* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOD WHO WALKED ON EARTH
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177663594
  • Edition : 6
  • Publishing Year : SEPTEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHO WAS SAI BABA? FROM WHERE DID HE COME? WHAT WAS HIS MESSAGE? HOW COME THOUSANDS OF PEOPLE STARTED FOLLOWING AND WORSHIPPING HIM WHILE CONSIDERING HIM TO BE DIVINE? WHO WERE HIS DISCIPLES? HOW WERE THEY ATTRACTED TOWARDS HIM? WHAT DO HIS DEVOTEES THINK ABOUT HIS VISIONS? WHAT ARE THE FEELINGS OF HIS DEVOTEES WHO EXPERIENCED HIM HELPING THEM IN THEIR BAD DAYS BEFORE AND AFTER HIS TAKING `SAMADHI`? SAI BABA WAS A LIVING LEGEND. THIS BIOGRAPHY GIVES ANSWERS TO ALL THE QUESTIONS ARISING IN OUR MINDS ABOUT HIM. HE CAPTIVATED THE MINDS OF THOUSANDS OF PEOPLE DEVOID OF THEIR STANDARD, CASTE, RELIGION, CULTURE AND SOCIAL STATUS. HIS DEVOTEES ARE NOT JUST THE ILLITERATE AND UNCOUTH BUT THE HI-FI AND THE HIGHLY INTELLECTUAL ARE ALSO AMONG HIS DEVOTEES. MUCH HAS BEEN WRITTEN ABOUT SAI BABA OF SHIRDI. THEN WHAT IS SPECIAL ABOUT THIS BOOK? IT IS FOR THE FIRST TIME THAT HIS LIFE IS DESCRIBED IN A RELEVANT AND MATTER OF FACT MANNER. THE STYLE MAINTAINS A FLOW WITH IMMACULATE DESCRIPTION OF HIS DOCTRINES AND HIS LIFE-STYLE. THIS IS A STORY OF A SIMPLE MAN, A FAKIR, WHO CAME TO SHIRDI. HE WAS MUCH TROUBLED BY THE CHILDREN; HE WAS A SUBJECT OF RIDICULE FOR THE VILLAGERS. BUT AT LAST, HE WAS THE ONE WHO CONQUERED SHIRDI IN A SPIRITUALISTIC WAY. HE BECAME THE LIVING SUPREME SPIRIT ON THIS EARTH. EVERY DEVOTEE WOULD WANT TO HAVE THIS BOOK WITH HIM AS IT IS THE BIBLE OF THE DOCTRINES BY SAI BABA. THROUGH THIS BOOK, LET US REMEMBER THE SUPREME SPIRIT WHO HAS BEEN ESTABLISHED TODAY IN MILLIONS OF HOUSEHOLDS.
साईबाबा कोण होते? ते कुठून आले? त्यांचा संदेश कोणता? त्यांना साक्षात परमेश्वर मानून असंख्य लोक त्यांची जी पूजा करू लागले, ती का आणि कशी? त्यांचे शिष्य तरी कोण? आणि हे शिष्य त्यांच्याकडे कशामुळे आकर्षित झाले? देशभर पसरलेल्या त्यांच्या लक्षावधी भक्तांना त्यांच्या लीलांविषयी नक्की काय वाटते? समाधीपूर्वी आणि समाधीनंतरसुद्धा आपल्या भक्तांच्या संकटकाळात बाबांनी त्यांना जो दिलासा दिला व जो करुणेचा वर्षाव त्यांच्यावर केला त्याविषयी त्यांच्या भक्तांच्या काय भावना आहेत? त्या चालत्या-बोलत्या ईश्वराविषयी आपल्या मनात उभ्या राहणाNया अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या चरित्राद्वारे आपल्याला मिळतात. जीवनातील सर्व स्तरांमधील असंख्य लोकांची मने त्या महात्म्याने काबीज केली आणि त्यांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. त्यांच्या भक्तांमध्ये गरीब होते, तसेच श्रीमंतही होते. विद्वान जसे होते; तसेच अशिक्षित, अडाणीसुद्धा होते. शिरडीच्या साईबाबांविषयी आजवर अनेकांनी अनेक पुस्तके लिहिली. पण त्या सर्वांपेक्षा हे पुस्तक निराळे आहे. साईबाबांच्या जीवनकालखंडाचे अत्यंत सुसूत्र, सुसंगत आणि वस्तुनिष्ठ वर्णन अशा प्रकारे प्रथमच लिहिले गेले आहे. तेही अत्यंत प्रवाही व प्रासादिक शैलीमध्ये. बाबांची तत्त्वे व त्यांचे जीवन याविषयीचे सर्व तपशील याचे अत्यंत नेटके रेखाटन यात आहे. शिरडीस आलेल्या एका माणसाची, एका ‘फकिरा’ची ही मनोवेधक कहाणी आहे. याला मुलांनी खोड्या काढून सतावलं, गावक-यांनी याची हेटाळणी केली. आणि त्याने पुढे त्रिकालाबाधित महात्मा होऊन सा-या आध्यात्मिक जगतावर अधिराज्य गाजवलं. या भूतलावर चालणारा तो साक्षात परमात्मा झाला. हे पुस्तक प्रत्येक साईभक्ताला संग्रही ठेवावेसे वाटेल. बाबांनी केलेल्या उपदेशाचे हे जणू बायबलच आहे. देशातील कोट्यवधी लोकांच्या घरांमधील देवघरे ज्या महात्म्याच्या तसबिरींनी सुशोभित झाली आहेत, त्या महात्म्याचे हे पुण्यस्मरण आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #RANGASWAMI PARTHASARATHY #लीना सोहोनी #LEENASOHONI #देव जो भूवरी चालिला : साईबाबा #GOD WHO WALKED ON EARTH #DEV JO BHUVARI CHALILA
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more