ALEX PATTAKOS ,CO-AUTHOR ELAINE DUNDON

About Author


HE IS CO-FOUNDER OF THE GLOBAL MEANING INSTITUTE AND COAUTHOR WITH ELAINE DUNDON OF THE INTERNATIONAL BEST-SELLING BOOK, PRISONERS OF OUR THOUGHTS: VIKTOR FRANKLS PRINCIPLES FOR DISCOVERING MEANING IN LIFE AND WORK, AVAILABLE IN OVER 20 LANGUAGES AND NOW IN A 3RD, REVISED AND EXPANDED, EDITION.

ॲलेक्स पॅटाकोस हे परिवर्तनशील विचारप्रणालीचे प्रणेते म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. द इनोव्हेशन ग्रुपचे ते प्रमुख आहेत. न्यू मेक्सिकोमधील सांता फे येथील सेंटर फॉर पर्सनल मीनिंगचे ते संस्थापक आहेत. रेनेसॉन्स बिझनेस असोसिएट्स (आर. बी.ए.) नावाच्या, ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते अध्यक्ष होते. दांडगा उत्साह, प्रेरणादायी व चैतन्यमय स्वभाव, प्रशिक्षणार्थीना हाताळण्याची पद्धत आणि सर्व स्तरांवर बदल घडवून आणण्याची हातोटी यासाठी त्यांचा नावलौकिक आहे. वक्ता, लेखक, सल्लागार आणि चर्चेत विषयाची प्रगती घडवून आणणारी व्यक्ती अशा सर्व भूमिकांत पॅटाकोस आपले विशिष्ट दृष्टिकोन व अनुभवांचा वापर करून, प्रशिक्षण घेणाऱ्यांना उत्साहित करीत, भविष्यासाठी योजना करण्याचा नवा मार्ग दाखवितात. वैयक्तिक सल्लागार व प्रशिक्षक या नात्याने ते, व्यवस्थापक, नामवंत खेळाडू, प्रसिद्ध व्यक्ती, वेगवेगळ्या क्षेत्रांतील कामगार, सेवानिवृत्त व्यक्तींस आपल्या रोजच्या व व्यावसायिक जीवनातील अर्थ शोधण्यास मदत करतात. उद्योगधंदा, सरकारी आणि धर्मादाय संस्था अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सामूहिकता निर्माण करण्याचा त्यांना पंचवीस वर्षांहून अधिक अनुभव आहे. विविध संस्थांतील वेगवेगळ्या स्तरांवरील कर्मचाऱ्यांची; नवनिर्मितीक्षम निर्णय घेण्याची, संस्थेचे कामकाज शिकण्याची, नेतृत्व करण्याची, यंत्रणेची मांडणी करता येण्याची क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्या ग्राहकांच्या नामावलीत फॉर्म्युन ५०० नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश होतो.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PRISONERS OF OUR THOUGHTS Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more