* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EKACH PELA SHIVAMBUCHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663778
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE THEME OF THIS BOOK IS A REAL STORY WHICH THE AUTHOR HAS PRESENTED IN THE FORM OF A DRAMA THOUGH THE NAMES OF THE CHARACTERS HAVE BEEN CHANGED. THE MAIN REASON BEHIND WRITING ABOUT SHIVAMBU IN MUCH DETAIL IS THE QUERIES THAT HE WAS GETTING ALL THESE YEARS FROM ALL HIS PATIENTS, THOSE WHO WERE CURED BY THE THERAPY OF SHIVAMBU. AS, IT IS NOT POSSIBLE TO EXPLAIN THE BENEFITS OF SHIVAMBU PERSONALLY TO EVERYBODY, HE HAS PRESENTED IT IN A FORM OF A BOOK. EVERYONE SHOULD HAVE GOOD HEALTH, WHICH IS THE BASIC FOUNDATION OF A HUMAN LIFE. HEALTH MAKES LIFE WONDERFUL. THIS HEALTH CAN BE ACHIEVED ONLY WHILE BEING WITH THE NATURE. SHIVAMBU IS ONE`S OWN URINE. THE DOCTOR CUM AUTHOR HIMSELF HAS FOLLOWED THE THERAPY FOR HIS BENEFIT AND HAS BEEN BLESSED BY IT. HE HAS CURED MANY A PEOPLE WITH THE USE OF THIS THERAPY WITH A FIRM BELIEF THAT NATURE CURE IS THE BEST SOLUTION, A KEY FOR A HEALTHY AND PEACEFUL LIFE. WE ARE A PART OF NATURE. THROUGHOUT LIFE, OR RATHER FROM BIRTH ITSELF WE TRY TO HOLD ONTO SOMETHING. MANY A TIMES, WE FEEL SOMEBODY AS CLOSE ENOUGH, BUT IT IS ONLY AT THE END OF THE LIFE THAT WE REALISE THAT ACTUALLY NOBODY IS FOR ANYBODY. IF WE MINUTELY OBSERVE THE HUMAN LIFE THEN WE WILL REALISE THAT ALL OUR ATTEMPTS ARE IN ONE DIRECTION, TO MAKE THE LAST MOMENT A VERY PEACEFUL AND A HAPPY ONE. THIS PROBLEM IS TOTALLY SOLVED WITH THE DAILY AND REGULAR USE OF SHIVAMBU. AT LEAST, THOSE WHO ARE VERY MUCH WORRIED ABOUT THE SMOOTH END OF THEIR LIFE SHOULD TRY THE SHIVAMBU THERAPY.
निसर्गोपचारा संबंधीच्या अनेक प्रश्नांचा चिंतनशील व मार्मिक विचार या नाट्य-ग्रंथात सहज, सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे. ते केवळ व्याधिग्रस्तांनीच वाचावे असे नाही, तर मुमुक्षूंनीही वाचावे. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीत्व हे तिच्या स्वास्थ्यानुरुप घडत असते आणि शुद्ध निसर्गोपचार हेच शिकवितो. सर्व लोकांना सर्व काळात उपयोगी पडणारा आणि सर्वत्र लागू होणारा असा हा निसर्गोपचार आहे. डॉ. शशि पाटील हे युरोपॅथिस्ट आहेत. ते मूत्रमार्गाने केल्या जाणाऱ्या उपचारांची नाट्यस्वरुपात माहिती देतात. मूत्र हा शब्दही माणसाला किळसवाणा वाटतो. पण त्या मूत्राचे नैसर्गिक महत्त्व डॅक्टर पटवून देतात. एका सत्यकथेवर आधारित ही नाटिका आहे. निर्सगोपचार उपचार पद्धतीने एका रुग्णाच्या आयुष्यात घडलेले बदल या साहित्यकृतीतून समोर येतात. त्यांचा निसर्गोपचार माणसाला खर्या अर्थाने निसर्गाच्या नजीक नेतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKACHPELASHIVAMBUCHA #EKACHPELASHIVAMBUCHA #एकचपेलाशिवाम्बूचा #HEALTHCARE&PSYCHOLOGY #MARATHI #DR.SHASHIPATIL #डॉ.शशीपाटील "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    स्वत:च्या आरोग्यरक्षणाचे प्रत्येकाजवळ असलेले अमोघ साधन... डॉ. शशि पाटील (जन्म - १९४५) हे गेली पंचवीस वर्षे शिवाम्बू योग व निसर्गोपचार केंद्र चालवत आहेत. देहशुद्धीसाठी शिवाम्बू उपचार व मन:शुद्धीसाठी विपश्यना, ध्यानप्रक्रिया या गोष्टी अत्यंत उपयुक्त आेत असा त्यांचा विश्वास आहे. शिवाम्बू म्हणजे स्वमूत्र. त्याच्या प्राशनाने दुर्धर व्याधीतूनही मुक्तता होते हे शेकडो रुग्णांच्या संदर्भात त्यांना आढळून आले आहे; आणि या स्वस्त सुलभ उपचार पद्धतीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ‘एकच पेला शिवाम्बूचा’ हे चार अंकी नाटक लिहिले आहे. नाटकात फारशा घटना नाहीत. केवळ चर्चा आहे. संवादाच्या रूपात माहिती दिली आहे. शिवाम्बू चिकित्सक अनुभवी डॉक्टरांना युवाशक्तीचा प्रतिनिधी कार्यकर्ता योगेश हा दुर्धर रोगाने मरणासक्त झालेल्या अंबूतार्इंवर उपचार करण्यासाठी बोलावतो. या घटनेपासून या नाटकाचा प्रारंभ होतो. अंबूतार्इंचे पती चिंतोपंत, मुलगा अविनाश, अविनाशची पत्नी श्रद्धा, शेजारी नाना ही अन्य पात्रे. शिवाम्बूबद्दलची माहिती वेगवेगळ्या रोगांच्या संदर्भात देण्यात येते. मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, मधुचंद्रदाह, आम्लपित्त, दंतरोग, ल्यूकेमिया, जिभेचा कर्करोग, बद्धकोष्ठता, रक्तदाब, ह्रदयविकार, एडस्, अशा अनेक विकारांमध्ये शिवाम्बूसेवन कसे प्रभावी ठरते हे उदाहरणे देऊन सांगितले आहे. शिवाम्बूचा इतिहास, वेगवेगळ्या देशात होणारा वापर, शिवाम्बूचे घटक, योग्य आहार व निसर्गोपचार, शिवाम्बू घेण्याची पद्धत, प्रमाण, शिवाम्बूचा मसाज इ. अनेक तपशीलही संभाषणाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहेत. शिवाम्बू सेवनाने वार्धक्यही जाणवत नाही; शरीर चैतन्यपूर्ण व तरतरीत राहते. याची पुन:पुन्हा जाणीव देण्याचा कळकळीचा प्रयत्न या संवादात्मक कृतीत केला आहे. मोरारजी देसाई, पी. बी. पाटील, विनोबा भावे, बाळकोबा भावे, रावजीभाई पटेल, वैद्यराज भोगे वगैरेंची मते शेवटी दिली आहेत. मलावरोध हे सर्व रोगांचे आदिकारण आहे; पांढरपेशा वर्गातील ७०/८० टक्के लोक मलावरोधामुळे देहक्लेश भोगत असतात. आपली जीवनप्रणालीही आपल्या आरोग्याला बाधक अशी आहे याकडेही लक्ष वेधणारी टिपणे दिली आहेत. विविध रोगांमध्ये शिवाम्बूचा जो उपयोग होतो त्यावरून शिवाम्बू उपचारप्रणाली कशी गुणकारी आहे, याची यादीही दिली आहेत. शिवाम्बूचे सेवन पतिपत्नी दोघांनी केले तर निपुत्रिकांना ४/६ महिन्यात फलधारणा होऊ शकते, सीझेरियन वा फोर्सेपची पूर्वपीठिका असणाऱ्या गर्भवती महिलांची नैसर्गिकरीत्या प्रसूती होते, एपिलेप्सीचा बंदोबस्त होतो, बाल व वृद्ध यांना एकाच प्रकारचे उपचार लागू पडतात, असेही डॉ. पाटील यांचे प्रतिपादन आहे. एका अभिनव उपचार पद्धतीबद्दल मनात असणाऱ्या सर्व शंका कुशंका दूर करणारे हे पुस्तक आहे. शिवाम्बूच्या महतीबद्दलचे काही संस्कृत श्र्लोकही येथे द्यावेसे वाटतात. शिवाम्बु चामृतं दिव्यं जरारोगविनाशनम् तदादाय महायोगी कुर्यात् वै निजसाधनम् ।।९।। (शिवाम्बू हे दिव्य अमृत आहे. वार्धक्य, रोग यांचा नाश करणारे आहे. महायोग्यांनी याचे प्राशन करून आपली साधना करावी.) मुखशुद्धिं विधायाथ कृत्वा चावश्यकीं क्रियाम् पिबेत् शिवाम्बु विमलं जन्मरोगविनाशनम् ।।१०।। (उठल्यावर मुखशुद्धी इ. क्रिया कराव्या. नंतर मलरहित शिवाम्बूचे सेवन करावे. जन्मापासूनचे रोग नाश पावतात.) मन:शिला यस्तु योगीं चूर्णितान्तु शिवाम्बुके विलेपनादरोग: स्यादंगे कृष्ण शिरोरुह: ।।४३।। (मन:शिलाचे चूर्ण करून शिवाम्बूमधून त्याचा सर्वांगाला लेप लावल्याने योगी रोगमुक्त होतो तसेच त्याचे मस्तकावरचे केस काळेभोर होतात.) निंबस्य पत्रजरसं तन्मिश्रंच शिवाम्बुना य: सेवने योगयुक्तो स भवेदमरोपम: ।।३२।। (निंबाच्या पानांचा रस शिवाम्बूमध्ये घालून सेवन केल्यास योगी, साधक मनुष्य देवाप्रमाणे कांतिमान होतो.) सर्वोपद्रवनिर्मुक्त: सदाशिववपुर्धर ब्रम्हाण्डगोलके क्रीडन् देववत् मोदतो चिरम् ।।३१।। (पथ्यपूर्ण शिवाम्बू सेवनाने माणूस सर्व उपद्रवांपासून मुक्त राहून शंकरासारखे तेजस्वी शरीर प्राप्त करतो; ब्रम्हांडात क्रीडा करीत देवांप्रमाणे सदैव आनंदी राहतो.) ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more