D.B.MOKASHI

About Author

Birth Date : 27/11/1915
Death Date : 29/06/1981


D.B. MOKASHI WAS BORN IN URAN IN RAIGAD DISTRICT. AFTER MATRICULATION, MOKASHI OBTAINED A DEGREE IN ENGINEERING AND STARTED A RADIO REPAIR BUSINESS IN PUNE. BUT HIS REAL INCLINATION WAS TOWARDS LITERATURE. ALONG WITH STORIES AND NOVELS, HE ALSO DEALT WITH DIFFERENT TYPES OF LITERATURE BASED ON DAILY LIFE EXPERIENCE LIKE FINE STORIES, MYSTERY STORIES, GHOST STORIES, MYSTERY STORIES.

दि.बा. मोकाशी यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण येथे झाला. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर मोकाशी यांनी अभियांत्रिकीची पदविका घेतली व पुण्यात रेडिओ दुरुस्तीचा व्यवसाय केला. पण त्यांचा खरा ओढा साहित्याकडे होता. कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारांसोबतच त्यांनी दैनंदिन जीवनानुभवावर आधारित ललित कथा, गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यासारखे वेगळ्या वळणाचे साहित्यप्रकारही हाताळले. संत तुकारामाच्या जीवनावरील ‘आनंद ओवरी’, ‘देव चालले’, ‘पुरुषास शंभर गुन्हे माफ’, ‘वात्स्यायन’, ‘स्थळ-यात्रा’ या त्यांच्या कादंबNया विशेष गाजल्या. १९४७ साली मोकाशींचा ‘लामणदिवा’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर ‘पाच हजार गायी’, ‘तू आणि मी’, ‘माऊली’, ‘चापलूस’, ‘कथामोहिनी’ अशा विपुल कथालेखनाने ते साठोत्तरी साहित्यातील नवकथाकार म्हणून ओळखले जाऊ लागले. ललित लेखन आणि बालसाहित्यातही मोकाशी यांचे भरीव योगदान आहे. ‘अठरा लक्ष पावले’, ‘अमृतानुभव’, ‘संध्याकाळचे पुणे’ असे अनेक ललित लेखसंग्रह त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘अमेरिकन लायब्ररी’तर्फे राबविण्यात आलेल्या अनुवाद प्रकल्पातील महत्त्वाचे अनुवादही त्यांच्या नावावर आहेत. ‘घणघणतो घंटानाद’ आणि ‘प्लासीचा रणसंग्राम’ यांसारख्या पुस्तकांचा यात समावेश आहे. त्यांच्या ‘गुपित’, ‘पालखी’, ‘स्थळयात्रा’, ‘आमोद सुनासी आले’, ‘देव चालले’, ‘जमीन आपली आई’ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाने ‘उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार’ देऊन गौरवले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GHANGHANTO GHANTANAD Rating Star
Add To Cart INR 550

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more