* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE SOUL PART 4
  • Availability : Available
  • Translators : USHA MAHAJAN
  • ISBN : 9788184981971
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
JACK CANFIELD AND MARK VICTOR HANSEN, THE WORLD’S BEST LOVED MOTIVATIONAL SPEAKERS, INVITE YOU TO JOIN THEM FOR ANOTHER SATISFYING FEAST OF INSPRING STORIES AND LIFE AFFIRMING WISDOM. THIS TIME, JACK AND MARK HAVE JOINED FORCES WITH AMERICA’S FIRST COUPLE OF KINDNESS, HANOCH AND MELADEE MCCARTY. TOGETHER, THESE FOUR INSPIRING LITERARY CHEFS HAVE GATHERED TIME TESTED RECIPES FOR SUCCESS ANDHAPPINESS, FRESH ANECDOTES OF SHARING AND CARING, AND SAVORY SPRIGS OF HONESTY, INTEGRITY AND CARING, AND SAVORY SPRIGS OF HONESTY, INTEGRITY, RESPECT AND SELFESTEEM. YOU WILL AGAIN FIND HEARTWARMING STORIES ON YOUR FAVORITE TOPICS: LOVE, PARENTING, TEACHING AND LEARNING, DEATH AND DYING, PERSPECTIVE, ATTITUDE, OVERCOMING OBSTACLES, AND WISDOM. ENJOY THIS NURTURING BOOK BY YOURSELF OR SHARE IT WITH FRIENDS, FAMILY AND COWORKERS. IT WILL WARM YOUR HEART, STRENGTHEN YOUR SPIRIT AND IMPROVE YOUR OUTLOOK ON LIFE. JACK CANFIELD AND MARK VICTOR HANSEN, # NEW YORK TIMES BESTSELLING COAUTHORS, ARE PROFESSIONAL SPEAKERS WHO HAVE DEDICATED THEIR LIVES TO ENHANCING THE PERSONAL AND PROFESSIONAL DEVELOPMENT OF OTHERS. THEY ARE JOINED HERE BY HANOCH MCCARTY AND MELADEE MCCARTY. HANOCH IS PRESIDENT OF HANOCH MCCARTY & ASSOCIATES, AND IS INTERNATIONALLY ACCLAIMED AS AN AUTHOR AND LECTURER. MELADEE, A PROGRAM SPECIALIST FOR THE SACRAMENTO COUNTY OFFICE OF EDUCATION, FINDS PLACEMENTS FOR SEVERELY HANDICAPPED CHILDREN, THE MCCARTYS ARE COAUTHORS OF ACTS OF KINDNESS, A YEAR OF KINDNESS AND THE DAILY JOURNAL OF KINDNESS.
‘चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकाच्या पहिल्या तीन भागांप्रमाणे या चौथ्या भागात जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सेन हे सुप्रसिद्ध लेखक परत एकदा देशविदेशातनं आत्मबळ वाढवणाया नव्या कथा मागवून त्यांची मेजवानीच घेऊन वाचकांच्या भेटीला आले आहेत. या वेळी त्यांच्या बरोबरीने प्रथमच हॅनॉक आणि लेडी मॅकार्टी या दांपत्यानं या संकलनकार्यात अमूल्य असा हातभार लावला आहे. प्रेम, शिकवणूक, पालकत्व, बुद्धीमत्ता, अडचणींवर मात, स्वप्नपूर्ती, मृत्यू, वाईटातनं चांगलं शोधण्याची कला अशा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असलेल्या हृदयस्पर्शी कथांचा नवा ठेवा या चौघांनी मिळून वाचकांसमोर उलगडला आहे. या कथांवर मननचिंतन करून तुम्हाआम्हा सर्वांचाच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल आणि बिकट सद्य:परिस्थितीमध्ये अशाच परिवर्तनाची निकडीची आवश्यकता आहे, याबद्दल वादच नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN #PRADNYAOAK
Customer Reviews
  • Rating StarCHATURANG 17-1-2009

    ‘चिकन सूप फॉर द सोल’ या जगप्रसिद्ध ‘बेस्ट सेलर’ पुस्तक मालिकेतील चौथ्या, पाचव्या व सहाव्या भागातील काही कथांचा उषा महाजन यांनी केलेला स्वैरानुवाद पेश करणारे हे सदर. या तिनही भागांच्या अनुवादांचे हक्क ‘मेहता प्रकाशन’ला मिळाले आहेत. यापूर्वी ‘मेहता प्राशन’ने पहिल्या व तिसऱ्या भागाचा अनुवाद पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे. ‘वेदना व दु:ख तर अपरिहार्यच असतं, परंतु सतत दु:खी राहणं हे मात्र ऐच्छिक असतं.’ - आर्ट क्लॅनिन शांत, एकाकी दफनभूमीच्या व्यवस्थापकाला एका स्त्रीकडून दर महिन्याला न चुकता चेक येत असे. ती स्त्री आजारी अवस्थेत त्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये अंथरुणावर पडून असे. गाडीच्या अपघातात मृत्यू पावलेल्या तिच्या मुलाच्या थडग्यावर वाहण्यासाठी ताजी फुलं विकत घेण्यासाठी तो चेक येत असे. एके दिवशी त्या दफनभूमीजवळ एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीत मागच्या सीटवर एक अतिशय निस्तेज वृद्ध स्त्री अर्धोन्मीलित डोळ्यांनी बसलेली होती. ‘या बार्इंची तब्येत अतिशय खराब झाल्यामुळे त्यांना चालता येत नाहीये,’ त्या गाडीच्या ड्रायव्हरने व्यवस्थापकाला सांगितलं. ‘तिच्या मुलाच्या थडग्यापर्यंत जाण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर गाडीतून येऊ शकता का? ...म्हणजे यांची तशी विनंती आहे तुम्हाला. बघा नं, त्या अगदी मृत्युपंथाला लागल्या आहेत. त्यांना मुलाच्या थडग्याचं अंतिम दर्शन घ्यायचं आहे.’ ‘या विल्सनबाई आहेत का?’ व्यवस्थापकाने विचारले. त्या माणसाने डोकं हलवून होकार दिला. ‘हं आता कळलं. दर महिन्याला त्या त्यांच्या मुलाच्या थडग्यावर फुलं वाहण्यासाठी चेक पाठवतात.’ तो व्यवस्थापक त्या माणसाबरोबर चालत जाऊन गाडीपाशी आला व आतमध्ये त्या बाईशेजारी बसला. ती वृद्धा खूपच अशक्त दिसत होती. तिचा मृत्यू जवळ आला होता, हे तिच्याकडे बघून जाणवत होतं, परंतु तरीही त्या व्यवस्थापकाला तिच्या चेहऱ्यावर काही तरी वेगळे भाव दिसत होते. तिचे निस्तेज, खोल गेलेले डोळे काही तरी जुनं दु:ख लपवत होते. ‘मी मिसेस विल्सन’ ती खोल आवाजात म्हणाली, ‘गेल्या दोन वर्षांपासून दर महिन्याला...’ ‘हो मला माहिती आहे आणि तुमच्या सूचनेनुसार मी ते करीत आलोय.’ ती पुढे बोलू लागली- ‘डॉक्टरांनी काही आठवड्यांचीच माझ्या जगण्याची हमी दिली आहे. त्यामुळे आज मी इथे येऊन पोहोचले. जगाचा निरोप घेताना माझ्या मनात कोणतीही खंत राहणार नाही. आता जगण्यासारखं काहीच उरलं नाहीय. परंतु मृत्यू येण्यापूर्वी मला एकदाच माझ्या मुलाच्या थडग्याचं अखेरचं दर्शन घ्यायचं अहे. आणि यापुढेही याच तऱ्हेने फुलं वाहण्याची तजवीज करायची आहे.’ एवढं बोलून ती खूप थकून गेली. गाडी त्या अरुंद रस्त्यावरून थडग्याच्या दिशेने जात होती. तिथे पोहोचल्यावर त्या बार्इंनी मोठ्या कष्टाने स्वत:ला थोडं ताठ करून मान उंचावून खिडकीतून तिच्या मुलाच्या थडग्याकडे नजर टाकली. त्याक्षणी सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. फक्त आजूबाजूच्या उंच उंच झाडांवर बसलेल्या पक्ष्यांची हलकी चिवचिव ऐकू येत होती. शेवटी तो व्यवस्थापक बोलू लागला- ‘बाई, एक सांगावंसं वाटतंय मला व सांगताना वाईटही वाटतंय. तुम्ही फुलं विकत घेण्यासाठी पैसे पाठवत होतात खरं, पण...’ त्या बार्इंना पहिल्यांदा काही ऐकूच गेलं नाही. असं वाटलं... पण सावकाशीने ती व्यवस्थापकांकडे तोंड वळवून म्हणाली, ‘दु:ख वाटतंय? तुम्हाला समजतंय का, तुम्ही काय बोलताय ते.. माझा मुलगा...’ ‘हो, मला जाणीव आहे त्याची.’ तो नरमाईच्या सुरात म्हणाला- ‘पण ऐका तरी- मी चर्चच्या एका संघटनेचा सदस्य आहे व आम्ही तर आठवड्याला हॉस्पिटल्स, तुरुंग, आधार केंद्र अशा अनेक ठिकाणांना भेट देत असतो. अशा जागी जिवंत माणसं राहात आहेत. त्यांना उत्साहित करण्याची गरज असते. अशा प्रकारच्या बहुतांश लोकांना मनापासून फुलं आवडतात. सुंदर सुंदर फुलं बघण्याचा, त्यांचा गंध घेण्याचा अनुभव ते घेऊ शकतात. ते थडगं... तिथे तर कोणी आता जिवंत नाहीय... फुलांचं सौंदर्य न्याहाळण्यासाठी की त्यांचा गंध नाकात भरून घेण्यासाठी...’ क्षीण आवाजात असं बोलून मान फिरवून, दुसऱ्या बाजूला बघू लागला. काही उत्तर न देता ती बाई मूकपणे तिच्या मुलाच्या थडग्याकडे एकटक बघत राहिली. नंतर सावकाशीने तिने हातानेच निर्देश केल्यावर ते सारे जण त्या व्यवस्थापकासह परत ऑफिसकडे येऊन पोहोचले. तो खाली उतरला व ते दोघे एकही शब्द न बोलता गाडीने पुढे निघून गेले. ‘मी तिचा अपमान केला आहे. असं काही तरी मी बोलायला नको होतं.’ तो स्वत:शीच पुटपुटला. काही महिन्यांनंतर परत एकदा ती बाई तिथे आलेली बघून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि यावेळी इतर कोणी गाडी चालवत नव्हतं, तर खुद्द ती स्वत: गाडी चालवत आली होती. त्या व्यवस्थापकाचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ‘तुमचं म्हणणं अगदी बरोबर होतं.’ ती त्याला म्हणाली, ‘अहो फुलांबद्दल म्हणतेय मी! म्हणून तर नंतर एकही चेक पाठवला नाही तुम्हाला. हॉस्पिटलमध्ये परतल्यावर माझ्या मनातून तुमचे शब्द जातच नव्हते. हॉस्पिटलमधल्या ज्या इतर रोग्यांसाठी एखादं फूलही येत नसे, त्यांच्यासाठी मी फुलं विकत घेण्यास सुरुवात केली. ती फुलं मिळाल्यामुळे व तीही एका अनोळखी व्यक्तीकडून, ते सगळे खूप खूश व्हायचे. त्यामुळे मलाही खूप आनंद, समाधान लाभू लागलं. ते सगळे तर आनंदी झालेच, पण त्यांच्यापेक्षा किती तरी पटीने मी अधिक आनंदी झालोय.’ ‘डॉक्टरांना उमगतच नाहीये की, अचानक कशामुळे मला बरं वाटायला लागलंय. पण मला मात्र उमगलंय बरं का!’ ...ती पुढे म्हणाली. - मूळ कथा : You Don`t Bring Me, Flowers Anymore ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
लोकसत्ता १०.९.२०२३ (लोकरंग) वंदना बोकील-कुलकर्णी

माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्यानेती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’. ‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी. अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं. ‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे. या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते. कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच. नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे. या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे. या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते. या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं. मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे. दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी. ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं. लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका. ...Read more