* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHUTACHA JANMA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984682
  • Edition : 10
  • Publishing Year : JANUARY 1958
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THESE GHOSTS CAN BE FOUND ABSOLUTELY ANYWHERE. NOBODY CAN SWEAR AND SAY THAT THEY ARE NOT FOUND IN SUCHANDSUCH PLACE. THEY ARE CERTAIN TO BE FOUND HAUNTING THE RUINS OF OLD WADAS, WELLS, AND CEMETERIES. THE HADAL LIVES IN WELLS, AND SHE MOVES ABOUT IN THE GUISE OF A BEAUTIFUL WOMAN. THE MUNJA IS SURE TO BE FOUND ON A PEEPUL TREE. AND OF COURSE THE PIMPARNI, BANYAN, AND NEEM TREES ATTRACT LARGE GROUPS OF GHOSTS, JUST LIKE MONKEYS. THEY ARE QUIESCENT DURING DAYTIME, AND THEIR DAY BEGINS AFTER DARK. THEN ONE CAN ENCOUNTER THEM ANYWHERE AND IN ANY GUISE. IT IS SAID THAT THEIR FEET FACE BACKWARDS; BUT THIS IS NOT ALWAYS TRUE. ON NOMOON NIGHTS THEY DEFINITELY PROWL ABOUT. TO BE SEEN BY THEM, OR EVEN TALKING ABOUT THEM ON SUCH OCCASIONS IS MOST DANGEROUS!
...ही भुते कुठेही असू शकतात. ती अमक्या ठिकाणी नाहीत, असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही. साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात, विहिरीत, मसणवटीत असतातच. विशेषत: विहिरीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचे रूप घेऊन इकडेतिकडे हिंडत असते. पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड, पिंपरणी, लिंब असल्या झाडांवरही भुते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात. दिवसा ती काही करीत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते. त्या वेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेषात भेटतात. त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात; पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही. अमावस्येच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात. अशा वेळी त्यांच्यासंबंधी काहीही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे, हे धोक्याचे असते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HUBEHUB #D. #M #MIRASDAR #KATHASANGRAH #GHAM #JODI #TAGAI #SAKSHIDAR #JEWANAVEL #EK #SUKYA #NHAVI #YACHI #GOST #NAKATE #BHUT #TANK #DHADPADNARI #MULE #हुबेहूब #द. #मा. #मिरासदार #कथासंग्रह #घाम #जोडी #तगई #साक्षीदार #जेवणवेळ #एक #सुक्या #न्हावी #ह्याची #गोष्ट #नकटे #भूत #टांक #धडपडणारी #मुले
Customer Reviews
  • Rating StarPradeep Zombade

    एक अप्रतिम विनोदी लेखकाचा , खळखळून हसवणारा कथासंग्रह म्हणजे भुताचा जन्म.

  • Rating Starमानसी सरोज

    "दिवसा ती काहीही करत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते.त्यांचे पाय उलटे असतात म्हणे" अशी भुतांच्या बाबतीत आपल्या मनाची समज आहे आणि नेमका त्याचा ठाव घेत द. मा.मिरासदार यांनी `भुताचा जन्म` हे पुस्तक लिहिलं आहे. विनोदी धाटणीतील मेहता प्रकाशनाचे े १२६ पानांचे पुस्तक वाचताना आपण प्रत्यक्ष ते प्रसंग अनुभवत आहोत असे वाटते. `भुताचा जन्म` हा कथासंग्रह आपल्याला गावात घडलेल्या काही घटनांची आठवण करून देतो.त्यांनी वापरलेली गावरान भाषा वाचकाला खिळवून ठेवते. प्रत्येक कथेतून एक वेगळं व्यक्तिचित्रण अभ्यासायला मिळतं. संवादातून काढलेले विनोदी चिमटे एकटेपणातही खो- खो हसायला लावतात. गंमत म्हणजे आपण इतके हसतो की समोरची व्यक्ती आपल्याला नक्कीच विचारते की " इतकं हसण्यासारखे काय आहे?" आणि आपण पूर्ण कथा सांगत सुटतो. हा लेखकाच्या लेखनशैलीचा विजय आहे. गावातील चालीरीती, परंपरा, पोशाख आणि भाकडकथा यांचे संमिश्र स्वरूप म्हणजे `भुताचा जन्म`. नाव जरी असे असले तरी प्रत्यक्ष भुताची एकच कथा आहे आणि बाकीच्या कथा ह्या त्या कथेतील ठराविक पात्राच्या वागणुकीला `भूत` म्हणून नोंदवतात असे मला वाटते. भुताचा जन्म कसा झाला यावरचा शोध, `भवानीचा पक्षकार` मधील मेहनती वकील `नाना`, भीमु बुरुडचा कोंबड्या विकण्याचा पराक्रम, नदीकाठी बाईच्या प्रेतावर झालेला काथ्याकूट, मारुतीचा कंटाळा,तात्याने विंचवाच्या मदतीने शिकलेली पंचाक्षरी,मैनाबाई स्वयंपाकीणीला नवऱ्याने हाल करूनही गेलेले दिवस, बाबू न्हाव्याचे " जावू दे कोर्टात" सांगून पैसे कमावणे, सोळा आण्याचे वतनदार चतुर अण्णासाहेब, बंड्याच्या तपकिरीचा शाळेतला उपद्व्याप आणि महाद्याने तालुक्यावर पाठवलेला निरोप अशा अकरा कथांचा हा संग्रह वाचताना वाचकाला खिळवून ठेवतो. एका खेपेतच पूर्ण संग्रह वाचला जातो. प्रत्येक कथेत शेवटच्या परिच्छेदात धक्का तंत्र वापरले आहे.त्यामुळे एखादी कथा सोडली तर बाकी कथांचा शेवट पटकन लक्षात येत नाही. अंदाज लावला तरीही तसा शेवट होत नाही यात लेखकाचा वाचनाचा दांडगा अनुभव जाणवतो. संवादात वापरलेल्या गावाकडील भाषेमुळे कथा आपलीशी वाटते. दीर्घकाळ धाटणीतल्या लघुकथांचा बाज राखुनही विनोदाची फोडणी जबरदस्त आहे. विनोदी संस्कृतीची जपणूक करणारा हा कथासंग्रह प्रत्येकाच्या संग्रही नक्कीच असायला हवा... कारण मिरासदारांनी विनोदाचे बाळकडू इतरांपेक्षा जरा जास्तच प्यायलेले वाटते! ...Read more

  • Rating StarGanesh Malleshe

    पुस्तक - भुताचा जन्म लेखक - द.मा.मिरासदार प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस. कधी कधी पुस्तकांचा पण कंटाळा येतो. तुम्ही कितीही पुस्तकप्रेमी असाल तरी एखाद्या वेळी हातात पुस्तक असलं तरी वाचायची इच्छा होत नाही. एखादी आवडती कादंबरी वाचण्यासाठी म्हणून घयावी आणि सुरू न करताच परत ठेऊन द्यावी, एखादं कवितेचं पुस्तक हातात घ्यावं पण काही ओळी वाचून पुस्तक मिटून टाकावं, एखादे ऐतिहासिक पुस्तक वाचायला घ्यावे पण त्या पुस्तकाची जाडी पाहूनच घाबरून जावं! असं बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना होतं. काहीतरी वाचायचं आहे ही भावना मनात खेळत असते पण काय वाचावं हे सुचत नाही. अशा वेळेस काय करावं? उत्तर सोपं आहे, अशा वेळेस सरळ सरळ द.मा.मिरासदार यांच्या कथा वाचायला घ्याव्या. द.मा.मिरासदार आणि त्यांचे जोडीदार म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांचा पिंडच वेगळा. यांचा कथासंग्रह म्हणजे विनोदाने भरलेला पेटारा असतो. याच पेठऱ्यातील एक अप्रतिम पुस्तक म्हणजे "भुताचा जन्म". पुस्तकाच्या शीर्षकावरून जरी या पुस्तकात भयकथा असतील असं वाटतं असेल तर तसं अजिबात नाही. द.मा.मिरासदारांच्या इतर कथांप्रमाणेच हे पुस्तक विनोदाने भरलेले आहे. गावाकडील कथा, त्या कथा लिखाणाची शैली आणि त्यातील अस्सल ग्रामीण बोली याचं रसायन म्हणजे हा ११ कथांचा कथासंग्रह.... खेडेगावातील निरनिराळ्या व्यक्ती आणि त्यांच्या वागण्यातील गमती जमती आपल्याला या ११ कथांमध्ये अनुभवायला मिळतात. `भुताचा जन्म` या पहिल्या कथा मध्ये गुंडगुळ्याच्या माळावर नाक मुठीत धरून इच्छा नसताना तिथे भूत कसा जन्माला आला हे वाचून हसून हसून पोट दुखल्या शिवाय राहत नाही. अनेक ठिकाणी अनेक भुतं अशीच जन्माला येत असतील असा विचार मनाला स्पर्श करून जातो. `भिमुच्या कोंबड्या` या कथेत अडमाप वागणुकीचा महा इब्लिस असणाऱ्या भिमुच्या कोंबड्या विकण्याचं कौशल्य पाहून त्याचं कौतुक वाटतं. आपण पण भिमु प्रमाणे कोंबड्यांचा धंदा करावा आणि चिकार पैसा कमवावा असं थोड्या वेळासाठी मला वाटून गेलं. `कंटाळा` ही कथा वाचून तुम्हाला कंटाळा तर मुळीच येणार नाही पण या कथेतील मारुती चव्हाणाचा कंटाळा आणि आळस पाहून तुम्ही तुमच्या कपाळाला हात लावाल हे नक्कीच.मारुतीराव हे आजच्या काळात देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श आहेत. कारण त्यांच्या प्रमाणेच कंटाळा करून दिवसरात्र घरात बसून राहण्याची गरज आज देशाला आहे😂. `पंचाक्षरी` या कथेत तात्या गुरव या बुटक्या माणसाची भूत पळवण्याची अद्भुत कला वाचल्या नंतर तुमच्या अंगात कधी भूत येणार नाही, आणि चुकून समजा एखादा भूत आलाच तरी तात्या गुरवाचा जप केल्यावर ते पळून जाईल. `तात्यांचा मंतिरच त्येवडा पावरफुल हाय`! `स्वयंपाकिणबाईंचा नवरा` या कथेतील स्वयंपाकिण आणि तिच्या आजारी नवऱ्याचे दुःख आणि कष्ट वाचून तुमच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतील, मात्र ते डोळ्यातील पाणी हसून हसून येईल, दुःखाने नव्हे! `निरोप` या शेवटच्या कथेत एखादा निरोप किती `अ-चूक` पोहचू शकतो याची अनुभूती येते. अशा या द.मा.मिरासदार यांच्या लिखाणातील सर्वात उजवी बाजू म्हणजे त्यांचे ग्रामीण भागातील भाषाशैलीवर असलेले प्रभुत्व. महाराष्ट्रातील अनेक खेड्या-पाड्याची भाषा ते खुप सहजतेने लिहतात. ही भाषा वाचणाऱ्याला असंच वाटेल की इतक्या सहजतेने तर त्या खेड्यातील लोकांना पण ही भाषा येत नसेल. याचंच एक छोटंसं उदाहरण म्हणजे `भुताचा जन्म` या कथेतील तुकाराम लांडगे या `भित्र्या-पैलवानाने` त्याच्या गावातील सांगितलेली ही पुढील भुताची गोष्ट - _________________________________________ "हे सांगताना तुकाराम लटालटा कापू लागला. “फुडं?” “फुडं काय? घाम सुटला समद्यांना. नशाच उतरली.” आता तुकारामाला घाम सुटला होता. “हं मग?” “मग ते भूत चढलं की, व्हिरीजवळच्या झाडावर. आन् दिली धाड्दिशी व्हिरीत उडी टाकून, धबेल करून. पुन्ना कायबाय आवाज करीत आलं वरती. पुन्ना चढलं झाडावर आन् पुन्यांदा ठोकली उडी व्हिरीत. रातसार हो धुमाकूळ. झाडावर चढायचं आन् व्हिरीत उडी ठोकायची! दुसरी बात न्हायी. पुन्यांदा झाडावर चढायचं आन् पुन्ना व्हिरीत उडी ठोकायची... ” “मंग काय झालं?” “काय व्हायाचं? खाड्दिशी दारु उतरली समद्यांची. फटफटस्तंवर ह्यो दंगा आपला चाललेला. फटफटलं तवा पळत आले गावात. पुन्ना म्हणून कदी रातच्याला भायेर गेले न्हायीत.” _________________________________________ हाय का न्हाई पाहूणं मजेदार!! अरे, माफ करा मी पण तुकारामाची भाषा बोलायला लागलो. तर आहे की नाही मंडळी ही मजेदार गावरान बोली! असा हा ११ कथांचा कथासंग्रह तुम्हाला सगळ्या ताण-तणावातून मुक्त करू शकतो अशी शाश्वती मी `सोळा आण्याचे वतनदार` या कथेतील कुलकर्णीने त्यांच्या पाहुण्यांना जशी दिली होती अगदी तशीच तुम्हाला देतो. आता हे कुलकर्णी कोण आणि त्यांनी काय शाश्वती दिली होती हे मला विचारू नका त्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचा. प्रत्येक पुस्तकप्रेमीने हा कथासंग्रह नक्की वाचावा! - गणेश मल्लेशे ...Read more

  • Rating StarVikram Pahadi

    द मा मिरासदार यांचा एक सुंदर आणि गंमतीशीर कथासंग्रह, निष्पाप निरागस पात्रांसारखेच निरागस विनोद,मजा आली वाचून।।

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more