* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANJARACHI SAVALI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668407
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANOJ FOLLOWED NEMADE INTO THE ROOM. SUDHIRA WAS SITTING ON THE BED, HER BACK TOWARD THEM. SHE TURNED SHARPLY AT THE SOUND AND MANOJ RECOILED IN HORROR. SUDHIRA HAD WASTED AWAY TO NOTHING; HE COULD SEE THE HARSH LINES OF HER COLLARBONES BENEATH HER DRESS. HER EYELASHES HAD TURNED WHITE, AND HER SKIN WAS COVERED IN A PALE MOSS-LIKE FUR. AS HER EYES FLICKED UPWARDS TO MEET HIS, HE SAW IN THEM A FLASH OF BRILLIANT GREEN. DESPERATELY, MANOJ SEARCHED SUDHIRA`S IMPASSIVE FACE, BUT IT BETRAYED NO SIGN OF RECOGNITION. NUMBLY, HE TURNED AWAY FROM SUDHIRA AND HIS GAZE FELL ON HER SHADOW. THERE, A DARK ANTONYM TO THE STARK WHITE OF THE WALL, WAS THE SILHOUETTE OF A CROUCHING CAT...
नेमाड्यांच्या पाठोपाठ मनोज सुधीराच्या खोलीत गेला. सुधीरा कॉटवर बसली होती. मनोज आणि नेमाडे खोलीत शिरताच तिने मान वळवून त्यांच्याकडे पाहिले आणि मनोजच्या जीवाचा थरकाप झाला. सुधीराच्या डोळ्यात ओळखीचे भाव किंचितही दिसत नव्हते. तिच्या डोळ्यांत हिरवट झाक आली होती आणि पापण्या पूर्णपणे पांढऱ्या झाल्या होत्या. अंगावरही बुरशीसारखी पांढरट लव दिसत होती. तिचे शरीर तर कमालीचे कृश झाले होते. अवाक् होऊन तिच्याकडे पाहता पाहताच त्याचे लक्ष भिंतीवर पडलेल्या तिच्या सावलीकडे गेले आणि तो पुन्हा एकदा विलक्षण दचकला. भिंतीवर पडलेली सावली एका मांजराची होती. दोन पाय पुढे ठेवून मागचे पाय दुमडून कॉटवर बसलेले एक मांजर त्या सावलीत स्पष्ट दिसत होते. या कथासंठाहातील प्रत्येक कथेतला थरार आणि भयनाट्य काळजाचा ठोका चुकवणारे आहे. अतिंद्रिय, अनाकलनीय प्रसंगाच्या रोमांचकारी घटना जेव्हा आपल्यासमोर साकार होऊ लागतात तेव्हा त्या त्या व्यक्तींच्या मनातील ताणाचे आणि भयाचे प्रक्षेप आपल्याही मनावर येऊन आदळतात. शब्दाशब्दांतून अघोरी वासनांच्या क्रौर्याची धग आपल्यापर्यंत पोहोचून आपल्या अंतर्मनाला अस्वस्थ, घामाघूम करते. ...आणि मग या शब्दभ्रमाच्या मायाजालातून वेगळे होऊन आपण जेव्हा पुन्हा आपल्या नित्याच्या वास्तव जगात परत येतो, तेव्हा आपल्याच सावलीकडे पाहतानाही आपल्याला क्षणभर विलक्षण भीती वाटते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
MANJARACHI SAVALI# JAYSHREE KULKARNI# MRUTUYACHE DALAL# CHAKRAVYUH# TYA DARAPALIKADE# NARBALI# MI AALO AAHE# SHAP# THARBABU# NAYAN TUZE JADUGAR# VISHARI VILAKHA #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starदैनिक ऐक्य 28 ऑक्टोबर 2007

    मांजराची सावली भयकथासंग्रहात जयश्री कुलकर्णी यांनी वेळोवेळी लिहिलेल्या निवडक भयकथांचा समावेश आहे. भयकथा, गूढकथा, रहस्यकथा यांच्या वाट्याला सहसा महिला जात नाहीत, परंतु कुलकर्णी यांनी लेखिका म्हणून कुठलेही क्षेत्र स्वत:ला वर्ज्य मानलेले नाही. सामाजिक,कौटुंबिक कथांबरोबरच मनोविश् लेषणात्मक कादंबरी, ललित लेख एवढेच नव्हे तर वास्तुशास्त्र, पर्यटन, विज्ञान यावरही लेखन केले आहे आणि निरनिराळ्या वृत्तपत्रांतून तसेच मासिकांतून त्यांचे हे लेखन छापून येत आहे. साठ-सत्तर रहस्यकथा त्यांनी लिहिल्या आहेत. कुठल्याच एका लेखनाविषयाशी बांधिलकी ठेवणे मला रुचत नाही... असे त्या म्हणतात. अमुकच विषय किंवा लेखनप्रकर जमतो असा न्यूनगंड त्यांना कधी वाटला नाही. उलट वेगवेगळे वाङ्मयप्रकार हाताळावेसे वाटले, लेखनात साचेबंदपणा येऊ नये असा प्रयत्न त्यांनी केला. रहस्यकथा आणि गूढकथा हे लेखनप्रकार जुळ्या भावंडांसारखे आहेत असे त्यांना वाटते. तंत्र आणि मांडणी करताना वैचारिक भूमिका मात्र पूर्णतया वेगळी असावी लागते. मांजराची सावली या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कुलकर्णी म्हणतात, भीतीचे किंवा घाबरण्याचे आणि घाबरवण्याचे आकर्षण माणसाला लहानपणापासूनच असते... तरीही लहान मुलांना अपरिपक्व वयात भूतकथा, भयकथा सांगू नयेत किंवा वाचायला देऊ नयेत. बालवाचक बौद्धिकदृष्ट्या पूर्ण विकसित झाला, आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सक्षम झाला, तसेच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक त्याला समजू लागला तरच भयकथा, भूतकथांमधील कल्पनाविश् वाला सामोरा जायला तो तयार झाला असे म्हणता येईल. मांगल्यावरच्या श्रद्धेचा पाया भक्कम असायला हवा. थोडक्यात, थोड्या वेळेपुरते रोमांचक अनुभवातून जाणे वेगळे आणि कायमच मनात अनाकलनीय भीतींचे ओझे बाळगून जगणे वेगळे. चुकीच्या कल्पनांच्या प्रभावाखाली जगणारी काही प्रौढ माणसेही अमंगल शक्तींचे अस्तित्व, देवदैवतांच्या आराधनेतील कडक नियम किंवा ताण उरावर बांधून जन्मभर जगतात. हे निश् चितच धोकादायक आहे. प्रत्येक सुजाण व्यक्तीने याचे भान ठेवायला हवे. कुलकर्णी यांच्या भयकथा या स्वयंर्स्फूत, स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या केंद्रस्थानी कल्पनाव्यूहांचे वेगवेगळे नमुने आढळतात. मांजराची सावली ही कथासंग्रहाला शीर्षक पुरवणारी कथा. डॉ. मनोजकडे त्यांचे क्लबमधले मित्र नेमाडे येऊन एक अजब तक्रार करतात, आमच्या घरातील रेडिओच्या जागी फ्लॉवरपॉट, गोल टीपॉयच्या जागी आयताकृती टीपॉय, साडेसहा फुटी कपाटाच्या जागी पाच फूट उंचीचे कपाट अशा वस्तू आहेत. त्या कशा बदलल्या गेल्या हेच कळत नाही. एके रात्री धाकटी मुलगी झोपेतून उठून स्वप्नात भयंकर मांजर दिसतेय म्हणू लागली... मी स्वत: एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवत असताना मला तिची सावली भिंतीवर दिसली. ती सावली मांजराची होती.. हे सर्व काय चाललंय तेच कळत नाही...डॉ. मनोज याला आपल्या काकांकडून टेलिट्रॅन्सफॉर्मेशनची विद्या मिळालेली असते आणि अमंगल शक्तींच्या तसेच अघोरी मांत्रिकापासून संरक्षण होण्यासाठी एक संरक्षक कवचही त्याच्या शरीराभोवती तयार केलेले असते. आपल्या योगसाधनेचे सर्व सामर्थ्य एकवटलेला एक नीलमणीही काका त्याला देतात. शुद्ध आचरण आणि परमेश् वराची सेवा करीत राहा असे सांगून ते आपल्या संग्रहातील दुर्मिळ वैद्यकीय व इतर पुस्तकांचीही व्यवस्था पहा असे सांगतात. त्यानंतर त्यांचे देहावसान होते. नेमाडे यांच्या घरात टेलिट्रॅन्सफॉर्मेशनचा प्रकार होत असणार हे मनोजच्या लक्षात येते. तो नेमाडे यांच्या शेजारी नव्यानेच एक भाडेकरू रहायला आल्यावर या प्रकारांना सुरुवात झाली असे नेमाडे म्हणतात. तेव्हा त्या शेजाऱ्याला डॉ. मनोज भेटतो... हा शेजारी म्हणजे अंगद... त्याच्याकडे आपल्या काकांची काही पुस्तके मनोजला दिसतात... ती रद्दीवाल्याकडून घेतली आहेत असे अंगद सांगतो... त्यावरून त्याने टेलिट्रॅन्सफॉर्मेशनची विद्या आत्मसात केलेली असते आणि नेमाडे यांचा सावत्रभाऊ असल्याचा दावा करून तो म्हणतो, ‘तुमच्या मुलीचं मांजरात रुपांतर झालं तरी तिचं मन आणि बुद्धी मात्र माणसाचीच राहणार... मला 25 हजार दिले तर मी माघार घेईन...’ डॉ. मनोजवर तो अशुभ शक्तीद्वारे हल्ला चढवू पाहतो. परंतु नीलमण्यामुळे मनोजवर काही परिणाम होत नाही. अंगद म्हणतो, ‘आता तू वाचलास. पण माझ्या शक्तीची कल्पना तुला आली असेल. माझ्यापासून दूर पहा...’ अंगदच्या या धमकीने डॉ. मनोज त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या विद्येचा वापर करतो. सुधीराच्या शरीरावर आपल्या डोळ्यातून निघणारे विशिष्ट किरण केंद्रित करतो. मांजराच्या शरीराचे उपरे आणू वेगवेगळे होऊन, आसपास वावरणारे मूळ अणू आपली जागा घेतात आणि सुधीरा पूर्ववत होते... तिच्या शरीराभोवती मनोज संरक्षक कवच तयार करतो. ही कथा इथेच संपत नाही. अंगद हा सुधीराला पळवून नेतो आणि कालभैरवीच्या देवळात तिचा नरबळी देऊ पाहतो. नेमाडे डॉ. मनोजकडे मदतीसाठी येतात... मनोज नीलमणी खिशात टाकून बघतो तर नेमाडे यांच्या जागी एक पांढरट विरविरीत आकार दिसतो... स्वत:भोवती संरक्षक कवच तयार करून मनोज निघतो... अंगदने नेमाडेंच्या रूपात अशुभ शक्तीला पाठवले आहे हे तो ओळखतो आणि अंगदचा डाव त्याच्यावर उलटवतो. अंगदला न मारता टेलिट्रॅन्सफॉर्मेशनद्वारे त्याच्या शरीरातले अणू-परमाणूत रुपांतर करून ते सर्व दिशांना पसरवून टाकतो. बळीच्या चौथर् यावरील स्त्रीला मुक्त करतो आणि ‘तू आता घरी जाशील आणि घडलेला सर्व प्रकार विसरून जाशील’ असाही संदेश देतो. टेलिट्रॅन्सफॉर्मेशनची कल्पना वापरून ‘मांजराची सावली’ या कथेची उभारणी केली गेली आहे. चक्रव्यूह’ या कथेच पाच वर्षांपूर्वी पुराणवस्तू संशोधन करताना रुपाली मध्यप्रदेशच्या जंगलातल्या स्टडी टूरच्या वेळी तेथून आणलेल्या वस्तूंपैकी एका चपट्या डबीला अपशकुनी मानत असते. त्या डबीत कसले तरी चूर्ण असते आणि पाठीमागे विचित्र लिपीत काहीतरी कोरलेले असते. तिचा विश् वासू नोकर चंदन ती डबी उघडतो आणि त्यानंतर बेपत्ता होतो तेव्हा रुपाली आपला मित्र विभाकर याला बोलावून ती डबी दाखवते. विभाकर म्हणतो, ‘ही डबी पंडितरावांना दाखवायला हवी. ते तिचे रहस्य शोधून काढतील.’ पाच वर्षांपूर्वीच्या त्या स्टडी टूरमध्ये रुपाली तिचे प्रा. सिन्हा व इतर सहकारी मित्र यांना जंगलात राहणारी एक आदिवासी तरुणी भेटलेली असते. डॉ. सिन्हा यांना ती डबी सापडलेली असते आणि नंतर ते मृतावस्थेत आढळतात... पंडितराव ही पूर्वकहाणी ऐकून, या डबीत एक दुर्दैवी आत्मा बंदिस्त असावा असा तर्क करतात आणि मंत्राने मारलेले पाणी त्या डबीवर टाकतात. त्याबरोबर ती डबी टणटण उड्या मारू लागते. एक पुरुषी किंकाळी ऐकू येते, ‘मला त्रास देऊ नको.’ ‘मी तुला मुक्ती देणार आहे, तू कोण आहेस?’ तेव्हा आवाज येतो, ‘मी सोमदत्त. चारशे वर्षांपूर्वी मी सेनापती होतो. बादशहाच्या बेगमचे प्रेम माझ्यावर जडले. पण तिच्या दासीने घात केला. बादशहाने माझे डोके धडावेगळे केले. बेगमेलाही ठार केले आणि मला म्हटले मी तुझ्या आत्म्याला कायमचे जखडून ठेवणार आहे. तुझ्या अस्थिंचे चूर्ण करून ते डबीत बंदिस्त करणार आहे. बेगमेच्या प्रेताबरोबर ही डबी राहील.’ पंडितराव त्याला आश् वासन देतात, ‘सोमदत्त, मी तुझ्या अस्थिचूर्णावर धार्मिक संस्कार करून तिचे योग्य जागी विसर्जन करीन. तुला मुक्ती मिळवून देईन.’ ...पंडितरावा रुपालीला घेऊन त्या मध्यप्रदेशातील जंगलात जातात. त्यांनाही ती झोपडी-तिच्यासमोर एक व्यक्ती दिसते... ती व्यक्ती म्हणजे चंदन असते... रुपाली हाक मारते... पण पंडितराव म्हणतात, ‘हा चंदन नाही. ही एक अमानवी शक्ती आहे... तू रिंगणात पाऊल ठेवू नकोस...’ नंतर पंडितराव खुलासा करतात, ‘सोमदत्ताची ती डबी दोनशे वर्षांपूर्वी एका युवतीने उघडली. तिच्या आत्म्याला थडग्यापाशी पहारा देत बसण्याची वेळ आली. नंतर प्रा. सिन्हा यांच्यावर ती पाळी आली... आता त्यांची जागा चंदनने घेतलीय... हे दुष्टचक्र आहे.’ ...या कथेच्या शेवटी आणखी एक आश् चर्य प्रकट होते. हा सोमदत्त कोण, ही रुपाली कोण? त्यांचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध कसे असतात. त्याचा केवळ निर्देश येतो आणि कथा संपते. मसुरीच्या ग्रीन व्ह्यू हॉटेलमध्ये डॉ. दिवाण यांच्या पत्नीचा खून केल्याच्या आरोपावरून प्रा. जयवंत नामजोशी यांना पोलीस कोठडीत डांबले जाते. तो खून नामजोशींनी केलेला नाही. डॉ. दिवाण यांची व नामजोशींची गाठ त्या हॉटेलातच पहिल्यांदा पडली. नरबळी’मधील गूढरम्य वातावरण संन्यासी मांत्रिक देवीपुढे आत्मसमर्पण करायला निघालेला चक्रधर आणि पंडितराव विभाकर यांनी त्याला वाचवण्याचा केलेला प्रयत्न... त्यामुळे चिडलेला संन्यासी... त्या संन्याशावर तुटून पडलेले वखवखणारे आत्मे... पंडितराव त्या संन्याशावर अंत्यसंस्कार करून त्याला मुक्त करतात... हे पंडितराव ‘विषारी विळखा’ या कथेतही पुन्हा भेटतात. अमितावर प्रेम करणाऱ्या सोमनाथचा खून करून त्याचे प्रेत कारंजासाठी खणलेल्या खड्ड्यात पुरण्यात येते. अमिताचे लग्न होते. तिच्या वडिलांना वेड लागते. अमिताला वेगवेगळे भास होऊ लागतात. पंडितराव तिला घेऊन... त्या सोमनाथच्या आत्म्याला आश् वासन देतात, तुझी काही इच्छा असेल तर ती पूर्ण करायचे वचन देते... तुझ्या बायकामुलांना सुखाचा घास मिळेल अशी व्यवस्था करते. कारंजाखाली पुरलेल्या तुझ्या देहावर योग्य ते धार्मिक संस्कार करते. ...आणि बागेतले कारंजे उद्ध्वस्त होते. तेथे एक सांगाडा सापडतो. पंडितरावांची कामगिरी फत्ते होते. मांजराची सावली ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more