* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HACH MAZA MARG
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984613
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 336
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HACH MAZA MARG IS THE AUTOBIOGRAPHY OF SACHIN, A POPULAR NAME IN INDIAN FILM INDUSTRY. SACHIN MADE HIS DEBUT IN THE FILMDOM THROUGH A MARATHI FILM IN 1963 AT THE AGE OF FOUR, WHICH WON THE NATIONAL AWARD FOR THE BEST CHILD ARTIST. (HE WON IT AGAIN FOR A SECOND TIME NINE YEARS LATER.) THERE HAS BEEN NO LOOKING BACK FOR HIM IN THE LAST FIVE DECADES. HE HAS NOT BEEN ONLY AN ACTOR BUT HE HAS PROVED HIMSELF AS A SUCCESSFUL PRODUCER, DIRECTOR, SCREENPLAY WRITER, EDITOR, MUSIC DIRECTOR. BESIDES THE CELLULOID WORLD HE HAS ALSO MADE HIS MARK IN THEATRE, ON SMALL SCREEN, STAGE SHOWS AND REALITY SHOWS CONCERNING TALENT HUNTING. SACHIN ENTERED THE FILM WORLD AT A TIME WHEN THE THEN MAJOR HERO’S – RAJ KAPOOR, DILIPKUMAR AND DEV ANAND HAD CROSSED THEIR PRIME. INITIALLY WHILE A NEW GENERATION OF TALENTED ACTORS WAS EMERGING, SACHIN MAINLY PLAYED SUPPORTING ROLES. HE SHOT TO FAME AS A PROMINENT ACTOR IN ANKHIYONKE JHAROKHESE, GEET GATA CHAL, AND NADIAKE PAAR. HIS ROLES IN SHOLAY AND TRISHUL WERE ALSO MEMORABLE. AFTER AN ILLUSTRIOUS CAREER IN HINDI, SACHIN TURNED TO MARATHI WHEN HE PRODUCED AND DIRECTED SOME COMMERCIAL SUPER HIT FILMS. HE PLAYED A LEADING ROLE IN THESE FILMS. HACH MAZA MARG IS NOT SIMPLY AN AUTOBIOGRAPHY OF A STAR TRACING PERSONAL LIFE. THROUGH ITS ANECDOTAL STYLE OF NARRATION IT PROVIDES INSIGHT INTO, THOUGH IN PART, A LONG PHASE IN THE HISTORY OF INDIAN CINEMA INDUSTRY, WHICH SAW THE RISE OF THE STAR SYSTEM, HOW SOME EMINENT DIRECTORS WORKED, ADVANCES IN TECHNOLOGY, PRODUCTION OF SOME SUCCESSFUL FILMS, AND NOVEL PROMOTIONAL TECHNIQUES.
बालकलाकार ‘मास्टर सचिन’... सहजसुंदर अभिनय करणारा ‘हिरो’... जबरदस्त परफॉर्मन्स देणारा... नवोदितांना आपुलकीने मार्गदर्शन करणारा ‘महागुरू’... हिंदी चित्रपटसृष्टीत अभिमानाने ‘मराठी मुद्रा’ उमटवणारा कलावंत... आजवर आपण सचिनला अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीतकार अशा भूमिकांमध्ये मोठ्या, तसेच छोट्या पडद्यावर पाहिलं आहे. अशा विविध क्षेत्रांत काम करताना त्याला कोणकोणते अनुभव आले, त्याची सुवर्णमहोत्सवी कारकिर्द कशी बहरली, मुलगा-भाऊ-पती-वडील-मित्र या भूमिका त्याने कशा पार पाडल्या, त्याचं पडद्यामागचं आयुष्य कसं आहे, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल! म्हणूनच सचिन शरद पिळगांवकर याच्या आयुष्याच्या प्रवासाची ही पटकथा...
अ.भा.म.प्र.संघ उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१६

No Records Found
No Records Found
Keywords
#SACHIN PILGAONKAR #ASHI HI BANVA BANVI #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI
Customer Reviews
  • Rating Starकानिकनाथ बि. भडके

    सचिन सर तुमचे पुस्तक जे प्रकाशित झाले , ते तुमच्या जिवनाचा पहिला टप्पाच म्हणला पाहिजे अन् ...हाे तिच खरी जिवनातली खरी कलाटनी हाेय अस मला वाटत ...ऊजळलेला दिवस आपण डाेळ्याने-डाेळा भरून पाहताेय पण ताेच दिवस मात्र परत येत नसताे.. एवढ माञ नक्किच!! सर तुमहच्या नविन प्रराशित झालेल्या लेकराला...हाच माझा मार्ग या गाेडंस पुस्तताला खुप-खुप शुभेच्छा...!! ...Read more

  • Rating StarSmita Deshpande

    सचिन पिळगावकर यांचे हे आत्मकथन. फिल्म इंडस्ट्री मधील `मोठे` नाव. शब्दांकन अभिजीत पेंढारकर यांचे. मेहता पब्लिशिंग हाऊस चे प्रकाशन. ३१२ पानाचे हे जाडजूड पुस्तक. परंतु अर्ध्याहून अधिक पानांवर छायाचित्र आहेत. सचिन चे `शिष्य`, चाहते, ज्यांना सचिन ने सर्प्रथम ब्रेक दिला ते प्रसिद्ध गायक सोनू निगम यांची `मेरे सचिन भैय्या` म्हणुन याला प्रस्तावना आहे. १९६३ साली वयाच्या अवघ्या साडे चार वर्षाच्या सचिन ने बालकलाकार म्हणुन काम केले अणि त्या नंतर करतच राहिले. ५० वर्षाहून अधिक काळ ते या इंडस्ट्री मध्ये वेगवेगळया भूमिकेत आहेत. या पुस्तकातील कथन एकूण ७० भागात आहे. त्याला सीन १,सीन२.. असे नम्बर आहेत. सीन १ म्हणजे माझी नाट्यमय `एंट्री` पासून सीन ७० मध्ये `कृतज्ञ` हा अंतिम सीन आहे. हे आत्मकथन असले तरी यातील सगळी पात्रे आपल्या परिचयाची आहे. सचिन येवढेच या इंडस्ट्री विषयी वाचायला आपल्याला नेहमीच आवडते. बहुतेक सगळी पात्र फिल्म इंडस्ट्री शी जुळलेली आहेत. मराठी पेक्षा अधिक काम त्यांनी हिंदी मध्ये केले आहे. सचिन ने `राज कपूर` व्हावे असे त्यांचे वडील शरद पिळगावकर यांना वाटायचे. त्या करता तसे बाळकडू त्यांच्या वडीलांनी त्यांना दिले. इंडस्ट्रीची ओळख करून दिली. हे आत्मकथन वाचताना आपल्या आवडते हीरो, हीरोइन, दिग्दर्शक, कॅमेरामन 📹, मेकअप आर्टिस्ट, संगीतकार, गायक, तंत्रज्ञान, याबद्दल अनेक किस्से वाचायला मिळतात. त्या सर्वांचे सचिन जी सोबत असणारे भावनिक, प्रोफेशनल संबंध, त्या निमित्ताने घडलेल्या गमती जमती तर काही कटू अनुभव यात आहेत. मीना आप्पा (मीना कुमारी), युसूफ भाई (दिलीप कुमार), हरी भाई (संजीव कुमार), अमित जी, दादा मुनि (अशोक कुमार) या व अनेक कलाकारांसोबत ऋषीदा, पंचम दा, किशोर दा, आशा ताई, दीदी, सुलोचना बाई, महेश कोठारे, अशोक सराफ - निवेदिता, लक्षा, माधुरी, नवीन जुन्या हीरो, हिरोइन सार्‍यांची उजळणी त्या निमित्ताने होते. सचिन - सारिका /सचिन - रंजीता या त्या काळी गाजलेल्या जोड्या. सचिन ची जोडी खूप hit झाली ती त्यांची `नवरी` सुप्रिया सोबत. या जोडी चा `सुखाचा संसार` film industry मध्ये आदराने उल्लेखला जातो. त्यांची `एकुलती एक` श्रीया हिच्यावर अर्थातच स्वतंत्र `सीन` आहे. बालकलाकार म्हणुन सुरवात करून अभिनेता(पारध - १९७७), दिग्दर्शक (मायबाप - १९८२), लेखक (माझा पती करोडपती - १९८८), निर्माता ( आयत्या घरात नागोबा - १९९१), गायक अशा विविध क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. त्या सर्वांचा उल्लेख या पुस्तकात आहे. ४२ मराठी सिनेमे, ३ मराठी नाटके( अपराध मीच केला, म्हैस येता माझ्या घरा, शिकार) , हिंदी, गुजराती, इंग्रजी एकूण ८९ चित्रपट, TV मालिका, Reality Shows, Host, सचिनमय एल्बम अशा अनेक बाबीत त्यांचे अमूल्य योगदान आहे. नच बलिऐं - सीजन १ चे विजेता म्हणुन त्यांची व सुप्रिया ची जोडी सर्वांच्या नेहमी लक्षात राहील. ५० वर्षाहून अधिक काळ इंडस्ट्री मध्ये काम केल्यावर Star या Rockstar या reality show मध्ये गायक म्हणून सहभाग घेणे कौतुकास्पद आहे. त्यांचे होम प्रॉडक्शन `सुश्रिया आर्ट्स` ची `तू तू मैं मैं` ही अतिशय गाजलेली रिमा अणि सुप्रिया ची मालिका ने त्यांना आर्थिक स्थैर्य दिले आहे. याची काबुली ते स्वतः देतात. १९९५ मध्ये परत एकदा मी Income Tax भरण्याच्या टप्प्या पर्यंत गेलो असे ते म्हणतात. Sachin, you are an Asset to Film Industry अशी ऋषीदां कडून त्यांना मिळालेली शाबासकी बरेच काही बोलून जाते. महागुरु ही स्वतःला एका अर्थी त्यांनी दिलेली पदवी हा प्रवास वाचता योग्य वाटते. सचिन महाराष्ट्रचे शान नक्कीच आहे. त्यांचा दांडगा उत्साह, सतत शिकण्याची धडपड, कलेला वाहिलेले, नवीन काही देण्याचे सतत प्रयत्न करणारे सचिन पिळगावकर महाराष्ट्रचे भूषण नक्कीच आहे. `हाच माझा मार्ग` योग्य शीर्षक आहे. हा चॉकलेट हीरो नेहमीच आवडीचा होता अणि राहील. चित्रपट प्रेमींनी हे आत्मकथन नक्की वाचावे. त्यांच्या पुढील वाटचाली करता शुभेच्छा 💐 ...Read more

  • Rating Starअमेय पाटकर

    सचिनचे (सॉरी पण मित्रासारखा वाटतोस) आत्मकथन प्रकाशित झाल्यावर दोन दिवसातच संपूर्ण वाचून काढले. काही माणसांना ते जन्माला आल्यावर कळालेलं असतं की, आपल्याला काय कराचे आहे ते. त्यासाठी लागणाऱ्या मार्गदर्शनाची संधी ती व्यक्ती शोधत असते. प्रत्येक व्यक्तीकडन स्वत:च्या विकासासाठी लागणारे गुण शोधून स्वत:चा विकास कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे आत्मकथन. सांस्कृतिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व करणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी व त्यांच्या परिवारालाही हे फार मार्गदर्शक ठरेल. या क्षेत्रात वावरणाऱ्या ज्येष्ठ साहाय्यक सह तसेच वयाने लहान असणाऱ्या कलाकारांशी कसे वागावे, नम्रता, कल्पकता, गुणग्राहकता, आत्मविश्वास, संयम, सतत्योद्योग, कौतुक, विनोद इत्यादी सचिनच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अभ्यासण्यासारखे आहेत. या प्रचंड धावपळीतही प्रपंच उत्तम कसा करावा हे ही कळते. थोडक्यात काय तर पूर्ण स. चिन्मय (सचिनमय) असणारे हे आत्मकथन सचिनच्या मनाचा आरसा आहे. सर्वांनी जरूर वाचावे. आम्ही तुझे ऋणी आहोत. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA LOKRANG 14-9-2014

    सचिन पिळगावकर या सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शकाच्या पन्नास वर्षांतील कामगिरीचा हा आलेखपट. सचिन यांनी त्यांच्या १९६३ मधील ‘हा माझा मार्ग एकला’ या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील ‘एकुलती एक’ यादरम्यानचा चित्रपटसृष्टीतील पन्नास वर्षांचा प्रवास एकंर ६९ प्रकरणांत उलगडला आहे. बालकलाकार सचिन, अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीत दिग्दर्शक, नर्तक, कॅमेरामन, हिंदी चित्रपट लेखक, टीव्ही मालिका आणि रिअ‍ॅलिटी शो निर्माता, परीक्षक, निवेदक, उर्दू शायर असा अनेक मार्गांनी संपन्न झालेला त्यांचा प्रवास यात दिसतो. याहीपुढे जाऊन एक यशस्वी कुटुंबप्रमुख, गाजावाजा न करता नवोदितांच्या मदतीला धावून जाणारे, माणसे जोडणारे आणि नाती मानणारे तसेच निभावणारे सचिन पिळगावकर माणूस म्हणून यात भावतात. उत्तम निरीक्षणशक्ती, दांडगी स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा, संयमी, दिलदार अशी उद्यमी व्यक्ती या आत्मचरित्रातून आपल्यासमोर साकार होते. पन्नाशीनंतरही विद्यार्थीभावना अंगी बाळगून आजही नवनवे प्रयोग करण्यास सरसावणारा हा कलाकार समजण्यास त्यातून मदत होते, हा या पुस्तकाचा विशेष. पुस्तकाची भाषा विलक्षण संवादी आहे. ही पन्नास वर्षे जशी सचिन यांची होती, तशीच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचीही होती. मात्र, त्यावरील अपेक्षित भाष्य यात आलेले नाही. सचिन यांच्याकडे सांगण्यासारखे खूप काही आहे. त्यातील केवळ हिमनगाचे टोक म्हणावे इतकीच माहिती या चरित्रात आली आहे असे जाणवते. हे चरित्र जसे किश्श्यांमधून तसेच पानोपानी दिलेल्या तब्बल १०८ पूरक छायाचित्रांतूनही उलगडत जाते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more