* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WOMEN IN INDIAS FREEDOM STRUGGLE
  • Availability : Available
  • Translators : VASANTI PHADKE
  • ISBN : 9788177663600
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 376
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORK THE WOMEN UNDERTOOK DURING THE FREEDOM FIGHT WAS A BIT EXTENDED FORM OF THEIR USUAL WORK. BUT A FEW OF THESE WOMEN WERE NOT SATISFIED WITH IT, THEY THREW OFF THE LIMITS OF THE TRADITIONS AND STOOD AGAINST THE SECONDARY POSITION OFFERED TO THEM. THEY MIXED THEIR ROLES AS NATIONALIST AND FEMINIST. THEY DID NOT WANT ANY POST OR POWER, THEY SERVED THEIR MOTHERLAND UNSELFISHLY. THEY GAVE A NEW DIMENSION TO THE NATIONAL FREEDOM MOVEMENT ON REGIONAL AND NATIONAL LEVEL. THIS CALLED FOR THE ENTHUSIASM ON A WIDE LEVEL, REGIONAL AS WELL AS STATE. THE HURDLES OF LOCATION, CLASS, CASTE, GENDER AND RELIGION WERE OVERCOME FAST. IT ALSO UNDERLINED THE DEVOTION OF PEOPLE IN THE LIGHT OF EQUALITY, SOCIAL JUSTICE, SECULARISM, AND NATIONALISM. THIS SAME DEVOTION THEN WAS SIPPED THROUGH TO THE CORE OF EVERY INDIAN AND GAVE A BOOST TO THE CONCLUDING NATIONAL FREEDOM MOVEMENT.
स्वातंत्र्य संग्रामातील कार्य हा बहुसंख्य स्त्रियांच्या दृष्टीने त्यांच्या परंपरागत कार्याचा थोडाफार विस्तार होता. तरीही फार थोड्या साहसी स्त्रियांनी परंपरा झुगारून त्यांच्या परंपरागत आणि दुय्यम दर्जाविरुद्ध बंड पुकारले, आणि स्त्रीवादी व राष्ट्रवादी भूमिकांचे एकत्रीकरण केले. कोणतेही पद किंवा सत्ता यांची अभिलाषा न धरता त्यांनी नि:स्वार्थपणे देशसेवा केली. राष्ट्रीय चळवळीला प्रथमच राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्वरूप प्राप्त झाले. परिणामी मोठ्या संख्येने स्थानिक व प्रादेशिक स्तरावर उत्साह दिसून आला. त्यामुळे प्रदेश, वर्ग, जाती, लिंग व धर्म यांचे अडसर भारतीय इतिहासात दीर्घ कालांतराने दूर झालेले दिसले. समानतेच्या तत्त्वज्ञानात, सामाजिक न्यायात, निधर्मीवादात आणि राष्ट्रवादात झिरपलेली पायाभूत भावनिष्ठा स्पष्ट झाली. स्वातंत्र्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी ही भावनिष्ठा सर्वत्र हळूहळू झिरपून चळवळीला मार्गदर्शक ठरली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #NAWAZ B. MODI #VASANTI PHADKE #भारतीयस्वातंत्र्यलढ्यातीलस्त्रिया #WOMENININDIASFREEDOMSTRUGGLE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (KOLHAPUR) 13-04-2003

    स्वातंत्र्य चळवळीला मार्गदर्शक ठरलेली भावनिष्ठा... भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग, कार्य हा बहुसंख्य स्त्रियांच्या दृष्टीने त्यांच्या परंपरागत कार्याचा थोडाफार विस्तार होता. तरीही फार थोड्या साहसी स्त्रियांनी परंपरा झुगारून त्यांच्या परंपरागत णि दुय्यम दर्जाविरुद्ध बंड पुकारले; आणि स्त्रीवादी व राष्ट्रवादी भूमिकांचे एकत्रीकरण केले. कोणतेही पद किंवा सत्ता यांची अभिलाषा न धरता त्यांनी नि:स्वार्थपणे देशसेवा केली. राष्ट्रीय चळवळीला स्थानिक व प्रादेशिक स्तरावर नेण्याचे महत्त्वाचे काम स्त्रियांनी केले. प्रदेश, वर्ग, नाती, लिंग व धर्म या दीर्घकालीन अडसरीचा गुंता उलगडण्याचे काम या चळवळीद्वारे स्त्रियांनी साध्य केले. समानतेच्या तत्त्वज्ञानात, सामाजिक न्यायात, निधर्मीवादात आणि राष्ट्रवादात झिरपलेली पायाभूत भावनिष्ठा स्पष्ट झाली. स्वातंत्र्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी ही भावनिष्ठा स्वातंत्र्य चळवळीला मार्गदर्शक ठरली. भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागाने २१ व २२ मार्च १९९८ या दोन दिवशी ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांची भूमिका (असा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात विविध अभ्यासकांनी सादर केलेले शोधनिबंधाचे संपादन परिसंवाद संचालिका डॉ. नवाझ मोदी यांनी या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषा अनुवाद वासंती फडके यांनी केला. पुस्तकाचे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात राष्ट्रीय चळवळीतील क्रांती स्त्रियांच्या योगदानाविषयी माहिती आहे. येसूबाई सावरकर, कल्पना, क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या व अरुणा असफअली आणि कॅप्टन सेहगल यांच्याविषयक लेख आहे. दुसरा विभाग महात्मा गांधीनी विविध चळवळीत भाग घेऊन बजावणाऱ्या स्त्रिया व त्यांचा चळवळीवर झालेला परिणाम विषयावर आधारित आहे. मणिबेन नानावटी, मृदुला साराभाई, मणिबेन कारा, कमलाबेन पटेल स्वातंत्र्य आणि गुजरातमधील तळ सत्याग्रही कार्यकर्त्या अवंतिकाबाई गोखले यांच्यावर आहेत. प्रत्येक लेखाच्या संदर्भग्रंथाची सूची मराठीत दिली. महत्त्वाच्या विषयावरील अनुवाद मराठी भाषेत आणून प्रकाशकाने साहित्यात मोलाची भर घातली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 24-12-2004

    स्त्रियांची ‘ऐतिहासिक कामगिरी’... मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाने २१ व २२ मार्च १९९८ या काळात ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांची भूमिका या परिसंवादाचं आयोजन केलं होतं. वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्यात आपले निबंध सादर कले. या शोधनिबंधाचं संपादन विभाग प्रमुख डॉ. नवाझ मोदी यांनी केलं आणि इंग्रजीतून एक ग्रंथ सिद्ध केला. याच पुस्तकाचा कराठीत अनुवाद ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रिया’ या शीर्षकाखाली वासंती फडके यांनी केला आहे. डॉ. य. दि. फडके यांनी या परिसंवादात केलेल्या बीजसंभाषणासह हे पुस्तक सिद्ध करण्यात आलं आहे. स्त्री सहभागाच्या चार वेगळ्या पायऱ्या कल्पून तसे चार विभाग पाडण्यात आले आहेत. त्यांना ‘राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारी स्त्रियांचे योगदान’, ‘महात्मा गांधीच्या चळवळीतील स्त्रियांचा सहभाग’, ‘अल्पसंख्याक स्त्रियांचे योगदान’ आणि ‘परदेशी स्त्रियांचे चळवळीतील योगदान’ अशा स्वरूपाची शीर्षक आहेत. त्यावरून त्याला विभागातील लेखांची कल्पना येऊ शकते. इतिहासलेखनात ‘स्त्रियांची कामगिरी मोठ्या प्रमाणात दुर्लक्षिली, विकृत स्वरूपात मांडली गेली आणि मर्यादित केली गेली’, अशी खंत डॉ. य. दि. फडके यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या भागात क्रांतिकारी स्त्रियांच्या संदर्भातील लेखांचा समावेश आहे. त्यामध्ये येसूबाई सावरकर यांनी थेट चळवळीत सहभाग न घेताही पार पाडलेल्या कामगिरीचं चित्र उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी मांडलं आहे. कल्पना दत्त, अरुण असफअली, कॅ. सहगल यांची कामगिरी कौतुकास्पद खरी पण चापेकर बंधूंच्या बायकांची कहाणीही त्यांच्या वेदना समोर मांडणारी आहे. चापेकर बंधूंच्या फाशीनंतर या स्त्रियांचे हाल झाले. त्यांना परंपरागत हिंदू विधवांचे जिणं जगावं लागलं. चार भिंतीआड राहिलेली या स्त्रियांची वेदना चटका लावून जाते. महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात मोठ्या प्रमाणावर स्त्रिया सहभागी झाल्या. सूतकताई, स्वदेशीचा पुरस्कार, परदेशी मालाची होळी, मिठाचा सत्याग्रह असे वेगवेगळे लढ्याचे मार्ग हाताळले सत्याग्रह असे वेगवेगळे लढ्याचे मार्ग हाताळले गेले. त्यात स्त्रिया सामील होत्या. सामान्य स्त्रियांची संख्याही यात लक्षणीय होती. मणिबेन नानावटी, मृदुला साराभाई, मणिबेन कारा, कमलाबेन पटेल, अवंतिकाबाई गोखले अशा अनेक स्त्रियांबद्दलचे यातील लेख त्यांच्या कामगिरीचा सखोल वेध घेणारे आहेत. ब्रिटिशांशी जिद्दीने लढणाऱ्या आणि वेगवेगळ्या स्तरांवरील क्रांतिकार्यात भाग घेणाऱ्या या स्त्रियांची कामगिरी मोलाची होती यात शंकाच नाही. तर पेरीन कॅप्टन, तैयबजी कुटुंबातील स्त्रिया, मिठूबेन पेटिट, खिलाफत चळवळीतील महिला, दलित स्त्रिया अशा अल्पसंख्याक गटातील स्त्रियांचा सहभागाचे मूल्यमापन करणारे लेखही महत्त्वाची माहिती पुरवतात. त्याचप्रमाणे मीराबेन (मॅडेसीन स्लेड), भगिनी निवेदिता, दक्षिण आफ्रिका व गोवा मुक्ती आंदोलनातील स्त्रिया, अ‍ॅनी बेझंट अशा मूळच्या परदेशी असलेल्या स्त्रियांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे मोलही ऐतिहासिक आहे. या सर्वांबद्दलचं या पुस्तकातील लेखन स्वातंत्र्याच्या आंदोलनातील या स्त्रियांची उज्ज्वल कामगिरी अधोरेखित करतं. प्रीता नीलेश, रोहिणी गवाणकर, उषा ठक्कर, लीला पटेल, मृदुला देवस्थळे, यास्मीन लुकमानी, अभिनया गायकवाड अशा अनेकांचे लेख खात आहेत. संशोधकांना, वाचकांना, अभ्यासकांना उपयुक्त असं हे लेखन तरुण पिढीलाही मार्गदर्शक ठरेल असं आहे. २१ व्या शतकातील भारताची उत्तरोत्तर विकासांच्या पथावरून होणारी वाटचाल या सर्व आणि इतर असंख्य अनामिक स्त्रियांच्या विना शक्य झाली नसती ही जाणीव हे लेखन मनात जागी करतं. स्त्रियांचा हा वाटा यापुढच्या इतिहासाला दुर्लक्षित करता येणार नाही. -नंदिनी आत्मसिद्ध ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो