ALEX PATTAKOS ,CO-AUTHOR ELAINE DUNDON

About Author


HE IS CO-FOUNDER OF THE GLOBAL MEANING INSTITUTE AND COAUTHOR WITH ELAINE DUNDON OF THE INTERNATIONAL BEST-SELLING BOOK, PRISONERS OF OUR THOUGHTS: VIKTOR FRANKLS PRINCIPLES FOR DISCOVERING MEANING IN LIFE AND WORK, AVAILABLE IN OVER 20 LANGUAGES AND NOW IN A 3RD, REVISED AND EXPANDED, EDITION.

ॲलेक्स पॅटाकोस हे परिवर्तनशील विचारप्रणालीचे प्रणेते म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. द इनोव्हेशन ग्रुपचे ते प्रमुख आहेत. न्यू मेक्सिकोमधील सांता फे येथील सेंटर फॉर पर्सनल मीनिंगचे ते संस्थापक आहेत. रेनेसॉन्स बिझनेस असोसिएट्स (आर. बी.ए.) नावाच्या, ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते अध्यक्ष होते. दांडगा उत्साह, प्रेरणादायी व चैतन्यमय स्वभाव, प्रशिक्षणार्थीना हाताळण्याची पद्धत आणि सर्व स्तरांवर बदल घडवून आणण्याची हातोटी यासाठी त्यांचा नावलौकिक आहे. वक्ता, लेखक, सल्लागार आणि चर्चेत विषयाची प्रगती घडवून आणणारी व्यक्ती अशा सर्व भूमिकांत पॅटाकोस आपले विशिष्ट दृष्टिकोन व अनुभवांचा वापर करून, प्रशिक्षण घेणाऱ्यांना उत्साहित करीत, भविष्यासाठी योजना करण्याचा नवा मार्ग दाखवितात. वैयक्तिक सल्लागार व प्रशिक्षक या नात्याने ते, व्यवस्थापक, नामवंत खेळाडू, प्रसिद्ध व्यक्ती, वेगवेगळ्या क्षेत्रांतील कामगार, सेवानिवृत्त व्यक्तींस आपल्या रोजच्या व व्यावसायिक जीवनातील अर्थ शोधण्यास मदत करतात. उद्योगधंदा, सरकारी आणि धर्मादाय संस्था अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सामूहिकता निर्माण करण्याचा त्यांना पंचवीस वर्षांहून अधिक अनुभव आहे. विविध संस्थांतील वेगवेगळ्या स्तरांवरील कर्मचाऱ्यांची; नवनिर्मितीक्षम निर्णय घेण्याची, संस्थेचे कामकाज शिकण्याची, नेतृत्व करण्याची, यंत्रणेची मांडणी करता येण्याची क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्या ग्राहकांच्या नामावलीत फॉर्म्युन ५०० नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश होतो.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PRISONERS OF OUR THOUGHTS Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more