* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KANCHANKAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666946
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHIVAJI SAWANT COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`KANCHAN` IN MARATHI MEANS GOLD. THIS COLLECTION IS NAMED SO AS IT CONSISTS OF MANY GOLD MOMENTS WOVEN TOGETHER IN THE ARTISTIC STYLE BY SHIVAJI SAWANT. HE TOUCHES VERY GENTLY THE TENDEREST AND PECULIAR MOMENTS OF THE LIVES OF CHAATRAPATI SHIVAJI MAHARAJ AND FIRST BAJIRAO PESHWA. HE IS ALSO BLESSED BY SOME OF THE PROMINENT MAHARASHTRIANS LIKE ACHARYA ATRE, ANNA ALIAS G.D.MADGULKAR AND THE GREAT MUSICIAN VASANT DESAI. SOMEWHERE THE AUTHOR HAS SUCCEEDED IN BRINGING FORTH THE LIFESTYLE OF THE PEOPLE`S MAN, BHAI MANOHAR KOTWAL, WHO GAVE A NEW DIMENSION TO THE FIGHT OF THE DOCK WORKERS. THE ARTICLES BASED ON DNYANESHWAR ARE THE MOST SALIENT FEATURE OF THIS COLLECTION. ONE MUST ENJOY THEM IN A PEACEFUL SURROUNDING. THE READERS WILL SURELY BE TEMPTED TO STORE THESE GOLDEN MOMENTS IN THEIR TREASURY.
साहित्याला `कांचनाचं` म्हणजे सोन्याचं मोल देणाऱ्या शिवाजी सावंत (`मृत्युंजय`कार) यांच्या विविध ललित लेखांचा हा भावसंच. खास त्यांच्या लेखनशैलीतील. अभिजात मराठी भाषेची जागोजाग भेट घडविणारा. या संचात छ. शिवराय व वीर थोरले बाजीराव पेशवे यांच्या विक्रमी, तशाच, भावसमृद्ध जीवनाच्या तळवटाला केलेला हळुवार स्पर्श भेटेल. आ. अत्रे, अण्णा (ग.दि.मा.) व अमरकीर्त, थोर संगीतकार वसंत देसाई यांचे त्यांना लाभलेले अनमोल आशीर्वाद दिसतील. तसेच, एरव्ही दुर्लक्षित गोदी कामगाराला सच्चा जीवनार्थ प्राप्त करून देणारे झुंजार व लढाऊ नेते भाई मनोहर कोतवाल यांच्या विविध जीवनछटा दिसतील. विशेषत: ज्ञानेश्वरांवर भावएकरूपता साधून बांधलेला, `विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!` व `एकतरी ओवी अनुभवावी!` असे दोन लेख आहेत. ते तर शांत चित्ती चवीनं चाखण्यासारखे आहेत. साहित्य सोनियाची समृद्ध खाण असलेल्या मायमराठीत हे `कांचनकण` अलवार हातांनी उचलून ठेवावेत, असे वाचकांनाच वाटेल.

No Records Found
No Records Found
Keywords
#ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR #KANCHANKAN #SHIVAJI #SAWANT #DIWAS #CHAVYACHE #DADA #TE #TIN #AASHIRVAD #KALAWANTNAGARI #KOLHAPUR #KULSWAMINI #कांचनकण #शिवाजी #सावंत #दिवस #छाव्याचे #दादा #ते #तीन #आशीर्वाद #कलावंतनगरी #कोल्हापूर #कुलस्वामिनी#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 21-03-1999

    ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत हे मराठी साहित्यातील सिद्धहस्त लेखक. साहित्याशी जिवाशिवाचे नाते जडलेल्या सावंतांनी उत्तुंग व्यक्तिरेखांना कांचनाच्या कोंदणात बद्ध केले. त्यांच्या साहित्यकृतीच्या आकृतिबंधात उदात्ततेचा साक्षात्कार, सखोल चिंतन व श्रद्धाळू मनजाणवत राहते. ‘कांचनकण’ या ललित लेखात विविध विषयांवरचं त्यांचं मुक्त चिंतन आहे. आदरणीय व्यक्तींच्या स्मृती, पूजनीय व्यक्तींच्या स्मृती आहेत. व्यक्तिगत जीवनाशी निगडित घटना, उपेक्षितांसाठी लढा देणाऱ्याची चरित्रकहाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांवरील, ज्ञानेश्वरीवरील चिंतनमय, रसाळ लेख, ‘मृत्युंजय’ च्या संदर्भातील दूरदर्शनचे दुर्दर्शन, कलावंतनगरी - उद्यमनगरी कोल्हापूरचे वर्णन, बाजीराव - मस्तानी ही वादग्रस्त ऐतिहासिक घटना अशी विषयांची विविधता प्रस्तुत पुस्तकात आढळते. ‘दिवस छाव्या’ चे या लेखात संभाजी राजें सारख्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाला योग्य न्याय मिळावा म्हणून केलेली जिवापाड मेहनत, धडपड लेखक सांगतो. झपाटलेल्या अवस्थेत असंख्य गडकोटांची केलेली पायपीट, दहा वर्षे ऐतिहासिक संदर्भग्रंथांचा केलेला अभ्यास अशा अथक परिश्रांतून डोळसपणे त्यांनी व्यक्तिरेखा उभी केली. संभाजीराजेंचे राष्ट्रप्रेम, अपूर्व बलिदान त्यांच्या दोषांमुळे झाकोळून जाऊ नये म्हणून केलेले श्रम त्यासाठी मृत्यूलाही सामोरे जाण्याची जिद्द दिसते. सहचारिणी, मित्रपरिवार यांचं पाठबळ, जगदंबेने दिलेले मनोबल यामुळे मिळालेले यश व कुसुमाग्रजांकडून मिळालेली शाबासकीची थाप यात ते धन्यता मानतात. ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करणाऱ्या एका बखरवजा लेखाचा परामर्ष घेताना लेखकाने सत्याचा पाठपुरावा करून बखरवाङ्मयाचा सुप्त अभ्यास केला. शिवप्रभूंसारख्या उत्तुंग, पूजनीय, सकलागुणांनी युक्त अशा नृपश्रेष्ठांचे चारित्र्यहनन व राणीच्या नावाला लागलेला कलंक असह्य होऊन लेखकाने बखरीतील अवास्तव, रंजकतेचा मुलामा चढवलेला असत्यास वाचा फोडून ऐतिहासिक घटनेचा अपलाप करणाऱ्या घटनेवर प्रकाश टाकलाय. ‘कुलस्वामिनी’ या लेखात आदिशक्ती, आदिमातेचा महिमा, आदिशक्तीची तीन शक्तिपीठे, विविध रूपे, जागृत दैवते, त्यांचे माहात्म्य, त्यांच्यावरील श्रद्धा, जगन्मातेची विविध रूपे, प्रेरणाशक्ती, निरनिराळ्या प्रसंगी कारणपरत्वे धारण केलेली रूपे यांचा उल्लेख आहे. कलावंतनगरी कोल्हापूरचे ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध रंगांचे आंतर्बाह्य रूप उलगडून दाखवताना त्या शहराशी असलेली लेखकाची भावनिक जवळीक जाणवते. श्रीकृष्णासारख्या अवतारी पुरुषश्रेष्ठांची भूमी (पौराणिक संदर्भ), राजर्षी शाहू महाराजांसारखा प्रजाहितदक्ष, प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा, राज्याच्या जनतेच्या सर्वांगीण हितासाठी झटणारा राजा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोल्हापूरचे सुपुत्र वि.स.खांडेकर, नाट्यचित्रपट कलावंत, शैक्षणिक क्षेत्रातील महारथी अशी वैभवशाली परंपरा वर्णिताना लेखक रंगून जातो. कला, क्रीडा, उद्योगव्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत अग्रगण्य असलेले कोल्हापूर या शहराने महाराष्ट्रास उदंड दिले. त्या शहराबद्दलची आत्मीयता, अभिमान व्यक्त होतो. छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंह यांच्यामधील समरप्रसंगावरील संवादातून एका श्रीमान योग्याचे मर्मस्पर्शी चित्रण अरविंदबाबू घोष या सिद्धपुरुषाने केले आहे. अरविंदबाबूंबद्दलचा आदरही प्रस्तुत लेखात व्यक्त झाला आहे. ज्ञानेश्वरीतील साहित्य सोनेचिया खाणीतील अनमोल रत्नांचा खजिनाच ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या विवेचनपर लेखात वाचकांसाठी उघडा केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या कवित्वशक्तीचा साक्षात्कार, त्यांची अलौकिक प्रतिभा, तत्त्वज्ञान, शब्दसृष्टीच्या सामर्थ्यावर उभी केलेली प्रतिमासृष्टी त्यातून भावाशयाचे नवनवे पदर तरलपणे उलगडत जातात. या महाकवीच्या अनुभवविश्वाचे अफाट, विशाल सामर्थ्य प्रकटते त्याच्या प्रत्येक ओवीओवीतून. शब्दसृष्टीच्या अलौकिक किमयेतून नाट्य उभे राहते. ‘विश्वाचे, आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेंचि झाले देह ब्रह्म’ असा विश्वकल्याणाचा महन्मंगल महान विचार ज्ञानेश्वर महाराज मांडतात. भारतीय संस्कृतीशी निगडित दृष्टांत, प्रतीके, जीवनाचा अर्थ, कल्पनाशक्ती, रसाळपणा, माधुर्य, सूक्ष्म अर्थछटा, अर्थाची श्रीमंती या हृदय हेलावून टाकणाऱ्या ज्ञानेश्वरीशी लेखकाचा आत्मा एकरूप झाला आहे. ‘मृत्युंजय’ ने लेखकास मराठी साहित्यात एक वेगळे स्थान प्राप्त झाले. या साहित्यकृतीची भाषांतरे झाली. महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे सूक्ष्म चित्रण, सखोल चिंतन, व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा आग्रह यामुळे मृत्युंजय एका वेगळ्या उंचीवर पोचले आहे. मात्र याच मृत्युंजयची दूरदर्शनने केलेली दुर्दशा पाहून लेखकाचे मन खंतावते. आपल्या अभ्यासपूर्ण चिंतनशीलतेतून केलेले चित्रण वास्तव भासते. वास्तव व कल्पित यांच्यातील सीमारेषा रुंदावल्या की व्यक्तिरेखेतील प्राणच निघून जातो. हे त्याने सोदाहरण स्पष्ट करतात. ‘गोदीच्या किनाऱ्यावर’ मध्ये लेखक १९४२ चे मंतरलेले दिवस वाचकांच्या नजरेसमोर उभे करतो. राष्ट्रप्रेमाने भारावून गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याने एक क्रांतिकारी वळण घेतले होते. महात्मा गांधी, पं.नेहरू, राजेंद्रबाबू, जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, वसंतदादा पाटील, आचार्य कृपलानी, स्वा.सावरकर, अच्युतराव पटवर्धन, इंदिरा गांधी अशा नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी जे अपार कष्ट उपसले त्याचा उल्लेख आहे. स्वातंत्र्यानंतरचा भारत, गांधी हत्येनंतरचा भारत, जनसामान्यांची मानसिकता, सामाजिक समस्या, उपेक्षितांची दैन्यावस्था यांचे विश्लेषण केले आहे. भाई मनोहर कोतवालांचे ‘पाम व्ह्यू’ तील दिवस, कामगारांसाठी केलेला संघर्ष, लढा, त्यांना मिळवून दिलेला न्याय या त्यांच्या महत्त्वपूर्ण जीवनकार्याचा गुणगौरव लेखकाने विस्तृतपणे केला आहे. इतिहासातील प्रसिद्ध, पराक्रमी, गुणी, मुत्सद्दी व्यक्तींच्या आयुष्यातही वादग्रस्त घटना घडू शकतात. त्यामुळे त्यांचे जीवन झाकोळून जाऊ शकते. त्या व्यक्तिमत्त्वात एक स्खलनशील माणूस सामावलेला असतो. या सत्यावर प्रकाश टाकताना लेखकाने बाजीराव-मस्तानी यांच्यातील हळुवार नातेसबंध व छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्या जीवनातील समान प्रसंगाचा आधार घेतला. राष्ट्रनिष्ठा, पराक्रम, आदर्श राजा हे समान गुण असूनही एका मोहास बळी पडल्याने एका व्यक्तिरेखेचे पतन होते. प्रस्तुत पुस्तकातील अनुभवांचे कांचनकण हृदयात अमोल ठेवा म्हणून साठवून ठेवावेत असे लेखकाच्या खास वैशिष्ट्यांसह हे कांचनकण झळाळून उठतात. कोणत्याही व्यक्तीतील, कलाकृतीतील दिव्यत्वाचा, अलौकिकत्वाचा शोध घेण्याचा लेखकाचा हव्यास या ललित लेखांतून दिसतो. त्यांच्या भावस्पर्शी, हळुवार पण सखोल चिंतनाचा स्पर्श असलेल्या या ललित लेखांचा आस्वाद घेताना हे मनात दरवळत राहते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more