* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GUNGE KERI SARKARA
  • Availability : Available
  • Translators : MEENA TAKALKAR
  • ISBN : 9788177665352
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OSHO ELUCIDATES VERY SWEETLY KABIR`S MEANINGFUL AND BEAUTIFUL `DOHA` IN THIS BOOK. THE IMPORTANCE OF LOVE IS IMMENSE, RIGHT FROM THE BEGINNING OF THE LIFE TILL OBTAINING THE GLIMPSE OF THE VIBRANT SUPREME SPIRIT. KABIR VERY DELICATELY EXPLAINS THE MEANING OF LOVE AT THE SAME TIME TAKING US TO THE HIGHEST STEPS. LOVE IS GOD, ONLY THING REMAINS FOR US TO DO IS TO FIND TRUE LOVE. AS LOVE LOSES ITS MIGHT FROM OUR MIND WE START FILLING OUR LIFE WITH PHYSICAL PLEASURES. AS LOVE STARTS RULING OUR MIND, ALL THESE MATERIALISTIC THINGS START TO DISAPPEAR. THE `SUPREME SPIRIT` ITSELF DESCENDS IN FRONT OF US. THE TRUE MEANING OF LIFE IS TRANSFORMATION OF `ONE`S OWN`. THE ART TO IMMERSE OUR EGO. THOSE WHO ARE ABLE TO SHED THEIR EGO, WILL EXPERIENCE THE LOVE POURING DOWN ON THEM FROM ALL SIDES. YOUTH! IT IS OF BODY, IT COMES AND GOES. BUT YOUTH OF A SOUL IS THAT OF THE DIVINE POWER. IT IS ETERNAL. THE MOMENT YOU REALIZE THIS, YOU WILL EXPERIENCE A COOLNESS, YOU WILL POSSESS A FORETASTE OF THE UNIQUE FORM OF YOUTH, THAT OF THE SOUL. IT WILL NEVER LAPSE, LEAVE YOU, NEVER BECOME OLD OR EXTINCT. THE MOMENT YOU ACHIEVE THIS VISION OF SEEING THROUGH YOUR SOUL, THEN EVERYTHING AROUND WILL CHANGE. THERE WILL BE NO DIFFERENCES, NO WALLS HOLDING FROM EACH OTHER. YOU WILL FIND THE PRESENCE OF ONLY LOVE, THE AIR AROUND YOU WILL BE FULL OF LOVE. IT WILL BE INFINITE LOVE EVERYWHERE, NEVER ENDING SHOW OF LOVE, AND FROM THERE, FINALLY, YOU WILL BE ABLE TO NOTICE THE VASTNESS OF THE SKY.
कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन. जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेट अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात. प्रेमच ईश्वर आहे. खरा प्रश्न प्रेमाचा शोध घेण्याचा. मनातून प्रेम जसे हरवायला लागते, तसे जीवन भौतिक गोष्टींनी भरून जाते. जसे प्रेम वाढायला लागते, तशा भौतिक गोष्टी नष्ट होतात आणि साक्षात परमेश्वर अवतरतो. प्रेमाचा अर्थ आहे `स्व`चे रूपांतर. आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला. जॉ कोणी आपला अहंकार सोडेल, त्याच्यावर प्रेमाचे ढग बरसतील. तारूण्य! जे शरीराचे आहे, ते येते आणि निघून जाते. पण आत्म्याचे तारुण्य जे परमसत्तेचे आहे, ते शाश्वत आहे. ह्या स्वतःतल्या शांतीमध्येडुबून गेल्यावर तुम्हाला मिळेल एक नवीन तारुण्याची झलक. एक असे यौवन, जे कधीही सरणार नाही, जे कधीही म्हातारे होणार नाही! अशी आत्मदृष्टी प्राप्त झाल्यावर सारेकाही बदलून जाते. मग कोणतेही मतभेद, कोणत्याही भिंती उरत नाहीत. जेथे फक्त प्रेमाचा आविर्भाव होत आहे. जेथे फक्त प्रेमच आहे अनंत प्रेमच आहे आणि जेथे अहर्निश प्रेमाचे नृत्य चालू आहे तेथूनच अनंत आकाशाची भव्यता तुम्हाला दिसेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MUGDHA KAHANI PREMACHI #RELIGIOUS & SPIRITUALS#MEENA TAKALKAR #OSHO #BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%"
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 30-01-2005

    कबीरांच्या भावात्म दोह्यांवरील रसाळ विवेचन... ‘म्हणे कबीर दिवाणा’ या कबीरावरील प्रवचनांच्या पुस्तकानंतर ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या मीना टाकळकर यांनी अनुवादित केलेले कबीरांच्या काव्यावरील ओशोंचे आणखी एक पुस्तक मराठी रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मेता पब्लिशिंग हाऊसचे आभार मानावयास हवेत. ओशो या भाष्यकाराची साक्षात्काराची देणगी, स्वत:चा शोध, ध्यानसूत्र, नवी पहाट, एक एक पाऊल, हसतखेळत ध्यानसाधना ही पुस्तके मराठीत भाषांतरित व अनुवादित करून रसिकांना तृप्त केले आहे. हिंदी साहित्याच्या इतिहासातील भक्तिकाळ हा सुवर्णकाळ मानला जातो. या साहित्याला सुवर्णत्व प्राप्त करून देण्यात कबीरांचे योगदान मोठे आहे. कबीरदास हे सूरदास व तुलसीदासांबरोबरचे कवी असले, तरी त्यांच्यापासून खूपच निराळे होते; आहेत! परखड आहेत, स्पष्ट वक्ते आहेत. सत्यकथनाची त्यांची इच्छा इतकी उत्कट असते की, ते कोणाचीही पर्वा न करता, चिंता न करता सरळ बोलून टाकतात. त्याची प्रचीती ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’मध्ये जागोजागी आल्यावाचून राहत नाही. ओशोही महान भाष्यकार आहेत. त्यांचे सारेच साहित्य अप्रतिम आहे. ओशोंच्या प्रत्येक प्रवचनात तत्त्वज्ञान आणि काव्य यांचे अपूर्व मीलन अनुभवावयास मिळते. त्यांच्या वक्तव्यात शास्त्रांची दुर्बोधता व तत्त्वज्ञानाची शुष्कता जाणवत नाही. त्यांचे भाष्य अत्यंत तर्कशुद्ध, सर्वस्पर्शी चिंतन असते. त्यांच्या वाणीत अत्यंत सहजपणा व साधेपणा जाणवतो. कबीराच्या दोह्यांवर तर भाष्य करताना त्यांची वाणी अमृतमय होऊन जाते. तेव्हा श्रेष्ठ कबीर वाणी आणि ओशोंची अप्रतिम भाष्यवाणी यांचा मनोहर संगम, ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचत असताना प्रकर्षाने अनुभवावयास मिळतो. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकास ‘प्रेमाची न सांगितलेली गोष्ट’ यापासून सुरुवात होते. ‘पोथी पढ पढ जग मुवा, पंडित भया न कोया ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होया ।। येथपासून ‘साधो धोखा कासूं कहिये’ या सद्गुरूचा तेजोमय प्रकाश या सातव्या दोह्यांवर ओशोंनी केलेली भाष्ये वर्णनातीत आहेत. जीवन हा एक उत्सव आहे. त्यामध्ये मिसळून जायचे असते. जीवन एक नृत्य आहे. जीवन ही एक कविता आहे, ती गायची आणि गुणगुणायची असते. जीवनाचा प्रवाह वाहतो आहे. त्यामध्ये तुम्ही उतरा. तुम्ही त्यापासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही जितके बाजूला जाल तितकाच जीवनाशी तुमचा संबंध तुटून जाईल. ‘साधो धोखा कासूं कहिये.’ कबीर म्हणतात, कोणाला सांगणार? कोण धोका देत आहे? रोग तुम्हीच निर्माण केला आहे. धोका दुसऱ्या कोणी दिला असता, तर आपल्या खांद्यावरचे ओझे उतरले असते. यातली गंमत ही आहे की, तुम्हीच निर्माण करता आणि पुन्हा ते सोडविण्याचे प्रयत्नही तुम्हीच करता! धोका देणारे तुम्हीच आहात, हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत जीवनातल्या समस्या नीट सोडवू शकणार नाही. तुम्ही आहात तेथेच भटकत राहाल! तुमचा एक कणभरही विकास झालेला नसेल. या साऱ्या खेळात तुम्हीच आहात. तुम्हीच अभिनेता, तुम्हीच कथाकार, तुम्हीच दिग्दर्शक आणि तुम्हीच प्रेक्षक! हा जीवनाचा खेळ तुमचा तुम्हीच रचला आहे! मग कोणाला सांगणार? ‘साधो धोखा कासूं कहिये!’ ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ, तसेच मलपृष्ठ अत्यंत बोलके आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारलेले मुखपृष्ठ अत्यंत साधे, पण तितकेच अर्थपूर्ण आहे. या पुस्तकाची सुरुवातही आपणास चिंतन करावयास प्रवृत्त करते! सुरुवात अशी आहे– ‘मी तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो आणि त्यानंतर एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात येते की, तुमच्याजवळ काहीतरी होते आणि ते हरवले आहे.’ हे पहिलेच वाक्य वाचल्यावर वाचक सावध होतो आणि विचार करू लागतो की, खरंच आपलं काहीतरी हरवलं आहे का? सत्याच्या शोधाची ही प्रस्तावना मोठी आकर्षक आणि मनोवेधक आहे. मुग्ध कहाणी प्रेमाची रसिकांना प्रेमाच्या अंतरंगात घेऊन जाते आणि कोणताही आडपडदा न ठेवता प्रेमा तुझा रंग कसा, हे दर्शविते! ‘आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला आहे प्रेम, हे सांगते आणि त्याच्या अनुभव घेण्यास प्रवृत्त करते! प्रेमाचा एक गूढगुपित अर्थ सांगणारी ही कहाणी नक्कीच रसिकांना भावेल. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचताना कोठेही कंटाळा येत नाही. उलट विषयाची उत्सुकता व ओढ वाढत जाते. रजनीशांनी प्रवचनातून दिलेले दाखले, सांगितलेल्या गोष्टी व किस्से, तसेच दिलेले दृष्टान्त मांडलेल्या विषयाला पाठबळ देतात व विषयाचा जडपणा हलका करण्यास मदत करतात. हे पुस्तक कोठूनही वाचावे, कोणतेही पान उघडावे व वाचनास प्रारंभ करावा, असे आहे. मीना टाकळकरांनी अनुवाद अत्यंत सहजतेने व भावपूर्णपणे केला आहे. ओशो रसाळ मराठी भाषेत प्रवचन करीत आहेत, असे वाटावे इतका अनुवाद सरस आहे. -डॉ. सुरेश करंदीकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more