* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667417
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1990
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
RANJIT DESAI`S SHORT STORIES ARE DIFFERENT THAN OTHER SHORT STORIES. THEY ALWAYS TAKE PLACE IN WONDROUS SITUATIONS, ALMOST HAVE AN ENVIRONMENT AS IF IN A FAIRY TALE. THEY ARE NOT RESTRAINED TO MAHARASHTRA. THEY HAVE A VAST BACKGROUND, THAT OF WHOLE INDIA. THIS AUTHOR LITERALLY LIVES THE LINE, "INDIA IS MY COUNTRY`. THE STORIES ARE MORE HISTORICAL THAN REALISTIC. MUSIC AND ROMANCE ARE THE INEVITABLE FACTORS OF THE STORIES. THE CHARACTERS ARE ROMANTIC AND LOVE TO BE IN THEIR OWN WORLD, ALWAYS LOST IN THE DREAMY ENVIRONMENT. FOR THEM, NOTHING VALUES MORE THAN LOVE AND ART, NOT EVEN THEIR LIFE. THE FEMALE CHARACTERS WHICH MEET US THROUGH HIS STORIES ARE ALWAYS BEAUTIFUL, PETITE, FRAGILE, WILLING TO SACRIFICE FOR LOVE WITHOUT ANY HESITATION IN THEIR MINDS. HE HAS ALWAYS PENNED THEM DOWN VERY DELICATELY, WHATEER THEIR OCCUPATION IS, BE IT A SINGER, A DANCER, A PROSTITUTE OR A HOUSEWIFE. HE HAS ALWAYS BEING CONSIDERATE OF THE DELICATE FEMALE MIND. HIS STORIES TAKE US TO PLACES FAR AWAY, MAKE US FORGET THE REAL WORLD. THE BACKGROUND IS EQUALLY COLOURFUL WITH ALL THE DETAILS PENNED DOWN MINUTELY. THIS SHOWS HIS OBSERVATION SKILLS. THOUGH HIS STORIES TEND TO BE MORE ON THE WONDEROUS SIDE, THE CHARACTERS ARE TYPICAL HUMAN BEINGS. HE HAS SKETCHED THEM VERY REALISTICALLY SO MUCH THAT WE AUTOMATICALLY AND UNKNOWINGLY GET INVOLVED, LAUGHING WITH THEIR HAPPINESS AND CRYING WITH THEIR SORROWS.PRALHAD KESHAV ATRE
‘रणजित देसाई यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातावरणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या; सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे. वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादिष्ट पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत. रणजित देसाईंच्या कथांत वावरणाया स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे. रणजित देसाईंच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पाश्र्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतही स्वप्नमयता वाढावी, अशा तहेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणाया व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणाया अन् आपल्या दु:खात पिचणाया त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...’ – प्रल्हाद केशव अत्रे
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    रंजक, रोचक पण पसरट कथा... ‘मेख मोगरी’ हा श्री. रणजित देसाई यांच्या पाच कथांचा वाटल्यास त्यांना दीर्घकथा म्हणा– संग्रह आहे, या पाचही कथा आकर्षक तर आहेतच; पण प्रत्येक कथेची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. कोठे इतिहासकाराची आठवण व्हावी अशी कोठे दोन पिढ्यांच्ा मागचे समाजजीवन डोळ्यापुढे उभे राहावे अशी, कोठे त्याग आणि भोग यांच्या शाश्वतद्वंद्वाचे दर्शन घडावे अशी, कोठे आजच्या भकास जीवनाचे दर्शन घडवून चित्त थरारून सोडणारी भीषण दाहकता मन कुरतडीत राहील अशी, तर कोठे भारतातील पूर्वकालीन संस्थानातील राजघराण्यात स्वार्थासाठी कोणते कुटिल डाव खेळले जात याचे मोठे प्रयत्ययकारी दर्शन घडवील अशी पार्श्वभूमी आहे. माणसांच्या जीवनातले वेधक क्षण देसाई मोठ्या कौशल्याने टिपतात आणि आपल्या अनलंकृत, काळजाला भिडणाऱ्या भाषेच्या द्वारे कधी आनंदभरी तर कधी दर्दभरी कथा जन्माला येते. प्रणयरम्य कथा त्या संग्रहातली ‘मेख मोगरी’ ही पहिलीच कथा या दृष्टीने मोठी लक्षणीय आहे. माणिकराव निंबाळकर या खानदानी सरदारांच्याकडे तुकोजीराव जाधव या नावाचे दुसरे सरदार पाहुणे म्हणून येतात. मोठ्या अगत्याने आणि आदराने त्यांचे आगत-स्वागत होते. माणिकरावांच्या तरुण कन्येने सखूबाईने जातीने लक्ष घालून स्वागताची सारी तयारी केलेली, खाण्यापिण्याचीच नव्हे तर शिकारीचीही, पण बरोबर आलेल्या तुकाजीरावांच्या मुलाचे म्हणजे अहिररावांचे आणि सखूबार्इंचे परस्परांकडे लक्ष वेधते आणि प्रणयाचे रेशमी धागे गुंफले जातात. ही आहे प्रणयाच्या नाजुक. रेशमी धाग्यांनी विणलेली कथा! या कथेत प्रणयाचे भडक रंग नाहीत की, प्रेमाच्या भाषेची आतषबाजी नाही. सारेच वातावरण कसे सौम्य, मनाला रिझविणारे, गुदगुल्या करणारे आहे. त्यामुहे ही कथा मनाची पकड कधी घेते हे लक्षातच येत नाही. मुलखावेगळी कथा ‘संस्कार’ ही एका सतरा-अठरा वर्षांच्या कोवळ्या वयाच्या मुलाची मोठी मुलखावेगळी कथा आहे. केशव कुलकर्णी शास्त्री या एकेकाळच्या नामवंत कीर्तनकाराचा नारायण हा पोरका मुलगा. ना आई, ना बाप, ना घर, ना दार! भिक्षेची झोळी घेऊन पोट भरण्यासाठी बाहेर पडलेला हा मुलगा योगायोगाने विश्वंभटशास्त्रांच्या घरी येतो. त्याने नाव सांगताच ओळख पटते. ‘‘मोठा पाहुणा आला आहे, त्याच्या भोजनाची व्यवस्था करा,’’ असे ते पत्नीला आणि सुनेला सांगतात तशी सुनबाई ‘‘घराची एकदा धर्मशाळा केली की सुटले!’’ अशी सासऱ्याची केली की सुटले!’’ अशी सासऱ्याची संभावना करते; पण तो राहतो, जेवतो पण घरातली एखादी वस्तू दिसेनाशी झाली की सूनबाई त्याचा संशय घेते. तो वेदपठनाचे नित्यकर्म करीत राहतो. त्याच्या वागण्याने घरातली माणसे हळूहळू बदलतात आणि निपुत्रिक असलेल्या सूनबाईला तर वात्सल्याचा पान्हा फुटतो. चांगल्या संस्कारात वाढलेला; पण संकटानी ग्रासलेला माणूस ही वेळ आली की कसा वागतो आणि इतरांचे धन्यवाद मिळवितो. याचे मोठे रसरशीत चित्र देसाई यांनी आपल्या शब्दसामर्थ्याने वाचकांपुढे उभे केले आहे. ‘सूरसिंगार’ ही कथा आहे. सूरसिंगार नावाच्या जहागिरीची आणि तिच्या गादीवर आलेल्या परस्पर विरोधी राजाची. योगराज गादीवर होते. तेव्हा लोक त्यांना मानीत; पण भोगराज हे योगराजांच्या मृत्यूनंतर जहागिरीच्या गादीवर आले आणि सारा मनु पालटला. भोगराजांनी आपल्या कृतीने आपले नाव सार्थ केले. भोग-उपभोगांना सीमा राहिल्या नाहीत. योगराज प्रजेचे दैवत होते, तर भोगराजांचे नाव ऐकताच प्रजेचा भीतीने थरकाप होऊ लागे. अशी ही चित्त थरारून सोडणारी कथा! करुण कहाणी ‘मोकळे आकाश’ ही आजच्या समाजजीवनाचीच एक करुण कहाणी. सारे ऐषआराम मिळूनही बॅरिस्टर असलेल्या अभिजित देशापांडेचे सारे जीवनच कसे उद्ध्वस्त झाले हे लेखकाने अशा काही कौशल्याने सांगितले आहे की, मनाला गहिवर यावा! गोव्यातल्या मंगेशीजवळ लीलावती या भाविणीसाठी अभिजितच्या वडिलांनी एक बंगला बांधला. अभिजित वडिलांच्या बरोबर तेथे जाऊ लागला. आईविना पोरका झालेल्या अभिजितला लीलाईचा लळा लागला आणि मग वडील गेले तरी तो मंगेशीला येतच राहिला. लीलाईची मुलगी अबोली आणि तो ‘यांच्यामध्ये भावा-बहिणीचे नाते निर्माण झाले. आपणावर कोणी तरी प्रेम करावे, जपावे अशी एक भूक त्याच्या मनात होती. तीही पूर्ण होत होती. त्यातच वैजयंतीसारखी पत्नी त्याला लाभली होती; पण मग हळूहळू सारे पालटले. वैजयंती त्याला सोडून गेली. रशीद नावाच्या मुसलमानाबरोबर अबोलीचे लग्न झाले आणि ती दुबईला निघून गेली. काही काळानंतर ती परत आली; पण तिच्या घरी त्याला जाता येईना. घरात कोणी नसताना परक्या पुरुषाबरोबर बोलत बसण्याचा त्यांच्या घरात रिवाज नव्हता. त्यातच लीलाईचा मृत्यू झाला. स्नेहाने, प्रेमाने आपुलकीने आणि सौहार्दाने काठोकाठ भरलेले त्याच्या मनाचे आकाश मोकळे झाले आणि ज्या गोव्यावर त्याने मनोमन प्रेम केले होते त्या गोव्याचा कायमचा संबंध सुटला होता! आणि संग्रहातली ‘शेवटचा शिवाजी’ ही अखेरची कथा जुन्या काळातल्या संस्थानातील घराण्यात सत्तेसाठी जी कारस्थाने होत त्यांची कहाणी सांगते. वैफल्याची किनार ‘मेख मोगरी’ कथासंग्रहातील कथांचे स्वरूप हे असे आहे. या सर्वच कथांना कारुण्याची, उदासीनतेची आणि क्वचित वैफल्याची जी एक किनार आहे त्यामुळे या कथा वाचताना वाचक अनेकदा अंतर्मुख होतो, त्याचे मन गलबलून जाते आणि ‘असे का?’ या विचाराचे प्रश्नचिन्ह त्याच्या मनात उभे राहून तो अस्वस्थ होतो. कथांच्या यशस्वीतेचाच हा साक्षात पुरावा आहे. या सर्वच कथा रंजक आणि रोचक आहेत आणि व्यक्तींची मोजक्या शब्दात शब्दचित्रे रेखाटणे यात तर कथाकाराचा हातखंडा आहे; पण कथेचा आघात वाचकांच्या मनावर होण्यासाठी साऱ्या निवेदनाला जो टोकदारपणा यावा लागतो. तो निवेदनाच्या पसरटपणामुळे येत नाही आणि या कथांचे उणेपण जाणवल्यावाचून राहत नाही. या साऱ्या कथा घटनाप्रधान आहेत त्यामुळे कथेतील घटना निवेदनाच्या सूत्रांत गुंफण्यात लेखक किती कौशल्य दाखवितो यावरच कथेची परिणामकारकता अवलंबून असते. घटनांना अर्थ वाचकांच्या मनात उलगडत जाऊन त्याचे मन आनंदित या व्यथिंत होण्यातच कथेचे सारे यश सामाविलेले असते याचे विस्मरण रणजित देसार्इंसारख्या समर्थ कथा-लेखकालाही व्हावे याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहवत नाही. तरीही चांगली कथा वाचली की वाचकांच्या मनाला जी एक तृप्तता येते तिचा अनुभव या कथा वाचूनही वाचकाला येतो हे मान्य करावेच लागेल. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 29-1990

    सामान्य वाचकाला रिझवणाऱ्या कथा... ‘स्वामी’कार रणजित देसार्इंच्या पाच कथांचा संग्रह ‘मेखमोगरी’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. रणजित देसार्इंनी मराठी कादंबरीला ‘स्वामी’मुळे नवी शैली दिली. नवे परिमाण दिले. स्वामीच्या आवृत्त्या पुन्हापुन्हा प्रसिद्ध होत आेत. केवळ ऐतिहासिक कादंबरी म्हणूनच याकडे न बघता एकूण मराठी कादंबरीचा ढाचा देसार्इंनी पार बदलला. त्यातून परिणामकारक निवेदनपद्धती दिसली. कथानक रचनेचे चातुर्य प्रकटले. संवादांची मार्मिकता जाणवली. हे सारे नव्याने प्रत्ययास आले. म्हणून स्वामींचे नाविन्य आजही कायम आहे यात वादच नाही. हे सारे येथे थोडक्यात अशासाठी सांगितले की, ‘मेखमोगरी’ हा कथासंग्रह वाचताना स्वामीच्या विनेदनशैलीची दाट छाया या साऱ्याच कथांवर आहे; किंबहुंना अद्यापही देसाई स्वामीच्या शैलीच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत, असे जाणवते. यातल्या प्रत्येक कथेचा आरंभ स्वामीच्या प्रकरणांचा तुकडाच वाटतो. यातल्या प्रत्येक कथेला आरंभ करतानाचा ऐसपैसपणा लेखक स्वीकारतो. पण खेचक प्रसंग फार पुढे येतो, बाकी दिवाणखान्याची, महालाची, किल्ल्यांची, परिसरांची वर्णने वाचताना स्वामीमधली वर्णने आपण वाचीत आहोत, अशी टोचणी सरखी लागून राहते. ढोबळपणा या कथासंग्रहात तीन कथा ऐतिहासिक आहेत, तर दोन कथा सामाजिक आहेत. या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली मेखमोगरी ही दीर्घ कथा आहे. माणिकराव निंबाळकर व तुकोजीराव जाधव यांच्यातल्या मैत्रीची ही कथा आहे. सरदार माणिकराव निंबाळकरांच्या वाड्यातल्या प्रवेशद्वाराच्या उंच कमानीवर एक मोत्याची भरगच्च मोगरी टांगली होती. त्याच्याजवळ रौप्य मेखला होती. तुकोजीरावांचे चिरंजीव अहिराव यांनी ती बघितली. ती निंबाळकरांची वंशपरंपरेची मिजास आहे हे कळताच अहिराव जाधवांचे रक्त तापले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो वाडा लुटेल त्याला ती मेखमोगरी मिळेल असे निंबाळकर सांगतात. अहिराव हे आव्हान स्वीकारतात. माणिकरावांची सुस्वरूप कन्या सखुबार्इंना ते लागते. अहिराव पराक्रमाने दिवसभरात वाडा लुटतात. त्यांची थोप तरवार व ताम्रपटही लुटतात. ठरल्याप्रमाणे मेखमोगरी उतरवतात. पण अहिराव ती उतरू देत नाहीत. दोघे व्याही होतात. मैत्रीचे रुपांतर नात्यात होते. सखुबार्इंचे स्वप्न साकारते. या कथानकात सुक्ष्म छटा आहेत. त्या अधिक यायला हव्या होत्या. त्यामुळे कथानक ढोबळपणाने वाचकाच्या समोर आले, तसे आले नसते. शेवटही गुंडाळल्यासारखा वाटला नसता. सूरसिंगार या कथेत मेवाड आणि उदेपूर यांच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्या जाहिरातीच्या पडत्या काळातली घटना आहे. या जहागिरीस सूरसिंगार म्हणत. राजा भीमदेवाचा तो मुलुख होता. यात राखी नाम गढी होती. याचे मालक चंद्रराज होते. हे योजराजांचे दिवाण होते. योगराजांच्या मृत्यूनंतर भोगराज आले नि जहागिरीला ग्रहण लागले. यातून चंद्रराज व भोगराज एकमेकांचे वैरी झाले. याचे चित्रण या कथेत आहे. तर ‘शेवटचा शिवाजी’ या कथेत हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती यांच्या वंशांतले इंग्रजांची लाचारी पत्करणारे अखेरचे शिवाजी यांचे चित्रण आले आहे. यातील महाराजांच्या अस्वस्थ माचे चित्रण प्रत्ययकारी झाले आहे. घराण्यातल्या गादीच्या संघर्षातली कुजलेली मने यात दिसतात. या तीनही ऐतिहासिक कथांत ही कथा त्यातल्या त्यात प्रभावी वाटते. बाळबोध कथा संस्कार व मोकळं आकाश या दोन सामाजिक बाळबोध कथा आहेत. कथा अतिशय सरळ नि नेहमीच्याच प्रश्नांच्या वा त्याच त्याच कथानकातल्या आहेत. केशवशास्त्र्यांचा मुलगा नारायण विश्वंभर अण्णांच्या घरात गरिबीमुळे माधुकरी मागतो. तो कुणाचे काहीही चोरत नाही. शेवटी अण्णांच्या एकादशीच्या कीर्तनात खंड पडू नये, म्हणून तो कीर्तनही करतो. आपल्या संस्काराच्या प्रभावाने तो सर्वांना आपलासा करतो. शेवटी तो अण्णांचे पूर्ण घर सांभाळतो. मोकळ्या आकाशामध्ये अभिजित गोव्यातल्या लीला भाविणीला आई मानतो. तिची कन्या अबोली हिला बहीण मानतो. आईसाठी कष्टही करतो. त्याची पत्नी त्याचा संशय घेते. शेवटी तीही निघून जाते. अभिजित गोव्याला आईकडे येतो. तीही देवाघरी विसावते. अबोली मुसलमानाशी विवाहबद्ध होते. पुन्हा अभिजित एकटा उरतो. या कथेत अभिजितच्या मनाचे चित्रण बऱ्यापैकी केलेले आहे. अशा या एकूण कथा सामान्य वाचकाला रिझविणाऱ्या, सुजाण वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण करणाऱ्या यातल्या स्वभावनाच्या अंतर्मनांचा ठाव अधिक खोलात जाऊन बारकाईने घेता आला असता तर या कथांना वेगळे मूल्य प्राप्त झाले असते. मुळात मेख इथेच आहे. मात्र काही कथांतले संवाद चित्रदर्शी आहेत. म्हणून कथासंग्रह वाचावयास वाटतो. -यशवंत पाठक ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    या कथासंग्रहात तीन कथा ऐतिहासिक आहेत, तर दोन कथा सामाजिक आहेत. या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली मेखमोगरी ही दीर्घ कथा आहे. माणिकराव निंबाळकर व तुकोजीराव जाधव यांच्यातल्या मैत्रीची ही कथा आहे. सरदार माणिकराव निंबाळकरांच्या वाड्यातल्या प्रवेशद्वाराच्या उं कमानीवर एक मोत्याची भरगच्च मोगरी टांगली होती. त्याच्याजवळ रौप्य मेखला होती. तुकोजीरावांचे चिरंजीव अहिराव यांनी ती बघितली. ती निंबाळकरांची वंशपरंपरेची मिजास आहे हे कळताच अहिराव जाधवांचे रक्त तापले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो वाडा लुटेल त्याला ती मेखमोगरी मिळेल असे निंबाळकर सांगतात. अहिराव हे आव्हान स्वीकारतात. माणिकरावांची सुस्वरुप कन्या सखुबार्इंना ते लागते. अहिराव पराक्रमाने दिवसभरात वाडा लुटतात. ठरल्याप्रमाणे मेखमोगरी उतरवतात. पण अहिराव ती उतरू देत नाहीत. दोघे व्याही होतात. मैत्रीचे रूपांतर नात्यात होते. सखुबार्इंचे स्वप्न साकारते. या कथानकात सुक्ष्म छटा आहेत. त्या अधिक यायला हव्या होत्या. त्यामुळे कथानक ढोबळपणाने वाचकाच्या समोर आले, तसे आले नसते. शेवटही गुंडाळल्यासारखा वाटला नसता. सूरसिंगार या कथेत मेवाड आणि उदेपूर यांच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्या जहागिरीच्या पडत्या काळातली घटना आहे. या जहागिरीस सूरसिंगार म्हणत. राजा भीमदेवाचा तो मुलूख होता. यात राखी नामक गढी होती. याचे मालक चंद्रराज होते. हे योगराजांचे दिवाण होते. योगराजांच्या मृत्यूनंतर भोगराज आले नि जहागिरीला ग्रहण लागले. यातून चंद्रराज व भोगराज एकमेकांचे वैरी झाले. याचे चित्रण या कथेत आहे. तर ‘शेवटचा शिवाजी’ या कथेत हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती यांच्या वंशातला इंग्रजांची लाचारी पत्करणारे अखेरचे शिवाजी यांचे चित्रण आले आहे. यातील महाराजांच्या अस्वस्थ मनाचे चित्रण प्रत्ययकारी झाले आहे. घराण्यातल्या गादीच्या संघर्षातली कुजलेली मने यात दिसतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more