* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EMINENT HISTORIANS
  • Availability : Available
  • Translators : SUDHA NARAVANE
  • ISBN : 9788177661385
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SEVERAL ESSAYS ON HISTORY AND HISTORICAL ISSUES IN INDIAIN THIS INCISIVE COMMENTARY, ARUN SHOURIE DOCUMENTS THE WAYS IN WHICH OUR HISTORY TEXTBOOKS HAVE BEEN DOCTORED BY LEFTIST HISTORIANS. THOROUGHLY RESEARCHED AND RIVETING, THIS STUDY BRINGS TO LIGHT THE TECHNIQUES AND FRAUDS THAT A CABAL OF SOME OF OUR BEST-KNOWN ACADEMICIANS HAS USED TO PROMOTE THEMSELVES, AND TO ACQUIRE CONTROL OVER INSTITUTIONS. AND THEN TO PUT THESE SUPPOSEDLY ACADEMIC INSTITUTIONS TO USE. SHOURIE SHOWS HOW, IN THE PROCESS, THIS CABAL HAS PERVERTED INDIA`S HISTORICAL NARRATIVE, AND THEREBY VITIATED THE COUNTRY`S PUBLIC DISCOURSE. TWO NEW CHAPTERS BRING TO LIGHT RECENT DEVELOPMENTS IN THE FIELD: HOW, WITH THEIR HOLY SCRIPTURES HAVING BEEN REPUDIATED IN THEIR HOLY CITIES, THESE `HISTORIANS` STRIVE TO RETAIN THEIR PERCHES BY DOMINATING NICHE DOMAINS; HOW THESE EFFORTS ARE BOUND TO FAIL; BUT HOW THEIR TRAJECTORY HOLDS VITAL LESSONS FOR THOSE WHO SEEK TO REPLACE THEM
ज्या कालखंडाविषयी लोकांना अभिमान वाटतो. ज्याविषयी विश्वास वाटतो त्या काळातील व्यक्ती आणि संस्थांवर टीकास्त्र चालवा...असहिष्णुता दाखविणाऱ्यांना महानता बहाल करून त्यांच्यात सहनशीलता दाखवा... सर्वसमावेशक, खुल्या परंपरा इतरांना गिळंकृत करण्यासाठी आहेत असे चित्रण करून एकसत्ता मानणारी, विशिष्ट वर्गासाठी असलेली विचारसरणी उदारमतवादी, शांतताप्रिय आणि सहिष्णु आहे असे म्हणा...तुमच्या विधानांना पुरावे मागणाऱ्यांना ‘जातीयवादी’ ठरवून त्यांचा धि:कार करा... जुलुमशहांच्या तत्त्वांमुळे बळी गेलेल्यांनाच दोषी ठरवा...साम्राज्यवादी सत्ताधाऱ्यांना मदत दिलेल्या कॉम्रेड मंडळींना पाठीशी घाला... राष्ट्रीय चळवळीतील नेते, सुधारक यांच्यावर चिखलफेक करा...एकंदरीत, सदा सर्वकाळ सर्व संस्थांवर कबजा करा, सगळीकडून लाभ उठवा. आपली सत्ता राबवीत रहा...आणि स्वत:चे कल्याण करून घ्या.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KHYATANAMITIHASKAR #EMINENTHISTORIANS #ख्यातनामइतिहासकार #POLITICS&GOVERNMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUDHANARAVANE #ARUNSHOURIE #अरुणशौरी "
Customer Reviews
  • Rating Starप्रसाद फाटक

    २०१४ पासून अचानक देशात भयंकर असहिष्णुता पसरली आहे !! अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. एवढंच काय तर इतिहासाचे भगवेकरण करून सगळा इतिहास बदलला जात आहे !!! यापूर्वी असे अत्याचार आणि असे खोटे इतिहासलेखन फक्त १९९८ ते २००४ दरम्यान झाले होते, नाही का ? कायकारण आहे बरं ?? सोप्पं आहे... त्या काळात आम्हाला हवी तशी इतिहास आणि संस्कृतीची मांडणी करणारे सरकार सत्तेत नव्हते. आपला देश कसा सगळ्या धर्माच्या लोकांना घेऊन गुण्यागोविंदाने नांदत होता, मुघल राजांनी कला, साहित्य यांच्या माध्यमातून हा देश सांस्कृतिकदृष्ट्या कसा समृद्ध केला, हिंदू धर्मात फक्त आणि फक्त विषमताच कशी होती या गोष्टी या दोन्ही कालखंडातली सरकारे सांगतच नाहीयेत हो ! मग काय करायचं ? चला पुरस्कार परत करूया !! आता उठवू सारे रान !!!...” हा आहे अनेक ‘विचारवंत’, ‘इतिहासकार’ यांचा गेल्या ३ वर्षांतला पवित्रा. ही मंडळी नक्की आहेत कोण, त्यांची विचारपद्धती कशी आहे याबद्दल तपशिलात जाणून घेतलं तरच त्यांच्या वक्तव्यांमागचा हेतू स्पष्ट होऊ शकतो. अशा ख्यातनाम इतिहासकारांच्या उद्योगांचा, पद्धतशीरपणे विणलेल्या जाळ्यांच्या लेखाजोखा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अरुण शौरी यांचं ख्यातनाम इतिहासकार हे पुस्तक. *इस्लामी राजवटीतील अत्याचारांकडे कानाडोळा आणि पण हिंदू जातीसंघर्षावर टीका* स्वतंत्र भारतात Indian Counsel For Historical Research (ICHR) या संस्थेवर कायमच डाव्या इतिहासकारांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून विशिष्ट विचारांची भलावण केलीच पण त्याहून वाईट गोष्ट म्हणजे त्यांनी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधूनही रेटून सोयीस्कर इतिहास मांडला, कारण पाठयपुस्तक मंडळातही त्याच विचारसरणीच्या लोकांचा भरणा होता. ‘आपापसात भांडणं होतील, संघर्ष होईल अशा ऐतिहासिक तपशिलांना पाठ्यपुस्तकांमधून वगळण्याचे’ डाव्या इतिहासकारांचे धोरण राहिले आहे. त्याचीच परिणती म्हणून मुस्लीम राजसत्तांच्या कार्यकाळात काळात झालेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमणांचे उल्लेखच पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकण्यात आले. पुस्तकातल्या ‘एक परिपत्रक’ या प्रकरणात अशा कारनाम्यांचे धक्कादायक तपशील दिले गेले आहेत. पश्चिम बंगालच्या कम्युनिस्ट सरकारच्या कार्यकाळात ‘माध्यमिक शिक्षण मंडळाने एक परिपत्रक १९८९ साली काढले होते. त्याद्वारे काय काय फेरबदल करण्यात आले बघा हे उदाहरणादाखल पहा: १) भारतवर्षे इतिहास या डॉ नरेंद्रनाथ भट्टाचार्य यांच्या पुस्तकातून ‘सुलतान महमुदाने मोठ्या प्रमाणावर खून, लुटालूट, विध्वंस व धर्मांतर करण्यासाठी बाळाचा वापर केला’ या वाक्यातील ‘हत्या आणि धर्मांतर’ हे वगळणे. २) ‘त्याने सोमनाथ मंदिरातील २ कोटी दिरहाम जवाहिरांची लुटालूट केली आणि गझनीतील मशिदीकडे जाणाऱ्या मार्गावर शिवलिंगाची पायरी बनवली’ यातील ‘शिवलिंगाची पायरी बनवली’ हे गाळून टाकणे. अशी २५-३० उदाहरणं इथे दिली आहेत ‘संघर्ष टाळण्यासाठी हे केले’ हे धोरण म्हणून ऐकायला उदात्त वाटते. पण इतिहासाच्या दुसऱ्या अंगाबद्दल जेव्हा लिहिले जाते तेव्हा मात्र डाव्या इतिहासकारांकडून एक चलाखी केली जाते. मुस्लीम आक्रमकांच्या अत्याचारांवर जाणीवपूर्वक पांघरुण घालणारे हे ख्यातनाम इतिहासकार भारतातील जातिव्यवस्थेमुळे गतकाळात जो परस्पर संघर्ष झाला त्याबद्दल मात्र अगदी तपशीलवार वर्णनं पाठ्यपुस्तकामधून अगदी जोरकसपणे देत असतात. जातीपातीमुळे हिंदू धर्म कसा वाईट होता हे बिंबवले की त्या तुलनेत इस्लाम हा धर्म कसा उजवा ठरतो (कारण त्यात म्हणे जातीभेद नाहीत !) हेही बेमालूमपणे सांगितले जाते. शिवाय एकदा का उच्चवर्णीय विरुद्ध दीनदलित दुबळे यांच्यातला संघर्ष ठळकपणे मांडला की तेच मनावर बिंबवल्या गेलेल्या तरुण मंडळींना हळूहळू हा मार्क्सने मांडलेल्या ‘शोषक विरुद्ध शोषित’ अशा वर्गविभागणीकडे, त्यांच्या आपापसातल्या संघर्षाकडे आणि अंतिमतः ‘न्याय्य हक्कासाठी हिंसाचार क्षम्य असतो’ या लाडक्या तत्वज्ञानाकडे नेणे सोपे असते. यातूनच मग ‘रशिया झारशाहीच्या तावडीतून कसा मुक्त झाला, आणि या क्रांतीने सामाजिक न्यायाची प्रस्थापना कशी झाली याचेही romantic चित्र उभं करायचं, पण याच डाव्या हुकुमशहांच्या राज्यात लाखो लोक कसे बळी गेले याबद्दल चकार शब्द काढायचा नाही, इतकंच काय पण भारतातल्या कम्युनिस्ट सरकार असलेल्या राज्यांमधल्या पक्षपुरस्कृत हिंसाचाराबद्दल मिठाची गुळणी धरायची हा ढोंगीपणा ख्यातनाम डाव्या इतिहासकारांनी वर्षानुवर्षे चालवला आहे. *प्राचीन काळातील भारतीय कर्तृत्वाला श्रेय नाही* मुळात आपल्याइथले डावे इतिहासकार मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या चष्म्यातूनच प्रत्येक गोष्टीकडे पाहत असल्यामुळे इथला संघर्ष ते कायमच ठळकपणे मांडतात पण हिंदू संस्कृतीतून उदयास आलेले साहित्य, वैज्ञानिक शोध इ. सकारात्मक बाबींविषयी मात्र कुचकुचत लिहितात. उदा. या पुस्तकातले "कदाचित , बहुतेककरून, संभाव्यपणे... म्हणून" या नावाचे प्रकरण पूर्णपणे याच विषयाला वाहिलेले आहे. इतिहासकार डी. एन. झा यांच्या ‘Ancient India, an introductory outline’ या पुस्तकातल्या खोडसाळबद्दल आपल्याला विस्ताराने कळते. जिथे काही ऐतिहासिक तथ्ये नाकारणे अशक्यच आहे तिथे ते मान्य करायचे पण त्याचे इथल्या विचारपद्धतीला श्रेय मात्र द्यायचे नाही हा भारतातल्या डाव्यांचा खाक्या, म्हणूनच आर्यभट्टाने मूलभूत सिद्धांत मांडले असे कबूल करायचे पण लगेच "ते इथल्या तोपर्यंतच्या विचाराच्या विरुद्ध होते" असे म्हणायचे किंवा कालिदासाच्या साहित्याबद्दल “त्याने जे मांडले तो आधीच्याच शैलीचा विकास होता” अशी मखलाशी करून कालिदासाचीसुद्धा `ऑल्सो रॅन` गटात गणती करून टाकायची. थोडक्यात काय तर इथे असलेल्या चांगल्या गोष्टी कुठल्यातरी दुसऱ्याच कारणांमुळे घडल्या असं म्हणायचं आणि वाईट गोष्टींना मात्र धर्माचे अधिष्ठान कसे होते हेच उच्चरवाने सांगायचं. तीच गोष्ट अन्य धर्मियांच्या राजवटीत घडली असेल तर तिची रंग सफेदी करून टाकायची (उदा. `मौर्य काळात जमा होणाऱ्या करातून करवसुली करणाऱ्यांना पोसले जायचे` असे म्हणायचे पण `औरंगजेबाचा जिझिया कर मात्र हिंदूंना सुरक्षितपणे जगण्यासाठी होता` असे म्हणून भलावण करायची) असे उद्योग इथे निर्लज्जपणे चालले. (विशेष म्हणजे डाव्या इतिहासकारांच्या सर्व निष्ठा ज्या रशियाच्या चरणी वाहिल्या होत्या त्या देशातल्या The History of India या पुस्तकात मात्र प्राचीन काळातल्या भारताच्या अनेक क्षेत्रातल्या प्रगतीबद्दल मोकळेपणाने कबुली दिली आहे, असे अरुण शौरी नमूद करतात. याचाच अर्थ भारताच्या इतिहासाच्या सोयीस्कर मांडणीत भारतातल्या डाव्या इतिहासकारांचे वैयक्तिक हितसंबंध देखील गुंतले असले पाहिजेत) डाव्या इतिहासकारांनी उकळलेले आर्थिक फायदे याच वैयक्तिक हितसंबंधांबद्दल पुस्तकाच्या `ते इतिहासकार` या पहिल्या विभागात विस्ताराने लिहिले आहे. एकमेकांची तळी उचलून धरत आपल्याच गोटातल्या इतिहासकारांची वर्णी लावण्याचे काम अनेक डाव्या इतिहासकारांनी केले. शिवाय मोठ्या संशोधन प्रकल्पांवर नेमले गेल्यावर त्यात कसा वेळकाढूपणा केला गेला "मानधन घेत नाही" अशा वल्गना करून प्रत्यक्षात मात्र अनुदान पदरात पडून घेतले, सरकारी खर्चाने परदेश दौरे पदरात पडून घेतले, (एवढे करूनही काही प्रकल्प पूर्ण झाले नाहीतच !) याबद्दल साधार विवेचन अरुण शौरी यांनी या विभागात केले आहे. वैचारिक आणि आर्थिक दोन्ही स्वरूपाचा भ्रष्टाचार करण्याची हिम्मत करणारे ख्यातनाम इतिहासकार अनेक महत्वाच्या पदांवर सरकारी कृपेने राहिले हे आपल्या देशाचे दुर्दैव. रोमिला थापर, इरफान हबीब, सतीशचंद्र, के. एन. पणिक्कर इ. मंडळींनी फेरफार केलेल्या इतिहासाचे देशाच्या काही पिढ्यांवर संस्कार केले आहेत. त्याच मुशीतुन घडलेले आजचे अनेक `विचारवंत` आणि `इतिहासकार` आज `इतिहासात होणाऱ्या ढवळाढवळी`बद्दल सरकारवर आरोप करतात तेव्हा त्या खोटारडेपणाला सीमा नसते. उदारमतवादाच्या मुखवट्याआडचे त्यांचे चेहरे जाणून घेण्याच्या दृष्टीने अरुण शौरींच्या या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्व आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 10-02-2002

    ख्यातनाम इतिहासकारांचं सत्य!... गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ‘इतिहासाचे भगवेकरण’ होत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा देत याविरुद्ध यायिका दाखल करणाऱ्यांची बोलती बंद केली. कित्येक दिवसांच्या वादावर अखेर पडदा पडला. इथे केवळ वादावरच पडा पडला असे पर्यायाने म्हटले आहे. याचा अर्थ इतिहासावर पडदा पडला असे नाही. इतिहासाची सत्यकथित पाने प्रत्येक विवेकावाद्याला सदोदीत उघडावीच लागतात. कटू सत्याचा स्वीकार पर्यायाने करावाच लागतो. तशी भारतीय इतिहासाला अनेकविध रूपे आहेत. त्यांचे स्वरूप प्रत्येक कालखंडात परिस्थिती सापेक्ष असेल, पण काहीतरी शिकवण या इतिहासातून पुढील समाजाला मिळत गेली. अर्थात त्या त्या समाजाने आपल्या इतिहासाकडून काय घेतले, काम नाकारले ही गोष्ट वेगळी. इतिहासकारांनी आपल्या प्राचीन तसेच अर्वाचीन इतिहासाचे दर्शन प्रत्येक समाजाला घडविले. पण या इतिहासाचे पुनरावलोकन करताना आधुनिक समाजाने काय स्वीकारले, काय नाकारले, याचा साकल्याने विचार करणे महत्त्वाचे आहे. ते दर्शन घडविणाऱ्या इतिहासकारांनी कोणत्या सत्यनिष्ठ आणि तर्कनिष्ठ तत्त्वावर इतिहासाचे मूल्यमापन केले याचे भान येणेही तितकेच क्रमप्राप्त ठरेल. याच मूल्यमापनाचा लेखन प्रपंच सध्याचे निर्गुतवणूक मंत्री, राजकीय भाष्यकार, अर्थशास्त्रज्ञ, संपादक अरुण शौरी यांनी मांडला आहे. आपल्या ‘ख्यातनाम इतिहासकार’ या पुस्तकात तथाकथित इतिहासाची दुरूस्तीवजा चिरफाड केलेली आहे. मूळ इंग्रजीतील पुस्तकाचा अनुवाद सुधा नरवणे यांनी मराठीत केला आहे. त्यांचे प्रयत्न तडीस गेले आहेत. इतिहास हा नेहमी सत्य असावा, अशी समाजातील बुद्धिप्रामण्यवादी लोकांची अपेक्षा असते. मुळात इतिहास घडताना सत्याच्या जगात घडत असतो. मग ते चांगले घडो अथवा वाईट. ती गोष्ट स्वीकारार्ह असते. ती नाकारून अथवा लपवून चालत नाही. नेमक्या याच लपविण्याच्या महान कृत्यांवर शैरी यांनी या पुस्तकात झगझगीत प्रकाश टाकला आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ यामध्ये इतिहास संशोधनाच्या आघाडीवर असलेल्या ‘ख्यातनाम इतिहासकारांनी’ संशोधनाच्या नावाखाली केंद्र सरकारचे कोट्यवधी रुपये निरर्थक घालविले याची कैक उदाहरणे या पुस्तकात आहेत. मार्क्सवादी विचारसणीचे इतिहासकारच बुद्धिनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध इतिहास लिहू शकतात. हिंदुत्व अथवा मूलगामी विचारांच्या दावणीला बांधलेले संकुचित इतिहासकारांचे हे काम नव्हे असा सरळसोट दावा खउक्ठ मधल्या इतिहासकारांनी केला आहे. अर्थात यात प्रसारमाध्यमांनी ‘सनसनाटी’ बातमीसाठी इतिहासाला ‘केशरी रंग चढविण्याचा मुद्दाही अधिक चघळला आहे. विशेषकरून डाव्या विचारसणीच्या वृत्तपत्र तसेच साप्ताहिकांनी त्या इतिहासकारांचे म्हणणे अत्यंत खुबीने मांडले आहे. शौरींनी रोमिला थापर, आर. एस. शर्मा, सूजभान, अथरअल्ली, इरफान हबीब, के. एम. श्रीमाळी, सुमीत सरकार, ग्यानेंद्र पांडे, के. एन. पाणीक्कर या इतिहासकारांनी मानव संसाधन मंत्रालयाकडून पैशांचा ओघ सतत चालू ठेवून प्रकल्पांची कशी ऐशीतैशी केलेली आहे. याचा तालिकाबद्ध पुरावा समोर उभा केला आहे. उदा. १९०७-१९०९ सुमित सरकार १२ हजार. लेखन सुपूर्त नाही. दुसरे के. एन. पणीक्कर मदतनीसासह संशोधन एकूण खर्च ४ लाख ५६ हजार ६१७ रुपये प्रकल्पाच्या ठावठिकाणा नाही अशी दहा बारा उदाहरणे आहेत. अजूनपर्यंत लाखो रुपये खर्च होऊनही एकसुद्धा प्रकल्प मंत्रालयाकडे सादर नाही. इतिहासाचे जातीयवादी रंगाचे पुनर्लेखन होत आहे असा आरोप या ख्यातनाम इतिहासकारांनी केला आहे. पण शौरींना याला आपल्या सखोल संशोधनाचे छेद दिला आहे. धर्माच्या बाबतीत असणारी त्यांची अतिरेकी मते, हिंदू धर्म हाच बौद्ध धर्माचा संहारक अशी हाकाटी हिंदू ब्राह्मणवादी राज्यकर्त्यांनी मुस्लिमांची तसेच इतर धर्मियांची मंदिरे पाडली, याबाबत शौरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, अरविंद यांचे धर्मविषयक सखोल तत्त्वज्ञान प्रकट केले आहे. यांचे म्हणणे खोटे ठरविण्याचा चंग या इतिहासकारांनी बांधला आहे असे शौरी यांनी आपल्या लेखनातून स्पष्ट केले आहे. काहीकाही वेळा शौरी यांनी धर्माच्या अनाठायी आग्रहाचा प्रत्यय येथे आणून दिला आहे. ‘इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या व सत्य दडपून टाकणाऱ्या व्यक्तींच्या हातात आता खउक्ठ संस्था जात असल्याने मी तिच्या कार्याविषयी साशंक होत आहे.’ या श्रीमाळ यांच्या विधानाला डझनभर पुराव्यानिशी धादांत खोटे ठरविले आहे. आपल्या एकूण २१ प्रकरणाच्या पुस्तकात डाव्या विचारसरणीतील इतिहासकारांची तत्त्वज्ञांची विपर्यस्त कृती दाखवून देवून त्यावर उपाहासात्मक भाष्य केले आहे. धर्म ही अफूची गोळी आहे. असे म्हणणाऱ्या मार्क्सच्या विधानाचा स्वत:च्या कृतीत इतिहासकारांनी अवलंब केला आहे. हे शौरींच्या इतिहासाच्या बाबतीत तसेच धार्मिक विवेचनाच्या बाबतीत दिसून येते. हिंदू धर्माने बौद्ध धर्माच्या वासलात लावली, असे या इतिहासकारांचे म्हणणे आहे. पण इतिहास काही वेगळेच सत्य सांगतं. येथे शौंरीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मविषयक तत्त्वज्ञान स्पष्टीकरणार्थ मांडले आहे. या इतिहासाकारांच्या तात्त्विक मतभिन्नतेबाबत तसेच युक्तीवादाबाबत सडेतोड विवेचन केले आहे. त्यामुळे इतिहासाचे नेमके स्वरूप वाचकाच्या समोर आले आहे. इतिहासाचे नेमके स्वरूप वाचकाच्या समोर आले आहे. इतिहासाचे पुनर्लेखन स्वच्छ आणि सत्याच्या आधारावर करणे पर्यायाने अपरिहार्य ठरते अशी ठाम भूमिका हे पुस्तक मांडते. इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करताना करावी लागणारी कसरत सुधा नरवणे यांना चुकलेली नाही. कुठे कुठे इंग्रजीचा प्रभाव दिसून येतो अर्थात वाक्यरचनेच्या संदर्भात इतिहासाची आपलीच बाजू तेवढी सत्य म्हणणाऱ्या ‘ख्यातनाम इतिहासकारांना’ सत्याचं भान आणून देणारे पुस्तक वाचकालाही खचितच डोळस करेल. तथाकथित सत्याचा अंधार दूर होण्याची आशा करता येईल. -गोविंद डेगवेकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 21-10-2001

    इतिहासाच्या विकृतीकरणाचा सडेतोड समाचार... ‘ओसामा बिन लादेन हा मुळात अतिशय शांत, नम्र व दयाळू असा माणूस होता. मात्र परिस्थितीच अशी निर्माण झाली की, ‘जिहाद पुकारण्यावाचून त्याच्याकडे पर्यायच नव्हता. नाइलाजाने त्याने ‘जिहाद’चे अस्त्र उगारले. इस्लाम विरधकांनी अत्यंत निष्ठूरपणे मानवी हक्कांची पायमल्ली करीत लादेनवर हल्ला केला...’ २५०० साली इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर वरील मजकूर आढळला तर त्याची लादेनबाबत काय भावना होईल? साहजिकच त्याची सहानुभूती लादेनला आणि इस्लामला मिळेल. अर्थात ही गोष्ट आहे ५०० वर्षांनंतरची. भविष्यातली. भूतकाळाचे काय? पृथ्वीतलावरील मानवी संस्कृती, हिंदुस्थान यांच्या इतिहासाचे काय? वर दिलेले उदाहरण हे प्रातिनिधिक आहे. इथे व्यक्तीऐवजी एखादी विचारसरणी, इसम याबाबतदेखील असे घडू शकते. एखाद्या विचारसरणीला अगदी झोडपून काढणे किंवा मग त्याची तळी उचलून धरणे हे नामवंत इतिहासकारांना सहजशक्य असते. आणि ‘मी म्हणते तेच सत्य’ असा त्यांचा हेका असतो. आपल्या हिंदुस्थानात वर्षानुवर्षे हेच चालू आहे. हिंदुस्थानच्या खऱ्या इतिहासाला बगल देत त्याचे विकृत रूप सातत्याने मांडले गेले आहे. प्रख्यात पत्रकार अरुण शौरी यांनी आपल्या ‘एमिनंट हिस्टोरियन्स’ या इंग्रजी पुस्तकाद्वारे या प्रकाराचा चांगलाच समाचार घेतला आहे. सुधा नरवणे यांनी केलेला या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘ख्यातनाम इतिहासकार’ मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. जो माणूस इतिहास विसरतो तो भविष्य घडविण्याची क्षमता गमावून बसतो असे म्हणतात. अर्थातच हा इतिहास सत्य स्वरूपात मांडला जाणे अपेक्षित आहे. आपल्या हिंदुस्थानात इतिहास सत्य स्वरूपात मांडला जातो आहे का, या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने ‘नाही’ असे द्यावे लागेल. ‘द इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (आय सी एच आर) ही इतिहास संशोधन करणारी बडी संस्था. शालेय अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन तत्त्वांची शिफारस करणाऱ्या एन.सी.ई.आर.टी.वर या संस्थेचा प्रभाव. आर्थिक व मनुष्यबळ याची या संस्थेला मुळीच कमतरता नाही. या संस्थेकडून आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल जे संशोधन व लेखन होत असते ते अतिशय महत्त्वाचे व ग्राह्य मानले जाते. साहजिकच हे लिखाण नि:पक्षपातीपणे व्हावे अशी कुणाचीही अपेक्षा असेल. मात्र ही अपेक्षा कशी फोल ठरली आहे व ठरते आहे हे शौरी यांनी आपल्या पुस्तकातून दाखवून दिले आहे. पुरोगामित्वाचा, सचोटीचा टेंभा मिरवणारे नामवंत इतिहासकार स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी कशा क्ऌप्त्या करतात, फसवणूक करतात हे सांगत त्यांनी त्यांचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. आयसीएचआरवर प्रदीर्घ काळापासून डाव्या विचारसरणीच्या मंडळींचा पगडा आहे. एखाद्या व्यक्तीने कुठली विचारसरणी आदर्श मानावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला आणि तो त्याच्या वैचारिक स्वातंत्र्याचा भाग आहे. मात्र देशांच्या इतिहासाची मांडणी करताना जर अशा प्रकारच्या कुठल्याही विचारसरणींचा चष्मा लावला गेला तर इतिहास अतिशय विकृत स्वरूपात मांडला जातो. ही बाब अतिशय घातक असून शौरी यांनी या पुस्तकातून त्याची सतत जाणीव करून दिली आहे. ‘आयसीएचआर’चे एक उद्देशपत्र आहे. संस्थेच्या कामाचा नेमका उद्देश त्यात उद्धृत केला आहे. १९७८ पासून त्यात काडीचाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर या उद्देशपत्रात बदल करण्यात आल्याचा कांगावा डाव्या विचारवंतांनी सुरू केला. ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत आहे, असा आरोप करण्यास त्यांनी सुरुवात केली. पण सत्य परिस्थिती काय आहे हे विशद करून सांगताना शौरी यांनी डाव्यांच्या या ऊरबडवेगिरीचा चांगलाच समाचार या पुस्तकातून घेतला आहे. ‘आय सी एच आर’तर्फे इतिहास संशोधनाचे व त्यावरील ग्रंथ प्रकाशनाचे अनेक प्रकल्प हाती घेतले जातात. हे काम डाव्या गोतावळ्यातील मंडळींनाच दिले जाते. त्यात प्रचंड गैरव्यवहार चालतात. कामाला हातदेखील लावला जात नाही. न केलेल्या कामाचे पैसे खिशात घातले जातात. याबाबतची विस्तृत आकडेवारी देत शौरी यांनी जी माहिती दिली आहे ती वाचून धक्का बसल्याखेरीज राहत नाही. पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता यावर केवळ आपलीच मक्तेदारी आहे, अशा तोऱ्यात वावरणारी ही मंडळी कोंडीत सापडली की कशी वागतात, सत्य स्वीकारण्याची त्यांची तयारी कशी नसते, त्यांचा कांगावखोरपणा कसा उफाळून येतो याचे उत्तम वर्णन काही प्रकरणांत आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रदीर्घ काळ डाव्यांची सत्ता आहे. आपले ‘डावे’पण सिद्ध करण्यासाठी ही मंडळी इतिहासालादेखील कसे वेठीस धरतात याची माहिती शौरी यांनी दिली आहे. मुस्लीम राज्यकर्त्यांनी हिंदुस्थानात असंख्य देवळांचा विदध्वंस केला हे जगजाहीर आहे. असे असताना प. बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाने १९८९ मध्ये एक आदेश काढला व त्याद्वारे शालेय पुस्तकातील अशा प्रकारचा देवळांच्या विदध्वंसाचा उल्लेख गाळण्याच्या सूचना दिल्या! हिंदुस्थानची संस्कृती-परंपरा याबाबत टिकात्मक, तुच्छतापूर्व बोलायचे आणि हिंदुस्तानवर टीका करीत इस्लामचे गोडवे गायचे हा या मंडळींचा आवडता उद्योग. शौरींनी या पुस्तकात डाव्यांच्या या उद्योगांवर टीकेचे आसूड ओढले आहेत. सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर डाव्यांचा आवाज काहीसा कमी झालेला असला तरी शैक्षणिक क्षेत्रावर अद्यापही त्यांचे नियंत्रण आहे. प्रसारमाध्यमातील मोठा भाग त्यांच्या नियंत्रणाखाली आहे, याचा उल्लेख गौरी करतात. या लोकांनी आतापर्यंत जे असत्य लेखन लोकांच्या माथी मारले आहे त्याचा व आय सी एच आरमधील गैरव्यवहारांचा जाब त्यांना विचारलाच पाहिजे, असेही मत ते पुढे मांडतात. पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणाऱ्या मंडळींचा बुरखा शौरी यांनी या पुस्तकाद्वारे अक्षरश: फाडला आहे. आपल्या इतिहासाविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. सुधा नरवणे यांच्या अनुवादात क्वचित ठिकाणी त्रुटी जाणवून रसभंग होतो. या त्रुटी दूर करायला हव्यात. डाव्या नामवंत इतिहासकारांची सत्याकडे कानाडोळा करण्याची जी मनोवृत्ती आहे त्याचे यथार्थ दर्शन घडविणारे असे पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठकाराच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. तो केल्यास चांगले. -राजीव काळे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (YUVA) 15-10-2002

    ख्यातनाम इतिहासकारांचं सत्य!... गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ‘इतिहासाचे भगवेकरण’ होत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा देत याविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्यांची बोलती बंद केली. कित्येक दिवसांच्या वादावर अखेर पडदा पडला. इथे केवळ वादावरच पदा पडला असे पर्यायाने म्हटले आहे. याचा अर्थ इतिहासावर पडदा पडला असे नाही. इतिहासाची सत्यकथित पाने प्रत्येक विवेकवाद्याला सदोदित उघडावीच लागतात. कटू सत्याचा स्वीकार पर्यायाने करावाच लागतो. तशी भारतीय इतिहासाला अनेकविध रूपे आहेत. त्यांचे स्वरूप प्रत्येक कालखंडात परिस्थिती सापेक्ष असेल, पण काहीतरी शिकवण या इतिहासातून पुढील समाजाला मिळत गेली. अर्थात त्या त्या समाजाने आपल्या इतिहासाकडून काय घेतले, काम नाकारले ही गोष्ट वेगळी. इतिहासकारांनी आपल्या प्राचीन तसेच अर्वाचीन इतिहासाचे दर्शन प्रत्येक समाजाला घडविले. पण या इतिहासाचे पुनरावलोकन करताना आधुनिक समाजाने काय स्वीकारले, काय नाकारले, याचा साकल्याने विचार करणे महत्त्वाचे आहे. ते दर्शन घडविणाऱ्या इतिहासकारांनी कोणत्या सत्यनिष्ठ आणि तर्कनिष्ठ तत्त्वावर इतिहासाचे मूल्यमापन केले याचे भान येणेही तितकेच क्रमप्राप्त ठरेल. याच मूल्यमापनाचा लेखन प्रपंच सध्याचे निर्गुंवणुक मंत्री, राजकीय भाष्यकार, अर्थशास्त्रज्ञ, संपादक अरुण शैरी यांनी मांडला आहे. आपल्या ‘ख्यातनाम इतिहासकार’ या पुस्तकात तथाकथित इतिहासाची दुरूस्तीवजा चिरफाड केलेली आहे. मूळ इंग्रजीतील पुस्तकाचा अनुवाद सुधा नरवणे यांनी मराठीत केला आहे. त्यांचे प्रयत्न तडीस गेले आहेत. इतिहास हा नेहमी सत्य असावा, अशी समाजातील बुद्धिप्रामाण्यवादी लोकांची अपेक्षा असते. मुळात इतिहास घडताना सत्याच्या अंगाने घडत असतो. मग ते चांगले घडो अथवा वाईट. ती गोष्ट स्वीकारार्ह असते. ती नकारून अथवा लपवून चालत नाही. नेमक्या याच लपविण्याच्या महान कृत्यांवर शौरी यांनी या पुस्तकात झगझगीत प्रकाश टाकला आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ यामध्ये इतिहास संशोधनाच्या आघाडीवर असलेल्या ‘ख्यातनाम इतिहासकारांनी’ संशोधनाच्या नावाखाली केंद्र सरकारचे कोट्यवधी रुपये निरर्थक घालविले याची कैक उदाहरणे या पुस्तकात आहेत. मार्क्सवादी विचारसरणीचे इतिहासकारच बुद्धिनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध इतिहास लिहू शकतात. हिंदुत्व अथवा मूलगामी विचारांच्या दावणीला बांधलेले संकुचित इतिहासकरांचे हे काम नव्हे असा सरळसोट दावा ICHR मधल्या इतिहासकारांनी केला आहे, अर्थात यात प्रसारमाध्यमांनी ‘सनसनाटी’ बातमीसाठी इतिहासाला ‘केशरी रंग चढविण्याचा मुद्दाही अधिक चघळला आहे. विशषकरून डाव्या विचारसणीच्या वृत्तपत्र तसेच साप्ताहिकांनी त्या इतिहासकारांचे म्हणणे अत्यंत खुबीने मांडले आहे. शौरींनी रोमिला थापर, आर. एस. शर्मा, सूजरभान, अथरअल्ली, इरफान हबीब, के. एम. श्रीमाळी, सुमीत सरकार, ग्यानेंद्र पांडे, के. एन. पाणीक्कर या इतिहासकारांनी मानव संसाधन मंत्रालयाकडून पैशांचा ओघ सतत चालू ठेवून प्रकल्पांची कशी ऐशीतैशी केलेली आहे याचा तालिकाबद्ध पुरावा समोर उभा केला आहे. उदा. १९०७-१९९०९ सुमित सरकार. १२ हजार लेखन सुपूर्त नाही. दुसरे के. एन. पणीक्कर मदतनीसासह संशोधन एकूण खर्च ४ लाचा ५६ हजार ६१७ रुपये. प्रकल्पाचा ठावठिकाणा नाही अशी दहा बारा उदाहरणे आहेत. अजूनपर्यंत लाखो रुपये खर्च होऊनही एकसुद्धा प्रकल्प मंत्रालयाकडे सादर नाही. इतिहासाचे जातीयवादी रंगाचे पुनर्लेखन होत आहे असा आरोप या ख्यातनाम इतिहासकारांनी केला आहे. पण शौरींना याला आपल्या सखोल संशोधनाने छेद दिला आहे. धर्माच्या बाबतीत असणारी त्यांची अतिरेकी मते, हिंदू धर्म हाच बौद्ध धर्माचा संहारक अशी हाकाटी, हिंदू ब्राह्मणवादी राज्यकत्र्यांनी मुस्लिमांची तसेच इतर धर्मियांची मंदिरे पाडली, याबाबत शौरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, अरविंद यांचे धर्मविषयक सखोल तत्त्वज्ञान प्रकट केले आहे. यांचे म्हणणे खोटे ठरविण्याचा चंग या इतिहासकारांनी बांधला आहे असे शौरी यांनी आपल्या लेखनातून स्पष्ट केले आहे. काहीकाही वेळा शौरी यांनी धर्माच्या अनाठायी आग्रहाचा प्रत्यय येथे आणून दिला आहे. ‘इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या व सत्य दडपून टाकणाऱ्या व्यक्तींच्या हातात आता ICHR संस्था जात असल्याने मी तिच्या कार्याविषयी साशंक होत आहे.’ या श्रीमाळी यांच्या विधानाला डझनभर पुराव्यानिशी धादांत खोटे ठरविले आहे. आपल्या एकूण २१ प्रकरणाच्या पुस्तकात डाव्या विचारसरणीतील इतिहासकारांची तत्त्वज्ञांची विपर्यस्त कृती दाखवून देवून त्यावर उपहासात्मक भाष्य केले आहे. धर्म ही अफुची गोळी आहे, असे म्हणणाऱ्या मार्क्सच्या विधानांचा स्वत:च्या कृतीत या इतिहासकारांनी अवलंब केला आहे. हे शौरींच्या इतिहासाच्या बाबतीत तसेच धार्मिक विवेचनाच्या बाबतीत दिसून येते. हिंदू धर्माने बौद्ध धर्माची वासलात लावली, असे या इतिहासकारांचे म्हणणे आहे. पण इतिहास काही वेगळेच सत्य सांगतो. येथे शौरींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मविषयक तत्त्वज्ञान स्पष्टीकरणार्थ मांडले आहे. या इतिहासकारांच्या तात्त्विक मतभिन्नतेबाबत तसेच युक्तीवादाबाबत सडेतोड विवेचन केले आहे. त्यामुळे इतिहासाचे नेमके स्वरूप वाचकाच्या समोर आले आहे. इतिहासाचे पुनर्लेखन स्वच्छ आणि सत्याच्या आधारावर करणे पर्यायाने अपरिहार्य ठरते अशी ठाम भूमिका हे पुस्तक मांडते. इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करताना करावी लागणारी कसरत सुधा नरवणे यांना चुकलेली नाही. कुठेकुठे इंग्रजीचा प्रभाव दिसून येतो अर्थात वाक्यरचनेच्या संदर्भात. इतिहासाची आपलीच बाजू तेवढी त्य म्हणणाऱ्या ‘ख्यातनाम इतिहासकारांना’ सत्याचे भान आणून देणारे पुस्तक वाचकालाही खचितच डोळस करेल. तथाकथित सत्याचा अंधार दूर होण्याची आशा करता येईल. -गोविंद डेगवेकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more