* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KANCHANKAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666946
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHIVAJI SAWANT COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`KANCHAN` IN MARATHI MEANS GOLD. THIS COLLECTION IS NAMED SO AS IT CONSISTS OF MANY GOLD MOMENTS WOVEN TOGETHER IN THE ARTISTIC STYLE BY SHIVAJI SAWANT. HE TOUCHES VERY GENTLY THE TENDEREST AND PECULIAR MOMENTS OF THE LIVES OF CHAATRAPATI SHIVAJI MAHARAJ AND FIRST BAJIRAO PESHWA. HE IS ALSO BLESSED BY SOME OF THE PROMINENT MAHARASHTRIANS LIKE ACHARYA ATRE, ANNA ALIAS G.D.MADGULKAR AND THE GREAT MUSICIAN VASANT DESAI. SOMEWHERE THE AUTHOR HAS SUCCEEDED IN BRINGING FORTH THE LIFESTYLE OF THE PEOPLE`S MAN, BHAI MANOHAR KOTWAL, WHO GAVE A NEW DIMENSION TO THE FIGHT OF THE DOCK WORKERS. THE ARTICLES BASED ON DNYANESHWAR ARE THE MOST SALIENT FEATURE OF THIS COLLECTION. ONE MUST ENJOY THEM IN A PEACEFUL SURROUNDING. THE READERS WILL SURELY BE TEMPTED TO STORE THESE GOLDEN MOMENTS IN THEIR TREASURY.
साहित्याला `कांचनाचं` म्हणजे सोन्याचं मोल देणाऱ्या शिवाजी सावंत (`मृत्युंजय`कार) यांच्या विविध ललित लेखांचा हा भावसंच. खास त्यांच्या लेखनशैलीतील. अभिजात मराठी भाषेची जागोजाग भेट घडविणारा. या संचात छ. शिवराय व वीर थोरले बाजीराव पेशवे यांच्या विक्रमी, तशाच, भावसमृद्ध जीवनाच्या तळवटाला केलेला हळुवार स्पर्श भेटेल. आ. अत्रे, अण्णा (ग.दि.मा.) व अमरकीर्त, थोर संगीतकार वसंत देसाई यांचे त्यांना लाभलेले अनमोल आशीर्वाद दिसतील. तसेच, एरव्ही दुर्लक्षित गोदी कामगाराला सच्चा जीवनार्थ प्राप्त करून देणारे झुंजार व लढाऊ नेते भाई मनोहर कोतवाल यांच्या विविध जीवनछटा दिसतील. विशेषत: ज्ञानेश्वरांवर भावएकरूपता साधून बांधलेला, `विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!` व `एकतरी ओवी अनुभवावी!` असे दोन लेख आहेत. ते तर शांत चित्ती चवीनं चाखण्यासारखे आहेत. साहित्य सोनियाची समृद्ध खाण असलेल्या मायमराठीत हे `कांचनकण` अलवार हातांनी उचलून ठेवावेत, असे वाचकांनाच वाटेल.

No Records Found
No Records Found
Keywords
#ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR #KANCHANKAN #SHIVAJI #SAWANT #DIWAS #CHAVYACHE #DADA #TE #TIN #AASHIRVAD #KALAWANTNAGARI #KOLHAPUR #KULSWAMINI #कांचनकण #शिवाजी #सावंत #दिवस #छाव्याचे #दादा #ते #तीन #आशीर्वाद #कलावंतनगरी #कोल्हापूर #कुलस्वामिनी#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 21-03-1999

    ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत हे मराठी साहित्यातील सिद्धहस्त लेखक. साहित्याशी जिवाशिवाचे नाते जडलेल्या सावंतांनी उत्तुंग व्यक्तिरेखांना कांचनाच्या कोंदणात बद्ध केले. त्यांच्या साहित्यकृतीच्या आकृतिबंधात उदात्ततेचा साक्षात्कार, सखोल चिंतन व श्रद्धाळू मनजाणवत राहते. ‘कांचनकण’ या ललित लेखात विविध विषयांवरचं त्यांचं मुक्त चिंतन आहे. आदरणीय व्यक्तींच्या स्मृती, पूजनीय व्यक्तींच्या स्मृती आहेत. व्यक्तिगत जीवनाशी निगडित घटना, उपेक्षितांसाठी लढा देणाऱ्याची चरित्रकहाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांवरील, ज्ञानेश्वरीवरील चिंतनमय, रसाळ लेख, ‘मृत्युंजय’ च्या संदर्भातील दूरदर्शनचे दुर्दर्शन, कलावंतनगरी - उद्यमनगरी कोल्हापूरचे वर्णन, बाजीराव - मस्तानी ही वादग्रस्त ऐतिहासिक घटना अशी विषयांची विविधता प्रस्तुत पुस्तकात आढळते. ‘दिवस छाव्या’ चे या लेखात संभाजी राजें सारख्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाला योग्य न्याय मिळावा म्हणून केलेली जिवापाड मेहनत, धडपड लेखक सांगतो. झपाटलेल्या अवस्थेत असंख्य गडकोटांची केलेली पायपीट, दहा वर्षे ऐतिहासिक संदर्भग्रंथांचा केलेला अभ्यास अशा अथक परिश्रांतून डोळसपणे त्यांनी व्यक्तिरेखा उभी केली. संभाजीराजेंचे राष्ट्रप्रेम, अपूर्व बलिदान त्यांच्या दोषांमुळे झाकोळून जाऊ नये म्हणून केलेले श्रम त्यासाठी मृत्यूलाही सामोरे जाण्याची जिद्द दिसते. सहचारिणी, मित्रपरिवार यांचं पाठबळ, जगदंबेने दिलेले मनोबल यामुळे मिळालेले यश व कुसुमाग्रजांकडून मिळालेली शाबासकीची थाप यात ते धन्यता मानतात. ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करणाऱ्या एका बखरवजा लेखाचा परामर्ष घेताना लेखकाने सत्याचा पाठपुरावा करून बखरवाङ्मयाचा सुप्त अभ्यास केला. शिवप्रभूंसारख्या उत्तुंग, पूजनीय, सकलागुणांनी युक्त अशा नृपश्रेष्ठांचे चारित्र्यहनन व राणीच्या नावाला लागलेला कलंक असह्य होऊन लेखकाने बखरीतील अवास्तव, रंजकतेचा मुलामा चढवलेला असत्यास वाचा फोडून ऐतिहासिक घटनेचा अपलाप करणाऱ्या घटनेवर प्रकाश टाकलाय. ‘कुलस्वामिनी’ या लेखात आदिशक्ती, आदिमातेचा महिमा, आदिशक्तीची तीन शक्तिपीठे, विविध रूपे, जागृत दैवते, त्यांचे माहात्म्य, त्यांच्यावरील श्रद्धा, जगन्मातेची विविध रूपे, प्रेरणाशक्ती, निरनिराळ्या प्रसंगी कारणपरत्वे धारण केलेली रूपे यांचा उल्लेख आहे. कलावंतनगरी कोल्हापूरचे ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध रंगांचे आंतर्बाह्य रूप उलगडून दाखवताना त्या शहराशी असलेली लेखकाची भावनिक जवळीक जाणवते. श्रीकृष्णासारख्या अवतारी पुरुषश्रेष्ठांची भूमी (पौराणिक संदर्भ), राजर्षी शाहू महाराजांसारखा प्रजाहितदक्ष, प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा, राज्याच्या जनतेच्या सर्वांगीण हितासाठी झटणारा राजा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोल्हापूरचे सुपुत्र वि.स.खांडेकर, नाट्यचित्रपट कलावंत, शैक्षणिक क्षेत्रातील महारथी अशी वैभवशाली परंपरा वर्णिताना लेखक रंगून जातो. कला, क्रीडा, उद्योगव्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत अग्रगण्य असलेले कोल्हापूर या शहराने महाराष्ट्रास उदंड दिले. त्या शहराबद्दलची आत्मीयता, अभिमान व्यक्त होतो. छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंह यांच्यामधील समरप्रसंगावरील संवादातून एका श्रीमान योग्याचे मर्मस्पर्शी चित्रण अरविंदबाबू घोष या सिद्धपुरुषाने केले आहे. अरविंदबाबूंबद्दलचा आदरही प्रस्तुत लेखात व्यक्त झाला आहे. ज्ञानेश्वरीतील साहित्य सोनेचिया खाणीतील अनमोल रत्नांचा खजिनाच ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या विवेचनपर लेखात वाचकांसाठी उघडा केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या कवित्वशक्तीचा साक्षात्कार, त्यांची अलौकिक प्रतिभा, तत्त्वज्ञान, शब्दसृष्टीच्या सामर्थ्यावर उभी केलेली प्रतिमासृष्टी त्यातून भावाशयाचे नवनवे पदर तरलपणे उलगडत जातात. या महाकवीच्या अनुभवविश्वाचे अफाट, विशाल सामर्थ्य प्रकटते त्याच्या प्रत्येक ओवीओवीतून. शब्दसृष्टीच्या अलौकिक किमयेतून नाट्य उभे राहते. ‘विश्वाचे, आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेंचि झाले देह ब्रह्म’ असा विश्वकल्याणाचा महन्मंगल महान विचार ज्ञानेश्वर महाराज मांडतात. भारतीय संस्कृतीशी निगडित दृष्टांत, प्रतीके, जीवनाचा अर्थ, कल्पनाशक्ती, रसाळपणा, माधुर्य, सूक्ष्म अर्थछटा, अर्थाची श्रीमंती या हृदय हेलावून टाकणाऱ्या ज्ञानेश्वरीशी लेखकाचा आत्मा एकरूप झाला आहे. ‘मृत्युंजय’ ने लेखकास मराठी साहित्यात एक वेगळे स्थान प्राप्त झाले. या साहित्यकृतीची भाषांतरे झाली. महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे सूक्ष्म चित्रण, सखोल चिंतन, व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा आग्रह यामुळे मृत्युंजय एका वेगळ्या उंचीवर पोचले आहे. मात्र याच मृत्युंजयची दूरदर्शनने केलेली दुर्दशा पाहून लेखकाचे मन खंतावते. आपल्या अभ्यासपूर्ण चिंतनशीलतेतून केलेले चित्रण वास्तव भासते. वास्तव व कल्पित यांच्यातील सीमारेषा रुंदावल्या की व्यक्तिरेखेतील प्राणच निघून जातो. हे त्याने सोदाहरण स्पष्ट करतात. ‘गोदीच्या किनाऱ्यावर’ मध्ये लेखक १९४२ चे मंतरलेले दिवस वाचकांच्या नजरेसमोर उभे करतो. राष्ट्रप्रेमाने भारावून गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याने एक क्रांतिकारी वळण घेतले होते. महात्मा गांधी, पं.नेहरू, राजेंद्रबाबू, जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, वसंतदादा पाटील, आचार्य कृपलानी, स्वा.सावरकर, अच्युतराव पटवर्धन, इंदिरा गांधी अशा नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी जे अपार कष्ट उपसले त्याचा उल्लेख आहे. स्वातंत्र्यानंतरचा भारत, गांधी हत्येनंतरचा भारत, जनसामान्यांची मानसिकता, सामाजिक समस्या, उपेक्षितांची दैन्यावस्था यांचे विश्लेषण केले आहे. भाई मनोहर कोतवालांचे ‘पाम व्ह्यू’ तील दिवस, कामगारांसाठी केलेला संघर्ष, लढा, त्यांना मिळवून दिलेला न्याय या त्यांच्या महत्त्वपूर्ण जीवनकार्याचा गुणगौरव लेखकाने विस्तृतपणे केला आहे. इतिहासातील प्रसिद्ध, पराक्रमी, गुणी, मुत्सद्दी व्यक्तींच्या आयुष्यातही वादग्रस्त घटना घडू शकतात. त्यामुळे त्यांचे जीवन झाकोळून जाऊ शकते. त्या व्यक्तिमत्त्वात एक स्खलनशील माणूस सामावलेला असतो. या सत्यावर प्रकाश टाकताना लेखकाने बाजीराव-मस्तानी यांच्यातील हळुवार नातेसबंध व छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्या जीवनातील समान प्रसंगाचा आधार घेतला. राष्ट्रनिष्ठा, पराक्रम, आदर्श राजा हे समान गुण असूनही एका मोहास बळी पडल्याने एका व्यक्तिरेखेचे पतन होते. प्रस्तुत पुस्तकातील अनुभवांचे कांचनकण हृदयात अमोल ठेवा म्हणून साठवून ठेवावेत असे लेखकाच्या खास वैशिष्ट्यांसह हे कांचनकण झळाळून उठतात. कोणत्याही व्यक्तीतील, कलाकृतीतील दिव्यत्वाचा, अलौकिकत्वाचा शोध घेण्याचा लेखकाचा हव्यास या ललित लेखांतून दिसतो. त्यांच्या भावस्पर्शी, हळुवार पण सखोल चिंतनाचा स्पर्श असलेल्या या ललित लेखांचा आस्वाद घेताना हे मनात दरवळत राहते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more