचनात अशी पुस्तके आल्यास त्यांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याची काळजी सोपे सोपे होईल. हे पुस्तक लिहिल्याबद्दल लेखिकेचे अभिनंदन! डॉ. भोसले व्ही.ए. एम.डी (पेडि.), बालरोगतज्ज्ञ
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% # सुधापाटील #SUDH PATIL #HEALTHCARE & PSYCHOLOGY #बालपरिचर्या #BALPARICHARYA #
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    बाल परिचर्या पुस्तकाची प्रथमावृत्ती जानेवारी १९९१ मध्ये प्रसिद्ध झाली. बाल संगोपन व बाल परिचर्या हा विषयतसा अतिशय किचकट पण या पुस्तकातील विषयाची मांडणी समजण्यास सोपी व सविस्तर आहे. या पुस्तकात बालकाचे संगोपन, संवर्धन, संरक्षण व आजारी बालकाची काळजी घी व रुग्णालयात कशी घ्यावी हे अतिशय सोप्या व सहज पद्धतीने मांडले आहे. बाळाला होणारे सर्वसाधारण आजार त्याची सुरुवात माहिती मिळाल्याने पालकसुद्धा जागृत राहून लवकरात लवकर बाळाला निदानासाठी डॉक्टरांकडे नेऊन आजार बरा होण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे सविस्तर विवेचन केले आहे. या पुस्तकातील बरीचशी प्रकरणे प्रत्येक पालकांनी वाचून आत्मसात केल्यास बालकाचे संगोपन शास्त्रीय दृष्ट्या करून बालक, शारिरीक, मानसिक निरोगी ठेवण्यास मदतच होईल यात शंका नाही. बाल कल्याणकारी योजना, कार्यक्रमांचाही यात समावेश असल्याने प्रत्येक पालक या योजनांची माहिती मिळवू शकतात त्याचा उपयोग त्यांच्या स्वत:च्या मुलांसाठी व इतरांना सांगण्यासाठी होईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.