* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MATTIR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669022
  • Edition : 2
  • Publishing Year : DECEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 264
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MAHADEV MORE COMBO SET - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE AUTHOR HAS GIVEN HIS CONTRIBUTION TOWARDS THE RURAL, DALIT AND URBAN LITERATURE. STILL, HIS PREFERENCE IS WITHOUT DOUBT TO THE DOWNTRODDEN. HE PRESENTS THEIR PICTURE WITH PERFECTION AND A GREAT CONCERN. YEARS BEFORE THE WORD `DALIT LITERATURE` WAS INTRODUCED TO MARATHI LITERATURE, HE HAD STARTED PENNING DOWN THEIR SUFFERINGS, CAUSING THE MIDDLE CLASS TO STARTLE. HE HAS ALWAYS SUCCEEDED IN PUTTING BEFORE US THE PAIN, AGONY OF THE DEVASTATED MINDS, THEIR SUFFERINGS, IN A VERY GENUINE WAY. HIS WRITING HAS A SERIOUS SIDE BUT HE HANDLES HUMOUR EQUALLY WELL. HE SUCCESSFULLY REVEAL IS THE NATURE OF PEOPLE THROUGH HIS STORIES. THESE NEW FORMAT OF HIS STORIES WILL SURELY ENTERTAIN ALL.
गेली ४७ वर्षे सातत्याने ललित लेखन करीत असलेल्या, उपेक्षित निपाणी सीमा भागातील माणसे व परिसर मराठी साहित्यात अजरामर करून आपल्या गावचा लौकिक गगनावरी नेलेल्या श्री. महादेव मोरे यांच्या ह्या नव्या कथासंग्रहात ९४ ते ०५ सालापर्यंत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या कथांचा समावेश आहे. ग्रामीण, दलित, नागर आदी वाङ्मय प्रकारांना सामावून घेणारे वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केले असले तरी त्यांच्या लेखणीचा खरा ओढा समाजाच्या तळाच्या थरातील भरडल्या जाणाया शोषितांचे जीवन चित्रण करण्याकडे आहे. मराठी साहित्यात ‘दलित साहित्य’ हा शब्दप्रयोग रूढ होण्याच्या कितीतरी वर्षे आधीपासून श्री. अण्णाभाऊ साठे, प्रा. डॉ. शंकरराव खरात, श्री. नारायण सुर्वे आदींच्या बरोबरीने विविध नियतकालिकांतून शोषितांची दु:खे पांढरपेशी संवेदनशीलतेला धक्का देत त्यांनी मांडली आहेत. पांढरपेशी परिघाबाहेर जगणाया किती एक मानव समूहाला शारदेच्या दरबारात आणण्याचे काम त्यांनी ताकदीने केले आहे. पिचलेली, खचलेली माणसे व समाजव्यवस्थेतून आलेले त्यांचे दु:खभोग कुठेही उथळपणा न आणता उत्कट संवेदनशीलतेतून त्यांनी आपल्या साहित्य कृतीतून प्रकट केले आहे. गंभीर लेखनाप्रमाणे गंमतीदार, मिश्कील लेखनातही त्यांनी आपल्या लेखणीची हुकमत सिद्ध केली आहे. आपल्या ह्या मिश्कील कथांद्वारे ते माणसातील आदिम वृत्तीप्रवृत्तींचा मनोज्ञ वेध घेत असल्याचा सुखद प्रत्यय येतो. त्यांची लेखनशैली खास त्यांची स्वत:ची असून तीवर पूर्वसुरींच्या, तसेच त्यांच्या समकालीन कुठल्याही साहित्यिकाची छाप नाही. शेतमजूर, मोटार मेकॅनिक, टॅक्सी ड्रायव्हर असं विविध पातळ्यांवरील जीणं जगत त्यांनी काही वर्षे मिरची पूड तयार करण्याच्या मशीनवरही काम केलं आहे. सत्तरी जवळ आली तरी वृद्ध साहित्यिकांना दिल्या जाणाया सरकारी सन्मानधनाकडे पाठ फिरवून पिठाच्या गिरणीत राबणाया कामगाराचे आयुष्य सन्मानाने जगत मराठीतील कुणा साहित्यिकाला अभावानेच आले असतील असे अनुभव घेत तेच अनोखे, अस्पर्श असे गारुड आपल्या चितरुण लेखणीतून ते प्रकट करीत असतात. गंभीर गंमतीदार अशा ‘मत्तीर’ मधील त्यांच्या ह्या नव्या व्यामिश्र कथा रसिक वाचकांना नक्कीच भावतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #EGIN #MATTIR # CHITAK #MANASA-ASHIHI #KONDVADA #PANIKUTHAVARALAAHE #MAHADEOMORE
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL - 25-10-2008

    महादेव मोरे यांनी ग्रामीण जीवनाचे चित्रण त्यांच्या कथांमधून केलेले आहे. अगदी छोट्याश्या खेडेगावातील खरं म्हणजे ते वाडीसारखे पाचपन्नास घरे असलेले कोणतीही वैशिष्ट्यपूर्णता नसलेले, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, बहुतेक माणसं रोजंदारीवर काम करणारी आजच्या भाषे अकुशल कामगार आहेत. गावात टपरीवजा दुकानं चालवणारी आहेत. अशा जगाचे चित्र त्यांच्या `मत्तीर` या कथा संग्रहात आलेले आहे. थोडंफार शिकलेल्या पण बहुधा अशिक्षित असलेल्या माणसाचं जग रंगविताना, लेखक त्यांची मानसिकता कशी आहे हे दाखविण्यावर अधिक भर देतो. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ हे जडविकार या माणसांच्या जगण्यामध्ये कोणत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि कसे व्यक्त होतात, याच्यावर लेखक अधिक भर देतो. नवऱ्याने बाईला मारणे, तिच्यावर शारिरिक अत्याचार करणे, कधी परस्पर तिला देहविक्रय करण्याच्या वाटेवर आणून सोडणे, अशिक्षित स्त्रीचे शरीर आणि रंग-रूप महत्वाचे मानण भोवतालच्या आंबटशौकीन पुरुषांचे जग या कथांमध्ये दिसते. गावात पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या नामी जोडीने जत्रेत कुस्तीचा खेळ ठरविण्याच्या निमित्ताने गावकऱ्याचा पैसा खाणे, लुटुपुटीच्या दरोड्याचा प्रसंग घडवून पट्रोल पंपावर काम करणाऱ्या माणसांनी पैसे लंपास करणे, अशा प्रसंगातून गावातील रिकामटोळ माणसं, त्यांचा बनेलपणा यांचं दर्शन लेखक घडवतो. आजही महाराष्ट्रात वा भारतातल्या कोणत्याही मागास खेडेगावात औद्योगिक विकासाचे शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे वारे न पोचलेल्या माणसांचे जगणे त्यांच्या पंचक्रोशीपुरतेच बंदिस्त आहे. तिथे बऱ्याचदा कमी कष्टांचे, सोपा मार्ग म्हणून फसवेगिरी करणे स्वाभाविक समजले जाते. याला अपवाद असणारी माणसे तिथेही असणारचं; परंतु या कथासंग्रहात माणसातल्या दुर्गुणांचे विकारात भडक चित्रण आलेले आहे. हे उघडेवागडे चित्रण लेखक स्वत:च एन्जॉय करत आहे, असे कथानिवेदन वाचताना जाणवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो