* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MATTIR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669022
  • Edition : 2
  • Publishing Year : DECEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 264
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MAHADEV MORE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE AUTHOR HAS GIVEN HIS CONTRIBUTION TOWARDS THE RURAL, DALIT AND URBAN LITERATURE. STILL, HIS PREFERENCE IS WITHOUT DOUBT TO THE DOWNTRODDEN. HE PRESENTS THEIR PICTURE WITH PERFECTION AND A GREAT CONCERN. YEARS BEFORE THE WORD `DALIT LITERATURE` WAS INTRODUCED TO MARATHI LITERATURE, HE HAD STARTED PENNING DOWN THEIR SUFFERINGS, CAUSING THE MIDDLE CLASS TO STARTLE. HE HAS ALWAYS SUCCEEDED IN PUTTING BEFORE US THE PAIN, AGONY OF THE DEVASTATED MINDS, THEIR SUFFERINGS, IN A VERY GENUINE WAY. HIS WRITING HAS A SERIOUS SIDE BUT HE HANDLES HUMOUR EQUALLY WELL. HE SUCCESSFULLY REVEAL IS THE NATURE OF PEOPLE THROUGH HIS STORIES. THESE NEW FORMAT OF HIS STORIES WILL SURELY ENTERTAIN ALL.
गेली ४७ वर्षे सातत्याने ललित लेखन करीत असलेल्या, उपेक्षित निपाणी सीमा भागातील माणसे व परिसर मराठी साहित्यात अजरामर करून आपल्या गावचा लौकिक गगनावरी नेलेल्या श्री. महादेव मोरे यांच्या ह्या नव्या कथासंग्रहात ९४ ते ०५ सालापर्यंत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या कथांचा समावेश आहे. ग्रामीण, दलित, नागर आदी वाङ्मय प्रकारांना सामावून घेणारे वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केले असले तरी त्यांच्या लेखणीचा खरा ओढा समाजाच्या तळाच्या थरातील भरडल्या जाणाया शोषितांचे जीवन चित्रण करण्याकडे आहे. मराठी साहित्यात ‘दलित साहित्य’ हा शब्दप्रयोग रूढ होण्याच्या कितीतरी वर्षे आधीपासून श्री. अण्णाभाऊ साठे, प्रा. डॉ. शंकरराव खरात, श्री. नारायण सुर्वे आदींच्या बरोबरीने विविध नियतकालिकांतून शोषितांची दु:खे पांढरपेशी संवेदनशीलतेला धक्का देत त्यांनी मांडली आहेत. पांढरपेशी परिघाबाहेर जगणाया किती एक मानव समूहाला शारदेच्या दरबारात आणण्याचे काम त्यांनी ताकदीने केले आहे. पिचलेली, खचलेली माणसे व समाजव्यवस्थेतून आलेले त्यांचे दु:खभोग कुठेही उथळपणा न आणता उत्कट संवेदनशीलतेतून त्यांनी आपल्या साहित्य कृतीतून प्रकट केले आहे. गंभीर लेखनाप्रमाणे गंमतीदार, मिश्कील लेखनातही त्यांनी आपल्या लेखणीची हुकमत सिद्ध केली आहे. आपल्या ह्या मिश्कील कथांद्वारे ते माणसातील आदिम वृत्तीप्रवृत्तींचा मनोज्ञ वेध घेत असल्याचा सुखद प्रत्यय येतो. त्यांची लेखनशैली खास त्यांची स्वत:ची असून तीवर पूर्वसुरींच्या, तसेच त्यांच्या समकालीन कुठल्याही साहित्यिकाची छाप नाही. शेतमजूर, मोटार मेकॅनिक, टॅक्सी ड्रायव्हर असं विविध पातळ्यांवरील जीणं जगत त्यांनी काही वर्षे मिरची पूड तयार करण्याच्या मशीनवरही काम केलं आहे. सत्तरी जवळ आली तरी वृद्ध साहित्यिकांना दिल्या जाणाया सरकारी सन्मानधनाकडे पाठ फिरवून पिठाच्या गिरणीत राबणाया कामगाराचे आयुष्य सन्मानाने जगत मराठीतील कुणा साहित्यिकाला अभावानेच आले असतील असे अनुभव घेत तेच अनोखे, अस्पर्श असे गारुड आपल्या चितरुण लेखणीतून ते प्रकट करीत असतात. गंभीर गंमतीदार अशा ‘मत्तीर’ मधील त्यांच्या ह्या नव्या व्यामिश्र कथा रसिक वाचकांना नक्कीच भावतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #EGIN #MATTIR # CHITAK #MANASA-ASHIHI #KONDVADA #PANIKUTHAVARALAAHE #MAHADEOMORE
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL - 25-10-2008

    महादेव मोरे यांनी ग्रामीण जीवनाचे चित्रण त्यांच्या कथांमधून केलेले आहे. अगदी छोट्याश्या खेडेगावातील खरं म्हणजे ते वाडीसारखे पाचपन्नास घरे असलेले कोणतीही वैशिष्ट्यपूर्णता नसलेले, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, बहुतेक माणसं रोजंदारीवर काम करणारी आजच्या भाषे अकुशल कामगार आहेत. गावात टपरीवजा दुकानं चालवणारी आहेत. अशा जगाचे चित्र त्यांच्या `मत्तीर` या कथा संग्रहात आलेले आहे. थोडंफार शिकलेल्या पण बहुधा अशिक्षित असलेल्या माणसाचं जग रंगविताना, लेखक त्यांची मानसिकता कशी आहे हे दाखविण्यावर अधिक भर देतो. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ हे जडविकार या माणसांच्या जगण्यामध्ये कोणत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि कसे व्यक्त होतात, याच्यावर लेखक अधिक भर देतो. नवऱ्याने बाईला मारणे, तिच्यावर शारिरिक अत्याचार करणे, कधी परस्पर तिला देहविक्रय करण्याच्या वाटेवर आणून सोडणे, अशिक्षित स्त्रीचे शरीर आणि रंग-रूप महत्वाचे मानण भोवतालच्या आंबटशौकीन पुरुषांचे जग या कथांमध्ये दिसते. गावात पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या नामी जोडीने जत्रेत कुस्तीचा खेळ ठरविण्याच्या निमित्ताने गावकऱ्याचा पैसा खाणे, लुटुपुटीच्या दरोड्याचा प्रसंग घडवून पट्रोल पंपावर काम करणाऱ्या माणसांनी पैसे लंपास करणे, अशा प्रसंगातून गावातील रिकामटोळ माणसं, त्यांचा बनेलपणा यांचं दर्शन लेखक घडवतो. आजही महाराष्ट्रात वा भारतातल्या कोणत्याही मागास खेडेगावात औद्योगिक विकासाचे शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे वारे न पोचलेल्या माणसांचे जगणे त्यांच्या पंचक्रोशीपुरतेच बंदिस्त आहे. तिथे बऱ्याचदा कमी कष्टांचे, सोपा मार्ग म्हणून फसवेगिरी करणे स्वाभाविक समजले जाते. याला अपवाद असणारी माणसे तिथेही असणारचं; परंतु या कथासंग्रहात माणसातल्या दुर्गुणांचे विकारात भडक चित्रण आलेले आहे. हे उघडेवागडे चित्रण लेखक स्वत:च एन्जॉय करत आहे, असे कथानिवेदन वाचताना जाणवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more