* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE OTHER SIDE OF SILENCE
  • Availability : Available
  • Translators : AAVTI NARAYAN
  • ISBN : 9788177662290
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 368
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE PARTITION OF INDIA IN 1947 CAUSED ONE OF THE MOST HARROWING HUMAN CONVULSIONS IN HISTORY: OVER TWELVE MILLION PEOPLE WERE DISPLACED AMIDST A FRENZY OF MURDER, RAPE AND ABDUCTION ON A MASSIVE SCALE. FOR DECADES THESE VIOLENT REALITIES REMAINED BURIED IN SILENCE, EVEN THOUGH THE MEMORIES OF BRUTALITY NEVER FADED. URVASHI BUTALIA’S THE OTHER SIDE OF SILENCE WAS THE FIRST MAJOR WORK TO EXHUME THE PERSONAL TRAUMA OF THE PARTITION. AN UNDISPUTED CLASSIC, IT METICULOUSLY LOCATES THE INDIVIDUAL EXPERIENCES AND PRIVATE PAIN AT THE HEART OF THIS CATACLYSMIC EVENT. FURTHERMORE, BUTALIA REVEALS HOW PEOPLE ON THE MARGINS OF HISTORY—CHILDREN, WOMEN, ORDINARY PEOPLE, THE LOWER CASTES, THE UNTOUCHABLES—WERE AFFECTED BY THIS UPHEAVAL. IN A PASSIONATE AND STIMULATING NEW INTRODUCTION, BUTALIA EXAMINES NOT ONLY RECENT DEVELOPMENTS IN THE EXPANDING FIELD OF PARTITION STUDIES BUT ALSO THE HEART-BREAKING WAYS IN WHICH THIS COLOSSAL TRAGEDY CONTINUES TO IMPACT OUR LIVES AND WHAT THIS MEANS FOR THE FUTURE OF THE INDIAN SUBCONTINENT.
उर्वशी बुटालिया यांचं ‘अदर साईड ऑफ सायलेन्स’ हे पुस्तक वाचलं आणि देशाची फाळणी म्हणजे काय हे समजलं. या पुस्तकात फाळणीचा ज्वलंत इतिहास आहे. यात मन सुन्न करणारे प्रसंग, घटना आहेत. यात काय नाही? फाळणीच्या हिंसाचारातून, उद्रेकातून जी कुटुंब, माणसं होरपळून निघाली त्यांच्या कथा आहेत. हकिकती आहेत. एवढे अत्याचार, हाल अपेष्टा भोगूनसुद्धा ती माणसं शांत आहेत. संयमित जीवन जगताहेत. आम्हाला ही कुटुंबं माहीत नव्हती. उर्वशी बुटालिया यांनी अशा अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. फाळणीत लोकांनी स्थलांतर कसं केलं, निर्वासितांचा काफिला निघाला, (जे निर्वासित चालत भारतात आले आणि भारतातून पाकिस्तानात गेले.) या लोकांना वाटेत काय अनुभव आले, रोगराईनं किती माणसं मुकले, जातीच्या-धर्माच्या प्रतिष्ठेसाठी लोकांनी आपल्याच मुलाबाळांना, बायकांना कसं ठार केलं, मुलं कशी रस्त्यावर आली हा सगळा इतिहास तुम्हाला या पुस्तकात मिळेल. त्याशिवाय तुम्हाला इथे माणुसकी, आपुलकीचं दर्शन घडेल. घरंदारं, प्रतिष्ठित स्त्रियांनी फाळणीतील अपहरण झालेल्या स्त्रियांचं पुनर्वसन केलं, त्यांना अनेक तऱ्हेने मदत केली. अनौरस मुलांचं संगोपन केलं, त्यांना मार्गाला लावण्यासाठी प्रयत्न केले, अशा प्रतिष्ठित, सामाजिक कार्यकत्र्यांचं दर्शन तुम्हाला इथे घडेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#INDIAPAKISTANPARTITION#URVASHIBUTALIA# "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEOTHERSIDEOFSILENCE #THEOTHERSIDEOFSILENCE #दअदरसाईडऑफसायलेन्स #POLITICS&GOVERNMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AAVTINARAYAN #URAVASHIBUTALIA "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more