* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MINISTRY OF UTMOST HAPPINESS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9789353173999
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 400
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :ARUNDHATI ROY COMBO SET-3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AT MAGIC HOUR; WHEN THE SUN HAS GONE BUT THE LIGHT HAS NOT, ARMIES OF FLYING FOXES UNHINGE THEMSELVES FROM THE BANYAN TREES IN THE OLD GRAVEYARD AND DRIFT ACROSS THE CITY LIKE SMOKE . . .` SO BEGINS THE MINISTRY OF UTMOST HAPPINESS, ARUNDHATI ROY`S INCREDIBLE FOLLOW-UP TO THE GOD OF SMALL THINGS. WE MEET ANJUM, WHO USED TO BE AFTAB, WHO RUNS A GUEST HOUSE IN AN OLD DELHI GRAVEYARD AND GATHERS AROUND HER THE LOST, THE BROKEN AND THE CAST OUT. WE MEET TILO, AN ARCHITECT, WHO, ALTHOUGH SHE IS LOVED BY THREE MEN, LIVES IN A `COUNTRY OF HER OWN SKIN`. WHEN TILO CLAIMS AN ABANDONED BABY AS HER OWN, HER DESTINY AND THAT OF ANJUM BECOME ENTANGLED AS A TALE THAT SWEEPS ACROSS THE YEARS AND A TEEMING CONTINENT TAKES FLIGHT. . .
जुन्या दिल्लीपासून ते काश्मीरमधील पर्वतराजींपर्यंत आणि महानगराच्या विराट रूपापासून ते दूरवरच्या जंगलापर्यंत... वेगवेगळ्या आयुष्यांचे अनेकरंगी पदर उलगडून दाखवणारी ही विलक्षण कादंबरी आहे. शहरातील एका कब्रस्तानात ‘घर’वसवणारी अन्जुम आणि तिच्या परिघातील पात्रे, एका रात्री फुटपाथवर अचानक प्रकट झालेली एक बालिका, एस. तिलोत्तमा आणि तिच्यावर प्रेम करणारे तीन पुरुष... या साऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कादंबरी वाचकाला विविध भावभावनांचं उत्कट दर्शन घडवते.

No Records Found
No Records Found
Keywords
#दमिनिस्ट्रीऑफअटमोस्टहॅपिनेस #अरुंधतीरॉय #सुप्रियावकील #बुकरपारितोषिक #मराठीपुस्तके #अनुवादितपुस्तके #मराठीप्रकाशक #THEMINISTRYOFUTMOSTHAPPINESS #ARUNDHATIROY #SUPRIYAVAKIL #BOOKERPRIZE #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarSakal 24.01.2021

    बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांची ही दुसरी कादंबरी. या कादंबरीचा आवाका मोठा आणि त्यातली पात्रही बरीच. मात्र कथानक प्रामुख्यानं घडतं ते दिल्ली आणि काश्मीरच्या अशांत भागात. अन्जुम या महिलेभोवती हे कथानक फिरतं. मुश्ताक अली, जैनव आणि एस तिलत्तमा आणि डॉ. आझाद भारतीय तसेच अन्य दोन व्यक्ती या कथानकातील महत्त्वाची पात्र आहेत. एक मोठा कालखंड तसेच सरकारी यंत्रणा, दहशतवाद आणि धर्मांधता तसेच गरीब माणसांचं जगणं आशा अनेक गोष्टी या कथानकात वाचकांच्या समोर येतात. विविध भावभावनांचं दर्शन यातून घडतं. मूळ इंग्लिश मध्ये लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद ४२ भाषांमध्ये झाला असून , सुप्रिया वकील यांनी मराठी अनुवाद केला आहे. ...Read more

  • Rating StarUday Kulkarni

    द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस – वाचायलाच हवी. २२-०१-२०१९ उदय कुलकर्ण आशुतोष दिवाण यांनी अरुंधती रॉय यांची नवी कादंबरी द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस नोबल पुरस्कार मिळवू शकेल इतकी चांगली आहे शिफारस केली होती. माझ्यापुढे प्रश्न होता ही इंग्लशमधील कादंबरी आपल्याला झेपेल की नाही. अनेक इंग्लिश पुस्तके वाचलेली असली तरीही अरुंधती रॉय यांची बुकर पुरस्कारप्राप्त कादंबरी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज वाचणे जमले नव्हते. कळत नाही म्हणून सोडून दिली होती. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्जचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला असून ती अपर्णा वेलणकर यांनी अनुवादीत केली आहे. मी आधी ही मराठी वाचून बघू ठरवले. हा अनुवाद वाचून कादंबरी समजली व आवडली. अरुंधती रॉय यांची स्टाईलही लक्षात आली. अनेक छोटी कथानके त्या एकत्र आणतात. स्थानिक संस्कृतीचे अनेक सूक्ष्म संदर्भ त्यात येतात. कथानकांची वीण पक्की असते. अपर्णा वेलणकर यांचा अनुवाद अतिशय उत्तम झालेला आहे. त्यांनी अनुवादासाठी तीन वर्षे लागली लिहिले आहे, ते योग्यच आहे. खरोखर मेहनत घेऊन त्यांनी हे काम केलेले आहे. वरच्या दर्जाच्या हा अनुवाद आहे. यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि मी द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस इंग्लिशमधून वाचली. प्रथमच स्पष्ट करतो, मी आशुतोष दिवाण यांच्याशी पूर्ण सहमत आहे व नोबल पुरस्कार मिळवू शकेल इतकी चांगली ही कादंबरी आहे. ह्या कादंबरीत अनेक विषय आलेले आहेत. दिल्लीतील अण्णा हजारे, केजरीवाल आंदोलन, मोदी, नक्षलवादी, गुजरात दंगल, ८४ची दिल्लीतील शीख विरोधी दंगल, भोपाळ गॅस असे अनेक. मुख्यत: काश्मीर समस्या हा मुद्दा आहे. त्यात काश्मीर मधील अनेक लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी – कथानके येतात. ब्रिटनमध्ये आयरिश दहशतवाद जोरात होता, तेव्हा दहशतवाद्द्यांचं एक वाक्य होतं, यू हॅव टू बी लकी ऑल द टाइम्स, बट वुई हॅव टू बी लकी ओन्ली वन्स. त्याचा पुस्तकात उपयोग आहे. एका अस्पृश्य सैनिकाचे दक्षिणेमधील एका गावात स्मारक उभारले जाते. गावाच्या वेशीवरच. लोकांना ते आवडत नाही. येता-जाता आम्ही ह्याला सलाम करायचा का ते म्हणतात आणि ते खराब केले जाते. कादंबरीत मुख्यत: काश्मीर समस्या हा मुद्दा आहे असे म्हटले, त्यात एका बाजूला दहशतवादी व दुसरीकडे आर्मी-पोलिस यांच्या कचाट्यात सापडलेले सामान्य काश्मीरी लोक आहेत. तुम्ही अलिप्त राहूच शकत नाही. पोलिस ऑफीसरने जाहिरपणे दिलेली व्हिस्कीची बाटली नाकारणे याचा अर्थ तो पोलिस ऑफीसर लावेल, तुम्हाला त्यांच्याबरोबर सहकार्य करायचे नाही, तो तुमच्या घरावर छापा टाकेल व तुम्हाला तुरुंगात टाकेल. दुसरीकडे ती बाटली स्वीकारली की लगेच दहशतवाद्द्यांना खबर मिळणार आणि तुम्ही पोलिसांचे खबरी म्हणून ते तुम्हाला संपवणार. पण अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की समस्या असल्या तरीही ही एक फिक्शनल कांदबरी म्हणून त्या कसोटीवर खरी उतरते. ज्या काही समस्या, मुद्दे, वास्तव आहे ते सगळे व्यक्तीरेखा, त्यांचं कथानक यातून येतं. अरुंधती रॉय त्याकरता कादंबरीत वेगळा निबंध देत नाहीत किंवा नुसतीच माहितीची भरताड देत नाहीत. कादंबरीत अनेक व्यक्तीरेखा आहेत, त्यांची छोटी-मोठी कथानके आहेत. सर्वांचा व्यवस्थित मेळ घातला जातो. डावे लेखक यांना युटोपिया दाखवण्याची आवड असते. ते ह्या कादंबरीतही आहे. फक्त हा युटोपिया त्यांनी वसवला आहे स्मशानात. ती वेगळी मजा आहे. कादंबरीत दिसते अरुंधती रॉय यांची तंत्रावरची हुकुमत – कमांड ओव्हर क्राफ्ट. लेखक काय अफाट विश्व निर्मण करू शकतो ते इथे दिसते. दहा दिवस सिनेमा बघणे बंद करुन ही कादंबरी वाचली होती त्याचे सार्थक झाले. ...Read more

  • Rating StarAnil Udgirkar

    अरूंधती राय यांची ही दुसरी कादंबरी.दिल्ली व काश्मीर ची सैर घडविणारी.डाव्या विचारसरणी,अगदी धीट असे लेखन.

  • Rating StarDAINIK LOKMAT 02-02-2020

    गुंतागुंतीचा उत्कंठावर्धक भावनिक खेळ... ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’ हे अरुंधती रॉय लिखित पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या कादंबरीचा साहित्य परीघ जागतिक पातळीवरदेखील विशाल आहे. आजतोवर या पुस्तकाचा ४९ भाषांमध्ये अनुवाद झाल आहे. नेमकं असं काय आहे, या कादंबरीत जिने वाचकांच्या मनाला मोहिनी घातली. तर याचे उत्तर आहे वेगवान काळाच्या ओघात देखील कादंबरी आपला वेळ व्यापते. दिल्ली, काश्मिर, महानगरे, जंगले, पात्रे, आशय, विषय यांसारख्या सर्व अंगांनी कादंबरी आपली सर्वसमावेशकता जपते. कब्रस्तानमध्ये घर करणारी अन्जुम, तिच्या आजूबाजूंचे पात्र, अचानकपणे फुटपाथवर येणारी बालिका एस. तिलोत्तमा आणि तिच्यावर प्रेम करणारे तीन पुरुष या साऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारे हे कथानक म्हणजे भावनिक गुंतागुंतीचा औत्सुक्याचा एक अप्रतिम खेळ आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more