* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WASTED
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184980196
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 340
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MARKJOHNSON`S FATHER HAD `LOVE` TATTOOED ACROSS HIS LEFT HAND, BUT THAT DIDN`T STOP THE BEATINGS. THE JOHNSON CHILDREN WOULD TURN UP TO SCHOOL BATTERED AND BRUISED, BUT NO ONE EVER THOUGHT OF INVESTIGATING THEIR HOME LIFE. MARK JUST SLIPPED THROUGH THE CRACKS AND KEPT ON FALLING. FOR YEARS. BROUGHT UP IN A HOME SIMMERING WITH VIOLENCE AND DARK SECRETS, MARK FELL INTO BAD HABITS AT AN EARLY AGE. CONSTANTLY IN TROUBLE AT SCHOOL, HE BEGAN STEALING _T THE AGE OF SIX, WAS DRINKING BY THE AGE OF EIGHT AND TOOK HIS FIRST HIT OF HEROIN AGED ELEVEN. A SENSITIVE AND INTELLIGENT BOY, HE COULD NEVER STAY ON THE RIGHT PATH, AND THOUGH ART COLLEGE BECKONED, HE ENDED UP IN PORTLAND PRISON INSTEAD. WITH SEARING HONESTY, WASTED DOCUMENTS MARK`S DESCENT INTO THE VERY DEPTHS OF ADDICTION AND CRIMINALITY. HOOKED ON HEROIN AND CRACK, HOMELESS ON THE STREETS OF LONDON AND WITH A PRICE ON HIS HEAD, NO ONE - LEAST OF ALL MARK - BELIEVED HE WOULD SURVIVE, NEVER MIND RECOVER. _ND YET HE SOMEHOW FOUND THE STRENGTH`_O PULL THROUGH, AND NOW RUNS HIS OWN THRIVING TREE SURGERY BUSINESS, EMPLOYING AND HELPING OTHER RECOVERING ADDICTS. HIS STORY IS AT ONCE SHOCKING AND INSPIRATIONAL - A HEARTBREAKING AND COMPELLING ACCOUNT OF ONE MAN`S STRUGGLE TO SAVE HIMSELF, AND HELP SAVE OTHERS IN THE PROCESS.
मार्क जॉन्सनच्या बापाच्या डाव्या हातावर प्रेम हा शब्द गोंदवलेला होता; पण त्यामुळे मुलांना बसणारा मार कधी थांबला नाही. जॉन्सनच्या घरातील मुलं शाळेत यायची, ती मार खाऊन, अंगावर माराचे वळ घेऊन; परंतु त्यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे, याचा तपास करण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. मार्क त्या फटीमधून खाली घसरला आणि कित्येक वर्षं त्याची अधोगती होत राहिली. ज्या घरात हिंसा आहे, काही दुष्ट गुपितं आहेत, अशा ठिकाणी तो वाढला. लहान वयातच त्याला वाईट सवयी लागल्या. शाळेत त्याचं बस्तान बसलंच नाही. सहा वर्षांचा असताना तो चो-या करू लागला आणि आठव्या वर्षी तो दारू पिऊ लागला. अकराव्या वर्षी त्यानं हेरॉईनची चव चाखली. एक भावनाशील बुद्धिमान मुलगा, पण त्याला योग्य वळण लागलं नाही. जरी आर्ट्स कॉलेज त्याला खुणावत होतं, तरी तो त्या ऐवजी पोर्टलँडच्या तुरुंगात गेला. त्याच्या सरळपणामुळे मादक द्रव्यांचं सेवन आणि गुन्हे यांच्या गर्तेत मार्कची कशी अवनती झाली, याचं अत्यंत प्रामाणिकपणे लिखाण वेस्टेडमध्ये झालं आहे. हेरॉईन आणि व्रॅÂकचं सेवन, लंडनच्या रस्त्यावर बेघर राहणं, त्याला ठार मारण्यासाठी दिलं जाणारं बक्षीस, या अशा परिस्थितीत कुणीही- स्वत: मार्कही आपण जिवंत राहू, अशी आशा करत नव्हता. बरं होणं तर दूरच राहिलं, पण एवढं असून यातून बाहेर पडण्याची शक्ती त्याला मिळाली आणि आता तो आपला ‘झाडांची शल्यचिकित्सा’ हा व्यवसाय जोमात चालवत आहे आणि इतर अशा जंकीजना नोकरीला ठेवून या मादक द्रव्य सेवनातून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. त्याची ही कथा तशी बरीच धक्कादायक, पण स्फूर्तिदायक आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी आणि याबरोबर त्याच्यासारख्या इतरांना वाचविण्यासाठी एका माणसानं केलेल्या प्रयत्नांची ही हृदयद्रावक आणि वाचावीशी वाटणारी कथा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #WASTED #SNEHALJOSHI #MARKJOHNSON #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating Starदर Pramod Bankhele

    वेगळ्या विषयावरचं खुपच वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं पुस्तक,प्रामाणिक भाषांतर ,हे पुस्तक म्हणजे त्याच्या आठवणी चे तुकडे आणि घटना आहेत,जाऊ द्या,"पुस्तक "मिळावा आणि हाती घ्या--एक वेगळं विश्व अनुभवा!!

  • Rating StarDAINIK SAKAL, SAPTARANG 06-09-2009

    जीवनात हरवलेल्या माणसांसाठी… माणूस व्यसनात का अडकतो? माणसाचं माकड होतं म्हणजे नक्की काय होतं? व्यसनांमुळे किंवा त्या जीवनात प्रचंड गुरफटल्यामुळे एखादा माणूस चांगल जगणं सोडून भीक मागू शकतो? बरं, आयुष्याची इतकी हेळसांड झाल्यानंतर एखाद्याला त्यातून बाहर पडावंसं वाटलं, तर बाहेर पडता येतं? तो पुन्हा एकदा नवा डाव मांडू शकतो? तो डाव यशस्वी होऊ शकतो? या आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, एका व्यसनी माणसाचं, गर्दुल्ल्याचं आयुष्य जवळून पाहायचं असेल, त्याचा व्यसनात गुरफटण्यापासून ते त्यातून मुक्त होईपर्यंतचा प्रवास अनुभवायचा असेल, तर मार्क जॉन्सन यांचं ‘वेस्टेड’ वाचायला हवं. हे त्यांचं आत्मकथन आहे. सत्य घटना आहे. ही कथा आहे, एका बालपण हरवलेल्या मुलाची. प्रेमाचा ओलावा शोधता शोधता, रखरखीत घरापासून मनानं दुरावलेल्या मुलाची. त्या शोधात लागलेल्या कुसंगतीची. त्यातून जडलेल्या व्यसनांची. व्यसनांमुळे विखुरलेल्या आयुष्याची. त्यानं भोगलेल्या तुरूंगवासाची आणि रस्त्यावरच्या जगण्याची. ही कथा आपल्याला सुन्न करते. आतून हलवून टाकते. माणूस व्यसनी का होतो, याचं उत्तर या प्रवासातून कुठंतरी सापडत जातं. व्यसनी आहे, असं म्हणून हिणवण्यापेक्षा किंवा झटकून टाकण्यापेक्षा, त्यांच्याकडे कशा पध्दतीनं पहायला हवं, हे यातून लक्षात येतं.सिगारेटपासून सुरवात करून हेरॉइन आणि क्रॅकच्या अधीन गेलेल्या मार्कचा फक्त व्यसनांचाच नव्हे, तर मानसिक प्रवास, त्याची आंदोलनं आपल्याला भिडतात. मार्कनं केलेल लग्न, त्याची तशीच व्यसनी बायको, नंतर झालेली मुलं, त्या मुलांची झालेली ससेहोलपट, हे वाचता वाचता आपण अंतर्बाह्य हादरतो. पुढे तर त्याचं रस्त्यावरचं भिकारी होऊन जगणं. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यातच गुरफटत जाणं, हा प्रवास आपणही सुन्न मनानंच करतो; पण प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा साक्षात्काराचा क्षण असतोच. तो क्षण समजला आणि पकडता आला, तर आयुष्याचं सोनं होतं, नाहीतर माती. मार्क तो क्षण पकडतो. त्याआधीही त्यानं व्यसन सोडण्याचा प्रयत्न केलेला असतो; पण प्रत्येक वेळी त्यापासून तो दूर पळतो. या वेळी मात्र तो निर्धारानं उतरतो. व्यसन सोडणं अजिबात सोपं नाही. शारीरिक त्रासासोबत मानसिक अडथळेही प्रचंड आहेत. शारीरिक त्रासावर औषधोपचार हा उपाय आहे; पण मानसिक त्रासाचं काय? तो सोसलाच पाहिजे. त्याला तोंड द्यायलाच हवं आणि त्यातून पार पडायलाच हवं. ही प्रक्रिया खूप अवघड असते. मुळात आपण व्यसनात गुरफटलेले आहोत, त्यातून बाहेर पडणं आपल्याला जमत नाही, हे मान्य करणंच खूप अवघड असतं. ‘छे, मी कधीही सोडू शकतो,’ हीच भूमिका व्यसनी लोकांची असते. तावून-सुलाखून निघणं म्हणजे काय, याचा अनुभव मार्क आपल्याला देतो. एकदा व्यसनमुक्त झाल्यानंतरचा मार्कचा प्रवासही तेवढाच भव्य आहे. मुळात तो झाडांचा शल्यचिकित्सक आहे. व्यसनांच्या आवरणाखाली त्याचं हे अंग झाकलं गेलं आहे. ते आवरण दूर होताच तो मोकळा होतो. पुन्हा एकदा डाव मांडतो. आत्मविश्वासानं व्यवसायात उतरतो आणि चक्क यशस्वी होतो.नव्या वाटेवर चालतानाही तो जुने दिवस विसरत नाही, हे विशेष! तो आपल्यासारख्या पूर्वायुष्यातील गुन्हेगार आणि व्यसनी मंडळींना नोकरी देतो. त्यांनाही पुन्हा उभं करतो. मार्क जॉन्सन आज एक यशस्वी व्यावसयिक आहेत. ते आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचे सल्लागार म्हणून काम पाहतात. गुन्हेगार आणि व्यसनी तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांचं पुर्नवसन करण्याचं कामही ते करत आहेत. मार्कची ही कहाणी आणि त्याची गगनभरारी मराठीत अगदी उत्तम रीतीनं पोचवली आहे स्नेहल जोशी यांनी. मार्क यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी ती लिहिली,असं सातत्यानं वाटत राहतं, हेच त्यांचं यश आहे. हे उत्तम पुस्तक उत्तम रीतीनं मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याचे काम केल्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाऊसचे आभारच मानायला हवेत. जाता जाता एकच. पुस्तकाची अर्पणपत्रिका आणि त्यातील विचार खूप महत्त्वाचा आहे. मार्क म्हणतो, ‘हे पुस्तक जीवनात हरवलेल्या माणसांना अर्पण. जर माणसं बदलली, तर जग बदलेल.’खरंच असंच व्हावं, हीच मनापासून इच्छा! - अभिजित थिटे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more