DADASAHEB MORE

About Author

Birth Date : 01/06/1961


IN 1984 FOR HIS AUTOBIOGRAPHY GABAL, SHRI. DADASAHEB MALHARI MORE WAS BORN ON 1 JUNE 1961 AT BAWCHI IN SOLAPUR DISTRICT. PRESENTLY RESIDING IN NASHIK, DADASAHEB COMPLETED M. IN FIRST CLASS. A. (MARATHI) DEGREE AND ALSO PASSED THE SET EXAMINATION. HE IS WORKING AS AN ASSOCIATE PROFESSOR IN THE FACULTY OF HUMANITIES AND SOCIAL SCIENCES.

गबाळ या आत्मकथनासाठी १९८४ मध्ये राज्य पुरस्कार मिळणाऱ्या श्री. दादासाहेब मल्हारी मोरे यांचा जन्म १ जून १९६१ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील बावची येथे झाला. सध्या नशिक येथे वास्तव्य असलेल्या दादासाहेबांनी प्रथम श्रेणीत एम. ए. (मराठी) पदवी प्राप्त केली असून, सेट परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे सहयोगी प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. गबाळ या आत्मकथनाबरोबरच त्यांचे दुस्काळ कादंबरी, विमुक्त कथासंग्रह, अंधाराचे वारसदार कादंबरी हे (मेहता प्रकाशन) व इतर विपुल साहित्यलेखन प्रसिद्ध आहे. गबाळ या आत्मकथनाला राज्य पुरस्काराबरोबरच मुकादम साहित्य पुरस्कार, विमुक्त कथासंग्रहाला मसाप चा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, अंधाराचे वारसदार (कादंबरी) कार्तिकेय साहित्य पुरस्कार, विळसा कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी श्री. मोरे यांचे लेखन नावाजले गेले आहे. कथा, कादंबरी, आत्मकथन या विविध साहित्यप्रकारांबरोबरच दलित साहित्याचे योगदान , शिक्षणातून सामाजिक परिवर्तन , जागतिकीकरण आणि भटक्या-विमुक्त साहित्याचा वाङ्मयप्रवाह असे शोधनिबंध त्यांनी चर्चासत्रांतून सादर केले आहेत. गबाळ चे अनुवाद कन्नड, इंग्रजी, हिंदी भाषांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या सकस लेखनावर पीएच.डी संशोधनाबरोबरच अभ्यासक्रमामध्येही ( गबाळ या कादंबरीचा बी.ए अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ, एम. ए. शिवाजी विद्यापीठ, एम. ए. गोंडवना विद्यापीठ, तसेच विमुक्त या कथासंग्रहातील कसरत ही कथा बालभारती पुस्तकात, विमुक्त या कथासंग्रहाचा गुलबर्गा विद्यापीठ ) समावेशाचा सन्मान त्यांना लाभला आहे. कोल्हापूर, बेळगाव, निगवे दुमाला, अहमदापूर येथील निरनिराळ्या संमेलनांचे अध्यक्षपद भूषवण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
ANDHARACHE WARASDAR Rating Star
Add To Cart INR 150
DUSKAL Rating Star
Add To Cart INR 160
GABAL Rating Star
Add To Cart INR 250
VIMUKTA Rating Star
Add To Cart INR 280

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more