* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MATTIR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669022
  • Edition : 2
  • Publishing Year : DECEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 264
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MAHADEO MORE COMBO SET - 18 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE AUTHOR HAS GIVEN HIS CONTRIBUTION TOWARDS THE RURAL, DALIT AND URBAN LITERATURE. STILL, HIS PREFERENCE IS WITHOUT DOUBT TO THE DOWNTRODDEN. HE PRESENTS THEIR PICTURE WITH PERFECTION AND A GREAT CONCERN. YEARS BEFORE THE WORD `DALIT LITERATURE` WAS INTRODUCED TO MARATHI LITERATURE, HE HAD STARTED PENNING DOWN THEIR SUFFERINGS, CAUSING THE MIDDLE CLASS TO STARTLE. HE HAS ALWAYS SUCCEEDED IN PUTTING BEFORE US THE PAIN, AGONY OF THE DEVASTATED MINDS, THEIR SUFFERINGS, IN A VERY GENUINE WAY. HIS WRITING HAS A SERIOUS SIDE BUT HE HANDLES HUMOUR EQUALLY WELL. HE SUCCESSFULLY REVEAL IS THE NATURE OF PEOPLE THROUGH HIS STORIES. THESE NEW FORMAT OF HIS STORIES WILL SURELY ENTERTAIN ALL.
गेली ४७ वर्षे सातत्याने ललित लेखन करीत असलेल्या, उपेक्षित निपाणी सीमा भागातील माणसे व परिसर मराठी साहित्यात अजरामर करून आपल्या गावचा लौकिक गगनावरी नेलेल्या श्री. महादेव मोरे यांच्या ह्या नव्या कथासंग्रहात ९४ ते ०५ सालापर्यंत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या कथांचा समावेश आहे. ग्रामीण, दलित, नागर आदी वाङ्मय प्रकारांना सामावून घेणारे वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केले असले तरी त्यांच्या लेखणीचा खरा ओढा समाजाच्या तळाच्या थरातील भरडल्या जाणाया शोषितांचे जीवन चित्रण करण्याकडे आहे. मराठी साहित्यात ‘दलित साहित्य’ हा शब्दप्रयोग रूढ होण्याच्या कितीतरी वर्षे आधीपासून श्री. अण्णाभाऊ साठे, प्रा. डॉ. शंकरराव खरात, श्री. नारायण सुर्वे आदींच्या बरोबरीने विविध नियतकालिकांतून शोषितांची दु:खे पांढरपेशी संवेदनशीलतेला धक्का देत त्यांनी मांडली आहेत. पांढरपेशी परिघाबाहेर जगणाया किती एक मानव समूहाला शारदेच्या दरबारात आणण्याचे काम त्यांनी ताकदीने केले आहे. पिचलेली, खचलेली माणसे व समाजव्यवस्थेतून आलेले त्यांचे दु:खभोग कुठेही उथळपणा न आणता उत्कट संवेदनशीलतेतून त्यांनी आपल्या साहित्य कृतीतून प्रकट केले आहे. गंभीर लेखनाप्रमाणे गंमतीदार, मिश्कील लेखनातही त्यांनी आपल्या लेखणीची हुकमत सिद्ध केली आहे. आपल्या ह्या मिश्कील कथांद्वारे ते माणसातील आदिम वृत्तीप्रवृत्तींचा मनोज्ञ वेध घेत असल्याचा सुखद प्रत्यय येतो. त्यांची लेखनशैली खास त्यांची स्वत:ची असून तीवर पूर्वसुरींच्या, तसेच त्यांच्या समकालीन कुठल्याही साहित्यिकाची छाप नाही. शेतमजूर, मोटार मेकॅनिक, टॅक्सी ड्रायव्हर असं विविध पातळ्यांवरील जीणं जगत त्यांनी काही वर्षे मिरची पूड तयार करण्याच्या मशीनवरही काम केलं आहे. सत्तरी जवळ आली तरी वृद्ध साहित्यिकांना दिल्या जाणाया सरकारी सन्मानधनाकडे पाठ फिरवून पिठाच्या गिरणीत राबणाया कामगाराचे आयुष्य सन्मानाने जगत मराठीतील कुणा साहित्यिकाला अभावानेच आले असतील असे अनुभव घेत तेच अनोखे, अस्पर्श असे गारुड आपल्या चितरुण लेखणीतून ते प्रकट करीत असतात. गंभीर गंमतीदार अशा ‘मत्तीर’ मधील त्यांच्या ह्या नव्या व्यामिश्र कथा रसिक वाचकांना नक्कीच भावतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #EGIN #MATTIR # CHITAK #MANASA-ASHIHI #KONDVADA #PANIKUTHAVARALAAHE #MAHADEOMORE
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL - 25-10-2008

    महादेव मोरे यांनी ग्रामीण जीवनाचे चित्रण त्यांच्या कथांमधून केलेले आहे. अगदी छोट्याश्या खेडेगावातील खरं म्हणजे ते वाडीसारखे पाचपन्नास घरे असलेले कोणतीही वैशिष्ट्यपूर्णता नसलेले, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, बहुतेक माणसं रोजंदारीवर काम करणारी आजच्या भाषे अकुशल कामगार आहेत. गावात टपरीवजा दुकानं चालवणारी आहेत. अशा जगाचे चित्र त्यांच्या `मत्तीर` या कथा संग्रहात आलेले आहे. थोडंफार शिकलेल्या पण बहुधा अशिक्षित असलेल्या माणसाचं जग रंगविताना, लेखक त्यांची मानसिकता कशी आहे हे दाखविण्यावर अधिक भर देतो. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ हे जडविकार या माणसांच्या जगण्यामध्ये कोणत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि कसे व्यक्त होतात, याच्यावर लेखक अधिक भर देतो. नवऱ्याने बाईला मारणे, तिच्यावर शारिरिक अत्याचार करणे, कधी परस्पर तिला देहविक्रय करण्याच्या वाटेवर आणून सोडणे, अशिक्षित स्त्रीचे शरीर आणि रंग-रूप महत्वाचे मानण भोवतालच्या आंबटशौकीन पुरुषांचे जग या कथांमध्ये दिसते. गावात पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या नामी जोडीने जत्रेत कुस्तीचा खेळ ठरविण्याच्या निमित्ताने गावकऱ्याचा पैसा खाणे, लुटुपुटीच्या दरोड्याचा प्रसंग घडवून पट्रोल पंपावर काम करणाऱ्या माणसांनी पैसे लंपास करणे, अशा प्रसंगातून गावातील रिकामटोळ माणसं, त्यांचा बनेलपणा यांचं दर्शन लेखक घडवतो. आजही महाराष्ट्रात वा भारतातल्या कोणत्याही मागास खेडेगावात औद्योगिक विकासाचे शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे वारे न पोचलेल्या माणसांचे जगणे त्यांच्या पंचक्रोशीपुरतेच बंदिस्त आहे. तिथे बऱ्याचदा कमी कष्टांचे, सोपा मार्ग म्हणून फसवेगिरी करणे स्वाभाविक समजले जाते. याला अपवाद असणारी माणसे तिथेही असणारचं; परंतु या कथासंग्रहात माणसातल्या दुर्गुणांचे विकारात भडक चित्रण आलेले आहे. हे उघडेवागडे चित्रण लेखक स्वत:च एन्जॉय करत आहे, असे कथानिवेदन वाचताना जाणवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more