SUNIL DANDEKAR

About Author

Birth Date : 10/09/1958


SUNIL DANDEKAR PASSED OUT IN 1980 FROM COLLEGE OF ENGINEERING PUNE IN MECHANICAL BRANCH. LATER ON, HE COMPLETED GRADUATESHIP IN INDUSTRIAL ENGINEERING FROM INDIAN INSTITUTE OF INDUSTRIAL ENGINEERING, POWAI, AND ALSO GRADUATESHIP IN COST AND WORKS ACCOUNTANCY FROM INSTITUTE OF COST AND WORKS ACCOUNTANTS. IN HIS FORTIES HE COMPLETED A COURSE IN INFORMATION TECHNOLOGY. HE HAS WORKED IN MANY ORGANIZATIONS IN VARIOUS DEPARTMENTS LIKE TOOL ROOM, PRODUCTION PLANNING AND CONTROL, INDUSTRIAL ENGINEERING, MAINTENANCE, INFORMATION SERVICES GROUP IN REPUTED COMPANIES IN PUNE AND ABROAD. HE RETIRED AS A SENIOR VICE PRESIDENT FROM A TIER 1 IT SERVICE PROVIDER ORGANIZATION. BECAUSE OF HIS DEEP LOVE FOR LITERATURE, SUNIL DANDEKAR HAS BEEN WRITING MARATHI STORIES, NOVELETTES FROM HIS COLLEGE DAYS. FOR LAST 5 YEARS HIS STORIES WERE GETTING REGULARLY PUBLISHED IN THE DIWALI EDITIONS OF REPUTED PUBLICATIONS. HE ALSO HAS WRITTEN ONE BOOK CALLED ‘नास्तिकयात्रा’ PUBLISHED BY RAJHANS PRAKASHAN, AND HE HAS THREE PUBLISHED BOOKS ON AMAZON KINDLE. SUNIL DANDEKAR’S INTERESTS ARE READING, WRITING, PLAYING MUSICAL INSTRUMENTS LIKE WOODEN FLUTE AND KEYBOARD, COMPOSING SONGS AND CODING FOR LEARNING NEW TECHNOLOGIES AND IMPLEMENT SOME OF HIS OWN IDEAS.

सुनील दांडेकर यांनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथून 1980 साली यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी ICWA आणि IIIE यासांरख्या अग्रगण्य संस्थांमधून कॉस्ट ॲण्ड वर्क अकाउंटंसी आणि इंडस्टि्यल इंजिनिअरिंगमधून स्नातकाचे अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर काही वर्षांनी नेटवर्क सेंटरड् कॉम्प्युटिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुण्यातील आणि भारताबाहेरच्या अनेक अग्रगण्य संस्थांमध्ये त्यांनी अनेक क्षेत्रात काम केले. सुनील दांडेकर हे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून एका अग्रगण्य संस्थेतून निवृत्त झाले. साहित्यप्रेमामुळे सुनील दांडेकर आपल्या कॉलेज जीवनापासूनच सुनील दांडेकर यांच्या अनेक कथा वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होत गेल्या होत्या. गेल्या पाच एक वर्षांत मराठीतील अग्रगण्य दिवाळी अंकातून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. राजहंस प्रकाशन तर्फे त्यांचे नास्तिकयात्रा हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. तसेच ॲमेझॉन किंडलवर त्यांचे तीन कथा संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. वाचन, लेखन, बासरी आणि कीबोर्ड वाजवणे, गाण्यांचे संगीत नियोजन करणे, स्वांत सुखाय नवीन नवीन तंत्रज्ञान शिकून घेणे आणि प्रोग्रामिंग करणे हे त्यांचे छंद आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AAGAMAN Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more