* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOVERNANCE
  • Availability : Notify Me
     
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177667745
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORKING OF GOVERNMENT IS JUST A PAPER WORK, OR IT REMAINS LIMITED TO REGISTERING THINGS, THE RULES GET ENTANGLED WITHIN THE RULES ITSELF, THE COMMITTEES WHICH WERE ORIGINALLY FORMED TO RESOLVE PROBLEMS BECOME PROBLEMS THEMSELVES, THE VERY VERY IMPORTANT DOCUMENTS WHICH MAY HARM THE SECURITY OF NATION GET LOST INTO THE HUGE PILES OF FILES AND VISITS TO THE COURTS, THE APPOINTMENTS ON THE PROJECT WORKS BECOME A JOB OF OBLIGATION AND REVEAL THE SHABBIEST FUNCTIONING, THE PROJECTS IN THE PUBLIC DEPARTMENTS BECOME A SHOW BUSINESS BUT IS NEVER REVEALED FULLY BEFORE THE PUBLIC INSTEAD WORKS MORE FOR THE BENEFIT OF THE MINISTERS AND OFFICERS. WHAT IS THE DIFFERENCE BETWEEN CHINA AND INDIA? WHAT IS THE SOLUTION FOR ALL THESE PROBLEMS? THE FIRST AND THE FOREMOST IS THE GOVERNING SYSTEM WHICH WILL MAKE THE PEOPLE COMPETENT. FOR THIS, FIRST WE WILL HAVE TO GO TO THE CORE OF THE PROBLEM, RECOGNIZE IT, RECORD IT AND PRESENT IT BEFORE THE PUBLIC. THIS DOCUMENT PRESENTS A TRUE PICTURE OF THE SITUATION AT THE GOVERNMENT LEVEL BY NONE OTHER THAN THE ONE WHO HAS WITNESSED IT AND HAS DARED TO REVEAL IT. IT ALSO TELLS US THE IMPORTANCE OF CHANGING IT TODAY, AT THIS MOMENT, WITHOUT LOSING A SINGLE MOMENT.
शासनव्यवहार फायलींवर नोंदी करण्यापुरताच उरतो / नियमांमध्ये नियम अडकून पडतात / समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या स्वत:च समस्या बनून जातात / राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणू शकतील इतक्या महत्त्वाच्या बाबीदेखील फायलींच्या ढिगाNयाखाली आणि कोर्टकचेयांच्या फेयांमध्ये हरवून जाऊ शकतात / प्रकल्पांवरील नेमणुकी हे उपकार करण्याचे आणि गचाळ, गबाळग्रंथी कारभाराचे बालेकिल्लेच बनून जातात / सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प सर्वसामान्य जनतेसमोर कधीही खेचले जात नाहीत आणि मंत्री आणि अधिकारी यांची खाजगी कुरणं मात्र बनून राहतात / आपण आणि चीन यांच्यातील फरक / या सर्वांवर उपाय: जनतेला सक्षम करू शकणारी शासनव्यवस्था यासाठीची पहिली गरज, खरी परिस्थिती काय आहे हे खणून काढा, त्या परिस्थितीची संपूर्ण नोंद करा आणि ती नोंद जनतेसमोर ठेवा. आज शासनाची खरीखुरी स्थिती काय आहे हे प्रत्यक्ष पाहिलेल्या अनुभवलेल्या व्यक्तीने ती स्थिती उघड करून दाखवण्यासाठी तयार केलेला हा दस्तऐवज. आजची ही परिस्थिती संपूर्णपणे आणि ‘आजआत्ता’ का बदलली पाहिजे हे आग्रहाने सांगणारा हा दस्तऐवज.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ARUN SHOURIE #BHARATI PANDE #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #POLITICS #TRANSLATEDBOOKS
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    शासन व्यवहार... पत्रकारिता स्वातंत्र्यासाठी सातत्याने झगडणाऱ्या ज्येष्ठ इंग्रजी पत्रकारांमध्ये इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूटने गौरवलेले ‘अरुण शौरी’ साहित्य आणि पत्रकारिता विश्वामधील ख्यातनाम पद्मभूषण स्वतंत्र बाण्याने आणि कुणाच्याही दबावाखाली न झुकतालिहिणाऱ्या अरुण शौरींनी राजकारण, समाजकारण, अर्थकारणादि विविध विषयांवर लेखन करून ताज्या घडामोडीचे अचूक विश्लेषक म्हणून आपला ठसा उमटवला. त्यांच्या निर्गुतवणकीसंबंधीच्या मूलभूत लेखनाने अर्थकारण धुरिणांनाही अंतर्मुख केले. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने त्यांना ‘बिझिनेस लीडर ऑफ द इर’ असा पुरस्कार देऊन गौरविले. मॅगसेसे पुरस्कार, दादाभाई नौरोजी पारितोषिक, फ्रीडमटू पब्लिश पारितोषिक.अ‍ॅस्टर पारितोषिक इंटरनॅशनल एडिटर ऑफ द इयर अशा विविध पुरस्कारांनी पत्रकार अरुण शौरी, गौरविले गेले. हिंदुस्थान सरकारने पद्मभूषण देऊन गौरविलेल्या या ख्यातनाम पत्रकाराने एन.डी.ए. सरकारमध्ये निर्गुतवर्तणूक खाते, माहिती आणि प्रसारण खाते अशा महत्त्वपूर्ण खात्यांचे मंत्रीपदही भूषविले होते. एवंच शासन व्यवहाराशी जागरूक पत्रकार आणि शासकीय पदस्थ म्हणून डोळस नजरेने केलेले निरीक्षण यातून आकाराला आलेले अरूण शौरी लिखित मूळ इंग्रजी पुस्तक ‘गव्हर्नन्स’ भारती पांडे यांनी तितक्याच समर्थ आणि ओघवती, परखड, अचूक, अर्थपूर्ण भाषाशैलीत मराठीत अनुवादित केले आहे. शासन व्यवहार आणि फायलीच्या ढिगाऱ्यामध्ये अडकून पडलेल्या नियमांच्या बंधनातून स्नायूक्षयबाधित समित्यांच्या शासकीय प्रशासकीयांच्या नोंदी सर्वसामान्यांसमोर कधीय येत नाहीत. समस्यांची उकल करण्यासाठी नेमलेल्या मार्गदर्शक समित्यासुद्धा बव्हंशी या समस्यांच्या जोडीने होऊन राहिलेल्या अडथळ्यांच्याच नव्या समस्या. या समस्यांच्या जोडीने देशाच्या संरक्षणाला राष्ट्रीय हिताना सुरूंग लावू शकतील अशा महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा या फायलीच्या ढिगाऱ्यामध्ये आणि कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यांमध्ये कशा लटकून राहतात, हरवून जातात याचे दर्शन आणि तोलमोल गव्हर्नन्समध्ये सहजच लक्ष वेधून घेते. पर्यावरण नष्ट होतंय? फायलीवरील नोंदी करायला अधिकारी कुठल्या रंगाची शाई वापरू शकतात? प्रश्न साधाच पण मंत्रालय चर्चेसाठी वर्षसुद्धा या विषयासाठी कमी पडावे. हिंदुस्थानी उच्चायुक्तांच्या निवासस्थानाची दुरुस्ती. केवढा ज्वलंत प्रश्न अनिर्णीत राहावा असाच कसा? या तुलनेत सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचे, राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षणविषयक महत्त्वाचे प्रश्न, गुप्तहेर खाते, घुसखोर, लोकसंख्येचा बदलता नकाशा, औद्योगिक परवाने, कायदा सुव्यवस्था, अंमलबजावणी, निर्यात नियंत्रण कायदा, निर्गुंतवणूक, शासन व्यवस्था सुधारण्यासाठीच्या अपेक्षित प्रक्रियेचे टप्पे, अर्थव्यवस्था, निर्णय आणि अंमलबजावणी अनावश्यक कामांना पायबंदांतून विकासाची साधना लक्षात आणून देणाऱ्या या गव्हर्नन्समध्ये सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांप्रमाणेच आपण आणि चीन यांच्यातल्या फरकाचा विचार मांडीत उपाय सांगताना जनतेला आज जो राइट टू इन्फर्मेशन माहिती अधिकार मिळाला आहे त्या जनता सक्षम करणाऱ्या शासन व्यवस्थेचा माहितीपूर्ण पाठपुरावा करण्याची पहिली गरज लक्षात आणून दिली आहे. शासन व्यवस्थेच्या डोळस निरीक्षणांतून स्वानुभवातून तयार झालेले गव्हर्नन्स (१) ओळख (२) धाडसी उपक्रम (३) अडथळ्यांची शर्यत (४) एक संस्या (५) एक क्षेत्र (६) एक जीवन मरणाचा प्रश्न (७) खरा धडा अशा सात प्रकरणांतून वाचकांपुढे मांडले आहे. घोषणाबाजीच्या चाकोरीबाहेर येऊन काम आणि सत्ता ही राज्याच्या अधिकाऱ्यांकडून समाजोन्मुख वळवणे कसे आवश्यक आहे ते सांगितले आहे. जनतेला ताकद देणारी कार्यक्षमता, समस्या, चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी विकासाची प्रक्रिया सुधारण्याची आवश्यकता स्वरूप बदलाची वेग वाढवण्यात महत्त्वपूर्णता अरुण शौरी इथं सांगून ठेवतात. समस्या तिथल्या तिथे सोडवून टाका. कालापव्यय टाळा. फायली वाढवू नका. स्वत: जाऊन भेटा, समोरासमोर येऊन प्रश्न सोडवणारा निर्णय घ्या व त्याची अंमलबजावणी करा. या मराठी अनुवादामध्ये भारती पांडे यांनी अरुण शौरी यांच्या मूळ इंग्रजी ‘गव्हर्ननस’मधील प्रत्येक अनुभवसिद्ध शासनव्यवस्था दर्शनाला समर्थ भाषाशैली, अर्थपूर्ण मांडणी आणि नेमकेपणाने पुरेपूर न्याय दिला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने अरुण शौरी यांच्या गव्हर्नन्स या अभ्यासनीय इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित करून मोलाची कामगिरी केली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी लालफीतीत अडकलेल्या काळ्या पांढऱ्या तपकिरी रंगांच्या बजबजपुरीत अडकलेल्या शासन व्यवहाराच्या दु:स्थितीचे बोलके दर्शन घडवणारे अर्थपूर्ण मुखपृष्ठ योजून ‘गव्हर्नन्स’चा हा मराठी अनुवाद ग्रंथ प्रथमदर्शनीच वेधक असल्याची ग्वाही दिली आहे. वाजवी किंमत, महत्त्वपूर्ण विषय. स्वच्छ निर्दोष छपाई मराठी वाचकांना आणि ग्रंथालयांना या पुस्तकाकडे खचित आकर्षित करील. -ललिता बापट ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 25-02-2004

    शासन नावाच्या ‘आंधळ्या’ व्यवस्थेची कथा!... सर्वसामान्या माणसांना ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महापालिकेच्या कारभाराची तोंडओळख असते; राज्य किंवा केंद्र सरकारच्या कारभाराची माहिती फारशी नसते. भारतासारख्या विशाल क्षेत्राचा कारभार हाकणाऱ्या केंद्रीय सरकरच्या व्यवस्थेची माहिती होणे फारच दुरापास्त असते. शिवाय तो विषयही अनेक अर्थाने रूचकर असतो. आपल्या लोकप्रतिनिधींनी तरी तो कितपत कळलेला असतो, याविषयी शंका येते. ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी वाजपेयी सरकारामध्ये विविध खात्याचे मंत्र म्हणून काम करताना आलेल्या अनुभवातून कथा ‘गव्हर्नन्स’ या इंग्रजी ग्रंथातून मांडली आहे. भारती पांडे यांनी एका किचकट विषयावरील पुस्तकाचा अनुवाद छान केला आहे. अरुण शौरी हे राजकीय घडामोडीचे विश्लेषण करणारे ज्येष्ठ पत्रकार. भाजप आघाडीचे सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी झाल्यानंतर त्यांनी निर्गुंतवणूक खाते, माहिती आणि प्रसार खाते, नियोजन खाते, माहिती आणि प्रसारण खाते, नियोजन खाते आदीचा कारभार पहिला. हा कारभार पाहताना त्यांच्यातील शोध पत्रकारिता सतत जागी होती. सरकारचे धोरण, राजकारण आणि व्यवहार यांची सांगड घालून काम करताना एक पत्रकार म्हणून तटस्थपणे या व्यवहाराकडे तो पाहत असल्याचे आणि या व्यवस्थेचे विश्लेषण करीत असल्याचे हे पुस्तक वाचताना पानोपानी जाणवतं. निर्गुंतवणूक खात्याचा कारभार सांभाळताना जे अनुभव आले, त्याचा पूर्ण पाढा वाचतानाच शासनाच्या अंगीकृत असलेल्या हॉटेलचे खासगीकरण करताना जी माहिती पुढे आली, ती वाचली की आपल्या शासनाचा कारभार म्हणजे ‘आंधळ दळतंय अन् कुत्र पीठ खातंय’ असाच वाटतो. पंतप्रधानांच्या कार्यालयापासून थोड्याच अंतरावर असलेले हॉटेल ज्या जमिनीवर उभे आहे, त्या जमिनीची नेमकी मालकी कुणाची? याचे उत्तर सापडत नाही. वाराणसीमधील आयटीडीसीचे अशोक हॉटेलचे खासगीकरण करण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव सुरू केली. १९७६मध्ये या हॉटेलसाठी पर्यटन विकास महामंडळाकडून जागा घेतली होती; मात्र पर्यटन विकास महामंडळानेच ही जागा विकत घेतल्याची कोठे नोंद नाही. ‘आयटीडीसी’ या जागेसाठीचा कर भरते आहे. तरीदेखील ही जागा महसूल खात्याकडे नोंद आहे, ती एका नेपाळी व्यक्तीच्या नावे! पर्यटन विकास मंडळाने ही जागा केव्हा विकत घेतली याचा शोधूनही सापडला नाही. अनेक ठिकाणी अशा हॉटेलची बांधकामे करताना इतरांच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे किंवा या हॉटेलवरच्या जागेवर इतरांनी अतिक्रमण केले आहे. या हॉटेलचा आर्थिक कारभारही अजब आणि तोट्यांचा होता म्हणून सरकारने ते न चालविता विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रेच सरकार दरबारी नव्हती. प्रत्यक्ष या हॉटेलच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कशा प्रकारचे अडथळे आले आणि शासन यंत्रणा कशी काम करते, याचे खूपच चांगले चित्रण करण्यात आले आहे. ते संतापजनक तसेच मनोरंजनात्मकही वाटते. समजून घ्यावे असे वाटते. त्यामुळे या पुस्तकातील ‘अ कॉरल.... रीफ’ हे प्रकरण थोडे कंटाळवाणे वाटू लागते. मात्र दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचा कारभार कसा चालतो, धोरणात्मक निर्णय घेताना नोकरशाही कशी वागते, त्यांचे हितसंबंध कसे निर्माण होतात, ते जपण्यासाठी त्यांची धडपड कशी चालू असते, याची माहिती डोळ्यांत अंजन घालणारी आहे. देशाचे नियोजन मंडळ म्हणजे एक प्रचंड प्रकरण आहे. अतिरिक्त जबाबदारी म्हणून नियोजन खात्याचे मंत्री अरुण शौरी होते, तेव्हा त्यांनी शासकीय अधिकारीच नियोजन मंडळ म्हणजे एक वाहनतळ, एक गोठा, किंवा एक पांजरपोळ असे वर्णन करतात. म्हणून त्यांनी या प्रकरणास ‘एक वाहनतळ’ असे नाव दिले आहे, ते अधिकच समर्पक आहे. कारण देशाच्या विकासाचे नियोजन कशा पद्धतीने चालते, नियोजन मंडळाची नेमकी भूमिका काय असते आणि कोठे चुकले याचे उत्तर येथे मिळते. पर्यावरणासारख्या गंभीर समस्येकडे सरकारी यंत्रणा कितपत आस्थेने पाहते, यावर प्रकाश टाकला आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानेच तयार केलेल्या अहवालात विषारी पदार्थ भारतात आणण्यावर घातलेल्या बंदीला न जुमानता आयात केली गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजे सरकारची बंदी, न्यायालयाची बंदी असे असतानाही हजारो टन टाकाऊ विषारी पदार्थांची आयात होते, याची नोंद शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालातच करण्यात येते, यापेक्षा या कारभाराचा विरोधाभास आणखी काय असू शकतो? बदलती अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, जागतिकीकरण आदी प्रक्रिया पाहता, आपल्या देशाचा कारभार पाहणारी शासन व्यवस्था कशी नसावी, याचा लेखाजोखाच अरुण शौरी यांनी या पुस्तकाद्वारे मांडला आहे. -वसंत भोसले ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA LOKRANG 28-10-2007

    एखाद्या समस्यवेर अथवा सूचनेवर अंमलबजावणीऐवजी कागदी घोडे नाचविण्याच्या सरकारी पद्धतीवर झगझगीत प्रकाश टाकणारे माजी मंत्री अरूण शौरी यांचे ‘गव्हर्नन्स’ हे पुस्तक परिस्थितीवर भाष्य करणारे आहे. या पुस्तकाचा अनुवाद भारती पांडे यांनी केला आहे. सरकारी लालफितत अडकलेल्या कारभारात कुणाचे प्रश्न मार्गी लागतात आणि कुणाचे मागे राहतात हे पाहणे रंजक तसेच विचार करण्यास भाग पाडणारे आहे.फायलींवर नोंदी करण्यासाठी नेमक्या कोणत्या रंगाच्या शाईचा वापर करावा, हे निश्चित करण्यासाठी सरकारी यंत्रणा एक संपूर्ण वर्ष घेते. या दरम्यान या विषयावर बराचसा काथ्याकूट केला जातो, डोकेफोड होते आणि अखेरीस काळ्या, हिरव्या, निळ्या आणि लाल अशा चारही रंगांच्या शाईचे पर्याय स्वीकारले जातात. एका साध्या शाईची ही कथा, तर जिथे सामान्यांना तातडीने न्याय हवा आहे आणि काही प्रश्नांची तड लावायची असेल, तिथे नेमके काय होत असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी. सरकारी यंत्रणेची ही प्रवृत्ती, हा स्वभाव बदलण्यासाठी शौरी यांनी काही उपायही या पुस्तकात सुचवले आहेत. आज अस्ताव्यस्त पसरलेली शासनव्यवस्था बांधेसूद आणि चोख काम करणारी हवी असेल तर काय करता येईल, याचा अदमास या पुस्तकात घेण्यात आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more