* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184988772
  • Edition : 3
  • Publishing Year : 1983
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE AUTHOR WHO IS NOW AN ASSOCIATE PROFESSOR IN THE DEPARTMENT OF EDUCATION AND SOCIAL SCIENCES IN NASHIK BELONGS TO THE NOMADIC JOSHI (ASTROLOGERS LOW IN THE CASTE HIERARCHY) TRIBE IN MAHARASHTRA. GABAL IS HIS AUTOBIOGRAPHY WHICH COVERS HIS CHILDHOOD AND EARLY YOUTH. AS HIS FAMILY HAD NO PERMANENT RESIDENCE, DADASAHEB HARDLY HAD AN OPPORTUNITY TO ATTEND SCHOOL, AND UNTIL THE AGE OF ALMOST SEVEN, HE TOOK TO THE FAMILY TRADITION OF BEGGING AND EARNING HIS LIVELIHOOD. AGAINST ALL ODDS SUCH AS ABJECT POVERTY, SUPERSTITION, DISCOURAGEMENT FROM THE ELDERS IN THE COMMUNITY, DADASAHEB CONTINUED HIS EDUCATION UNTIL GRADUATION. AFTER COMPLETING HIS HIGHER SECONDARY, HE SUPPORTED HIS EDUCATION INITIALLY BY DOING MENIAL JOBS AND LATER ACTING, AND BY SCHOLARSHIP. THE TITLE OPENS A WINDOW ON THE LIFE OF THE DOWNTRODDEN, AND PARTICULARLY THEIR DIALECT.
मानव समाजातीलच एक घटक, ज्याला स्वत:चे असे अस्तित्व नाही अशा घटकाचे- `कुडमोडे जोशी` या जातीचे- जीवन विस्तारित स्वरूपात येथे आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पात्र आज या सत्य परिस्थितीला तोंड देत आहे. भटक्या जमातीची दु:खे, त्यांच्या व्यथा, वेदना, स्त्रियांचे पशुतुल्य जीवन, त्यांच्या रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा याविषयीचा सत्य वृत्तान्त यात सादर केला गेला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GABAL #GABAL #गबाळ #AUTOBIOGRAPHY #MARATHI #DADASAHEBMORE "
Customer Reviews
  • Rating StarSrikant Birajdar

    वाचून डोकं सुन्न करणारा पुस्तक. लेखक दादासाहेब मोरे त्यांना जेव्हा पासून समजायला लागलं, तेव्हा पासून ते ज्या जमातीत जन्मला आले त्या भटक्या जमातीची दुःखी व्यथा, त्यांची समाजात होत असलेली उपेक्षा, त्याचं जीवन हे या पुस्तकात उभं करण्याचं प्रयत्न केलाआहे. मिरज तालुक्यातील बाजार सलगरे शहरवजा खेडेगाव असलेल्या ठिकाणी एका कोंडिबा कुंभाराच्या शेतात ही भटकी जात वर्षातून एकदा नोव्हेंबर ते डिसेंबर एक महिना मुक्कामाला असायचा, दोन काठ्यावर पोती टाकून तयार केलेलं पाल म्हणजेच त्यांच घर. पालासमोर तीन दगड आणून ठेवायचे, रानातून लांकड गवऱ्या गोळा करून आणायचा. आणि आपली चूल पेटवायची. पाला समोर एक मोठा दगड आणून ठेवायचे, आणि त्यावर बसून अंघोळ करायची. बायकांनी देखील तिथंच अंघोळ करायची. त्याना लाज वाटायची नाही, बहुतेक त्यांच्या जीवनाच्या हिशोबात राजेच खातं उघडलं नसावं. त्या पाच एकरात जत्रा भरवल्या सारखी असायची. फक्त दुःख आणि लाचारी यांची देवघेवचं या जत्रेत चालत होती.अश्या पालाच्या जमातीत लेखक जीवन जगत मोठे झाले. दुसऱ्यांना खोटं सांगून त्याच्या कडून एखादं कोंबडी घेऊन खोटं म्हणजे तुझ्या घरात सूख निर्माण करतो, तुझ्या मुलांनी तु़झ ऐकांव असं करतो, तुझ्या संपत्तीत बरकत निर्माण करतो. असे खोटे सांगून त्या बदल्यात एखादी कोंबडी घ्यायची. या समाजाला समजत नाही का..? आम्हाला संपत्तीच्या शिखरावर उंभ करणारा माणूस भाकरीच्या तुकड्यासाठी दारोदार भीक का मागत फिरतो ? सुखी होण्याच्या खोठ्या आशेने समाज अश्या लोकांना कोंबड्या देतो. हे नवलच आहे. ...Read more

  • Rating StarPROF. DATTA JADHAV

    आदरणीय दादासाहेब, आपलं आत्मचरित्र वाचलं. थक्क झालो. मनाला विश्वास बसत नव्हता. एखादा काल्पनिक, जीवनपट वाटत होता. हे सर्व काल्पनिक नसून वास्तविक आहे, याने जगण्याला बळ व अस्तित्व नसणाऱ्याना आत्मभान मिळते. आपल्या सहचरिणी सौ. विमल मोरे यांचे आत्मकथन प्रमतः वाचले, तद्नंतर पुढील आयुष्याबद्दल अगम्य राहिला असता. अशा समाजातील व्यक्ती शिकून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. स्वाभिमानाने हे केवळ भारतीय संविधानामुळेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही आपल्या समाजाला इतका संघर्ष करावा लागतो, हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, त्या केवळ भारतीय संविधानाची योग्य व पूर्णता अंमलबजावणी न केल्यामुळेच. तुमच्या जीवनातील मानका आईचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. देव दगडात नसतो, तो माणसात असतो. अशिक्षित असूनही आपल्या वडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी खूप त्याग केला. स्वतःच्या मुलीच्या लग्नात ते नवीन कपडेही घेऊ शकले नाहीत, हा त्याग पराकोटीचा आहे. जतला शिक्षणाला असताना तुम्ही जत ते इंचलकरंजी केलेला प्रवास आई मुलाचे निस्सिम व प्रखर प्रेम व्यक्त करते. आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. लाड, पाटील यांनी तुम्हास आत्मबळ दिले असे गुरुजण आज तुरळक आहेत. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा स्नेहजिव्हाळा, नकोत नुसती नाती. आपल्या घरांना मातीच्या भिंती कदाचित त्या काळात नव्हत्या पण प्रेम, स्नेह, जिव्हाळा, त्याग, विश्वास यांच्या भिंती अभेद्य होत्या. या भिंतीच आज जागतिकीकरणाच्या काळात धूसर झाल्या आहेत. सर्वकाही असूनही जे लोक नशिबाला दोष देतात त्यांच्यासाठी आपले आत्मचरित्र एखाद्या मार्गदर्शकासारखे आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 5-6-2016

    मराठी साहित्यात आत्मकथन हा एक प्रमुख प्रवाह आहे. आत्मकथन हे कित्येकदा आयुष्याच्या एका टप्प्यावर मागे वळून पाहण्याच्या इच्छेने केलेले असते तर कधी गत आयुष्यातील घटनांच्या स्मृतींचा, त्यांच्या अवलोकनाचा पट असतो. कधी समाजातील उपेक्षित, शोषित वर्गाचे वेदनमय कथन असते. ‘गबाळ’ हे दादासाहेब मोरे लिखित आत्मकथन म्हणजे ‘कुडमुडे जोशी’ या जमातीचे भटक्या अस्तित्वहीन, पीडित वर्गाच्या पशुतुल्य जीवनाची वेदनामय करुण कहाणी आहे. ‘गबाळ’मध्ये लेखकाच्या बालपणापासून दु:खाची परिसीमा नसलेले जे उपभोग वाट्याला आले व आजही ती जमात तेच दारुण जीवन जगत आहे त्याचे वास्तव चित्रण आहे. भटक्या जीवनाचा अनुभव घेत पोटापाण्याचा कोणताही व्यवसाय न करणारी ही जमात भीक मागून पोट भरते. गावकुसाबाहेर पालं टाकून गावागावातून भीक मागत फिरणे हेच प्राक्तन. समाजातील इतर जमाती यांच्याकडे चोर म्हणून बघून त्यांना पशुतूल्य वर्तणूक देतात. पिंगला पक्ष्याच्या माध्यमातून लोकांना भविष्यकथन करणे व त्याबद्दल भाकरीचे तुकडे मिळवणे हा त्यांचा उद्योग. हे भविष्यकथन म्हणजे समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, रुढी, अशिक्षितपणाचे वास्तव कथन. लेखकाचे वडिलांना आपल्या मुलाने शाळेत जावे, शिकावे व या लाजिरवाण्या अवस्थेतून बाहेर पडावे असे वाटत होते. वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे लेखक शाळेत जाऊ शकला. लेखक म्हणतात,‘‘मी भीक मागायला जात होतो व अभ्यासही करत होतो. माझ्या जीवनाचे दोन रस्ते निर्माण झाले होते. मी कोणत्या रस्त्यावरून जाणार होतो ते मलाच माहीत नव्हतं.’’ शिकत असताना लेखकाला अनेक शिक्षकांची, सहृदय व्यक्तींची, आजीची मोलाची मदत मिळत गेली - निंबोणी गावचे गुरुजी, पाटील गुरुजी - पण अनेक वेळा पैशाअभावी शाळा सोडण्याची पाळी आली व ‘हाडप’हाती आलं. भाकरी मागण्यासाठी कधी भगुली घेऊन दारोदार फिरत होतो. शालेय जीवनातून लाचार जीवनात प्रवेश केला होता. आत्महत्या करावी असं वाटत होतं. एस.एस.सी.ला फर्स्ट क्लास मिळवून लेखकाने जिद्दीने यश मिळवलं होतं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ग्रामपंचायतीत बोटींग मशीनवर, गटार साफ करणे ही कामे केली. महाविद्यालयीन काळात लेखकाच्या जीवनात एक वेगळं वळण आलं. गॅदरिंगमध्ये नाटकात कामे करणे, कलापथकात काम करणे यामुळे एका सहृदय व्यक्तीमुळे तेथील गणेशोत्सवात काम व पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. महाविद्यालयातील देवधर सरांमुळे होस्टेलची सोय झाली. शिक्षणाचा व कलेचाही विकास होत होता. अत्यंत बिकट परिस्थितीशी सामना करत, कित्येकदा उपाशीपोटी राहूनही लेखकाने शिक्षण पूर्ण केले. पण त्यांच्या जमातीची परिस्थिती मात्र तशीच होती व आहे. लेखकाने एक दाहक सत्य सांगितलं, गबाळ घेऊन गावोगाव फिरण्याचं. ‘आमच्या जमातीतील प्रत्येक माणूस, रानातच जन्माला येत होता व रानातच मरत होता.’ कुडमुड्या जोशींचं हे निराशादायक चित्र लेखकाने उभं केलं आहे. तरीही त्याच्या मनात एक आशादायक चित्र उभारताना दिसलं. ‘मनात अनेक पहाटा उजाडल्या होत्या. वाट पहात होतो प्रत्यक्ष जीवनात पहाट उगवण्याची.’ ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 2-7-2016

    मानव समाजातीलच एक घटक, ज्याला स्वत:चे असे अस्तित्व नाही अशा घटकाचे- ‘कुडमोडे जोशी’ या जातीचे- जीवन विस्तारित स्वरूपात येथे आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पात्र आज या सत्य परिस्थितीला तोंड देत आहे. भटक्या जमातीची दु:खे, वेदना, स्त्रियांचे पशुतुल्य जीन, त्यांच्या रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा याविषयीचा सत्य वृत्तान्त यात सादर केला गेला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more