* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHUTACHA JANMA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984682
  • Edition : 10
  • Publishing Year : JANUARY 1958
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THESE GHOSTS CAN BE FOUND ABSOLUTELY ANYWHERE. NOBODY CAN SWEAR AND SAY THAT THEY ARE NOT FOUND IN SUCHANDSUCH PLACE. THEY ARE CERTAIN TO BE FOUND HAUNTING THE RUINS OF OLD WADAS, WELLS, AND CEMETERIES. THE HADAL LIVES IN WELLS, AND SHE MOVES ABOUT IN THE GUISE OF A BEAUTIFUL WOMAN. THE MUNJA IS SURE TO BE FOUND ON A PEEPUL TREE. AND OF COURSE THE PIMPARNI, BANYAN, AND NEEM TREES ATTRACT LARGE GROUPS OF GHOSTS, JUST LIKE MONKEYS. THEY ARE QUIESCENT DURING DAYTIME, AND THEIR DAY BEGINS AFTER DARK. THEN ONE CAN ENCOUNTER THEM ANYWHERE AND IN ANY GUISE. IT IS SAID THAT THEIR FEET FACE BACKWARDS; BUT THIS IS NOT ALWAYS TRUE. ON NOMOON NIGHTS THEY DEFINITELY PROWL ABOUT. TO BE SEEN BY THEM, OR EVEN TALKING ABOUT THEM ON SUCH OCCASIONS IS MOST DANGEROUS!
...ही भुते कुठेही असू शकतात. ती अमक्या ठिकाणी नाहीत, असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही. साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात, विहिरीत, मसणवटीत असतातच. विशेषत: विहिरीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचे रूप घेऊन इकडेतिकडे हिंडत असते. पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड, पिंपरणी, लिंब असल्या झाडांवरही भुते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात. दिवसा ती काही करीत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते. त्या वेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेषात भेटतात. त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात; पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही. अमावस्येच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात. अशा वेळी त्यांच्यासंबंधी काहीही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे, हे धोक्याचे असते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HUBEHUB #D. #M #MIRASDAR #KATHASANGRAH #GHAM #JODI #TAGAI #SAKSHIDAR #JEWANAVEL #EK #SUKYA #NHAVI #YACHI #GOST #NAKATE #BHUT #TANK #DHADPADNARI #MULE #हुबेहूब #द. #मा. #मिरासदार #कथासंग्रह #घाम #जोडी #तगई #साक्षीदार #जेवणवेळ #एक #सुक्या #न्हावी #ह्याची #गोष्ट #नकटे #भूत #टांक #धडपडणारी #मुले
Customer Reviews
  • Rating StarPradeep Zombade

    एक अप्रतिम विनोदी लेखकाचा , खळखळून हसवणारा कथासंग्रह म्हणजे भुताचा जन्म.

  • Rating Starमानसी सरोज

    "दिवसा ती काहीही करत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते.त्यांचे पाय उलटे असतात म्हणे" अशी भुतांच्या बाबतीत आपल्या मनाची समज आहे आणि नेमका त्याचा ठाव घेत द. मा.मिरासदार यांनी `भुताचा जन्म` हे पुस्तक लिहिलं आहे. विनोदी धाटणीतील मेहता प्रकाशनाचे े १२६ पानांचे पुस्तक वाचताना आपण प्रत्यक्ष ते प्रसंग अनुभवत आहोत असे वाटते. `भुताचा जन्म` हा कथासंग्रह आपल्याला गावात घडलेल्या काही घटनांची आठवण करून देतो.त्यांनी वापरलेली गावरान भाषा वाचकाला खिळवून ठेवते. प्रत्येक कथेतून एक वेगळं व्यक्तिचित्रण अभ्यासायला मिळतं. संवादातून काढलेले विनोदी चिमटे एकटेपणातही खो- खो हसायला लावतात. गंमत म्हणजे आपण इतके हसतो की समोरची व्यक्ती आपल्याला नक्कीच विचारते की " इतकं हसण्यासारखे काय आहे?" आणि आपण पूर्ण कथा सांगत सुटतो. हा लेखकाच्या लेखनशैलीचा विजय आहे. गावातील चालीरीती, परंपरा, पोशाख आणि भाकडकथा यांचे संमिश्र स्वरूप म्हणजे `भुताचा जन्म`. नाव जरी असे असले तरी प्रत्यक्ष भुताची एकच कथा आहे आणि बाकीच्या कथा ह्या त्या कथेतील ठराविक पात्राच्या वागणुकीला `भूत` म्हणून नोंदवतात असे मला वाटते. भुताचा जन्म कसा झाला यावरचा शोध, `भवानीचा पक्षकार` मधील मेहनती वकील `नाना`, भीमु बुरुडचा कोंबड्या विकण्याचा पराक्रम, नदीकाठी बाईच्या प्रेतावर झालेला काथ्याकूट, मारुतीचा कंटाळा,तात्याने विंचवाच्या मदतीने शिकलेली पंचाक्षरी,मैनाबाई स्वयंपाकीणीला नवऱ्याने हाल करूनही गेलेले दिवस, बाबू न्हाव्याचे " जावू दे कोर्टात" सांगून पैसे कमावणे, सोळा आण्याचे वतनदार चतुर अण्णासाहेब, बंड्याच्या तपकिरीचा शाळेतला उपद्व्याप आणि महाद्याने तालुक्यावर पाठवलेला निरोप अशा अकरा कथांचा हा संग्रह वाचताना वाचकाला खिळवून ठेवतो. एका खेपेतच पूर्ण संग्रह वाचला जातो. प्रत्येक कथेत शेवटच्या परिच्छेदात धक्का तंत्र वापरले आहे.त्यामुळे एखादी कथा सोडली तर बाकी कथांचा शेवट पटकन लक्षात येत नाही. अंदाज लावला तरीही तसा शेवट होत नाही यात लेखकाचा वाचनाचा दांडगा अनुभव जाणवतो. संवादात वापरलेल्या गावाकडील भाषेमुळे कथा आपलीशी वाटते. दीर्घकाळ धाटणीतल्या लघुकथांचा बाज राखुनही विनोदाची फोडणी जबरदस्त आहे. विनोदी संस्कृतीची जपणूक करणारा हा कथासंग्रह प्रत्येकाच्या संग्रही नक्कीच असायला हवा... कारण मिरासदारांनी विनोदाचे बाळकडू इतरांपेक्षा जरा जास्तच प्यायलेले वाटते! ...Read more

  • Rating StarGanesh Malleshe

    पुस्तक - भुताचा जन्म लेखक - द.मा.मिरासदार प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस. कधी कधी पुस्तकांचा पण कंटाळा येतो. तुम्ही कितीही पुस्तकप्रेमी असाल तरी एखाद्या वेळी हातात पुस्तक असलं तरी वाचायची इच्छा होत नाही. एखादी आवडती कादंबरी वाचण्यासाठी म्हणून घयावी आणि सुरू न करताच परत ठेऊन द्यावी, एखादं कवितेचं पुस्तक हातात घ्यावं पण काही ओळी वाचून पुस्तक मिटून टाकावं, एखादे ऐतिहासिक पुस्तक वाचायला घ्यावे पण त्या पुस्तकाची जाडी पाहूनच घाबरून जावं! असं बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना होतं. काहीतरी वाचायचं आहे ही भावना मनात खेळत असते पण काय वाचावं हे सुचत नाही. अशा वेळेस काय करावं? उत्तर सोपं आहे, अशा वेळेस सरळ सरळ द.मा.मिरासदार यांच्या कथा वाचायला घ्याव्या. द.मा.मिरासदार आणि त्यांचे जोडीदार म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांचा पिंडच वेगळा. यांचा कथासंग्रह म्हणजे विनोदाने भरलेला पेटारा असतो. याच पेठऱ्यातील एक अप्रतिम पुस्तक म्हणजे "भुताचा जन्म". पुस्तकाच्या शीर्षकावरून जरी या पुस्तकात भयकथा असतील असं वाटतं असेल तर तसं अजिबात नाही. द.मा.मिरासदारांच्या इतर कथांप्रमाणेच हे पुस्तक विनोदाने भरलेले आहे. गावाकडील कथा, त्या कथा लिखाणाची शैली आणि त्यातील अस्सल ग्रामीण बोली याचं रसायन म्हणजे हा ११ कथांचा कथासंग्रह.... खेडेगावातील निरनिराळ्या व्यक्ती आणि त्यांच्या वागण्यातील गमती जमती आपल्याला या ११ कथांमध्ये अनुभवायला मिळतात. `भुताचा जन्म` या पहिल्या कथा मध्ये गुंडगुळ्याच्या माळावर नाक मुठीत धरून इच्छा नसताना तिथे भूत कसा जन्माला आला हे वाचून हसून हसून पोट दुखल्या शिवाय राहत नाही. अनेक ठिकाणी अनेक भुतं अशीच जन्माला येत असतील असा विचार मनाला स्पर्श करून जातो. `भिमुच्या कोंबड्या` या कथेत अडमाप वागणुकीचा महा इब्लिस असणाऱ्या भिमुच्या कोंबड्या विकण्याचं कौशल्य पाहून त्याचं कौतुक वाटतं. आपण पण भिमु प्रमाणे कोंबड्यांचा धंदा करावा आणि चिकार पैसा कमवावा असं थोड्या वेळासाठी मला वाटून गेलं. `कंटाळा` ही कथा वाचून तुम्हाला कंटाळा तर मुळीच येणार नाही पण या कथेतील मारुती चव्हाणाचा कंटाळा आणि आळस पाहून तुम्ही तुमच्या कपाळाला हात लावाल हे नक्कीच.मारुतीराव हे आजच्या काळात देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श आहेत. कारण त्यांच्या प्रमाणेच कंटाळा करून दिवसरात्र घरात बसून राहण्याची गरज आज देशाला आहे😂. `पंचाक्षरी` या कथेत तात्या गुरव या बुटक्या माणसाची भूत पळवण्याची अद्भुत कला वाचल्या नंतर तुमच्या अंगात कधी भूत येणार नाही, आणि चुकून समजा एखादा भूत आलाच तरी तात्या गुरवाचा जप केल्यावर ते पळून जाईल. `तात्यांचा मंतिरच त्येवडा पावरफुल हाय`! `स्वयंपाकिणबाईंचा नवरा` या कथेतील स्वयंपाकिण आणि तिच्या आजारी नवऱ्याचे दुःख आणि कष्ट वाचून तुमच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतील, मात्र ते डोळ्यातील पाणी हसून हसून येईल, दुःखाने नव्हे! `निरोप` या शेवटच्या कथेत एखादा निरोप किती `अ-चूक` पोहचू शकतो याची अनुभूती येते. अशा या द.मा.मिरासदार यांच्या लिखाणातील सर्वात उजवी बाजू म्हणजे त्यांचे ग्रामीण भागातील भाषाशैलीवर असलेले प्रभुत्व. महाराष्ट्रातील अनेक खेड्या-पाड्याची भाषा ते खुप सहजतेने लिहतात. ही भाषा वाचणाऱ्याला असंच वाटेल की इतक्या सहजतेने तर त्या खेड्यातील लोकांना पण ही भाषा येत नसेल. याचंच एक छोटंसं उदाहरण म्हणजे `भुताचा जन्म` या कथेतील तुकाराम लांडगे या `भित्र्या-पैलवानाने` त्याच्या गावातील सांगितलेली ही पुढील भुताची गोष्ट - _________________________________________ "हे सांगताना तुकाराम लटालटा कापू लागला. “फुडं?” “फुडं काय? घाम सुटला समद्यांना. नशाच उतरली.” आता तुकारामाला घाम सुटला होता. “हं मग?” “मग ते भूत चढलं की, व्हिरीजवळच्या झाडावर. आन् दिली धाड्दिशी व्हिरीत उडी टाकून, धबेल करून. पुन्ना कायबाय आवाज करीत आलं वरती. पुन्ना चढलं झाडावर आन् पुन्यांदा ठोकली उडी व्हिरीत. रातसार हो धुमाकूळ. झाडावर चढायचं आन् व्हिरीत उडी ठोकायची! दुसरी बात न्हायी. पुन्यांदा झाडावर चढायचं आन् पुन्ना व्हिरीत उडी ठोकायची... ” “मंग काय झालं?” “काय व्हायाचं? खाड्दिशी दारु उतरली समद्यांची. फटफटस्तंवर ह्यो दंगा आपला चाललेला. फटफटलं तवा पळत आले गावात. पुन्ना म्हणून कदी रातच्याला भायेर गेले न्हायीत.” _________________________________________ हाय का न्हाई पाहूणं मजेदार!! अरे, माफ करा मी पण तुकारामाची भाषा बोलायला लागलो. तर आहे की नाही मंडळी ही मजेदार गावरान बोली! असा हा ११ कथांचा कथासंग्रह तुम्हाला सगळ्या ताण-तणावातून मुक्त करू शकतो अशी शाश्वती मी `सोळा आण्याचे वतनदार` या कथेतील कुलकर्णीने त्यांच्या पाहुण्यांना जशी दिली होती अगदी तशीच तुम्हाला देतो. आता हे कुलकर्णी कोण आणि त्यांनी काय शाश्वती दिली होती हे मला विचारू नका त्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचा. प्रत्येक पुस्तकप्रेमीने हा कथासंग्रह नक्की वाचावा! - गणेश मल्लेशे ...Read more

  • Rating StarVikram Pahadi

    द मा मिरासदार यांचा एक सुंदर आणि गंमतीशीर कथासंग्रह, निष्पाप निरागस पात्रांसारखेच निरागस विनोद,मजा आली वाचून।।

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more