* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MERA MUJHMEIN KUCHH NAHIN
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177666823
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS THE VALUE OF MEDITATION AND PRAYER IN DEVOTION? ASKS KABIR. MEDITATION AND PRAYER ARE TWO DIFFERENT ASPECTS. PRAYER SIGNIFIES THE FEELINGS WHILE MEDITATION SIGNIFIES THE MIND. PRAYER STARTS FROM THE BASE OF THE HEART. IT TAKES THE LOVE HIDDEN UNDERNEATH ON AN UNIVERSAL LEVEL. AT THAT MOMENT THE ME DIES WITHIN. MEDITATION STARTS FROM THE BRAIN. IT ALTOGETHER STOPS THE THINKING PROCESS. AS ONE GOES ON MEDITATING, PRAYER STARTS DISCLOSING AUTOMATICALLY AND AS THE PRAYER INCREASES, THE MEDITATION STARTS DISCLOSING. THEN, AT ONE PRECISE MOMENT THEY BOTH DISSOLVE INTO ONE ANOTHER. THIS IS DEVOTION. THIS BOOK INCLUDES THE INTERPRETATION OF KABIR WRITING BY OSHO. THIS WILL SURELY ANSWER MANY QUESTIONS IN THE MINDS OF DEVOTEES ON THE PATH OF DEVOTION.
कबीराच्या मते भक्तिसाधनेमध्ये ध्यान आणि प्रार्थनेचं काय स्थान आहे? ध्यान आणि प्रार्थना हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. प्रार्थना ही भावदशा आहे; तर ध्यान ही चित्तदशा आहे. प्रार्थनेचा प्रवास हृदयातून सुरू होतो. प्रार्थना हृदयातील प्रेमाला वैयक्तिक पातळीवरून वैश्विक पातळीवर नेते. तेव्हाच प्रार्थना करणारा `मी` संपून जातो. ध्यानाचा उगम मस्तकातून सुरू होतो. ध्यानाने मस्तकातील विचारच संपून जातात. जसजसे ध्यान वाढू लागते तसतशी प्रार्थना प्रकट होऊ लागते आणि जशीजशी प्रार्थना वाढू लागते तसतसे ध्यान प्रकट होऊ लागते. शेवटी असा क्षण येतो की, ध्यान आणि प्रार्थना एकमेकात विलीन होऊन जातात. याच अवस्थेला भक्ती म्हणतात. कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन या पुस्तकात समाविष्ट केले आहे. भक्ती मार्गावर वाटचाल करणा-यांच्या मनातील प्रश्नांची सविस्तर उत्तरे या पुस्तकातून निश्चितच मिळतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 12-11-2006

    ओशोंच्या मुखातून कबीरवाणी!... ‘ओशो’ नाव घेतलं की भारतीय मनासमोर धर्माच्या विरोधात बंड करून उठलेली आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. अशी सर्रास धारणा असलेल्या व्यक्तींनी एकतर ओशोंचं साहित्य वाचलेलं नसतं किंवा त्याबद्दल ते वचलेल्यांकडून काही ऐकलेलंही नसतं. एक गॉसिप म्हणून ओशो बऱ्याचवेळा चघळले जातात. पण वस्तुस्थिती तर अशी आहे की, फ्रेडरिक नित्शे फ्रॉइड, रामकृष्ण, राजकारण, समाजकारण अशा सर्व विषयांवर अधिकारवाणीने मार्गदर्शन ओशोंनी केलंय. त्यांच्यावर धर्माच्या विपरित शिकवण केल्याचा आरोप केला जातो. तर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ त्यामुळे अनेक संतांचे दाखले, त्यांचे विचार ओशो आपली धार्मिकता विषद करण्यासाठी मांडतात. दोह्यांमुळे आपल्याला माहिती असलेल्या कबीरांवर त्यांनी दिलेली व्याख्याने ‘मृत्यू अमृताचे द्वार’, ‘माझे माझ्यापाशी काही नाही’ आणि ‘भक्तीत भिजला कबीर’ या पुस्तकात संग्रहित करण्यात आली आहेत. ओशोंचा मुख्य विषय नेहमीप्रमाणेच परमेश्वर आणि मानव असा आहे. त्या ईश्वराला शोधण्यासाठी बाहेर नाही तर आत बघायला पाहिजे, हा उपदेश सर्वमान्य असला तरी सर्वसामान्यांच्या काही तो गळी उतरत नाही. पण कबिराच्या दोह्यांमध्ये नीट डोकावून बघितलं तर लक्षात येतं, परमेश्वर कसा आहे; तर तो जिथे हवा तिथे तसा आहे. आणि हे असं का आहे, हे ओशो मग अत्यंत रंजक अशा भाषेत पानापानात समजावत राहतात. या आशेने की, कधीतरी आपल्या मनातला अंधकार दूर होईल आणि या प्रचंड विश्वातल्या आपल्या आणि ईश्वराच्या बाबतीतल्या सत्य स्वरुपाचं आपल्याला ज्ञान होईल. साधारणपणे कुठलाही धार्मिक विषय हा रुक्ष असतो. एकदम कपाळावर भरपूर आठ्या घालून विश्वाचं ओझं आपल्याच डोक्यावर असल्यासारखी भावमुद्रा बुवांना आणि भक्तांना म्हणजे आपल्याला वागवावीच लागते. पण ओशोंच्या धार्मिकतेत मात्र निखळ विनोदाला स्थान आहे, समाजाच्या सबलीकरणाला स्थान आहे, शांततेला स्थान आहे, नृत्याला स्थान आहे. संगीताला स्थान आहे, थोडक्यात म्हणजे जीवनाला स्थान आहे. आणि जीवन आहे तर मृत्यूही आहे. या वास्तवाची जाणीव ज्यादिवशी खऱ्या अर्थी आपल्याला होते, त्यावेळी जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. मृत्यू आहे म्हणून जीवनाला काही अर्थ आहे. हे पटतं. मग कबीराचं ‘सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते’ हे वचन आपल्याला आतल्या प्रवासाला जायला उद्युक्त करतं. लोकांनी आतल्या प्रवासाला सुरुवात करावी या उद्देशाने, धार्मिक बनावं या हेतूने असे हे कबीर आपल्याला ओशो या तीन पुस्तकांतून समजावून देतात. त्यामुळे अक्षरश: प्रत्येक व्यक्तीने ही पुस्तकं वाचणं ‘मस्ट’च आहे. -योगेश मेहेंदळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो