* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 4
  • Availability : Available
  • Translators : USHA MAHAJAN
  • ISBN : 9788184981971
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
JACK CANFIELD AND MARK VICTOR HANSEN, THE WORLD’S BEST LOVED MOTIVATIONAL SPEAKERS, INVITE YOU TO JOIN THEM FOR ANOTHER SATISFYING FEAST OF INSPRING STORIES AND LIFE AFFIRMING WISDOM. THIS TIME, JACK AND MARK HAVE JOINED FORCES WITH AMERICA’S FIRST COUPLE OF KINDNESS, HANOCH AND MELADEE MCCARTY. TOGETHER, THESE FOUR INSPIRING LITERARY CHEFS HAVE GATHERED TIME TESTED RECIPES FOR SUCCESS ANDHAPPINESS, FRESH ANECDOTES OF SHARING AND CARING, AND SAVORY SPRIGS OF HONESTY, INTEGRITY AND CARING, AND SAVORY SPRIGS OF HONESTY, INTEGRITY, RESPECT AND SELFESTEEM. YOU WILL AGAIN FIND HEARTWARMING STORIES ON YOUR FAVORITE TOPICS: LOVE, PARENTING, TEACHING AND LEARNING, DEATH AND DYING, PERSPECTIVE, ATTITUDE, OVERCOMING OBSTACLES, AND WISDOM. ENJOY THIS NURTURING BOOK BY YOURSELF OR SHARE IT WITH FRIENDS, FAMILY AND COWORKERS. IT WILL WARM YOUR HEART, STRENGTHEN YOUR SPIRIT AND IMPROVE YOUR OUTLOOK ON LIFE. JACK CANFIELD AND MARK VICTOR HANSEN, # NEW YORK TIMES BESTSELLING COAUTHORS, ARE PROFESSIONAL SPEAKERS WHO HAVE DEDICATED THEIR LIVES TO ENHANCING THE PERSONAL AND PROFESSIONAL DEVELOPMENT OF OTHERS. THEY ARE JOINED HERE BY HANOCH MCCARTY AND MELADEE MCCARTY. HANOCH IS PRESIDENT OF HANOCH MCCARTY & ASSOCIATES, AND IS INTERNATIONALLY ACCLAIMED AS AN AUTHOR AND LECTURER. MELADEE, A PROGRAM SPECIALIST FOR THE SACRAMENTO COUNTY OFFICE OF EDUCATION, FINDS PLACEMENTS FOR SEVERELY HANDICAPPED CHILDREN, THE MCCARTYS ARE COAUTHORS OF ACTS OF KINDNESS, A YEAR OF KINDNESS AND THE DAILY JOURNAL OF KINDNESS.
‘चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकाच्या पहिल्या तीन भागांप्रमाणे या चौथ्या भागात जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सेन हे सुप्रसिद्ध लेखक परत एकदा देशविदेशातनं आत्मबळ वाढवणाया नव्या कथा मागवून त्यांची मेजवानीच घेऊन वाचकांच्या भेटीला आले आहेत. या वेळी त्यांच्या बरोबरीने प्रथमच हॅनॉक आणि लेडी मॅकार्टी या दांपत्यानं या संकलनकार्यात अमूल्य असा हातभार लावला आहे. प्रेम, शिकवणूक, पालकत्व, बुद्धीमत्ता, अडचणींवर मात, स्वप्नपूर्ती, मृत्यू, वाईटातनं चांगलं शोधण्याची कला अशा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असलेल्या हृदयस्पर्शी कथांचा नवा ठेवा या चौघांनी मिळून वाचकांसमोर उलगडला आहे. या कथांवर मननचिंतन करून तुम्हाआम्हा सर्वांचाच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल आणि बिकट सद्य:परिस्थितीमध्ये अशाच परिवर्तनाची निकडीची आवश्यकता आहे, याबद्दल वादच नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN #PRADNYAOAK
Customer Reviews
  • Rating StarCHATURANG 17-1-2009

    ‘चिकन सूप फॉर द सोल’ या जगप्रसिद्ध ‘बेस्ट सेलर’ पुस्तक मालिकेतील चौथ्या, पाचव्या व सहाव्या भागातील काही कथांचा उषा महाजन यांनी केलेला स्वैरानुवाद पेश करणारे हे सदर. या तिनही भागांच्या अनुवादांचे हक्क ‘मेहता प्रकाशन’ला मिळाले आहेत. यापूर्वी ‘मेहता प्राशन’ने पहिल्या व तिसऱ्या भागाचा अनुवाद पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे. ‘वेदना व दु:ख तर अपरिहार्यच असतं, परंतु सतत दु:खी राहणं हे मात्र ऐच्छिक असतं.’ - आर्ट क्लॅनिन शांत, एकाकी दफनभूमीच्या व्यवस्थापकाला एका स्त्रीकडून दर महिन्याला न चुकता चेक येत असे. ती स्त्री आजारी अवस्थेत त्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये अंथरुणावर पडून असे. गाडीच्या अपघातात मृत्यू पावलेल्या तिच्या मुलाच्या थडग्यावर वाहण्यासाठी ताजी फुलं विकत घेण्यासाठी तो चेक येत असे. एके दिवशी त्या दफनभूमीजवळ एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीत मागच्या सीटवर एक अतिशय निस्तेज वृद्ध स्त्री अर्धोन्मीलित डोळ्यांनी बसलेली होती. ‘या बार्इंची तब्येत अतिशय खराब झाल्यामुळे त्यांना चालता येत नाहीये,’ त्या गाडीच्या ड्रायव्हरने व्यवस्थापकाला सांगितलं. ‘तिच्या मुलाच्या थडग्यापर्यंत जाण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर गाडीतून येऊ शकता का? ...म्हणजे यांची तशी विनंती आहे तुम्हाला. बघा नं, त्या अगदी मृत्युपंथाला लागल्या आहेत. त्यांना मुलाच्या थडग्याचं अंतिम दर्शन घ्यायचं आहे.’ ‘या विल्सनबाई आहेत का?’ व्यवस्थापकाने विचारले. त्या माणसाने डोकं हलवून होकार दिला. ‘हं आता कळलं. दर महिन्याला त्या त्यांच्या मुलाच्या थडग्यावर फुलं वाहण्यासाठी चेक पाठवतात.’ तो व्यवस्थापक त्या माणसाबरोबर चालत जाऊन गाडीपाशी आला व आतमध्ये त्या बाईशेजारी बसला. ती वृद्धा खूपच अशक्त दिसत होती. तिचा मृत्यू जवळ आला होता, हे तिच्याकडे बघून जाणवत होतं, परंतु तरीही त्या व्यवस्थापकाला तिच्या चेहऱ्यावर काही तरी वेगळे भाव दिसत होते. तिचे निस्तेज, खोल गेलेले डोळे काही तरी जुनं दु:ख लपवत होते. ‘मी मिसेस विल्सन’ ती खोल आवाजात म्हणाली, ‘गेल्या दोन वर्षांपासून दर महिन्याला...’ ‘हो मला माहिती आहे आणि तुमच्या सूचनेनुसार मी ते करीत आलोय.’ ती पुढे बोलू लागली- ‘डॉक्टरांनी काही आठवड्यांचीच माझ्या जगण्याची हमी दिली आहे. त्यामुळे आज मी इथे येऊन पोहोचले. जगाचा निरोप घेताना माझ्या मनात कोणतीही खंत राहणार नाही. आता जगण्यासारखं काहीच उरलं नाहीय. परंतु मृत्यू येण्यापूर्वी मला एकदाच माझ्या मुलाच्या थडग्याचं अखेरचं दर्शन घ्यायचं अहे. आणि यापुढेही याच तऱ्हेने फुलं वाहण्याची तजवीज करायची आहे.’ एवढं बोलून ती खूप थकून गेली. गाडी त्या अरुंद रस्त्यावरून थडग्याच्या दिशेने जात होती. तिथे पोहोचल्यावर त्या बार्इंनी मोठ्या कष्टाने स्वत:ला थोडं ताठ करून मान उंचावून खिडकीतून तिच्या मुलाच्या थडग्याकडे नजर टाकली. त्याक्षणी सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. फक्त आजूबाजूच्या उंच उंच झाडांवर बसलेल्या पक्ष्यांची हलकी चिवचिव ऐकू येत होती. शेवटी तो व्यवस्थापक बोलू लागला- ‘बाई, एक सांगावंसं वाटतंय मला व सांगताना वाईटही वाटतंय. तुम्ही फुलं विकत घेण्यासाठी पैसे पाठवत होतात खरं, पण...’ त्या बार्इंना पहिल्यांदा काही ऐकूच गेलं नाही. असं वाटलं... पण सावकाशीने ती व्यवस्थापकांकडे तोंड वळवून म्हणाली, ‘दु:ख वाटतंय? तुम्हाला समजतंय का, तुम्ही काय बोलताय ते.. माझा मुलगा...’ ‘हो, मला जाणीव आहे त्याची.’ तो नरमाईच्या सुरात म्हणाला- ‘पण ऐका तरी- मी चर्चच्या एका संघटनेचा सदस्य आहे व आम्ही तर आठवड्याला हॉस्पिटल्स, तुरुंग, आधार केंद्र अशा अनेक ठिकाणांना भेट देत असतो. अशा जागी जिवंत माणसं राहात आहेत. त्यांना उत्साहित करण्याची गरज असते. अशा प्रकारच्या बहुतांश लोकांना मनापासून फुलं आवडतात. सुंदर सुंदर फुलं बघण्याचा, त्यांचा गंध घेण्याचा अनुभव ते घेऊ शकतात. ते थडगं... तिथे तर कोणी आता जिवंत नाहीय... फुलांचं सौंदर्य न्याहाळण्यासाठी की त्यांचा गंध नाकात भरून घेण्यासाठी...’ क्षीण आवाजात असं बोलून मान फिरवून, दुसऱ्या बाजूला बघू लागला. काही उत्तर न देता ती बाई मूकपणे तिच्या मुलाच्या थडग्याकडे एकटक बघत राहिली. नंतर सावकाशीने तिने हातानेच निर्देश केल्यावर ते सारे जण त्या व्यवस्थापकासह परत ऑफिसकडे येऊन पोहोचले. तो खाली उतरला व ते दोघे एकही शब्द न बोलता गाडीने पुढे निघून गेले. ‘मी तिचा अपमान केला आहे. असं काही तरी मी बोलायला नको होतं.’ तो स्वत:शीच पुटपुटला. काही महिन्यांनंतर परत एकदा ती बाई तिथे आलेली बघून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि यावेळी इतर कोणी गाडी चालवत नव्हतं, तर खुद्द ती स्वत: गाडी चालवत आली होती. त्या व्यवस्थापकाचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ‘तुमचं म्हणणं अगदी बरोबर होतं.’ ती त्याला म्हणाली, ‘अहो फुलांबद्दल म्हणतेय मी! म्हणून तर नंतर एकही चेक पाठवला नाही तुम्हाला. हॉस्पिटलमध्ये परतल्यावर माझ्या मनातून तुमचे शब्द जातच नव्हते. हॉस्पिटलमधल्या ज्या इतर रोग्यांसाठी एखादं फूलही येत नसे, त्यांच्यासाठी मी फुलं विकत घेण्यास सुरुवात केली. ती फुलं मिळाल्यामुळे व तीही एका अनोळखी व्यक्तीकडून, ते सगळे खूप खूश व्हायचे. त्यामुळे मलाही खूप आनंद, समाधान लाभू लागलं. ते सगळे तर आनंदी झालेच, पण त्यांच्यापेक्षा किती तरी पटीने मी अधिक आनंदी झालोय.’ ‘डॉक्टरांना उमगतच नाहीये की, अचानक कशामुळे मला बरं वाटायला लागलंय. पण मला मात्र उमगलंय बरं का!’ ...ती पुढे म्हणाली. - मूळ कथा : You Don`t Bring Me, Flowers Anymore ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more