* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAMBAKTH NINDAR
  • Availability : Available
  • Translators : YASHODHARA KATKAR
  • ISBN : 9789391151133
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2021
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KAMBAKHT NINDAR, THE FIRST VOLUME OF THE AUTOBIOGRAPHY OF EMINENT HINDI AUTHOR DR NARENDRA MOHAN, IS A LITERARY WORK REVOLVING AROUND SELF ; WHICH HE HAS INTERWOVEN WITH THE JOYS AND SORROWS OF HIS PERSONAL LIFE BY DEEPLY INTROSPECTING UPON ISSUES IN SOCIAL AND POLITICAL SPHERES OF HIS TIMES. HE DEPICTS THE PERIOD BETWEEN THE TWO EMERGENCIES WHERE THE FIRST EMERGENCY WAS THE MOMENT OF HIS BIRTH IN A DARKENED ALLY OF A CITY STRIFE WITH GUNSHOTS AND COMMUNAL VIOLENCE . PARTITION THAT SET INDIA FREE , WAS ALSO THE TRIGGER TO THE LARGEST EXODUS AND TRAGEDY IN HUMAN HISTORY AS MILLIONS MIGRATED AND DIED IN THE ENSUING VIOLENCE. AS YOUNG NARENDRA ( OR NINDAR AS HE WAS AFFECTIONATELY CALLED BY BEEJI,HIS MOTHER ) AND HIS FAMILY HAD TO FLEE AND ARRIVE AT AMRITSAR AS REFUGEES , THE STUNNING PERSONAL EXPERIENCES OF THOSE MOMENTS HAUNTED AND PUSHED HIM TOWARDS CREATIVE EXPRESSIONS THROUGHOUT HIS LIFE. KAMBAKHT NINDAR IS ONE OF THEM.
साहित्यिक नरेन्द्र मोहन यांची ही आत्मकथा त्यांचं लौकिक, व्यावसायिक जीवन उलगडते. आई-वडील, दोन भाऊ अशा कुटुंबासमवेतचं बालपण...तेराव्या वर्षी फाळणीमुळे अमृतसरला निर्वासितांच्या छावणीत स्थलांतर...या घटनेने बदललेले आयुष्य आणि भावविश्व...अर्थात हा प्रवास ते चित्रित करतात निंदर (त्यांची आई त्यांना लाडाने ‘निंदर’ असं म्हणत असे) या व्याQक्तरेखेच्या माध्यमातून...त्यांच्या मनाला पडलेला पीळ, अस्वस्थता व्यक्त करताना ते निंदरचा आधार घेतात आणि या आत्मकथेला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतात...निंदर ते साहित्यिक नरेन्द्र मोहन हा महत्त्वपूर्ण प्रवास यात येतो...फाळणीच्या आणि १९७५च्या आणीबाणीच्या वेदना या आत्मकथेतून जाणवतात...लौकिक आणि व्यावसायिक जीवनातील वादळांचा, आनंदक्षणांचा, त्या त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण, व्यामिश्र आविष्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#नरेन्द्रमोहन #यशोधराकाटकर #कमबख्तनिंदर #अपूर्वअलौकिकएकमेव #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मराठीमेहतापब्लिशिंगहाऊस #NARENDRAMOHAN #YASHODHARAKATKAR #KAMBAKTHNINDAR #APURVAALOUKIKEKMEV #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC#TRANSLATEDBOOKS@50%#MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 20-02-2022

    ‘मी’ ला वेगळं करून पारखणारी आत्मकथा... डॉ. नरेंद्र मोहन हे हिंदी साहित्यातील महत्त्वाचं नाव आहे. त्यांना आपण महत्त्वाचे कवी, समीक्षक आणि नाटककार म्हणून ओळखतो. त्यांचं सृजनात्मक तसेच शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचं योगदान आहे. त्यांच्या नावावर ‘हद होगयी यारों’ आणि ‘मंच अंधेरे में’ या लोकप्रिय नाट्यकृतींसोबतच अनेक महत्त्वाची पुस्तके आहेत. ‘मि. जिन्ना’ हे त्यांचं नाटक विवादास्पद होतं आणि या नाटकानंतरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि सृजनात्मकतेचा नवीन पैलू समोर आला. नरेंद्र मोहन हे भारत-पाकिस्तान फाळणीच्या दाहात प्रत्यक्ष होरपळलेल्यांपैकी एक होते. काही कविता आणि कथा लिहून आत्मलुब्ध होणाऱ्या साहित्यिकांचे समकालीन असूनही नरेंद्र मोहन, व्रतस्थ पद्धतीने साहित्यसेवा करणारे साहित्यिक होते. नरेंद्र मोहन यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला काळ, त्यातून केलेली साहित्यनिर्मितीबद्दलचा दस्तावेज त्यांच्या ‘कम्बख्त निंदर’ आणि ‘क्या हाल सुनावा’ या दोन खंडातील आत्मकथेतून समजून घेता येतो. ‘कम्बख्त निंदर’ हा नरेंद्र मोहन यांनी लिहिलेल्या आत्मकथेचा पहिला खंड, त्यात त्यांच्या लाहोर येथील जन्मापासून ते दिल्लीत येऊन स्थायिक होण्यापर्यंतचा प्रवास नोंदवला आहे. भारत-पाकिस्तान विभाजनापूर्वीच्या लाहोर शहरातील साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या मुलापासून ते साहित्यक्षेत्रातील ख्यातनाम लेखक बनण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. फाळणीपूर्वी रोवल्या गेलेल्या अस्वस्थतेच्या बीजातून धुमसत गेलेला काळ, जो कालांतराने भारतीय स्वातंत्र्याचा अभिशाप ठरला. तो धुमसता काळ, त्यातली अस्वस्थता, धुमसणं नरेंद्र मोहन यांनी अनुभवलंय. या अनुभवाशी समानधर्म असणारा मंटोही त्यांना त्यामुळेच जवळचा होता. दोघांच्या काळाशी संबंधित दु:खाची जातकुळी एकच होती. मंटोशी त्यांच्या आत्मीय आणि साहित्यिक नात्यालाही किनार होती. माझ्यातल्या ‘मी’ ला स्वत:पासून वेगळं करून पारखण्याचं वेगळं कौशल्य आहे. अशा पद्धतीचे अनुभवकथन प्रत्यक्षात फार होताना दिसत नाहीत. त्याला अपवाद म्हणून ‘कम्बख्त निंदर’कडे बघता येईल. नरेंद्र मोहन यांनी त्यांच्या अनुभवांची दाहकताही कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत संयमाने व्यक्त केली आहे. बालपणी शरणार्थी कॅम्पमध्ये लुटीपुटीचे नाटक खेळणाऱ्या निंदर दिल्लीत येऊन नाट्यप्रेमी आणि लेखक होतो. त्याला दिल्लीतील प्रत्येक दृश्यातलं नाट्य जाणवतं. प्रत्येक घटनेचं रंगमंचीय स्वरूप दिसतं. रंगमचावरचं नाट्य आणि दिल्लीतील राजनैतिक घटनाक्रमामध्ये अद्भुत साधर्म्य जाणवतं. नरेंद्र मोहन यांच्या संदर्भातील अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी लेखक म्हणून जी प्रसिद्धी प्राप्त केली ती केवळ आणि केवळ त्यांच्या सृजनात्मक निर्मितीच्याच बळावर. मूळ हिंदीत किताबीघर प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या या आत्मकथेच्या पहिल्या खंडाचा अनुवाद यशोधरा काटकर यांनी उत्तम केला आहे. असं पुस्तक मराठीत येणं हीच महत्त्वाची बाब आहे. हिंदीतील सगळी भाषिक वैशिष्ट्य आत्मसात करून त्याचा दरवळ मराठीतीलच पुस्तक वाटावे असा बेमालूमपणे पोहोचवला आहे. अनुवादक म्हणून हे मोठं यश आहे. – अंजली अंबेकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 06-02-2022

    अस्वस्थ जीवनसंघर्षाचे चित्रण... डॉ. नरेद्र मोहन हे भारतीय साहित्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व. फाळणीच्या तडाख्याने विद्ध होऊन लिहित्या झालेल्या भारतीय साहित्यिकांची फळी काळाच्या पडद्याआड गेलेली असताना, ‘कमबख्त निंदर’ या आत्मकथेचे विशेष मोल आहे. फाळणी रम्यान निर्वासित म्हणून भारतात आलेल्या नरेंद्र ‘निंदर’ने प्रचंड मेहनत आणि संघर्षातून साहित्यिक ओळख निर्माण केली. मूलत: कविवृत्तीचे असलेल्या नरेंद्र यांनी दीर्घ कविता/वैचारिक कवितेचे स्वरूप आणि शास्त्राविषयी मूलभूत चिंतन, भारतीय भाषांमधील फाळणीच्या कथांचे संपादन, मंटोचे चरित्र व कथांचे संपादन, नाटक, साहित्यशास्त्र, समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र आणि डायरी असे वैविध्यपूर्ण लेखन सातत्याने केले. अशा दिग्गज साहित्यिकाचा जन्म, फाळणी आणि आणीबाणी या कालबिंदूंमधल्या अस्वस्थ वर्तमानातल्या जीवनसंघर्षाचे चित्रण ‘कमबख्त निंदर’ या आत्मकथेत उमटले आहे. निंदर त्यांच्या जीवनातील अनेक सत्यघटनांचे वर्णन करीत, आपल्याला फाळणीच्या कालखंडात घेऊन जातो. बलुचिस्तानमधल्या क्वेट्टा शहरातला भूकंप, जन्मघडीच्या रात्री लाहोरमध्ये लागलेला कर्फ्यू, गोळीबार आणि आईच्या प्रसववेदना अशा जन्म-मृत्यूच्या तांडवात हा जीवन जन्माला आला. त्या अतिंद्रिय अनुभवाच्या दहशतीची सावली त्यांच्या आयुष्यावर सदैव राहिली. वडिलांच्या बदलणाऱ्या नोकऱ्यांमुळे अस्थिरताही होती; परंतु आईचा धीर, वडिलांची जीजिविषा आणि लहानलहान गोष्टीत आनंद मिळविण्याच्या वृत्तीमुळेच अचानक आलेले मुकेपण, तोतरेपण, शक्ती शोषून घेणारा दीर्घकालीन आजार अशा विपरीत परिस्थितीवर ते मात करू शकले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, विदेशी कपड्यांची होळी, नेहरूंच्या सभेत वडिलांच्या खांद्यावर बसून दिलेली ‘जयहिंद’ची घोषणा; तसेच हिंदीचा प्रचार हा राष्ट्रीय मुद्दा असणाऱ्या ऐतिहासिक कालखंडात ते मोठे होत गेले. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय धुमश्चक्रीत मोठे होताना, संघर्ष त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव कसा बनला, याचे प्रत्ययकारी चित्रण येथे उमटले आहे. वयाच्या बाराव्या वर्षी फाळणीचा आघात सोसून, निंदर कुटुंबीयांबरोबर लाहोरहून अमृतसरला येऊन पोहोचला. मायभूमीतून उखडले जाण्याचे दु:ख, युसूफ मास्तर आणि शाळामित्र आफताब यांच्या ताटातुटीची वेदना व सत्ताधिशांविरुद्ध विद्रोहाची भावना तेव्हापासून त्यांच्या अंतरंगात ठाण मांडून बसली. त्यांच्या अंतरंगातली वेदना, विद्रोहाची भावना कधी शमली नाही, उलट तत्कालीन वास्तवातल्या उलथापालथींच्या संदर्भात ती अधिक तीव्र होत, बहुआयामी साहित्यनिर्मिती करायला प्रवृत्त करत गेली. स्वत: विस्थापित होण्याच्या दु:खाने होरपळले असल्याने, नागवल्या जाणाऱ्या आदिवासींचे दु:ख त्यांना आपलेसे वाटले. त्यांच्या आयुष्यातली दुसरी बिकट घडी होती आणीबाणीची. त्या कालखंडात दडपशाहीविरुद्ध उभ्या राहिलेल्या आंदोलनाचे विश्लेषण करताना, भारतीय भाषांमधल्या फाळणीविषयक कथांचे संपादन ‘सिक्का बदल गया’, दुसरे ‘लंबी कविताओंका रचना सिद्धान्त’ आणि तिसरे ‘विद्रोह और साहित्य’ अशा सर्जनशील कार्यातून कसा आवाज उमटवला, याचे चित्रण येथे दिसते. निंदरच्या बालपणीच्या पर्यावरणातले बोलीभाषेतले शब्द, आईच्या तोंडची स्त्रीसुलभ भाषा, म्हणी, वाक्प्रचार असा भाषिक ऐवज घेऊन आलेली भाषाशैली, पुढे निंदरच्या जाणिवांच्या कक्षा विकसित गेल्या, तसतसे या भाषेने प्रमाण हिंदीचे वळण आत्मसात करीत, आत्मकथन प्रवाहित ठेवलेले दिसते. हा अनुवादही प्रवाही झाला आहे. ‘कमबख्त’ मधून जाणवणाऱ्या दुर्दैवी, अभागी या शब्दछटा त्यांच्या जीवनाशी निगडित आहेत. निंदर ही त्यांच्या बिजींनी भूतकाळाच्या स्मृतींमधून दिलेली मृदुवत्सल हाक आहे. तो त्यांचा सदोहर, सखा; तसेच त्यांच्या आत्म्याचा आवाज आहे. निवेदनाला प्रवाहित ठेवणारे, सुफल-संपूर्ण करणारे बहुआयामी रूपक बनून अवतरलेला निंदर हे या आत्मकथेचे बलस्थान आहे. हे सगळे खूप तरल, संवेदनशील आहे. आशयानुकूल मुखपृष्ठ ही मेहता प्रकाशनाची खासियत आहे. पुस्तकातील छायाचित्रांमुळे डॉ. नरेंद्र मोहन यांचा जीवनपट अधिक जिवंत झाला आहे. – डॉ. वसुधा सहस्रबुद्धे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more