* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE LAST GIRL: MY STORY OF CAPTIVITY, AND MY FIGHT AGAINST THE ISLAMIC STATE
  • Availability : Notify Me
     
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789353173227
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2019
  • Weight : 300.00 gms
  • Pages : 320
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE LAST GIRL: MY STORY OF CAPTIVITY, AND MY FIGHT AGAINST THE ISLAMIC STATE IS AN AUTOBIOGRAPHICAL BOOK BY NADIA MURAD IN WHICH SHE DESCRIBES HOW SHE WAS CAPTURED AND ENSLAVED BY THE ISLAMIC STATE DURING THE SECOND IRAQI CIVIL WAR. THE BOOK EVENTUALLY LED TO THE 2018 NOBEL PEACE PRIZE BEING AWARDED TO MURAD.
नोबेल शांतता पुरस्कार विजेतीची कहाणी़...नादिया मुराद ही अत्यंत धाडसी यजिदी तरुणी आहे. तिनं इसिसची लैंगिक गुलामगिरी सोसली आहे. तिनं कल्पनातीत यातना आणि अपमान भोगला आहे. नादियाच्या सहा भावांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यानंतर काही काळातच, तिच्या आईलाही ठार मारण्यात आलं. त्यांचे मृतदेह सामूहिक कबरींत लोटण्यात आले...पण तिनं लढा दिला...इराकमधील तिचे बालपणीचे शांततामय दिवस... घरच्यांचा कायमचा वियोग आणि अमानुषतेचा सामना... ते जर्मनीत लाभलेली सुरक्षितता यादरम्यानचा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.

No Records Found
No Records Found
Keywords
# द लास्ट गर्ल # नादियामुराद # जेन्नाक्रेजस्की #सुप्रिया वकील #नोबेलशांततापुरस्कार #आयसिस #NOBELPRIZE #THELASTGIRL #NADIAMURAD #SUPRIYAVAKIL #MEEMALALA #YAZIDI #IRAQ #ISLAMIKSTATES
Customer Reviews
  • Rating Starमोईन ह्यूमॅनीस्ट.

    आपल्याला आपल्याच समस्या फार मोठ्या वाटतं असतात.सर्वकाही पुरेसे असून सुद्धा आपण आपल्याकडे जे नाही ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो नि जोपर्यत ती गोष्ट मिळवत नाही तोपर्यंत दुःखी राहतो.जगात फक्त आपल्यालाच दुःख आहे नि आपलेच दुःख फार मोठे आहे असं आपल्यालावाटतं राहतं.आपण आज आपल्या घरात सुखाने राहतोय,स्वतंत्र पध्दतीने जगतोय तरीही आपल्याला स्वातंत्र्याची विशेष किंमत नसते.पण जेव्हा आपण इतर देशाची स्थिती बघतो,`नादिया मुराद` सारख्या तरुणींची कहाणी बघतो/वाचतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण किती नशीबवान नि सुखी आहोत याची प्रचिती येते.आपले दुःख किती किरकोळ आहेत हे आपल्याला समजतं.`आपल्या जवळ जेवढं आहे त्यातील काही मूलभूत गोष्टी सुद्धा जगात असंख्यांना मिळतं नाही या गोष्टीची जाणीव आपल्याला होते. तर काही दिवसांपूर्वी मी 2018 चा `नोबेल शांतता पुरस्कार` विजेती `नादिया मुराद `ताई लिखित `द लास्ट गर्ल` या आत्मकथनाचा `सुप्रिया वकील`यांनी केलेला मराठी अनुवाद वाचून पूर्ण केला.तेव्हापासूनच याबद्दल माझं अनुभव लिहायचं प्रयत्न करत होतो पण ते काही केल्या जमतंच नव्हतं;कारण की या पुस्तकाचा कथानकच तसा आहे जो वाचकाला आतून हेलावून सोडतो,थरकाप उडवतो नि सुरुवातीला जे काही मांडल त्याची जाणीव करून देतो. हे सर्वकाही वाचून पूर्ण केल्यानंतर लिहायला,बोलायला वाचकाला काही शब्दचं सुचतं नाही एवढं अस्वस्थ या पुस्तकाचा प्रवास आहे.संपूर्ण पुस्तकं वाचताना माणूस एवढं घाणेरडं नि क्रूर वागू शकतो ? एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो ? इत्यादी प्रश्न आपल्याला सारखे पडतं राहतात.पूर्णपणे थक्क नि सुन्न करून जाणारे हे आत्मकथन वाचताना आपल्या डोळ्याला पाजर फुटतो,घृणा वाटू लागते,राग अन् चीड येते तर यातील कितीतरी भयंकर प्रसंग वाचताना धायमोकळून रडावं वाटतं.... आपण यामध्ये पूर्णपणे गुंतून नि हरवून जातो नि यातील कथानकाचा एक अविभाज्य भाग होऊन जातो.हे सर्वकाही आपल्याला आपल्या समोर घडताना दिसतो नि आपण काहीच करू शकतं हा विचार करून आपल्याला हतबल वाटतं राहतं एवढं नक्की...वाचायला सुरुवात केल्यापासून ते शेवटच्या पृष्ठापर्यत खाली ठेवावं वाटतं नाही एवढ्या चांगल्या पद्धतीने हे पुस्तक लिहलेलं असून अनुवाद सुद्धा तेवढंच सुरेख झाला आहे....! नादिया ताईने त्याची ही कहाणी ज्यापद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे ती आपल्या हृदयाचा ठाव घेणारी नि मुळापासून हादरून सोडणारी आहे.तिच्या बालपणापासून तर आयसिसच्या कैदेतून सुटण्यापर्यतचा एकंदरीत सर्व प्रवास आपल्या या आत्मकथनात लेखिकेने शब्दबद्ध केला आहे जो वाचताना अंगावर काटा येतो.🌿 कथानकाबद्दल.... `यजिदी धर्मीय नादिया मुराद ही तरुणी आपल्या कुटुंबासोबत इराक देशातील कोचो या छोट्याश्या गावात राहत असते.जेमतेम परिस्थिती असलेलं हे कुटूंब सुखाने -प्रेमाने नांदत असतं.पण 2014 साली या गावांवर आयसिस या दहशतवादी संघटनेची वाईट नजर पडते नि एक भयंकर संकट या गावांवर येऊन कोसळतं.आयसिसचे दहशतवादी या गावातील सर्वांना एका शाळेत जमा करतात नि त्यांना जबरन इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सांगतात. जेव्हा यापैकी कोणीही धर्मांतर करायचं स्वीकार करत नाही, तेव्हा सर्वप्रथम पुरुषांना वेगळं करून एका ट्रक मध्ये भरून नेल्या जातं नि गोळ्यांनी ठार केल्या जातं.`यामध्ये नादियाचे 6 भाऊ बळी पडतात.यानंतर वृद्ध नि तरुण स्त्रियांना वेगवेगळ करून `वृद्ध स्त्रियांना` सुद्धा ठार केल्या जातं(यामध्ये नादियाच्या आईचा समावेश असतो) आणि तरुणींना `सेक्स वर्कर`म्हणून विकल्या जातं.यामध्ये नादिया मुराद, तिच्या बहिणी, तिची वहिनी या सर्वांची लैंगिक गुलाम म्हणून विक्री होते. येथूनच नादियाच्या खडतर नि भयानक प्रवासाला सुरुवात होते. तिच्यावर आयसिसच्या वेगवेगळ्या नराधमाकडून सतत बलात्कार केल्या जाते,क्रूर अत्याचार केल्या जातात,मारहाण करून तिला भयंकर त्रास दिल्या जातो.तिने वर्णन केलेलं हे सर्व वाचताना गहिवरून येतं,डोकं सुन्न व्हायला होतं,पुढे वाचण्याची हिम्मत होतं नाही एवढं त्रासदायक हा प्रवास आहे.आपल्याला वाचताना कष्ट जाणवतात तर लेखिकेने हे सर्वकाही भोगलं आहे हा विचार करून जीव कासावीस होऊन जातो.... नादिया ताईची खरेदी विक्री नि तिच्यावर सारख्या अत्याचाराची मालिका सुरूच राहते.पण इतकं सगळं सोसूनही लेखिका मोडून पडतं नाही किंवा शरण जातं नाही.आपले पळून जाण्याचे प्रयत्न ती सुरू ठेवते आणि एकेवेळी ती त्यात ती यशस्वी होते.एका सुन्नी मुस्लिम कुटुंबीयांच्या मदतीने ती मोठ्या जोखमीने`कुर्दीस्थानात` पोहोचते.🌿 अवघ्या 21 व्या वर्षी हे सगळं वाट्याला आलेली नादिया मुराद या अत्याचारातून सुटली व आपल्यावर झालेले अन्याय तिनं जगाला सांगितले.आता नादिया ताई मानवाधिकार चळवळीतली एक अग्रगण्य कार्यकर्ती म्हणून ओळखली जाते. यजिदी समाज, त्यांचा धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी ती काम करते.या सर्व लढ्याची व तिच्या संघर्षाची दखल जगाने घेतली नि तिला `2018 चा नोबेल शांतता पुरस्कार`देऊन तिचा सन्मान केला. द लास्ट गर्ल या आत्मकथनात ` नादिया ताई` म्हणते.... मला माझ्यावर बलात्कार करणाऱ्या माणसांच्या नजरेला नजर द्यायची आहे आणि त्यांना न्यायव्यवस्थेसमोर उभं केलेलं पाहायचं आहे आणि बाकी कशाहीपेक्षा, कुणाचीही कहाणी माझ्यासारखी असू नये, अशी माझी इच्छा आहे... अशी कहाणी असलेली मी जगातली शेवटचीच मुलगी असावे... द लास्ट गर्ल...! नि खरोखरच आपण असं कधीही,कोणासोबतही होऊ नये आणि ताईचे हे शब्द खरे ठरो यासाठी प्रार्थना करूया...! नक्की नक्की वाचा...! ...Read more

  • Rating StarSandeep balasaheb patil

    खरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्रबळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more

  • Rating StarKavita Jadhav

    आपल्या ग्रुपवर कोणीतरी हे पुस्तक वाचण्यासाठी सुचविले होते त्यांचे धन्यवाद.🙏 *द लास्ट गर्ल - नादिया मुराद (2018 नोबेल शांतता पुरस्कार विजेती, संयुक्त राष्ट्र संघाची पहिली सदिच्छादूत, इस्लामिक स्टेटला वंशहत्या आणि मानवताविरोधी गुन्ह्यांसाठी आंतररष्ट्रीय अपराध न्यायालयासमोर उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.)* 2014 साली जेव्हा आयसिस ने "यजिदी" इराक-सिंजर- कोचोवर निव्वळ अल्पसंख्याक आणि आपल्या धर्मा व्यतिरिक्त अन्य धर्माच्या लोकांच्या वेगळ्या श्रद्धा मान्य नसण्याच्या कारणाने हल्ला करून संपुर्ण गाव, कुटुंब, नाती, घरं, शेती उद्ध्वस्त केली. तिच्या भावांसह आईला मारून टाकलं. गावातल्या सगळ्या पुरुषांना मारून, तरुण मुलींना "सबिय्या" केलं. संपूर्ण इराकभर त्यांना एका कडून दुसऱ्याकडे विकलं. मानसिक, शारीरिक, लैंगिक आत्याचार केले. मोसुल- इस्लामिक स्टेट, सुन्नी मुस्लिम कुटुंबाने जीवावर उदार होवुन तिची सुटका करण्यात तिला मदत केली. ती संपुर्ण घटना पुस्तकामध्ये आहे. तिच्यावर झालेले अत्याचार परत कुणावरही होऊ नये, असे आत्याचार झालेली ती शेवटची असावी म्हणून "द लास्ट गर्ल" पुस्तक वाचताना देशातल्या लोकशाहीचे महत्त्व कळते. पुस्तक वाचल्यावर आत्याचाराची दाहकता समजते, सगळी घटना डोळ्यासमोर उभी रहाते. अगदी अलीकडच्या काळातील ही घटना आहे. धर्माच्याआड दुसऱ्यावर आत्याचार करून, "आमचाच धर्म कित्ती चांगला सांगणं" मनाला पटत नाही. "माणुसकी" हाच धर्म आहे. आपण आपल्या धार्मिक अस्मिता गोंजारण्याआधी हे पुस्तक नक्कीच वाचल पाहिजे. ...Read more

  • Rating StarChandrakant Kavathekar

    आयसिसच्या अनन्वित अत्याचारांची सुन्न करणारी कहाणी

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more