* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAMBAKTH NINDAR
  • Availability : Available
  • Translators : YASHODHARA KATKAR
  • ISBN : 9789391151133
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2021
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KAMBAKHT NINDAR, THE FIRST VOLUME OF THE AUTOBIOGRAPHY OF EMINENT HINDI AUTHOR DR NARENDRA MOHAN, IS A LITERARY WORK REVOLVING AROUND SELF ; WHICH HE HAS INTERWOVEN WITH THE JOYS AND SORROWS OF HIS PERSONAL LIFE BY DEEPLY INTROSPECTING UPON ISSUES IN SOCIAL AND POLITICAL SPHERES OF HIS TIMES. HE DEPICTS THE PERIOD BETWEEN THE TWO EMERGENCIES WHERE THE FIRST EMERGENCY WAS THE MOMENT OF HIS BIRTH IN A DARKENED ALLY OF A CITY STRIFE WITH GUNSHOTS AND COMMUNAL VIOLENCE . PARTITION THAT SET INDIA FREE , WAS ALSO THE TRIGGER TO THE LARGEST EXODUS AND TRAGEDY IN HUMAN HISTORY AS MILLIONS MIGRATED AND DIED IN THE ENSUING VIOLENCE. AS YOUNG NARENDRA ( OR NINDAR AS HE WAS AFFECTIONATELY CALLED BY BEEJI,HIS MOTHER ) AND HIS FAMILY HAD TO FLEE AND ARRIVE AT AMRITSAR AS REFUGEES , THE STUNNING PERSONAL EXPERIENCES OF THOSE MOMENTS HAUNTED AND PUSHED HIM TOWARDS CREATIVE EXPRESSIONS THROUGHOUT HIS LIFE. KAMBAKHT NINDAR IS ONE OF THEM.
साहित्यिक नरेन्द्र मोहन यांची ही आत्मकथा त्यांचं लौकिक, व्यावसायिक जीवन उलगडते. आई-वडील, दोन भाऊ अशा कुटुंबासमवेतचं बालपण...तेराव्या वर्षी फाळणीमुळे अमृतसरला निर्वासितांच्या छावणीत स्थलांतर...या घटनेने बदललेले आयुष्य आणि भावविश्व...अर्थात हा प्रवास ते चित्रित करतात निंदर (त्यांची आई त्यांना लाडाने ‘निंदर’ असं म्हणत असे) या व्याQक्तरेखेच्या माध्यमातून...त्यांच्या मनाला पडलेला पीळ, अस्वस्थता व्यक्त करताना ते निंदरचा आधार घेतात आणि या आत्मकथेला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतात...निंदर ते साहित्यिक नरेन्द्र मोहन हा महत्त्वपूर्ण प्रवास यात येतो...फाळणीच्या आणि १९७५च्या आणीबाणीच्या वेदना या आत्मकथेतून जाणवतात...लौकिक आणि व्यावसायिक जीवनातील वादळांचा, आनंदक्षणांचा, त्या त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण, व्यामिश्र आविष्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#नरेन्द्रमोहन #यशोधराकाटकर #कमबख्तनिंदर #अपूर्वअलौकिकएकमेव #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मराठीमेहतापब्लिशिंगहाऊस #NARENDRAMOHAN #YASHODHARAKATKAR #KAMBAKTHNINDAR #APURVAALOUKIKEKMEV #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC#TRANSLATEDBOOKS@50%#MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 20-02-2022

    ‘मी’ ला वेगळं करून पारखणारी आत्मकथा... डॉ. नरेंद्र मोहन हे हिंदी साहित्यातील महत्त्वाचं नाव आहे. त्यांना आपण महत्त्वाचे कवी, समीक्षक आणि नाटककार म्हणून ओळखतो. त्यांचं सृजनात्मक तसेच शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचं योगदान आहे. त्यांच्या नावावर ‘हद होगयी यारों’ आणि ‘मंच अंधेरे में’ या लोकप्रिय नाट्यकृतींसोबतच अनेक महत्त्वाची पुस्तके आहेत. ‘मि. जिन्ना’ हे त्यांचं नाटक विवादास्पद होतं आणि या नाटकानंतरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सृजनात्मकतेचा नवीन पैलू समोर आला. नरेंद्र मोहन हे भारत-पाकिस्तान फाळणीच्या दाहात प्रत्यक्ष होरपळलेल्यांपैकी एक होते. काही कविता आणि कथा लिहून आत्मलुब्ध होणाऱ्या साहित्यिकांचे समकालीन असूनही नरेंद्र मोहन, व्रतस्थ पद्धतीने साहित्यसेवा करणारे साहित्यिक होते. नरेंद्र मोहन यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला काळ, त्यातून केलेली साहित्यनिर्मितीबद्दलचा दस्तावेज त्यांच्या ‘कम्बख्त निंदर’ आणि ‘क्या हाल सुनावा’ या दोन खंडातील आत्मकथेतून समजून घेता येतो. ‘कम्बख्त निंदर’ हा नरेंद्र मोहन यांनी लिहिलेल्या आत्मकथेचा पहिला खंड, त्यात त्यांच्या लाहोर येथील जन्मापासून ते दिल्लीत येऊन स्थायिक होण्यापर्यंतचा प्रवास नोंदवला आहे. भारत-पाकिस्तान विभाजनापूर्वीच्या लाहोर शहरातील साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या मुलापासून ते साहित्यक्षेत्रातील ख्यातनाम लेखक बनण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. फाळणीपूर्वी रोवल्या गेलेल्या अस्वस्थतेच्या बीजातून धुमसत गेलेला काळ, जो कालांतराने भारतीय स्वातंत्र्याचा अभिशाप ठरला. तो धुमसता काळ, त्यातली अस्वस्थता, धुमसणं नरेंद्र मोहन यांनी अनुभवलंय. या अनुभवाशी समानधर्म असणारा मंटोही त्यांना त्यामुळेच जवळचा होता. दोघांच्या काळाशी संबंधित दु:खाची जातकुळी एकच होती. मंटोशी त्यांच्या आत्मीय आणि साहित्यिक नात्यालाही किनार होती. माझ्यातल्या ‘मी’ ला स्वत:पासून वेगळं करून पारखण्याचं वेगळं कौशल्य आहे. अशा पद्धतीचे अनुभवकथन प्रत्यक्षात फार होताना दिसत नाहीत. त्याला अपवाद म्हणून ‘कम्बख्त निंदर’कडे बघता येईल. नरेंद्र मोहन यांनी त्यांच्या अनुभवांची दाहकताही कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत संयमाने व्यक्त केली आहे. बालपणी शरणार्थी कॅम्पमध्ये लुटीपुटीचे नाटक खेळणाऱ्या निंदर दिल्लीत येऊन नाट्यप्रेमी आणि लेखक होतो. त्याला दिल्लीतील प्रत्येक दृश्यातलं नाट्य जाणवतं. प्रत्येक घटनेचं रंगमंचीय स्वरूप दिसतं. रंगमचावरचं नाट्य आणि दिल्लीतील राजनैतिक घटनाक्रमामध्ये अद्भुत साधर्म्य जाणवतं. नरेंद्र मोहन यांच्या संदर्भातील अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी लेखक म्हणून जी प्रसिद्धी प्राप्त केली ती केवळ आणि केवळ त्यांच्या सृजनात्मक निर्मितीच्याच बळावर. मूळ हिंदीत किताबीघर प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या या आत्मकथेच्या पहिल्या खंडाचा अनुवाद यशोधरा काटकर यांनी उत्तम केला आहे. असं पुस्तक मराठीत येणं हीच महत्त्वाची बाब आहे. हिंदीतील सगळी भाषिक वैशिष्ट्य आत्मसात करून त्याचा दरवळ मराठीतीलच पुस्तक वाटावे असा बेमालूमपणे पोहोचवला आहे. अनुवादक म्हणून हे मोठं यश आहे. – अंजली अंबेकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 06-02-2022

    अस्वस्थ जीवनसंघर्षाचे चित्रण... डॉ. नरेद्र मोहन हे भारतीय साहित्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व. फाळणीच्या तडाख्याने विद्ध होऊन लिहित्या झालेल्या भारतीय साहित्यिकांची फळी काळाच्या पडद्याआड गेलेली असताना, ‘कमबख्त निंदर’ या आत्मकथेचे विशेष मोल आहे. फाळणी रम्यान निर्वासित म्हणून भारतात आलेल्या नरेंद्र ‘निंदर’ने प्रचंड मेहनत आणि संघर्षातून साहित्यिक ओळख निर्माण केली. मूलत: कविवृत्तीचे असलेल्या नरेंद्र यांनी दीर्घ कविता/वैचारिक कवितेचे स्वरूप आणि शास्त्राविषयी मूलभूत चिंतन, भारतीय भाषांमधील फाळणीच्या कथांचे संपादन, मंटोचे चरित्र व कथांचे संपादन, नाटक, साहित्यशास्त्र, समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र आणि डायरी असे वैविध्यपूर्ण लेखन सातत्याने केले. अशा दिग्गज साहित्यिकाचा जन्म, फाळणी आणि आणीबाणी या कालबिंदूंमधल्या अस्वस्थ वर्तमानातल्या जीवनसंघर्षाचे चित्रण ‘कमबख्त निंदर’ या आत्मकथेत उमटले आहे. निंदर त्यांच्या जीवनातील अनेक सत्यघटनांचे वर्णन करीत, आपल्याला फाळणीच्या कालखंडात घेऊन जातो. बलुचिस्तानमधल्या क्वेट्टा शहरातला भूकंप, जन्मघडीच्या रात्री लाहोरमध्ये लागलेला कर्फ्यू, गोळीबार आणि आईच्या प्रसववेदना अशा जन्म-मृत्यूच्या तांडवात हा जीवन जन्माला आला. त्या अतिंद्रिय अनुभवाच्या दहशतीची सावली त्यांच्या आयुष्यावर सदैव राहिली. वडिलांच्या बदलणाऱ्या नोकऱ्यांमुळे अस्थिरताही होती; परंतु आईचा धीर, वडिलांची जीजिविषा आणि लहानलहान गोष्टीत आनंद मिळविण्याच्या वृत्तीमुळेच अचानक आलेले मुकेपण, तोतरेपण, शक्ती शोषून घेणारा दीर्घकालीन आजार अशा विपरीत परिस्थितीवर ते मात करू शकले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, विदेशी कपड्यांची होळी, नेहरूंच्या सभेत वडिलांच्या खांद्यावर बसून दिलेली ‘जयहिंद’ची घोषणा; तसेच हिंदीचा प्रचार हा राष्ट्रीय मुद्दा असणाऱ्या ऐतिहासिक कालखंडात ते मोठे होत गेले. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय धुमश्चक्रीत मोठे होताना, संघर्ष त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव कसा बनला, याचे प्रत्ययकारी चित्रण येथे उमटले आहे. वयाच्या बाराव्या वर्षी फाळणीचा आघात सोसून, निंदर कुटुंबीयांबरोबर लाहोरहून अमृतसरला येऊन पोहोचला. मायभूमीतून उखडले जाण्याचे दु:ख, युसूफ मास्तर आणि शाळामित्र आफताब यांच्या ताटातुटीची वेदना व सत्ताधिशांविरुद्ध विद्रोहाची भावना तेव्हापासून त्यांच्या अंतरंगात ठाण मांडून बसली. त्यांच्या अंतरंगातली वेदना, विद्रोहाची भावना कधी शमली नाही, उलट तत्कालीन वास्तवातल्या उलथापालथींच्या संदर्भात ती अधिक तीव्र होत, बहुआयामी साहित्यनिर्मिती करायला प्रवृत्त करत गेली. स्वत: विस्थापित होण्याच्या दु:खाने होरपळले असल्याने, नागवल्या जाणाऱ्या आदिवासींचे दु:ख त्यांना आपलेसे वाटले. त्यांच्या आयुष्यातली दुसरी बिकट घडी होती आणीबाणीची. त्या कालखंडात दडपशाहीविरुद्ध उभ्या राहिलेल्या आंदोलनाचे विश्लेषण करताना, भारतीय भाषांमधल्या फाळणीविषयक कथांचे संपादन ‘सिक्का बदल गया’, दुसरे ‘लंबी कविताओंका रचना सिद्धान्त’ आणि तिसरे ‘विद्रोह और साहित्य’ अशा सर्जनशील कार्यातून कसा आवाज उमटवला, याचे चित्रण येथे दिसते. निंदरच्या बालपणीच्या पर्यावरणातले बोलीभाषेतले शब्द, आईच्या तोंडची स्त्रीसुलभ भाषा, म्हणी, वाक्प्रचार असा भाषिक ऐवज घेऊन आलेली भाषाशैली, पुढे निंदरच्या जाणिवांच्या कक्षा विकसित गेल्या, तसतसे या भाषेने प्रमाण हिंदीचे वळण आत्मसात करीत, आत्मकथन प्रवाहित ठेवलेले दिसते. हा अनुवादही प्रवाही झाला आहे. ‘कमबख्त’ मधून जाणवणाऱ्या दुर्दैवी, अभागी या शब्दछटा त्यांच्या जीवनाशी निगडित आहेत. निंदर ही त्यांच्या बिजींनी भूतकाळाच्या स्मृतींमधून दिलेली मृदुवत्सल हाक आहे. तो त्यांचा सदोहर, सखा; तसेच त्यांच्या आत्म्याचा आवाज आहे. निवेदनाला प्रवाहित ठेवणारे, सुफल-संपूर्ण करणारे बहुआयामी रूपक बनून अवतरलेला निंदर हे या आत्मकथेचे बलस्थान आहे. हे सगळे खूप तरल, संवेदनशील आहे. आशयानुकूल मुखपृष्ठ ही मेहता प्रकाशनाची खासियत आहे. पुस्तकातील छायाचित्रांमुळे डॉ. नरेंद्र मोहन यांचा जीवनपट अधिक जिवंत झाला आहे. – डॉ. वसुधा सहस्रबुद्धे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more