* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984682
  • Edition : 11
  • Publishing Year : JANUARY 1958
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THESE GHOSTS CAN BE FOUND ABSOLUTELY ANYWHERE. NOBODY CAN SWEAR AND SAY THAT THEY ARE NOT FOUND IN SUCH AND SUCH PLACE. THEY ARE CERTAIN TO BE FOUND HAUNTING THE RUINS OF OLD WADAS, WELLS, AND CEMETERIES. THE HADAL LIVES IN WELLS, AND SHE MOVES ABOUT IN THE GUISE OF A BEAUTIFUL WOMAN. THE MUNJA IS SURE TO BE FOUND ON A PEEPUL TREE. AND OF COURSE THE PIMPARNI, BANYAN, AND NEEM TREES ATTRACT LARGE GROUPS OF GHOSTS, JUST LIKE MONKEYS. THEY ARE QUIESCENT DURING DAYTIME, AND THEIR DAY BEGINS AFTER DARK. THEN ONE CAN ENCOUNTER THEM ANYWHERE AND IN ANY GUISE. IT IS SAID THAT THEIR FEET FACE BACKWARDS; BUT THIS IS NOT ALWAYS TRUE. ON NOMOON NIGHTS THEY DEFINITELY PROWL ABOUT. TO BE SEEN BY THEM, OR EVEN TALKING ABOUT THEM ON SUCH OCCASIONS IS MOST DANGEROUS!
...ही भुते कुठेही असू शकतात. ती अमक्या ठिकाणी नाहीत, असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही. साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात, विहिरीत, मसणवटीत असतातच. विशेषत: विहिरीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचे रूप घेऊन इकडेतिकडे हिंडत असते. पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड, पिंपरणी, लिंब असल्या झाडांवरही भुते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात. दिवसा ती काही करीत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते. त्या वेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेषात भेटतात. त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात; पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही. अमावस्येच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात. अशा वेळी त्यांच्यासंबंधी काहीही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे, हे धोक्याचे असते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HUBEHUB #D. #M #MIRASDAR #KATHASANGRAH #GHAM #JODI #TAGAI #SAKSHIDAR #JEWANAVEL #EK #SUKYA #NHAVI #YACHI #GOST #NAKATE #BHUT #TANK #DHADPADNARI #MULE #हुबेहूब #द. #मा. #मिरासदार #कथासंग्रह #घाम #जोडी #तगई #साक्षीदार #जेवणवेळ #एक #सुक्या #न्हावी #ह्याची #गोष्ट #नकटे #भूत #टांक #धडपडणारी #मुले
Customer Reviews
  • Rating StarPradeep Zombade

    एक अप्रतिम विनोदी लेखकाचा , खळखळून हसवणारा कथासंग्रह म्हणजे भुताचा जन्म.

  • Rating Starमानसी सरोज

    "दिवसा ती काहीही करत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते.त्यांचे पाय उलटे असतात म्हणे" अशी भुतांच्या बाबतीत आपल्या मनाची समज आहे आणि नेमका त्याचा ठाव घेत द. मा.मिरासदार यांनी `भुताचा जन्म` हे पुस्तक लिहिलं आहे. विनोदी धाटणीतील मेहता प्रकाशनाचे े १२६ पानांचे पुस्तक वाचताना आपण प्रत्यक्ष ते प्रसंग अनुभवत आहोत असे वाटते. `भुताचा जन्म` हा कथासंग्रह आपल्याला गावात घडलेल्या काही घटनांची आठवण करून देतो.त्यांनी वापरलेली गावरान भाषा वाचकाला खिळवून ठेवते. प्रत्येक कथेतून एक वेगळं व्यक्तिचित्रण अभ्यासायला मिळतं. संवादातून काढलेले विनोदी चिमटे एकटेपणातही खो- खो हसायला लावतात. गंमत म्हणजे आपण इतके हसतो की समोरची व्यक्ती आपल्याला नक्कीच विचारते की " इतकं हसण्यासारखे काय आहे?" आणि आपण पूर्ण कथा सांगत सुटतो. हा लेखकाच्या लेखनशैलीचा विजय आहे. गावातील चालीरीती, परंपरा, पोशाख आणि भाकडकथा यांचे संमिश्र स्वरूप म्हणजे `भुताचा जन्म`. नाव जरी असे असले तरी प्रत्यक्ष भुताची एकच कथा आहे आणि बाकीच्या कथा ह्या त्या कथेतील ठराविक पात्राच्या वागणुकीला `भूत` म्हणून नोंदवतात असे मला वाटते. भुताचा जन्म कसा झाला यावरचा शोध, `भवानीचा पक्षकार` मधील मेहनती वकील `नाना`, भीमु बुरुडचा कोंबड्या विकण्याचा पराक्रम, नदीकाठी बाईच्या प्रेतावर झालेला काथ्याकूट, मारुतीचा कंटाळा,तात्याने विंचवाच्या मदतीने शिकलेली पंचाक्षरी,मैनाबाई स्वयंपाकीणीला नवऱ्याने हाल करूनही गेलेले दिवस, बाबू न्हाव्याचे " जावू दे कोर्टात" सांगून पैसे कमावणे, सोळा आण्याचे वतनदार चतुर अण्णासाहेब, बंड्याच्या तपकिरीचा शाळेतला उपद्व्याप आणि महाद्याने तालुक्यावर पाठवलेला निरोप अशा अकरा कथांचा हा संग्रह वाचताना वाचकाला खिळवून ठेवतो. एका खेपेतच पूर्ण संग्रह वाचला जातो. प्रत्येक कथेत शेवटच्या परिच्छेदात धक्का तंत्र वापरले आहे.त्यामुळे एखादी कथा सोडली तर बाकी कथांचा शेवट पटकन लक्षात येत नाही. अंदाज लावला तरीही तसा शेवट होत नाही यात लेखकाचा वाचनाचा दांडगा अनुभव जाणवतो. संवादात वापरलेल्या गावाकडील भाषेमुळे कथा आपलीशी वाटते. दीर्घकाळ धाटणीतल्या लघुकथांचा बाज राखुनही विनोदाची फोडणी जबरदस्त आहे. विनोदी संस्कृतीची जपणूक करणारा हा कथासंग्रह प्रत्येकाच्या संग्रही नक्कीच असायला हवा... कारण मिरासदारांनी विनोदाचे बाळकडू इतरांपेक्षा जरा जास्तच प्यायलेले वाटते! ...Read more

  • Rating StarGanesh Malleshe

    पुस्तक - भुताचा जन्म लेखक - द.मा.मिरासदार प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस. कधी कधी पुस्तकांचा पण कंटाळा येतो. तुम्ही कितीही पुस्तकप्रेमी असाल तरी एखाद्या वेळी हातात पुस्तक असलं तरी वाचायची इच्छा होत नाही. एखादी आवडती कादंबरी वाचण्यासाठी म्हणून घयावी आणि सुरू न करताच परत ठेऊन द्यावी, एखादं कवितेचं पुस्तक हातात घ्यावं पण काही ओळी वाचून पुस्तक मिटून टाकावं, एखादे ऐतिहासिक पुस्तक वाचायला घ्यावे पण त्या पुस्तकाची जाडी पाहूनच घाबरून जावं! असं बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना होतं. काहीतरी वाचायचं आहे ही भावना मनात खेळत असते पण काय वाचावं हे सुचत नाही. अशा वेळेस काय करावं? उत्तर सोपं आहे, अशा वेळेस सरळ सरळ द.मा.मिरासदार यांच्या कथा वाचायला घ्याव्या. द.मा.मिरासदार आणि त्यांचे जोडीदार म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांचा पिंडच वेगळा. यांचा कथासंग्रह म्हणजे विनोदाने भरलेला पेटारा असतो. याच पेठऱ्यातील एक अप्रतिम पुस्तक म्हणजे "भुताचा जन्म". पुस्तकाच्या शीर्षकावरून जरी या पुस्तकात भयकथा असतील असं वाटतं असेल तर तसं अजिबात नाही. द.मा.मिरासदारांच्या इतर कथांप्रमाणेच हे पुस्तक विनोदाने भरलेले आहे. गावाकडील कथा, त्या कथा लिखाणाची शैली आणि त्यातील अस्सल ग्रामीण बोली याचं रसायन म्हणजे हा ११ कथांचा कथासंग्रह.... खेडेगावातील निरनिराळ्या व्यक्ती आणि त्यांच्या वागण्यातील गमती जमती आपल्याला या ११ कथांमध्ये अनुभवायला मिळतात. `भुताचा जन्म` या पहिल्या कथा मध्ये गुंडगुळ्याच्या माळावर नाक मुठीत धरून इच्छा नसताना तिथे भूत कसा जन्माला आला हे वाचून हसून हसून पोट दुखल्या शिवाय राहत नाही. अनेक ठिकाणी अनेक भुतं अशीच जन्माला येत असतील असा विचार मनाला स्पर्श करून जातो. `भिमुच्या कोंबड्या` या कथेत अडमाप वागणुकीचा महा इब्लिस असणाऱ्या भिमुच्या कोंबड्या विकण्याचं कौशल्य पाहून त्याचं कौतुक वाटतं. आपण पण भिमु प्रमाणे कोंबड्यांचा धंदा करावा आणि चिकार पैसा कमवावा असं थोड्या वेळासाठी मला वाटून गेलं. `कंटाळा` ही कथा वाचून तुम्हाला कंटाळा तर मुळीच येणार नाही पण या कथेतील मारुती चव्हाणाचा कंटाळा आणि आळस पाहून तुम्ही तुमच्या कपाळाला हात लावाल हे नक्कीच.मारुतीराव हे आजच्या काळात देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श आहेत. कारण त्यांच्या प्रमाणेच कंटाळा करून दिवसरात्र घरात बसून राहण्याची गरज आज देशाला आहे😂. `पंचाक्षरी` या कथेत तात्या गुरव या बुटक्या माणसाची भूत पळवण्याची अद्भुत कला वाचल्या नंतर तुमच्या अंगात कधी भूत येणार नाही, आणि चुकून समजा एखादा भूत आलाच तरी तात्या गुरवाचा जप केल्यावर ते पळून जाईल. `तात्यांचा मंतिरच त्येवडा पावरफुल हाय`! `स्वयंपाकिणबाईंचा नवरा` या कथेतील स्वयंपाकिण आणि तिच्या आजारी नवऱ्याचे दुःख आणि कष्ट वाचून तुमच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतील, मात्र ते डोळ्यातील पाणी हसून हसून येईल, दुःखाने नव्हे! `निरोप` या शेवटच्या कथेत एखादा निरोप किती `अ-चूक` पोहचू शकतो याची अनुभूती येते. अशा या द.मा.मिरासदार यांच्या लिखाणातील सर्वात उजवी बाजू म्हणजे त्यांचे ग्रामीण भागातील भाषाशैलीवर असलेले प्रभुत्व. महाराष्ट्रातील अनेक खेड्या-पाड्याची भाषा ते खुप सहजतेने लिहतात. ही भाषा वाचणाऱ्याला असंच वाटेल की इतक्या सहजतेने तर त्या खेड्यातील लोकांना पण ही भाषा येत नसेल. याचंच एक छोटंसं उदाहरण म्हणजे `भुताचा जन्म` या कथेतील तुकाराम लांडगे या `भित्र्या-पैलवानाने` त्याच्या गावातील सांगितलेली ही पुढील भुताची गोष्ट - _________________________________________ "हे सांगताना तुकाराम लटालटा कापू लागला. “फुडं?” “फुडं काय? घाम सुटला समद्यांना. नशाच उतरली.” आता तुकारामाला घाम सुटला होता. “हं मग?” “मग ते भूत चढलं की, व्हिरीजवळच्या झाडावर. आन् दिली धाड्दिशी व्हिरीत उडी टाकून, धबेल करून. पुन्ना कायबाय आवाज करीत आलं वरती. पुन्ना चढलं झाडावर आन् पुन्यांदा ठोकली उडी व्हिरीत. रातसार हो धुमाकूळ. झाडावर चढायचं आन् व्हिरीत उडी ठोकायची! दुसरी बात न्हायी. पुन्यांदा झाडावर चढायचं आन् पुन्ना व्हिरीत उडी ठोकायची... ” “मंग काय झालं?” “काय व्हायाचं? खाड्दिशी दारु उतरली समद्यांची. फटफटस्तंवर ह्यो दंगा आपला चाललेला. फटफटलं तवा पळत आले गावात. पुन्ना म्हणून कदी रातच्याला भायेर गेले न्हायीत.” _________________________________________ हाय का न्हाई पाहूणं मजेदार!! अरे, माफ करा मी पण तुकारामाची भाषा बोलायला लागलो. तर आहे की नाही मंडळी ही मजेदार गावरान बोली! असा हा ११ कथांचा कथासंग्रह तुम्हाला सगळ्या ताण-तणावातून मुक्त करू शकतो अशी शाश्वती मी `सोळा आण्याचे वतनदार` या कथेतील कुलकर्णीने त्यांच्या पाहुण्यांना जशी दिली होती अगदी तशीच तुम्हाला देतो. आता हे कुलकर्णी कोण आणि त्यांनी काय शाश्वती दिली होती हे मला विचारू नका त्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचा. प्रत्येक पुस्तकप्रेमीने हा कथासंग्रह नक्की वाचावा! - गणेश मल्लेशे ...Read more

  • Rating StarVikram Pahadi

    द मा मिरासदार यांचा एक सुंदर आणि गंमतीशीर कथासंग्रह, निष्पाप निरागस पात्रांसारखेच निरागस विनोद,मजा आली वाचून।।

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more