* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9789395477154
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2023
  • Weight : 180.00 gms
  • Pages : 196
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :LAXMAN MANE COMBO SET - 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK WAS COMPILED AND EDITED ON THE OCCASION OF THE DIAMOND JUBILEE BIRTHDAY OF AUTHOR LAXMAN MANE. IT CONTAINS ARTICLES WRITTEN BY HIS COLLEAGUES WHO SUPPORTED MANE IN THE MOVEMENT FROM HIS YOUTH TILL TODAY. EVEN IF YOU GLANCE AT THESE ARTICLES, YOU WILL NOTICE HOW LAXMAN MANE HAD A WIDE CIRCLE OF FRIENDS. IT CAN ALSO BE SEEN THAT HIS WRITING DID NOT STOP EVEN AFTER ENDURING SOCIAL HARDSHIPS. HIS DISTINGUISHED COLLEAGUES SUCH AS DR. BABA ADHAV, DR. JANARDHAN WAGHMARE, ARUN KHORE, PROF. RAMNATH CHAVAN, NARAYAN JAVALIKAR, DR. EKNATH AWHAD, DR. JAISINGRAO PAWAR, ALONG WITH WIFE SHASHI MANE, HAVE CONTRIBUTED TO THIS BOOK. RECOLLECTIONS OF THE CRUSADES, MARCHES AND STRUGGLES MADE TO UNITE THE NOMADIC TRIBES AND SINCERE EFFORTS TO BRING THEM INTO THE MAINSTREAM OF SOCIETY ARE SHARED IN THESE WRITE-UPS. ALSO, IT IS EVIDENT THAT MANE WISHES TO ENRICH THE LIVES OF PEOPLE BY INVOKING THE HUMANITY IN THEM.
उपराकार लक्ष्मण माने यांच्या षष्ठब्दीपूर्ती निमित्त संपादन केलेला हा गौरवग्रंथ. यात माने यांना अगदी तरुणपणापासून ते आजतागायत ज्या ज्या सहकाऱ्यांनी चळवळीत साथ दिली, त्या लोकांनी लिहिलेले लेख आहेत. यातील लेखांवर सहज नजर फिरवली तरी लक्ष्मण माने यांचा स्नेहीमंडळींचा गोतावळा कसा विस्तृत होता, हे लक्षात येते. तसेच सामाजिक किटाळ सहन करूनही त्यांची लेखणी थांबली नाही, हेही दृष्टीस पडते. डॉ. बाबा आढाव, खा. डॉ. जनार्दन वाघमारे, अरुण खोरे, प्रा. रामनाथ चव्हाण, नारायण जावलीकर, डॉ. एकनाथ आव्हाड, डॉ. जयसिंगराव पवार या मान्यवर सहकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी शशी माने यांचा लेखही यात आहे. भटक्या विमुक्त लोकांना एकत्रित करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या चळवळी, मोर्चे, संघर्ष त्यातला सच्चेपणा याला उजाळा देणाऱ्या आठवणी यांत पाहायला मिळतात. तसेच प्रत्येकाच्या जीवनजाणिवा समृद्ध करून मानवता निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास आहे, हे दिसून येते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#रेषेपलीकडील लक्ष्मण #लक्ष्मण माने # लेखसंग्रह #आठवणी#मेहता पब्लिशिंग हाऊस#मराठी साहित्य #मराठी पुस्तके #RESHEPALIKADIL LAXMAN #LAXMAN MANE #MEHTA PUBLISHING HOUSE #ARTICLES #MARATHI LITERATURE # MARATHI BOOKS
Customer Reviews
  • Rating Starदैनिक लोकमत

    रेषेपलीकडील लक्ष्मण उपराकार लक्ष्मण माने यांच्या षष्ट्यब्दीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे `रेषेपलीकडील लक्ष्मण हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केले आहे. डॉ. यशवंत मनोहर आणि डॉ. रावसाहेब कसबे यांनी या पुस्तकाचे संपादन केले असू, याची पृष्ठसंख्या १८२ आहे. भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी देहभान हरपून काम करणाऱ्या लक्ष्मण माने यांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद या पुस्तकात घेण्यात आली आहे. माजी कुलगुरू, खासदार, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. बाबा आढाव, डॉ. जयसिंगराव पवार, अॅड. एकनाथ आव्हाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींनी लक्ष्मण माने यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे. याला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा अभिप्राय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more