* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE LAST GIRL
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789353173227
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2019
  • Weight : 300.00 gms
  • Pages : 320
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE LAST GIRL: MY STORY OF CAPTIVITY, AND MY FIGHT AGAINST THE ISLAMIC STATE IS AN AUTOBIOGRAPHICAL BOOK BY NADIA MURAD IN WHICH SHE DESCRIBES HOW SHE WAS CAPTURED AND ENSLAVED BY THE ISLAMIC STATE DURING THE SECOND IRAQI CIVIL WAR. THE BOOK EVENTUALLY LED TO THE 2018 NOBEL PEACE PRIZE BEING AWARDED TO MURAD.
नोबेल शांतता पुरस्कार विजेतीची कहाणी़...नादिया मुराद ही अत्यंत धाडसी यजिदी तरुणी आहे. तिनं इसिसची लैंगिक गुलामगिरी सोसली आहे. तिनं कल्पनातीत यातना आणि अपमान भोगला आहे. नादियाच्या सहा भावांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यानंतर काही काळातच, तिच्या आईलाही ठार मारण्यात आलं. त्यांचे मृतदेह सामूहिक कबरींत लोटण्यात आले...पण तिनं लढा दिला...इराकमधील तिचे बालपणीचे शांततामय दिवस... घरच्यांचा कायमचा वियोग आणि अमानुषतेचा सामना... ते जर्मनीत लाभलेली सुरक्षितता यादरम्यानचा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.

No Records Found
No Records Found
Keywords
# द लास्ट गर्ल # नादियामुराद # जेन्नाक्रेजस्की #सुप्रिया वकील #नोबेलशांततापुरस्कार #आयसिस #NOBELPRIZE #THELASTGIRL #NADIAMURAD #SUPRIYAVAKIL #MEEMALALA #YAZIDI #IRAQ #ISLAMIKSTATES
Customer Reviews
  • Rating Starमोईन ह्यूमॅनीस्ट.

    आपल्याला आपल्याच समस्या फार मोठ्या वाटतं असतात.सर्वकाही पुरेसे असून सुद्धा आपण आपल्याकडे जे नाही ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो नि जोपर्यत ती गोष्ट मिळवत नाही तोपर्यंत दुःखी राहतो.जगात फक्त आपल्यालाच दुःख आहे नि आपलेच दुःख फार मोठे आहे असं आपल्यालावाटतं राहतं.आपण आज आपल्या घरात सुखाने राहतोय,स्वतंत्र पध्दतीने जगतोय तरीही आपल्याला स्वातंत्र्याची विशेष किंमत नसते.पण जेव्हा आपण इतर देशाची स्थिती बघतो,`नादिया मुराद` सारख्या तरुणींची कहाणी बघतो/वाचतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण किती नशीबवान नि सुखी आहोत याची प्रचिती येते.आपले दुःख किती किरकोळ आहेत हे आपल्याला समजतं.`आपल्या जवळ जेवढं आहे त्यातील काही मूलभूत गोष्टी सुद्धा जगात असंख्यांना मिळतं नाही या गोष्टीची जाणीव आपल्याला होते. तर काही दिवसांपूर्वी मी 2018 चा `नोबेल शांतता पुरस्कार` विजेती `नादिया मुराद `ताई लिखित `द लास्ट गर्ल` या आत्मकथनाचा `सुप्रिया वकील`यांनी केलेला मराठी अनुवाद वाचून पूर्ण केला.तेव्हापासूनच याबद्दल माझं अनुभव लिहायचं प्रयत्न करत होतो पण ते काही केल्या जमतंच नव्हतं;कारण की या पुस्तकाचा कथानकच तसा आहे जो वाचकाला आतून हेलावून सोडतो,थरकाप उडवतो नि सुरुवातीला जे काही मांडल त्याची जाणीव करून देतो. हे सर्वकाही वाचून पूर्ण केल्यानंतर लिहायला,बोलायला वाचकाला काही शब्दचं सुचतं नाही एवढं अस्वस्थ या पुस्तकाचा प्रवास आहे.संपूर्ण पुस्तकं वाचताना माणूस एवढं घाणेरडं नि क्रूर वागू शकतो ? एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो ? इत्यादी प्रश्न आपल्याला सारखे पडतं राहतात.पूर्णपणे थक्क नि सुन्न करून जाणारे हे आत्मकथन वाचताना आपल्या डोळ्याला पाजर फुटतो,घृणा वाटू लागते,राग अन् चीड येते तर यातील कितीतरी भयंकर प्रसंग वाचताना धायमोकळून रडावं वाटतं.... आपण यामध्ये पूर्णपणे गुंतून नि हरवून जातो नि यातील कथानकाचा एक अविभाज्य भाग होऊन जातो.हे सर्वकाही आपल्याला आपल्या समोर घडताना दिसतो नि आपण काहीच करू शकतं हा विचार करून आपल्याला हतबल वाटतं राहतं एवढं नक्की...वाचायला सुरुवात केल्यापासून ते शेवटच्या पृष्ठापर्यत खाली ठेवावं वाटतं नाही एवढ्या चांगल्या पद्धतीने हे पुस्तक लिहलेलं असून अनुवाद सुद्धा तेवढंच सुरेख झाला आहे....! नादिया ताईने त्याची ही कहाणी ज्यापद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे ती आपल्या हृदयाचा ठाव घेणारी नि मुळापासून हादरून सोडणारी आहे.तिच्या बालपणापासून तर आयसिसच्या कैदेतून सुटण्यापर्यतचा एकंदरीत सर्व प्रवास आपल्या या आत्मकथनात लेखिकेने शब्दबद्ध केला आहे जो वाचताना अंगावर काटा येतो.🌿 कथानकाबद्दल.... `यजिदी धर्मीय नादिया मुराद ही तरुणी आपल्या कुटुंबासोबत इराक देशातील कोचो या छोट्याश्या गावात राहत असते.जेमतेम परिस्थिती असलेलं हे कुटूंब सुखाने -प्रेमाने नांदत असतं.पण 2014 साली या गावांवर आयसिस या दहशतवादी संघटनेची वाईट नजर पडते नि एक भयंकर संकट या गावांवर येऊन कोसळतं.आयसिसचे दहशतवादी या गावातील सर्वांना एका शाळेत जमा करतात नि त्यांना जबरन इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सांगतात. जेव्हा यापैकी कोणीही धर्मांतर करायचं स्वीकार करत नाही, तेव्हा सर्वप्रथम पुरुषांना वेगळं करून एका ट्रक मध्ये भरून नेल्या जातं नि गोळ्यांनी ठार केल्या जातं.`यामध्ये नादियाचे 6 भाऊ बळी पडतात.यानंतर वृद्ध नि तरुण स्त्रियांना वेगवेगळ करून `वृद्ध स्त्रियांना` सुद्धा ठार केल्या जातं(यामध्ये नादियाच्या आईचा समावेश असतो) आणि तरुणींना `सेक्स वर्कर`म्हणून विकल्या जातं.यामध्ये नादिया मुराद, तिच्या बहिणी, तिची वहिनी या सर्वांची लैंगिक गुलाम म्हणून विक्री होते. येथूनच नादियाच्या खडतर नि भयानक प्रवासाला सुरुवात होते. तिच्यावर आयसिसच्या वेगवेगळ्या नराधमाकडून सतत बलात्कार केल्या जाते,क्रूर अत्याचार केल्या जातात,मारहाण करून तिला भयंकर त्रास दिल्या जातो.तिने वर्णन केलेलं हे सर्व वाचताना गहिवरून येतं,डोकं सुन्न व्हायला होतं,पुढे वाचण्याची हिम्मत होतं नाही एवढं त्रासदायक हा प्रवास आहे.आपल्याला वाचताना कष्ट जाणवतात तर लेखिकेने हे सर्वकाही भोगलं आहे हा विचार करून जीव कासावीस होऊन जातो.... नादिया ताईची खरेदी विक्री नि तिच्यावर सारख्या अत्याचाराची मालिका सुरूच राहते.पण इतकं सगळं सोसूनही लेखिका मोडून पडतं नाही किंवा शरण जातं नाही.आपले पळून जाण्याचे प्रयत्न ती सुरू ठेवते आणि एकेवेळी ती त्यात ती यशस्वी होते.एका सुन्नी मुस्लिम कुटुंबीयांच्या मदतीने ती मोठ्या जोखमीने`कुर्दीस्थानात` पोहोचते.🌿 अवघ्या 21 व्या वर्षी हे सगळं वाट्याला आलेली नादिया मुराद या अत्याचारातून सुटली व आपल्यावर झालेले अन्याय तिनं जगाला सांगितले.आता नादिया ताई मानवाधिकार चळवळीतली एक अग्रगण्य कार्यकर्ती म्हणून ओळखली जाते. यजिदी समाज, त्यांचा धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी ती काम करते.या सर्व लढ्याची व तिच्या संघर्षाची दखल जगाने घेतली नि तिला `2018 चा नोबेल शांतता पुरस्कार`देऊन तिचा सन्मान केला. द लास्ट गर्ल या आत्मकथनात ` नादिया ताई` म्हणते.... मला माझ्यावर बलात्कार करणाऱ्या माणसांच्या नजरेला नजर द्यायची आहे आणि त्यांना न्यायव्यवस्थेसमोर उभं केलेलं पाहायचं आहे आणि बाकी कशाहीपेक्षा, कुणाचीही कहाणी माझ्यासारखी असू नये, अशी माझी इच्छा आहे... अशी कहाणी असलेली मी जगातली शेवटचीच मुलगी असावे... द लास्ट गर्ल...! नि खरोखरच आपण असं कधीही,कोणासोबतही होऊ नये आणि ताईचे हे शब्द खरे ठरो यासाठी प्रार्थना करूया...! नक्की नक्की वाचा...! ...Read more

  • Rating StarSandeep balasaheb patil

    खरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्रबळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more

  • Rating StarKavita Jadhav

    आपल्या ग्रुपवर कोणीतरी हे पुस्तक वाचण्यासाठी सुचविले होते त्यांचे धन्यवाद.🙏 *द लास्ट गर्ल - नादिया मुराद (2018 नोबेल शांतता पुरस्कार विजेती, संयुक्त राष्ट्र संघाची पहिली सदिच्छादूत, इस्लामिक स्टेटला वंशहत्या आणि मानवताविरोधी गुन्ह्यांसाठी आंतररष्ट्रीय अपराध न्यायालयासमोर उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.)* 2014 साली जेव्हा आयसिस ने "यजिदी" इराक-सिंजर- कोचोवर निव्वळ अल्पसंख्याक आणि आपल्या धर्मा व्यतिरिक्त अन्य धर्माच्या लोकांच्या वेगळ्या श्रद्धा मान्य नसण्याच्या कारणाने हल्ला करून संपुर्ण गाव, कुटुंब, नाती, घरं, शेती उद्ध्वस्त केली. तिच्या भावांसह आईला मारून टाकलं. गावातल्या सगळ्या पुरुषांना मारून, तरुण मुलींना "सबिय्या" केलं. संपूर्ण इराकभर त्यांना एका कडून दुसऱ्याकडे विकलं. मानसिक, शारीरिक, लैंगिक आत्याचार केले. मोसुल- इस्लामिक स्टेट, सुन्नी मुस्लिम कुटुंबाने जीवावर उदार होवुन तिची सुटका करण्यात तिला मदत केली. ती संपुर्ण घटना पुस्तकामध्ये आहे. तिच्यावर झालेले अत्याचार परत कुणावरही होऊ नये, असे आत्याचार झालेली ती शेवटची असावी म्हणून "द लास्ट गर्ल" पुस्तक वाचताना देशातल्या लोकशाहीचे महत्त्व कळते. पुस्तक वाचल्यावर आत्याचाराची दाहकता समजते, सगळी घटना डोळ्यासमोर उभी रहाते. अगदी अलीकडच्या काळातील ही घटना आहे. धर्माच्याआड दुसऱ्यावर आत्याचार करून, "आमचाच धर्म कित्ती चांगला सांगणं" मनाला पटत नाही. "माणुसकी" हाच धर्म आहे. आपण आपल्या धार्मिक अस्मिता गोंजारण्याआधी हे पुस्तक नक्कीच वाचल पाहिजे. ...Read more

  • Rating StarChandrakant Kavathekar

    आयसिसच्या अनन्वित अत्याचारांची सुन्न करणारी कहाणी

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more