* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983647
  • Edition : 7
  • Publishing Year : 1971
  • Weight : 220.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BIRDS ARE CLASSIFIED. IN THE SAME WAY WE CAN CLASSIFY THE AUTHORS. THOSE WHO SCRIBBLE WITH BLACK ON WHITE PAPERS. AUTHORS SPECIALIZING MYTHOLOGY: LIKE THE CRANE; AUTHORS SPECIALIZING HISTORICAL WRITING: LIKE THE PAURANIK; AUTHORS SPECIALIZING HUMOUR: LIKE THE PARAKEET; AUTHORS SPECIALIZING MIDDLE CLASS: LIKE THE PIGEON; AUTHORS SPECIALIZING SLUMS: LIKE THE KING EAGLE; AUTHORS SPECIALIZING RURAL WRITINGS: LIKE THE COUNTRY HEN; AUTHORS SPECIALIZING IN CHILDREN’S BOOK: LIKE A FIST; AUTHORS IN GENERAL: LIKE THE TITVI, THE LAPWING;
पक्ष्यांचे जसे वर्गीकरण केले जाते, तसे ‘पांढऱ्यावर काळे’ करणाऱ्या लेखकांचेही होऊ शकते; ते असे पौराणिक लेखक : क्रौन्च पक्ष्याएवढा ऐतिहासिक लेखक : पौराणिकाएवढा विनोदी लेखक : राघूएवढा मध्यमवर्गीय लेखक : कबुतराएवढा झोपडपट्टी लेखक : राजगिधाडाएवढा ग्रामीण लेखक : गावठीकोंबडी एवढा बाल-लेखक : मुठीएवढा भरड (खरड) लेखक : टिटवीएवढा
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarSrikant Birajdar

    या पुस्तकात माडगूळकर यांनी आपल्या जीवनातील प्राण्यांचे अनुभव सांगितले आहे. देवाचे रूप असणारा कासव हा त्यांना कसा मिळाला, त्यांच्या बायकोने त्याला ठेवलेल्या बादलीतून न बघता संडासात फेकून दिले, मग शोधाशोध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सापडतो. आणि त्यांा जिम नावाचा कुत्रा हा त्यांना जीव लावून अकाली कसा गेला, हे माडगूळकर यांनी सांगितले आहे शंकर वैदू‌ नावाच्या माणसाने त्यांना दोन ससे आणून देतो, ते ससे जंगली जनावरे असल्या कारणाने जीवाला लावून घेतात व मरतात . बारा हत्यारी रखवालदार पैकी एक बळी रामोशी होता, त्यांनेच लेखकांना रानामाळाची गोडी लावली. पुढे त्यांनी भारत स्वातंत्र्यासाठी भाग घेतलेल्या चळवळीत त्यांना आलेली अडचण, ते कसे सुखरुप बाहेर पडले, हे व त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी या पुस्तकात त्यांनी सांगितले आहे. ...Read more

  • Rating StarUnmesh Khanwale

    काही पुस्तकांच्या निर्मिती कथा खुप विलक्षण असतात. "आई आजारी आहे, त्वरित भेटीला ये" असा निरोप व्यंकटेश माडगूळकरांना मिळाला आणि ते लगेच पुण्याहून माडगूळला जायला निघाले. माडगूळला जातांना आटपाडीहून जावे लागे. पण बसस्थानकावर पोचल्यावर रात्रीची बस कधीच िघून गेली होती. आता पुढची बस एकदम पहाटेच. त्या बस स्टॅन्डवर वेळ जाता जात नव्हता. पिशवीत कागद-पेन होतं. तेंव्हा त्या मधल्या काळात त्यांनी "पांढऱ्यावर काळे" हे पुस्तक लिहून पुर्ण केले. "पांढऱ्यावर काळे" हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरील ३७ खुमासदार लेखांचा संग्रह आहे. पाळीव प्राण्यांचे आलेले गमतीशीर अनुभव, सिनेमा/नाटक लेखक म्हणून जागवलेल्या आठवणी, शिकारीतले थरारक अनुभव आणि इतर बऱ्याच दर्जेदार लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. या सगळ्या आठवणी सत्य घटनेवर आधारित आहेत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर "मी गोष्टी कशा लिहतो" हा लेख. लेखकाचे मामा एकदा पुण्याला त्यांच्या घरी येतात आणि त्यांना लिहीत असलेलं बघून सहज म्हणतात की कसं काय सुचतं तुला असं लिहायला? मी आता बारामतीला जातोय, उद्या परत पुण्याला आल्यावर आपण यावर बोलूया. मामा जाताना मुलांना खेळण्यासाठी, आपलं कुत्र्याचं लहान पिलू सोबत ठेवून जातात. पण मग ते पिलू घरांत काय काय धुमाकूळ घालतं याचं भन्नाट वर्णन वाचताना आपल्या देखील मनांत विचार येतो खरंच कसं काय सुचतं असं लिहायला. सुरुवातीला कथा लिहितांना माडगूळकरांनी एक नाटक लिहिले. मात्र ते पहिले नाटक पूर्णपणे कोसळले. आता नाटक आयुष्यात कधी लिहायचे नाही हे मनाशी पक्के ठरवले असतांना, थोड्याच वर्षांनी एका संस्थेने तेच नाटक "तु वेडा कुंभार" नावाने राज्य नाट्य-स्पर्धेसाठी बसवले आणि दणक्यात यशस्वी केले. हा सगळा अनुभव त्यांनी "नाटक" या कथेत मिश्कीलपणे सांगितलाय. कथालेखक म्हणून प्रसिद्ध होत असतांना त्यांना एका सिनेमा निर्मात्याने एक कादंबरी आणून दिली आणि त्यावर सिनेमाची कथा-पटकथा बनवायला सांगितली. कादंबरी माडगूळकरांना विशेष आवडली नाही आणि हा सिनेमा चालणार नाही असं त्यांनी निर्मात्याला सांगितलं. त्याने "तुम्ही लिहा हो माडगूळकर. धंद्याचं गणित मी बसवतो", असं सांगितलं. हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारित "सांगत्ये ऐका" या नावाने बनलेला तो सिनेमा धो-धो चालला. या सिनेमासाठी केलेलं हे काम "पटकथा" नावाच्या लेखात सांगताना एकंदरीत सिनेमा जगतातील अनुभव त्यांनी झकास मांडलेत. प्रत्येक वाचकाला आपल्या आवडत्या लेखकाची एकदा तरी भेट घडावी असं वाटत असतं. एकदा एक अवलिया माणूस लेखकाला भेटतो, त्याला घरी येण्याचं आमंत्रण देतो. लेखक तिकडे गेल्यावर मात्र हा माणूस "माडगूळकर, श्रेष्ठ साहित्यिक दरवेळी उच्च प्रतीची साहित्य निर्मिती करत नसतो. तुमच्या बाबतीत, खरं म्हणजे माणदेशी माणसं लिहून तुम्ही मरायला हवं होतं. अर्थात साहित्यिक म्हणून. असे हजार वर्षे जगलात तरी आम्हाला आनंदच आहे" असं म्हणून लेखकाचीच शिकवणी घेतो. "पाहुणचार" नावाच्या लेखांत हा भेटीबाबतचा अनुभव म्हणजे अगदीच झकास! यातील कथा\ललित हे खुप ओघवत्या, सहज भाषेत लिहल्या आहेत. उगीच शब्दबंबाळ करणारे अनुभव नाही, अलंकारिक भाषा, उसनं-उधारीचे तत्वज्ञान शिकवणं नाही आणि मुख्य म्हणजे स्वतः बद्दलचा बडेजाव नाही. वाचकाला प्रत्येक घडलेल्या घटनांमध्ये, आपण एक साक्षीदार असल्यासारखं ती गोष्ट पुन्हा स्वतः अनुभवतोय असंच वाटतं. शेवटी व्यंकटेश माडगुळकरांनी सांगितल्याप्रमाणे चांगला लेखक हा मुळात असतो, तो तयार होत नाही. जितक्या स्वाभाविकपणे केळीला घड येतो तितक्याच स्वाभाविकपणे त्याच्याकडून लेखन होतं. जमिनीचे कवच फोडून वर येणाऱ्या केळीच्या त्या कोंभातच याचं आश्वासन असतं. हे पुस्तक वाचतांना आपल्याला सारखा याचा अनुभव येतो. वाचकहो, हे पुस्तक वाचतांना मी अनुभवलेला आनंद या पोस्टद्वारे तुमच्यापर्यंत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तो कसा मांडला गेला हे मला माहित नाही कारण पुलं, वपु, माडगूळकरांसारखे लेखक असे शब्दात मांडता येत नाही. आपण फक्त वाचण्यातील आनंद अनुभवायचा असतो. :-) - उन्मेष खानवाले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more