* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAMBAKTH NINDAR
  • Availability : Available
  • Translators : YASHODHARA KATKAR
  • ISBN : 9789391151133
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2021
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KAMBAKHT NINDAR, THE FIRST VOLUME OF THE AUTOBIOGRAPHY OF EMINENT HINDI AUTHOR DR NARENDRA MOHAN, IS A LITERARY WORK REVOLVING AROUND SELF ; WHICH HE HAS INTERWOVEN WITH THE JOYS AND SORROWS OF HIS PERSONAL LIFE BY DEEPLY INTROSPECTING UPON ISSUES IN SOCIAL AND POLITICAL SPHERES OF HIS TIMES. HE DEPICTS THE PERIOD BETWEEN THE TWO EMERGENCIES WHERE THE FIRST EMERGENCY WAS THE MOMENT OF HIS BIRTH IN A DARKENED ALLY OF A CITY STRIFE WITH GUNSHOTS AND COMMUNAL VIOLENCE . PARTITION THAT SET INDIA FREE , WAS ALSO THE TRIGGER TO THE LARGEST EXODUS AND TRAGEDY IN HUMAN HISTORY AS MILLIONS MIGRATED AND DIED IN THE ENSUING VIOLENCE. AS YOUNG NARENDRA ( OR NINDAR AS HE WAS AFFECTIONATELY CALLED BY BEEJI,HIS MOTHER ) AND HIS FAMILY HAD TO FLEE AND ARRIVE AT AMRITSAR AS REFUGEES , THE STUNNING PERSONAL EXPERIENCES OF THOSE MOMENTS HAUNTED AND PUSHED HIM TOWARDS CREATIVE EXPRESSIONS THROUGHOUT HIS LIFE. KAMBAKHT NINDAR IS ONE OF THEM.
साहित्यिक नरेन्द्र मोहन यांची ही आत्मकथा त्यांचं लौकिक, व्यावसायिक जीवन उलगडते. आई-वडील, दोन भाऊ अशा कुटुंबासमवेतचं बालपण...तेराव्या वर्षी फाळणीमुळे अमृतसरला निर्वासितांच्या छावणीत स्थलांतर...या घटनेने बदललेले आयुष्य आणि भावविश्व...अर्थात हा प्रवास ते चित्रित करतात निंदर (त्यांची आई त्यांना लाडाने ‘निंदर’ असं म्हणत असे) या व्याQक्तरेखेच्या माध्यमातून...त्यांच्या मनाला पडलेला पीळ, अस्वस्थता व्यक्त करताना ते निंदरचा आधार घेतात आणि या आत्मकथेला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतात...निंदर ते साहित्यिक नरेन्द्र मोहन हा महत्त्वपूर्ण प्रवास यात येतो...फाळणीच्या आणि १९७५च्या आणीबाणीच्या वेदना या आत्मकथेतून जाणवतात...लौकिक आणि व्यावसायिक जीवनातील वादळांचा, आनंदक्षणांचा, त्या त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण, व्यामिश्र आविष्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#नरेन्द्रमोहन #यशोधराकाटकर #कमबख्तनिंदर #अपूर्वअलौकिकएकमेव #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मराठीमेहतापब्लिशिंगहाऊस #NARENDRAMOHAN #YASHODHARAKATKAR #KAMBAKTHNINDAR #APURVAALOUKIKEKMEV #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC#TRANSLATEDBOOKS@50%#MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 20-02-2022

    ‘मी’ ला वेगळं करून पारखणारी आत्मकथा... डॉ. नरेंद्र मोहन हे हिंदी साहित्यातील महत्त्वाचं नाव आहे. त्यांना आपण महत्त्वाचे कवी, समीक्षक आणि नाटककार म्हणून ओळखतो. त्यांचं सृजनात्मक तसेच शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचं योगदान आहे. त्यांच्या नावावर ‘हद होगयी यारों’ आणि ‘मंच अंधेरे में’ या लोकप्रिय नाट्यकृतींसोबतच अनेक महत्त्वाची पुस्तके आहेत. ‘मि. जिन्ना’ हे त्यांचं नाटक विवादास्पद होतं आणि या नाटकानंतरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सृजनात्मकतेचा नवीन पैलू समोर आला. नरेंद्र मोहन हे भारत-पाकिस्तान फाळणीच्या दाहात प्रत्यक्ष होरपळलेल्यांपैकी एक होते. काही कविता आणि कथा लिहून आत्मलुब्ध होणाऱ्या साहित्यिकांचे समकालीन असूनही नरेंद्र मोहन, व्रतस्थ पद्धतीने साहित्यसेवा करणारे साहित्यिक होते. नरेंद्र मोहन यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला काळ, त्यातून केलेली साहित्यनिर्मितीबद्दलचा दस्तावेज त्यांच्या ‘कम्बख्त निंदर’ आणि ‘क्या हाल सुनावा’ या दोन खंडातील आत्मकथेतून समजून घेता येतो. ‘कम्बख्त निंदर’ हा नरेंद्र मोहन यांनी लिहिलेल्या आत्मकथेचा पहिला खंड, त्यात त्यांच्या लाहोर येथील जन्मापासून ते दिल्लीत येऊन स्थायिक होण्यापर्यंतचा प्रवास नोंदवला आहे. भारत-पाकिस्तान विभाजनापूर्वीच्या लाहोर शहरातील साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या मुलापासून ते साहित्यक्षेत्रातील ख्यातनाम लेखक बनण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. फाळणीपूर्वी रोवल्या गेलेल्या अस्वस्थतेच्या बीजातून धुमसत गेलेला काळ, जो कालांतराने भारतीय स्वातंत्र्याचा अभिशाप ठरला. तो धुमसता काळ, त्यातली अस्वस्थता, धुमसणं नरेंद्र मोहन यांनी अनुभवलंय. या अनुभवाशी समानधर्म असणारा मंटोही त्यांना त्यामुळेच जवळचा होता. दोघांच्या काळाशी संबंधित दु:खाची जातकुळी एकच होती. मंटोशी त्यांच्या आत्मीय आणि साहित्यिक नात्यालाही किनार होती. माझ्यातल्या ‘मी’ ला स्वत:पासून वेगळं करून पारखण्याचं वेगळं कौशल्य आहे. अशा पद्धतीचे अनुभवकथन प्रत्यक्षात फार होताना दिसत नाहीत. त्याला अपवाद म्हणून ‘कम्बख्त निंदर’कडे बघता येईल. नरेंद्र मोहन यांनी त्यांच्या अनुभवांची दाहकताही कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत संयमाने व्यक्त केली आहे. बालपणी शरणार्थी कॅम्पमध्ये लुटीपुटीचे नाटक खेळणाऱ्या निंदर दिल्लीत येऊन नाट्यप्रेमी आणि लेखक होतो. त्याला दिल्लीतील प्रत्येक दृश्यातलं नाट्य जाणवतं. प्रत्येक घटनेचं रंगमंचीय स्वरूप दिसतं. रंगमचावरचं नाट्य आणि दिल्लीतील राजनैतिक घटनाक्रमामध्ये अद्भुत साधर्म्य जाणवतं. नरेंद्र मोहन यांच्या संदर्भातील अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी लेखक म्हणून जी प्रसिद्धी प्राप्त केली ती केवळ आणि केवळ त्यांच्या सृजनात्मक निर्मितीच्याच बळावर. मूळ हिंदीत किताबीघर प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या या आत्मकथेच्या पहिल्या खंडाचा अनुवाद यशोधरा काटकर यांनी उत्तम केला आहे. असं पुस्तक मराठीत येणं हीच महत्त्वाची बाब आहे. हिंदीतील सगळी भाषिक वैशिष्ट्य आत्मसात करून त्याचा दरवळ मराठीतीलच पुस्तक वाटावे असा बेमालूमपणे पोहोचवला आहे. अनुवादक म्हणून हे मोठं यश आहे. – अंजली अंबेकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 06-02-2022

    अस्वस्थ जीवनसंघर्षाचे चित्रण... डॉ. नरेद्र मोहन हे भारतीय साहित्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व. फाळणीच्या तडाख्याने विद्ध होऊन लिहित्या झालेल्या भारतीय साहित्यिकांची फळी काळाच्या पडद्याआड गेलेली असताना, ‘कमबख्त निंदर’ या आत्मकथेचे विशेष मोल आहे. फाळणी रम्यान निर्वासित म्हणून भारतात आलेल्या नरेंद्र ‘निंदर’ने प्रचंड मेहनत आणि संघर्षातून साहित्यिक ओळख निर्माण केली. मूलत: कविवृत्तीचे असलेल्या नरेंद्र यांनी दीर्घ कविता/वैचारिक कवितेचे स्वरूप आणि शास्त्राविषयी मूलभूत चिंतन, भारतीय भाषांमधील फाळणीच्या कथांचे संपादन, मंटोचे चरित्र व कथांचे संपादन, नाटक, साहित्यशास्त्र, समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र आणि डायरी असे वैविध्यपूर्ण लेखन सातत्याने केले. अशा दिग्गज साहित्यिकाचा जन्म, फाळणी आणि आणीबाणी या कालबिंदूंमधल्या अस्वस्थ वर्तमानातल्या जीवनसंघर्षाचे चित्रण ‘कमबख्त निंदर’ या आत्मकथेत उमटले आहे. निंदर त्यांच्या जीवनातील अनेक सत्यघटनांचे वर्णन करीत, आपल्याला फाळणीच्या कालखंडात घेऊन जातो. बलुचिस्तानमधल्या क्वेट्टा शहरातला भूकंप, जन्मघडीच्या रात्री लाहोरमध्ये लागलेला कर्फ्यू, गोळीबार आणि आईच्या प्रसववेदना अशा जन्म-मृत्यूच्या तांडवात हा जीवन जन्माला आला. त्या अतिंद्रिय अनुभवाच्या दहशतीची सावली त्यांच्या आयुष्यावर सदैव राहिली. वडिलांच्या बदलणाऱ्या नोकऱ्यांमुळे अस्थिरताही होती; परंतु आईचा धीर, वडिलांची जीजिविषा आणि लहानलहान गोष्टीत आनंद मिळविण्याच्या वृत्तीमुळेच अचानक आलेले मुकेपण, तोतरेपण, शक्ती शोषून घेणारा दीर्घकालीन आजार अशा विपरीत परिस्थितीवर ते मात करू शकले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, विदेशी कपड्यांची होळी, नेहरूंच्या सभेत वडिलांच्या खांद्यावर बसून दिलेली ‘जयहिंद’ची घोषणा; तसेच हिंदीचा प्रचार हा राष्ट्रीय मुद्दा असणाऱ्या ऐतिहासिक कालखंडात ते मोठे होत गेले. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय धुमश्चक्रीत मोठे होताना, संघर्ष त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव कसा बनला, याचे प्रत्ययकारी चित्रण येथे उमटले आहे. वयाच्या बाराव्या वर्षी फाळणीचा आघात सोसून, निंदर कुटुंबीयांबरोबर लाहोरहून अमृतसरला येऊन पोहोचला. मायभूमीतून उखडले जाण्याचे दु:ख, युसूफ मास्तर आणि शाळामित्र आफताब यांच्या ताटातुटीची वेदना व सत्ताधिशांविरुद्ध विद्रोहाची भावना तेव्हापासून त्यांच्या अंतरंगात ठाण मांडून बसली. त्यांच्या अंतरंगातली वेदना, विद्रोहाची भावना कधी शमली नाही, उलट तत्कालीन वास्तवातल्या उलथापालथींच्या संदर्भात ती अधिक तीव्र होत, बहुआयामी साहित्यनिर्मिती करायला प्रवृत्त करत गेली. स्वत: विस्थापित होण्याच्या दु:खाने होरपळले असल्याने, नागवल्या जाणाऱ्या आदिवासींचे दु:ख त्यांना आपलेसे वाटले. त्यांच्या आयुष्यातली दुसरी बिकट घडी होती आणीबाणीची. त्या कालखंडात दडपशाहीविरुद्ध उभ्या राहिलेल्या आंदोलनाचे विश्लेषण करताना, भारतीय भाषांमधल्या फाळणीविषयक कथांचे संपादन ‘सिक्का बदल गया’, दुसरे ‘लंबी कविताओंका रचना सिद्धान्त’ आणि तिसरे ‘विद्रोह और साहित्य’ अशा सर्जनशील कार्यातून कसा आवाज उमटवला, याचे चित्रण येथे दिसते. निंदरच्या बालपणीच्या पर्यावरणातले बोलीभाषेतले शब्द, आईच्या तोंडची स्त्रीसुलभ भाषा, म्हणी, वाक्प्रचार असा भाषिक ऐवज घेऊन आलेली भाषाशैली, पुढे निंदरच्या जाणिवांच्या कक्षा विकसित गेल्या, तसतसे या भाषेने प्रमाण हिंदीचे वळण आत्मसात करीत, आत्मकथन प्रवाहित ठेवलेले दिसते. हा अनुवादही प्रवाही झाला आहे. ‘कमबख्त’ मधून जाणवणाऱ्या दुर्दैवी, अभागी या शब्दछटा त्यांच्या जीवनाशी निगडित आहेत. निंदर ही त्यांच्या बिजींनी भूतकाळाच्या स्मृतींमधून दिलेली मृदुवत्सल हाक आहे. तो त्यांचा सदोहर, सखा; तसेच त्यांच्या आत्म्याचा आवाज आहे. निवेदनाला प्रवाहित ठेवणारे, सुफल-संपूर्ण करणारे बहुआयामी रूपक बनून अवतरलेला निंदर हे या आत्मकथेचे बलस्थान आहे. हे सगळे खूप तरल, संवेदनशील आहे. आशयानुकूल मुखपृष्ठ ही मेहता प्रकाशनाची खासियत आहे. पुस्तकातील छायाचित्रांमुळे डॉ. नरेंद्र मोहन यांचा जीवनपट अधिक जिवंत झाला आहे. – डॉ. वसुधा सहस्रबुद्धे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more