* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WOMEN IN INDIAS FREEDOM STRUGGLE
  • Availability : Available
  • Translators : VASANTI PHADKE
  • ISBN : 9788177663600
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 376
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORK THE WOMEN UNDERTOOK DURING THE FREEDOM FIGHT WAS A BIT EXTENDED FORM OF THEIR USUAL WORK. BUT A FEW OF THESE WOMEN WERE NOT SATISFIED WITH IT, THEY THREW OFF THE LIMITS OF THE TRADITIONS AND STOOD AGAINST THE SECONDARY POSITION OFFERED TO THEM. THEY MIXED THEIR ROLES AS NATIONALIST AND FEMINIST. THEY DID NOT WANT ANY POST OR POWER, THEY SERVED THEIR MOTHERLAND UNSELFISHLY. THEY GAVE A NEW DIMENSION TO THE NATIONAL FREEDOM MOVEMENT ON REGIONAL AND NATIONAL LEVEL. THIS CALLED FOR THE ENTHUSIASM ON A WIDE LEVEL, REGIONAL AS WELL AS STATE. THE HURDLES OF LOCATION, CLASS, CASTE, GENDER AND RELIGION WERE OVERCOME FAST. IT ALSO UNDERLINED THE DEVOTION OF PEOPLE IN THE LIGHT OF EQUALITY, SOCIAL JUSTICE, SECULARISM, AND NATIONALISM. THIS SAME DEVOTION THEN WAS SIPPED THROUGH TO THE CORE OF EVERY INDIAN AND GAVE A BOOST TO THE CONCLUDING NATIONAL FREEDOM MOVEMENT.
स्वातंत्र्य संग्रामातील कार्य हा बहुसंख्य स्त्रियांच्या दृष्टीने त्यांच्या परंपरागत कार्याचा थोडाफार विस्तार होता. तरीही फार थोड्या साहसी स्त्रियांनी परंपरा झुगारून त्यांच्या परंपरागत आणि दुय्यम दर्जाविरुद्ध बंड पुकारले, आणि स्त्रीवादी व राष्ट्रवादी भूमिकांचे एकत्रीकरण केले. कोणतेही पद किंवा सत्ता यांची अभिलाषा न धरता त्यांनी नि:स्वार्थपणे देशसेवा केली. राष्ट्रीय चळवळीला प्रथमच राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्वरूप प्राप्त झाले. परिणामी मोठ्या संख्येने स्थानिक व प्रादेशिक स्तरावर उत्साह दिसून आला. त्यामुळे प्रदेश, वर्ग, जाती, लिंग व धर्म यांचे अडसर भारतीय इतिहासात दीर्घ कालांतराने दूर झालेले दिसले. समानतेच्या तत्त्वज्ञानात, सामाजिक न्यायात, निधर्मीवादात आणि राष्ट्रवादात झिरपलेली पायाभूत भावनिष्ठा स्पष्ट झाली. स्वातंत्र्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी ही भावनिष्ठा सर्वत्र हळूहळू झिरपून चळवळीला मार्गदर्शक ठरली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #NAWAZ B. MODI #VASANTI PHADKE #भारतीयस्वातंत्र्यलढ्यातीलस्त्रिया #WOMENININDIASFREEDOMSTRUGGLE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (KOLHAPUR) 13-04-2003

    स्वातंत्र्य चळवळीला मार्गदर्शक ठरलेली भावनिष्ठा... भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग, कार्य हा बहुसंख्य स्त्रियांच्या दृष्टीने त्यांच्या परंपरागत कार्याचा थोडाफार विस्तार होता. तरीही फार थोड्या साहसी स्त्रियांनी परंपरा झुगारून त्यांच्या परंपरागत णि दुय्यम दर्जाविरुद्ध बंड पुकारले; आणि स्त्रीवादी व राष्ट्रवादी भूमिकांचे एकत्रीकरण केले. कोणतेही पद किंवा सत्ता यांची अभिलाषा न धरता त्यांनी नि:स्वार्थपणे देशसेवा केली. राष्ट्रीय चळवळीला स्थानिक व प्रादेशिक स्तरावर नेण्याचे महत्त्वाचे काम स्त्रियांनी केले. प्रदेश, वर्ग, नाती, लिंग व धर्म या दीर्घकालीन अडसरीचा गुंता उलगडण्याचे काम या चळवळीद्वारे स्त्रियांनी साध्य केले. समानतेच्या तत्त्वज्ञानात, सामाजिक न्यायात, निधर्मीवादात आणि राष्ट्रवादात झिरपलेली पायाभूत भावनिष्ठा स्पष्ट झाली. स्वातंत्र्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी ही भावनिष्ठा स्वातंत्र्य चळवळीला मार्गदर्शक ठरली. भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागाने २१ व २२ मार्च १९९८ या दोन दिवशी ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांची भूमिका (असा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात विविध अभ्यासकांनी सादर केलेले शोधनिबंधाचे संपादन परिसंवाद संचालिका डॉ. नवाझ मोदी यांनी या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषा अनुवाद वासंती फडके यांनी केला. पुस्तकाचे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात राष्ट्रीय चळवळीतील क्रांती स्त्रियांच्या योगदानाविषयी माहिती आहे. येसूबाई सावरकर, कल्पना, क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या व अरुणा असफअली आणि कॅप्टन सेहगल यांच्याविषयक लेख आहे. दुसरा विभाग महात्मा गांधीनी विविध चळवळीत भाग घेऊन बजावणाऱ्या स्त्रिया व त्यांचा चळवळीवर झालेला परिणाम विषयावर आधारित आहे. मणिबेन नानावटी, मृदुला साराभाई, मणिबेन कारा, कमलाबेन पटेल स्वातंत्र्य आणि गुजरातमधील तळ सत्याग्रही कार्यकर्त्या अवंतिकाबाई गोखले यांच्यावर आहेत. प्रत्येक लेखाच्या संदर्भग्रंथाची सूची मराठीत दिली. महत्त्वाच्या विषयावरील अनुवाद मराठी भाषेत आणून प्रकाशकाने साहित्यात मोलाची भर घातली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 24-12-2004

    स्त्रियांची ‘ऐतिहासिक कामगिरी’... मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाने २१ व २२ मार्च १९९८ या काळात ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांची भूमिका या परिसंवादाचं आयोजन केलं होतं. वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्यात आपले निबंध सादर कले. या शोधनिबंधाचं संपादन विभाग प्रमुख डॉ. नवाझ मोदी यांनी केलं आणि इंग्रजीतून एक ग्रंथ सिद्ध केला. याच पुस्तकाचा कराठीत अनुवाद ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रिया’ या शीर्षकाखाली वासंती फडके यांनी केला आहे. डॉ. य. दि. फडके यांनी या परिसंवादात केलेल्या बीजसंभाषणासह हे पुस्तक सिद्ध करण्यात आलं आहे. स्त्री सहभागाच्या चार वेगळ्या पायऱ्या कल्पून तसे चार विभाग पाडण्यात आले आहेत. त्यांना ‘राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारी स्त्रियांचे योगदान’, ‘महात्मा गांधीच्या चळवळीतील स्त्रियांचा सहभाग’, ‘अल्पसंख्याक स्त्रियांचे योगदान’ आणि ‘परदेशी स्त्रियांचे चळवळीतील योगदान’ अशा स्वरूपाची शीर्षक आहेत. त्यावरून त्याला विभागातील लेखांची कल्पना येऊ शकते. इतिहासलेखनात ‘स्त्रियांची कामगिरी मोठ्या प्रमाणात दुर्लक्षिली, विकृत स्वरूपात मांडली गेली आणि मर्यादित केली गेली’, अशी खंत डॉ. य. दि. फडके यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या भागात क्रांतिकारी स्त्रियांच्या संदर्भातील लेखांचा समावेश आहे. त्यामध्ये येसूबाई सावरकर यांनी थेट चळवळीत सहभाग न घेताही पार पाडलेल्या कामगिरीचं चित्र उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी मांडलं आहे. कल्पना दत्त, अरुण असफअली, कॅ. सहगल यांची कामगिरी कौतुकास्पद खरी पण चापेकर बंधूंच्या बायकांची कहाणीही त्यांच्या वेदना समोर मांडणारी आहे. चापेकर बंधूंच्या फाशीनंतर या स्त्रियांचे हाल झाले. त्यांना परंपरागत हिंदू विधवांचे जिणं जगावं लागलं. चार भिंतीआड राहिलेली या स्त्रियांची वेदना चटका लावून जाते. महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात मोठ्या प्रमाणावर स्त्रिया सहभागी झाल्या. सूतकताई, स्वदेशीचा पुरस्कार, परदेशी मालाची होळी, मिठाचा सत्याग्रह असे वेगवेगळे लढ्याचे मार्ग हाताळले सत्याग्रह असे वेगवेगळे लढ्याचे मार्ग हाताळले गेले. त्यात स्त्रिया सामील होत्या. सामान्य स्त्रियांची संख्याही यात लक्षणीय होती. मणिबेन नानावटी, मृदुला साराभाई, मणिबेन कारा, कमलाबेन पटेल, अवंतिकाबाई गोखले अशा अनेक स्त्रियांबद्दलचे यातील लेख त्यांच्या कामगिरीचा सखोल वेध घेणारे आहेत. ब्रिटिशांशी जिद्दीने लढणाऱ्या आणि वेगवेगळ्या स्तरांवरील क्रांतिकार्यात भाग घेणाऱ्या या स्त्रियांची कामगिरी मोलाची होती यात शंकाच नाही. तर पेरीन कॅप्टन, तैयबजी कुटुंबातील स्त्रिया, मिठूबेन पेटिट, खिलाफत चळवळीतील महिला, दलित स्त्रिया अशा अल्पसंख्याक गटातील स्त्रियांचा सहभागाचे मूल्यमापन करणारे लेखही महत्त्वाची माहिती पुरवतात. त्याचप्रमाणे मीराबेन (मॅडेसीन स्लेड), भगिनी निवेदिता, दक्षिण आफ्रिका व गोवा मुक्ती आंदोलनातील स्त्रिया, अ‍ॅनी बेझंट अशा मूळच्या परदेशी असलेल्या स्त्रियांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे मोलही ऐतिहासिक आहे. या सर्वांबद्दलचं या पुस्तकातील लेखन स्वातंत्र्याच्या आंदोलनातील या स्त्रियांची उज्ज्वल कामगिरी अधोरेखित करतं. प्रीता नीलेश, रोहिणी गवाणकर, उषा ठक्कर, लीला पटेल, मृदुला देवस्थळे, यास्मीन लुकमानी, अभिनया गायकवाड अशा अनेकांचे लेख खात आहेत. संशोधकांना, वाचकांना, अभ्यासकांना उपयुक्त असं हे लेखन तरुण पिढीलाही मार्गदर्शक ठरेल असं आहे. २१ व्या शतकातील भारताची उत्तरोत्तर विकासांच्या पथावरून होणारी वाटचाल या सर्व आणि इतर असंख्य अनामिक स्त्रियांच्या विना शक्य झाली नसती ही जाणीव हे लेखन मनात जागी करतं. स्त्रियांचा हा वाटा यापुढच्या इतिहासाला दुर्लक्षित करता येणार नाही. -नंदिनी आत्मसिद्ध ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more