* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JINNAH : INDIA– PARTITION–INDEPENDENCE
  • Availability : Available
  • Translators : ASHOK PADHYE
  • ISBN : 9788184981124
  • Edition : 3
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 584
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LORD MOUNTBATTEN: I TRIED EVERY TRICK I COULD PLAY... TO SHAKE JINNAH`S RESOLVE .NOTHING WOULD MOVE HIM FROM HIS CONSUMING DETERMINATION TO REALISE THE DREAM OF PAKISTAN...THE DATE I CHOSE (FOR INDEPENDENCE) CAME OUT OF THE BLUE. I WAS DETERMINED TO SHOW I WAS MASTER OF THE WHOLE EVENT. JASWANT SINGH HAS COME A LONG WAY FROM HIS HOME IN THE DESERT DISTRICTS OF RAJASTHAN. COMMISSIONED IN THE INDIAN ARMY WHEN BARELY NINETEEN, HE WENT THROUGH TWO WARS WHILST IN SERVICE (1962 AND 1965) BEFORE RESIGNING HIS COMMISSION TO PURSUE A POLITICAL CAREER. HE HAS SERVED SEVEN TERMS IN PARLIAMENT, AND, IN THE BJP-LED GOVERNMENTS OF 1996 AND 1998-2004, HELD CHARGE OF SIX MINISTRIES OF THE GOVERNMENT OF INDIA, INCLUDING EXTERNAL AFFAIRS, DEFENCE AND FINANCE. REGARDED AS AN AUTHORITY ON INDIAN FOREIGN POLICY AND NATIONAL SECURITY, JASWANT SINGH IS AMONG THE MOST RESPECTED NAMES IN THE COUNTRY`S PUBLIC LIFE, AND IN THE WORLD OF DIPLOMACY. HE IS DESERVEDLY GIVEN CREDIT FOR DEXTEROUSLY STEERING INDIA OUT OF THE TURBULENT DIPLOMATIC SEAS ENCOUNTERED IN THE AFTERMATH OF THE NUCLEAR TESTS.
१९०६ ते १९४७ या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील फारच थोडा भाग आपल्या समोर ठेवला गेला होता. टिळक, गांधी, सत्याग्रह, चलेजाव चळवळ, क्रांतिकारकांचे प्रयत्न... बस्स. एवढेच आपल्याला ठाऊक आहे. परंतु याखेरीज असलेला ९० टक्के इतिहास हा श्री. जसवंतसिंग यांनी संशोधन करून बाहेर काढला. जिनांचे चरित्र अभ्यासताना हे सारे त्यांच्या हातात येत गेले. पाच वर्षे ३० माणसांची तुकडी हे काम करत होती. सुमारे ५००० संदर्भ गोळा केले गेले. त्यातील सार या पुस्तकात एकवटले आहे. ‘‘खादीने कुठे स्वातंत्र्य मिळते?’’ नेहरूंचा महात्मा गांधींना सवाल. जिनांनी ठरवून कोलकात्यात दंगल करवली व ६००० हिंदूंची कत्तल घडवली. ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत’ असे प्रमाणपत्र गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून घेणारे जिना शेवटी हिंदूंचे कर्दनकाळ बनले. आपल्या कौशल्याने, काँग्रेसच्या नेत्यांना भोंगळपणाचा फायदा उठवत, धमकी देत जिनांनी पाकिस्तान निर्माण केले. पुन्हा एकदा दाहीर राजाचा पराभव ८०० वर्षांनी जिना नावाच्या महंमद कासिम याने केला. अत्यंत खळबळजनक माहितीने भरलेले पुस्तक.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JINNAHINDIA-PARTITION–INDEPENDENCE #JINNAHINDIA– PARTITION–INDEPENDENCE #जिना हिंदुस्थान-फाळणी-स्वातंत्र्य #POLITICS&GOVERNMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ASHOKPADHYE #अशोकपाध्ये #JASWANTSINGH "
Customer Reviews
  • Rating StarDevdutt Kamat

    १९०६ ते १९४७ या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील फारच थोडा भाग आपल्या समोर ठेवला गेला होता. टिळक, गांधी, सत्याग्रह, चलेजाव चळवळ, क्रांतिकारकांचे प्रयत्न... बस्स. एवढेच आपल्याला ठाऊक आहे. परंतु याखेरीज असलेला ९० टक्के इतिहास हा श्री. जसवंसिंग यांनी संशोधन करून बाहेर काढला. जिनांचे चरित्र अभ्यासताना हे सारे त्यांच्या हातात येत गेले. पाच वर्षे ३० माणसांची तुकडी हे काम करत होती. सुमारे ५००० संदर्भ गोळा केले गेले. त्यातील सार या पुस्तकात एकवटले आहे. ‘‘खादीने कुठे स्वातंत्र्य मिळते?’’ नेहरूंचा महात्मा गांधींना सवाल. जिनांनी ठरवून कोलकात्यात दंगल करवली व ६००० हिंदूंची कत्तल घडवली. ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत’ असे प्रमाणपत्र गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून घेणारे जिना शेवटी हिंदूंचे कर्दनकाळ बनले. आपल्या कौशल्याने, काँग्रेसच्या नेत्यांना भोंगळपणाचा फायदा उठवत, धमकी देत जिनांनी पाकिस्तान निर्माण केले. पुन्हा एकदा दाहीर राजाचा पराभव ८०० वर्षांनी जिना नावाच्या महंमद कासिम याने केला. अत्यंत खळबळजनक माहितीने भरलेले पुस्तक. ...Read more

  • Rating Starअशोक घैसास, नाशिक

    आपण प्रसिद्ध केलेले `जिना` हे पुस्तक वाचले. श्री जसवंतसिंग यांनी मोठ्या परिश्रमाने हे एक इतिहासाचे पुस्तक लिहिले आहे. आत्तापर्यंत उघड न झालेली माहिती त्यांनी प्रकाशात आणली आहे. मी आजवर म.गांधी यांच्यावरची अनेक पुस्तके वाचली आहेत. पण जिना पुस्तकातील गंधींबद्दलची माहिती अत्यंत उद्बोधक आहे. श्री. अशोक पाध्ये यांनी सरस अनुवाद केला आहे. पुनश्च एकदा आपले आभार. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    जिनांनी २७ जुलै १९४६ रोजी मुस्लीम लिगच्या कौन्सिलच्या सभेत भाषण केले. त्यात ‘थेट कृती’ (Direct Action) करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही थेट कृती हिंसक की अहिंसक? यावर जिनांचे उत्तर होते, ‘मी त्याबद्दलच्या कोणत्याही नैतिक बाबींबरोबर चर्चा करणार नाही.’ ंतर मुस्लीम लिगच्या छापलेल्या एका पत्रकातून म्हटलं होतं, ‘केवळ कमनशिबामुळे तुम्ही हिंदूंचे आणि ब्रिटिशांचे गुलाम झालेले आहात. पण तुम्ही या रमजानच्या महिन्यात एका जिहादला प्रारंभ करणार आहात... अरे काफरांनो, तुमचे दिवस आता भरत आले आहेत... आता एक सार्वत्रिक कत्तल सुरू होईल!’ त्यावेळी मुस्लीम लीगचे सुऱ्हावर्दी बंगालमधील महत्त्वाचे पुढारी होते. त्यांच्या चिथावणीचा निदर्शकांनी फायदा उठविला. १६ ऑगस्ट १९४६ रोजी एकट्या कलकत्यांत ६००० पेक्षा जास्त हिंदूंना ठार करण्यात आले. १५००० पेक्षा जास्त हिंदू जखमी झाले. हिंदुस्थानभर त्याचे पडसाद उमटले.. मृत्यू आता थैमान घालू लागला होता... ‘नौखाली’ हा शब्द पुढे अत्याचारांचा निदर्शक बनला. त्याकाळी गांधीजी ‘सेवाग्राम’मध्ये आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर पोहोचले होते. काँग्रेस त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत चालली होती. गांधीजी दंगल शांत करायला पुन्हा बाहेर पडले, नौखालीकडे! हिंदुस्थानची फाळणीची प्राक्रिया या ‘थेट कृती’मुळे जलद होऊ लागली... आता ‘घटना’ माणसांना धरून पुढे नेत होत्या!’ ‘जिना : हिंदुस्थान, फाळणी, स्वातंत्र्य’ या जसवंत सिंग लिखित, अशोक पाध्ये अनुवादित पुस्तकातील अखेरच्या भागांतील वरील अंश. ‘माझ्या बऱ्याच हितचिंतकांनी मला ‘जिना व फाळणी’ या विषयावर न लिहिण्याचा सल्ला दिला होता. पण हा निर्णय शेवटी माझा होता. त्याचे भले-बुरे परिणाम भोगण्यास मी तयार होतो. १९४७ची फाळणी का झाली याचा पुन्हा एकदा शोध मला घ्यायचा होता’, असे जसवंत सिंग सुरुवातीलाच सांगतात अन् पुस्तकाच्या अखेरीस ‘फाळणीला जबाबदार कोण’ याचा निष्कर्षदेखील काढतात! यात जिनांची भूमिका कोणती? काहींच्या मते जिना खलनायक होते, तर काहींच्या मते ते प्रतिनायक होते. पाकिस्ताननिर्मितीनंतर तर ते पाकिस्तानसाठी ‘महानायक’ ठरले! खरंच कोण आणि कसे होते जिना? काठेवाडातील पानेली येथील एका ‘खोजा’ कुटुंबात २५ ऑक्टोबर वा डिसेंबर १८७८ रोजी जिनांचा जन्म झाला. लंडनला ‘बार’ची परीक्षा देऊन ते मुंबईला आले. २४ ऑगस्ट १८९६ रोजी बॉम्बे हायकोर्टात अ‍ॅडव्होकेट म्हणून त्यांनी नाव रजिस्टर केले - ‘महंमद अली जिना’ (पूर्वी त्यांचे आडनाव होते ‘जिनाभाई.’) नंतर ५१ वर्षे मुंबई हेच त्यांचे घर होते. बर्नार्ड लुई म्हणतो, खोजा म्हणजे पातळ मुस्लीम आवणाखालील हिंदूच! तर १९१७ मध्ये सरोजिनी नायडू म्हणाल्या, ‘जिना हे मानववंशशास्त्रीयदृष्ट्या हिंदूच आहेत आणि धर्माने मुसलमान आहेत. त्यामुळे ते हिंदू-मुसलमान एकतेचे दूत आहेत. आणि हा केवळ आदर्श कल्पनाविलास नाही!’ अशा धर्मनिरपेक्षतेकडून धर्मांधतेकडे झालेला जिनांचा पन्नासएक वर्षांचा प्रवास या पुस्तकातून उलगडला जातो. राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांना जस्टिस दावर यांनी सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तेव्हा जिनांनी टिळकांच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला, तो फेटाळून दावर यांनी शिक्षा कायम केली. त्याबद्दल जेव्हा ब्रिटिश सरकारने जस्टिस दावर यांना ‘नाईट हूड’ हा किताब दिला, तेव्हा त्यावर टीका करून जिनांनी त्या समारंभावर बहिष्कार टाकला होता! गांधी आणि जिना यांची तुलना कठीण व गुंतागुंतीची, पण दोघांचे राजकीय गुरू एकच होते, गोपाळ कृष्ण गोखले! जिनांना त्या काळात ‘मुस्लीम गोखले’ म्हणत असत. गांधी व जिना दोघांनी लंडनमध्ये असताना ‘ब्रिटिश जेंटलमन’ लकब व शैली उचलली. पण २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहून गांधी जेव्हा हिंदुस्थानात परतले, तेव्हा त्यांनी वेशभूषेत आमूलाग्र बदल केला, पण जिनांनी ‘थ्री पीस सूट’ हा वेश कधीच सोडला नाही. त्यामुळे जिनांनी गांधींना नुसताच स्पर्धक न मानता, लोकांच्या भावनांचा फायदा उठविणारा- खोटारडा- बडबड्या राजकारणी मानलं. तरीही गांधींना आव्हान देणारे जिनाच होते तर नेहरूंना प्रतिस्पर्धी ठरलेले जिनाच होते. फाळणीपर्यंत जिनांचा सुसंवाद फक्त गांधींशीच होता. नेहरू-जिना यांच्यात तसा तो कधीच नव्हता. १९२८च्या अखेरपर्यंत ‘हिंदू-मुसलमान ऐक्य’ हा शब्दप्रयोग ‘स्वराज्य’ या शब्दाला समानार्थी आहे असे जिना मानीत. तर ‘कोणत्याही धर्माचा, जातीचा हिंदुस्थानचा नागरिक असो’, त्याला घटनेनुसार समान अधिकार मिळण्याची ग्वाही दिली जाईल, एवढे पुरेसे आहे, ही नेहरूंची भूमिका. महंमद इक्बालसारख्या काहीजणांनी १९३० मध्ये याच हिंदुस्थानात आपला ‘मुस्लीम इंडिया’ हा देश साकारावा म्हणून आव्हान केले, तर १९३३ साली रहिमत अलींनी ‘मुस्लीम इंडिया’ हा देश हिंदुस्थानपेक्षा वेगळा असावा असा आग्रह धरला. ‘पाकिस्तान’ हा या रहिमत अलींनी निर्माण केलेला शब्द. त्या वेळीदेखील जिनांनी महंमद इक्बाल यांच्या कल्पनेला विरोध केला होता. १२ नोव्हेंबर १९३०च्या लंडन येथील गोलमेज परिषदेचा ‘मँचेस्टर गार्डियन’ मधील वृत्तांत जिनांसमोरील पेच स्पष्टपणे व्यक्त करतो. ‘मिस्टर जिना यांची गोलमेज परिषदेतील अवस्थाही एकमेव अशी झाली होती. हिंदूंना वाटले की जिना हे एक मुस्लीम जातीवादी आहेत, तर मुस्लिमांना वाटले की जिना हे हिंदूंकडे झुकणारे आहेत. संस्थानिकांना वाटले की जिना हे अति लोकशाहीवादी आहेत. ब्रिटिशांना वाटत होते की जिना हे डोक्यात राख घालून टोकाशी जाणारे आहेत. यामुळे असे झाले की, जिना हे म्हटले तर सर्वत्र आहेत, आणि म्हटले तर कुठेच नाहीत. कोणालाच ते नको आहेत.’ हा जिनांच्या राजकीय कारकीर्दीचा उलटत चाललेला मध्यान्ह काळ होता. १९३३च्या सुमारास जिना एके ठिकाणी म्हणतात, ‘खऱ्याखुऱ्या हिंदू-मुसलमान ऐक्याशिवाय हिंदुस्थानला कसलीही आशा नाही. हे ऐक्य साधणं बहुसंख्य असलेल्या हिंदूंनाच जमू शकेल. मुळात आपल्या अंत:करणात त्यासाठी बदल झाला पाहिजे.’ पुढे १९३८ मध्ये अलीगढ अँग्लो-मुस्लीम कॉलेजात ते म्हणतात, ‘हिदूंच्या भावना-हिंदू मन व दृष्टिकोन पाहिल्यावर मी निष्कर्ष काढला की, ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याची आशा धरण्यात अर्थ नाही. मला माझ्या देशाविषयी प्रथमच निराशा वाटली. ही स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. मी खचलो आहे... असहाय्य झाल्यासारखे वाटत आहे.’ गांधींची अवस्थादेखील वेगळी नव्हती. ‘मी असहाय्य आहे. माझी ऐक्यावरील श्रद्धा तेवढीच घट्ट आहे. पण माझ्यासमोर घनदाट अंध:कार पसरला असून, कुठेही प्रकाश दिसत नाही, अशा परिस्थितीत मी फक्त देवाला ‘मला प्रकाश दाखव’ अशी प्रार्थना करू शकतो. १९३८ साली काँग्रेसचे अध्यक्ष असताना सुभाषचंद्र बोस यांनी स्वत: हिंदू-मुसलमान प्रश्नात लक्ष घालून तो सोडवायचा प्रयत्न केला. पुढे हे सारे एकांडे प्रस्ताव अपुरे पडले. मार्ग ठप्प झाला. कदाचित हाच फाळणीचा टर्निंग पाँर्इंट होता! हिंदुस्थानात अशी चमत्कारिक परिस्थिती असताना दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं. २३ मार्च १९४० रोजी मुस्लीम लीगच्या खुल्या अधिवेशनात एक ठराव पास करण्यात आला. बलुचिस्तान-सिंध-पंजाब व वायव्य सरहद्द प्रांत यांचे एक वेगळे फेडरेशन बनवावे. या चारही प्रांतांना स्वायत्तता व सार्वभौमत्व बहाल करावे. हा ‘पाकिस्तान’चा जन्म होता! म्हणून आजही पाकिस्तानात २३ मार्च हा दिवस ‘पाकिस्तान दिवस’ म्हणून पाळला जातो. नंतर इकडच्या १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीमुळे, ऐन युद्धकाळात इंग्रजांना हिंदुस्थान सोडण्यास सांगण्यामुळे बहुतांशी काँग्रेस नेत्यांची धरपकड झाली. १९४२ ते १९४६ या काळात बरेचसे काँग्रेस नेते तुरुंगात असल्यामुळे सरकारशी बोलणी करण्यास कुणीच उरलं नव्हतं, त्यामुळे राजकीयदृष्ट्या जिनांचे फावले! दरम्यान, गांधी तुरुंगात असताना १९४३ मध्ये जिनांनी जाहीर केले की, खुद्द गांधींना मुस्लीम लीगबरोबर समझोता हवा असेल तर त्यांचे स्वागत होईल, अन्य कुणाचे नाही. १९४४ रोजी जिनांच्या १०, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई या घरी जिना-गांधी बोलणी सुरू झाली, ती १८ दिवस चालली... आणि ब्रिटिश अस्वस्थ झाले, हिंदू-मुसलमान ऐक्याच्या भीतीने, हिंदूमहासभावाले चिडले या कृतीनेच, तर लीगची पाकिस्तानची मागणी गांधी मान्य करतील म्हणून शीखही बिथरले अन् बाहेर पडले ते ‘शिखीस्तानची’ मागणी घेऊनच! अर्थात वाटाघाटी फिसकटल्या. गांधींनी जिनांना लिहिलं, ‘इस्लामचा उदय होण्यापूर्वी हिंदुस्थान एक राष्ट्र होते. ते अजूनही एकच राष्ट्र राहावं, जरी त्या राष्ट्राच्या पुत्रांनी आपला धर्म बदलला असला तरीही. तुमची नव्या राष्ट्राची कल्पना मी स्वीकारली तर नव्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.’ यानंतर जिनांच्या ‘थेट कृती (Direct Action)च्या २७ जुलै १९४६च्या आवाहनानंतरचा इतिहास, हा दंगली-अत्याचार-नरसंहार-मानवतेच्या हत्येचा होता. अखंड हिंदुस्थानचे कट्टर पाठीराखेदेखील म्हणू लागले, ‘आता फाळणी झाली तर बरे पडेल. निदान संहार-अत्याचार- हत्याकांडातून तरी सुटका होईल. भूतकाळातील अनेक वर्षातील छळवाद संपेल.’ ६ मे १९४७ रोजी जिना-गांधींची शेवटची भेट दिल्ली येथे घडून आली. जिनांनी गांधींच्या संमतीने एक पत्रक काढले. ‘हिंदुस्थानच्या फाळणीवर आमच्यात चर्चा झाली; परंतु गांधींनी फाळणीचे तत्त्व स्वीकारले नाही. फाळणी अपरिहार्य आहे, हे त्यांना पटत नव्हते. माझ्या मते पाकिस्तान निर्माण होणे हे नुसते अपरिहार्यच नव्हे तर, हिंदुस्थानच्या आजच्या राजकीय समस्येवर तोच एक उपाय आहे.’ तत्पूर्वी १ एप्रिल १९४७ रोजी माऊंट बॅटन यांनी गांधींची भेट घेतली तेव्हा, माऊंट बॅटनला दचकविणारा प्रस्ताव गांधींनी ठेवला, ‘जिना यांना पंतप्रधान करा आणि संघटित हिंदुस्थानचे सरकार बनवा.’ नंतर ५-६ एप्रिलला माऊंट बॅटन जिनांना भेटले, तेव्हा जिना म्हणाले, ‘फक्त एकच उपाय आहे, हिंदुस्थानवर शस्त्रक्रिया नाहीतर हिंदुस्थान नाश पावेल.’ आता जिनांचा धर्मांधतेकडचा ‘पाकिस्ताननिर्मितीचा’ प्रवास पूर्ण होत आला होता! हिंदुस्थान पूर्वी कधीही न पाहिलेल्या सर सिरील जॉन रॅडक्लिफ याला हिंदुस्थान-पाकिस्तान सरहद्द ठरविण्याचे काम देण्यात आले. ‘रॅडक्लिफ अवॉर्ड’ १२ ऑगस्ट १९४७ला तयार झाले. १४ ऑगस्टला हिंदुस्थान अस्तित्वात आला. जन्माला आलेल्या दोन्ही देशांना आपल्या सरहद्दी माहीत नव्हत्या. कारण ‘अवॉर्ड’ १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालं! मग पुन्हा दंगली उसळल्या. नरसंहार-हत्याकांडाचा रक्तरंजित इतिहास पुढे चालूच राहिला! तत्पूर्वी ७ ऑगस्ट १९४७ रोजी विमान जेव्हा जिनांना घेऊन दिल्लीहून कराचीकडे सुटलं, तेव्हा जिना स्वत:शीच पुटपुटले, ‘इट्स द एन्ड ऑफ दॅट!’ पुढे वर्षभराने ११ सप्टेंबर १९४८ रोजी जिनांचा मृत्यू झाला, तेव्हा दिल्लीत राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला. नेहरूंनी शोकसंदेश दिला, ‘जिनांनी हिंदुस्थानचा इतिहास रचला, पण तो चुकीच्या मार्गाने... भूतकाळातील घटनांबद्दल त्यांना खेद वाटला असेल की पश्चात्ताप झाला असेल? बहुधा असे काहीच वाटले नसेल, कारण त्यांनी आपल्याभोवती द्वेषाचा बुरखा पांघरून घेतला होता!’ पुढे १९७१ मध्ये पाकिस्तान फुटून बांगलादेश निर्माण झाला, हा जिनांच्या सिद्धांताचा पराभव होता हा अलीकडचा इतिहास. जिनांच्या मृत्यूपूर्वी, ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या झाली. १९४६च्या नौखालीच्या दंगलीत पीडीतांचे सांत्वन करताना, एका कागदाच्या तुकड्यावर शिसपेन्सिलचे थोटूक वापरून गांधींनी लिहिलं होतं, ‘I don`t want to die a failure, but I may be a failure.’ आपल्या सत्य व अहिंसा या तत्त्वांचा पराभव झाल्याचे त्यांना स्पष्ट दिसत होते! पुस्तकाच्या प्रास्ताविकात जसवंत सिंग कबूल करतात की, अखंड हिंदुस्थानासाठी कुणी आपला आवाज उठवत होते की नाही, याचे उत्तर दु:खाने असे द्यावे लागते की, ‘फक्त महात्मा गांधी.’ पण पुस्तकाच्या अखेरीस, फाळणीची टोकाची भूमिका जिनांना घ्यायला भाग पाडल्याबद्दल, फाळणीला मुख्यत्वेकरून नेहरू’च जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढतात. ‘नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली होती. पण पक्षाच्या सर्वोच्च अधिकारपदावर असलेले नेहरू आणि नंतर सत्तेवर आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून नेहरूच होते. तेव्हा नेहरूंकडेच फाळणीची जबाबदारी जाते... काँग्रेसचे १९३४, १९४२, १९४५ व १९४७ चे ठराव अप्रत्यक्षरीत्या पाकिस्ताननिर्मितीला कारणीभूत ठरले.’ पुढे फाळणीची ही शोकांतिका अटळ नव्हती असा निष्कर्ष काढताना ‘जर संघराज्याचा (फेडरल) विस्तृत पाया आपण स्वीकारला असता, तर हे शक्य होते,’ असे देखील जसवंत सिंग सुचवितात. असो. जसवंत सिंग यांच्या या विषयातील अधिकाराबद्दल प्रश्नच नाही. अर्थात स्वतंत्र भारतात अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारात ते परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री होते हा काही योगायोग नव्हे. १९४८ साली निजामाची राजवट संपल्यावर, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाल्यावर तिथले मुसलमान स्वत:ला ‘अल्पसंख्याक’ म्हणवून घेऊ लागले. ज्या Minority Syndrome मुळे पाकिस्तानची निर्मिती झाली, त्याचा संसर्ग स्वतंत्र हिंदुस्थानभर पसरला... हेच जर सध्याचे वास्तव असेल, तर मग फाळणीला जबाबदार कोण, हा प्रश्नच निरर्थक आहे. ‘कोणत्याही धर्माचा, जातीचा हिंदुस्थानचा नागरिक असो, त्याला घटनेनुसार समान अधिकार मिळण्याची ग्वाही दिली जाईल,’ या नेहरूंच्या सुरुवातीपासूनच्या भूमिकेचे महत्त्व, आज स्वतंत्र्याच्या साठ वर्षांनंतरदेखील सत्तेच्या लोभपायी मान्य होत नाही, हेच या देशाचे दुर्दैव! या पुस्तकातील, जिना-गांधी यांच्यातील वाटाघाटी, गांधी-नेहरू यांच्यातील दुरावा दर्शविणारा पत्रव्यवहार, वेव्हेल-गांधी-नेहरू चर्चा, मौ. आझाद यांचे जामा मशिदीतील भाषण, डॉ. लोहियांचे फाळणीच्या योजनेवर झालेले भाषण, बॅ. जिना यांची भाषणे पत्रव्यवहार वगैरे सारं मुळातून वाचण्यासारखे आहे. त्या काळी झालेले विविध काम गोपनीय पत्रव्यवहार, करारांचे मसुदे वगैरे संदर्भासाठी हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. पुस्तक वाचून झाल्यावर एवढंच जाणवतं, फाळणीची घटना हा एक कॅलिडोस्कोप आहे. जसा ‘दृष्टिकोन’ बदलेल, तसं घटनाचित्र बदलत जातं, निष्कर्ष बदलत जातात. इतिहास कधी बदलत नाही! ...Read more

  • Rating StarDAINIK PUNYANAGARI 4-7-2010

    ज्येष्ठ राजकारणी जसवंत सिंग यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिमांचे नेतृत्व करणाऱ्या जिनांवर लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद नुकताच मराठीत आला. या पुस्तकाच्या निमित्ताने जसवंत सिंग यांनी व्यक्त केलेले मनोगत. महंमदअली जिना यांचे राजकीय चरित्र लिहिण्यााठी मी फार पूर्वीपासून धडपडत होतो; परंतु हा विचार कल्पनेच्या स्वरूपात खूप वर्षे नुसताच मनात पडून राहिला होता. या कल्पनांचे बीज १९९९ मध्ये रुजले आणि अखेर त्याचा हा पुस्तकरूपी वृक्ष तयार झाला. १९९९ मध्ये ऐतिहासिक दिल्ली-लखनौ बसयात्रेत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर मी होतो. पाकिस्तानात ‘मिनार-ए-पाकिस्तान’ म्हणून एक ६० मीटर उंचीचा स्मारकस्तंभ बांधलेला आहे. याच जागी २३ मार्च १९४० रोजी मुस्लीम लीगने पाकिस्तान निर्मितीचा ठराव संमत केला होता. कोणत्याही राजकीय व्यक्तीने जिना यांचे चरित्र लिहिलेले नाही. मी हे चरित्र लिहिण्याचे ठरवले. या ग्रंथावरील प्रत्यक्ष काम २००४ मध्ये सुरू झाले. त्यावेळी मी मंत्री राहिलो नव्हतो. काम सुरू झाल्यावर मी अनेकांशी या पुस्तकाबद्दल बोललो. मला सल्ले दिले जाऊ लागले. ‘जिना व फाळणी’ या विषयाला हा घालणे धोक्याचे असल्याने मी या मार्गावर जाण्याचे धाडस करायला नको, असे बऱ्याचजणांचे मत पडले. मला मात्र १९४७ मध्ये हिंदुस्थानची फाळणी का झाली, याचा एकदा शोध घ्यायचा होता. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे ‘जिना : हिंदुस्थान फाळणी स्वातंत्र्य’ हे पुस्तक. हे पुस्तक लिहायला, पुन:पुन्हा लिहायला, तपासायला, वेगवेगळ्या मार्गांनी माहितीची खातरजमा करून घ्यायला पाच वर्षे लागली. या कामी मला नॅशनल अर्काइव्हज ऑफ पाकिस्तानच्या ‘कैद-ए-आझम’ पेपर्स प्रोजेक्टचे प्रमुख संपादक डॉ. झैदी यांची मोलाची मदत झाली. या पुस्तकासाठी आवश्यक असलेल्या संदर्भग्रंथांची यादी अफाट मोठी झाली. या पुस्तकांमध्ये त्या काळातील, म्हणजे फाळणीच्या कालखंडातील एकूण एक घटनांच्या नोंदींचा तपशीलवार मागोवा आहे. त्या वेळच्या विविध विद्वानांनी ते ग्रंथ लिहिले आहेत. जे जुने ग्रंथ गोळा करून आणले, त्यातले काही एवढे जुने झाले होते की, हाताळताना त्यातील पानांचा तुकडा पडेल अशी भीती वाटे. या पुस्तकाचा विषय वरवर फारसा महत्त्वाचा वाटला नाही, तरी तो सर्वांच्या अंगात भिनला असून, अत्यंत संवेदनशील आहे. फाळणीमुळे आपल्या हृदयाला झालेली जखम अद्याप भरून निघालेली नाही. म्हणून मी ज्यांच्या-ज्यांच्याकडून सल्ले मागितले आणि अवलंबून राहिलो, त्यांनी ते सल्ले काही पाने भरतील इतक्या विस्तृतपणे दिले आहेत. या कामामध्ये अनेक भावना दाटलेल्या आहेत. फाळणीचा इतिहास म्हटल्यानंतर असे होणारच. फाळणीला गांधीजी एक अनिवार्य विच्छेदन म्हणत. परंतु हा राजकीय अर्थ झाला. यात गुंतलेल्या मानवी यातना, संवेदना आणि भावना यांचीही चिरफाड झाली, त्याचे काय? इतिहास जुळवून लिहिणाऱ्या तज्ज्ञांना याकडे मानवी दृष्टिकोनातून बघता येणे कठीण आहे. ते अशा गोष्टींकडे नेहमीच भुवया उंचावून पाहतात याची मला कल्पना आहे. पण, तशा थंडपणे, घटनांचे भावरहित कथन करणे मला जमणार नाही. तशा पद्धतीने लिहिलेले लिखाण हे नेहमीच रटाळ आणि कंटाळवाणे ठरते. माझे लिखाण अनेकांच्या हातातून आधी परीक्षणासाठी गेले होते. ते बारकाईने वाचून त्यावर त्यांनी भरपूर कष्ट घेतले. महंमदअली जिना हे सार्वजनिक जीवनात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिनिधी ठरवले गेले होते. तेथून पाकिस्तानचे ‘कैद-ए-आझम’ बनण्यापर्यंतचा त्यांचा सार्वजनिक आणि राजकीय प्रवास कसा झाला, हे मला या पुस्तकात मांडता आले. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more