* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE LAST GIRL
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789353173227
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 324
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE LAST GIRL: MY STORY OF CAPTIVITY, AND MY FIGHT AGAINST THE ISLAMIC STATE IS AN AUTOBIOGRAPHICAL BOOK BY NADIA MURAD IN WHICH SHE DESCRIBES HOW SHE WAS CAPTURED AND ENSLAVED BY THE ISLAMIC STATE DURING THE SECOND IRAQI CIVIL WAR. THE BOOK EVENTUALLY LED TO THE 2018 NOBEL PEACE PRIZE BEING AWARDED TO MURAD.
नोबेल शांतता पुरस्कार विजेतीची कहाणी़...नादिया मुराद ही अत्यंत धाडसी यजिदी तरुणी आहे. तिनं इसिसची लैंगिक गुलामगिरी सोसली आहे. तिनं कल्पनातीत यातना आणि अपमान भोगला आहे. नादियाच्या सहा भावांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यानंतर काही काळातच, तिच्या आईलाही ठार मारण्यात आलं. त्यांचे मृतदेह सामूहिक कबरींत लोटण्यात आले...पण तिनं लढा दिला...इराकमधील तिचे बालपणीचे शांततामय दिवस... घरच्यांचा कायमचा वियोग आणि अमानुषतेचा सामना... ते जर्मनीत लाभलेली सुरक्षितता यादरम्यानचा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.

No Records Found
No Records Found
Keywords
# द लास्ट गर्ल # नादियामुराद # जेन्नाक्रेजस्की #सुप्रिया वकील #नोबेलशांततापुरस्कार #आयसिस #NOBELPRIZE #THELASTGIRL #NADIAMURAD #SUPRIYAVAKIL #MEEMALALA #YAZIDI #IRAQ #ISLAMIKSTATES
Customer Reviews
  • Rating StarSandeep balasaheb patil

    खरच अंगावर काटा आणणारे हे पुस्तक आहे . नादियाची will power खूप मजबूत होती . तिची इच्छा शक्ती प्रबळ होती . मृत्यू च्या जबड्यात असतानाही संयमाने स्वताची सुटका करून घेतली.नादिया ने आपल सर्वस्व गमावल कुटूंब गमावलं डोळयादेखत सगळ्याची राख रांगोळी झाली . यावर नादिया ने मात केली . Hats off नादिया . ...Read more

  • Rating StarKavita Jadhav

    आपल्या ग्रुपवर कोणीतरी हे पुस्तक वाचण्यासाठी सुचविले होते त्यांचे धन्यवाद.🙏 *द लास्ट गर्ल - नादिया मुराद (2018 नोबेल शांतता पुरस्कार विजेती, संयुक्त राष्ट्र संघाची पहिली सदिच्छादूत, इस्लामिक स्टेटला वंशहत्या आणि मानवताविरोधी गुन्ह्यांसाठी आंतररष्ट्रीय अपराध न्यायालयासमोर उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.)* 2014 साली जेव्हा आयसिस ने "यजिदी" इराक-सिंजर- कोचोवर निव्वळ अल्पसंख्याक आणि आपल्या धर्मा व्यतिरिक्त अन्य धर्माच्या लोकांच्या वेगळ्या श्रद्धा मान्य नसण्याच्या कारणाने हल्ला करून संपुर्ण गाव, कुटुंब, नाती, घरं, शेती उद्ध्वस्त केली. तिच्या भावांसह आईला मारून टाकलं. गावातल्या सगळ्या पुरुषांना मारून, तरुण मुलींना "सबिय्या" केलं. संपूर्ण इराकभर त्यांना एका कडून दुसऱ्याकडे विकलं. मानसिक, शारीरिक, लैंगिक आत्याचार केले. मोसुल- इस्लामिक स्टेट, सुन्नी मुस्लिम कुटुंबाने जीवावर उदार होवुन तिची सुटका करण्यात तिला मदत केली. ती संपुर्ण घटना पुस्तकामध्ये आहे. तिच्यावर झालेले अत्याचार परत कुणावरही होऊ नये, असे आत्याचार झालेली ती शेवटची असावी म्हणून "द लास्ट गर्ल" पुस्तक वाचताना देशातल्या लोकशाहीचे महत्त्व कळते. पुस्तक वाचल्यावर आत्याचाराची दाहकता समजते, सगळी घटना डोळ्यासमोर उभी रहाते. अगदी अलीकडच्या काळातील ही घटना आहे. धर्माच्याआड दुसऱ्यावर आत्याचार करून, "आमचाच धर्म कित्ती चांगला सांगणं" मनाला पटत नाही. "माणुसकी" हाच धर्म आहे. आपण आपल्या धार्मिक अस्मिता गोंजारण्याआधी हे पुस्तक नक्कीच वाचल पाहिजे. ...Read more

  • Rating StarChandrakant Kavathekar

    आयसिसच्या अनन्वित अत्याचारांची सुन्न करणारी कहाणी

  • Rating StarAarti Paranjape

    द लास्ट गर्ल हि कहाणी आहे नादिया मुराद ची_इराक मधल्या एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या मुलीची_ एका धाडसी यजिदी तरुणीची. तिला इसिसन लैंगिक गुलाम म्हणून वापरलं, असंख्य सामूहिक अत्याचार केले, तिची आई आणि सहा भावांना एकाच वेळी ठार केलं, तरीही ती हरली नाी, थकली नाही._ ती लढली_ हि कहाणी आहे तिच्या इस्लामिक स्टेट विरुद्धच्या लढ्याची, संघर्षाची! नादिया च्या कहाणीवर *on her shoulders* हा माहितीपट बनवण्यात आला असून ती संयुक्त राष्ट्र संघाची पहिली सदीच्छा दूत आहे. (For the dignity of Survivor of human trafficking) 1950 च्या दशकात भटके यजिदी शेतकरी आणि मेंढपाळ, सुन्नी ,अरब शेतकऱ्यांच्या कोचो या खेड्यात स्थायिक झाले .नादिया च्या खऱ्या कहाणीची सुरुवात होते २०१४ सालापासून. त्यावेळी नदिया उत्तर इराक मधील कोचो नामक एका छोट्याशा खेड्यात हायस्कूलमध्ये शिकत असते.२०१४ पासून येथील यजिदिना इसिस कडून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणि धमक्या येऊ लागतात. पुस्तकाच्या सुरुवातीला नादिया भूतकाळात जाऊन इराकमधील तिचे बालपणीचे शांततामय जीवन, तिचे कुटुंब,तिची शाळा, तिचे गाव आणि समाज यासंबंधी भरभरून बोलते .त्यातून तिचे तिच्या कुटुंबावरील प्रेम ,आई, भाऊ, बहीण, मैत्रीण यांच्याशी असलेले घट्ट ऋणानुबंध उलगडत जातात ,तसेच तिचा यजिदी धर्म, कुर्दिष मातृभाषा आणि कोचो हे खेडे या सर्वांवर असलेले निस्सीम प्रेम आणि अभिमान ही दिसून येतो. इतर सगळ्याच तरुण मुलीं प्रमाणे नादिया आणि तिच्या भाचीला सुंदर दिसायचं असतं .त्या लहानशा खेड्यात राहून सुद्धा नवनवीन फॅशनची वेशभूषा, केशभूषा आत्मसात करण्याचा त्यांचा सततचा नाद असतो .पुढे जाऊन एक छानस ब्युटी पार्लर उघडण्याच त्यांचं स्वप्न असतं. पण जुलै ऑगस्ट च्या दरम्यान त्यांच्या गावाला इसिस चा वेढा पडतो आणि त्यांना नजर कैद केलं जात.अखेर 12 ऑगस्टला त्यांना निर्वाणीचा इशारा देऊन शरण येण्यास सांगितलं जातं. त्यानंतर सगळ्यांना एका शाळेत एकत्र करून स्त्री-पुरुषांना वयाप्रमाणे वेगळे करण्यात येतं. सर्व तरुण स्त्रियांना एकत्र करून वेगवेगळ्या बसेसमधून नेण्यात येत आणि सर्व पुरुषांना आणि प्रौढ स्त्रियांना रांगेत उभं करून सरळ गोळ्या घालण्यात येतात. नादिया आणि तिच्या मैत्रिणी असहाय्यपणे बसच्या खिडक्यांमधून हे सगळं पहात राहतात.त्यात नादीयाचे सहा भाऊ आणि आई मारले जातात. नादिया व काही मुलींना एका बसमधून इस्लामिक स्टेट ची राजधानी मोसुल येथे नेण्यात येत आणि त्यानंतर सुरू होते त्यांची लैंगिक गुलामगिरी. एका मालकाकडून दुसऱ्या मालकाकडे विकल्या जाण्याची साखळी. सतत होणारी उपासमार, छळ ,मारहाण, सिगारेटचे चटके आणि पळून जाण्याचा प्रयत्न करता शिक्षा म्हणून होणारा सामूहिक अत्याचार. हे सगळं वर्णन च अत्यंत भयावह, बिभत्स आणि अंगावर शहारे आणणारे आहे. केवळ नादीयाच नाही तर तिच्या बहिणी, तिच्या मैत्रिणी या सर्वच या अत्याचारांना सामोरे जात होत्या. आपण ज्याची कल्पनाही कधी करत नाही ते या सगळ्या कोवळ्या मुलींबरोबर वास्तवात घडत होतं हे वाचून मन अक्षरशः सुन्न होतं .या सर्व मुलींवर त्या पळून जाऊ नये म्हणून सतत बंदुकधारी पहारा असे.तरीही काहीजणी पळून जाण्याचा प्रयत्न करीत आणि एकतर घोर अत्याचारांना सामोरे जात किंवा आपला जीव गमवीत. नादिया सांगते त्यांना कोंडून ठेवलेल्या अनेक खोल्यांच्या आणि स्नानगृहाच्या भिंती रक्ताळलेल्या असत. अत्याचारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी अनेक तरुणींनी केलेल्या बलिदानाच्या त्या खुणा च. नादिया निश्चय करते, ती हरणार नाही, आत्महत्या ही करणार नाही, तर स्वतःची सुटका करून घेऊन इसिस चा हा क्रूर चेहरा जगासमोर आणील. ____आणि शेवटी तो दिवस येतो. संधी मिळताच चुकून उघड्या राहिलेल्या दारातून नादिया निसटते आणि एका सुन्नी मुस्लिम कुटुंबाच्या घरात आश्रयाला जाते .ती माणसं सज्जन असतात व तिला मदत करण्याचे आश्वासन देतात आणि काही दिवस तिला आपल्या घरात लपवून ठेवतात. त्यानंतर सुरु होतो तीचा परतीचा प्रवास, त्या कुटुंबातील नसिर नावाच्या मुलाबरोबर. नसिरची बायको म्हणून बनावट कागदपत्रे तयार केले जातात व बायकोला माहेरी पोचवण्याच्या बहाण्याने नासिर तिला त्या क्षेत्राच्या बाहेर काढण्यात यशस्वी होतो. रस्त्यात येणारे अनेक अडथळे, त्यावेळची नादियाची भयभीत मनस्थिती, अशा परिस्थितीत नासिर ने तिला दिलेला मानसिक आधार आणि दिलासा हे सगळेच मनाला स्पर्श करते.तिचे आणि नसीरचे एक वेगळेच भावविश्व तयार होते, एक आगळेवेगळे मैत्र! आपल्या या जगावेगळ्या मित्रा च्या सुरक्षेसाठी त्याचा नादिया ला नेहमीसाठी निरोप घ्यावा लागतो. त्याप्रसंगी आपले सुद्धा हृदय पिळवटून निघते. अखेर आपल्या हेझनी या वाचलेल्या भावापर्यंत नादिया पोहोचते .त्यानंतर तिच्या दोन बहिणी व वहिनी पण स्वतःची सुटका करून घेऊन परत येतात.त्यांच्या सूटकेच्या पण अंगावर शहारे आणणार्‍या कहाण्या आहेत. नादिया चा भाऊ ,भाचा व इतर काही वाचलेले पुरुष तस्करांच्या मदतीने आपल्या गावातील स्त्रियांना सोडवण्यासाठी प्रयत्नांची जी पराकाष्ठा करतात तिला खरंच तोड नाही. अखेर सर्वजण निर्वासितांच्या छावणीत आश्रय घेतात. कॉम्रेड मुक्ता मनोहर म्हणतात, वांशिक दंगलींचे उद्दिष्ट जेव्हा एखाद्या जमातीचं निर्वशीकरण करणं हे असतं तेव्हा तेव्हा अटळपणे स्त्रीयांवर बलात्कार केले जातात. नादिया आणि तिच्या मैत्रिणींच्या बाबतीत हेच घडलं. पण त्यांच्या बाबतीतील एक सुखावह बाब म्हणजे त्यांच्या धर्माने ,समाजाने त्यांना पुन्हा स्वीकारलं. जे घडल त्यात या स्त्रियांची कोणतीही चूक नव्हती .त्यामुळे हा एक अपघात समजून त्यांना पुन्हा सन्मानाने समाजात सामावून घेतल्या गेलं. त्यासाठी त्यांच्या धर्मगुरूंनी समाजाचे केलेले समुपदेशन खूपच कौतुकास्पद आहे. किती उदात्त दृष्टीकोण! समाजाच्या पुनरुज्जीवनासाठी घेतलेला एक अभूतपूर्व निर्णय! पण या सगळ्या स्त्रियांचा संघर्ष इथेच संपत नाही.शरीराबरोबरच मनाचेही खच्चीकरण झालेल्या या स्त्रिया सैरभैर होतात. कित्येक जणी तर पुन्हा वर्जीन होण्यासाठी शस्त्रक्रिया सुद्धा करून घेतात .त्यांच्या या केविलवाण्या अवस्थेला कारणीभूत ठरलेल्या हैवानान विरुद्ध नादिया पेटून उठते आणि त्यांचा क्रूर चेहरा जगासमोर आणण्याचा तिचा निश्चय आणखीनच ठाम होतो. दरम्यान नादिया ला निसरिन नावाची सामाजिक कार्यकरती भेटते. तिच्याबरोबर नादिया नोव्हेंबर 2015 मध्ये स्विझर्लंडला जाते आणि संयुक्त राष्ट्र संघासमोर स्वतःची रक्तरंजित कहाणी सांगते. त्यात शेवटी ती म्हणते की अशी कहाणी असलेली मी जगातली शेवटचीच मुलगी असावे *द लास्ट गर्ल*. ती म्हणते, *I want to be the last girl in the world with a story like mine*. नादिया ला आता एक वकील मिळाली आहे जी या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात केस दाखल करेल. मला व्यक्तीशः या सर्व स्त्रियांच्या धाडसाचे खूप कौतुक वाटतं. त्यांनी मुकाटपणे जुलूम सहन न करता प्रतिकार केला, आत्महत्या न करता स्वतःची सुटका करून घेतली आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. नादिया ने तिचा आवाज तर मिळवला आहेच शिवाय ती या नरसंहारचा बळी ठरलेल्या प्रत्येक यजिदीचा आवाज बनली आहे. कोणीही क्रौर्याने तिचा आवाज आता दाबून टाकू शकत नाही. आता ती यजिदिंसाठी काम करणाऱ्या *यजदा* या संस्थेची कार्यकर्ती आहे.ठीक ठिकाणच्या भाषणातून ती तिची कहाणी जगाला सांगत असते. ती म्हणते ,माझी आगळी वेगळी कहाणी हेच माझं अमोघ शस्त्र आहे. मला माझ्यावर बलात्कार करणाऱ्या माणसानच्या नजरेला नजर द्यायची आहे. त्यांना न्याय व्यवस्थे समोर उभं केलेलं पाहायचं आहे. हे पुस्तक वाचताना आणि वाचून झाल्यावर सुद्धा बरेच दिवस मी खूप अस्वस्थ होते. आपण किती सुरक्षित समाजात राहतो .जणू त्यांच जग हे आपलं जग नाहीच .भारतात राहून भारताविरुद्ध च कोल्हेकुई करणाऱ्या काही मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार हे पुस्तक .असुरक्षित ता म्हणजे काय हे अशा मंडळींना हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच समजेल. मला स्वतःला एक स्त्री म्हणून नादिया च्या धाडसाच खूप कौतुक वाटतं आणि आपण एका सुरक्षित देशात जन्माला आल्याबद्दल आपल्या देशाविषयी अभिमान! शेवटी *मेरा भारत महान!* हेच खरे! 🇮🇳🇮🇳🇮🇳 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more