IAN FLEMING

About Author

Birth Date : 28/05/1908


IAN FLEMING WAS BORN ON MAY 28, 1908 IN GREEN STREET, LONDON. HE WAS EDUCATED AT ETON COLLEGE. HE WENT TO GERMANY AND AUSTRIA FOR HIGHER EDUCATION. AFTER INITIALLY WORKING AT REUTERS NEWS AGENCY, HE STARTED WORKING AS A STOCKBROKER IN THE STOCK MARKET. DURING WORLD WAR II, HE WORKED FULL-TIME AS AN ASSISTANT DIRECTOR OF NAVAL INTELLIGENCE.

इयान फ्लेमिंग यांचा जन्म २८ मे, १९०८ रोजी लंडनमधील ग्रीन स्ट्रीट येथे झाला. त्यांचे शिक्षण इटन महाविद्यालायात झाले. उच्चशिक्षणासाठी ते जर्मनी आणि ऑस्ट्रिया येथे गेले. सुरुवातीचा काही काळ रायटर्स न्यूज एजन्सी येथे काम केल्यावर ते शेअर मार्केटमध्ये स्टॉकब्रोकर म्हणून काम करू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पूर्ण वेळ नौदलातील हेरखात्यात असिस्टंट डायरेक्टर म्हणून ते कार्यरत होते. महायुद्धाच्या नंतर इयान फ्लेमिंग यांनी केम्स्ले , संडे टाइम्स या आणि इतर काही वर्तमानपत्रांसाठी परराष्ट्रीय बातमीदार म्हणून काम केले. १९५२ साली त्यांनी कसिनो रॉयल ही थरारक कादंबरी लिहिली. याच कादंबरीतून त्यांनी जेम्स बाँड – एजंट ००७ हे पात्र जगासमोर आणले. पुढील आयुष्यात त्यांनी जेम्स बाँड या पात्राभोवती गुंफलेल्या तेरा कादंबऱ्या लिहिल्या. या सर्व कादंबऱ्या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. या कादंबऱ्यावर चित्रपटही निघाले. १९६२ साली हृदयविकाराशी झगडता झगडता त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी – वॅÂस्परसाठी – एका उडणाऱ्या गाडीवर आधारित चिटी चिटी-बँग बँग ही कथा लिहिली. १२ ऑगस्ट, १९६४ साली केंट येथे त्यांचा मृत्यू झाला.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
FROM RUSSIA WITH LOVE Rating Star
Add To Cart INR 250
TBC Classic Book
GOLD FINGER Rating Star
Add To Cart INR 180
TBC Classic Book
OCTOPUSSY Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more