* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE LAST GIRL
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789353173227
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2019
  • Weight : 300.00 gms
  • Pages : 320
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE LAST GIRL: MY STORY OF CAPTIVITY, AND MY FIGHT AGAINST THE ISLAMIC STATE IS AN AUTOBIOGRAPHICAL BOOK BY NADIA MURAD IN WHICH SHE DESCRIBES HOW SHE WAS CAPTURED AND ENSLAVED BY THE ISLAMIC STATE DURING THE SECOND IRAQI CIVIL WAR. THE BOOK EVENTUALLY LED TO THE 2018 NOBEL PEACE PRIZE BEING AWARDED TO MURAD.
नोबेल शांतता पुरस्कार विजेतीची कहाणी़...नादिया मुराद ही अत्यंत धाडसी यजिदी तरुणी आहे. तिनं इसिसची लैंगिक गुलामगिरी सोसली आहे. तिनं कल्पनातीत यातना आणि अपमान भोगला आहे. नादियाच्या सहा भावांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यानंतर काही काळातच, तिच्या आईलाही ठार मारण्यात आलं. त्यांचे मृतदेह सामूहिक कबरींत लोटण्यात आले...पण तिनं लढा दिला...इराकमधील तिचे बालपणीचे शांततामय दिवस... घरच्यांचा कायमचा वियोग आणि अमानुषतेचा सामना... ते जर्मनीत लाभलेली सुरक्षितता यादरम्यानचा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.

No Records Found
No Records Found
Keywords
# द लास्ट गर्ल # नादियामुराद # जेन्नाक्रेजस्की #सुप्रिया वकील #नोबेलशांततापुरस्कार #आयसिस #NOBELPRIZE #THELASTGIRL #NADIAMURAD #SUPRIYAVAKIL #MEEMALALA #YAZIDI #IRAQ #ISLAMIKSTATES
Customer Reviews
  • Rating Starमोईन ह्यूमॅनीस्ट.

    आपल्याला आपल्याच समस्या फार मोठ्या वाटतं असतात.सर्वकाही पुरेसे असून सुद्धा आपण आपल्याकडे जे नाही ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो नि जोपर्यत ती गोष्ट मिळवत नाही तोपर्यंत दुःखी राहतो.जगात फक्त आपल्यालाच दुःख आहे नि आपलेच दुःख फार मोठे आहे असं आपल्यालावाटतं राहतं.आपण आज आपल्या घरात सुखाने राहतोय,स्वतंत्र पध्दतीने जगतोय तरीही आपल्याला स्वातंत्र्याची विशेष किंमत नसते.पण जेव्हा आपण इतर देशाची स्थिती बघतो,`नादिया मुराद` सारख्या तरुणींची कहाणी बघतो/वाचतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण किती नशीबवान नि सुखी आहोत याची प्रचिती येते.आपले दुःख किती किरकोळ आहेत हे आपल्याला समजतं.`आपल्या जवळ जेवढं आहे त्यातील काही मूलभूत गोष्टी सुद्धा जगात असंख्यांना मिळतं नाही या गोष्टीची जाणीव आपल्याला होते. तर काही दिवसांपूर्वी मी 2018 चा `नोबेल शांतता पुरस्कार` विजेती `नादिया मुराद `ताई लिखित `द लास्ट गर्ल` या आत्मकथनाचा `सुप्रिया वकील`यांनी केलेला मराठी अनुवाद वाचून पूर्ण केला.तेव्हापासूनच याबद्दल माझं अनुभव लिहायचं प्रयत्न करत होतो पण ते काही केल्या जमतंच नव्हतं;कारण की या पुस्तकाचा कथानकच तसा आहे जो वाचकाला आतून हेलावून सोडतो,थरकाप उडवतो नि सुरुवातीला जे काही मांडल त्याची जाणीव करून देतो. हे सर्वकाही वाचून पूर्ण केल्यानंतर लिहायला,बोलायला वाचकाला काही शब्दचं सुचतं नाही एवढं अस्वस्थ या पुस्तकाचा प्रवास आहे.संपूर्ण पुस्तकं वाचताना माणूस एवढं घाणेरडं नि क्रूर वागू शकतो ? एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो ? इत्यादी प्रश्न आपल्याला सारखे पडतं राहतात.पूर्णपणे थक्क नि सुन्न करून जाणारे हे आत्मकथन वाचताना आपल्या डोळ्याला पाजर फुटतो,घृणा वाटू लागते,राग अन् चीड येते तर यातील कितीतरी भयंकर प्रसंग वाचताना धायमोकळून रडावं वाटतं.... आपण यामध्ये पूर्णपणे गुंतून नि हरवून जातो नि यातील कथानकाचा एक अविभाज्य भाग होऊन जातो.हे सर्वकाही आपल्याला आपल्या समोर घडताना दिसतो नि आपण काहीच करू शकतं हा विचार करून आपल्याला हतबल वाटतं राहतं एवढं नक्की...वाचायला सुरुवात केल्यापासून ते शेवटच्या पृष्ठापर्यत खाली ठेवावं वाटतं नाही एवढ्या चांगल्या पद्धतीने हे पुस्तक लिहलेलं असून अनुवाद सुद्धा तेवढंच सुरेख झाला आहे....! नादिया ताईने त्याची ही कहाणी ज्यापद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे ती आपल्या हृदयाचा ठाव घेणारी नि मुळापासून हादरून सोडणारी आहे.तिच्या बालपणापासून तर आयसिसच्या कैदेतून सुटण्यापर्यतचा एकंदरीत सर्व प्रवास आपल्या या आत्मकथनात लेखिकेने शब्दबद्ध केला आहे जो वाचताना अंगावर काटा येतो.🌿 कथानकाबद्दल.... `यजिदी धर्मीय नादिया मुराद ही तरुणी आपल्या कुटुंबासोबत इराक देशातील कोचो या छोट्याश्या गावात राहत असते.जेमतेम परिस्थिती असलेलं हे कुटूंब सुखाने -प्रेमाने नांदत असतं.पण 2014 साली या गावांवर आयसिस या दहशतवादी संघटनेची वाईट नजर पडते नि एक भयंकर संकट या गावांवर येऊन कोसळतं.आयसिसचे दहशतवादी या गावातील सर्वांना एका शाळेत जमा करतात नि त्यांना जबरन इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सांगतात. जेव्हा यापैकी कोणीही धर्मांतर करायचं स्वीकार करत नाही, तेव्हा सर्वप्रथम पुरुषांना वेगळं करून एका ट्रक मध्ये भरून नेल्या जातं नि गोळ्यांनी ठार केल्या जातं.`यामध्ये नादियाचे 6 भाऊ बळी पडतात.यानंतर वृद्ध नि तरुण स्त्रियांना वेगवेगळ करून `वृद्ध स्त्रियांना` सुद्धा ठार केल्या जातं(यामध्ये नादियाच्या आईचा समावेश असतो) आणि तरुणींना `सेक्स वर्कर`म्हणून विकल्या जातं.यामध्ये नादिया मुराद, तिच्या बहिणी, तिची वहिनी या सर्वांची लैंगिक गुलाम म्हणून विक्री होते. येथूनच नादियाच्या खडतर नि भयानक प्रवासाला सुरुवात होते. तिच्यावर आयसिसच्या वेगवेगळ्या नराधमाकडून सतत बलात्कार केल्या जाते,क्रूर अत्याचार केल्या जातात,मारहाण करून तिला भयंकर त्रास दिल्या जातो.तिने वर्णन केलेलं हे सर्व वाचताना गहिवरून येतं,डोकं सुन्न व्हायला होतं,पुढे वाचण्याची हिम्मत होतं नाही एवढं त्रासदायक हा प्रवास आहे.आपल्याला वाचताना कष्ट जाणवतात तर लेखिकेने हे सर्वकाही भोगलं आहे हा विचार करून जीव कासावीस होऊन जातो.... नादिया ताईची खरेदी विक्री नि तिच्यावर सारख्या अत्याचाराची मालिका सुरूच राहते.पण इतकं सगळं सोसूनही लेखिका मोडून पडतं नाही किंवा शरण जातं नाही.आपले पळून जाण्याचे प्रयत्न ती सुरू ठेवते आणि एकेवेळी ती त्यात ती यशस्वी होते.एका सुन्नी मुस्लिम कुटुंबीयांच्या मदतीने ती मोठ्या जोखमीने`कुर्दीस्थानात` पोहोचते.🌿 अवघ्या 21 व्या वर्षी हे सगळं वाट्याला आलेली नादिया मुराद या अत्याचारातून सुटली व आपल्यावर झालेले अन्याय तिनं जगाला सांगितले.आता नादिया ताई मानवाधिकार चळवळीतली एक अग्रगण्य कार्यकर्ती म्हणून ओळखली जाते. यजिदी समाज, त्यांचा धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी ती काम करते.या सर्व लढ्याची व तिच्या संघर्षाची दखल जगाने घेतली नि तिला `2018 चा नोबेल शांतता पुरस्कार`देऊन तिचा सन्मान केला. द लास्ट गर्ल या आत्मकथनात ` नादिया ताई` म्हणते.... मला माझ्यावर बलात्कार करणाऱ्या माणसांच्या नजरेला नजर द्यायची आहे आणि त्यांना न्यायव्यवस्थेसमोर उभं केलेलं पाहायचं आहे आणि बाकी कशाहीपेक्षा, कुणाचीही कहाणी माझ्यासारखी असू नये, अशी माझी इच्छा आहे... अशी कहाणी असलेली मी जगातली शेवटचीच मुलगी असावे... द लास्ट गर्ल...! नि खरोखरच आपण असं कधीही,कोणासोबतही होऊ नये आणि ताईचे हे शब्द खरे ठरो यासाठी प्रार्थना करूया...! नक्की नक्की वाचा...! ...Read more

  • Rating StarSandeep balasaheb patil

    खरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्रबळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more

  • Rating StarKavita Jadhav

    आपल्या ग्रुपवर कोणीतरी हे पुस्तक वाचण्यासाठी सुचविले होते त्यांचे धन्यवाद.🙏 *द लास्ट गर्ल - नादिया मुराद (2018 नोबेल शांतता पुरस्कार विजेती, संयुक्त राष्ट्र संघाची पहिली सदिच्छादूत, इस्लामिक स्टेटला वंशहत्या आणि मानवताविरोधी गुन्ह्यांसाठी आंतररष्ट्रीय अपराध न्यायालयासमोर उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.)* 2014 साली जेव्हा आयसिस ने "यजिदी" इराक-सिंजर- कोचोवर निव्वळ अल्पसंख्याक आणि आपल्या धर्मा व्यतिरिक्त अन्य धर्माच्या लोकांच्या वेगळ्या श्रद्धा मान्य नसण्याच्या कारणाने हल्ला करून संपुर्ण गाव, कुटुंब, नाती, घरं, शेती उद्ध्वस्त केली. तिच्या भावांसह आईला मारून टाकलं. गावातल्या सगळ्या पुरुषांना मारून, तरुण मुलींना "सबिय्या" केलं. संपूर्ण इराकभर त्यांना एका कडून दुसऱ्याकडे विकलं. मानसिक, शारीरिक, लैंगिक आत्याचार केले. मोसुल- इस्लामिक स्टेट, सुन्नी मुस्लिम कुटुंबाने जीवावर उदार होवुन तिची सुटका करण्यात तिला मदत केली. ती संपुर्ण घटना पुस्तकामध्ये आहे. तिच्यावर झालेले अत्याचार परत कुणावरही होऊ नये, असे आत्याचार झालेली ती शेवटची असावी म्हणून "द लास्ट गर्ल" पुस्तक वाचताना देशातल्या लोकशाहीचे महत्त्व कळते. पुस्तक वाचल्यावर आत्याचाराची दाहकता समजते, सगळी घटना डोळ्यासमोर उभी रहाते. अगदी अलीकडच्या काळातील ही घटना आहे. धर्माच्याआड दुसऱ्यावर आत्याचार करून, "आमचाच धर्म कित्ती चांगला सांगणं" मनाला पटत नाही. "माणुसकी" हाच धर्म आहे. आपण आपल्या धार्मिक अस्मिता गोंजारण्याआधी हे पुस्तक नक्कीच वाचल पाहिजे. ...Read more

  • Rating StarChandrakant Kavathekar

    आयसिसच्या अनन्वित अत्याचारांची सुन्न करणारी कहाणी

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MANSA ASHI ANI TASHIHI
MANSA ASHI ANI TASHIHI by RAVINDRA BHAGAVATE Rating Star
ठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

THE HUNGRY TIDE
THE HUNGRY TIDE by AMITAV GHOSH Rating Star
जयश्री सोनवणे

बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more