* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980486
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL AROUND US WE CAN SEE THE SPACE WITH WHICH SCIENCE IS MAKING PROGRESS IN ALL AREAS OF LIFE TODAY. THIS HAS FURTHER ENABLED TO MAKE OUR LIFE BETTER IN MANY WAYS. WE ARE ENDURING LESS PAIN OWING TO THE INVENTIONS. YET, THERE ARE A HUGE NUMBER OF THINGS AND ELEMENTS OF WHICH SCIENCE SEEMS TO FIND NO EXPLANATION. THERE MIGHT BE AN ANSWER SOMEWHERE BUT RIGHT NOW ALL WE ARE CLUELESS ABOUT THEM. THIS HAS FURTHER GIVEN RISE TO MANY WRONG ASSUMPTIONS AND MISCONCEPTIONS. WE AS HUMAN BEINGS ALWAYS GET CARRIED AWAY WITH MYSTERIES AND INDULGE US INTO THOUGHTS RELATED TO THIS VAGUENESS. MRS. GOGATE IS A WELL-KNOWN SCI-FI WRITER. HER MYSTERIES ALSO HAVE THE SAME CAPACITY OF CAPTIVATING THE MINDS OF HER READERS.
आजचं युग हे विज्ञानयुग आहे. विज्ञानाची घोडदौड सर्व क्षेत्रांमध्ये चालू आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक सुखकर, आरामदायी, वेदनारहित होत आहे. असं असलं तरी अजूनही कित्येक गोष्टी अशा आहेत, की ज्यांचं स्पष्टीकरण आजच्या विज्ञानाला देता येत नाही. असं स्पष्टीकरण कदाचित उद्या मिळेल. पण आज तरी त्यांच्याभोवती गूढतेचं धुवंÂ आहे. या धुक्यात दडलेल्या सत्याचं स्पष्ट आणि वास्तव दर्शन होत नाही आणि त्यामुळे त्याविषयी अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज निर्माण होतात. गूढ आणि विलक्षण गोष्टींचं माणसाला नेहमीच आकर्षण असतं. असं असेल का, असं खरंच घडेल का अशा विचारांनी तो भारला जातो. अशा काही भारणाNया कथांचा हा संग्रह. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या विज्ञानकथांप्रमाणेच या गूढकथा वाचकाला खिळवून ठेवतात.
पुणे मराठी ग्रंथालय राजेंद्र बनहट्टी पुरस्कार २००९
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
GHAR #SHUBHADA GOGATE #LANDGA #CHITR #VAT #VAHI #NANDITA DIVAKAR AMIT #ARCHANA #SAMITA #DIDIRAJE #GOVINDA #ROHIT #RAVI
Customer Reviews
  • Rating StarLOUKIK LOKASHA 20-9-2009

    कधी काळी मराठी साहित्यात गूढ कथांना खूपच मागणी होती. कोणत्याही दिवाळी अंकात एखादी गूढकथा असल्याशिवाय अंकाला परिपूर्णता येत नाही असे समजले जाई. विशेषत: रत्नाकर मतकरी यांची गूढकथा असलेल्या दिवाळी अंकाला प्रचंड मागणी असे. अलीकडच्या काळात गूढकथेविषयी औत्ुक्य काही प्रमाणात कमी झाली आहे हे खरे असले तरी याच काळात शुभदा गोगटे यांचे घर हे पुस्तक याच गूढकथा घेऊन आलेले आहे. मागच्या पन्नास वर्षात विज्ञानाने प्रचंड प्रगती केली. माणसाची पावले चंद्रावर पडली. आरोग्य तंत्रज्ञान या क्षेत्रातली प्रगती विचार करण्याच्या पलीकडची आहे. मानवी स्वभाव, मानवी विचार याबद्दलही संशोधन झाले. डॉ. सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्राचा पाया घातला. आज मानसशास्त्रातही प्रचंड प्रगती झाली आहे. माणसाचे जगणे, जगण्याचा उद्देश याबद्दल असंख्य ग्रंथ बाजारात दिसतात. तरीही अजूनपर्यंत कोणत्याही माणसाला माणसाच्या मनाचा अचूक वेध घेता आलेला नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण सर्वश्रुत आहे. जगातल्या एका माणसाचा चेहरा दुसऱ्या माणसाच्या चेहऱ्याशी मिळत नाही. मानवी स्वभावाचेही तसेच असते. एका माणसाचा स्वभाव दुसऱ्या माणसाच्या स्वभावाशी जुळत नाही. माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. आजच्या या प्रगतकाळातही काही माणसांना विज्ञानाच्या पलीकडे खूप काही असते असे वाटत असते. माणसाचा जन्म, त्याची वाढ आणि मृत्यू याचे चक्र अटळ असले तरी मृत्यूनंतरही एक वेगळे जग असते असा समज असलेली किंवा त्या दृष्टीने विचार करणारा एक मोठा वर्ग समाजात असतो. भारतीय माणसालाच गूढतेचे आकर्षण आहे असे नाही. जगभरातील माणसे रंगरुपाने वेगळे असू शकतात परंतु त्यांची विचार करण्याची पद्धत सारखीच असते. अत्यंत प्रगत समजल्या जाणाऱ्या राष्ट्रातूनही गूढकथा साहित्यांना चांगली मागणी असते. माणसाला जन्मापासून मृत्यूची भीती असते. कोणताही सजीव आयुष्यातला बहुतांशी वेळ मृत्यू कशाला म्हणता येईल त्याच विचारात घालवतो. बऱ्याच लोकांना मृत्यूनंतरचे जग कसे असेल, भारतीय परंपरेत तर पुनर्जन्माला खूपच महत्त्व दिले जाते. भारतीय तत्वज्ञान किंवा वैज्ञानिक परंपरा कोणताही सजीव ८४ लाख योनीचक्रातून फिरतो असे सांगत असते. माणसाला पुनर्जन्म मिळाला तर तो कशाचा असेल याबाबतही चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर शुभदा गोगटेंच्या या पुस्तकाकडे बघता येईल. या पुस्तकात असलेल्या पाचही कथातून माणसाला अमूर्त असे काही तरी दिसत असते. कथातील पात्रे आहेत त्यांच्यासोबत गूढतेची सावली आहे. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कधीकधी कथानकातील काही घटनांना विज्ञानाचा पाया असल्याचे जाणवते. गूढकथेसाठी काही शब्द ठरलेले आहेत. भाषा विशिष्ट पद्धतीची पाहिजे. पात्रनिर्मिती करताना प्रचंड कल्पकता दाखवावी लागते. एक भासमान जग प्रत्यक्षपणे उभे करणे सोपे नसते. या कामात शुभदा गोगटे या यशस्वी झाल्या आहेत असे म्हणावे लागेल. गूढकथांना साहित्यिक मूल्य असते का या प्रश्नाबद्दल चर्चा करण्याचे कारण नाही. अशा कथा वाचणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांची तशी गरज आहे. हे लोक गूढकथा फक्त एकाचवेळी वाचतात असे नाही तर एकच पुस्तक अनेक वेळाही वाचतात आणि त्यातून त्याना मानसिक स्तरावर त्यांना पाहिजे असते तसे समाधान मिळते. या बाबींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. वास्तववादी साहित्य लिहिणे काहीसे सोपे असते. दैनंदिन आयुष्यात दिसणारी माणसे, घडणाऱ्या घटना यांच्याविषयी कथेची फ्रेम तयार झाली की आतील त्रुटीच्या जागा कल्पनेने भरून काढायच्या असतात. गूढकथेबद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही. अशा कथातील जवळपास सर्व पात्रे काल्पनिक असतात. गूढकथा लिहिताना प्रचंड अशा कल्पनाशक्तीच्या वापर करावा लागतो. हे सर्व जमले तरच कथा जमते अन्यथा वाचक दहा-वीस ओळी वाचल्यानंतर पुस्तक बाजूला ठेवून मोकळा होतो. ‘घर’मधील कथा खूपच चांगल्या आहेत. वाचक एकदा पुस्तक हातात घेतले की ते पूर्ण करूनच बाजूला ठेवतो ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.