DADASAHEB MORE

About Author

Birth Date : 01/06/1961


IN 1984 FOR HIS AUTOBIOGRAPHY GABAL, SHRI. DADASAHEB MALHARI MORE WAS BORN ON 1 JUNE 1961 AT BAWCHI IN SOLAPUR DISTRICT. PRESENTLY RESIDING IN NASHIK, DADASAHEB COMPLETED M. IN FIRST CLASS. A. (MARATHI) DEGREE AND ALSO PASSED THE SET EXAMINATION. HE IS WORKING AS AN ASSOCIATE PROFESSOR IN THE FACULTY OF HUMANITIES AND SOCIAL SCIENCES.

गबाळ या आत्मकथनासाठी १९८४ मध्ये राज्य पुरस्कार मिळणाऱ्या श्री. दादासाहेब मल्हारी मोरे यांचा जन्म १ जून १९६१ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील बावची येथे झाला. सध्या नशिक येथे वास्तव्य असलेल्या दादासाहेबांनी प्रथम श्रेणीत एम. ए. (मराठी) पदवी प्राप्त केली असून, सेट परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे सहयोगी प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. गबाळ या आत्मकथनाबरोबरच त्यांचे दुस्काळ कादंबरी, विमुक्त कथासंग्रह, अंधाराचे वारसदार कादंबरी हे (मेहता प्रकाशन) व इतर विपुल साहित्यलेखन प्रसिद्ध आहे. गबाळ या आत्मकथनाला राज्य पुरस्काराबरोबरच मुकादम साहित्य पुरस्कार, विमुक्त कथासंग्रहाला मसाप चा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, अंधाराचे वारसदार (कादंबरी) कार्तिकेय साहित्य पुरस्कार, विळसा कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी श्री. मोरे यांचे लेखन नावाजले गेले आहे. कथा, कादंबरी, आत्मकथन या विविध साहित्यप्रकारांबरोबरच दलित साहित्याचे योगदान , शिक्षणातून सामाजिक परिवर्तन , जागतिकीकरण आणि भटक्या-विमुक्त साहित्याचा वाङ्मयप्रवाह असे शोधनिबंध त्यांनी चर्चासत्रांतून सादर केले आहेत. गबाळ चे अनुवाद कन्नड, इंग्रजी, हिंदी भाषांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या सकस लेखनावर पीएच.डी संशोधनाबरोबरच अभ्यासक्रमामध्येही ( गबाळ या कादंबरीचा बी.ए अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ, एम. ए. शिवाजी विद्यापीठ, एम. ए. गोंडवना विद्यापीठ, तसेच विमुक्त या कथासंग्रहातील कसरत ही कथा बालभारती पुस्तकात, विमुक्त या कथासंग्रहाचा गुलबर्गा विद्यापीठ ) समावेशाचा सन्मान त्यांना लाभला आहे. कोल्हापूर, बेळगाव, निगवे दुमाला, अहमदापूर येथील निरनिराळ्या संमेलनांचे अध्यक्षपद भूषवण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
ANDHARACHE WARASDAR Rating Star
Add To Cart INR 150
DUSKAL Rating Star
Add To Cart INR 160
GABAL Rating Star
Add To Cart INR 250
VIMUKTA Rating Star
Add To Cart INR 280

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more