* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EKACH PELA SHIVAMBUCHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663778
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE THEME OF THIS BOOK IS A REAL STORY WHICH THE AUTHOR HAS PRESENTED IN THE FORM OF A DRAMA THOUGH THE NAMES OF THE CHARACTERS HAVE BEEN CHANGED. THE MAIN REASON BEHIND WRITING ABOUT SHIVAMBU IN MUCH DETAIL IS THE QUERIES THAT HE WAS GETTING ALL THESE YEARS FROM ALL HIS PATIENTS, THOSE WHO WERE CURED BY THE THERAPY OF SHIVAMBU. AS, IT IS NOT POSSIBLE TO EXPLAIN THE BENEFITS OF SHIVAMBU PERSONALLY TO EVERYBODY, HE HAS PRESENTED IT IN A FORM OF A BOOK. EVERYONE SHOULD HAVE GOOD HEALTH, WHICH IS THE BASIC FOUNDATION OF A HUMAN LIFE. HEALTH MAKES LIFE WONDERFUL. THIS HEALTH CAN BE ACHIEVED ONLY WHILE BEING WITH THE NATURE. SHIVAMBU IS ONE`S OWN URINE. THE DOCTOR CUM AUTHOR HIMSELF HAS FOLLOWED THE THERAPY FOR HIS BENEFIT AND HAS BEEN BLESSED BY IT. HE HAS CURED MANY A PEOPLE WITH THE USE OF THIS THERAPY WITH A FIRM BELIEF THAT NATURE CURE IS THE BEST SOLUTION, A KEY FOR A HEALTHY AND PEACEFUL LIFE. WE ARE A PART OF NATURE. THROUGHOUT LIFE, OR RATHER FROM BIRTH ITSELF WE TRY TO HOLD ONTO SOMETHING. MANY A TIMES, WE FEEL SOMEBODY AS CLOSE ENOUGH, BUT IT IS ONLY AT THE END OF THE LIFE THAT WE REALISE THAT ACTUALLY NOBODY IS FOR ANYBODY. IF WE MINUTELY OBSERVE THE HUMAN LIFE THEN WE WILL REALISE THAT ALL OUR ATTEMPTS ARE IN ONE DIRECTION, TO MAKE THE LAST MOMENT A VERY PEACEFUL AND A HAPPY ONE. THIS PROBLEM IS TOTALLY SOLVED WITH THE DAILY AND REGULAR USE OF SHIVAMBU. AT LEAST, THOSE WHO ARE VERY MUCH WORRIED ABOUT THE SMOOTH END OF THEIR LIFE SHOULD TRY THE SHIVAMBU THERAPY.
निसर्गोपचारा संबंधीच्या अनेक प्रश्नांचा चिंतनशील व मार्मिक विचार या नाट्य-ग्रंथात सहज, सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे. ते केवळ व्याधिग्रस्तांनीच वाचावे असे नाही, तर मुमुक्षूंनीही वाचावे. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीत्व हे तिच्या स्वास्थ्यानुरुप घडत असते आणि शुद्ध निसर्गोपचार हेच शिकवितो. सर्व लोकांना सर्व काळात उपयोगी पडणारा आणि सर्वत्र लागू होणारा असा हा निसर्गोपचार आहे. डॉ. शशि पाटील हे युरोपॅथिस्ट आहेत. ते मूत्रमार्गाने केल्या जाणाऱ्या उपचारांची नाट्यस्वरुपात माहिती देतात. मूत्र हा शब्दही माणसाला किळसवाणा वाटतो. पण त्या मूत्राचे नैसर्गिक महत्त्व डॅक्टर पटवून देतात. एका सत्यकथेवर आधारित ही नाटिका आहे. निर्सगोपचार उपचार पद्धतीने एका रुग्णाच्या आयुष्यात घडलेले बदल या साहित्यकृतीतून समोर येतात. त्यांचा निसर्गोपचार माणसाला खर्या अर्थाने निसर्गाच्या नजीक नेतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKACHPELASHIVAMBUCHA #EKACHPELASHIVAMBUCHA #एकचपेलाशिवाम्बूचा #HEALTHCARE&PSYCHOLOGY #MARATHI #DR.SHASHIPATIL #डॉ.शशीपाटील "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    स्वत:च्या आरोग्यरक्षणाचे प्रत्येकाजवळ असलेले अमोघ साधन... डॉ. शशि पाटील (जन्म - १९४५) हे गेली पंचवीस वर्षे शिवाम्बू योग व निसर्गोपचार केंद्र चालवत आहेत. देहशुद्धीसाठी शिवाम्बू उपचार व मन:शुद्धीसाठी विपश्यना, ध्यानप्रक्रिया या गोष्टी अत्यंत उपयुक्त आेत असा त्यांचा विश्वास आहे. शिवाम्बू म्हणजे स्वमूत्र. त्याच्या प्राशनाने दुर्धर व्याधीतूनही मुक्तता होते हे शेकडो रुग्णांच्या संदर्भात त्यांना आढळून आले आहे; आणि या स्वस्त सुलभ उपचार पद्धतीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ‘एकच पेला शिवाम्बूचा’ हे चार अंकी नाटक लिहिले आहे. नाटकात फारशा घटना नाहीत. केवळ चर्चा आहे. संवादाच्या रूपात माहिती दिली आहे. शिवाम्बू चिकित्सक अनुभवी डॉक्टरांना युवाशक्तीचा प्रतिनिधी कार्यकर्ता योगेश हा दुर्धर रोगाने मरणासक्त झालेल्या अंबूतार्इंवर उपचार करण्यासाठी बोलावतो. या घटनेपासून या नाटकाचा प्रारंभ होतो. अंबूतार्इंचे पती चिंतोपंत, मुलगा अविनाश, अविनाशची पत्नी श्रद्धा, शेजारी नाना ही अन्य पात्रे. शिवाम्बूबद्दलची माहिती वेगवेगळ्या रोगांच्या संदर्भात देण्यात येते. मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, मधुचंद्रदाह, आम्लपित्त, दंतरोग, ल्यूकेमिया, जिभेचा कर्करोग, बद्धकोष्ठता, रक्तदाब, ह्रदयविकार, एडस्, अशा अनेक विकारांमध्ये शिवाम्बूसेवन कसे प्रभावी ठरते हे उदाहरणे देऊन सांगितले आहे. शिवाम्बूचा इतिहास, वेगवेगळ्या देशात होणारा वापर, शिवाम्बूचे घटक, योग्य आहार व निसर्गोपचार, शिवाम्बू घेण्याची पद्धत, प्रमाण, शिवाम्बूचा मसाज इ. अनेक तपशीलही संभाषणाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहेत. शिवाम्बू सेवनाने वार्धक्यही जाणवत नाही; शरीर चैतन्यपूर्ण व तरतरीत राहते. याची पुन:पुन्हा जाणीव देण्याचा कळकळीचा प्रयत्न या संवादात्मक कृतीत केला आहे. मोरारजी देसाई, पी. बी. पाटील, विनोबा भावे, बाळकोबा भावे, रावजीभाई पटेल, वैद्यराज भोगे वगैरेंची मते शेवटी दिली आहेत. मलावरोध हे सर्व रोगांचे आदिकारण आहे; पांढरपेशा वर्गातील ७०/८० टक्के लोक मलावरोधामुळे देहक्लेश भोगत असतात. आपली जीवनप्रणालीही आपल्या आरोग्याला बाधक अशी आहे याकडेही लक्ष वेधणारी टिपणे दिली आहेत. विविध रोगांमध्ये शिवाम्बूचा जो उपयोग होतो त्यावरून शिवाम्बू उपचारप्रणाली कशी गुणकारी आहे, याची यादीही दिली आहेत. शिवाम्बूचे सेवन पतिपत्नी दोघांनी केले तर निपुत्रिकांना ४/६ महिन्यात फलधारणा होऊ शकते, सीझेरियन वा फोर्सेपची पूर्वपीठिका असणाऱ्या गर्भवती महिलांची नैसर्गिकरीत्या प्रसूती होते, एपिलेप्सीचा बंदोबस्त होतो, बाल व वृद्ध यांना एकाच प्रकारचे उपचार लागू पडतात, असेही डॉ. पाटील यांचे प्रतिपादन आहे. एका अभिनव उपचार पद्धतीबद्दल मनात असणाऱ्या सर्व शंका कुशंका दूर करणारे हे पुस्तक आहे. शिवाम्बूच्या महतीबद्दलचे काही संस्कृत श्र्लोकही येथे द्यावेसे वाटतात. शिवाम्बु चामृतं दिव्यं जरारोगविनाशनम् तदादाय महायोगी कुर्यात् वै निजसाधनम् ।।९।। (शिवाम्बू हे दिव्य अमृत आहे. वार्धक्य, रोग यांचा नाश करणारे आहे. महायोग्यांनी याचे प्राशन करून आपली साधना करावी.) मुखशुद्धिं विधायाथ कृत्वा चावश्यकीं क्रियाम् पिबेत् शिवाम्बु विमलं जन्मरोगविनाशनम् ।।१०।। (उठल्यावर मुखशुद्धी इ. क्रिया कराव्या. नंतर मलरहित शिवाम्बूचे सेवन करावे. जन्मापासूनचे रोग नाश पावतात.) मन:शिला यस्तु योगीं चूर्णितान्तु शिवाम्बुके विलेपनादरोग: स्यादंगे कृष्ण शिरोरुह: ।।४३।। (मन:शिलाचे चूर्ण करून शिवाम्बूमधून त्याचा सर्वांगाला लेप लावल्याने योगी रोगमुक्त होतो तसेच त्याचे मस्तकावरचे केस काळेभोर होतात.) निंबस्य पत्रजरसं तन्मिश्रंच शिवाम्बुना य: सेवने योगयुक्तो स भवेदमरोपम: ।।३२।। (निंबाच्या पानांचा रस शिवाम्बूमध्ये घालून सेवन केल्यास योगी, साधक मनुष्य देवाप्रमाणे कांतिमान होतो.) सर्वोपद्रवनिर्मुक्त: सदाशिववपुर्धर ब्रम्हाण्डगोलके क्रीडन् देववत् मोदतो चिरम् ।।३१।। (पथ्यपूर्ण शिवाम्बू सेवनाने माणूस सर्व उपद्रवांपासून मुक्त राहून शंकरासारखे तेजस्वी शरीर प्राप्त करतो; ब्रम्हांडात क्रीडा करीत देवांप्रमाणे सदैव आनंदी राहतो.) ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more