* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GAPPAGOSHTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984309
  • Edition : 5
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :D.M.MIRASDAR COMBO SET-25 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN ‘MAAZAA KAILASVASI VRUTTAPATRA VYAVASAYA’ THE PROTAGONIST NARRATES HOW HIS JOURNALISTIC CAREER CAME TO AN END DUE TO HIS INTELLECTUAL NONONSENSE STYLE OF WRITING…’KHEDYATIL EK DIVAS’ TAKES A SARCASTIC LOOK AT THE GROSS MISCONCEPTIONS THAT CITY DWELLERS HOLD ABOUT VILLAGE LIFE…BHIKU INGALE DECIDES TO BECOME A TEACHER RATHER THAN A CLERK AND IN ‘EKA VARGATIL PATH’ HE TELLS HOW HE LEARNT HIS LESSON FOR LIFE! MOVED BY THE PLIGHT OF FLOOD VICTIMS IN PUNE, THE FOLK OF BHOKARWADI GO ON A FUNDRAISING DRIVE AND END UP NEEDING HELP THEMSELVES…IN ‘GANPAT PATIL’ WE MEET THE LARGEHEARTED, BUT CUNNING PROTAGONIST WHO KEEPS FIGHTING THE CASE FOR PRESTIGE THOUGH HE IS SURE TO LOSE; YET IN THE END HE FORGIVES SAKHU…ON THE OTHER HAND, IN ‘NIKAAL’, GANPAT WAGHMODE SOMEHOW MANAGES TO GET A FAVOURABLE VERDICT FOR HIMSELF… THE COMMON THREAD THAT LINKS THE TALES TOGETHER IN THIS COLLECTION IS THE SOMEWHAT HUMOROUS STREAK UNDERLYING ALL HUMAN NATURE – FULL OF PARADOXES AND CUNNING. THE EASY AND SPONTANEOUS STYLE HAS LENT A CONVERSATIONAL TONE TO THE VOLUME.
`माझा कै. वृत्तपत्रव्यवसाय` मधला नायक आपल्या बौद्धिक बाणेदारपणामुळे आपली पत्रकारिता कशी कैलासवासी` झाली हे स्वत:च सांगतो... शहरात राहणाऱ्यांना खेडेगावाबद्दल किती गैरसमज असतात याचा उपरोधिक शैलीत समाचार `खेड्यातील एक दिवस` मध्ये आढळतो... भिकू इंगळे कारकून होण्यापेक्षा मास्तरकी करण्याचं ठरवतो आणि त्याचा `एका वर्गातील पाठ` आयुष्यभराचा धडा ठरतो!... आणि पुण्यातल्या जलप्रलयाने हळहळलेली भोकरवाडीतली मंडळी मदत मागायला निघतात आणि त्यांनाच `मदत` करायची पाळी येते... केस हरणार असं ठाऊक असूनही केवळ प्रतिष्ठेकरिता केस लढणारा, दिलदार पण इरसाल `गणपत पाटील` शेवटी सखूला माफ करतो, तर गणपत वाघमोडे वेगळीच शक्कल लढवून `निकाल` आपल्या बाजूने लावून घेतो... मानवी स्वभाव, त्यातली विसंगती, इरसालपणा आणि यांमधून होणारी विनोदनिर्मिती या विषयांभोवती या संग्रहातल्या कथा गुंफलेल्या आहेत. सहज व उस्फूर्त कथनशैलीमुळे यातल्या कथा या `गप्पागोष्टी`च वाटतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MAZYA BAPACHI PEND #D.M.MIRASDAR #VINODI KATHASANGRAH #BHAVAKI #KALAS #SONYA BAMAN #KONE EKE KALI #MAZI PAHILI CHORI #RANMANUS #ZOP #VYANKUCHI SHIKAVANI #HARAVLYACHA SHODH #विनोदी कथासंग्रह #भावकी #कळस #सोन्या बामण #कोणे एके काळी #माझी पहिली चोरी #रानमाणूस #झोप #व्यंकूची शिकवणी #हरवल्याचा शोध ##माझ्या बापाची पेंड #द मा मिरासदार
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 18-12-2015

    मिरासदारांची हसवा-हसवी... कथा वाचता वाचता खळखळून हसण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर द.मा.मिरासदार आणि त्यांची पुस्तकं हा चांगला पर्याय आहे, हे पुन्हा एकदा ‘गप्पागोष्टीं’मधील कथा कुणी तरी ज्येष्ठानं आपल्या सहकाऱ्यांना, आपल्याभोवती असणाऱ्यांना, सांगाव्यातइतक्या सहजपणे लिहिल्या असल्याने त्या खरोखरच ‘गप्पागोष्टी’ वाटतात. कथासंग्रहातील ‘माझा कै. वृत्तपत्र व्यवसाय’ या पहिल्याच कथेतील नायक पत्रकारितेतील करिअर कशा प्रकारे संपुष्टात येतं याचं वर्णन करतो. वृत्तपत्र व्यवसायात असणाऱ्या प्रत्येकाला जवळची वाटावी अशी ही कथा. रुपया गडगडल्याची बातमी संपादकांनी सांगितल्यानंतर या तरुण पत्रकारासमोर उभं राहिलेलं चित्र, बजेटची बातमी करण्यासाठी बजेट घेऊन येऊन ते बातमी करेपर्यंतची कथा वाचून अगदी हसूनहसून पुरेवाट होते. घसारा निधी, चलन, फुगवटा, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर यांच्या पत्रकाराने केलेल्या व्याख्या तर किती हसावं आता असं होऊन जातं. ‘ड्रॉइंग मास्तरांचा तास’ या कथेत चित्रकलेचे शिक्षक आणि त्यांनी घेतलेली इतिहासाची उजळणी आहे. मास्तरांचे कुंजपुरा, बारभाई, पानिपतची लढाई याविषयीचे ‘ज्ञान’ ते कसं सिद्ध करतात आणि फळ्यावर टिंब काढून, रेषा मारून दाखवलेली पानिपतची लढाई हे वाचनीय (हासणीय) आहे. आजच्या शहरी लोकांचं खेड्याविषयी असणारं अतिज्ञान ‘खेड्यातील एक दिवस’ मधून समजतं. शहरी लोकांची शेती, तिथलं राहणीमान या विषयीची कल्पना हस्यापद वाटत असली तरी ही स्थिती आज बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत असल्याने कुठे तरी ही विनोद कथा विचार करायला लावते, काळजीत टाकते. काकांचे अंतिम संस्कार करताना प्रत्येक शेजाऱ्याचा, नातेवाईकाचा कलंदरपणा मिरासदार यांनी त्या त्या व्यक्तिचित्रणात जिवंत केला आहे. काकांची ‘बॉडी’ बदलली गेल्यानंतरचा प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. रामभाऊ, विशापंत, डोंगऱ्यांची स्थिती नक्की काय झाली असेल याची कल्पनाच चेहऱ्यावर हसू उमटवते. शाळेतील इरसाल पोरे नवीन मास्तरांना कशी त्रास देतात, पहिला तास घेताना प्रत्येक शिक्षकाला काय अनुभव येतो, शिक्षकांनी केलेला अभ्यास कसा ऐन वेळी पोरांच्या इरसालपणामुळे विसरला जातो. त्यामुळे ‘चहामधील आसाम, मळ्याचे चहा, पायथ्याचे डोंगर, आसममधील मळे जास्त चहा पितात’ असे शब्दप्रयोग वाक्यांमध्ये केले जातात. त्यातून झालेली विनोदनिर्मिती ‘एका वर्गातील पाठ’ या कथेत आहे. खरं तर प्रत्येक कथाच वेगळी. त्या कथेचा, विनोदाचा बाज वेगळा. असं असूनही प्रत्येक कथा ही चेहऱ्यावर हसू आणतेच आणते. द. मा. यांची पात्रं आणि त्यांनी त्यांचं केलेलं वर्णन इतकं जिवंत, की प्रत्येक कथेतील स्थिती, प्रसंग जशाच तसा डोळ्यासमोर उभा राहतो. हे सगळं द.मा. मिरासदार यांना कुठे, कसे मिळाले असेल अशा आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ते ‘माझ्या विनोदाची उलटतपासणी’ मध्ये मिळतात. त्यांच्या लिखाणमागे नक्की काय काय आहे, हे समजून घेताना एका लेखकाचा प्रवास उलगडत जाते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शि. द. फडणीस यांनी काढलेल्या चित्राचाही आपल्याला हसवण्यात नक्कीच वाटा असतो. पुस्तक संपलं तरी मनातल्या मनात त्यातील पात्रं, त्यांचे विनोद आठवत राहतात आणि नकळत चेहऱ्यावर हसू उमटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.