* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MEKH MOGARI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667417
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1990
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
RANJIT DESAI`S SHORT STORIES ARE DIFFERENT THAN OTHER SHORT STORIES. THEY ALWAYS TAKE PLACE IN WONDROUS SITUATIONS, ALMOST HAVE AN ENVIRONMENT AS IF IN A FAIRY TALE. THEY ARE NOT RESTRAINED TO MAHARASHTRA. THEY HAVE A VAST BACKGROUND, THAT OF WHOLE INDIA. THIS AUTHOR LITERALLY LIVES THE LINE, "INDIA IS MY COUNTRY`. THE STORIES ARE MORE HISTORICAL THAN REALISTIC. MUSIC AND ROMANCE ARE THE INEVITABLE FACTORS OF THE STORIES. THE CHARACTERS ARE ROMANTIC AND LOVE TO BE IN THEIR OWN WORLD, ALWAYS LOST IN THE DREAMY ENVIRONMENT. FOR THEM, NOTHING VALUES MORE THAN LOVE AND ART, NOT EVEN THEIR LIFE. THE FEMALE CHARACTERS WHICH MEET US THROUGH HIS STORIES ARE ALWAYS BEAUTIFUL, PETITE, FRAGILE, WILLING TO SACRIFICE FOR LOVE WITHOUT ANY HESITATION IN THEIR MINDS. HE HAS ALWAYS PENNED THEM DOWN VERY DELICATELY, WHATEER THEIR OCCUPATION IS, BE IT A SINGER, A DANCER, A PROSTITUTE OR A HOUSEWIFE. HE HAS ALWAYS BEING CONSIDERATE OF THE DELICATE FEMALE MIND. HIS STORIES TAKE US TO PLACES FAR AWAY, MAKE US FORGET THE REAL WORLD. THE BACKGROUND IS EQUALLY COLOURFUL WITH ALL THE DETAILS PENNED DOWN MINUTELY. THIS SHOWS HIS OBSERVATION SKILLS. THOUGH HIS STORIES TEND TO BE MORE ON THE WONDEROUS SIDE, THE CHARACTERS ARE TYPICAL HUMAN BEINGS. HE HAS SKETCHED THEM VERY REALISTICALLY SO MUCH THAT WE AUTOMATICALLY AND UNKNOWINGLY GET INVOLVED, LAUGHING WITH THEIR HAPPINESS AND CRYING WITH THEIR SORROWS.PRALHAD KESHAV ATRE
‘रणजित देसाई यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातावरणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या; सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे. वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादिष्ट पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत. रणजित देसार्इंच्या कथांत वावरणाया स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे. रणजित देसार्इंच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पाश्र्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतही स्वप्नमयता वाढावी, अशा तहेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणाया व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणाया अन् आपल्या दु:खात पिचणाया त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...’ – प्रल्हाद केशव अत्रे
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    रंजक, रोचक पण पसरट कथा... ‘मेख मोगरी’ हा श्री. रणजित देसाई यांच्या पाच कथांचा वाटल्यास त्यांना दीर्घकथा म्हणा– संग्रह आहे, या पाचही कथा आकर्षक तर आहेतच; पण प्रत्येक कथेची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. कोठे इतिहासकाराची आठवण व्हावी अशी कोठे दोन पिढ्यांच्ा मागचे समाजजीवन डोळ्यापुढे उभे राहावे अशी, कोठे त्याग आणि भोग यांच्या शाश्वतद्वंद्वाचे दर्शन घडावे अशी, कोठे आजच्या भकास जीवनाचे दर्शन घडवून चित्त थरारून सोडणारी भीषण दाहकता मन कुरतडीत राहील अशी, तर कोठे भारतातील पूर्वकालीन संस्थानातील राजघराण्यात स्वार्थासाठी कोणते कुटिल डाव खेळले जात याचे मोठे प्रयत्ययकारी दर्शन घडवील अशी पार्श्वभूमी आहे. माणसांच्या जीवनातले वेधक क्षण देसाई मोठ्या कौशल्याने टिपतात आणि आपल्या अनलंकृत, काळजाला भिडणाऱ्या भाषेच्या द्वारे कधी आनंदभरी तर कधी दर्दभरी कथा जन्माला येते. प्रणयरम्य कथा त्या संग्रहातली ‘मेख मोगरी’ ही पहिलीच कथा या दृष्टीने मोठी लक्षणीय आहे. माणिकराव निंबाळकर या खानदानी सरदारांच्याकडे तुकोजीराव जाधव या नावाचे दुसरे सरदार पाहुणे म्हणून येतात. मोठ्या अगत्याने आणि आदराने त्यांचे आगत-स्वागत होते. माणिकरावांच्या तरुण कन्येने सखूबाईने जातीने लक्ष घालून स्वागताची सारी तयारी केलेली, खाण्यापिण्याचीच नव्हे तर शिकारीचीही, पण बरोबर आलेल्या तुकाजीरावांच्या मुलाचे म्हणजे अहिररावांचे आणि सखूबार्इंचे परस्परांकडे लक्ष वेधते आणि प्रणयाचे रेशमी धागे गुंफले जातात. ही आहे प्रणयाच्या नाजुक. रेशमी धाग्यांनी विणलेली कथा! या कथेत प्रणयाचे भडक रंग नाहीत की, प्रेमाच्या भाषेची आतषबाजी नाही. सारेच वातावरण कसे सौम्य, मनाला रिझविणारे, गुदगुल्या करणारे आहे. त्यामुहे ही कथा मनाची पकड कधी घेते हे लक्षातच येत नाही. मुलखावेगळी कथा ‘संस्कार’ ही एका सतरा-अठरा वर्षांच्या कोवळ्या वयाच्या मुलाची मोठी मुलखावेगळी कथा आहे. केशव कुलकर्णी शास्त्री या एकेकाळच्या नामवंत कीर्तनकाराचा नारायण हा पोरका मुलगा. ना आई, ना बाप, ना घर, ना दार! भिक्षेची झोळी घेऊन पोट भरण्यासाठी बाहेर पडलेला हा मुलगा योगायोगाने विश्वंभटशास्त्रांच्या घरी येतो. त्याने नाव सांगताच ओळख पटते. ‘‘मोठा पाहुणा आला आहे, त्याच्या भोजनाची व्यवस्था करा,’’ असे ते पत्नीला आणि सुनेला सांगतात तशी सुनबाई ‘‘घराची एकदा धर्मशाळा केली की सुटले!’’ अशी सासऱ्याची केली की सुटले!’’ अशी सासऱ्याची संभावना करते; पण तो राहतो, जेवतो पण घरातली एखादी वस्तू दिसेनाशी झाली की सूनबाई त्याचा संशय घेते. तो वेदपठनाचे नित्यकर्म करीत राहतो. त्याच्या वागण्याने घरातली माणसे हळूहळू बदलतात आणि निपुत्रिक असलेल्या सूनबाईला तर वात्सल्याचा पान्हा फुटतो. चांगल्या संस्कारात वाढलेला; पण संकटानी ग्रासलेला माणूस ही वेळ आली की कसा वागतो आणि इतरांचे धन्यवाद मिळवितो. याचे मोठे रसरशीत चित्र देसाई यांनी आपल्या शब्दसामर्थ्याने वाचकांपुढे उभे केले आहे. ‘सूरसिंगार’ ही कथा आहे. सूरसिंगार नावाच्या जहागिरीची आणि तिच्या गादीवर आलेल्या परस्पर विरोधी राजाची. योगराज गादीवर होते. तेव्हा लोक त्यांना मानीत; पण भोगराज हे योगराजांच्या मृत्यूनंतर जहागिरीच्या गादीवर आले आणि सारा मनु पालटला. भोगराजांनी आपल्या कृतीने आपले नाव सार्थ केले. भोग-उपभोगांना सीमा राहिल्या नाहीत. योगराज प्रजेचे दैवत होते, तर भोगराजांचे नाव ऐकताच प्रजेचा भीतीने थरकाप होऊ लागे. अशी ही चित्त थरारून सोडणारी कथा! करुण कहाणी ‘मोकळे आकाश’ ही आजच्या समाजजीवनाचीच एक करुण कहाणी. सारे ऐषआराम मिळूनही बॅरिस्टर असलेल्या अभिजित देशापांडेचे सारे जीवनच कसे उद्ध्वस्त झाले हे लेखकाने अशा काही कौशल्याने सांगितले आहे की, मनाला गहिवर यावा! गोव्यातल्या मंगेशीजवळ लीलावती या भाविणीसाठी अभिजितच्या वडिलांनी एक बंगला बांधला. अभिजित वडिलांच्या बरोबर तेथे जाऊ लागला. आईविना पोरका झालेल्या अभिजितला लीलाईचा लळा लागला आणि मग वडील गेले तरी तो मंगेशीला येतच राहिला. लीलाईची मुलगी अबोली आणि तो ‘यांच्यामध्ये भावा-बहिणीचे नाते निर्माण झाले. आपणावर कोणी तरी प्रेम करावे, जपावे अशी एक भूक त्याच्या मनात होती. तीही पूर्ण होत होती. त्यातच वैजयंतीसारखी पत्नी त्याला लाभली होती; पण मग हळूहळू सारे पालटले. वैजयंती त्याला सोडून गेली. रशीद नावाच्या मुसलमानाबरोबर अबोलीचे लग्न झाले आणि ती दुबईला निघून गेली. काही काळानंतर ती परत आली; पण तिच्या घरी त्याला जाता येईना. घरात कोणी नसताना परक्या पुरुषाबरोबर बोलत बसण्याचा त्यांच्या घरात रिवाज नव्हता. त्यातच लीलाईचा मृत्यू झाला. स्नेहाने, प्रेमाने आपुलकीने आणि सौहार्दाने काठोकाठ भरलेले त्याच्या मनाचे आकाश मोकळे झाले आणि ज्या गोव्यावर त्याने मनोमन प्रेम केले होते त्या गोव्याचा कायमचा संबंध सुटला होता! आणि संग्रहातली ‘शेवटचा शिवाजी’ ही अखेरची कथा जुन्या काळातल्या संस्थानातील घराण्यात सत्तेसाठी जी कारस्थाने होत त्यांची कहाणी सांगते. वैफल्याची किनार ‘मेख मोगरी’ कथासंग्रहातील कथांचे स्वरूप हे असे आहे. या सर्वच कथांना कारुण्याची, उदासीनतेची आणि क्वचित वैफल्याची जी एक किनार आहे त्यामुळे या कथा वाचताना वाचक अनेकदा अंतर्मुख होतो, त्याचे मन गलबलून जाते आणि ‘असे का?’ या विचाराचे प्रश्नचिन्ह त्याच्या मनात उभे राहून तो अस्वस्थ होतो. कथांच्या यशस्वीतेचाच हा साक्षात पुरावा आहे. या सर्वच कथा रंजक आणि रोचक आहेत आणि व्यक्तींची मोजक्या शब्दात शब्दचित्रे रेखाटणे यात तर कथाकाराचा हातखंडा आहे; पण कथेचा आघात वाचकांच्या मनावर होण्यासाठी साऱ्या निवेदनाला जो टोकदारपणा यावा लागतो. तो निवेदनाच्या पसरटपणामुळे येत नाही आणि या कथांचे उणेपण जाणवल्यावाचून राहत नाही. या साऱ्या कथा घटनाप्रधान आहेत त्यामुळे कथेतील घटना निवेदनाच्या सूत्रांत गुंफण्यात लेखक किती कौशल्य दाखवितो यावरच कथेची परिणामकारकता अवलंबून असते. घटनांना अर्थ वाचकांच्या मनात उलगडत जाऊन त्याचे मन आनंदित या व्यथिंत होण्यातच कथेचे सारे यश सामाविलेले असते याचे विस्मरण रणजित देसार्इंसारख्या समर्थ कथा-लेखकालाही व्हावे याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहवत नाही. तरीही चांगली कथा वाचली की वाचकांच्या मनाला जी एक तृप्तता येते तिचा अनुभव या कथा वाचूनही वाचकाला येतो हे मान्य करावेच लागेल. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 29-1990

    सामान्य वाचकाला रिझवणाऱ्या कथा... ‘स्वामी’कार रणजित देसार्इंच्या पाच कथांचा संग्रह ‘मेखमोगरी’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. रणजित देसार्इंनी मराठी कादंबरीला ‘स्वामी’मुळे नवी शैली दिली. नवे परिमाण दिले. स्वामीच्या आवृत्त्या पुन्हापुन्हा प्रसिद्ध होत आेत. केवळ ऐतिहासिक कादंबरी म्हणूनच याकडे न बघता एकूण मराठी कादंबरीचा ढाचा देसार्इंनी पार बदलला. त्यातून परिणामकारक निवेदनपद्धती दिसली. कथानक रचनेचे चातुर्य प्रकटले. संवादांची मार्मिकता जाणवली. हे सारे नव्याने प्रत्ययास आले. म्हणून स्वामींचे नाविन्य आजही कायम आहे यात वादच नाही. हे सारे येथे थोडक्यात अशासाठी सांगितले की, ‘मेखमोगरी’ हा कथासंग्रह वाचताना स्वामीच्या विनेदनशैलीची दाट छाया या साऱ्याच कथांवर आहे; किंबहुंना अद्यापही देसाई स्वामीच्या शैलीच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत, असे जाणवते. यातल्या प्रत्येक कथेचा आरंभ स्वामीच्या प्रकरणांचा तुकडाच वाटतो. यातल्या प्रत्येक कथेला आरंभ करतानाचा ऐसपैसपणा लेखक स्वीकारतो. पण खेचक प्रसंग फार पुढे येतो, बाकी दिवाणखान्याची, महालाची, किल्ल्यांची, परिसरांची वर्णने वाचताना स्वामीमधली वर्णने आपण वाचीत आहोत, अशी टोचणी सरखी लागून राहते. ढोबळपणा या कथासंग्रहात तीन कथा ऐतिहासिक आहेत, तर दोन कथा सामाजिक आहेत. या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली मेखमोगरी ही दीर्घ कथा आहे. माणिकराव निंबाळकर व तुकोजीराव जाधव यांच्यातल्या मैत्रीची ही कथा आहे. सरदार माणिकराव निंबाळकरांच्या वाड्यातल्या प्रवेशद्वाराच्या उंच कमानीवर एक मोत्याची भरगच्च मोगरी टांगली होती. त्याच्याजवळ रौप्य मेखला होती. तुकोजीरावांचे चिरंजीव अहिराव यांनी ती बघितली. ती निंबाळकरांची वंशपरंपरेची मिजास आहे हे कळताच अहिराव जाधवांचे रक्त तापले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो वाडा लुटेल त्याला ती मेखमोगरी मिळेल असे निंबाळकर सांगतात. अहिराव हे आव्हान स्वीकारतात. माणिकरावांची सुस्वरूप कन्या सखुबार्इंना ते लागते. अहिराव पराक्रमाने दिवसभरात वाडा लुटतात. त्यांची थोप तरवार व ताम्रपटही लुटतात. ठरल्याप्रमाणे मेखमोगरी उतरवतात. पण अहिराव ती उतरू देत नाहीत. दोघे व्याही होतात. मैत्रीचे रुपांतर नात्यात होते. सखुबार्इंचे स्वप्न साकारते. या कथानकात सुक्ष्म छटा आहेत. त्या अधिक यायला हव्या होत्या. त्यामुळे कथानक ढोबळपणाने वाचकाच्या समोर आले, तसे आले नसते. शेवटही गुंडाळल्यासारखा वाटला नसता. सूरसिंगार या कथेत मेवाड आणि उदेपूर यांच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्या जाहिरातीच्या पडत्या काळातली घटना आहे. या जहागिरीस सूरसिंगार म्हणत. राजा भीमदेवाचा तो मुलुख होता. यात राखी नाम गढी होती. याचे मालक चंद्रराज होते. हे योजराजांचे दिवाण होते. योगराजांच्या मृत्यूनंतर भोगराज आले नि जहागिरीला ग्रहण लागले. यातून चंद्रराज व भोगराज एकमेकांचे वैरी झाले. याचे चित्रण या कथेत आहे. तर ‘शेवटचा शिवाजी’ या कथेत हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती यांच्या वंशांतले इंग्रजांची लाचारी पत्करणारे अखेरचे शिवाजी यांचे चित्रण आले आहे. यातील महाराजांच्या अस्वस्थ माचे चित्रण प्रत्ययकारी झाले आहे. घराण्यातल्या गादीच्या संघर्षातली कुजलेली मने यात दिसतात. या तीनही ऐतिहासिक कथांत ही कथा त्यातल्या त्यात प्रभावी वाटते. बाळबोध कथा संस्कार व मोकळं आकाश या दोन सामाजिक बाळबोध कथा आहेत. कथा अतिशय सरळ नि नेहमीच्याच प्रश्नांच्या वा त्याच त्याच कथानकातल्या आहेत. केशवशास्त्र्यांचा मुलगा नारायण विश्वंभर अण्णांच्या घरात गरिबीमुळे माधुकरी मागतो. तो कुणाचे काहीही चोरत नाही. शेवटी अण्णांच्या एकादशीच्या कीर्तनात खंड पडू नये, म्हणून तो कीर्तनही करतो. आपल्या संस्काराच्या प्रभावाने तो सर्वांना आपलासा करतो. शेवटी तो अण्णांचे पूर्ण घर सांभाळतो. मोकळ्या आकाशामध्ये अभिजित गोव्यातल्या लीला भाविणीला आई मानतो. तिची कन्या अबोली हिला बहीण मानतो. आईसाठी कष्टही करतो. त्याची पत्नी त्याचा संशय घेते. शेवटी तीही निघून जाते. अभिजित गोव्याला आईकडे येतो. तीही देवाघरी विसावते. अबोली मुसलमानाशी विवाहबद्ध होते. पुन्हा अभिजित एकटा उरतो. या कथेत अभिजितच्या मनाचे चित्रण बऱ्यापैकी केलेले आहे. अशा या एकूण कथा सामान्य वाचकाला रिझविणाऱ्या, सुजाण वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण करणाऱ्या यातल्या स्वभावनाच्या अंतर्मनांचा ठाव अधिक खोलात जाऊन बारकाईने घेता आला असता तर या कथांना वेगळे मूल्य प्राप्त झाले असते. मुळात मेख इथेच आहे. मात्र काही कथांतले संवाद चित्रदर्शी आहेत. म्हणून कथासंग्रह वाचावयास वाटतो. -यशवंत पाठक ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    या कथासंग्रहात तीन कथा ऐतिहासिक आहेत, तर दोन कथा सामाजिक आहेत. या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली मेखमोगरी ही दीर्घ कथा आहे. माणिकराव निंबाळकर व तुकोजीराव जाधव यांच्यातल्या मैत्रीची ही कथा आहे. सरदार माणिकराव निंबाळकरांच्या वाड्यातल्या प्रवेशद्वाराच्या उं कमानीवर एक मोत्याची भरगच्च मोगरी टांगली होती. त्याच्याजवळ रौप्य मेखला होती. तुकोजीरावांचे चिरंजीव अहिराव यांनी ती बघितली. ती निंबाळकरांची वंशपरंपरेची मिजास आहे हे कळताच अहिराव जाधवांचे रक्त तापले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो वाडा लुटेल त्याला ती मेखमोगरी मिळेल असे निंबाळकर सांगतात. अहिराव हे आव्हान स्वीकारतात. माणिकरावांची सुस्वरुप कन्या सखुबार्इंना ते लागते. अहिराव पराक्रमाने दिवसभरात वाडा लुटतात. ठरल्याप्रमाणे मेखमोगरी उतरवतात. पण अहिराव ती उतरू देत नाहीत. दोघे व्याही होतात. मैत्रीचे रूपांतर नात्यात होते. सखुबार्इंचे स्वप्न साकारते. या कथानकात सुक्ष्म छटा आहेत. त्या अधिक यायला हव्या होत्या. त्यामुळे कथानक ढोबळपणाने वाचकाच्या समोर आले, तसे आले नसते. शेवटही गुंडाळल्यासारखा वाटला नसता. सूरसिंगार या कथेत मेवाड आणि उदेपूर यांच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्या जहागिरीच्या पडत्या काळातली घटना आहे. या जहागिरीस सूरसिंगार म्हणत. राजा भीमदेवाचा तो मुलूख होता. यात राखी नामक गढी होती. याचे मालक चंद्रराज होते. हे योगराजांचे दिवाण होते. योगराजांच्या मृत्यूनंतर भोगराज आले नि जहागिरीला ग्रहण लागले. यातून चंद्रराज व भोगराज एकमेकांचे वैरी झाले. याचे चित्रण या कथेत आहे. तर ‘शेवटचा शिवाजी’ या कथेत हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती यांच्या वंशातला इंग्रजांची लाचारी पत्करणारे अखेरचे शिवाजी यांचे चित्रण आले आहे. यातील महाराजांच्या अस्वस्थ मनाचे चित्रण प्रत्ययकारी झाले आहे. घराण्यातल्या गादीच्या संघर्षातली कुजलेली मने यात दिसतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more