* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619443
  • Edition : 7
  • Publishing Year : MARCH 1984
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL KNOW RANJIT DESAI AS A VERSATILE WRITER HE GOT HIS NAME AND FAME BECAUSE OF THE NOVELS, STILL HE STARTED HIS CAREER AS A WRITER WITH SHORT STORIES. DURING THE EARLY YEARS, HE MAINLY FOCUSED ON THE RURAL LIFE AND THE REALITIES THEREIN. LATER ON, HE TRIED TO WALK ON THE PATH OF HISTORY GIVING US WONDROUS STORIES WITH MAJESTIC ENVIRONMENT. HE SKETCHED PICTURES OF WELL KNOWN PERSONALITIES IN THE FIELD OF MUSIC AND ART. LATER ON, HE SWITCHED OVER TO STORIES WITH MORE STRESS ON NATURE, STARS ETC. MORPANKHI SAWALYA IS A COLLECTION OF 15 STORIES OF DIFFERENT ANIMALS, USED TO THE NATURE. THE PECULIARITY OF THESE STORIES IS THOUGH THEY ARE WRITTEN BY A HUMAN NOT EVEN A SINGLE HUMAN BEING COMES INTO OUR SIGHT THROUGHOUT AFTER GOING THROUGH THE WONDERFUL NATURE PICTURED BY RANJIT DESAI, WE WILL ONCE AGAIN REALISE HIS GREATNESS.
रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. कादंबरीलेखनामुळे त्यांनी दिगंत किर्ती मिळवली असली, तरी त्यांनी साहित्यिक कर्तृत्वाचा आरंभ कथालेखनानंच केला होता. सुरवातीच्या काळात त्यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण वास्तवाचा वेध घेतला. त्यानंतर इतिहासाच्या गर्भरेशमी, अद्भुतरम्य वातावरणात नेणाऱ्या मनोवेधक कथाही त्यांनी लिहिल्या. संगीतक्षेत्रात अलौकिक यश संपादन करणाऱ्या काही कलावंतांची सुखदुःखही त्यांनी आस्थेवाईकपणे चितारली. पुढच्या काळात त्यांनी अत्यंत प्रवाही शैलीत काही निसर्गकथाही लिहिल्या, काही नक्षत्रकथाही लिहिल्या, काही रूपककथाही लिहिल्या. मोरपंखी सावल्या या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहात निसर्गाच्या सावलीत वाढणाया प्राण्यांच्या पंधरा कथा साक्षेपानं एकत्रित केलेल्या आहेत. या सर्व कथांचं विलक्षण वैशिष्ट्य असं, की त्या पूर्णतः मानवविरहित आहेत. कथासूत्रात बांधलेली ही लालित्यपूर्ण निसर्गचित्र पाहून आणि अनुभवून, रणजित देसाई हा आपल्या काळातील केवढा थोर साहित्यिक आहे, याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarPrachi Kadam- Pustak Bistak

    श्रीमानयोगी,राधेय,पावनखिंड,स्वामी,लक्ष्यवेध या आणि यांसारख्या अनेक ऐतिहासिक पुस्तकांपेक्षा हे एक आगळं वेगळं निसर्गावर, त्याच्या सान्निध्यात राहणा-या प्राणी पक्ष्यांवर आधारित आणि विशेष म्हणजे मानवविरहित असं छोटसं पुस्तक. खरं तर मानवविरहित असलं तरी माणाच्या स्वभावाचं पुसटसं दर्शन घडवून जातं. वसंत आगमनाची चाहूल, पावसाच्या सरींनी तुडुंब भरून वाहणा-या वाहिनीचा आनंद, सागराच्या उन्मत्तपणाला मर्यादा आणू पाहणारी खडकाळी, उतार वयातही आपला स्वाभिमान डगमगू न देता आयुष्य संपवण्याचा निर्णय घेणारा गरूड, उन्हाने पर्णहीन आणि एकाकी झालेली सावर, खूप प्रयत्नांती खेकड्याची शिकार केलेल्या कोल्होबाचं सुख, अंधारातून प्रकाशाकडे झालेला ससोबाचा प्रवास आणि शेवट, कोंबड्याची पहाटेची बांग आणि प्राणी जगताची जंगलातील सकाळ, हुप्प्यांची,खारूताईची पळापळी, अशा मस्त कथांनी खिळवून ठेवणारं हे पुस्तक वाचायला निसर्गप्रेमींना नक्की आवडेल. ...Read more

  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    पशुपक्ष्यांचे अंतर्मन व्यक्त करणाऱ्या प्राणिकथा रणजित देसार्इंच्या कथालेखन प्रवासाला एक विशिष्ट वळण मिळाले ते ‘मोरपंखी सावल्या’मुळे. प्राणी जीवनावरील हा अनोखा कथासंग्रह १९८४ मध्ये वाचकांसमोर आला असून त्यात पंधरा प्राणिकथा आहेत. ‘‘या संग्रहातील कथा मझ्या आजवरच्या इतर कथांच्यापेक्षा जरा निराळ्या आहेत. मानवविरहित निसर्ग आणि त्या सावलीत वाढणाऱ्या या प्राणिकथा आहेत.’’ असे त्यांनी स्वत:च सुरुवातीला नमूद केलेले आहे. ग्रामीण समाजाला निसर्गाचे सान्निध्य सहज-सुलभ असते. निसर्गाशी जमवून घेत व प्रसंगी निसर्गाशी झुंज घेत ग्रामीण भागातील लोकांना जीवन व्यतीत करावे लागते. पशु-पक्षी-कीटक इत्यादींसह येणारा ग्रामीण जीवनातील निसर्गाचा घटक अपरिहार्यपणे स्वीकारावा लागतो. पर्यायाने याचे प्रतिबिंब मग इतर वाङ्मय प्रकारांप्रमाणेच कथेतही पडल्याचे दिसून येते. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्या प्रमाणेच रणजित देसार्इंच्या कथांमधून निसर्गाची अशी रेखाटने पाहावयास मिळतात. रणजित देसार्इंच्या निसर्गकथांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथांत निसर्गाला स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांचा निसर्ग जीवनाशी एकरूप झाल्यासारखा भासत नाही. कथांतील घटनांमधून निसर्ग डोकावण्याऐवजी निसर्गाच्या आधारेच घटना घडत राहते. एखाद्या पक्ष्याचा, प्राण्याचा किंवा किटकाचा उल्लेख येतो आणि ज्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडत असते, त्या निसर्गाचा आत्मस्पर्शी साक्षात्कार होऊन जातो. लघुकथा आणि लघुनिबंध यांच्यामधील सीमारेषा पुसट ठराव्यात, अशा प्रकारचे वर्णन या तीन निसर्गचित्रणामध्ये पहायला मिळते. कारण इतर कथासंग्रहांप्रमाणे कथानक, व्यक्तिचित्रण, प्रसंगवर्णन, वातावरणनिर्मिती इत्यादी घटकांद्वारे कथा फुलत न जाता ती निसर्गाच्या माध्यमातून विकसित होताना दिसते. पण प्रत्येक कथेत एखादा प्राणी आपल्या सर्व वैशिष्ट्यांसह वाचकांसमोर साकार होतो. वाघ आणि माकड यांच्यातील परस्पर संबंधांविषयीची जिज्ञासा ‘जिज्ञासा’ या कथेत आढळते. तर गरुडाचे जगणे, राजेपण, जगण्यातील आब, कालांतराने येणारे वार्धक्य, त्या जाणिवेने झोकून देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय, हे सर्व ‘निर्णय’ या कथेत सूचक शब्दात चित्रित झालेले आहे. ‘कीड’मध्ये छोट्या आणि मोठ्या गव्यांतील रोमांचकारी संघर्ष चित्रित झालेला दिसतो. माणूस जसा नेहमी सुखासाठी धडपडतो, तसेच प्राणीही नेहमी सुखाची अपेक्षा करीत असल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीनुसार एक जीव सुखासाठी दुसऱ्याच्या जिवावर अवलंबून असतो. ‘सुख’ या कथेतील कोल्हा खेकड्याची शिकार साधण्यासाठी अविश्रांत धडपडतो. नाना युक्त्या योजून आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा पाठलाग, खेकड्याचे सापडणे, निसटणे, शेवटचा रंगलेला अटीतटीचा सामना, बऱ्याच कष्टाने यशप्राप्ती झाल्याने कोल्ह्याला झालेला आनंद हे सर्व ‘सुख’मध्ये लेखक नाट्यपूर्ण रीतीने रंगवितो. वृद्धत्वाची सूचकता समर्थपणे प्रकट करणारी ‘पर्णहीन’, शिकार साधल्याच्या आनंदाची सूचना देणारी ‘अंधारातून उजेडाकडे’ किंवा हरिणांची प्रेमकहाणी असणारी ‘मृगजळ’ इत्यादी सर्व कथांतून झाडे, नदी, पाणी, ऊन, सावली, वारा, ओहोळ, झरा, वाघ, माकडे, कोल्हे, तरसे, चितळे, वाघळे, ससे, घुबडे, हरीण, मासे, कोंबड्या, गरुड, कावळे, कुत्री, चिमण्या यासारख्या निसर्गघटकांचे अस्तित्व पहायला मिळते. लेखकाच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीची आणि निसर्ग घटकांविषयीच्या चिंतनशीलतेची प्रचिती यातून येते. आटोपशीरपणा, प्रतिकात्मकता आणि सूचकता ही प्रमुख वैशिष्ट्ये यातील प्रत्येक कथेत आढळतात. लेखकाचा शिकारीचा नाद व त्याविषयीची जाण याचाही उपयोग प्रस्तुत कथालेखनासाठी झाल्याचे जाणवते. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांच्या अंतर्मनात शिरुन त्याची उकल करण्याचे लेखकाचे कौशल्य या कथासंग्रहात पणाला लागलेले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more