* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184988772
  • Edition : 3
  • Publishing Year : 1983
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :DADASAHEB MORE COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE AUTHOR WHO IS NOW AN ASSOCIATE PROFESSOR IN THE DEPARTMENT OF EDUCATION AND SOCIAL SCIENCES IN NASHIK BELONGS TO THE NOMADIC JOSHI (ASTROLOGERS LOW IN THE CASTE HIERARCHY) TRIBE IN MAHARASHTRA. GABAL IS HIS AUTOBIOGRAPHY WHICH COVERS HIS CHILDHOOD AND EARLY YOUTH. AS HIS FAMILY HAD NO PERMANENT RESIDENCE, DADASAHEB HARDLY HAD AN OPPORTUNITY TO ATTEND SCHOOL, AND UNTIL THE AGE OF ALMOST SEVEN, HE TOOK TO THE FAMILY TRADITION OF BEGGING AND EARNING HIS LIVELIHOOD. AGAINST ALL ODDS SUCH AS ABJECT POVERTY, SUPERSTITION, DISCOURAGEMENT FROM THE ELDERS IN THE COMMUNITY, DADASAHEB CONTINUED HIS EDUCATION UNTIL GRADUATION. AFTER COMPLETING HIS HIGHER SECONDARY, HE SUPPORTED HIS EDUCATION INITIALLY BY DOING MENIAL JOBS AND LATER ACTING, AND BY SCHOLARSHIP. THE TITLE OPENS A WINDOW ON THE LIFE OF THE DOWNTRODDEN, AND PARTICULARLY THEIR DIALECT.
मानव समाजातीलच एक घटक, ज्याला स्वत:चे असे अस्तित्व नाही अशा घटकाचे- `कुडमोडे जोशी` या जातीचे- जीवन विस्तारित स्वरूपात येथे आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पात्र आज या सत्य परिस्थितीला तोंड देत आहे. भटक्या जमातीची दु:खे, त्यांच्या व्यथा, वेदना, स्त्रियांचे पशुतुल्य जीवन, त्यांच्या रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा याविषयीचा सत्य वृत्तान्त यात सादर केला गेला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GABAL #GABAL #गबाळ #AUTOBIOGRAPHY #MARATHI #DADASAHEBMORE "
Customer Reviews
  • Rating StarSrikant Birajdar

    वाचून डोकं सुन्न करणारा पुस्तक. लेखक दादासाहेब मोरे त्यांना जेव्हा पासून समजायला लागलं, तेव्हा पासून ते ज्या जमातीत जन्मला आले त्या भटक्या जमातीची दुःखी व्यथा, त्यांची समाजात होत असलेली उपेक्षा, त्याचं जीवन हे या पुस्तकात उभं करण्याचं प्रयत्न केलाआहे. मिरज तालुक्यातील बाजार सलगरे शहरवजा खेडेगाव असलेल्या ठिकाणी एका कोंडिबा कुंभाराच्या शेतात ही भटकी जात वर्षातून एकदा नोव्हेंबर ते डिसेंबर एक महिना मुक्कामाला असायचा, दोन काठ्यावर पोती टाकून तयार केलेलं पाल म्हणजेच त्यांच घर. पालासमोर तीन दगड आणून ठेवायचे, रानातून लांकड गवऱ्या गोळा करून आणायचा. आणि आपली चूल पेटवायची. पाला समोर एक मोठा दगड आणून ठेवायचे, आणि त्यावर बसून अंघोळ करायची. बायकांनी देखील तिथंच अंघोळ करायची. त्याना लाज वाटायची नाही, बहुतेक त्यांच्या जीवनाच्या हिशोबात राजेच खातं उघडलं नसावं. त्या पाच एकरात जत्रा भरवल्या सारखी असायची. फक्त दुःख आणि लाचारी यांची देवघेवचं या जत्रेत चालत होती.अश्या पालाच्या जमातीत लेखक जीवन जगत मोठे झाले. दुसऱ्यांना खोटं सांगून त्याच्या कडून एखादं कोंबडी घेऊन खोटं म्हणजे तुझ्या घरात सूख निर्माण करतो, तुझ्या मुलांनी तु़झ ऐकांव असं करतो, तुझ्या संपत्तीत बरकत निर्माण करतो. असे खोटे सांगून त्या बदल्यात एखादी कोंबडी घ्यायची. या समाजाला समजत नाही का..? आम्हाला संपत्तीच्या शिखरावर उंभ करणारा माणूस भाकरीच्या तुकड्यासाठी दारोदार भीक का मागत फिरतो ? सुखी होण्याच्या खोठ्या आशेने समाज अश्या लोकांना कोंबड्या देतो. हे नवलच आहे. ...Read more

  • Rating StarPROF. DATTA JADHAV

    आदरणीय दादासाहेब, आपलं आत्मचरित्र वाचलं. थक्क झालो. मनाला विश्वास बसत नव्हता. एखादा काल्पनिक, जीवनपट वाटत होता. हे सर्व काल्पनिक नसून वास्तविक आहे, याने जगण्याला बळ व अस्तित्व नसणाऱ्याना आत्मभान मिळते. आपल्या सहचरिणी सौ. विमल मोरे यांचे आत्मकथन प्रमतः वाचले, तद्नंतर पुढील आयुष्याबद्दल अगम्य राहिला असता. अशा समाजातील व्यक्ती शिकून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. स्वाभिमानाने हे केवळ भारतीय संविधानामुळेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही आपल्या समाजाला इतका संघर्ष करावा लागतो, हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, त्या केवळ भारतीय संविधानाची योग्य व पूर्णता अंमलबजावणी न केल्यामुळेच. तुमच्या जीवनातील मानका आईचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. देव दगडात नसतो, तो माणसात असतो. अशिक्षित असूनही आपल्या वडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी खूप त्याग केला. स्वतःच्या मुलीच्या लग्नात ते नवीन कपडेही घेऊ शकले नाहीत, हा त्याग पराकोटीचा आहे. जतला शिक्षणाला असताना तुम्ही जत ते इंचलकरंजी केलेला प्रवास आई मुलाचे निस्सिम व प्रखर प्रेम व्यक्त करते. आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. लाड, पाटील यांनी तुम्हास आत्मबळ दिले असे गुरुजण आज तुरळक आहेत. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा स्नेहजिव्हाळा, नकोत नुसती नाती. आपल्या घरांना मातीच्या भिंती कदाचित त्या काळात नव्हत्या पण प्रेम, स्नेह, जिव्हाळा, त्याग, विश्वास यांच्या भिंती अभेद्य होत्या. या भिंतीच आज जागतिकीकरणाच्या काळात धूसर झाल्या आहेत. सर्वकाही असूनही जे लोक नशिबाला दोष देतात त्यांच्यासाठी आपले आत्मचरित्र एखाद्या मार्गदर्शकासारखे आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 5-6-2016

    मराठी साहित्यात आत्मकथन हा एक प्रमुख प्रवाह आहे. आत्मकथन हे कित्येकदा आयुष्याच्या एका टप्प्यावर मागे वळून पाहण्याच्या इच्छेने केलेले असते तर कधी गत आयुष्यातील घटनांच्या स्मृतींचा, त्यांच्या अवलोकनाचा पट असतो. कधी समाजातील उपेक्षित, शोषित वर्गाचे वेदनमय कथन असते. ‘गबाळ’ हे दादासाहेब मोरे लिखित आत्मकथन म्हणजे ‘कुडमुडे जोशी’ या जमातीचे भटक्या अस्तित्वहीन, पीडित वर्गाच्या पशुतुल्य जीवनाची वेदनामय करुण कहाणी आहे. ‘गबाळ’मध्ये लेखकाच्या बालपणापासून दु:खाची परिसीमा नसलेले जे उपभोग वाट्याला आले व आजही ती जमात तेच दारुण जीवन जगत आहे त्याचे वास्तव चित्रण आहे. भटक्या जीवनाचा अनुभव घेत पोटापाण्याचा कोणताही व्यवसाय न करणारी ही जमात भीक मागून पोट भरते. गावकुसाबाहेर पालं टाकून गावागावातून भीक मागत फिरणे हेच प्राक्तन. समाजातील इतर जमाती यांच्याकडे चोर म्हणून बघून त्यांना पशुतूल्य वर्तणूक देतात. पिंगला पक्ष्याच्या माध्यमातून लोकांना भविष्यकथन करणे व त्याबद्दल भाकरीचे तुकडे मिळवणे हा त्यांचा उद्योग. हे भविष्यकथन म्हणजे समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, रुढी, अशिक्षितपणाचे वास्तव कथन. लेखकाचे वडिलांना आपल्या मुलाने शाळेत जावे, शिकावे व या लाजिरवाण्या अवस्थेतून बाहेर पडावे असे वाटत होते. वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे लेखक शाळेत जाऊ शकला. लेखक म्हणतात,‘‘मी भीक मागायला जात होतो व अभ्यासही करत होतो. माझ्या जीवनाचे दोन रस्ते निर्माण झाले होते. मी कोणत्या रस्त्यावरून जाणार होतो ते मलाच माहीत नव्हतं.’’ शिकत असताना लेखकाला अनेक शिक्षकांची, सहृदय व्यक्तींची, आजीची मोलाची मदत मिळत गेली - निंबोणी गावचे गुरुजी, पाटील गुरुजी - पण अनेक वेळा पैशाअभावी शाळा सोडण्याची पाळी आली व ‘हाडप’हाती आलं. भाकरी मागण्यासाठी कधी भगुली घेऊन दारोदार फिरत होतो. शालेय जीवनातून लाचार जीवनात प्रवेश केला होता. आत्महत्या करावी असं वाटत होतं. एस.एस.सी.ला फर्स्ट क्लास मिळवून लेखकाने जिद्दीने यश मिळवलं होतं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ग्रामपंचायतीत बोटींग मशीनवर, गटार साफ करणे ही कामे केली. महाविद्यालयीन काळात लेखकाच्या जीवनात एक वेगळं वळण आलं. गॅदरिंगमध्ये नाटकात कामे करणे, कलापथकात काम करणे यामुळे एका सहृदय व्यक्तीमुळे तेथील गणेशोत्सवात काम व पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. महाविद्यालयातील देवधर सरांमुळे होस्टेलची सोय झाली. शिक्षणाचा व कलेचाही विकास होत होता. अत्यंत बिकट परिस्थितीशी सामना करत, कित्येकदा उपाशीपोटी राहूनही लेखकाने शिक्षण पूर्ण केले. पण त्यांच्या जमातीची परिस्थिती मात्र तशीच होती व आहे. लेखकाने एक दाहक सत्य सांगितलं, गबाळ घेऊन गावोगाव फिरण्याचं. ‘आमच्या जमातीतील प्रत्येक माणूस, रानातच जन्माला येत होता व रानातच मरत होता.’ कुडमुड्या जोशींचं हे निराशादायक चित्र लेखकाने उभं केलं आहे. तरीही त्याच्या मनात एक आशादायक चित्र उभारताना दिसलं. ‘मनात अनेक पहाटा उजाडल्या होत्या. वाट पहात होतो प्रत्यक्ष जीवनात पहाट उगवण्याची.’ ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 2-7-2016

    मानव समाजातीलच एक घटक, ज्याला स्वत:चे असे अस्तित्व नाही अशा घटकाचे- ‘कुडमोडे जोशी’ या जातीचे- जीवन विस्तारित स्वरूपात येथे आले आहे. या पुस्तकातील प्रत्येक पात्र आज या सत्य परिस्थितीला तोंड देत आहे. भटक्या जमातीची दु:खे, वेदना, स्त्रियांचे पशुतुल्य जीन, त्यांच्या रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा याविषयीचा सत्य वृत्तान्त यात सादर केला गेला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more