* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WASTED
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184980196
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 340
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARKJOHNSON`S FATHER HAD `LOVE` TATTOOED ACROSS HIS LEFT HAND, BUT THAT DIDN`T STOP THE BEATINGS. THE JOHNSON CHILDREN WOULD TURN UP TO SCHOOL BATTERED AND BRUISED, BUT NO ONE EVER THOUGHT OF INVESTIGATING THEIR HOME LIFE. MARK JUST SLIPPED THROUGH THE CRACKS AND KEPT ON FALLING. FOR YEARS. BROUGHT UP IN A HOME SIMMERING WITH VIOLENCE AND DARK SECRETS, MARK FELL INTO BAD HABITS AT AN EARLY AGE. CONSTANTLY IN TROUBLE AT SCHOOL, HE BEGAN STEALING _T THE AGE OF SIX, WAS DRINKING BY THE AGE OF EIGHT AND TOOK HIS FIRST HIT OF HEROIN AGED ELEVEN. A SENSITIVE AND INTELLIGENT BOY, HE COULD NEVER STAY ON THE RIGHT PATH, AND THOUGH ART COLLEGE BECKONED, HE ENDED UP IN PORTLAND PRISON INSTEAD. WITH SEARING HONESTY, WASTED DOCUMENTS MARK`S DESCENT INTO THE VERY DEPTHS OF ADDICTION AND CRIMINALITY. HOOKED ON HEROIN AND CRACK, HOMELESS ON THE STREETS OF LONDON AND WITH A PRICE ON HIS HEAD, NO ONE - LEAST OF ALL MARK - BELIEVED HE WOULD SURVIVE, NEVER MIND RECOVER. _ND YET HE SOMEHOW FOUND THE STRENGTH`_O PULL THROUGH, AND NOW RUNS HIS OWN THRIVING TREE SURGERY BUSINESS, EMPLOYING AND HELPING OTHER RECOVERING ADDICTS. HIS STORY IS AT ONCE SHOCKING AND INSPIRATIONAL - A HEARTBREAKING AND COMPELLING ACCOUNT OF ONE MAN`S STRUGGLE TO SAVE HIMSELF, AND HELP SAVE OTHERS IN THE PROCESS.
मार्क जॉन्सनच्या बापाच्या डाव्या हातावर प्रेम हा शब्द गोंदवलेला होता; पण त्यामुळे मुलांना बसणारा मार कधी थांबला नाही. जॉन्सनच्या घरातील मुलं शाळेत यायची, ती मार खाऊन, अंगावर माराचे वळ घेऊन; परंतु त्यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे, याचा तपास करण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. मार्क त्या फटीमधून खाली घसरला आणि कित्येक वर्षं त्याची अधोगती होत राहिली. ज्या घरात हिंसा आहे, काही दुष्ट गुपितं आहेत, अशा ठिकाणी तो वाढला. लहान वयातच त्याला वाईट सवयी लागल्या. शाळेत त्याचं बस्तान बसलंच नाही. सहा वर्षांचा असताना तो चो-या करू लागला आणि आठव्या वर्षी तो दारू पिऊ लागला. अकराव्या वर्षी त्यानं हेरॉईनची चव चाखली. एक भावनाशील बुद्धिमान मुलगा, पण त्याला योग्य वळण लागलं नाही. जरी आर्ट्स कॉलेज त्याला खुणावत होतं, तरी तो त्या ऐवजी पोर्टलँडच्या तुरुंगात गेला. त्याच्या सरळपणामुळे मादक द्रव्यांचं सेवन आणि गुन्हे यांच्या गर्तेत मार्कची कशी अवनती झाली, याचं अत्यंत प्रामाणिकपणे लिखाण वेस्टेडमध्ये झालं आहे. हेरॉईन आणि व्रॅÂकचं सेवन, लंडनच्या रस्त्यावर बेघर राहणं, त्याला ठार मारण्यासाठी दिलं जाणारं बक्षीस, या अशा परिस्थितीत कुणीही- स्वत: मार्कही आपण जिवंत राहू, अशी आशा करत नव्हता. बरं होणं तर दूरच राहिलं, पण एवढं असून यातून बाहेर पडण्याची शक्ती त्याला मिळाली आणि आता तो आपला ‘झाडांची शल्यचिकित्सा’ हा व्यवसाय जोमात चालवत आहे आणि इतर अशा जंकीजना नोकरीला ठेवून या मादक द्रव्य सेवनातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. त्याची ही कथा तशी बरीच धक्कादायक, पण स्फूर्तिदायक आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी आणि याबरोबर त्याच्यासारख्या इतरांना वाचविण्यासाठी एका माणसानं केलेल्या प्रयत्नांची ही हृदयद्रावक आणि वाचावीशी वाटणारी कथा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #WASTED #SNEHALJOSHI #MARKJOHNSON #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating Starदर Pramod Bankhele

    वेगळ्या विषयावरचं खुपच वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं पुस्तक,प्रामाणिक भाषांतर ,हे पुस्तक म्हणजे त्याच्या आठवणी चे तुकडे आणि घटना आहेत,जाऊ द्या,"पुस्तक "मिळावा आणि हाती घ्या--एक वेगळं विश्व अनुभवा!!

  • Rating StarDAINIK SAKAL, SAPTARANG 06-09-2009

    जीवनात हरवलेल्या माणसांसाठी… माणूस व्यसनात का अडकतो? माणसाचं माकड होतं म्हणजे नक्की काय होतं? व्यसनांमुळे किंवा त्या जीवनात प्रचंड गुरफटल्यामुळे एखादा माणूस चांगल जगणं सोडून भीक मागू शकतो? बरं, आयुष्याची इतकी हेळसांड झाल्यानंतर एखाद्याला त्यातून बाहर पडावंसं वाटलं, तर बाहेर पडता येतं? तो पुन्हा एकदा नवा डाव मांडू शकतो? तो डाव यशस्वी होऊ शकतो? या आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, एका व्यसनी माणसाचं, गर्दुल्ल्याचं आयुष्य जवळून पाहायचं असेल, त्याचा व्यसनात गुरफटण्यापासून ते त्यातून मुक्त होईपर्यंतचा प्रवास अनुभवायचा असेल, तर मार्क जॉन्सन यांचं ‘वेस्टेड’ वाचायला हवं. हे त्यांचं आत्मकथन आहे. सत्य घटना आहे. ही कथा आहे, एका बालपण हरवलेल्या मुलाची. प्रेमाचा ओलावा शोधता शोधता, रखरखीत घरापासून मनानं दुरावलेल्या मुलाची. त्या शोधात लागलेल्या कुसंगतीची. त्यातून जडलेल्या व्यसनांची. व्यसनांमुळे विखुरलेल्या आयुष्याची. त्यानं भोगलेल्या तुरूंगवासाची आणि रस्त्यावरच्या जगण्याची. ही कथा आपल्याला सुन्न करते. आतून हलवून टाकते. माणूस व्यसनी का होतो, याचं उत्तर या प्रवासातून कुठंतरी सापडत जातं. व्यसनी आहे, असं म्हणून हिणवण्यापेक्षा किंवा झटकून टाकण्यापेक्षा, त्यांच्याकडे कशा पध्दतीनं पहायला हवं, हे यातून लक्षात येतं.सिगारेटपासून सुरवात करून हेरॉइन आणि क्रॅकच्या अधीन गेलेल्या मार्कचा फक्त व्यसनांचाच नव्हे, तर मानसिक प्रवास, त्याची आंदोलनं आपल्याला भिडतात. मार्कनं केलेल लग्न, त्याची तशीच व्यसनी बायको, नंतर झालेली मुलं, त्या मुलांची झालेली ससेहोलपट, हे वाचता वाचता आपण अंतर्बाह्य हादरतो. पुढे तर त्याचं रस्त्यावरचं भिकारी होऊन जगणं. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यातच गुरफटत जाणं, हा प्रवास आपणही सुन्न मनानंच करतो; पण प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा साक्षात्काराचा क्षण असतोच. तो क्षण समजला आणि पकडता आला, तर आयुष्याचं सोनं होतं, नाहीतर माती. मार्क तो क्षण पकडतो. त्याआधीही त्यानं व्यसन सोडण्याचा प्रयत्न केलेला असतो; पण प्रत्येक वेळी त्यापासून तो दूर पळतो. या वेळी मात्र तो निर्धारानं उतरतो. व्यसन सोडणं अजिबात सोपं नाही. शारीरिक त्रासासोबत मानसिक अडथळेही प्रचंड आहेत. शारीरिक त्रासावर औषधोपचार हा उपाय आहे; पण मानसिक त्रासाचं काय? तो सोसलाच पाहिजे. त्याला तोंड द्यायलाच हवं आणि त्यातून पार पडायलाच हवं. ही प्रक्रिया खूप अवघड असते. मुळात आपण व्यसनात गुरफटलेले आहोत, त्यातून बाहेर पडणं आपल्याला जमत नाही, हे मान्य करणंच खूप अवघड असतं. ‘छे, मी कधीही सोडू शकतो,’ हीच भूमिका व्यसनी लोकांची असते. तावून-सुलाखून निघणं म्हणजे काय, याचा अनुभव मार्क आपल्याला देतो. एकदा व्यसनमुक्त झाल्यानंतरचा मार्कचा प्रवासही तेवढाच भव्य आहे. मुळात तो झाडांचा शल्यचिकित्सक आहे. व्यसनांच्या आवरणाखाली त्याचं हे अंग झाकलं गेलं आहे. ते आवरण दूर होताच तो मोकळा होतो. पुन्हा एकदा डाव मांडतो. आत्मविश्वासानं व्यवसायात उतरतो आणि चक्क यशस्वी होतो.नव्या वाटेवर चालतानाही तो जुने दिवस विसरत नाही, हे विशेष! तो आपल्यासारख्या पूर्वायुष्यातील गुन्हेगार आणि व्यसनी मंडळींना नोकरी देतो. त्यांनाही पुन्हा उभं करतो. मार्क जॉन्सन आज एक यशस्वी व्यावसयिक आहेत. ते आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचे सल्लागार म्हणून काम पाहतात. गुन्हेगार आणि व्यसनी तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांचं पुर्नवसन करण्याचं कामही ते करत आहेत. मार्कची ही कहाणी आणि त्याची गगनभरारी मराठीत अगदी उत्तम रीतीनं पोचवली आहे स्नेहल जोशी यांनी. मार्क यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी ती लिहिली,असं सातत्यानं वाटत राहतं, हेच त्यांचं यश आहे. हे उत्तम पुस्तक उत्तम रीतीनं मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याचे काम केल्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाऊसचे आभारच मानायला हवेत. जाता जाता एकच. पुस्तकाची अर्पणपत्रिका आणि त्यातील विचार खूप महत्त्वाचा आहे. मार्क म्हणतो, ‘हे पुस्तक जीवनात हरवलेल्या माणसांना अर्पण. जर माणसं बदलली, तर जग बदलेल.’खरंच असंच व्हावं, हीच मनापासून इच्छा! - अभिजित थिटे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more