R.K.LAXMAN

About Author

Birth Date : 24/10/1924


WELL-KNOWN VETERAN CARTOONIST RASIPURAM KRISHNASWAMY LAXMAN I.E. R. K. LAXMAN WAS BORN ON 24 OCTOBER 1924 IN MYSORE. SINCE CHILDHOOD R. K DEVELOPED A PASSION FOR CARTOONS. LATER, AFTER GRADUATING WITH A BA FROM THE UNIVERSITY OF MYSORE, HE TOOK UP HIS FIRST FULL-TIME JOB WITH FREE PRESS JOURNALS. AFTER LEAVING THE FREE PRESS JOB, HE DREW CARTOONS IN THE TIMES OF INDIA FOR HALF A CENTURY.

सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९२४ या दिवशी मैसूर येथे झाला. लहानपणापासूनच आर. केंच्या मनात व्यंगचित्रांची आवड निर्माण झाली. पुढे मैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी फ्री प्रेस जर्नल्समध्ये पूर्णवेळाची पहिली नोकरी पत्करली. फ्री प्रेसची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी अर्धशतकभर टाइम्स ऑफ इंडियामध्ये व्यंगचित्रे रेखाटली. यू सेड इट नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. निरीक्षणातूनच पुढे त्यांनी रेखाटलेले कॉमन मॅन हे सर्वसामान्य माणसाचे प्रातिनिधिक व्यंगचित्र बरेच गाजले. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी लिहिलेली निबंधांची आणि प्रवासवर्णनांचीही अनेक पुस्तके आहेत. आर. के. लक्ष्मण यांना त्यांच्या व्यंगचित्रांसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. त्यांत पद्मभूषण (१९७१), पद्मविभूषण (२००५), रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९८४) आदी महत्त्वाचे पुरस्कार आहेत. मराठा विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही सन्माननीय पदवी दिली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यंग्यचित्रकाराचे, रेषांबरोबरच शब्दांवरही तितकेच प्रेम करणारे लेखक आर. के. लक्ष्मण यांचे ९४ व्या वर्षी दिनांक २६ जानेवारी २०१५ रोजी निधन झाले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KASA BOLALAAT! PART 1 TO 7 Rating Star
Add To Cart INR 665

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more