* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MINISTRY OF UTMOST HAPPINESS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789353173999
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 400
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ARUNDHATI ROY COMBO SET-3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AT MAGIC HOUR; WHEN THE SUN HAS GONE BUT THE LIGHT HAS NOT, ARMIES OF FLYING FOXES UNHINGE THEMSELVES FROM THE BANYAN TREES IN THE OLD GRAVEYARD AND DRIFT ACROSS THE CITY LIKE SMOKE . . .` SO BEGINS THE MINISTRY OF UTMOST HAPPINESS, ARUNDHATI ROY`S INCREDIBLE FOLLOW-UP TO THE GOD OF SMALL THINGS. WE MEET ANJUM, WHO USED TO BE AFTAB, WHO RUNS A GUEST HOUSE IN AN OLD DELHI GRAVEYARD AND GATHERS AROUND HER THE LOST, THE BROKEN AND THE CAST OUT. WE MEET TILO, AN ARCHITECT, WHO, ALTHOUGH SHE IS LOVED BY THREE MEN, LIVES IN A `COUNTRY OF HER OWN SKIN`. WHEN TILO CLAIMS AN ABANDONED BABY AS HER OWN, HER DESTINY AND THAT OF ANJUM BECOME ENTANGLED AS A TALE THAT SWEEPS ACROSS THE YEARS AND A TEEMING CONTINENT TAKES FLIGHT. . .
जुन्या दिल्लीपासून ते काश्मीरमधील पर्वतराजींपर्यंत आणि महानगराच्या विराट रूपापासून ते दूरवरच्या जंगलापर्यंत... वेगवेगळ्या आयुष्यांचे अनेकरंगी पदर उलगडून दाखवणारी ही विलक्षण कादंबरी आहे. शहरातील एका कब्रस्तानात ‘घर’वसवणारी अन्जुम आणि तिच्या परिघातील पात्रे, एका रात्री फुटपाथवर अचानक प्रकट झालेली एक बालिका, एस. तिलोत्तमा आणि तिच्यावर प्रेम करणारे तीन पुरुष... या साऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कादंबरी वाचकाला विविध भावभावनांचं उत्कट दर्शन घडवते.

No Records Found
No Records Found
Keywords
#दमिनिस्ट्रीऑफअटमोस्टहॅपिनेस #अरुंधतीरॉय #सुप्रियावकील #बुकरपारितोषिक #मराठीपुस्तके #अनुवादितपुस्तके #मराठीप्रकाशक #THEMINISTRYOFUTMOSTHAPPINESS #ARUNDHATIROY #SUPRIYAVAKIL #BOOKERPRIZE #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarSakal 24.01.2021

    बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांची ही दुसरी कादंबरी. या कादंबरीचा आवाका मोठा आणि त्यातली पात्रही बरीच. मात्र कथानक प्रामुख्यानं घडतं ते दिल्ली आणि काश्मीरच्या अशांत भागात. अन्जुम या महिलेभोवती हे कथानक फिरतं. मुश्ताक अली, जैनव आणि एस तिलत्तमा आणि डॉ. आझाद भारतीय तसेच अन्य दोन व्यक्ती या कथानकातील महत्त्वाची पात्र आहेत. एक मोठा कालखंड तसेच सरकारी यंत्रणा, दहशतवाद आणि धर्मांधता तसेच गरीब माणसांचं जगणं आशा अनेक गोष्टी या कथानकात वाचकांच्या समोर येतात. विविध भावभावनांचं दर्शन यातून घडतं. मूळ इंग्लिश मध्ये लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद ४२ भाषांमध्ये झाला असून , सुप्रिया वकील यांनी मराठी अनुवाद केला आहे. ...Read more

  • Rating StarUday Kulkarni

    द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस – वाचायलाच हवी. २२-०१-२०१९ उदय कुलकर्ण आशुतोष दिवाण यांनी अरुंधती रॉय यांची नवी कादंबरी द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस नोबल पुरस्कार मिळवू शकेल इतकी चांगली आहे शिफारस केली होती. माझ्यापुढे प्रश्न होता ही इंग्लशमधील कादंबरी आपल्याला झेपेल की नाही. अनेक इंग्लिश पुस्तके वाचलेली असली तरीही अरुंधती रॉय यांची बुकर पुरस्कारप्राप्त कादंबरी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज वाचणे जमले नव्हते. कळत नाही म्हणून सोडून दिली होती. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्जचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला असून ती अपर्णा वेलणकर यांनी अनुवादीत केली आहे. मी आधी ही मराठी वाचून बघू ठरवले. हा अनुवाद वाचून कादंबरी समजली व आवडली. अरुंधती रॉय यांची स्टाईलही लक्षात आली. अनेक छोटी कथानके त्या एकत्र आणतात. स्थानिक संस्कृतीचे अनेक सूक्ष्म संदर्भ त्यात येतात. कथानकांची वीण पक्की असते. अपर्णा वेलणकर यांचा अनुवाद अतिशय उत्तम झालेला आहे. त्यांनी अनुवादासाठी तीन वर्षे लागली लिहिले आहे, ते योग्यच आहे. खरोखर मेहनत घेऊन त्यांनी हे काम केलेले आहे. वरच्या दर्जाच्या हा अनुवाद आहे. यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि मी द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस इंग्लिशमधून वाचली. प्रथमच स्पष्ट करतो, मी आशुतोष दिवाण यांच्याशी पूर्ण सहमत आहे व नोबल पुरस्कार मिळवू शकेल इतकी चांगली ही कादंबरी आहे. ह्या कादंबरीत अनेक विषय आलेले आहेत. दिल्लीतील अण्णा हजारे, केजरीवाल आंदोलन, मोदी, नक्षलवादी, गुजरात दंगल, ८४ची दिल्लीतील शीख विरोधी दंगल, भोपाळ गॅस असे अनेक. मुख्यत: काश्मीर समस्या हा मुद्दा आहे. त्यात काश्मीर मधील अनेक लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी – कथानके येतात. ब्रिटनमध्ये आयरिश दहशतवाद जोरात होता, तेव्हा दहशतवाद्द्यांचं एक वाक्य होतं, यू हॅव टू बी लकी ऑल द टाइम्स, बट वुई हॅव टू बी लकी ओन्ली वन्स. त्याचा पुस्तकात उपयोग आहे. एका अस्पृश्य सैनिकाचे दक्षिणेमधील एका गावात स्मारक उभारले जाते. गावाच्या वेशीवरच. लोकांना ते आवडत नाही. येता-जाता आम्ही ह्याला सलाम करायचा का ते म्हणतात आणि ते खराब केले जाते. कादंबरीत मुख्यत: काश्मीर समस्या हा मुद्दा आहे असे म्हटले, त्यात एका बाजूला दहशतवादी व दुसरीकडे आर्मी-पोलिस यांच्या कचाट्यात सापडलेले सामान्य काश्मीरी लोक आहेत. तुम्ही अलिप्त राहूच शकत नाही. पोलिस ऑफीसरने जाहिरपणे दिलेली व्हिस्कीची बाटली नाकारणे याचा अर्थ तो पोलिस ऑफीसर लावेल, तुम्हाला त्यांच्याबरोबर सहकार्य करायचे नाही, तो तुमच्या घरावर छापा टाकेल व तुम्हाला तुरुंगात टाकेल. दुसरीकडे ती बाटली स्वीकारली की लगेच दहशतवाद्द्यांना खबर मिळणार आणि तुम्ही पोलिसांचे खबरी म्हणून ते तुम्हाला संपवणार. पण अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की समस्या असल्या तरीही ही एक फिक्शनल कांदबरी म्हणून त्या कसोटीवर खरी उतरते. ज्या काही समस्या, मुद्दे, वास्तव आहे ते सगळे व्यक्तीरेखा, त्यांचं कथानक यातून येतं. अरुंधती रॉय त्याकरता कादंबरीत वेगळा निबंध देत नाहीत किंवा नुसतीच माहितीची भरताड देत नाहीत. कादंबरीत अनेक व्यक्तीरेखा आहेत, त्यांची छोटी-मोठी कथानके आहेत. सर्वांचा व्यवस्थित मेळ घातला जातो. डावे लेखक यांना युटोपिया दाखवण्याची आवड असते. ते ह्या कादंबरीतही आहे. फक्त हा युटोपिया त्यांनी वसवला आहे स्मशानात. ती वेगळी मजा आहे. कादंबरीत दिसते अरुंधती रॉय यांची तंत्रावरची हुकुमत – कमांड ओव्हर क्राफ्ट. लेखक काय अफाट विश्व निर्मण करू शकतो ते इथे दिसते. दहा दिवस सिनेमा बघणे बंद करुन ही कादंबरी वाचली होती त्याचे सार्थक झाले. ...Read more

  • Rating StarAnil Udgirkar

    अरूंधती राय यांची ही दुसरी कादंबरी.दिल्ली व काश्मीर ची सैर घडविणारी.डाव्या विचारसरणी,अगदी धीट असे लेखन.

  • Rating StarDAINIK LOKMAT 02-02-2020

    गुंतागुंतीचा उत्कंठावर्धक भावनिक खेळ... ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ हे अरुंधती रॉय लिखित पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या कादंबरीचा साहित्य परीघ जागतिक पातळीवरदेखील विशाल आहे. आजतोवर या पुस्तकाचा ४९ भाषांमध्ये अनुवाद झाल आहे. नेमकं असं काय आहे, या कादंबरीत जिने वाचकांच्या मनाला मोहिनी घातली. तर याचे उत्तर आहे वेगवान काळाच्या ओघात देखील कादंबरी आपला वेळ व्यापते. दिल्ली, काश्मिर, महानगरे, जंगले, पात्रे, आशय, विषय यांसारख्या सर्व अंगांनी कादंबरी आपली सर्वसमावेशकता जपते. कब्रस्तानमध्ये घर करणारी अन्जुम, तिच्या आजूबाजूंचे पात्र, अचानकपणे फुटपाथवर येणारी बालिका एस. तिलोत्तमा आणि तिच्यावर प्रेम करणारे तीन पुरुष या साऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारे हे कथानक म्हणजे भावनिक गुंतागुंतीचा औत्सुक्याचा एक अप्रतिम खेळ आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो