ALEX PATTAKOS ,CO-AUTHOR ELAINE DUNDON

About Author


HE IS CO-FOUNDER OF THE GLOBAL MEANING INSTITUTE AND COAUTHOR WITH ELAINE DUNDON OF THE INTERNATIONAL BEST-SELLING BOOK, PRISONERS OF OUR THOUGHTS: VIKTOR FRANKLS PRINCIPLES FOR DISCOVERING MEANING IN LIFE AND WORK, AVAILABLE IN OVER 20 LANGUAGES AND NOW IN A 3RD, REVISED AND EXPANDED, EDITION.

अॅलेक्स पॅटाकोस हे परिवर्तनशील विचारप्रणालीचे प्रणेते म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. द इनोव्हेशन ग्रुपचे ते प्रमुख आहेत. न्यू मेक्सिकोमधील सांता फे येथील सेंटर फॉर पर्सनल मीनिंगचे ते संस्थापक आहेत. रेनेसॉन्स बिझनेस असोसिएट्स (आर. बी.ए.) नावाच्या, ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते अध्यक्ष होते. दांडगा उत्साह, प्रेरणादायी व चैतन्यमय स्वभाव, प्रशिक्षणार्थीना हाताळण्याची पद्धत आणि सर्व स्तरांवर बदल घडवून आणण्याची हातोटी यासाठी त्यांचा नावलौकिक आहे. वक्ता, लेखक, सल्लागार आणि चर्चेत विषयाची प्रगती घडवून आणणारी व्यक्ती अशा सर्व भूमिकांत पॅटाकोस आपले विशिष्ट दृष्टिकोन व अनुभवांचा वापर करून, प्रशिक्षण घेणाऱ्यांना उत्साहित करीत, भविष्यासाठी योजना करण्याचा नवा मार्ग दाखवितात. वैयक्तिक सल्लागार व प्रशिक्षक या नात्याने ते, व्यवस्थापक, नामवंत खेळाडू, प्रसिद्ध व्यक्ती, वेगवेगळ्या क्षेत्रांतील कामगार, सेवानिवृत्त व्यक्तींस आपल्या रोजच्या व व्यावसायिक जीवनातील अर्थ शोधण्यास मदत करतात. उद्योगधंदा, सरकारी आणि धर्मादाय संस्था अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सामूहिकता निर्माण करण्याचा त्यांना पंचवीस वर्षांहून अधिक अनुभव आहे. विविध संस्थांतील वेगवेगळ्या स्तरांवरील कर्मचाऱ्यांची; नवनिर्मितीक्षम निर्णय घेण्याची, संस्थेचे कामकाज शिकण्याची, नेतृत्व करण्याची, यंत्रणेची मांडणी करता येण्याची क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्या ग्राहकांच्या नामावलीत फॉर्म्युन ५०० नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश होतो.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PRISONERS OF OUR THOUGHTS Rating Star
Add To Cart INR 240

Latest Reviews

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more