* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353174057
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :DR.CHHAYA MAHAJAN COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HOW SO EVER ONE TRIES TO FATHOM THE FACTS OF LIFE WHICH ARE NORMALLY UNSEEN AND YET ACTIVE BEHIND ARE UNREACHABLE.WE ENDEAVOUR TO UNDERSTAND THEM AND TRY TO ANALYSE THEM STILL THEY REMAIN A MYSTERY.WE TEND TO LABEL THEM AS SUPERNATURAL.MAY THESE BE EVENTS, PERSONS OR ATTITUDES WE DO COME ACROSS THEM IN OUR ROUTINE. THIS BOOK IS A COLLECTION OF STORIES FROM DIFFERENT WALKS OF LIFE OF VARIED CHARACTERS AND EVENTS VIVIDLY PORTRAYED BY DR CHHAYA MAHAJAN THE READER WILL REALISE THIS UNSEEN AND UNHEARD IN THE MINGLED YEARN
बऱ्या-वाईट अनुभवांचं आणि व्यक्तींचं व्यामिश्र चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘अज्ञात.’ माणसाची नियतीशरणता अधोरेखित करते ‘अज्ञात’ ही कथा... तर एका वृद्धाच्या मनातील भावकल्लोळ व्यक्त होतो ‘पत्र आलंय’ या कथेतून... शेतमजुराची व्यथा सांगते ‘मोकळं आकाश’ही कथा... तर एका कुष्ठरोग्याचं आक्रंदन टिपते ‘वास्तव’ ही कथा...एका वृद्ध आईच्या चिंतनरूपी भावना प्रकटतात ‘सावलीचा दाह’मधून. सूक्ष्म भावनांचं अस्वस्थ करणारं कथाविश्व.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #अज्ञात #छायामहाजन #व्हेटो #गुंजाइश #खिरपेंड #चारीभुरी #सावलीचा #दाह #मॉब #कैदाशीण #सुरास्त #वेदना #चिरेबंदी #पायरवदेवडी #पेव #धडपा #लाघवट #फोपशा #खवट #पायला #बेरकी #इरसाल #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #ADNYAT #CHHAYAMAHAJAN #VETO #GUNJAESH #KHIRPEND #CHARIBHURI #SAVLICHA #DAH #MOB #KAIDASHIN #SURASTA #VEDANA #CHIREBANDI #PAYARVDEVDI #PEV#DHADAPA #LAGHVAT #PHOPASHA #KHAVAT #PAYAL #BERAKI #ERASAL
Customer Reviews
  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स

    अज्ञात..... एक विस्तृत परीघ ..... डॉ. छाया महाजन ह्यांचा नवा कथासंग्रह वाचनात आला. वाचक कितीही सर्वश्रुत असला, सर्वज्ञानी मानला, तरीही मानवी मनाचे अनेक कंगोरे/विषय त्याला अज्ञातच राहतात. `असं का व्हावं ह्या प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नसतं अशया अनेक जाणिवांना, विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा, ह्या कथा संग्रहात आहेत. काही कथांचे विषय जरी पूर्वी इतर लेखकांच्या कथांमधून वाचनात आलेले असले तरी लेखिकेचा असा स्वतःचा दृष्टीकोन, त्या कथांना `स्पेशल` करून टाकतो. `सावलीचा दाह` कथेतील वृद्ध आईच्या वाट्याला सून-मुलांकडून येणारी त्रयस्थ-तिरस्कृत वागणूक अनेकदा कथांमध्ये येऊन गेली असली तरी छायाताईंनी, मुलानं विचारलेल्या `परतफेडीला एनी लिमिट?` ह्या प्रश्नावर काढलेला तोडगा , वेगळा व स्पेशल आहे. `प्रत्येकाचा भोग व प्रारब्ध वेगळं, जे ज्याचं त्यालाच भोगू द्यावं` - हे गुरूंनी सांगितलेलं वाचन तिला संसाराच्या मायेतून अचानकपणे मोकळं करतं, मुक्त करतं ती कुठेहि जायला राहायला तयार होते. `निचरा` मधील देवदासींच्या मुलगी मोठी कलावंत होते, पण आपल्या भूतकाळापासून तिला फारकत घेता येत नाही. `भूतकाळाची लाज वाटू द्यायची नाही` गोष्टी सोप्या होतात,` हा उपाय कथेतील रामबाण ठरवत. उत्कृष्ट उतरलीये ती `वेदना चिरेबंदी` घरातल्या विधवा सुनेचा उपभोग , घरातल्याच जेष्टांनी घेणं, ह्या एके काळच्या परिस्थितीवर खूप लिखाणं झालं. पण छायाताईंनी त्या कथेत रंगवलेलं दुर्दैवं व वेदना, सबंध कथाभर वाचकांच्या मनाच्या चिंध्या करत राहत. `अज्ञात` कथेतला भविष्य सांगणारा पोपट `पत्र आलंय` मधला परदेशातल्या मुलाचं `येऊ नका म्हणणारं पत्र लपवणार बाप `सूरास्त` मधील शेजाऱ्याच्या लहानग्या नोकराचे नातवांप्रमाणे लाड करणारा वृद्ध `अस्मिता` मधील कामाच्या बदल्यात उपभोग घेऊ इच्छिणाऱ्या पीचडी च्या गाईडचं गलिच्छ वास्तव , ( त्या विरुद्ध तडफेने उभी राहिलेली विद्याथीनी ) , `प्रतीक्षा` मधील नोकरी करणारी त्यामुळे मुलाच्या अपेक्षेनुसार पारंपरिक कर्तव्य पार न पाडणारी ` आई `मोकळं आकाश` मध्ये सरकारं गुंड घालून मारपीट करून जमीन काढून घेतलेला हतभागी शिवाप्पा व सगळ्यात शेवटी वास्तव घटनेवर बेतलेली कुष्ठरोग्यांवरची कथा `वास्तव` लेखिकेचे सूक्ष्म निरीक्षण शक्तीतर जाणवतेच पण स्वतःला पटतील असे निष्कर्षही त्या काढतात. ते सर्व वाचकांना पटतील , भावतील अशीही काळजी घेतात. प्रवाही भाषेत लिहिलेला , स्वतःबरोबर घेऊन जाणारा हा मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित संग्र्ह वाचून लॉकडाऊनच्या काळात आलेली मरगळ एका झटक्यात दूर झाली. म्हणून वाचकांकरता हे छोटस परीक्षण डॉ. छाया महाजन ह्यांची विद्वत्ता नाव ख्याती लेखन, सर्वच समृद्ध आहे प्राचार्य म्हणून जरी त्या रिटायर झालेल्या असल्या तरी सर्वदूर ऑनलाईन कार्यक्रम करण्यातील त्यांची तडफ जाणवण्यासारखी आहे. दरवर्षी अनेक दिवाळी अंकातून त्या वाचकांच्या भेटीला यायच्याच . आता ह्या वर्षी दिवाळी अंक कोणत्या स्वरूपात निघताहेत व त्यातून त्या आपल्या भेटीला काय आणताहेत हे बघायचं. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 03-01-2021

    अज्ञाताच्या शोधाचे कथारूप... डॉ. छाया महाजन या मराठीतील महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांनी कथा, कादंबरी आणि ललितगद्य लेखनातून आपली स्वतंत्र शैली प्रस्थापित केलेली आहे. निरनिराळ्या अनुभवांना सामावून घेणारे त्यांचे लेखण वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले आहे. मानवीजीवनाचा विविध कोनातून शोध घेत, त्यांनी जगण्याच्या अनेक मिती साहित्यातून साक्षात केलेल्या आहेत. जीवनातील व्यमिश्रता आणि अलक्षित पेचांना त्यांनी मुखरित केला आहे. रूढ अर्थाने त्या स्त्रीवादी लेखिका नाहीत, परंतु भारतीय अवकाशात स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या दु:ख भोगाची अनेकविध रूपे त्यांच्या लेखनातून उजागर होतात. शमाजातील बहुस्तरीय जीवनजाणीवांना कवेत घेण्याचा प्रयत्न डॉ. महाजन यांच्या कथेने केलेला आहे. त्यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला ‘अज्ञात’ हा कथासंग्रहही याला अपवाद नाही. मानवी जीवन आणि त्यामधील आशयविश्व हे विस्तीर्ण आहे. त्याला अनेकविध संदर्भ आहेत. ते सर्वच संदर्भ साहित्यातून प्रकट करणे अशक्य आहे, तरीही केंद्रवर्ती आशयापेक्षा अलक्षित जाणीवविश्वाला प्रकट करणे, ही बाब नेहमीच साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. अशा ‘अज्ञात’ असणाऱ्या विषयांना कथारूप देण्याचा सातत्याने प्रयत्न डॉ. महाजन यांनी केलेला दिसतो. परिघाबाहेरच्या आशयाला कथेच्या कक्षेत सामावून घेणे, ही त्यांची लेखनप्रकृती आहे. हेच भान प्रस्तुत कथासंग्रहातूनही दिसते. अज्ञात, पत्र आलंय, मोकळं आकाश, वास्तव, सावलीचा दाह, निचरा, प्रतीक्षा, विस्कळित, सुरास्त, वेदना चिरेबंदी, अस्मिता अशा अकरा कथांचा समावेश या संग्रहात आहे. बेकारी, दारिद्र्य, नियती, सांस्कृतिक ताण, कौटुंबिक तणाव, नात्यातील तकलादूपणा, गुंडगिरी, भ्रष्टाचार, शेतकऱ्याची असहायता, भांडवली विकासाच्या नवप्रारूपाने सर्वसामान्य माणसांना आलेले क्षुद्रत्व, कुष्ठरोगी व्यक्तीच्या आयुष्याची शोकांतिका, वयोवृद्ध जगण्याची फरफट, देवदासींच्या वास्तव, नाचणाऱ्या स्त्रीबद्दलच्या समाजधारणा, लहान मुलांचे केले जाणारे शोषण, समाजाच्या दृष्टीने अनैतिक असणारे नातेसंबंध, अशा अनेकविध विषयांना मध्यवर्ती ठेवून या कथा आकाराला आल्या आहेत. या कथासंग्रहातील कथांमध्ये विषय-आशयाचे वैविध्य दिसते. वेगवेगळ्या समाजस्तरांच्या जाणीवा आणि वृत्ती-प्रवृत्तींना या कथांनी कवेत घेतले आहे. ही कथा बहुविध जीवनजाणिवा आणि त्यातील ताण्याबाण्यांना मुखरित करताना दिसते. या सर्वच कथा अंतर्मुख करायला लावणाऱ्या आणि मानवी वर्तन व त्या वर्तनामागील कार्यकारणभाव स्पष्ट करणाऱ्या आहेत. नागेश, अण्णा, बिरजूशेठ, शिवाप्पा, महादेव, सविता, हेमा, राजेश, रमणी यांसारखी अनेक सुष्ट-दुष्ट पात्रे आपल्या भवताली दिसणारी आहेत. त्यांचे नेमके रेखाटन डॉ. महाजन यांनी केले आहे. ही सर्व पात्रे आशयाला तोलून धरत, वास्तवाची प्रचिती देणारी आहेत. कथांच्या भाषेत प्रमाणभाषेतील वळणदारपण आहे; त्यामुळे वाचनीय सुलभताही आलेली आहे. चिंतनशीलता आणि वैचारिकता हा महत्त्वाचा गुणधर्म या कथांच्या भाषेचा आहे. मांडणीत रहस्यमयता असल्याने, ही कथा वाचकांना पकडून ठेवते. सर्वच कथांची सुरुवात उत्सुकता निर्माण करणारी आणि शेवट संदेशसूचक आहेत. निवेदन-मांडणी आणि रचनेच्या प्रयोगामुळेही हा संग्रह महत्त्वाचा ठरतो. आशय अभिव्यक्तीचे एकजीवीकरण आणि अज्ञाताच्या शोधाचे कथारूप म्हणून या कथासंग्रहाचे मोल लक्षात घेणे आवश्यक आहे. -केदार काळवणे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो