* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MINISTRY OF UTMOST HAPPINESS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789353173999
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 400
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ARUNDHATI ROY COMBO SET-3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AT MAGIC HOUR; WHEN THE SUN HAS GONE BUT THE LIGHT HAS NOT, ARMIES OF FLYING FOXES UNHINGE THEMSELVES FROM THE BANYAN TREES IN THE OLD GRAVEYARD AND DRIFT ACROSS THE CITY LIKE SMOKE . . .` SO BEGINS THE MINISTRY OF UTMOST HAPPINESS, ARUNDHATI ROY`S INCREDIBLE FOLLOW-UP TO THE GOD OF SMALL THINGS. WE MEET ANJUM, WHO USED TO BE AFTAB, WHO RUNS A GUEST HOUSE IN AN OLD DELHI GRAVEYARD AND GATHERS AROUND HER THE LOST, THE BROKEN AND THE CAST OUT. WE MEET TILO, AN ARCHITECT, WHO, ALTHOUGH SHE IS LOVED BY THREE MEN, LIVES IN A `COUNTRY OF HER OWN SKIN`. WHEN TILO CLAIMS AN ABANDONED BABY AS HER OWN, HER DESTINY AND THAT OF ANJUM BECOME ENTANGLED AS A TALE THAT SWEEPS ACROSS THE YEARS AND A TEEMING CONTINENT TAKES FLIGHT. . .
जुन्या दिल्लीपासून ते काश्मीरमधील पर्वतराजींपर्यंत आणि महानगराच्या विराट रूपापासून ते दूरवरच्या जंगलापर्यंत... वेगवेगळ्या आयुष्यांचे अनेकरंगी पदर उलगडून दाखवणारी ही विलक्षण कादंबरी आहे. शहरातील एका कब्रस्तानात ‘घर’वसवणारी अन्जुम आणि तिच्या परिघातील पात्रे, एका रात्री फुटपाथवर अचानक प्रकट झालेली एक बालिका, एस. तिलोत्तमा आणि तिच्यावर प्रेम करणारे तीन पुरुष... या साऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कादंबरी वाचकाला विविध भावभावनांचं उत्कट दर्शन घडवते.

No Records Found
No Records Found
Keywords
#दमिनिस्ट्रीऑफअटमोस्टहॅपिनेस #अरुंधतीरॉय #सुप्रियावकील #बुकरपारितोषिक #मराठीपुस्तके #अनुवादितपुस्तके #मराठीप्रकाशक #THEMINISTRYOFUTMOSTHAPPINESS #ARUNDHATIROY #SUPRIYAVAKIL #BOOKERPRIZE #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarSakal 24.01.2021

    बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांची ही दुसरी कादंबरी. या कादंबरीचा आवाका मोठा आणि त्यातली पात्रही बरीच. मात्र कथानक प्रामुख्यानं घडतं ते दिल्ली आणि काश्मीरच्या अशांत भागात. अन्जुम या महिलेभोवती हे कथानक फिरतं. मुश्ताक अली, जैनव आणि एस तिलत्तमा आणि डॉ. आझाद भारतीय तसेच अन्य दोन व्यक्ती या कथानकातील महत्त्वाची पात्र आहेत. एक मोठा कालखंड तसेच सरकारी यंत्रणा, दहशतवाद आणि धर्मांधता तसेच गरीब माणसांचं जगणं आशा अनेक गोष्टी या कथानकात वाचकांच्या समोर येतात. विविध भावभावनांचं दर्शन यातून घडतं. मूळ इंग्लिश मध्ये लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद ४२ भाषांमध्ये झाला असून , सुप्रिया वकील यांनी मराठी अनुवाद केला आहे. ...Read more

  • Rating StarUday Kulkarni

    द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस – वाचायलाच हवी. २२-०१-२०१९ उदय कुलकर्ण आशुतोष दिवाण यांनी अरुंधती रॉय यांची नवी कादंबरी द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस नोबल पुरस्कार मिळवू शकेल इतकी चांगली आहे शिफारस केली होती. माझ्यापुढे प्रश्न होता ही इंग्लशमधील कादंबरी आपल्याला झेपेल की नाही. अनेक इंग्लिश पुस्तके वाचलेली असली तरीही अरुंधती रॉय यांची बुकर पुरस्कारप्राप्त कादंबरी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज वाचणे जमले नव्हते. कळत नाही म्हणून सोडून दिली होती. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्जचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला असून ती अपर्णा वेलणकर यांनी अनुवादीत केली आहे. मी आधी ही मराठी वाचून बघू ठरवले. हा अनुवाद वाचून कादंबरी समजली व आवडली. अरुंधती रॉय यांची स्टाईलही लक्षात आली. अनेक छोटी कथानके त्या एकत्र आणतात. स्थानिक संस्कृतीचे अनेक सूक्ष्म संदर्भ त्यात येतात. कथानकांची वीण पक्की असते. अपर्णा वेलणकर यांचा अनुवाद अतिशय उत्तम झालेला आहे. त्यांनी अनुवादासाठी तीन वर्षे लागली लिहिले आहे, ते योग्यच आहे. खरोखर मेहनत घेऊन त्यांनी हे काम केलेले आहे. वरच्या दर्जाच्या हा अनुवाद आहे. यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि मी द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस इंग्लिशमधून वाचली. प्रथमच स्पष्ट करतो, मी आशुतोष दिवाण यांच्याशी पूर्ण सहमत आहे व नोबल पुरस्कार मिळवू शकेल इतकी चांगली ही कादंबरी आहे. ह्या कादंबरीत अनेक विषय आलेले आहेत. दिल्लीतील अण्णा हजारे, केजरीवाल आंदोलन, मोदी, नक्षलवादी, गुजरात दंगल, ८४ची दिल्लीतील शीख विरोधी दंगल, भोपाळ गॅस असे अनेक. मुख्यत: काश्मीर समस्या हा मुद्दा आहे. त्यात काश्मीर मधील अनेक लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी – कथानके येतात. ब्रिटनमध्ये आयरिश दहशतवाद जोरात होता, तेव्हा दहशतवाद्द्यांचं एक वाक्य होतं, यू हॅव टू बी लकी ऑल द टाइम्स, बट वुई हॅव टू बी लकी ओन्ली वन्स. त्याचा पुस्तकात उपयोग आहे. एका अस्पृश्य सैनिकाचे दक्षिणेमधील एका गावात स्मारक उभारले जाते. गावाच्या वेशीवरच. लोकांना ते आवडत नाही. येता-जाता आम्ही ह्याला सलाम करायचा का ते म्हणतात आणि ते खराब केले जाते. कादंबरीत मुख्यत: काश्मीर समस्या हा मुद्दा आहे असे म्हटले, त्यात एका बाजूला दहशतवादी व दुसरीकडे आर्मी-पोलिस यांच्या कचाट्यात सापडलेले सामान्य काश्मीरी लोक आहेत. तुम्ही अलिप्त राहूच शकत नाही. पोलिस ऑफीसरने जाहिरपणे दिलेली व्हिस्कीची बाटली नाकारणे याचा अर्थ तो पोलिस ऑफीसर लावेल, तुम्हाला त्यांच्याबरोबर सहकार्य करायचे नाही, तो तुमच्या घरावर छापा टाकेल व तुम्हाला तुरुंगात टाकेल. दुसरीकडे ती बाटली स्वीकारली की लगेच दहशतवाद्द्यांना खबर मिळणार आणि तुम्ही पोलिसांचे खबरी म्हणून ते तुम्हाला संपवणार. पण अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की समस्या असल्या तरीही ही एक फिक्शनल कांदबरी म्हणून त्या कसोटीवर खरी उतरते. ज्या काही समस्या, मुद्दे, वास्तव आहे ते सगळे व्यक्तीरेखा, त्यांचं कथानक यातून येतं. अरुंधती रॉय त्याकरता कादंबरीत वेगळा निबंध देत नाहीत किंवा नुसतीच माहितीची भरताड देत नाहीत. कादंबरीत अनेक व्यक्तीरेखा आहेत, त्यांची छोटी-मोठी कथानके आहेत. सर्वांचा व्यवस्थित मेळ घातला जातो. डावे लेखक यांना युटोपिया दाखवण्याची आवड असते. ते ह्या कादंबरीतही आहे. फक्त हा युटोपिया त्यांनी वसवला आहे स्मशानात. ती वेगळी मजा आहे. कादंबरीत दिसते अरुंधती रॉय यांची तंत्रावरची हुकुमत – कमांड ओव्हर क्राफ्ट. लेखक काय अफाट विश्व निर्मण करू शकतो ते इथे दिसते. दहा दिवस सिनेमा बघणे बंद करुन ही कादंबरी वाचली होती त्याचे सार्थक झाले. ...Read more

  • Rating StarAnil Udgirkar

    अरूंधती राय यांची ही दुसरी कादंबरी.दिल्ली व काश्मीर ची सैर घडविणारी.डाव्या विचारसरणी,अगदी धीट असे लेखन.

  • Rating StarDAINIK LOKMAT 02-02-2020

    गुंतागुंतीचा उत्कंठावर्धक भावनिक खेळ... ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ हे अरुंधती रॉय लिखित पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या कादंबरीचा साहित्य परीघ जागतिक पातळीवरदेखील विशाल आहे. आजतोवर या पुस्तकाचा ४९ भाषांमध्ये अनुवाद झाल आहे. नेमकं असं काय आहे, या कादंबरीत जिने वाचकांच्या मनाला मोहिनी घातली. तर याचे उत्तर आहे वेगवान काळाच्या ओघात देखील कादंबरी आपला वेळ व्यापते. दिल्ली, काश्मिर, महानगरे, जंगले, पात्रे, आशय, विषय यांसारख्या सर्व अंगांनी कादंबरी आपली सर्वसमावेशकता जपते. कब्रस्तानमध्ये घर करणारी अन्जुम, तिच्या आजूबाजूंचे पात्र, अचानकपणे फुटपाथवर येणारी बालिका एस. तिलोत्तमा आणि तिच्यावर प्रेम करणारे तीन पुरुष या साऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारे हे कथानक म्हणजे भावनिक गुंतागुंतीचा औत्सुक्याचा एक अप्रतिम खेळ आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more