* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PANGALEECHYA AATHAVANEE
  • Availability : Available
  • ISBN : 9788184981575
  • Edition : 3
  • Publishing Year : DECEMBER 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN A WAY THIS IS AN AUTOBIOGRAPHY; THOUGH IT MAINLY REVEALS AROUND THE MEMORIES OF IN-LAWS OF THE AUTHOR AND MAINLY HER FATHER IN LAW. SHOBHA, DAUGHTER OF MRS. AND MR. PRADHAN, A TYPICAL MIDDLE CLASS MAHARASHTRIAN COUPLE WAS MARRIED TO DILIP CHITRE. SOON AFTER MARRIAGE SHE REALIZED THAT A GIRL DOES NOT MARRY TO A BOY. IN FACT, SHE MARRIES TO A FAMILY AND IS TIED UP WITH MANY PEOPLE WITH MANY RELATIONS. ONE OF SUCH RELATIONS IS THAT OF A DAUGHTER-IN-LAW. THROUGHOUT THE BOOK, WE COME ACROSS THE VALUES AND MORALS THAT WE OURSELVES HAVE BEEN TAUGHT AND HAVE ADOPTED AS WELL. THOUGH SHE SETTLED DOWN IN FAR AWAY COUNTRIES LIKE ENGLAND AND AMERICA, HER CULTURAL BASE KEPT HER STRONG AND INTACT, COME WHAT MAY. THE LOVE FROM HER FAMILY GAVE HER ENERGY TO KEEP GOING EVERY DAY. AFTER A BRIEF GLIMPSE OF HER LIFE AFTER MARRIAGE, SHOBHA ELABORATES HER TIME WITH HER IN-LAWS. NO ONE NOTICES THE CHANGE IN APPA, HER FATHER-IN-LAW. SLOWLY, HE STARTS BEING MORE AND MORE FORGETFUL. INITIALLY, EVERYONE PUTS THE BLAME ON HIS AGEING. BUT WHEN HE IS DIAGNOSED, IT BECOMES CLEAR THAT HE IS SUFFERING FROM ALZHEIMER. AND THEN HIS HEALTH KEEPS ON DETERIORATING MORE AND MORE. EACH LINE TELLS US MORE AND MORE ABOUT THE SYMPTOMS AND CONSEQUENCES OF THIS DISEASE, YET IN NO WAY THIS NARRATION IS INFORMATIVE. IT REACHES THE DEPTH OF OUR HEARTS. IT CASTS A SPELL ON OUR MINDS. IT REVEALS THE FACETS OF THE RELATIONSHIPS. IT MAKES US APPRECIATE THE FEELINGS OF A DAUGHTER-IN-LAW FOR HER FATHER-IN-LAW. IT MAKES US PONDER OVER OUR TIES WITH OUR FAMILY MEMBERS. IT NOURISHES THE INDIAN CULTURE WITH ALL ITS GOOD QUALITIES. EVERY LINE IS WORTH READING AND THEN MUSING OVER.
म्हटलं तर हे आत्मकथन आहे. मध्यमवर्गात जन्मलेली लेखिका अमेरिकेतल्या जीवनाचा स्वीकार करून जगत असताना, बदलत्या काळाबरोबर विविध अनुभवांना तोंड देत असताना बदलली नाही ती फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे मनावरचे मध्यमवर्गीय संस्कार. लग्नानंतरच्या आयुष्यात निर्माण झालेले नवे भावबंध, नाती-गोती, मनावरचे मध्यमवर्गीय संस्कार जोपासताना परदेशातील आयुष्यात वाट्याला आलेली अटळ धडपड ही त्यांची वैयक्तिक जरी असली, तरी ती वाचकाला प्रातिनिधिक वाटेल. पण त्याही पलीकडे जीवनातल्या एका विशिष्ट अनुभवावर लिहिता-लिहिता त्यांचे भावविश्व इतके विस्तारले जाते की, तो सीमित अनुभव जणू सर्वस्पर्शी बनतो आणि वाचकाला अंतर्मुख करून टाकतो. ‘पानगळीच्या आठवणी’ ही भावनाप्रधान साहित्यकृती, जीवघेण्या विलक्षण अनुभवाचा वेध घेत सांगितली जाणारी ही प्रांजळ कथा हृदय हेलावून सोडते हे नि:संशय.

No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SHOBHACHITRE #शोभाचित्रे #PANGALEECHYAAATHAVANEE #AUTOBIOGRAPHY #EKDIVAS
Customer Reviews
  • Rating StarSAMANA 08-05-2011

    आत्मकथन अन् कथालेखन! कसं जेवावं हे प्रत्येकाला लहानपणापासूनच शिकवलं जातं. कोणत्या पदार्थाबरोबर काय तोंडी लावणं घ्यावं. घास कसा घ्यावा. तो चावून कसा गिळावा. हे सगळं प्रत्येक व्यक्तीच्या अंगवळणी पडून गेलेलं असतं. पण समजा एखाद्याला हे विसरायला झालं तर?तुम्ही म्हणाल, ‘हे कसं शक्य आहे?’ पण होय! अल्झायमर या रोगामुळे हेच घडतं. अल्झायमर माणसाच्या मेंदूतल्या आठवणीच्या, स्मरणाच्या केंद्रालाच हळूहळू निकामी बनवत जातो. त्या माणसाला कोणतीही, कसलीही आठवणच राहत नाही. या भीषण रोगाचा प्रादुर्भाव जगभर वाढतो आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन अल्झायमरलाच बळी पडले. प्रस्तुत आत्मकथन ‘पानगळीच्या आठवणी’च्या लेखिका शोभा चित्रे यांचे सासरे विष्णू केशव चित्रे हेही अल्झायमरचे बळी ठरले. वास्तविक भाई चित्रे म्हणजे कुणी प्रसिद्ध व्यक्ती नव्हते. त्यांची सारी हयात बडोद्यात गेली. लेखिका शोभा चित्रे या मूळच्या मुंबईकर लग्न होऊन बडोद्याला गेल्या. तिथून प्रथम लंडन, मग अमेरिकेत न्यू जर्सी आणि आता वॉशिंग्टनला स्थिरावल्या आहेत. सासू-सासरे त्यांच्याकडे वॉशिंग्टनला गेलेले असताना प्रसंगाप्रसंगाने लेखिकेला जाणीव होते की, आपल्या सासऱ्यांना अल्झायमर झाला आहे. पण लेखिकेने आत्मकथनाची सुरुवात इथपासून केलेली नाही. तिच्या लग्नापूर्वी तिच्या माहेर-सासरचे संबंध कसे होते इथपासून सुरुवात करून दोन मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांच्या नातेसंबंधाचं अतिशय हृद्य असं चित्र तिथे उभे केलं आहे. त्यामुळे ते आत्मनिवेदन न राहता एका प्रातिनिधिक मराठी कुटुंबाचं चित्रण बनून जातं आणि वाचकाच्या मनात सहसंवेदना निर्माण करतं, मग अल्झायमरचे बळी ठरलेले भाई चित्रे हे फक्त लेखिकेचे सासरे न उरता, सगळ्याच वाचकांचे कुणी आप्त बनून जातात. लेखिकेच्या मांडणीतला अस्सलपणा पानगळीच्या आठवणीला वाचनीय बनवून जातो. तर दुसरीकडे ‘एक दिवस’ या कथासंग्रहातल्या कथा ठराविक साचेबंद वळण घेताना दिसतात. म्हणजे असं की, कथांचा एकूण बाज मराठी मासिकामधल्या नेहमीच्या कथांसारखाच, फक्त पाश्र्वभूमी महाराष्ट्राऐवजी अमेरिकेची म्हणजे निसर्गवर्णनांमध्ये उन्हाळ्या-पावसाळ्याऐवजी अमेरिकेतला हाडं फोडणारा हिमवर्षाव. सुट्टीत शिमला, कुलू, मनाली, दार्जिंलिंगच्या वर्णनाऐवजी अलास्का किंवा नायगाराची वर्णनं, नोकरदार स्त्री-पुरुष लोककला लटकून कामावर जाण्याऐवजी स्वत:च्या गाडीतून जातात इत्यादी. वास्तविक अमेरिका हा एक अफाट विस्ताराचा. सतत अनंत उलाढाली चालू असणारा देश आहे. खुद्द अमेरिकेतल्या लेखक-लेखिकांच्या विषय निवडीचा पल्ला अक्षरश: थक्क करून सोडणारा आहे. जीवनाच्या हर एक क्षेत्राला ते अतिशय ताकदीने शब्दबद्ध करून वाचकांपुढे मांडताना दिसतात. मग गेली किमान ३५-३६ वर्षे अमेरिकेत वास्तव्य करून आलेल्या लेखिका शोभा चित्रे यांच्या कथालेखनात तेच ते, संकुचित मराठी मानसिकता दाखवणारे अनुभव का येतात, असा प्रश्न जाणत्या वाचकाला पडतो. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांमध्येही वेगवेगळ्या बुवा, महाराज, माताजी, माई यांचं प्रस्थ वाढताना पाहून लेखिका सचित होते. तिची कथानायिका अशा अंधश्रद्धा नवऱ्याला घटस्फोट देते. गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजे अगदी स्वामी विवेकानंदांच्या काळापासून अनेक हिंदू आध्यात्मिक संस्था अमेरिकेत उत्तम कार्य करीत आहेत याची दखल लेखिका का बरं घेत नाही? आणि खुद्द अमेरिकन माणसंही अंधश्रद्ध नाहीत असं कुठे आहे? सामान्य माणसांनी चर्चच्या मिशनऱ्यांनी त्याचा गैरफायदा घेत लहान मुलांवर केलेले अत्याचार यांच्या कहाण्या रोज तिथे बाहेर येत आहेत. लेखिका याचीही दखल घेताना दिसत नाही. एकंदरीत ‘पानगळीच्या आठवणी’ आवर्जून वाचनीय, तर ‘एक दिवस’ सामान्य दोन्ही पुस्तकांची मांडणी, मुद्रण, मुखपृष्ठ आदी तांत्रिक अंगे सुबक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more