* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: EAT DELETE
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9789386342270
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
POOJA MAKHIJA HAS PENNED THIS RENOWNED BOOK `EAT DELETE: HOW TO GET OFF THE WEIGHT LOSS CYCLE FOR GOOD` AND ACCORDING TO HER THERE IS NO SHORTCUT TO LOSE WEIGHT. QUICK DIET WON’T HELP TO LOSE WEIGHT ,RATHER IT MAKES YOU WEAKER THAN BEFORE. SO IF YOU WANT TO LOSE WEIGHT AND ALONG WITH IT DO NOT WANT TO QUIT YOUR MOUTH WATERING BREAKFAST, THEN THIS BOOK WILL SHOW YOU THE RIGHT PATH. IN THE BOOK THE WRITER HAS SHARED SCIENTIFIC WEIGHT LOSS PRINCIPLES AND DIETARY STRATEGY ALONG WITH VALUABLE INSIGHTS FROM PSYCHOLOGISTS TO PRESENT A HOLISTIC MIND-BODY SOLUTION TO WEIGHT LOSS.
आहाराच्या सवयींबाबत तारतम्य बाळगणं म्हणजे तारेवरची कसरत. त्यात सामान्य माणसाला आहार घटकांची पुरेशी माहिती नसते. हे सामान्य ज्ञान सोप्या , सहज भाषेतून या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचतं. प्रथिने, कर्बोदकं आणि इतर आहार घटक, ते उपलब्ध असणारे पदार्थ आणि त्यांचा दैनंदिन आहारातील समावेश , या सर्व गोष्टींची शास्त्रोक्त माहिती या पुस्तकातून समोर येते. पुजा मखिजा यांची सांगण्याची रीत या पुस्तकाची जमेची बाजू. माणसाच्या आहाराच्या सवयींविषयी बोलताना त्या अनेक गमंतीशीर संदर्भ देतात. या आहाराच्या सवयींना त्या माकडाची उपमा देतात. त्या म्हणतात, माकडासारखा आहार- म्हणजे एक खूळ संपलं की दुसरं खूळ डोक्यात घेणारा आहार. अकाई बेरीजपासून अ‍ॅगयपल सायडर व्हिनिगरकडे धाव घेणारा आहार. कोणतीही नवी, चकचकीत, आकर्षक गोष्ट पाहिली की, माकड त्यावर झडप घालतं, त्यातला काही भाग टाकून देतं आणि फक्त आवडीचा तेवढाच खातं, तसा हा आहार असतो. `मंकी डाएट` तुम्हाला `नव्या` अन्नपदार्थाबद्दल अर्धी कच्ची माहिती देतं आणि त्याचे फायदे अवास्तव वाढवून सांगतं. अशा डाएटमध्ये एकाच अन्नघटकाचा अतिरेक असतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SUDOULRAHA #EAT.DELETE. #सुडौलराहा #HEALTHCARE&PSYCHOLOGY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNITIKANE #सुनीतिकाणे #POOJAMAKHIJA "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 27-12-2019

    बांधा सडपातळ राखण्यासाठी तोंडावर ताबा ठेवण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण आजूबाजूला चमचमीत पदार्थ हात जोडून उभे असताना त्यांचा अपमान तरी कसा करायचा, असा प्रश्न आज अनेकांना पडतो. डाएट म्हणजे बिनसाखरेचे, बिनतेलाचे, बिनमैद्याचे, बिनमिठाचे, थोडक्यात अतिय सपक पदार्थच डोळ्यांसमोर उभे राहतात आणि मग सुडौल राहण्याचा विचार मागे पडतो. बॉलीवूड स्टार्सना आहाराचे धडे देणाऱ्या पूजा मखिजा यांनी ‘इट डिलिट’ या पुस्तकाचा सुनीति काणे यांनी अनुवाद केला आहे. झटपट वजन घटवण्याचं जे वेड सध्या सर्वत्र पसरलेलं दिसतं, त्यापसून दूर राहण्याचा सल्ला लेखिकेने दिला आहे. या वेडामुळे चिडचिड, अशक्तपणा, केस-त्वचेशी संबंधित तक्रारी, स्नायूंचा ऱ्हास अशा समस्या उदभवू शकतात, अशी धोक्याची घंटाही यात वाजवण्यात आली आहे. एवढा सगळा उपदव्याप केल्यानंतर वजन पुन्हा पूर्वपदावर आले, तर सगळे मुसळ केरात जाण्याची भीतीही यात व्यक्त करण्यात आली आहे. अन्न म्हणे आपल्या समस्या सोडवण्याचा मार्ग असे मानून बटाट्याचे वेफर्स खात किंवा चॉकलेट चघळत चर्च करणेही योग्य नाही आणि अन्नामुळे वजन वाढते, असे मानून त्याला आपला शत्रू समजणेही चुकीचेच हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या भावनांचा आपल्या खाण्याच्या इच्छेशी काही संबंध आहे का, वजन घटवण्याची आपली खरोखरच मानसिक तयारी आहे का, बारीक होण्यासाठी कोणी तुमच्यावर दबाव आणत आहे का, असे प्रश्न स्वत:लाच विचारण्याचा सल्ला यात देण्यात आला आहे. वजन कसं आणि कधी करावं, प्रगती कशी तपासावी, सकारात्मक कसं राहावं, याच्या टिप्सही यात मिळतील. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, SAPTARANG 12-03-2017

    सडपातळ राहण्यासाठी खाणं कमी केलं पाहिजे, आवडीच्या पदार्थांचा त्याग केला पाहिजे, असा अनेकांचा समज असतो. पण ही खवय्येगिरी सांभाळूनही सडपातळ कसं राहता येऊ शकतं, हे पूजा मखिजा यांनी सांगितलं आहे. त्यांच्या ‘इट-डिलिट’ या पुस्तकाचा अनुवाद सुनीती काणे यांनीकेला आहे. अन्न हा मित्र की ‘शत्रू’, स्वत:च्या आहाराला कसं पडताळून बघायचं, मनाचा निग्रह कसा करायचा, मानसिकता कशी बदलायची अशा अगदी मूलभूत गोष्टींची चर्चा त्यांनी केली आहे. ‘आहाराबाबतच्या जुन्या सवयींना रामराम ठोका’, ‘हालचाल करा आणि वजन उतरवा’, ‘खा’, ‘जीवनशैलीला मुरड घाला’ असे कानमंत्र सांगत त्यांनी त्याच्यामागचं तत्त्वही समजावून सांगितलं आहे. सहज पटतील अशी उदाहरणं आणि सहजसाध्य गोष्टी यांच्यामुळे कुणालाही पुस्तकातल्या सल्ल्यांचा उपयोग होईल. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    सुदृढ आयुष्याचा गुरुमंत्र ... माणूस हा सवयींचा गुलाम असतो. सवय एकदा लागली की ती बदलणे दिवसेंदिवस कठीण होत जाते. आहाराच्या चुकीच्या सवयी तुमच्या आरोग्याचे मोठे नुकसान करू शकतात. जगात जितके लोक उपाशी राहिल्याने मरतात त्यापेक्षा खूप जास्त लोक खाण्या्या चुकीच्या पद्धतींमुळे मरतात. आहाराच्या या चुकीच्या सवयींना नियंत्रणात ठेऊन आरोग्य सुधारण्याचा मंत्र पूजा मखिजा या पुस्तकात देतात. पूजा मखिजा यांच्या ‘इट डिलिट’ या पुस्तकाचा मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘सुडौल रहा’ नावाने अनुवाद प्रसिद्ध केला आहे. या पुस्तकामुळे मखिजा यांचा आरोग्य मंत्र मराठी वाचकांना अनुभवता येणार आहे. आहाराच्या सवयींबाबत तारतम्य बाळगणं म्हणजे तारेवरची कसरत. त्यात सामान्य माणसाला आहार घटकांची पुरेशी माहिती नसते. हे सामान्य ज्ञान सोप्या, सहज भाषेतून या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचतं. प्रथिने, कर्बोदकं आणि इतर आहार घटक, ते उपलब्ध असणारे पदार्थ आणि त्यांचा दैनंदिन आहारातील समावेश, या सर्व गोष्टींची शास्त्रोक्त माहिती या पुस्तकातून समोर येते. पुजा मखिजा यांची सांगण्याची रीत या पुस्तकाची जमेची बाजू. माणसाच्या आहाराच्या सवयींविषयी बोलताना त्या अनेक गमंतीशीर संदर्भ देतात. या आहाराच्या सवयींना त्या माकडाची उपमा देतात. त्या म्हणतात, माकडासारखा आहार- म्हणजे एक खूळ संपलं की दुसरं खूळ डोक्यात घेणारा आहार. अकाई बेरीजपासून अ‍ॅपल सायडर व्हिनिगरकडे धाव घेणारा आहार. कोणतीही नवी, चकचकीत, आकर्षक गोष्ट पाहिली की, माकड त्यावर झडप घालतं, त्यातला काही भाग टाकून देतं आणि फक्त आवडीचा तेवढाच खातं, तसा हा आहार असतो. `मंकी डाएट` तुम्हाला `नव्या` अन्नपदार्थाबद्दल अर्धी कच्ची माहिती देतं आणि त्याचे फायदे अवास्तव वाढवून सांगतं. अशा डाएटमध्ये एकाच अन्नघटकाचा अतिरेक असतो. मखिजा यांचा सोप्या भाषेतला मंत्र सुनिती काणे यांनीही नेमक्या भाषेत अनुवादित केला आहे. आहारविषयक शास्त्रीय संकल्पनाही सहज शैलीत स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक खऱ्या अर्थाने सदृढ आयुष्याचा गुरुमंत्र ठरु शकते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
लोकसत्ता १०.९.२०२३ (लोकरंग) वंदना बोकील-कुलकर्णी

माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्यानेती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’. ‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी. अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं. ‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे. या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते. कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच. नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे. या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे. या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते. या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं. मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे. दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी. ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं. लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका. ...Read more