DADASAHEB MORE

About Author

Birth Date : 01/06/1961


IN 1984 FOR HIS AUTOBIOGRAPHY GABAL, SHRI. DADASAHEB MALHARI MORE WAS BORN ON 1 JUNE 1961 AT BAWCHI IN SOLAPUR DISTRICT. PRESENTLY RESIDING IN NASHIK, DADASAHEB COMPLETED M. IN FIRST CLASS. A. (MARATHI) DEGREE AND ALSO PASSED THE SET EXAMINATION. HE IS WORKING AS AN ASSOCIATE PROFESSOR IN THE FACULTY OF HUMANITIES AND SOCIAL SCIENCES.

गबाळ या आत्मकथनासाठी १९८४ मध्ये राज्य पुरस्कार मिळणाऱ्या श्री. दादासाहेब मल्हारी मोरे यांचा जन्म १ जून १९६१ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील बावची येथे झाला. सध्या नशिक येथे वास्तव्य असलेल्या दादासाहेबांनी प्रथम श्रेणीत एम. ए. (मराठी) पदवी प्राप्त केली असून, सेट परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे सहयोगी प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. गबाळ या आत्मकथनाबरोबरच त्यांचे दुस्काळ कादंबरी, विमुक्त कथासंग्रह, अंधाराचे वारसदार कादंबरी हे (मेहता प्रकाशन) व इतर विपुल साहित्यलेखन प्रसिद्ध आहे. गबाळ या आत्मकथनाला राज्य पुरस्काराबरोबरच मुकादम साहित्य पुरस्कार, विमुक्त कथासंग्रहाला मसाप चा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, अंधाराचे वारसदार (कादंबरी) कार्तिकेय साहित्य पुरस्कार, विळसा कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी श्री. मोरे यांचे लेखन नावाजले गेले आहे. कथा, कादंबरी, आत्मकथन या विविध साहित्यप्रकारांबरोबरच दलित साहित्याचे योगदान , शिक्षणातून सामाजिक परिवर्तन , जागतिकीकरण आणि भटक्या-विमुक्त साहित्याचा वाङ्मयप्रवाह असे शोधनिबंध त्यांनी चर्चासत्रांतून सादर केले आहेत. गबाळ चे अनुवाद कन्नड, इंग्रजी, हिंदी भाषांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या सकस लेखनावर पीएच.डी संशोधनाबरोबरच अभ्यासक्रमामध्येही ( गबाळ या कादंबरीचा बी.ए अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ, एम. ए. शिवाजी विद्यापीठ, एम. ए. गोंडवना विद्यापीठ, तसेच विमुक्त या कथासंग्रहातील कसरत ही कथा बालभारती पुस्तकात, विमुक्त या कथासंग्रहाचा गुलबर्गा विद्यापीठ ) समावेशाचा सन्मान त्यांना लाभला आहे. कोल्हापूर, बेळगाव, निगवे दुमाला, अहमदापूर येथील निरनिराळ्या संमेलनांचे अध्यक्षपद भूषवण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
ANDHARACHE WARASDAR Rating Star
Add To Cart INR 150
GABAL Rating Star
Add To Cart INR 250
VIMUKTA Rating Star
Add To Cart INR 130

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.