* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KANCHANKAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666946
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHIVAJI SAWANT COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`KANCHAN` IN MARATHI MEANS GOLD. THIS COLLECTION IS NAMED SO AS IT CONSISTS OF MANY GOLD MOMENTS WOVEN TOGETHER IN THE ARTISTIC STYLE BY SHIVAJI SAWANT. HE TOUCHES VERY GENTLY THE TENDEREST AND PECULIAR MOMENTS OF THE LIVES OF CHAATRAPATI SHIVAJI MAHARAJ AND FIRST BAJIRAO PESHWA. HE IS ALSO BLESSED BY SOME OF THE PROMINENT MAHARASHTRIANS LIKE ACHARYA ATRE, ANNA ALIAS G.D.MADGULKAR AND THE GREAT MUSICIAN VASANT DESAI. SOMEWHERE THE AUTHOR HAS SUCCEEDED IN BRINGING FORTH THE LIFESTYLE OF THE PEOPLE`S MAN, BHAI MANOHAR KOTWAL, WHO GAVE A NEW DIMENSION TO THE FIGHT OF THE DOCK WORKERS. THE ARTICLES BASED ON DNYANESHWAR ARE THE MOST SALIENT FEATURE OF THIS COLLECTION. ONE MUST ENJOY THEM IN A PEACEFUL SURROUNDING. THE READERS WILL SURELY BE TEMPTED TO STORE THESE GOLDEN MOMENTS IN THEIR TREASURY.
साहित्याला `कांचनाचं` म्हणजे सोन्याचं मोल देणाऱ्या शिवाजी सावंत (`मृत्युंजय`कार) यांच्या विविध ललित लेखांचा हा भावसंच. खास त्यांच्या लेखनशैलीतील. अभिजात मराठी भाषेची जागोजाग भेट घडविणारा. या संचात छ. शिवराय व वीर थोरले बाजीराव पेशवे यांच्या विक्रमी, तशाच, भावसमृद्ध जीवनाच्या तळवटाला केलेला हळुवार स्पर्श भेटेल. आ. अत्रे, अण्णा (ग.दि.मा.) व अमरकीर्त, थोर संगीतकार वसंत देसाई यांचे त्यांना लाभलेले अनमोल आशीर्वाद दिसतील. तसेच, एरव्ही दुर्लक्षित गोदी कामगाराला सच्चा जीवनार्थ प्राप्त करून देणारे झुंजार व लढाऊ नेते भाई मनोहर कोतवाल यांच्या विविध जीवनछटा दिसतील. विशेषत: ज्ञानेश्वरांवर भावएकरूपता साधून बांधलेला, `विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!` व `एकतरी ओवी अनुभवावी!` असे दोन लेख आहेत. ते तर शांत चित्ती चवीनं चाखण्यासारखे आहेत. साहित्य सोनियाची समृद्ध खाण असलेल्या मायमराठीत हे `कांचनकण` अलवार हातांनी उचलून ठेवावेत, असे वाचकांनाच वाटेल.

No Records Found
No Records Found
Keywords
#ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR #KANCHANKAN #SHIVAJI #SAWANT #DIWAS #CHAVYACHE #DADA #TE #TIN #AASHIRVAD #KALAWANTNAGARI #KOLHAPUR #KULSWAMINI #कांचनकण #शिवाजी #सावंत #दिवस #छाव्याचे #दादा #ते #तीन #आशीर्वाद #कलावंतनगरी #कोल्हापूर #कुलस्वामिनी#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 21-03-1999

    ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत हे मराठी साहित्यातील सिद्धहस्त लेखक. साहित्याशी जिवाशिवाचे नाते जडलेल्या सावंतांनी उत्तुंग व्यक्तिरेखांना कांचनाच्या कोंदणात बद्ध केले. त्यांच्या साहित्यकृतीच्या आकृतिबंधात उदात्ततेचा साक्षात्कार, सखोल चिंतन व श्रद्धाळू मनजाणवत राहते. ‘कांचनकण’ या ललित लेखात विविध विषयांवरचं त्यांचं मुक्त चिंतन आहे. आदरणीय व्यक्तींच्या स्मृती, पूजनीय व्यक्तींच्या स्मृती आहेत. व्यक्तिगत जीवनाशी निगडित घटना, उपेक्षितांसाठी लढा देणाऱ्याची चरित्रकहाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांवरील, ज्ञानेश्वरीवरील चिंतनमय, रसाळ लेख, ‘मृत्युंजय’ च्या संदर्भातील दूरदर्शनचे दुर्दर्शन, कलावंतनगरी - उद्यमनगरी कोल्हापूरचे वर्णन, बाजीराव - मस्तानी ही वादग्रस्त ऐतिहासिक घटना अशी विषयांची विविधता प्रस्तुत पुस्तकात आढळते. ‘दिवस छाव्या’ चे या लेखात संभाजी राजें सारख्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाला योग्य न्याय मिळावा म्हणून केलेली जिवापाड मेहनत, धडपड लेखक सांगतो. झपाटलेल्या अवस्थेत असंख्य गडकोटांची केलेली पायपीट, दहा वर्षे ऐतिहासिक संदर्भग्रंथांचा केलेला अभ्यास अशा अथक परिश्रांतून डोळसपणे त्यांनी व्यक्तिरेखा उभी केली. संभाजीराजेंचे राष्ट्रप्रेम, अपूर्व बलिदान त्यांच्या दोषांमुळे झाकोळून जाऊ नये म्हणून केलेले श्रम त्यासाठी मृत्यूलाही सामोरे जाण्याची जिद्द दिसते. सहचारिणी, मित्रपरिवार यांचं पाठबळ, जगदंबेने दिलेले मनोबल यामुळे मिळालेले यश व कुसुमाग्रजांकडून मिळालेली शाबासकीची थाप यात ते धन्यता मानतात. ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करणाऱ्या एका बखरवजा लेखाचा परामर्ष घेताना लेखकाने सत्याचा पाठपुरावा करून बखरवाङ्मयाचा सुप्त अभ्यास केला. शिवप्रभूंसारख्या उत्तुंग, पूजनीय, सकलागुणांनी युक्त अशा नृपश्रेष्ठांचे चारित्र्यहनन व राणीच्या नावाला लागलेला कलंक असह्य होऊन लेखकाने बखरीतील अवास्तव, रंजकतेचा मुलामा चढवलेला असत्यास वाचा फोडून ऐतिहासिक घटनेचा अपलाप करणाऱ्या घटनेवर प्रकाश टाकलाय. ‘कुलस्वामिनी’ या लेखात आदिशक्ती, आदिमातेचा महिमा, आदिशक्तीची तीन शक्तिपीठे, विविध रूपे, जागृत दैवते, त्यांचे माहात्म्य, त्यांच्यावरील श्रद्धा, जगन्मातेची विविध रूपे, प्रेरणाशक्ती, निरनिराळ्या प्रसंगी कारणपरत्वे धारण केलेली रूपे यांचा उल्लेख आहे. कलावंतनगरी कोल्हापूरचे ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध रंगांचे आंतर्बाह्य रूप उलगडून दाखवताना त्या शहराशी असलेली लेखकाची भावनिक जवळीक जाणवते. श्रीकृष्णासारख्या अवतारी पुरुषश्रेष्ठांची भूमी (पौराणिक संदर्भ), राजर्षी शाहू महाराजांसारखा प्रजाहितदक्ष, प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा, राज्याच्या जनतेच्या सर्वांगीण हितासाठी झटणारा राजा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोल्हापूरचे सुपुत्र वि.स.खांडेकर, नाट्यचित्रपट कलावंत, शैक्षणिक क्षेत्रातील महारथी अशी वैभवशाली परंपरा वर्णिताना लेखक रंगून जातो. कला, क्रीडा, उद्योगव्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांत अग्रगण्य असलेले कोल्हापूर या शहराने महाराष्ट्रास उदंड दिले. त्या शहराबद्दलची आत्मीयता, अभिमान व्यक्त होतो. छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंह यांच्यामधील समरप्रसंगावरील संवादातून एका श्रीमान योग्याचे मर्मस्पर्शी चित्रण अरविंदबाबू घोष या सिद्धपुरुषाने केले आहे. अरविंदबाबूंबद्दलचा आदरही प्रस्तुत लेखात व्यक्त झाला आहे. ज्ञानेश्वरीतील साहित्य सोनेचिया खाणीतील अनमोल रत्नांचा खजिनाच ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या विवेचनपर लेखात वाचकांसाठी उघडा केला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या कवित्वशक्तीचा साक्षात्कार, त्यांची अलौकिक प्रतिभा, तत्त्वज्ञान, शब्दसृष्टीच्या सामर्थ्यावर उभी केलेली प्रतिमासृष्टी त्यातून भावाशयाचे नवनवे पदर तरलपणे उलगडत जातात. या महाकवीच्या अनुभवविश्वाचे अफाट, विशाल सामर्थ्य प्रकटते त्याच्या प्रत्येक ओवीओवीतून. शब्दसृष्टीच्या अलौकिक किमयेतून नाट्य उभे राहते. ‘विश्वाचे, आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेंचि झाले देह ब्रह्म’ असा विश्वकल्याणाचा महन्मंगल महान विचार ज्ञानेश्वर महाराज मांडतात. भारतीय संस्कृतीशी निगडित दृष्टांत, प्रतीके, जीवनाचा अर्थ, कल्पनाशक्ती, रसाळपणा, माधुर्य, सूक्ष्म अर्थछटा, अर्थाची श्रीमंती या हृदय हेलावून टाकणाऱ्या ज्ञानेश्वरीशी लेखकाचा आत्मा एकरूप झाला आहे. ‘मृत्युंजय’ ने लेखकास मराठी साहित्यात एक वेगळे स्थान प्राप्त झाले. या साहित्यकृतीची भाषांतरे झाली. महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे सूक्ष्म चित्रण, सखोल चिंतन, व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा आग्रह यामुळे मृत्युंजय एका वेगळ्या उंचीवर पोचले आहे. मात्र याच मृत्युंजयची दूरदर्शनने केलेली दुर्दशा पाहून लेखकाचे मन खंतावते. आपल्या अभ्यासपूर्ण चिंतनशीलतेतून केलेले चित्रण वास्तव भासते. वास्तव व कल्पित यांच्यातील सीमारेषा रुंदावल्या की व्यक्तिरेखेतील प्राणच निघून जातो. हे त्याने सोदाहरण स्पष्ट करतात. ‘गोदीच्या किनाऱ्यावर’ मध्ये लेखक १९४२ चे मंतरलेले दिवस वाचकांच्या नजरेसमोर उभे करतो. राष्ट्रप्रेमाने भारावून गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याने एक क्रांतिकारी वळण घेतले होते. महात्मा गांधी, पं.नेहरू, राजेंद्रबाबू, जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, वसंतदादा पाटील, आचार्य कृपलानी, स्वा.सावरकर, अच्युतराव पटवर्धन, इंदिरा गांधी अशा नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी जे अपार कष्ट उपसले त्याचा उल्लेख आहे. स्वातंत्र्यानंतरचा भारत, गांधी हत्येनंतरचा भारत, जनसामान्यांची मानसिकता, सामाजिक समस्या, उपेक्षितांची दैन्यावस्था यांचे विश्लेषण केले आहे. भाई मनोहर कोतवालांचे ‘पाम व्ह्यू’ तील दिवस, कामगारांसाठी केलेला संघर्ष, लढा, त्यांना मिळवून दिलेला न्याय या त्यांच्या महत्त्वपूर्ण जीवनकार्याचा गुणगौरव लेखकाने विस्तृतपणे केला आहे. इतिहासातील प्रसिद्ध, पराक्रमी, गुणी, मुत्सद्दी व्यक्तींच्या आयुष्यातही वादग्रस्त घटना घडू शकतात. त्यामुळे त्यांचे जीवन झाकोळून जाऊ शकते. त्या व्यक्तिमत्त्वात एक स्खलनशील माणूस सामावलेला असतो. या सत्यावर प्रकाश टाकताना लेखकाने बाजीराव-मस्तानी यांच्यातील हळुवार नातेसबंध व छत्रपती शिवाजी महाराज या दोघांच्या जीवनातील समान प्रसंगाचा आधार घेतला. राष्ट्रनिष्ठा, पराक्रम, आदर्श राजा हे समान गुण असूनही एका मोहास बळी पडल्याने एका व्यक्तिरेखेचे पतन होते. प्रस्तुत पुस्तकातील अनुभवांचे कांचनकण हृदयात अमोल ठेवा म्हणून साठवून ठेवावेत असे लेखकाच्या खास वैशिष्ट्यांसह हे कांचनकण झळाळून उठतात. कोणत्याही व्यक्तीतील, कलाकृतीतील दिव्यत्वाचा, अलौकिकत्वाचा शोध घेण्याचा लेखकाचा हव्यास या ललित लेखांतून दिसतो. त्यांच्या भावस्पर्शी, हळुवार पण सखोल चिंतनाचा स्पर्श असलेल्या या ललित लेखांचा आस्वाद घेताना हे मनात दरवळत राहते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more