* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GUNGE KERI SARKARA
  • Availability : Available
  • Translators : MEENA TAKALKAR
  • ISBN : 9788177665352
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OSHO ELUCIDATES VERY SWEETLY KABIR`S MEANINGFUL AND BEAUTIFUL `DOHA` IN THIS BOOK. THE IMPORTANCE OF LOVE IS IMMENSE, RIGHT FROM THE BEGINNING OF THE LIFE TILL OBTAINING THE GLIMPSE OF THE VIBRANT SUPREME SPIRIT. KABIR VERY DELICATELY EXPLAINS THE MEANING OF LOVE AT THE SAME TIME TAKING US TO THE HIGHEST STEPS. LOVE IS GOD, ONLY THING REMAINS FOR US TO DO IS TO FIND TRUE LOVE. AS LOVE LOSES ITS MIGHT FROM OUR MIND WE START FILLING OUR LIFE WITH PHYSICAL PLEASURES. AS LOVE STARTS RULING OUR MIND, ALL THESE MATERIALISTIC THINGS START TO DISAPPEAR. THE `SUPREME SPIRIT` ITSELF DESCENDS IN FRONT OF US. THE TRUE MEANING OF LIFE IS TRANSFORMATION OF `ONE`S OWN`. THE ART TO IMMERSE OUR EGO. THOSE WHO ARE ABLE TO SHED THEIR EGO, WILL EXPERIENCE THE LOVE POURING DOWN ON THEM FROM ALL SIDES. YOUTH! IT IS OF BODY, IT COMES AND GOES. BUT YOUTH OF A SOUL IS THAT OF THE DIVINE POWER. IT IS ETERNAL. THE MOMENT YOU REALIZE THIS, YOU WILL EXPERIENCE A COOLNESS, YOU WILL POSSESS A FORETASTE OF THE UNIQUE FORM OF YOUTH, THAT OF THE SOUL. IT WILL NEVER LAPSE, LEAVE YOU, NEVER BECOME OLD OR EXTINCT. THE MOMENT YOU ACHIEVE THIS VISION OF SEEING THROUGH YOUR SOUL, THEN EVERYTHING AROUND WILL CHANGE. THERE WILL BE NO DIFFERENCES, NO WALLS HOLDING FROM EACH OTHER. YOU WILL FIND THE PRESENCE OF ONLY LOVE, THE AIR AROUND YOU WILL BE FULL OF LOVE. IT WILL BE INFINITE LOVE EVERYWHERE, NEVER ENDING SHOW OF LOVE, AND FROM THERE, FINALLY, YOU WILL BE ABLE TO NOTICE THE VASTNESS OF THE SKY.
कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन. जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेट अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात. प्रेमच ईश्वर आहे. खरा प्रश्न प्रेमाचा शोध घेण्याचा. मनातून प्रेम जसे हरवायला लागते, तसे जीवन भौतिक गोष्टींनी भरून जाते. जसे प्रेम वाढायला लागते, तशा भौतिक गोष्टी नष्ट होतात आणि साक्षात परमेश्वर अवतरतो. प्रेमाचा अर्थ आहे `स्व`चे रूपांतर. आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला. जॉ कोणी आपला अहंकार सोडेल, त्याच्यावर प्रेमाचे ढग बरसतील. तारूण्य! जे शरीराचे आहे, ते येते आणि निघून जाते. पण आत्म्याचे तारुण्य जे परमसत्तेचे आहे, ते शाश्वत आहे. ह्या स्वतःतल्या शांतीमध्येडुबून गेल्यावर तुम्हाला मिळेल एक नवीन तारुण्याची झलक. एक असे यौवन, जे कधीही सरणार नाही, जे कधीही म्हातारे होणार नाही! अशी आत्मदृष्टी प्राप्त झाल्यावर सारेकाही बदलून जाते. मग कोणतेही मतभेद, कोणत्याही भिंती उरत नाहीत. जेथे फक्त प्रेमाचा आविर्भाव होत आहे. जेथे फक्त प्रेमच आहे अनंत प्रेमच आहे आणि जेथे अहर्निश प्रेमाचे नृत्य चालू आहे तेथूनच अनंत आकाशाची भव्यता तुम्हाला दिसेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MUGDHA KAHANI PREMACHI #RELIGIOUS & SPIRITUALS#MEENA TAKALKAR #OSHO #BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%"
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 30-01-2005

    कबीरांच्या भावात्म दोह्यांवरील रसाळ विवेचन... ‘म्हणे कबीर दिवाणा’ या कबीरावरील प्रवचनांच्या पुस्तकानंतर ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या मीना टाकळकर यांनी अनुवादित केलेले कबीरांच्या काव्यावरील ओशोंचे आणखी एक पुस्तक मराठी रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मेता पब्लिशिंग हाऊसचे आभार मानावयास हवेत. ओशो या भाष्यकाराची साक्षात्काराची देणगी, स्वत:चा शोध, ध्यानसूत्र, नवी पहाट, एक एक पाऊल, हसतखेळत ध्यानसाधना ही पुस्तके मराठीत भाषांतरित व अनुवादित करून रसिकांना तृप्त केले आहे. हिंदी साहित्याच्या इतिहासातील भक्तिकाळ हा सुवर्णकाळ मानला जातो. या साहित्याला सुवर्णत्व प्राप्त करून देण्यात कबीरांचे योगदान मोठे आहे. कबीरदास हे सूरदास व तुलसीदासांबरोबरचे कवी असले, तरी त्यांच्यापासून खूपच निराळे होते; आहेत! परखड आहेत, स्पष्ट वक्ते आहेत. सत्यकथनाची त्यांची इच्छा इतकी उत्कट असते की, ते कोणाचीही पर्वा न करता, चिंता न करता सरळ बोलून टाकतात. त्याची प्रचीती ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’मध्ये जागोजागी आल्यावाचून राहत नाही. ओशोही महान भाष्यकार आहेत. त्यांचे सारेच साहित्य अप्रतिम आहे. ओशोंच्या प्रत्येक प्रवचनात तत्त्वज्ञान आणि काव्य यांचे अपूर्व मीलन अनुभवावयास मिळते. त्यांच्या वक्तव्यात शास्त्रांची दुर्बोधता व तत्त्वज्ञानाची शुष्कता जाणवत नाही. त्यांचे भाष्य अत्यंत तर्कशुद्ध, सर्वस्पर्शी चिंतन असते. त्यांच्या वाणीत अत्यंत सहजपणा व साधेपणा जाणवतो. कबीराच्या दोह्यांवर तर भाष्य करताना त्यांची वाणी अमृतमय होऊन जाते. तेव्हा श्रेष्ठ कबीर वाणी आणि ओशोंची अप्रतिम भाष्यवाणी यांचा मनोहर संगम, ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचत असताना प्रकर्षाने अनुभवावयास मिळतो. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकास ‘प्रेमाची न सांगितलेली गोष्ट’ यापासून सुरुवात होते. ‘पोथी पढ पढ जग मुवा, पंडित भया न कोया ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होया ।। येथपासून ‘साधो धोखा कासूं कहिये’ या सद्गुरूचा तेजोमय प्रकाश या सातव्या दोह्यांवर ओशोंनी केलेली भाष्ये वर्णनातीत आहेत. जीवन हा एक उत्सव आहे. त्यामध्ये मिसळून जायचे असते. जीवन एक नृत्य आहे. जीवन ही एक कविता आहे, ती गायची आणि गुणगुणायची असते. जीवनाचा प्रवाह वाहतो आहे. त्यामध्ये तुम्ही उतरा. तुम्ही त्यापासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही जितके बाजूला जाल तितकाच जीवनाशी तुमचा संबंध तुटून जाईल. ‘साधो धोखा कासूं कहिये.’ कबीर म्हणतात, कोणाला सांगणार? कोण धोका देत आहे? रोग तुम्हीच निर्माण केला आहे. धोका दुसऱ्या कोणी दिला असता, तर आपल्या खांद्यावरचे ओझे उतरले असते. यातली गंमत ही आहे की, तुम्हीच निर्माण करता आणि पुन्हा ते सोडविण्याचे प्रयत्नही तुम्हीच करता! धोका देणारे तुम्हीच आहात, हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत जीवनातल्या समस्या नीट सोडवू शकणार नाही. तुम्ही आहात तेथेच भटकत राहाल! तुमचा एक कणभरही विकास झालेला नसेल. या साऱ्या खेळात तुम्हीच आहात. तुम्हीच अभिनेता, तुम्हीच कथाकार, तुम्हीच दिग्दर्शक आणि तुम्हीच प्रेक्षक! हा जीवनाचा खेळ तुमचा तुम्हीच रचला आहे! मग कोणाला सांगणार? ‘साधो धोखा कासूं कहिये!’ ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ, तसेच मलपृष्ठ अत्यंत बोलके आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारलेले मुखपृष्ठ अत्यंत साधे, पण तितकेच अर्थपूर्ण आहे. या पुस्तकाची सुरुवातही आपणास चिंतन करावयास प्रवृत्त करते! सुरुवात अशी आहे– ‘मी तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो आणि त्यानंतर एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात येते की, तुमच्याजवळ काहीतरी होते आणि ते हरवले आहे.’ हे पहिलेच वाक्य वाचल्यावर वाचक सावध होतो आणि विचार करू लागतो की, खरंच आपलं काहीतरी हरवलं आहे का? सत्याच्या शोधाची ही प्रस्तावना मोठी आकर्षक आणि मनोवेधक आहे. मुग्ध कहाणी प्रेमाची रसिकांना प्रेमाच्या अंतरंगात घेऊन जाते आणि कोणताही आडपडदा न ठेवता प्रेमा तुझा रंग कसा, हे दर्शविते! ‘आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला आहे प्रेम, हे सांगते आणि त्याच्या अनुभव घेण्यास प्रवृत्त करते! प्रेमाचा एक गूढगुपित अर्थ सांगणारी ही कहाणी नक्कीच रसिकांना भावेल. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचताना कोठेही कंटाळा येत नाही. उलट विषयाची उत्सुकता व ओढ वाढत जाते. रजनीशांनी प्रवचनातून दिलेले दाखले, सांगितलेल्या गोष्टी व किस्से, तसेच दिलेले दृष्टान्त मांडलेल्या विषयाला पाठबळ देतात व विषयाचा जडपणा हलका करण्यास मदत करतात. हे पुस्तक कोठूनही वाचावे, कोणतेही पान उघडावे व वाचनास प्रारंभ करावा, असे आहे. मीना टाकळकरांनी अनुवाद अत्यंत सहजतेने व भावपूर्णपणे केला आहे. ओशो रसाळ मराठी भाषेत प्रवचन करीत आहेत, असे वाटावे इतका अनुवाद सरस आहे. -डॉ. सुरेश करंदीकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more