* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANJARACHI SAVALI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668407
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANOJ FOLLOWED NEMADE INTO THE ROOM. SUDHIRA WAS SITTING ON THE BED, HER BACK TOWARD THEM. SHE TURNED SHARPLY AT THE SOUND AND MANOJ RECOILED IN HORROR. SUDHIRA HAD WASTED AWAY TO NOTHING; HE COULD SEE THE HARSH LINES OF HER COLLARBONES BENEATH HER DRESS. HER EYELASHES HAD TURNED WHITE, AND HER SKIN WAS COVERED IN A PALE MOSS-LIKE FUR. AS HER EYES FLICKED UPWARDS TO MEET HIS, HE SAW IN THEM A FLASH OF BRILLIANT GREEN. DESPERATELY, MANOJ SEARCHED SUDHIRA`S IMPASSIVE FACE, BUT IT BETRAYED NO SIGN OF RECOGNITION. NUMBLY, HE TURNED AWAY FROM SUDHIRA AND HIS GAZE FELL ON HER SHADOW. THERE, A DARK ANTONYM TO THE STARK WHITE OF THE WALL, WAS THE SILHOUETTE OF A CROUCHING CAT...
नेमाड्यांच्या पाठोपाठ मनोज सुधीराच्या खोलीत गेला. सुधीरा कॉटवर बसली होती. मनोज आणि नेमाडे खोलीत शिरताच तिने मान वळवून त्यांच्याकडे पाहिले आणि मनोजच्या जीवाचा थरकाप झाला. सुधीराच्या डोळ्यात ओळखीचे भाव किंचितही दिसत नव्हते. तिच्या डोळ्यांत हिरवट झाक आली होती आणि पापण्या पूर्णपणे पांढऱ्या झाल्या होत्या. अंगावरही बुरशीसारखी पांढरट लव दिसत होती. तिचे शरीर तर कमालीचे कृश झाले होते. अवाक् होऊन तिच्याकडे पाहता पाहताच त्याचे लक्ष भिंतीवर पडलेल्या तिच्या सावलीकडे गेले आणि तो पुन्हा एकदा विलक्षण दचकला. भिंतीवर पडलेली सावली एका मांजराची होती. दोन पाय पुढे ठेवून मागचे पाय दुमडून कॉटवर बसलेले एक मांजर त्या सावलीत स्पष्ट दिसत होते. या कथासंठाहातील प्रत्येक कथेतला थरार आणि भयनाट्य काळजाचा ठोका चुकवणारे आहे. अतिंद्रिय, अनाकलनीय प्रसंगाच्या रोमांचकारी घटना जेव्हा आपल्यासमोर साकार होऊ लागतात तेव्हा त्या त्या व्यक्तींच्या मनातील ताणाचे आणि भयाचे प्रक्षेप आपल्याही मनावर येऊन आदळतात. शब्दाशब्दांतून अघोरी वासनांच्या क्रौर्याची धग आपल्यापर्यंत पोहोचून आपल्या अंतर्मनाला अस्वस्थ, घामाघूम करते. ...आणि मग या शब्दभ्रमाच्या मायाजालातून वेगळे होऊन आपण जेव्हा पुन्हा आपल्या नित्याच्या वास्तव जगात परत येतो, तेव्हा आपल्याच सावलीकडे पाहतानाही आपल्याला क्षणभर विलक्षण भीती वाटते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
MANJARACHI SAVALI# JAYSHREE KULKARNI# MRUTUYACHE DALAL# CHAKRAVYUH# TYA DARAPALIKADE# NARBALI# MI AALO AAHE# SHAP# THARBABU# NAYAN TUZE JADUGAR# VISHARI VILAKHA #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starदैनिक ऐक्य 28 ऑक्टोबर 2007

    मांजराची सावली भयकथासंग्रहात जयश्री कुलकर्णी यांनी वेळोवेळी लिहिलेल्या निवडक भयकथांचा समावेश आहे. भयकथा, गूढकथा, रहस्यकथा यांच्या वाट्याला सहसा महिला जात नाहीत, परंतु कुलकर्णी यांनी लेखिका म्हणून कुठलेही क्षेत्र स्वत:ला वर्ज्य मानलेले नाही. सामाजिक,कौटुंबिक कथांबरोबरच मनोविश् लेषणात्मक कादंबरी, ललित लेख एवढेच नव्हे तर वास्तुशास्त्र, पर्यटन, विज्ञान यावरही लेखन केले आहे आणि निरनिराळ्या वृत्तपत्रांतून तसेच मासिकांतून त्यांचे हे लेखन छापून येत आहे. साठ-सत्तर रहस्यकथा त्यांनी लिहिल्या आहेत. कुठल्याच एका लेखनाविषयाशी बांधिलकी ठेवणे मला रुचत नाही... असे त्या म्हणतात. अमुकच विषय किंवा लेखनप्रकर जमतो असा न्यूनगंड त्यांना कधी वाटला नाही. उलट वेगवेगळे वाङ्मयप्रकार हाताळावेसे वाटले, लेखनात साचेबंदपणा येऊ नये असा प्रयत्न त्यांनी केला. रहस्यकथा आणि गूढकथा हे लेखनप्रकार जुळ्या भावंडांसारखे आहेत असे त्यांना वाटते. तंत्र आणि मांडणी करताना वैचारिक भूमिका मात्र पूर्णतया वेगळी असावी लागते. मांजराची सावली या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कुलकर्णी म्हणतात, भीतीचे किंवा घाबरण्याचे आणि घाबरवण्याचे आकर्षण माणसाला लहानपणापासूनच असते... तरीही लहान मुलांना अपरिपक्व वयात भूतकथा, भयकथा सांगू नयेत किंवा वाचायला देऊ नयेत. बालवाचक बौद्धिकदृष्ट्या पूर्ण विकसित झाला, आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सक्षम झाला, तसेच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक त्याला समजू लागला तरच भयकथा, भूतकथांमधील कल्पनाविश् वाला सामोरा जायला तो तयार झाला असे म्हणता येईल. मांगल्यावरच्या श्रद्धेचा पाया भक्कम असायला हवा. थोडक्यात, थोड्या वेळेपुरते रोमांचक अनुभवातून जाणे वेगळे आणि कायमच मनात अनाकलनीय भीतींचे ओझे बाळगून जगणे वेगळे. चुकीच्या कल्पनांच्या प्रभावाखाली जगणारी काही प्रौढ माणसेही अमंगल शक्तींचे अस्तित्व, देवदैवतांच्या आराधनेतील कडक नियम किंवा ताण उरावर बांधून जन्मभर जगतात. हे निश् चितच धोकादायक आहे. प्रत्येक सुजाण व्यक्तीने याचे भान ठेवायला हवे. कुलकर्णी यांच्या भयकथा या स्वयंर्स्फूत, स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या केंद्रस्थानी कल्पनाव्यूहांचे वेगवेगळे नमुने आढळतात. मांजराची सावली ही कथासंग्रहाला शीर्षक पुरवणारी कथा. डॉ. मनोजकडे त्यांचे क्लबमधले मित्र नेमाडे येऊन एक अजब तक्रार करतात, आमच्या घरातील रेडिओच्या जागी फ्लॉवरपॉट, गोल टीपॉयच्या जागी आयताकृती टीपॉय, साडेसहा फुटी कपाटाच्या जागी पाच फूट उंचीचे कपाट अशा वस्तू आहेत. त्या कशा बदलल्या गेल्या हेच कळत नाही. एके रात्री धाकटी मुलगी झोपेतून उठून स्वप्नात भयंकर मांजर दिसतेय म्हणू लागली... मी स्वत: एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवत असताना मला तिची सावली भिंतीवर दिसली. ती सावली मांजराची होती.. हे सर्व काय चाललंय तेच कळत नाही...डॉ. मनोज याला आपल्या काकांकडून टेलिट्रॅन्सफॉर्मेशनची विद्या मिळालेली असते आणि अमंगल शक्तींच्या तसेच अघोरी मांत्रिकापासून संरक्षण होण्यासाठी एक संरक्षक कवचही त्याच्या शरीराभोवती तयार केलेले असते. आपल्या योगसाधनेचे सर्व सामर्थ्य एकवटलेला एक नीलमणीही काका त्याला देतात. शुद्ध आचरण आणि परमेश् वराची सेवा करीत राहा असे सांगून ते आपल्या संग्रहातील दुर्मिळ वैद्यकीय व इतर पुस्तकांचीही व्यवस्था पहा असे सांगतात. त्यानंतर त्यांचे देहावसान होते. नेमाडे यांच्या घरात टेलिट्रॅन्सफॉर्मेशनचा प्रकार होत असणार हे मनोजच्या लक्षात येते. तो नेमाडे यांच्या शेजारी नव्यानेच एक भाडेकरू रहायला आल्यावर या प्रकारांना सुरुवात झाली असे नेमाडे म्हणतात. तेव्हा त्या शेजाऱ्याला डॉ. मनोज भेटतो... हा शेजारी म्हणजे अंगद... त्याच्याकडे आपल्या काकांची काही पुस्तके मनोजला दिसतात... ती रद्दीवाल्याकडून घेतली आहेत असे अंगद सांगतो... त्यावरून त्याने टेलिट्रॅन्सफॉर्मेशनची विद्या आत्मसात केलेली असते आणि नेमाडे यांचा सावत्रभाऊ असल्याचा दावा करून तो म्हणतो, ‘तुमच्या मुलीचं मांजरात रुपांतर झालं तरी तिचं मन आणि बुद्धी मात्र माणसाचीच राहणार... मला 25 हजार दिले तर मी माघार घेईन...’ डॉ. मनोजवर तो अशुभ शक्तीद्वारे हल्ला चढवू पाहतो. परंतु नीलमण्यामुळे मनोजवर काही परिणाम होत नाही. अंगद म्हणतो, ‘आता तू वाचलास. पण माझ्या शक्तीची कल्पना तुला आली असेल. माझ्यापासून दूर पहा...’ अंगदच्या या धमकीने डॉ. मनोज त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या विद्येचा वापर करतो. सुधीराच्या शरीरावर आपल्या डोळ्यातून निघणारे विशिष्ट किरण केंद्रित करतो. मांजराच्या शरीराचे उपरे आणू वेगवेगळे होऊन, आसपास वावरणारे मूळ अणू आपली जागा घेतात आणि सुधीरा पूर्ववत होते... तिच्या शरीराभोवती मनोज संरक्षक कवच तयार करतो. ही कथा इथेच संपत नाही. अंगद हा सुधीराला पळवून नेतो आणि कालभैरवीच्या देवळात तिचा नरबळी देऊ पाहतो. नेमाडे डॉ. मनोजकडे मदतीसाठी येतात... मनोज नीलमणी खिशात टाकून बघतो तर नेमाडे यांच्या जागी एक पांढरट विरविरीत आकार दिसतो... स्वत:भोवती संरक्षक कवच तयार करून मनोज निघतो... अंगदने नेमाडेंच्या रूपात अशुभ शक्तीला पाठवले आहे हे तो ओळखतो आणि अंगदचा डाव त्याच्यावर उलटवतो. अंगदला न मारता टेलिट्रॅन्सफॉर्मेशनद्वारे त्याच्या शरीरातले अणू-परमाणूत रुपांतर करून ते सर्व दिशांना पसरवून टाकतो. बळीच्या चौथर् यावरील स्त्रीला मुक्त करतो आणि ‘तू आता घरी जाशील आणि घडलेला सर्व प्रकार विसरून जाशील’ असाही संदेश देतो. टेलिट्रॅन्सफॉर्मेशनची कल्पना वापरून ‘मांजराची सावली’ या कथेची उभारणी केली गेली आहे. चक्रव्यूह’ या कथेच पाच वर्षांपूर्वी पुराणवस्तू संशोधन करताना रुपाली मध्यप्रदेशच्या जंगलातल्या स्टडी टूरच्या वेळी तेथून आणलेल्या वस्तूंपैकी एका चपट्या डबीला अपशकुनी मानत असते. त्या डबीत कसले तरी चूर्ण असते आणि पाठीमागे विचित्र लिपीत काहीतरी कोरलेले असते. तिचा विश् वासू नोकर चंदन ती डबी उघडतो आणि त्यानंतर बेपत्ता होतो तेव्हा रुपाली आपला मित्र विभाकर याला बोलावून ती डबी दाखवते. विभाकर म्हणतो, ‘ही डबी पंडितरावांना दाखवायला हवी. ते तिचे रहस्य शोधून काढतील.’ पाच वर्षांपूर्वीच्या त्या स्टडी टूरमध्ये रुपाली तिचे प्रा. सिन्हा व इतर सहकारी मित्र यांना जंगलात राहणारी एक आदिवासी तरुणी भेटलेली असते. डॉ. सिन्हा यांना ती डबी सापडलेली असते आणि नंतर ते मृतावस्थेत आढळतात... पंडितराव ही पूर्वकहाणी ऐकून, या डबीत एक दुर्दैवी आत्मा बंदिस्त असावा असा तर्क करतात आणि मंत्राने मारलेले पाणी त्या डबीवर टाकतात. त्याबरोबर ती डबी टणटण उड्या मारू लागते. एक पुरुषी किंकाळी ऐकू येते, ‘मला त्रास देऊ नको.’ ‘मी तुला मुक्ती देणार आहे, तू कोण आहेस?’ तेव्हा आवाज येतो, ‘मी सोमदत्त. चारशे वर्षांपूर्वी मी सेनापती होतो. बादशहाच्या बेगमचे प्रेम माझ्यावर जडले. पण तिच्या दासीने घात केला. बादशहाने माझे डोके धडावेगळे केले. बेगमेलाही ठार केले आणि मला म्हटले मी तुझ्या आत्म्याला कायमचे जखडून ठेवणार आहे. तुझ्या अस्थिंचे चूर्ण करून ते डबीत बंदिस्त करणार आहे. बेगमेच्या प्रेताबरोबर ही डबी राहील.’ पंडितराव त्याला आश् वासन देतात, ‘सोमदत्त, मी तुझ्या अस्थिचूर्णावर धार्मिक संस्कार करून तिचे योग्य जागी विसर्जन करीन. तुला मुक्ती मिळवून देईन.’ ...पंडितरावा रुपालीला घेऊन त्या मध्यप्रदेशातील जंगलात जातात. त्यांनाही ती झोपडी-तिच्यासमोर एक व्यक्ती दिसते... ती व्यक्ती म्हणजे चंदन असते... रुपाली हाक मारते... पण पंडितराव म्हणतात, ‘हा चंदन नाही. ही एक अमानवी शक्ती आहे... तू रिंगणात पाऊल ठेवू नकोस...’ नंतर पंडितराव खुलासा करतात, ‘सोमदत्ताची ती डबी दोनशे वर्षांपूर्वी एका युवतीने उघडली. तिच्या आत्म्याला थडग्यापाशी पहारा देत बसण्याची वेळ आली. नंतर प्रा. सिन्हा यांच्यावर ती पाळी आली... आता त्यांची जागा चंदनने घेतलीय... हे दुष्टचक्र आहे.’ ...या कथेच्या शेवटी आणखी एक आश् चर्य प्रकट होते. हा सोमदत्त कोण, ही रुपाली कोण? त्यांचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध कसे असतात. त्याचा केवळ निर्देश येतो आणि कथा संपते. मसुरीच्या ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये डॉ. दिवाण यांच्या पत्नीचा खून केल्याच्या आरोपावरून प्रा. जयवंत नामजोशी यांना पोलीस कोठडीत डांबले जाते. तो खून नामजोशींनी केलेला नाही. डॉ. दिवाण यांची व नामजोशींची गाठ त्या हॉटेलातच पहिल्यांदा पडली. नरबळी’मधील गूढरम्य वातावरण संन्यासी मांत्रिक देवीपुढे आत्मसमर्पण करायला निघालेला चक्रधर आणि पंडितराव विभाकर यांनी त्याला वाचवण्याचा केलेला प्रयत्न... त्यामुळे चिडलेला संन्यासी... त्या संन्याशावर तुटून पडलेले वखवखणारे आत्मे... पंडितराव त्या संन्याशावर अंत्यसंस्कार करून त्याला मुक्त करतात... हे पंडितराव ‘विषारी विळखा’ या कथेतही पुन्हा भेटतात. अमितावर प्रेम करणाऱ्या सोमनाथचा खून करून त्याचे प्रेत कारंजासाठी खणलेल्या खड्ड्यात पुरण्यात येते. अमिताचे लग्न होते. तिच्या वडिलांना वेड लागते. अमिताला वेगवेगळे भास होऊ लागतात. पंडितराव तिला घेऊन... त्या सोमनाथच्या आत्म्याला आश् वासन देतात, तुझी काही इच्छा असेल तर ती पूर्ण करायचे वचन देते... तुझ्या बायकामुलांना सुखाचा घास मिळेल अशी व्यवस्था करते. कारंजाखाली पुरलेल्या तुझ्या देहावर योग्य ते धार्मिक संस्कार करते. ...आणि बागेतले कारंजे उद्ध्वस्त होते. तेथे एक सांगाडा सापडतो. पंडितरावांची कामगिरी फत्ते होते. मांजराची सावली ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more