* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HACH MAZA MARG
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984613
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HACH MAZA MARG IS THE AUTOBIOGRAPHY OF SACHIN, A POPULAR NAME IN INDIAN FILM INDUSTRY. SACHIN MADE HIS DEBUT IN THE FILMDOM THROUGH A MARATHI FILM IN 1963 AT THE AGE OF FOUR, WHICH WON THE NATIONAL AWARD FOR THE BEST CHILD ARTIST. (HE WON IT AGAIN FOR A SECOND TIME NINE YEARS LATER.) THERE HAS BEEN NO LOOKING BACK FOR HIM IN THE LAST FIVE DECADES. HE HAS NOT BEEN ONLY AN ACTOR BUT HE HAS PROVED HIMSELF AS A SUCCESSFUL PRODUCER, DIRECTOR, SCREENPLAY WRITER, EDITOR, MUSIC DIRECTOR. BESIDES THE CELLULOID WORLD HE HAS ALSO MADE HIS MARK IN THEATRE, ON SMALL SCREEN, STAGE SHOWS AND REALITY SHOWS CONCERNING TALENT HUNTING. SACHIN ENTERED THE FILM WORLD AT A TIME WHEN THE THEN MAJOR HERO’S – RAJ KAPOOR, DILIPKUMAR AND DEV ANAND HAD CROSSED THEIR PRIME. INITIALLY WHILE A NEW GENERATION OF TALENTED ACTORS WAS EMERGING, SACHIN MAINLY PLAYED SUPPORTING ROLES. HE SHOT TO FAME AS A PROMINENT ACTOR IN ANKHIYONKE JHAROKHESE, GEET GATA CHAL, AND NADIAKE PAAR. HIS ROLES IN SHOLAY AND TRISHUL WERE ALSO MEMORABLE. AFTER AN ILLUSTRIOUS CAREER IN HINDI, SACHIN TURNED TO MARATHI WHEN HE PRODUCED AND DIRECTED SOME COMMERCIAL SUPER HIT FILMS. HE PLAYED A LEADING ROLE IN THESE FILMS. HACH MAZA MARG IS NOT SIMPLY AN AUTOBIOGRAPHY OF A STAR TRACING PERSONAL LIFE. THROUGH ITS ANECDOTAL STYLE OF NARRATION IT PROVIDES INSIGHT INTO, THOUGH IN PART, A LONG PHASE IN THE HISTORY OF INDIAN CINEMA INDUSTRY, WHICH SAW THE RISE OF THE STAR SYSTEM, HOW SOME EMINENT DIRECTORS WORKED, ADVANCES IN TECHNOLOGY, PRODUCTION OF SOME SUCCESSFUL FILMS, AND NOVEL PROMOTIONAL TECHNIQUES.
बालकलाकार ‘मास्टर सचिन’... सहजसुंदर अभिनय करणारा ‘हिरो’... जबरदस्त परफॉर्मन्स देणारा... नवोदितांना आपुलकीने मार्गदर्शन करणारा ‘महागुरू’... हिंदी चित्रपटसृष्टीत अभिमानाने ‘मराठी मुद्रा’ उमटवणारा कलावंत... आजवर आपण सचिनला अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीतकार अशा भूमिकांमध्ये मोठ्या, तसेच छोट्या पडद्यावर पाहिलं आहे. अशा विविध क्षेत्रांत काम करताना त्याला कोणकोणते अनुभव आले, त्याची सुवर्णमहोत्सवी कारकिर्द कशी बहरली, मुलगा-भाऊ-पती-वडील-मित्र या भूमिका त्याने कशा पार पाडल्या, त्याचं पडद्यामागचं आयुष्य कसं आहे, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल! म्हणूनच सचिन शरद पिळगांवकर याच्या आयुष्याच्या प्रवासाची ही पटकथा...
अ.भा.म.प्र.संघ उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१६

No Records Found
No Records Found
Keywords
#SACHIN PILGAONKAR #ASHI HI BANVA BANVI #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI
Customer Reviews
  • Rating Starकानिकनाथ बि. भडके

    सचिन सर तुमचे पुस्तक जे प्रकाशित झाले , ते तुमच्या जिवनाचा पहिला टप्पाच म्हणला पाहिजे अन् ...हाे तिच खरी जिवनातली खरी कलाटनी हाेय अस मला वाटत ...ऊजळलेला दिवस आपण डाेळ्याने-डाेळा भरून पाहताेय पण ताेच दिवस मात्र परत येत नसताे.. एवढ माञ नक्किच!! सर तुमहच्या नविन प्रराशित झालेल्या लेकराला...हाच माझा मार्ग या गाेडंस पुस्तताला खुप-खुप शुभेच्छा...!! ...Read more

  • Rating StarSmita Deshpande

    सचिन पिळगावकर यांचे हे आत्मकथन. फिल्म इंडस्ट्री मधील `मोठे` नाव. शब्दांकन अभिजीत पेंढारकर यांचे. मेहता पब्लिशिंग हाऊस चे प्रकाशन. ३१२ पानाचे हे जाडजूड पुस्तक. परंतु अर्ध्याहून अधिक पानांवर छायाचित्र आहेत. सचिन चे `शिष्य`, चाहते, ज्यांना सचिन ने सर्प्रथम ब्रेक दिला ते प्रसिद्ध गायक सोनू निगम यांची `मेरे सचिन भैय्या` म्हणुन याला प्रस्तावना आहे. १९६३ साली वयाच्या अवघ्या साडे चार वर्षाच्या सचिन ने बालकलाकार म्हणुन काम केले अणि त्या नंतर करतच राहिले. ५० वर्षाहून अधिक काळ ते या इंडस्ट्री मध्ये वेगवेगळया भूमिकेत आहेत. या पुस्तकातील कथन एकूण ७० भागात आहे. त्याला सीन १,सीन२.. असे नम्बर आहेत. सीन १ म्हणजे माझी नाट्यमय `एंट्री` पासून सीन ७० मध्ये `कृतज्ञ` हा अंतिम सीन आहे. हे आत्मकथन असले तरी यातील सगळी पात्रे आपल्या परिचयाची आहे. सचिन येवढेच या इंडस्ट्री विषयी वाचायला आपल्याला नेहमीच आवडते. बहुतेक सगळी पात्र फिल्म इंडस्ट्री शी जुळलेली आहेत. मराठी पेक्षा अधिक काम त्यांनी हिंदी मध्ये केले आहे. सचिन ने `राज कपूर` व्हावे असे त्यांचे वडील शरद पिळगावकर यांना वाटायचे. त्या करता तसे बाळकडू त्यांच्या वडीलांनी त्यांना दिले. इंडस्ट्रीची ओळख करून दिली. हे आत्मकथन वाचताना आपल्या आवडते हीरो, हीरोइन, दिग्दर्शक, कॅमेरामन 📹, मेकअप आर्टिस्ट, संगीतकार, गायक, तंत्रज्ञान, याबद्दल अनेक किस्से वाचायला मिळतात. त्या सर्वांचे सचिन जी सोबत असणारे भावनिक, प्रोफेशनल संबंध, त्या निमित्ताने घडलेल्या गमती जमती तर काही कटू अनुभव यात आहेत. मीना आप्पा (मीना कुमारी), युसूफ भाई (दिलीप कुमार), हरी भाई (संजीव कुमार), अमित जी, दादा मुनि (अशोक कुमार) या व अनेक कलाकारांसोबत ऋषीदा, पंचम दा, किशोर दा, आशा ताई, दीदी, सुलोचना बाई, महेश कोठारे, अशोक सराफ - निवेदिता, लक्षा, माधुरी, नवीन जुन्या हीरो, हिरोइन सार्‍यांची उजळणी त्या निमित्ताने होते. सचिन - सारिका /सचिन - रंजीता या त्या काळी गाजलेल्या जोड्या. सचिन ची जोडी खूप hit झाली ती त्यांची `नवरी` सुप्रिया सोबत. या जोडी चा `सुखाचा संसार` film industry मध्ये आदराने उल्लेखला जातो. त्यांची `एकुलती एक` श्रीया हिच्यावर अर्थातच स्वतंत्र `सीन` आहे. बालकलाकार म्हणुन सुरवात करून अभिनेता(पारध - १९७७), दिग्दर्शक (मायबाप - १९८२), लेखक (माझा पती करोडपती - १९८८), निर्माता ( आयत्या घरात नागोबा - १९९१), गायक अशा विविध क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. त्या सर्वांचा उल्लेख या पुस्तकात आहे. ४२ मराठी सिनेमे, ३ मराठी नाटके( अपराध मीच केला, म्हैस येता माझ्या घरा, शिकार) , हिंदी, गुजराती, इंग्रजी एकूण ८९ चित्रपट, TV मालिका, Reality Shows, Host, सचिनमय एल्बम अशा अनेक बाबीत त्यांचे अमूल्य योगदान आहे. नच बलिऐं - सीजन १ चे विजेता म्हणुन त्यांची व सुप्रिया ची जोडी सर्वांच्या नेहमी लक्षात राहील. ५० वर्षाहून अधिक काळ इंडस्ट्री मध्ये काम केल्यावर Star या Rockstar या reality show मध्ये गायक म्हणून सहभाग घेणे कौतुकास्पद आहे. त्यांचे होम प्रॉडक्शन `सुश्रिया आर्ट्स` ची `तू तू मैं मैं` ही अतिशय गाजलेली रिमा अणि सुप्रिया ची मालिका ने त्यांना आर्थिक स्थैर्य दिले आहे. याची काबुली ते स्वतः देतात. १९९५ मध्ये परत एकदा मी Income Tax भरण्याच्या टप्प्या पर्यंत गेलो असे ते म्हणतात. Sachin, you are an Asset to Film Industry अशी ऋषीदां कडून त्यांना मिळालेली शाबासकी बरेच काही बोलून जाते. महागुरु ही स्वतःला एका अर्थी त्यांनी दिलेली पदवी हा प्रवास वाचता योग्य वाटते. सचिन महाराष्ट्रचे शान नक्कीच आहे. त्यांचा दांडगा उत्साह, सतत शिकण्याची धडपड, कलेला वाहिलेले, नवीन काही देण्याचे सतत प्रयत्न करणारे सचिन पिळगावकर महाराष्ट्रचे भूषण नक्कीच आहे. `हाच माझा मार्ग` योग्य शीर्षक आहे. हा चॉकलेट हीरो नेहमीच आवडीचा होता अणि राहील. चित्रपट प्रेमींनी हे आत्मकथन नक्की वाचावे. त्यांच्या पुढील वाटचाली करता शुभेच्छा 💐 ...Read more

  • Rating Starअमेय पाटकर

    सचिनचे (सॉरी पण मित्रासारखा वाटतोस) आत्मकथन प्रकाशित झाल्यावर दोन दिवसातच संपूर्ण वाचून काढले. काही माणसांना ते जन्माला आल्यावर कळालेलं असतं की, आपल्याला काय कराचे आहे ते. त्यासाठी लागणाऱ्या मार्गदर्शनाची संधी ती व्यक्ती शोधत असते. प्रत्येक व्यक्तीकडन स्वत:च्या विकासासाठी लागणारे गुण शोधून स्वत:चा विकास कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे आत्मकथन. सांस्कृतिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व करणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी व त्यांच्या परिवारालाही हे फार मार्गदर्शक ठरेल. या क्षेत्रात वावरणाऱ्या ज्येष्ठ साहाय्यक सह तसेच वयाने लहान असणाऱ्या कलाकारांशी कसे वागावे, नम्रता, कल्पकता, गुणग्राहकता, आत्मविश्वास, संयम, सतत्योद्योग, कौतुक, विनोद इत्यादी सचिनच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अभ्यासण्यासारखे आहेत. या प्रचंड धावपळीतही प्रपंच उत्तम कसा करावा हे ही कळते. थोडक्यात काय तर पूर्ण स. चिन्मय (सचिनमय) असणारे हे आत्मकथन सचिनच्या मनाचा आरसा आहे. सर्वांनी जरूर वाचावे. आम्ही तुझे ऋणी आहोत. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA LOKRANG 14-9-2014

    सचिन पिळगावकर या सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शकाच्या पन्नास वर्षांतील कामगिरीचा हा आलेखपट. सचिन यांनी त्यांच्या १९६३ मधील ‘हा माझा मार्ग एकला’ या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील ‘एकुलती एक’ यादरम्यानचा चित्रपटसृष्टीतील पन्नास वर्षांचा प्रवास एकंर ६९ प्रकरणांत उलगडला आहे. बालकलाकार सचिन, अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीत दिग्दर्शक, नर्तक, कॅमेरामन, हिंदी चित्रपट लेखक, टीव्ही मालिका आणि रिअ‍ॅलिटी शो निर्माता, परीक्षक, निवेदक, उर्दू शायर असा अनेक मार्गांनी संपन्न झालेला त्यांचा प्रवास यात दिसतो. याहीपुढे जाऊन एक यशस्वी कुटुंबप्रमुख, गाजावाजा न करता नवोदितांच्या मदतीला धावून जाणारे, माणसे जोडणारे आणि नाती मानणारे तसेच निभावणारे सचिन पिळगावकर माणूस म्हणून यात भावतात. उत्तम निरीक्षणशक्ती, दांडगी स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा, संयमी, दिलदार अशी उद्यमी व्यक्ती या आत्मचरित्रातून आपल्यासमोर साकार होते. पन्नाशीनंतरही विद्यार्थीभावना अंगी बाळगून आजही नवनवे प्रयोग करण्यास सरसावणारा हा कलाकार समजण्यास त्यातून मदत होते, हा या पुस्तकाचा विशेष. पुस्तकाची भाषा विलक्षण संवादी आहे. ही पन्नास वर्षे जशी सचिन यांची होती, तशीच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचीही होती. मात्र, त्यावरील अपेक्षित भाष्य यात आलेले नाही. सचिन यांच्याकडे सांगण्यासारखे खूप काही आहे. त्यातील केवळ हिमनगाचे टोक म्हणावे इतकीच माहिती या चरित्रात आली आहे असे जाणवते. हे चरित्र जसे किश्श्यांमधून तसेच पानोपानी दिलेल्या तब्बल १०८ पूरक छायाचित्रांतूनही उलगडत जाते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more