* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE NEW DAWN
  • Availability : Available
  • Translators : PRADNYA OAK
  • ISBN : 9788177661477
  • Edition : 5
  • Publishing Year : FEBRUARY 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE THOUGHTS PENNED DOWN BY OSHO IN THE YEAR 1987 AND THE INSTANCES THAT TOOK PLACE IN 2001... WHEN WE THINK OF THEM TOGETHER THEN WE REALIZE THAT HIS THOUGHTS THEN HAVE VERY PRECISELY COME TRUE AFTER SUCH A LONG PERIOD OF TIME. IN THIS THIRD PART, HE HAS FULSOMELY THANKED THE MOTHER EARTH WHILE BEING ABLE TO SOLVE THE UNIVERSAL LABYRINTH. HE EXPLAINS THAT COMPARED TO THE ANIMAL LIFE, A HUMAN LIFE IS MUCH MORE SENSATIONAL. AT THE SAME TIME, HE WARNS US AGAIN AND AGAIN TO TAKE UTMOST CARE OF IT. HE REMINDS US THAT IT IS THE GIFT FROM MOTHER EARTH, HENCE WE OUGHT TO NURTURE IT IN ALL POSSIBLE WAYS. HE ALSO WARNS US ABOUT NOT BEING NEGLIGENT TOWARDS IT. TO BE ABLE TO DO THIS, HE SAYS, WE MUST TRY AND FIND THE TRUE ME WITHIN. HE TELLS US THAT THE MOST IMPORTANT AND ESSENTIAL STAGE IN THE FURTHERANCE OF A HUMAN LIFE IS TO `FINDING ONESELF`.
एकोणीसशे सत्याऐंशी सालातले ओशोंचे विचार... आणि आता दोन हजार एक मधल्या घटना... खरोखर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे विचार आज तंतोतंत प्रत्ययाला येत आहेत. या तिसया भागात विश्वाची कोडी उकलताना त्यांनी सृष्टीला भरभरून धन्यवाद दिले आहेत. इतर प्राणिमात्रांपेक्षा मनुष्यप्राण्याचं जीवन हे जास्त रोमांचकारी आहे हे स्पष्ट करताना वारंवार त्यांनी ठामपणे सांगितलंय की हे ‘प्रकृतीचं देणं आहे...’ ते सांभाळून ठेवा! स्वत:च्या जीवनाची स्वत:च्या हातानं हेळसांड करू नका. आणि त्यासाठी स्वत:चा शोध पहिल्यांदा घ्या. मनुष्याच्या उन्नतीमधला अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक टप्पा म्हणजे स्वतःचा शोध
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 20-04-2003

    विश्वाचे कोडे उलगडताना आचार्य रजनीश (ओशो) यांनी सृष्टीला भरभरून धन्यवाद दिले आहेत. इतर प्राणीमात्रांपेक्षा मनुष्यप्राण्याचं जीवन हे जास्त रोमांचकारी आहे हे स्पष्ट करताना त्यांनी ठामपणे सांगितलंय, की हे प्रकृतीचं देणं आहे... ते सांभाळून ठेवा. स्वत:च्य जीवनाची स्वत:च्या हातानं हेंडसाळ करू नका आणि त्यासाठी स्वत:चा शोध पहिल्यांदा घ्या. मनुष्याच्या उन्नतीमधला महत्त्वाचा आवश्यक टप्पा म्हणजे ‘स्वत:चा शोध.’ ओशो यांचे याच नावाचे प्रज्ञा ओक यांनी अनुवादित केलेले पुस्तक प्रकाशित झाले आहे. शिष्यांनी त्यांना आध्यात्मप्रवासात विचारलेल्या शंका आणि त्यांना ओशोनी दिलेली उत्तरे यात आहेत. ध्यानधारणेला या सगळ्या प्रवासात महत्त्वाचे स्थान आहे. एक शिष्य स्वत:च्या मनातील संघर्षाबद्दल त्यांना सांगतो. त्यावर ते म्हणतात, ‘संघर्ष याचा अर्थ कोणती तरी गोष्ट तुला निवडायची आहे आणि निवड करणं संपत नाही तोवर संघर्ष चालूच राहील. निवड करणं सोडून दे आणि उत्स्फूर्तपणे जगायला सुरुवात कर. भविष्याबद्दल फार विचार करू नकोच. ते कुणाच्याच हातात नसतं. कोणत्याही भावना दडपून टाकू नका. त्या गाण्यातून, नृत्यातून, हसण्यातून व्यक्त करा आणि आनंदी राहा हे त्यांचे प्रसिद्ध, तत्त्वज्ञानही यात आहे. एका ठिकाणी ते ‘मेडिटेशन’च्या विविध भाषेतील अर्थाबद्दल ऊहापेह करतात. तत्त्वज्ञानाची खास आवड नसलेल्यानाही ओशोंचे तत्त्वज्ञान वाचायला आवडेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more