* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353174057
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HOW SO EVER ONE TRIES TO FATHOM THE FACTS OF LIFE WHICH ARE NORMALLY UNSEEN AND YET ACTIVE BEHIND ARE UNREACHABLE.WE ENDEAVOUR TO UNDERSTAND THEM AND TRY TO ANALYSE THEM STILL THEY REMAIN A MYSTERY.WE TEND TO LABEL THEM AS SUPERNATURAL.MAY THESE BE EVENTS, PERSONS OR ATTITUDES WE DO COME ACROSS THEM IN OUR ROUTINE. THIS BOOK IS A COLLECTION OF STORIES FROM DIFFERENT WALKS OF LIFE OF VARIED CHARACTERS AND EVENTS VIVIDLY PORTRAYED BY DR CHHAYA MAHAJAN THE READER WILL REALISE THIS UNSEEN AND UNHEARD IN THE MINGLED YEARN
बऱ्या-वाईट अनुभवांचं आणि व्यक्तींचं व्यामिश्र चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘अज्ञात.’ माणसाची नियतीशरणता अधोरेखित करते ‘अज्ञात’ ही कथा... तर एका वृद्धाच्या मनातील भावकल्लोळ व्यक्त होतो ‘पत्र आलंय’ या कथेतून... शेतमजुराची व्यथा सांगते ‘मोकळं आकाश’ही कथा... तर एका कुष्ठरोग्याचं आक्रंदन टिपते ‘वास्तव’ ही कथा...एका वृद्ध आईच्या चिंतनरूपी भावना प्रकटतात ‘सावलीचा दाह’मधून. सूक्ष्म भावनांचं अस्वस्थ करणारं कथाविश्व.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #अज्ञात #छायामहाजन #व्हेटो #गुंजाइश #खिरपेंड #चारीभुरी #सावलीचा #दाह #मॉब #कैदाशीण #सुरास्त #वेदना #चिरेबंदी #पायरवदेवडी #पेव #धडपा #लाघवट #फोपशा #खवट #पायला #बेरकी #इरसाल #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #ADNYAT #CHHAYAMAHAJAN #VETO #GUNJAESH #KHIRPEND #CHARIBHURI #SAVLICHA #DAH #MOB #KAIDASHIN #SURASTA #VEDANA #CHIREBANDI #PAYARVDEVDI #PEV#DHADAPA #LAGHVAT #PHOPASHA #KHAVAT #PAYAL #BERAKI #ERASAL
Customer Reviews
  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स

    अज्ञात..... एक विस्तृत परीघ ..... डॉ. छाया महाजन ह्यांचा नवा कथासंग्रह वाचनात आला. वाचक कितीही सर्वश्रुत असला, सर्वज्ञानी मानला, तरीही मानवी मनाचे अनेक कंगोरे/विषय त्याला अज्ञातच राहतात. `असं का व्हावं ह्या प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नसतं अशया अनेक जाणिवांना, विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा, ह्या कथा संग्रहात आहेत. काही कथांचे विषय जरी पूर्वी इतर लेखकांच्या कथांमधून वाचनात आलेले असले तरी लेखिकेचा असा स्वतःचा दृष्टीकोन, त्या कथांना `स्पेशल` करून टाकतो. `सावलीचा दाह` कथेतील वृद्ध आईच्या वाट्याला सून-मुलांकडून येणारी त्रयस्थ-तिरस्कृत वागणूक अनेकदा कथांमध्ये येऊन गेली असली तरी छायाताईंनी, मुलानं विचारलेल्या `परतफेडीला एनी लिमिट?` ह्या प्रश्नावर काढलेला तोडगा , वेगळा व स्पेशल आहे. `प्रत्येकाचा भोग व प्रारब्ध वेगळं, जे ज्याचं त्यालाच भोगू द्यावं` - हे गुरूंनी सांगितलेलं वाचन तिला संसाराच्या मायेतून अचानकपणे मोकळं करतं, मुक्त करतं ती कुठेहि जायला राहायला तयार होते. `निचरा` मधील देवदासींच्या मुलगी मोठी कलावंत होते, पण आपल्या भूतकाळापासून तिला फारकत घेता येत नाही. `भूतकाळाची लाज वाटू द्यायची नाही` गोष्टी सोप्या होतात,` हा उपाय कथेतील रामबाण ठरवत. उत्कृष्ट उतरलीये ती `वेदना चिरेबंदी` घरातल्या विधवा सुनेचा उपभोग , घरातल्याच जेष्टांनी घेणं, ह्या एके काळच्या परिस्थितीवर खूप लिखाणं झालं. पण छायाताईंनी त्या कथेत रंगवलेलं दुर्दैवं व वेदना, सबंध कथाभर वाचकांच्या मनाच्या चिंध्या करत राहत. `अज्ञात` कथेतला भविष्य सांगणारा पोपट `पत्र आलंय` मधला परदेशातल्या मुलाचं `येऊ नका म्हणणारं पत्र लपवणार बाप `सूरास्त` मधील शेजाऱ्याच्या लहानग्या नोकराचे नातवांप्रमाणे लाड करणारा वृद्ध `अस्मिता` मधील कामाच्या बदल्यात उपभोग घेऊ इच्छिणाऱ्या पीचडी च्या गाईडचं गलिच्छ वास्तव , ( त्या विरुद्ध तडफेने उभी राहिलेली विद्याथीनी ) , `प्रतीक्षा` मधील नोकरी करणारी त्यामुळे मुलाच्या अपेक्षेनुसार पारंपरिक कर्तव्य पार न पाडणारी ` आई `मोकळं आकाश` मध्ये सरकारं गुंड घालून मारपीट करून जमीन काढून घेतलेला हतभागी शिवाप्पा व सगळ्यात शेवटी वास्तव घटनेवर बेतलेली कुष्ठरोग्यांवरची कथा `वास्तव` लेखिकेचे सूक्ष्म निरीक्षण शक्तीतर जाणवतेच पण स्वतःला पटतील असे निष्कर्षही त्या काढतात. ते सर्व वाचकांना पटतील , भावतील अशीही काळजी घेतात. प्रवाही भाषेत लिहिलेला , स्वतःबरोबर घेऊन जाणारा हा मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित संग्र्ह वाचून लॉकडाऊनच्या काळात आलेली मरगळ एका झटक्यात दूर झाली. म्हणून वाचकांकरता हे छोटस परीक्षण डॉ. छाया महाजन ह्यांची विद्वत्ता नाव ख्याती लेखन, सर्वच समृद्ध आहे प्राचार्य म्हणून जरी त्या रिटायर झालेल्या असल्या तरी सर्वदूर ऑनलाईन कार्यक्रम करण्यातील त्यांची तडफ जाणवण्यासारखी आहे. दरवर्षी अनेक दिवाळी अंकातून त्या वाचकांच्या भेटीला यायच्याच . आता ह्या वर्षी दिवाळी अंक कोणत्या स्वरूपात निघताहेत व त्यातून त्या आपल्या भेटीला काय आणताहेत हे बघायचं. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 03-01-2021

    अज्ञाताच्या शोधाचे कथारूप... डॉ. छाया महाजन या मराठीतील महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांनी कथा, कादंबरी आणि ललितगद्य लेखनातून आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित केलेली आहे. निरनिराळ्या अनुभवांना सामावून घेणारे त्यांचे लेखण वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले आहे. मानवीजीवनाचा विविध कोनातून शोध घेत, त्यांनी जगण्याच्या अनेक मिती साहित्यातून साक्षात केलेल्या आहेत. जीवनातील व्यमिश्रता आणि अलक्षित पेचांना त्यांनी मुखरित केला आहे. रूढ अर्थाने त्या स्त्रीवादी लेखिका नाहीत, परंतु भारतीय अवकाशात स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या दु:ख भोगाची अनेकविध रूपे त्यांच्या लेखनातून उजागर होतात. शमाजातील बहुस्तरीय जीवनजाणीवांना कवेत घेण्याचा प्रयत्न डॉ. महाजन यांच्या कथेने केलेला आहे. त्यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला ‘अज्ञात’ हा कथासंग्रहही याला अपवाद नाही. मानवी जीवन आणि त्यामधील आशयविश्व हे विस्तीर्ण आहे. त्याला अनेकविध संदर्भ आहेत. ते सर्वच संदर्भ साहित्यातून प्रकट करणे अशक्य आहे, तरीही केंद्रवर्ती आशयापेक्षा अलक्षित जाणीवविश्वाला प्रकट करणे, ही बाब नेहमीच साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. अशा ‘अज्ञात’ असणाऱ्या विषयांना कथारूप देण्याचा सातत्याने प्रयत्न डॉ. महाजन यांनी केलेला दिसतो. परिघाबाहेरच्या आशयाला कथेच्या कक्षेत सामावून घेणे, ही त्यांची लेखनप्रकृती आहे. हेच भान प्रस्तुत कथासंग्रहातूनही दिसते. अज्ञात, पत्र आलंय, मोकळं आकाश, वास्तव, सावलीचा दाह, निचरा, प्रतीक्षा, विस्कळित, सुरास्त, वेदना चिरेबंदी, अस्मिता अशा अकरा कथांचा समावेश या संग्रहात आहे. बेकारी, दारिद्र्य, नियती, सांस्कृतिक ताण, कौटुंबिक तणाव, नात्यातील तकलादूपणा, गुंडगिरी, भ्रष्टाचार, शेतकऱ्याची असहायता, भांडवली विकासाच्या नवप्रारूपाने सर्वसामान्य माणसांना आलेले क्षुद्रत्व, कुष्ठरोगी व्यक्तीच्या आयुष्याची शोकांतिका, वयोवृद्ध जगण्याची फरफट, देवदासींच्या वास्तव, नाचणाऱ्या स्त्रीबद्दलच्या समाजधारणा, लहान मुलांचे केले जाणारे शोषण, समाजाच्या दृष्टीने अनैतिक असणारे नातेसंबंध, अशा अनेकविध विषयांना मध्यवर्ती ठेवून या कथा आकाराला आल्या आहेत. या कथासंग्रहातील कथांमध्ये विषय-आशयाचे वैविध्य दिसते. वेगवेगळ्या समाजस्तरांच्या जाणीवा आणि वृत्ती-प्रवृत्तींना या कथांनी कवेत घेतले आहे. ही कथा बहुविध जीवनजाणिवा आणि त्यातील ताण्याबाण्यांना मुखरित करताना दिसते. या सर्वच कथा अंतर्मुख करायला लावणाऱ्या आणि मानवी वर्तन व त्या वर्तनामागील कार्यकारणभाव स्पष्ट करणाऱ्या आहेत. नागेश, अण्णा, बिरजूशेठ, शिवाप्पा, महादेव, सविता, हेमा, राजेश, रमणी यांसारखी अनेक सुष्ट-दुष्ट पात्रे आपल्या भवताली दिसणारी आहेत. त्यांचे नेमके रेखाटन डॉ. महाजन यांनी केले आहे. ही सर्व पात्रे आशयाला तोलून धरत, वास्तवाची प्रचिती देणारी आहेत. कथांच्या भाषेत प्रमाणभाषेतील वळणदारपण आहे; त्यामुळे वाचनीय सुलभताही आलेली आहे. चिंतनशीलता आणि वैचारिकता हा महत्त्वाचा गुणधर्म या कथांच्या भाषेचा आहे. मांडणीत रहस्यमयता असल्याने, ही कथा वाचकांना पकडून ठेवते. सर्वच कथांची सुरुवात उत्सुकता निर्माण करणारी आणि शेवट संदेशसूचक आहेत. निवेदन-मांडणी आणि रचनेच्या प्रयोगामुळेही हा संग्रह महत्त्वाचा ठरतो. आशय अभिव्यक्तीचे एकजीवीकरण आणि अज्ञाताच्या शोधाचे कथारूप म्हणून या कथासंग्रहाचे मोल लक्षात घेणे आवश्यक आहे. -केदार काळवणे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more