* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983647
  • Edition : 7
  • Publishing Year : 1971
  • Weight : 220.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BIRDS ARE CLASSIFIED. IN THE SAME WAY WE CAN CLASSIFY THE AUTHORS. THOSE WHO SCRIBBLE WITH BLACK ON WHITE PAPERS. AUTHORS SPECIALIZING MYTHOLOGY: LIKE THE CRANE; AUTHORS SPECIALIZING HISTORICAL WRITING: LIKE THE PAURANIK; AUTHORS SPECIALIZING HUMOUR: LIKE THE PARAKEET; AUTHORS SPECIALIZING MIDDLE CLASS: LIKE THE PIGEON; AUTHORS SPECIALIZING SLUMS: LIKE THE KING EAGLE; AUTHORS SPECIALIZING RURAL WRITINGS: LIKE THE COUNTRY HEN; AUTHORS SPECIALIZING IN CHILDREN’S BOOK: LIKE A FIST; AUTHORS IN GENERAL: LIKE THE TITVI, THE LAPWING;
पक्ष्यांचे जसे वर्गीकरण केले जाते, तसे ‘पांढऱ्यावर काळे’ करणाऱ्या लेखकांचेही होऊ शकते; ते असे पौराणिक लेखक : क्रौन्च पक्ष्याएवढा ऐतिहासिक लेखक : पौराणिकाएवढा विनोदी लेखक : राघूएवढा मध्यमवर्गीय लेखक : कबुतराएवढा झोपडपट्टी लेखक : राजगिधाडाएवढा ग्रामीण लेखक : गावठीकोंबडी एवढा बाल-लेखक : मुठीएवढा भरड (खरड) लेखक : टिटवीएवढा
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarSrikant Birajdar

    या पुस्तकात माडगूळकर यांनी आपल्या जीवनातील प्राण्यांचे अनुभव सांगितले आहे. देवाचे रूप असणारा कासव हा त्यांना कसा मिळाला, त्यांच्या बायकोने त्याला ठेवलेल्या बादलीतून न बघता संडासात फेकून दिले, मग शोधाशोध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सापडतो. आणि त्यांा जिम नावाचा कुत्रा हा त्यांना जीव लावून अकाली कसा गेला, हे माडगूळकर यांनी सांगितले आहे शंकर वैदू‌ नावाच्या माणसाने त्यांना दोन ससे आणून देतो, ते ससे जंगली जनावरे असल्या कारणाने जीवाला लावून घेतात व मरतात . बारा हत्यारी रखवालदार पैकी एक बळी रामोशी होता, त्यांनेच लेखकांना रानामाळाची गोडी लावली. पुढे त्यांनी भारत स्वातंत्र्यासाठी भाग घेतलेल्या चळवळीत त्यांना आलेली अडचण, ते कसे सुखरुप बाहेर पडले, हे व त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी या पुस्तकात त्यांनी सांगितले आहे. ...Read more

  • Rating StarUnmesh Khanwale

    काही पुस्तकांच्या निर्मिती कथा खुप विलक्षण असतात. "आई आजारी आहे, त्वरित भेटीला ये" असा निरोप व्यंकटेश माडगूळकरांना मिळाला आणि ते लगेच पुण्याहून माडगूळला जायला निघाले. माडगूळला जातांना आटपाडीहून जावे लागे. पण बसस्थानकावर पोचल्यावर रात्रीची बस कधीच िघून गेली होती. आता पुढची बस एकदम पहाटेच. त्या बस स्टॅन्डवर वेळ जाता जात नव्हता. पिशवीत कागद-पेन होतं. तेंव्हा त्या मधल्या काळात त्यांनी "पांढऱ्यावर काळे" हे पुस्तक लिहून पुर्ण केले. "पांढऱ्यावर काळे" हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरील ३७ खुमासदार लेखांचा संग्रह आहे. पाळीव प्राण्यांचे आलेले गमतीशीर अनुभव, सिनेमा/नाटक लेखक म्हणून जागवलेल्या आठवणी, शिकारीतले थरारक अनुभव आणि इतर बऱ्याच दर्जेदार लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. या सगळ्या आठवणी सत्य घटनेवर आधारित आहेत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर "मी गोष्टी कशा लिहतो" हा लेख. लेखकाचे मामा एकदा पुण्याला त्यांच्या घरी येतात आणि त्यांना लिहीत असलेलं बघून सहज म्हणतात की कसं काय सुचतं तुला असं लिहायला? मी आता बारामतीला जातोय, उद्या परत पुण्याला आल्यावर आपण यावर बोलूया. मामा जाताना मुलांना खेळण्यासाठी, आपलं कुत्र्याचं लहान पिलू सोबत ठेवून जातात. पण मग ते पिलू घरांत काय काय धुमाकूळ घालतं याचं भन्नाट वर्णन वाचताना आपल्या देखील मनांत विचार येतो खरंच कसं काय सुचतं असं लिहायला. सुरुवातीला कथा लिहितांना माडगूळकरांनी एक नाटक लिहिले. मात्र ते पहिले नाटक पूर्णपणे कोसळले. आता नाटक आयुष्यात कधी लिहायचे नाही हे मनाशी पक्के ठरवले असतांना, थोड्याच वर्षांनी एका संस्थेने तेच नाटक "तु वेडा कुंभार" नावाने राज्य नाट्य-स्पर्धेसाठी बसवले आणि दणक्यात यशस्वी केले. हा सगळा अनुभव त्यांनी "नाटक" या कथेत मिश्कीलपणे सांगितलाय. कथालेखक म्हणून प्रसिद्ध होत असतांना त्यांना एका सिनेमा निर्मात्याने एक कादंबरी आणून दिली आणि त्यावर सिनेमाची कथा-पटकथा बनवायला सांगितली. कादंबरी माडगूळकरांना विशेष आवडली नाही आणि हा सिनेमा चालणार नाही असं त्यांनी निर्मात्याला सांगितलं. त्याने "तुम्ही लिहा हो माडगूळकर. धंद्याचं गणित मी बसवतो", असं सांगितलं. हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारित "सांगत्ये ऐका" या नावाने बनलेला तो सिनेमा धो-धो चालला. या सिनेमासाठी केलेलं हे काम "पटकथा" नावाच्या लेखात सांगताना एकंदरीत सिनेमा जगतातील अनुभव त्यांनी झकास मांडलेत. प्रत्येक वाचकाला आपल्या आवडत्या लेखकाची एकदा तरी भेट घडावी असं वाटत असतं. एकदा एक अवलिया माणूस लेखकाला भेटतो, त्याला घरी येण्याचं आमंत्रण देतो. लेखक तिकडे गेल्यावर मात्र हा माणूस "माडगूळकर, श्रेष्ठ साहित्यिक दरवेळी उच्च प्रतीची साहित्य निर्मिती करत नसतो. तुमच्या बाबतीत, खरं म्हणजे माणदेशी माणसं लिहून तुम्ही मरायला हवं होतं. अर्थात साहित्यिक म्हणून. असे हजार वर्षे जगलात तरी आम्हाला आनंदच आहे" असं म्हणून लेखकाचीच शिकवणी घेतो. "पाहुणचार" नावाच्या लेखांत हा भेटीबाबतचा अनुभव म्हणजे अगदीच झकास! यातील कथा\ललित हे खुप ओघवत्या, सहज भाषेत लिहल्या आहेत. उगीच शब्दबंबाळ करणारे अनुभव नाही, अलंकारिक भाषा, उसनं-उधारीचे तत्वज्ञान शिकवणं नाही आणि मुख्य म्हणजे स्वतः बद्दलचा बडेजाव नाही. वाचकाला प्रत्येक घडलेल्या घटनांमध्ये, आपण एक साक्षीदार असल्यासारखं ती गोष्ट पुन्हा स्वतः अनुभवतोय असंच वाटतं. शेवटी व्यंकटेश माडगुळकरांनी सांगितल्याप्रमाणे चांगला लेखक हा मुळात असतो, तो तयार होत नाही. जितक्या स्वाभाविकपणे केळीला घड येतो तितक्याच स्वाभाविकपणे त्याच्याकडून लेखन होतं. जमिनीचे कवच फोडून वर येणाऱ्या केळीच्या त्या कोंभातच याचं आश्वासन असतं. हे पुस्तक वाचतांना आपल्याला सारखा याचा अनुभव येतो. वाचकहो, हे पुस्तक वाचतांना मी अनुभवलेला आनंद या पोस्टद्वारे तुमच्यापर्यंत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तो कसा मांडला गेला हे मला माहित नाही कारण पुलं, वपु, माडगूळकरांसारखे लेखक असे शब्दात मांडता येत नाही. आपण फक्त वाचण्यातील आनंद अनुभवायचा असतो. :-) - उन्मेष खानवाले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more