* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GUNGE KERI SARKARA
  • Availability : Available
  • Translators : MEENA TAKALKAR
  • ISBN : 9788177665352
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OSHO ELUCIDATES VERY SWEETLY KABIR`S MEANINGFUL AND BEAUTIFUL `DOHA` IN THIS BOOK. THE IMPORTANCE OF LOVE IS IMMENSE, RIGHT FROM THE BEGINNING OF THE LIFE TILL OBTAINING THE GLIMPSE OF THE VIBRANT SUPREME SPIRIT. KABIR VERY DELICATELY EXPLAINS THE MEANING OF LOVE AT THE SAME TIME TAKING US TO THE HIGHEST STEPS. LOVE IS GOD, ONLY THING REMAINS FOR US TO DO IS TO FIND TRUE LOVE. AS LOVE LOSES ITS MIGHT FROM OUR MIND WE START FILLING OUR LIFE WITH PHYSICAL PLEASURES. AS LOVE STARTS RULING OUR MIND, ALL THESE MATERIALISTIC THINGS START TO DISAPPEAR. THE `SUPREME SPIRIT` ITSELF DESCENDS IN FRONT OF US. THE TRUE MEANING OF LIFE IS TRANSFORMATION OF `ONE`S OWN`. THE ART TO IMMERSE OUR EGO. THOSE WHO ARE ABLE TO SHED THEIR EGO, WILL EXPERIENCE THE LOVE POURING DOWN ON THEM FROM ALL SIDES. YOUTH! IT IS OF BODY, IT COMES AND GOES. BUT YOUTH OF A SOUL IS THAT OF THE DIVINE POWER. IT IS ETERNAL. THE MOMENT YOU REALIZE THIS, YOU WILL EXPERIENCE A COOLNESS, YOU WILL POSSESS A FORETASTE OF THE UNIQUE FORM OF YOUTH, THAT OF THE SOUL. IT WILL NEVER LAPSE, LEAVE YOU, NEVER BECOME OLD OR EXTINCT. THE MOMENT YOU ACHIEVE THIS VISION OF SEEING THROUGH YOUR SOUL, THEN EVERYTHING AROUND WILL CHANGE. THERE WILL BE NO DIFFERENCES, NO WALLS HOLDING FROM EACH OTHER. YOU WILL FIND THE PRESENCE OF ONLY LOVE, THE AIR AROUND YOU WILL BE FULL OF LOVE. IT WILL BE INFINITE LOVE EVERYWHERE, NEVER ENDING SHOW OF LOVE, AND FROM THERE, FINALLY, YOU WILL BE ABLE TO NOTICE THE VASTNESS OF THE SKY.
कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन. जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेट अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात. प्रेमच ईश्वर आहे. खरा प्रश्न प्रेमाचा शोध घेण्याचा. मनातून प्रेम जसे हरवायला लागते, तसे जीवन भौतिक गोष्टींनी भरून जाते. जसे प्रेम वाढायला लागते, तशा भौतिक गोष्टी नष्ट होतात आणि साक्षात परमेश्वर अवतरतो. प्रेमाचा अर्थ आहे `स्व`चे रूपांतर. आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला. जॉ कोणी आपला अहंकार सोडेल, त्याच्यावर प्रेमाचे ढग बरसतील. तारूण्य! जे शरीराचे आहे, ते येते आणि निघून जाते. पण आत्म्याचे तारुण्य जे परमसत्तेचे आहे, ते शाश्वत आहे. ह्या स्वतःतल्या शांतीमध्येडुबून गेल्यावर तुम्हाला मिळेल एक नवीन तारुण्याची झलक. एक असे यौवन, जे कधीही सरणार नाही, जे कधीही म्हातारे होणार नाही! अशी आत्मदृष्टी प्राप्त झाल्यावर सारेकाही बदलून जाते. मग कोणतेही मतभेद, कोणत्याही भिंती उरत नाहीत. जेथे फक्त प्रेमाचा आविर्भाव होत आहे. जेथे फक्त प्रेमच आहे अनंत प्रेमच आहे आणि जेथे अहर्निश प्रेमाचे नृत्य चालू आहे तेथूनच अनंत आकाशाची भव्यता तुम्हाला दिसेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MUGDHA KAHANI PREMACHI #RELIGIOUS & SPIRITUALS#MEENA TAKALKAR #OSHO #BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%"
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 30-01-2005

    कबीरांच्या भावात्म दोह्यांवरील रसाळ विवेचन... ‘म्हणे कबीर दिवाणा’ या कबीरावरील प्रवचनांच्या पुस्तकानंतर ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या मीना टाकळकर यांनी अनुवादित केलेले कबीरांच्या काव्यावरील ओशोंचे आणखी एक पुस्तक मराठी रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मेता पब्लिशिंग हाऊसचे आभार मानावयास हवेत. ओशो या भाष्यकाराची साक्षात्काराची देणगी, स्वत:चा शोध, ध्यानसूत्र, नवी पहाट, एक एक पाऊल, हसतखेळत ध्यानसाधना ही पुस्तके मराठीत भाषांतरित व अनुवादित करून रसिकांना तृप्त केले आहे. हिंदी साहित्याच्या इतिहासातील भक्तिकाळ हा सुवर्णकाळ मानला जातो. या साहित्याला सुवर्णत्व प्राप्त करून देण्यात कबीरांचे योगदान मोठे आहे. कबीरदास हे सूरदास व तुलसीदासांबरोबरचे कवी असले, तरी त्यांच्यापासून खूपच निराळे होते; आहेत! परखड आहेत, स्पष्ट वक्ते आहेत. सत्यकथनाची त्यांची इच्छा इतकी उत्कट असते की, ते कोणाचीही पर्वा न करता, चिंता न करता सरळ बोलून टाकतात. त्याची प्रचीती ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’मध्ये जागोजागी आल्यावाचून राहत नाही. ओशोही महान भाष्यकार आहेत. त्यांचे सारेच साहित्य अप्रतिम आहे. ओशोंच्या प्रत्येक प्रवचनात तत्त्वज्ञान आणि काव्य यांचे अपूर्व मीलन अनुभवावयास मिळते. त्यांच्या वक्तव्यात शास्त्रांची दुर्बोधता व तत्त्वज्ञानाची शुष्कता जाणवत नाही. त्यांचे भाष्य अत्यंत तर्कशुद्ध, सर्वस्पर्शी चिंतन असते. त्यांच्या वाणीत अत्यंत सहजपणा व साधेपणा जाणवतो. कबीराच्या दोह्यांवर तर भाष्य करताना त्यांची वाणी अमृतमय होऊन जाते. तेव्हा श्रेष्ठ कबीर वाणी आणि ओशोंची अप्रतिम भाष्यवाणी यांचा मनोहर संगम, ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचत असताना प्रकर्षाने अनुभवावयास मिळतो. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकास ‘प्रेमाची न सांगितलेली गोष्ट’ यापासून सुरुवात होते. ‘पोथी पढ पढ जग मुवा, पंडित भया न कोया ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होया ।। येथपासून ‘साधो धोखा कासूं कहिये’ या सद्गुरूचा तेजोमय प्रकाश या सातव्या दोह्यांवर ओशोंनी केलेली भाष्ये वर्णनातीत आहेत. जीवन हा एक उत्सव आहे. त्यामध्ये मिसळून जायचे असते. जीवन एक नृत्य आहे. जीवन ही एक कविता आहे, ती गायची आणि गुणगुणायची असते. जीवनाचा प्रवाह वाहतो आहे. त्यामध्ये तुम्ही उतरा. तुम्ही त्यापासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही जितके बाजूला जाल तितकाच जीवनाशी तुमचा संबंध तुटून जाईल. ‘साधो धोखा कासूं कहिये.’ कबीर म्हणतात, कोणाला सांगणार? कोण धोका देत आहे? रोग तुम्हीच निर्माण केला आहे. धोका दुसऱ्या कोणी दिला असता, तर आपल्या खांद्यावरचे ओझे उतरले असते. यातली गंमत ही आहे की, तुम्हीच निर्माण करता आणि पुन्हा ते सोडविण्याचे प्रयत्नही तुम्हीच करता! धोका देणारे तुम्हीच आहात, हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत जीवनातल्या समस्या नीट सोडवू शकणार नाही. तुम्ही आहात तेथेच भटकत राहाल! तुमचा एक कणभरही विकास झालेला नसेल. या साऱ्या खेळात तुम्हीच आहात. तुम्हीच अभिनेता, तुम्हीच कथाकार, तुम्हीच दिग्दर्शक आणि तुम्हीच प्रेक्षक! हा जीवनाचा खेळ तुमचा तुम्हीच रचला आहे! मग कोणाला सांगणार? ‘साधो धोखा कासूं कहिये!’ ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ, तसेच मलपृष्ठ अत्यंत बोलके आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारलेले मुखपृष्ठ अत्यंत साधे, पण तितकेच अर्थपूर्ण आहे. या पुस्तकाची सुरुवातही आपणास चिंतन करावयास प्रवृत्त करते! सुरुवात अशी आहे– ‘मी तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो आणि त्यानंतर एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात येते की, तुमच्याजवळ काहीतरी होते आणि ते हरवले आहे.’ हे पहिलेच वाक्य वाचल्यावर वाचक सावध होतो आणि विचार करू लागतो की, खरंच आपलं काहीतरी हरवलं आहे का? सत्याच्या शोधाची ही प्रस्तावना मोठी आकर्षक आणि मनोवेधक आहे. मुग्ध कहाणी प्रेमाची रसिकांना प्रेमाच्या अंतरंगात घेऊन जाते आणि कोणताही आडपडदा न ठेवता प्रेमा तुझा रंग कसा, हे दर्शविते! ‘आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला आहे प्रेम, हे सांगते आणि त्याच्या अनुभव घेण्यास प्रवृत्त करते! प्रेमाचा एक गूढगुपित अर्थ सांगणारी ही कहाणी नक्कीच रसिकांना भावेल. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचताना कोठेही कंटाळा येत नाही. उलट विषयाची उत्सुकता व ओढ वाढत जाते. रजनीशांनी प्रवचनातून दिलेले दाखले, सांगितलेल्या गोष्टी व किस्से, तसेच दिलेले दृष्टान्त मांडलेल्या विषयाला पाठबळ देतात व विषयाचा जडपणा हलका करण्यास मदत करतात. हे पुस्तक कोठूनही वाचावे, कोणतेही पान उघडावे व वाचनास प्रारंभ करावा, असे आहे. मीना टाकळकरांनी अनुवाद अत्यंत सहजतेने व भावपूर्णपणे केला आहे. ओशो रसाळ मराठी भाषेत प्रवचन करीत आहेत, असे वाटावे इतका अनुवाद सरस आहे. -डॉ. सुरेश करंदीकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more