SUNIL DANDEKAR

About Author

Birth Date : 10/09/1958


SUNIL DANDEKAR PASSED OUT IN 1980 FROM COLLEGE OF ENGINEERING PUNE IN MECHANICAL BRANCH. LATER ON, HE COMPLETED GRADUATESHIP IN INDUSTRIAL ENGINEERING FROM INDIAN INSTITUTE OF INDUSTRIAL ENGINEERING, POWAI, AND ALSO GRADUATESHIP IN COST AND WORKS ACCOUNTANCY FROM INSTITUTE OF COST AND WORKS ACCOUNTANTS. IN HIS FORTIES HE COMPLETED A COURSE IN INFORMATION TECHNOLOGY. HE HAS WORKED IN MANY ORGANIZATIONS IN VARIOUS DEPARTMENTS LIKE TOOL ROOM, PRODUCTION PLANNING AND CONTROL, INDUSTRIAL ENGINEERING, MAINTENANCE, INFORMATION SERVICES GROUP IN REPUTED COMPANIES IN PUNE AND ABROAD. HE RETIRED AS A SENIOR VICE PRESIDENT FROM A TIER 1 IT SERVICE PROVIDER ORGANIZATION. BECAUSE OF HIS DEEP LOVE FOR LITERATURE, SUNIL DANDEKAR HAS BEEN WRITING MARATHI STORIES, NOVELETTES FROM HIS COLLEGE DAYS. FOR LAST 5 YEARS HIS STORIES WERE GETTING REGULARLY PUBLISHED IN THE DIWALI EDITIONS OF REPUTED PUBLICATIONS. HE ALSO HAS WRITTEN ONE BOOK CALLED ‘नास्तिकयात्रा’ PUBLISHED BY RAJHANS PRAKASHAN, AND HE HAS THREE PUBLISHED BOOKS ON AMAZON KINDLE. SUNIL DANDEKAR’S INTERESTS ARE READING, WRITING, PLAYING MUSICAL INSTRUMENTS LIKE WOODEN FLUTE AND KEYBOARD, COMPOSING SONGS AND CODING FOR LEARNING NEW TECHNOLOGIES AND IMPLEMENT SOME OF HIS OWN IDEAS.

सुनील दांडेकर यांनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथून 1980 साली यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी ICWA आणि IIIE यासांरख्या अग्रगण्य संस्थांमधून कॉस्ट ॲण्ड वर्क अकाउंटंसी आणि इंडस्टि्यल इंजिनिअरिंगमधून स्नातकाचे अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर काही वर्षांनी नेटवर्क सेंटरड् कॉम्प्युटिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुण्यातील आणि भारताबाहेरच्या अनेक अग्रगण्य संस्थांमध्ये त्यांनी अनेक क्षेत्रात काम केले. सुनील दांडेकर हे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून एका अग्रगण्य संस्थेतून निवृत्त झाले. साहित्यप्रेमामुळे सुनील दांडेकर आपल्या कॉलेज जीवनापासूनच सुनील दांडेकर यांच्या अनेक कथा वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होत गेल्या होत्या. गेल्या पाच एक वर्षांत मराठीतील अग्रगण्य दिवाळी अंकातून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. राजहंस प्रकाशन तर्फे त्यांचे नास्तिकयात्रा हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. तसेच ॲमेझॉन किंडलवर त्यांचे तीन कथा संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. वाचन, लेखन, बासरी आणि कीबोर्ड वाजवणे, गाण्यांचे संगीत नियोजन करणे, स्वांत सुखाय नवीन नवीन तंत्रज्ञान शिकून घेणे आणि प्रोग्रामिंग करणे हे त्यांचे छंद आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AAGAMAN Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more