* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667417
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1990
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
RANJIT DESAI`S SHORT STORIES ARE DIFFERENT THAN OTHER SHORT STORIES. THEY ALWAYS TAKE PLACE IN WONDROUS SITUATIONS, ALMOST HAVE AN ENVIRONMENT AS IF IN A FAIRY TALE. THEY ARE NOT RESTRAINED TO MAHARASHTRA. THEY HAVE A VAST BACKGROUND, THAT OF WHOLE INDIA. THIS AUTHOR LITERALLY LIVES THE LINE, "INDIA IS MY COUNTRY`. THE STORIES ARE MORE HISTORICAL THAN REALISTIC. MUSIC AND ROMANCE ARE THE INEVITABLE FACTORS OF THE STORIES. THE CHARACTERS ARE ROMANTIC AND LOVE TO BE IN THEIR OWN WORLD, ALWAYS LOST IN THE DREAMY ENVIRONMENT. FOR THEM, NOTHING VALUES MORE THAN LOVE AND ART, NOT EVEN THEIR LIFE. THE FEMALE CHARACTERS WHICH MEET US THROUGH HIS STORIES ARE ALWAYS BEAUTIFUL, PETITE, FRAGILE, WILLING TO SACRIFICE FOR LOVE WITHOUT ANY HESITATION IN THEIR MINDS. HE HAS ALWAYS PENNED THEM DOWN VERY DELICATELY, WHATEER THEIR OCCUPATION IS, BE IT A SINGER, A DANCER, A PROSTITUTE OR A HOUSEWIFE. HE HAS ALWAYS BEING CONSIDERATE OF THE DELICATE FEMALE MIND. HIS STORIES TAKE US TO PLACES FAR AWAY, MAKE US FORGET THE REAL WORLD. THE BACKGROUND IS EQUALLY COLOURFUL WITH ALL THE DETAILS PENNED DOWN MINUTELY. THIS SHOWS HIS OBSERVATION SKILLS. THOUGH HIS STORIES TEND TO BE MORE ON THE WONDEROUS SIDE, THE CHARACTERS ARE TYPICAL HUMAN BEINGS. HE HAS SKETCHED THEM VERY REALISTICALLY SO MUCH THAT WE AUTOMATICALLY AND UNKNOWINGLY GET INVOLVED, LAUGHING WITH THEIR HAPPINESS AND CRYING WITH THEIR SORROWS.PRALHAD KESHAV ATRE
‘रणजित देसाई यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातावरणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या; सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे. वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादिष्ट पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत. रणजित देसार्इंच्या कथांत वावरणाया स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे. रणजित देसार्इंच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पाश्र्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतही स्वप्नमयता वाढावी, अशा तहेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणाया व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणाया अन् आपल्या दु:खात पिचणाया त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...’ – प्रल्हाद केशव अत्रे
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    रंजक, रोचक पण पसरट कथा... ‘मेख मोगरी’ हा श्री. रणजित देसाई यांच्या पाच कथांचा वाटल्यास त्यांना दीर्घकथा म्हणा– संग्रह आहे, या पाचही कथा आकर्षक तर आहेतच; पण प्रत्येक कथेची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. कोठे इतिहासकाराची आठवण व्हावी अशी कोठे दोन पिढ्यांच्ा मागचे समाजजीवन डोळ्यापुढे उभे राहावे अशी, कोठे त्याग आणि भोग यांच्या शाश्वतद्वंद्वाचे दर्शन घडावे अशी, कोठे आजच्या भकास जीवनाचे दर्शन घडवून चित्त थरारून सोडणारी भीषण दाहकता मन कुरतडीत राहील अशी, तर कोठे भारतातील पूर्वकालीन संस्थानातील राजघराण्यात स्वार्थासाठी कोणते कुटिल डाव खेळले जात याचे मोठे प्रयत्ययकारी दर्शन घडवील अशी पार्श्वभूमी आहे. माणसांच्या जीवनातले वेधक क्षण देसाई मोठ्या कौशल्याने टिपतात आणि आपल्या अनलंकृत, काळजाला भिडणाऱ्या भाषेच्या द्वारे कधी आनंदभरी तर कधी दर्दभरी कथा जन्माला येते. प्रणयरम्य कथा त्या संग्रहातली ‘मेख मोगरी’ ही पहिलीच कथा या दृष्टीने मोठी लक्षणीय आहे. माणिकराव निंबाळकर या खानदानी सरदारांच्याकडे तुकोजीराव जाधव या नावाचे दुसरे सरदार पाहुणे म्हणून येतात. मोठ्या अगत्याने आणि आदराने त्यांचे आगत-स्वागत होते. माणिकरावांच्या तरुण कन्येने सखूबाईने जातीने लक्ष घालून स्वागताची सारी तयारी केलेली, खाण्यापिण्याचीच नव्हे तर शिकारीचीही, पण बरोबर आलेल्या तुकाजीरावांच्या मुलाचे म्हणजे अहिररावांचे आणि सखूबार्इंचे परस्परांकडे लक्ष वेधते आणि प्रणयाचे रेशमी धागे गुंफले जातात. ही आहे प्रणयाच्या नाजुक. रेशमी धाग्यांनी विणलेली कथा! या कथेत प्रणयाचे भडक रंग नाहीत की, प्रेमाच्या भाषेची आतषबाजी नाही. सारेच वातावरण कसे सौम्य, मनाला रिझविणारे, गुदगुल्या करणारे आहे. त्यामुहे ही कथा मनाची पकड कधी घेते हे लक्षातच येत नाही. मुलखावेगळी कथा ‘संस्कार’ ही एका सतरा-अठरा वर्षांच्या कोवळ्या वयाच्या मुलाची मोठी मुलखावेगळी कथा आहे. केशव कुलकर्णी शास्त्री या एकेकाळच्या नामवंत कीर्तनकाराचा नारायण हा पोरका मुलगा. ना आई, ना बाप, ना घर, ना दार! भिक्षेची झोळी घेऊन पोट भरण्यासाठी बाहेर पडलेला हा मुलगा योगायोगाने विश्वंभटशास्त्रांच्या घरी येतो. त्याने नाव सांगताच ओळख पटते. ‘‘मोठा पाहुणा आला आहे, त्याच्या भोजनाची व्यवस्था करा,’’ असे ते पत्नीला आणि सुनेला सांगतात तशी सुनबाई ‘‘घराची एकदा धर्मशाळा केली की सुटले!’’ अशी सासऱ्याची केली की सुटले!’’ अशी सासऱ्याची संभावना करते; पण तो राहतो, जेवतो पण घरातली एखादी वस्तू दिसेनाशी झाली की सूनबाई त्याचा संशय घेते. तो वेदपठनाचे नित्यकर्म करीत राहतो. त्याच्या वागण्याने घरातली माणसे हळूहळू बदलतात आणि निपुत्रिक असलेल्या सूनबाईला तर वात्सल्याचा पान्हा फुटतो. चांगल्या संस्कारात वाढलेला; पण संकटानी ग्रासलेला माणूस ही वेळ आली की कसा वागतो आणि इतरांचे धन्यवाद मिळवितो. याचे मोठे रसरशीत चित्र देसाई यांनी आपल्या शब्दसामर्थ्याने वाचकांपुढे उभे केले आहे. ‘सूरसिंगार’ ही कथा आहे. सूरसिंगार नावाच्या जहागिरीची आणि तिच्या गादीवर आलेल्या परस्पर विरोधी राजाची. योगराज गादीवर होते. तेव्हा लोक त्यांना मानीत; पण भोगराज हे योगराजांच्या मृत्यूनंतर जहागिरीच्या गादीवर आले आणि सारा मनु पालटला. भोगराजांनी आपल्या कृतीने आपले नाव सार्थ केले. भोग-उपभोगांना सीमा राहिल्या नाहीत. योगराज प्रजेचे दैवत होते, तर भोगराजांचे नाव ऐकताच प्रजेचा भीतीने थरकाप होऊ लागे. अशी ही चित्त थरारून सोडणारी कथा! करुण कहाणी ‘मोकळे आकाश’ ही आजच्या समाजजीवनाचीच एक करुण कहाणी. सारे ऐषआराम मिळूनही बॅरिस्टर असलेल्या अभिजित देशापांडेचे सारे जीवनच कसे उद्ध्वस्त झाले हे लेखकाने अशा काही कौशल्याने सांगितले आहे की, मनाला गहिवर यावा! गोव्यातल्या मंगेशीजवळ लीलावती या भाविणीसाठी अभिजितच्या वडिलांनी एक बंगला बांधला. अभिजित वडिलांच्या बरोबर तेथे जाऊ लागला. आईविना पोरका झालेल्या अभिजितला लीलाईचा लळा लागला आणि मग वडील गेले तरी तो मंगेशीला येतच राहिला. लीलाईची मुलगी अबोली आणि तो ‘यांच्यामध्ये भावा-बहिणीचे नाते निर्माण झाले. आपणावर कोणी तरी प्रेम करावे, जपावे अशी एक भूक त्याच्या मनात होती. तीही पूर्ण होत होती. त्यातच वैजयंतीसारखी पत्नी त्याला लाभली होती; पण मग हळूहळू सारे पालटले. वैजयंती त्याला सोडून गेली. रशीद नावाच्या मुसलमानाबरोबर अबोलीचे लग्न झाले आणि ती दुबईला निघून गेली. काही काळानंतर ती परत आली; पण तिच्या घरी त्याला जाता येईना. घरात कोणी नसताना परक्या पुरुषाबरोबर बोलत बसण्याचा त्यांच्या घरात रिवाज नव्हता. त्यातच लीलाईचा मृत्यू झाला. स्नेहाने, प्रेमाने आपुलकीने आणि सौहार्दाने काठोकाठ भरलेले त्याच्या मनाचे आकाश मोकळे झाले आणि ज्या गोव्यावर त्याने मनोमन प्रेम केले होते त्या गोव्याचा कायमचा संबंध सुटला होता! आणि संग्रहातली ‘शेवटचा शिवाजी’ ही अखेरची कथा जुन्या काळातल्या संस्थानातील घराण्यात सत्तेसाठी जी कारस्थाने होत त्यांची कहाणी सांगते. वैफल्याची किनार ‘मेख मोगरी’ कथासंग्रहातील कथांचे स्वरूप हे असे आहे. या सर्वच कथांना कारुण्याची, उदासीनतेची आणि क्वचित वैफल्याची जी एक किनार आहे त्यामुळे या कथा वाचताना वाचक अनेकदा अंतर्मुख होतो, त्याचे मन गलबलून जाते आणि ‘असे का?’ या विचाराचे प्रश्नचिन्ह त्याच्या मनात उभे राहून तो अस्वस्थ होतो. कथांच्या यशस्वीतेचाच हा साक्षात पुरावा आहे. या सर्वच कथा रंजक आणि रोचक आहेत आणि व्यक्तींची मोजक्या शब्दात शब्दचित्रे रेखाटणे यात तर कथाकाराचा हातखंडा आहे; पण कथेचा आघात वाचकांच्या मनावर होण्यासाठी साऱ्या निवेदनाला जो टोकदारपणा यावा लागतो. तो निवेदनाच्या पसरटपणामुळे येत नाही आणि या कथांचे उणेपण जाणवल्यावाचून राहत नाही. या साऱ्या कथा घटनाप्रधान आहेत त्यामुळे कथेतील घटना निवेदनाच्या सूत्रांत गुंफण्यात लेखक किती कौशल्य दाखवितो यावरच कथेची परिणामकारकता अवलंबून असते. घटनांना अर्थ वाचकांच्या मनात उलगडत जाऊन त्याचे मन आनंदित या व्यथिंत होण्यातच कथेचे सारे यश सामाविलेले असते याचे विस्मरण रणजित देसार्इंसारख्या समर्थ कथा-लेखकालाही व्हावे याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहवत नाही. तरीही चांगली कथा वाचली की वाचकांच्या मनाला जी एक तृप्तता येते तिचा अनुभव या कथा वाचूनही वाचकाला येतो हे मान्य करावेच लागेल. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 29-1990

    सामान्य वाचकाला रिझवणाऱ्या कथा... ‘स्वामी’कार रणजित देसार्इंच्या पाच कथांचा संग्रह ‘मेखमोगरी’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. रणजित देसार्इंनी मराठी कादंबरीला ‘स्वामी’मुळे नवी शैली दिली. नवे परिमाण दिले. स्वामीच्या आवृत्त्या पुन्हापुन्हा प्रसिद्ध होत आेत. केवळ ऐतिहासिक कादंबरी म्हणूनच याकडे न बघता एकूण मराठी कादंबरीचा ढाचा देसार्इंनी पार बदलला. त्यातून परिणामकारक निवेदनपद्धती दिसली. कथानक रचनेचे चातुर्य प्रकटले. संवादांची मार्मिकता जाणवली. हे सारे नव्याने प्रत्ययास आले. म्हणून स्वामींचे नाविन्य आजही कायम आहे यात वादच नाही. हे सारे येथे थोडक्यात अशासाठी सांगितले की, ‘मेखमोगरी’ हा कथासंग्रह वाचताना स्वामीच्या विनेदनशैलीची दाट छाया या साऱ्याच कथांवर आहे; किंबहुंना अद्यापही देसाई स्वामीच्या शैलीच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत, असे जाणवते. यातल्या प्रत्येक कथेचा आरंभ स्वामीच्या प्रकरणांचा तुकडाच वाटतो. यातल्या प्रत्येक कथेला आरंभ करतानाचा ऐसपैसपणा लेखक स्वीकारतो. पण खेचक प्रसंग फार पुढे येतो, बाकी दिवाणखान्याची, महालाची, किल्ल्यांची, परिसरांची वर्णने वाचताना स्वामीमधली वर्णने आपण वाचीत आहोत, अशी टोचणी सरखी लागून राहते. ढोबळपणा या कथासंग्रहात तीन कथा ऐतिहासिक आहेत, तर दोन कथा सामाजिक आहेत. या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली मेखमोगरी ही दीर्घ कथा आहे. माणिकराव निंबाळकर व तुकोजीराव जाधव यांच्यातल्या मैत्रीची ही कथा आहे. सरदार माणिकराव निंबाळकरांच्या वाड्यातल्या प्रवेशद्वाराच्या उंच कमानीवर एक मोत्याची भरगच्च मोगरी टांगली होती. त्याच्याजवळ रौप्य मेखला होती. तुकोजीरावांचे चिरंजीव अहिराव यांनी ती बघितली. ती निंबाळकरांची वंशपरंपरेची मिजास आहे हे कळताच अहिराव जाधवांचे रक्त तापले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो वाडा लुटेल त्याला ती मेखमोगरी मिळेल असे निंबाळकर सांगतात. अहिराव हे आव्हान स्वीकारतात. माणिकरावांची सुस्वरूप कन्या सखुबार्इंना ते लागते. अहिराव पराक्रमाने दिवसभरात वाडा लुटतात. त्यांची थोप तरवार व ताम्रपटही लुटतात. ठरल्याप्रमाणे मेखमोगरी उतरवतात. पण अहिराव ती उतरू देत नाहीत. दोघे व्याही होतात. मैत्रीचे रुपांतर नात्यात होते. सखुबार्इंचे स्वप्न साकारते. या कथानकात सुक्ष्म छटा आहेत. त्या अधिक यायला हव्या होत्या. त्यामुळे कथानक ढोबळपणाने वाचकाच्या समोर आले, तसे आले नसते. शेवटही गुंडाळल्यासारखा वाटला नसता. सूरसिंगार या कथेत मेवाड आणि उदेपूर यांच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्या जाहिरातीच्या पडत्या काळातली घटना आहे. या जहागिरीस सूरसिंगार म्हणत. राजा भीमदेवाचा तो मुलुख होता. यात राखी नाम गढी होती. याचे मालक चंद्रराज होते. हे योजराजांचे दिवाण होते. योगराजांच्या मृत्यूनंतर भोगराज आले नि जहागिरीला ग्रहण लागले. यातून चंद्रराज व भोगराज एकमेकांचे वैरी झाले. याचे चित्रण या कथेत आहे. तर ‘शेवटचा शिवाजी’ या कथेत हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती यांच्या वंशांतले इंग्रजांची लाचारी पत्करणारे अखेरचे शिवाजी यांचे चित्रण आले आहे. यातील महाराजांच्या अस्वस्थ माचे चित्रण प्रत्ययकारी झाले आहे. घराण्यातल्या गादीच्या संघर्षातली कुजलेली मने यात दिसतात. या तीनही ऐतिहासिक कथांत ही कथा त्यातल्या त्यात प्रभावी वाटते. बाळबोध कथा संस्कार व मोकळं आकाश या दोन सामाजिक बाळबोध कथा आहेत. कथा अतिशय सरळ नि नेहमीच्याच प्रश्नांच्या वा त्याच त्याच कथानकातल्या आहेत. केशवशास्त्र्यांचा मुलगा नारायण विश्वंभर अण्णांच्या घरात गरिबीमुळे माधुकरी मागतो. तो कुणाचे काहीही चोरत नाही. शेवटी अण्णांच्या एकादशीच्या कीर्तनात खंड पडू नये, म्हणून तो कीर्तनही करतो. आपल्या संस्काराच्या प्रभावाने तो सर्वांना आपलासा करतो. शेवटी तो अण्णांचे पूर्ण घर सांभाळतो. मोकळ्या आकाशामध्ये अभिजित गोव्यातल्या लीला भाविणीला आई मानतो. तिची कन्या अबोली हिला बहीण मानतो. आईसाठी कष्टही करतो. त्याची पत्नी त्याचा संशय घेते. शेवटी तीही निघून जाते. अभिजित गोव्याला आईकडे येतो. तीही देवाघरी विसावते. अबोली मुसलमानाशी विवाहबद्ध होते. पुन्हा अभिजित एकटा उरतो. या कथेत अभिजितच्या मनाचे चित्रण बऱ्यापैकी केलेले आहे. अशा या एकूण कथा सामान्य वाचकाला रिझविणाऱ्या, सुजाण वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण करणाऱ्या यातल्या स्वभावनाच्या अंतर्मनांचा ठाव अधिक खोलात जाऊन बारकाईने घेता आला असता तर या कथांना वेगळे मूल्य प्राप्त झाले असते. मुळात मेख इथेच आहे. मात्र काही कथांतले संवाद चित्रदर्शी आहेत. म्हणून कथासंग्रह वाचावयास वाटतो. -यशवंत पाठक ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    या कथासंग्रहात तीन कथा ऐतिहासिक आहेत, तर दोन कथा सामाजिक आहेत. या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली मेखमोगरी ही दीर्घ कथा आहे. माणिकराव निंबाळकर व तुकोजीराव जाधव यांच्यातल्या मैत्रीची ही कथा आहे. सरदार माणिकराव निंबाळकरांच्या वाड्यातल्या प्रवेशद्वाराच्या उं कमानीवर एक मोत्याची भरगच्च मोगरी टांगली होती. त्याच्याजवळ रौप्य मेखला होती. तुकोजीरावांचे चिरंजीव अहिराव यांनी ती बघितली. ती निंबाळकरांची वंशपरंपरेची मिजास आहे हे कळताच अहिराव जाधवांचे रक्त तापले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो वाडा लुटेल त्याला ती मेखमोगरी मिळेल असे निंबाळकर सांगतात. अहिराव हे आव्हान स्वीकारतात. माणिकरावांची सुस्वरुप कन्या सखुबार्इंना ते लागते. अहिराव पराक्रमाने दिवसभरात वाडा लुटतात. ठरल्याप्रमाणे मेखमोगरी उतरवतात. पण अहिराव ती उतरू देत नाहीत. दोघे व्याही होतात. मैत्रीचे रूपांतर नात्यात होते. सखुबार्इंचे स्वप्न साकारते. या कथानकात सुक्ष्म छटा आहेत. त्या अधिक यायला हव्या होत्या. त्यामुळे कथानक ढोबळपणाने वाचकाच्या समोर आले, तसे आले नसते. शेवटही गुंडाळल्यासारखा वाटला नसता. सूरसिंगार या कथेत मेवाड आणि उदेपूर यांच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्या जहागिरीच्या पडत्या काळातली घटना आहे. या जहागिरीस सूरसिंगार म्हणत. राजा भीमदेवाचा तो मुलूख होता. यात राखी नामक गढी होती. याचे मालक चंद्रराज होते. हे योगराजांचे दिवाण होते. योगराजांच्या मृत्यूनंतर भोगराज आले नि जहागिरीला ग्रहण लागले. यातून चंद्रराज व भोगराज एकमेकांचे वैरी झाले. याचे चित्रण या कथेत आहे. तर ‘शेवटचा शिवाजी’ या कथेत हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती यांच्या वंशातला इंग्रजांची लाचारी पत्करणारे अखेरचे शिवाजी यांचे चित्रण आले आहे. यातील महाराजांच्या अस्वस्थ मनाचे चित्रण प्रत्ययकारी झाले आहे. घराण्यातल्या गादीच्या संघर्षातली कुजलेली मने यात दिसतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more