* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOVERNANCE
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177667745
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORKING OF GOVERNMENT IS JUST A PAPER WORK, OR IT REMAINS LIMITED TO REGISTERING THINGS, THE RULES GET ENTANGLED WITHIN THE RULES ITSELF, THE COMMITTEES WHICH WERE ORIGINALLY FORMED TO RESOLVE PROBLEMS BECOME PROBLEMS THEMSELVES, THE VERY VERY IMPORTANT DOCUMENTS WHICH MAY HARM THE SECURITY OF NATION GET LOST INTO THE HUGE PILES OF FILES AND VISITS TO THE COURTS, THE APPOINTMENTS ON THE PROJECT WORKS BECOME A JOB OF OBLIGATION AND REVEAL THE SHABBIEST FUNCTIONING, THE PROJECTS IN THE PUBLIC DEPARTMENTS BECOME A SHOW BUSINESS BUT IS NEVER REVEALED FULLY BEFORE THE PUBLIC INSTEAD WORKS MORE FOR THE BENEFIT OF THE MINISTERS AND OFFICERS. WHAT IS THE DIFFERENCE BETWEEN CHINA AND INDIA? WHAT IS THE SOLUTION FOR ALL THESE PROBLEMS? THE FIRST AND THE FOREMOST IS THE GOVERNING SYSTEM WHICH WILL MAKE THE PEOPLE COMPETENT. FOR THIS, FIRST WE WILL HAVE TO GO TO THE CORE OF THE PROBLEM, RECOGNIZE IT, RECORD IT AND PRESENT IT BEFORE THE PUBLIC. THIS DOCUMENT PRESENTS A TRUE PICTURE OF THE SITUATION AT THE GOVERNMENT LEVEL BY NONE OTHER THAN THE ONE WHO HAS WITNESSED IT AND HAS DARED TO REVEAL IT. IT ALSO TELLS US THE IMPORTANCE OF CHANGING IT TODAY, AT THIS MOMENT, WITHOUT LOSING A SINGLE MOMENT.
शासनव्यवहार फायलींवर नोंदी करण्यापुरताच उरतो / नियमांमध्ये नियम अडकून पडतात / समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या स्वत:च समस्या बनून जातात / राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणू शकतील इतक्या महत्त्वाच्या बाबीदेखील फायलींच्या ढिगाNयाखाली आणि कोर्टकचेयांच्या फेयांमध्ये हरवून जाऊ शकतात / प्रकल्पांवरील नेमणुकी हे उपकार करण्याचे आणि गचाळ, गबाळग्रंथी कारभाराचे बालेकिल्लेच बनून जातात / सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प सर्वसामान्य जनतेसमोर कधीही खेचले जात नाहीत आणि मंत्री आणि अधिकारी यांची खाजगी कुरणं मात्र बनून राहतात / आपण आणि चीन यांच्यातील फरक / या सर्वांवर उपाय: जनतेला सक्षम करू शकणारी शासनव्यवस्था यासाठीची पहिली गरज, खरी परिस्थिती काय आहे हे खणून काढा, त्या परिस्थितीची संपूर्ण नोंद करा आणि ती नोंद जनतेसमोर ठेवा. आज शासनाची खरीखुरी स्थिती काय आहे हे प्रत्यक्ष पाहिलेल्या अनुभवलेल्या व्यक्तीने ती स्थिती उघड करून दाखवण्यासाठी तयार केलेला हा दस्तऐवज. आजची ही परिस्थिती संपूर्णपणे आणि ‘आजआत्ता’ का बदलली पाहिजे हे आग्रहाने सांगणारा हा दस्तऐवज.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ARUN SHOURIE #BHARATI PANDE #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #POLITICS #TRANSLATEDBOOKS
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    शासन व्यवहार... पत्रकारिता स्वातंत्र्यासाठी सातत्याने झगडणाऱ्या ज्येष्ठ इंग्रजी पत्रकारांमध्ये इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूटने गौरवलेले ‘अरुण शौरी’ साहित्य आणि पत्रकारिता विश्वामधील ख्यातनाम पद्मभूषण स्वतंत्र बाण्याने आणि कुणाच्याही दबावाखाली न झुकतालिहिणाऱ्या अरुण शौरींनी राजकारण, समाजकारण, अर्थकारणादि विविध विषयांवर लेखन करून ताज्या घडामोडीचे अचूक विश्लेषक म्हणून आपला ठसा उमटवला. त्यांच्या निर्गुतवणकीसंबंधीच्या मूलभूत लेखनाने अर्थकारण धुरिणांनाही अंतर्मुख केले. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने त्यांना ‘बिझिनेस लीडर ऑफ द इर’ असा पुरस्कार देऊन गौरविले. मॅगसेसे पुरस्कार, दादाभाई नौरोजी पारितोषिक, फ्रीडमटू पब्लिश पारितोषिक.अ‍ॅस्टर पारितोषिक इंटरनॅशनल एडिटर ऑफ द इयर अशा विविध पुरस्कारांनी पत्रकार अरुण शौरी, गौरविले गेले. हिंदुस्थान सरकारने पद्मभूषण देऊन गौरविलेल्या या ख्यातनाम पत्रकाराने एन.डी.ए. सरकारमध्ये निर्गुतवर्तणूक खाते, माहिती आणि प्रसारण खाते अशा महत्त्वपूर्ण खात्यांचे मंत्रीपदही भूषविले होते. एवंच शासन व्यवहाराशी जागरूक पत्रकार आणि शासकीय पदस्थ म्हणून डोळस नजरेने केलेले निरीक्षण यातून आकाराला आलेले अरूण शौरी लिखित मूळ इंग्रजी पुस्तक ‘गव्हर्नन्स’ भारती पांडे यांनी तितक्याच समर्थ आणि ओघवती, परखड, अचूक, अर्थपूर्ण भाषाशैलीत मराठीत अनुवादित केले आहे. शासन व्यवहार आणि फायलीच्या ढिगाऱ्यामध्ये अडकून पडलेल्या नियमांच्या बंधनातून स्नायूक्षयबाधित समित्यांच्या शासकीय प्रशासकीयांच्या नोंदी सर्वसामान्यांसमोर कधीय येत नाहीत. समस्यांची उकल करण्यासाठी नेमलेल्या मार्गदर्शक समित्यासुद्धा बव्हंशी या समस्यांच्या जोडीने होऊन राहिलेल्या अडथळ्यांच्याच नव्या समस्या. या समस्यांच्या जोडीने देशाच्या संरक्षणाला राष्ट्रीय हिताना सुरूंग लावू शकतील अशा महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा या फायलीच्या ढिगाऱ्यामध्ये आणि कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यांमध्ये कशा लटकून राहतात, हरवून जातात याचे दर्शन आणि तोलमोल गव्हर्नन्समध्ये सहजच लक्ष वेधून घेते. पर्यावरण नष्ट होतंय? फायलीवरील नोंदी करायला अधिकारी कुठल्या रंगाची शाई वापरू शकतात? प्रश्न साधाच पण मंत्रालय चर्चेसाठी वर्षसुद्धा या विषयासाठी कमी पडावे. हिंदुस्थानी उच्चायुक्तांच्या निवासस्थानाची दुरुस्ती. केवढा ज्वलंत प्रश्न अनिर्णीत राहावा असाच कसा? या तुलनेत सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचे, राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षणविषयक महत्त्वाचे प्रश्न, गुप्तहेर खाते, घुसखोर, लोकसंख्येचा बदलता नकाशा, औद्योगिक परवाने, कायदा सुव्यवस्था, अंमलबजावणी, निर्यात नियंत्रण कायदा, निर्गुंतवणूक, शासन व्यवस्था सुधारण्यासाठीच्या अपेक्षित प्रक्रियेचे टप्पे, अर्थव्यवस्था, निर्णय आणि अंमलबजावणी अनावश्यक कामांना पायबंदांतून विकासाची साधना लक्षात आणून देणाऱ्या या गव्हर्नन्समध्ये सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांप्रमाणेच आपण आणि चीन यांच्यातल्या फरकाचा विचार मांडीत उपाय सांगताना जनतेला आज जो राइट टू इन्फर्मेशन माहिती अधिकार मिळाला आहे त्या जनता सक्षम करणाऱ्या शासन व्यवस्थेचा माहितीपूर्ण पाठपुरावा करण्याची पहिली गरज लक्षात आणून दिली आहे. शासन व्यवस्थेच्या डोळस निरीक्षणांतून स्वानुभवातून तयार झालेले गव्हर्नन्स (१) ओळख (२) धाडसी उपक्रम (३) अडथळ्यांची शर्यत (४) एक संस्या (५) एक क्षेत्र (६) एक जीवन मरणाचा प्रश्न (७) खरा धडा अशा सात प्रकरणांतून वाचकांपुढे मांडले आहे. घोषणाबाजीच्या चाकोरीबाहेर येऊन काम आणि सत्ता ही राज्याच्या अधिकाऱ्यांकडून समाजोन्मुख वळवणे कसे आवश्यक आहे ते सांगितले आहे. जनतेला ताकद देणारी कार्यक्षमता, समस्या, चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी विकासाची प्रक्रिया सुधारण्याची आवश्यकता स्वरूप बदलाची वेग वाढवण्यात महत्त्वपूर्णता अरुण शौरी इथं सांगून ठेवतात. समस्या तिथल्या तिथे सोडवून टाका. कालापव्यय टाळा. फायली वाढवू नका. स्वत: जाऊन भेटा, समोरासमोर येऊन प्रश्न सोडवणारा निर्णय घ्या व त्याची अंमलबजावणी करा. या मराठी अनुवादामध्ये भारती पांडे यांनी अरुण शौरी यांच्या मूळ इंग्रजी ‘गव्हर्ननस’मधील प्रत्येक अनुभवसिद्ध शासनव्यवस्था दर्शनाला समर्थ भाषाशैली, अर्थपूर्ण मांडणी आणि नेमकेपणाने पुरेपूर न्याय दिला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने अरुण शौरी यांच्या गव्हर्नन्स या अभ्यासनीय इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित करून मोलाची कामगिरी केली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी लालफीतीत अडकलेल्या काळ्या पांढऱ्या तपकिरी रंगांच्या बजबजपुरीत अडकलेल्या शासन व्यवहाराच्या दु:स्थितीचे बोलके दर्शन घडवणारे अर्थपूर्ण मुखपृष्ठ योजून ‘गव्हर्नन्स’चा हा मराठी अनुवाद ग्रंथ प्रथमदर्शनीच वेधक असल्याची ग्वाही दिली आहे. वाजवी किंमत, महत्त्वपूर्ण विषय. स्वच्छ निर्दोष छपाई मराठी वाचकांना आणि ग्रंथालयांना या पुस्तकाकडे खचित आकर्षित करील. -ललिता बापट ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 25-02-2004

    शासन नावाच्या ‘आंधळ्या’ व्यवस्थेची कथा!... सर्वसामान्या माणसांना ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महापालिकेच्या कारभाराची तोंडओळख असते; राज्य किंवा केंद्र सरकारच्या कारभाराची माहिती फारशी नसते. भारतासारख्या विशाल क्षेत्राचा कारभार हाकणाऱ्या केंद्रीय सरकरच्या व्यवस्थेची माहिती होणे फारच दुरापास्त असते. शिवाय तो विषयही अनेक अर्थाने रूचकर असतो. आपल्या लोकप्रतिनिधींनी तरी तो कितपत कळलेला असतो, याविषयी शंका येते. ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी वाजपेयी सरकारामध्ये विविध खात्याचे मंत्र म्हणून काम करताना आलेल्या अनुभवातून कथा ‘गव्हर्नन्स’ या इंग्रजी ग्रंथातून मांडली आहे. भारती पांडे यांनी एका किचकट विषयावरील पुस्तकाचा अनुवाद छान केला आहे. अरुण शौरी हे राजकीय घडामोडीचे विश्लेषण करणारे ज्येष्ठ पत्रकार. भाजप आघाडीचे सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी झाल्यानंतर त्यांनी निर्गुंतवणूक खाते, माहिती आणि प्रसार खाते, नियोजन खाते, माहिती आणि प्रसारण खाते, नियोजन खाते आदीचा कारभार पहिला. हा कारभार पाहताना त्यांच्यातील शोध पत्रकारिता सतत जागी होती. सरकारचे धोरण, राजकारण आणि व्यवहार यांची सांगड घालून काम करताना एक पत्रकार म्हणून तटस्थपणे या व्यवहाराकडे तो पाहत असल्याचे आणि या व्यवस्थेचे विश्लेषण करीत असल्याचे हे पुस्तक वाचताना पानोपानी जाणवतं. निर्गुंतवणूक खात्याचा कारभार सांभाळताना जे अनुभव आले, त्याचा पूर्ण पाढा वाचतानाच शासनाच्या अंगीकृत असलेल्या हॉटेलचे खासगीकरण करताना जी माहिती पुढे आली, ती वाचली की आपल्या शासनाचा कारभार म्हणजे ‘आंधळ दळतंय अन् कुत्र पीठ खातंय’ असाच वाटतो. पंतप्रधानांच्या कार्यालयापासून थोड्याच अंतरावर असलेले हॉटेल ज्या जमिनीवर उभे आहे, त्या जमिनीची नेमकी मालकी कुणाची? याचे उत्तर सापडत नाही. वाराणसीमधील आयटीडीसीचे अशोक हॉटेलचे खासगीकरण करण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव सुरू केली. १९७६मध्ये या हॉटेलसाठी पर्यटन विकास महामंडळाकडून जागा घेतली होती; मात्र पर्यटन विकास महामंडळानेच ही जागा विकत घेतल्याची कोठे नोंद नाही. ‘आयटीडीसी’ या जागेसाठीचा कर भरते आहे. तरीदेखील ही जागा महसूल खात्याकडे नोंद आहे, ती एका नेपाळी व्यक्तीच्या नावे! पर्यटन विकास मंडळाने ही जागा केव्हा विकत घेतली याचा शोधूनही सापडला नाही. अनेक ठिकाणी अशा हॉटेलची बांधकामे करताना इतरांच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे किंवा या हॉटेलवरच्या जागेवर इतरांनी अतिक्रमण केले आहे. या हॉटेलचा आर्थिक कारभारही अजब आणि तोट्यांचा होता म्हणून सरकारने ते न चालविता विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रेच सरकार दरबारी नव्हती. प्रत्यक्ष या हॉटेलच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कशा प्रकारचे अडथळे आले आणि शासन यंत्रणा कशी काम करते, याचे खूपच चांगले चित्रण करण्यात आले आहे. ते संतापजनक तसेच मनोरंजनात्मकही वाटते. समजून घ्यावे असे वाटते. त्यामुळे या पुस्तकातील ‘अ कॉरल.... रीफ’ हे प्रकरण थोडे कंटाळवाणे वाटू लागते. मात्र दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचा कारभार कसा चालतो, धोरणात्मक निर्णय घेताना नोकरशाही कशी वागते, त्यांचे हितसंबंध कसे निर्माण होतात, ते जपण्यासाठी त्यांची धडपड कशी चालू असते, याची माहिती डोळ्यांत अंजन घालणारी आहे. देशाचे नियोजन मंडळ म्हणजे एक प्रचंड प्रकरण आहे. अतिरिक्त जबाबदारी म्हणून नियोजन खात्याचे मंत्री अरुण शौरी होते, तेव्हा त्यांनी शासकीय अधिकारीच नियोजन मंडळ म्हणजे एक वाहनतळ, एक गोठा, किंवा एक पांजरपोळ असे वर्णन करतात. म्हणून त्यांनी या प्रकरणास ‘एक वाहनतळ’ असे नाव दिले आहे, ते अधिकच समर्पक आहे. कारण देशाच्या विकासाचे नियोजन कशा पद्धतीने चालते, नियोजन मंडळाची नेमकी भूमिका काय असते आणि कोठे चुकले याचे उत्तर येथे मिळते. पर्यावरणासारख्या गंभीर समस्येकडे सरकारी यंत्रणा कितपत आस्थेने पाहते, यावर प्रकाश टाकला आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानेच तयार केलेल्या अहवालात विषारी पदार्थ भारतात आणण्यावर घातलेल्या बंदीला न जुमानता आयात केली गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजे सरकारची बंदी, न्यायालयाची बंदी असे असतानाही हजारो टन टाकाऊ विषारी पदार्थांची आयात होते, याची नोंद शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालातच करण्यात येते, यापेक्षा या कारभाराचा विरोधाभास आणखी काय असू शकतो? बदलती अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, जागतिकीकरण आदी प्रक्रिया पाहता, आपल्या देशाचा कारभार पाहणारी शासन व्यवस्था कशी नसावी, याचा लेखाजोखाच अरुण शौरी यांनी या पुस्तकाद्वारे मांडला आहे. -वसंत भोसले ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA LOKRANG 28-10-2007

    एखाद्या समस्यवेर अथवा सूचनेवर अंमलबजावणीऐवजी कागदी घोडे नाचविण्याच्या सरकारी पद्धतीवर झगझगीत प्रकाश टाकणारे माजी मंत्री अरूण शौरी यांचे ‘गव्हर्नन्स’ हे पुस्तक परिस्थितीवर भाष्य करणारे आहे. या पुस्तकाचा अनुवाद भारती पांडे यांनी केला आहे. सरकारी लालफितत अडकलेल्या कारभारात कुणाचे प्रश्न मार्गी लागतात आणि कुणाचे मागे राहतात हे पाहणे रंजक तसेच विचार करण्यास भाग पाडणारे आहे.फायलींवर नोंदी करण्यासाठी नेमक्या कोणत्या रंगाच्या शाईचा वापर करावा, हे निश्चित करण्यासाठी सरकारी यंत्रणा एक संपूर्ण वर्ष घेते. या दरम्यान या विषयावर बराचसा काथ्याकूट केला जातो, डोकेफोड होते आणि अखेरीस काळ्या, हिरव्या, निळ्या आणि लाल अशा चारही रंगांच्या शाईचे पर्याय स्वीकारले जातात. एका साध्या शाईची ही कथा, तर जिथे सामान्यांना तातडीने न्याय हवा आहे आणि काही प्रश्नांची तड लावायची असेल, तिथे नेमके काय होत असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी. सरकारी यंत्रणेची ही प्रवृत्ती, हा स्वभाव बदलण्यासाठी शौरी यांनी काही उपायही या पुस्तकात सुचवले आहेत. आज अस्ताव्यस्त पसरलेली शासनव्यवस्था बांधेसूद आणि चोख काम करणारी हवी असेल तर काय करता येईल, याचा अदमास या पुस्तकात घेण्यात आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more