* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GUNGE KERI SARKARA
  • Availability : Available
  • Translators : MEENA TAKALKAR
  • ISBN : 9788177665352
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO BIRTHDAY OFFER-37 BOOKS
    OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OSHO ELUCIDATES VERY SWEETLY KABIR`S MEANINGFUL AND BEAUTIFUL `DOHA` IN THIS BOOK. THE IMPORTANCE OF LOVE IS IMMENSE, RIGHT FROM THE BEGINNING OF THE LIFE TILL OBTAINING THE GLIMPSE OF THE VIBRANT SUPREME SPIRIT. KABIR VERY DELICATELY EXPLAINS THE MEANING OF LOVE AT THE SAME TIME TAKING US TO THE HIGHEST STEPS. LOVE IS GOD, ONLY THING REMAINS FOR US TO DO IS TO FIND TRUE LOVE. AS LOVE LOSES ITS MIGHT FROM OUR MIND WE START FILLING OUR LIFE WITH PHYSICAL PLEASURES. AS LOVE STARTS RULING OUR MIND, ALL THESE MATERIALISTIC THINGS START TO DISAPPEAR. THE `SUPREME SPIRIT` ITSELF DESCENDS IN FRONT OF US. THE TRUE MEANING OF LIFE IS TRANSFORMATION OF `ONE`S OWN`. THE ART TO IMMERSE OUR EGO. THOSE WHO ARE ABLE TO SHED THEIR EGO, WILL EXPERIENCE THE LOVE POURING DOWN ON THEM FROM ALL SIDES. YOUTH! IT IS OF BODY, IT COMES AND GOES. BUT YOUTH OF A SOUL IS THAT OF THE DIVINE POWER. IT IS ETERNAL. THE MOMENT YOU REALIZE THIS, YOU WILL EXPERIENCE A COOLNESS, YOU WILL POSSESS A FORETASTE OF THE UNIQUE FORM OF YOUTH, THAT OF THE SOUL. IT WILL NEVER LAPSE, LEAVE YOU, NEVER BECOME OLD OR EXTINCT. THE MOMENT YOU ACHIEVE THIS VISION OF SEEING THROUGH YOUR SOUL, THEN EVERYTHING AROUND WILL CHANGE. THERE WILL BE NO DIFFERENCES, NO WALLS HOLDING FROM EACH OTHER. YOU WILL FIND THE PRESENCE OF ONLY LOVE, THE AIR AROUND YOU WILL BE FULL OF LOVE. IT WILL BE INFINITE LOVE EVERYWHERE, NEVER ENDING SHOW OF LOVE, AND FROM THERE, FINALLY, YOU WILL BE ABLE TO NOTICE THE VASTNESS OF THE SKY.
कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन. जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेट अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात. प्रेमच ईश्वर आहे. खरा प्रश्न प्रेमाचा शोध घेण्याचा. मनातून प्रेम जसे हरवायला लागते, तसे जीवन भौतिक गोष्टींनी भरून जाते. जसे प्रेम वाढायला लागते, तशा भौतिक गोष्टी नष्ट होतात आणि साक्षात परमेश्वर अवतरतो. प्रेमाचा अर्थ आहे `स्व`चे रूपांतर. आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला. जॉ कोणी आपला अहंकार सोडेल, त्याच्यावर प्रेमाचे ढग बरसतील. तारूण्य! जे शरीराचे आहे, ते येते आणि निघून जाते. पण आत्म्याचे तारुण्य जे परमसत्तेचे आहे, ते शाश्वत आहे. ह्या स्वतःतल्या शांतीमध्येडुबून गेल्यावर तुम्हाला मिळेल एक नवीन तारुण्याची झलक. एक असे यौवन, जे कधीही सरणार नाही, जे कधीही म्हातारे होणार नाही! अशी आत्मदृष्टी प्राप्त झाल्यावर सारेकाही बदलून जाते. मग कोणतेही मतभेद, कोणत्याही भिंती उरत नाहीत. जेथे फक्त प्रेमाचा आविर्भाव होत आहे. जेथे फक्त प्रेमच आहे अनंत प्रेमच आहे आणि जेथे अहर्निश प्रेमाचे नृत्य चालू आहे तेथूनच अनंत आकाशाची भव्यता तुम्हाला दिसेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MUGDHA KAHANI PREMACHI #RELIGIOUS & SPIRITUALS#MEENA TAKALKAR #OSHO #BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%"
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 30-01-2005

    कबीरांच्या भावात्म दोह्यांवरील रसाळ विवेचन... ‘म्हणे कबीर दिवाणा’ या कबीरावरील प्रवचनांच्या पुस्तकानंतर ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या मीना टाकळकर यांनी अनुवादित केलेले कबीरांच्या काव्यावरील ओशोंचे आणखी एक पुस्तक मराठी रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मेता पब्लिशिंग हाऊसचे आभार मानावयास हवेत. ओशो या भाष्यकाराची साक्षात्काराची देणगी, स्वत:चा शोध, ध्यानसूत्र, नवी पहाट, एक एक पाऊल, हसतखेळत ध्यानसाधना ही पुस्तके मराठीत भाषांतरित व अनुवादित करून रसिकांना तृप्त केले आहे. हिंदी साहित्याच्या इतिहासातील भक्तिकाळ हा सुवर्णकाळ मानला जातो. या साहित्याला सुवर्णत्व प्राप्त करून देण्यात कबीरांचे योगदान मोठे आहे. कबीरदास हे सूरदास व तुलसीदासांबरोबरचे कवी असले, तरी त्यांच्यापासून खूपच निराळे होते; आहेत! परखड आहेत, स्पष्ट वक्ते आहेत. सत्यकथनाची त्यांची इच्छा इतकी उत्कट असते की, ते कोणाचीही पर्वा न करता, चिंता न करता सरळ बोलून टाकतात. त्याची प्रचीती ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’मध्ये जागोजागी आल्यावाचून राहत नाही. ओशोही महान भाष्यकार आहेत. त्यांचे सारेच साहित्य अप्रतिम आहे. ओशोंच्या प्रत्येक प्रवचनात तत्त्वज्ञान आणि काव्य यांचे अपूर्व मीलन अनुभवावयास मिळते. त्यांच्या वक्तव्यात शास्त्रांची दुर्बोधता व तत्त्वज्ञानाची शुष्कता जाणवत नाही. त्यांचे भाष्य अत्यंत तर्कशुद्ध, सर्वस्पर्शी चिंतन असते. त्यांच्या वाणीत अत्यंत सहजपणा व साधेपणा जाणवतो. कबीराच्या दोह्यांवर तर भाष्य करताना त्यांची वाणी अमृतमय होऊन जाते. तेव्हा श्रेष्ठ कबीर वाणी आणि ओशोंची अप्रतिम भाष्यवाणी यांचा मनोहर संगम, ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचत असताना प्रकर्षाने अनुभवावयास मिळतो. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकास ‘प्रेमाची न सांगितलेली गोष्ट’ यापासून सुरुवात होते. ‘पोथी पढ पढ जग मुवा, पंडित भया न कोया ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होया ।। येथपासून ‘साधो धोखा कासूं कहिये’ या सद्गुरूचा तेजोमय प्रकाश या सातव्या दोह्यांवर ओशोंनी केलेली भाष्ये वर्णनातीत आहेत. जीवन हा एक उत्सव आहे. त्यामध्ये मिसळून जायचे असते. जीवन एक नृत्य आहे. जीवन ही एक कविता आहे, ती गायची आणि गुणगुणायची असते. जीवनाचा प्रवाह वाहतो आहे. त्यामध्ये तुम्ही उतरा. तुम्ही त्यापासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही जितके बाजूला जाल तितकाच जीवनाशी तुमचा संबंध तुटून जाईल. ‘साधो धोखा कासूं कहिये.’ कबीर म्हणतात, कोणाला सांगणार? कोण धोका देत आहे? रोग तुम्हीच निर्माण केला आहे. धोका दुसऱ्या कोणी दिला असता, तर आपल्या खांद्यावरचे ओझे उतरले असते. यातली गंमत ही आहे की, तुम्हीच निर्माण करता आणि पुन्हा ते सोडविण्याचे प्रयत्नही तुम्हीच करता! धोका देणारे तुम्हीच आहात, हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत जीवनातल्या समस्या नीट सोडवू शकणार नाही. तुम्ही आहात तेथेच भटकत राहाल! तुमचा एक कणभरही विकास झालेला नसेल. या साऱ्या खेळात तुम्हीच आहात. तुम्हीच अभिनेता, तुम्हीच कथाकार, तुम्हीच दिग्दर्शक आणि तुम्हीच प्रेक्षक! हा जीवनाचा खेळ तुमचा तुम्हीच रचला आहे! मग कोणाला सांगणार? ‘साधो धोखा कासूं कहिये!’ ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ, तसेच मलपृष्ठ अत्यंत बोलके आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारलेले मुखपृष्ठ अत्यंत साधे, पण तितकेच अर्थपूर्ण आहे. या पुस्तकाची सुरुवातही आपणास चिंतन करावयास प्रवृत्त करते! सुरुवात अशी आहे– ‘मी तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो आणि त्यानंतर एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात येते की, तुमच्याजवळ काहीतरी होते आणि ते हरवले आहे.’ हे पहिलेच वाक्य वाचल्यावर वाचक सावध होतो आणि विचार करू लागतो की, खरंच आपलं काहीतरी हरवलं आहे का? सत्याच्या शोधाची ही प्रस्तावना मोठी आकर्षक आणि मनोवेधक आहे. मुग्ध कहाणी प्रेमाची रसिकांना प्रेमाच्या अंतरंगात घेऊन जाते आणि कोणताही आडपडदा न ठेवता प्रेमा तुझा रंग कसा, हे दर्शविते! ‘आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला आहे प्रेम, हे सांगते आणि त्याच्या अनुभव घेण्यास प्रवृत्त करते! प्रेमाचा एक गूढगुपित अर्थ सांगणारी ही कहाणी नक्कीच रसिकांना भावेल. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचताना कोठेही कंटाळा येत नाही. उलट विषयाची उत्सुकता व ओढ वाढत जाते. रजनीशांनी प्रवचनातून दिलेले दाखले, सांगितलेल्या गोष्टी व किस्से, तसेच दिलेले दृष्टान्त मांडलेल्या विषयाला पाठबळ देतात व विषयाचा जडपणा हलका करण्यास मदत करतात. हे पुस्तक कोठूनही वाचावे, कोणतेही पान उघडावे व वाचनास प्रारंभ करावा, असे आहे. मीना टाकळकरांनी अनुवाद अत्यंत सहजतेने व भावपूर्णपणे केला आहे. ओशो रसाळ मराठी भाषेत प्रवचन करीत आहेत, असे वाटावे इतका अनुवाद सरस आहे. -डॉ. सुरेश करंदीकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more